Talk

Pune (India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

TALK IN MARATHI-PUNE-1973-0916

जगातल्या पाठीवर कुठंही चर्चिला गेलेला नाही जितका आपल्याभारात वर्षात झालेला आहे कारण हिंदुस्थान ज्याला आपण पूर्वी भारतवर्ष म्हणत होतो ,हिच एक योग भूमी आहे. बाकी सगळ्या भोग भूमी आहेत . हि एक यॊग भोमि आहे म्हणून इथे फार मोठ मोठ्या प्रवृत्तीने म्हंटलं पाहिजे किंवा देवांनी अवतार घेतलेले आहेत आणि ह्या भूमीतच ह्या विषयवर हजारो वर्षांपासून म्हणजे कृष्णाला जर ६ हजार वर्षे झाली असतील तर रामाला जवळ जवळ ११ हजार तरी वर्ष झाली असतील आणि त्याच्या आधी कितीतरी आधी पासुन हजारो वर्षांपूर्वी वेदात वैगरे, इतिहासकारांना कदचित त्यांना पटायचे नाही माझे म्हणणे पण हझारोवर्षांपासून ह्या भारत वर्षामध्ये तपस्वी मुनींनी जे दृष्टा होते त्यांनी आत्मसाक्षत्कारावर पुष्कळ काम केलेले आहे पण आज काळ त्यांच्याबद्दल वाचतेय कोण , त्यांच्या बदल जाणतय कोण ,आपण हिंदू हिंदू म्हणून लोक फार गर्वाने फिरतात आणि मी बघते कि प्रत्येक गोष्टींमधय उठलं कि आम्ही हिंदू आहोत ,म्हणजे आम्ही काही विशेष आहोत असे सुद्धा पुष्कळ लोकं स्वतःला समजतात,पण ज्या आदिशंकराचार्यांनी ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना वैगरे ज्यांनी केलेली आहे , त्यांनी जे तत्त्व या संसारात मांडलेले आहे,त्यांनी जी चैतन्यावर कामं करून त्याचं निरूपण केले आहे त्याबद्दल फार छाती ठोकपणे साऱ्या संसारा समोर इतक्या मोठ्यापणे सत्य मांडलेलं आहे , ते कोण जाणताय ? त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाही.फक्त ब्राह्मण हा पूजेला पाहिजे अशा रीतीने आपल्या बद्दल एक कल्पना डोक्यावर चालवली आहे पण ब्राह्मण म्हणजे कोण ? हे सुध्दा जे त्यांनी सांगितलेलं आहे , ब्राम्हण तो कोण ज्याचा दुसरांदा जन्म झालेला आहे. आणी तेच कृष्णांनी सांगितले आहे तेच सगळ्या मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे ,म्हणजे महंमद साहेबांनी सुद्धा तेच सांगितलेले आहे, आपले साईबाबा आहेत शिर्डीचे त्यांनी सुध्दा तेच सांगितलेले आहे, नानक होते त्यांनी तेच सांगितलेले आहे, जाणकांनी तेच सांगितलेले आहे, झोरास्त्रांनी तेच सांगितलेले आहे.

प्रत्येक देशात कुठेही जिथे सत्य जन्माला आले तिथे सत्य काय आहे हेच सांगितले आहे.आज तुम्ही इथे उभे आहात आणि मी जर पांढरी साडी नेसलेली आहे ,आणि तुम्हाला जर डोळे असतील तर तुम्ही सगळ्यांना जाऊन काय सांगाल की माताजींनी पांढरी साडी घातलेली आहे तुम्हाला काही दुसरं केव्हा दिसेल जेव्हा तुमच्या डोळ्यावरती काहीतरी गुंगी तरी आली असेल किंवा तुम्हाला डोळेच नसतील ज्यांना डोळे होते त्यांनी सत्य एकच सांगितले होते. सत्य हे एकच आहे आणि त्याचा मार्ग सुध्दा एकच आहे . आणि सगळ्यांनी एकच मार्ग सांगितला आहे . फक्त आपण वेड्या सारखे इकडे भांडत बसतो एकातने अनेक झालो तरी आपण एकाच मुळावर आहोत हे समग्रतेत उतरल्याशिवाय समजणार नाही . आणि त्यात उतरण्यासाठी माणसाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय ते जमणार नाही. आता हे थोडंसं दुसरं काही सांगितल्या बरोबर पुष्कळ लोक ???? वैगरे जर इथे बसले असतील तर ते सुध्दा माझ्यावर बिघडू शकतात . ह्या जगात मला क्रॉसवर वैगरे काही चढवणार नाहीत किंवा रामाला वनवास झाला तसा मला तुम्ही वनवासात वगैरे पाठविणार नाहीत अशी मला अजून खात्री वाटते ,अजून . गीतेत सुध्दा कृष्णानें पहिल्यांदा फार छाती ठोक पणे (म्हणजे त्यांना घाबरायचं असं काही कारण नव्हतं ) सांगितले आहे कि त्याला तू आतमध्ये जाणुन घे. अर्जूनाला स्पष्टपणें सांगितले आहे की त्याला (आत्म्याला ) जाणलं पाहिजे. तो जाणल्याशिवाय तो झाल्याशिवाय बाकी सर्वकाही व्यर्थ आहे . हेच उत्तम आणि तेच मिळविले पाहिजे . मग बाकीचे जे सांगितले असेल ते का? असा प्रश्न लोकांना पडतो . कृष्णात आणि माझ्यात तोच फरक आहे आणि तो राहणारच . कृष्ण हा राजकारणी पुरुष होता आणि त्याला माहित होते की महामूर्खांच्या डोक्यामध्ये राजकारण खेळल्याशिवाय अक्कल येत नाही . जर त्यांना सरळ तोंडाने सांगितले कि हे करा तर ते कधीही करणार नाहीत . उलट मार्गानं जातील , म्हणून त्यांना सांगायचं बर तेही करा ,तेही करा ,तेही करा . आणि शेवटी मग धडपडत इकडे या . ते म्हणजे असं आहे की उदाहरणार्थ आपण असं बघूया , की एक मुलगा गाडीवर बसलेला आहे आणि त्याचं घोडं हे पाठीमागे बांधलं आहे आणी तो गाडी हाकतो आहे .त्याचे वडील आले आणि त्याला सांगितले हे तु काय करतोय ? तू घोडं पुढे करून घे म्हणजे तुझी गाडी पुढे जाईल . तर तो मुलगा म्हणतो नाही हे असंच घोडं हाकणार आणी माझी गाडी पुढे जाईल . तर ते (वडील) म्हणतात बर हाक मग , थोडंसं हाकून बघ. पण त्याच्यामध्ये राजकारण आहे म्हणजे त्या राजकारणामध्ये सर्व चैतन्यमय divine आहे .त्या राजकारणामध्ये फार मोठा ???आहे. त्याची लीला आहे फार मोठी. मग वडील म्हणतात हो तू अगदी असच कर. खूप मार आणि गाडी चालव . म्हणजे कस ? त्यांनी सांगितलं की तू त्या चैतनल्याला आपल्या आतमध्ये जाण , त्या चैतन्यामध्ये जागा हो आणि त्याला अनुभव. हेच सत्य आणि हेच पुरुषार्थाचं कार्य आहे . पण अर्जुनाला ते पटलं नाही. त्यांनी विचारलं हे काय ? तू मला सांगतो कि तू आत मध्ये जा आणि इकडे सांगतोस कि तू युद्धावर जा. म्हणजे हे कस काय ?

अर्जुनाचा अर्थ त्याला तरी कळला कि नाही माहीत नाही. पण कृष्णाला एवढं मात्र कळलं कि ह्याना हे जमायचं नाही. अजून हि स्तिथी नाही. कृष्णांनी सांगितलं होत कि तू त्याला जाण आणि साक्षी हो . मग तू रणांगणात असलास , स्मशानात असलास, घरात असलास, वनात असलास, जनात असलास तरी तिथंच आहे . तेव्हा त्यांनी म्हटलं कि अस कस शक्य आहे ? तेव्हा तो म्हणाला बरं दुसरा मार्ग आहे . तो kai ? आता ह्याच्या मध्ये राजकारण आहे पण त्यातही डिप्लोमसि बघा त्याची . त्याला सांगितलं कि तू कर्म कर आणि कर्माच फळ तू देवावर ठेव. आता हे बघा हं कृष्णाची माखन चोरी कशी असते ती . तुम्ही जर कर्म करता आणि तुमच्यात करता जर तुमच्यात जागृत आहे, हे मी करतो आहे असं जर तुम्हाला कळलं आणि असं वाटत असलं रात्रं दिवस कि मी हे करतो आहे तेव्हा त्याचा फळ तुम्ही देवावर कस घालणार ? अशक्यातली गोष्ट आहे . जेव्हा तुम्ही जे कार्य करता तेव्हा त्याचं फळ तुम्ही देवावर घालू शकत नाही . आणि असं जे लोक म्हणतात. पुष्कळ लोकांनी असेही म्हटलेले मी ऐकलेले आहे कि अहो आम्ही जे जे करतो त्याचं सगळं फळ आम्ही देवावर टाकतो. 7’34

म्हणजे अगदी नाटक आहे सगळं खोटं, ते सत्य नाही.जोपर्यंत तुम्ही काही करता तोपर्यन्त त्याचं फळ तुम्ही देवावर टाकूच शकत नाही.फक्त काही जर तुमच्या हातुन घडलं, म्हणजे सुर्याचा प्रकाश. अकर्मात तो उभा आहे वहात आहे प्रकाश.तो काही म्हणत नाही.मी काही करतो. म्हणून कोणी काही सूर्याला दहा शिव्या केल्यात काय किंवा त्याचं वंदन केलं. हे सगळं एक सारखं.नदी वहात आहे.नदीला काही वाटत नाही कि मी वहात आहे की माझ्यातून पाणी वाहतंय कि त्याच्यातून जीवन वाहतंय, कि लोकांना ते पाहिजे आहे.ती आपली वहात आहे. सुकली तर लोक शिव्या देतील.दिल्या तर बरं नाही दिल्या तर बरं.ती काही करतच नाही. ती आपली वाहत राहते.जो काही करत नाही फक्त त्याच्या हातून घडत आहे, त्याचं आपोआपच ऑटोमॅटीकली त्याचं कार्य जेआहे ते परमेश्वरावर आहे.त्याचं फळ आणि कार्य सर्व काही परमेश्वरावर असतं.तो जे काही करतो ते सगळंच सगळं परमेश्वराचं असतं.तो नुसता साक्षी बघत असतो.तेव्हा आपल्याकडे जे लोक कर्म योग घेऊन बसलेले आहेत त्यांना मला स्पष्ट असं सांगावंसं वाटतं कि ह्याच्यात कृष्णाची माखनचोरी ओळखून घ्यावी.इतकं भयंकर विचार आहे ????????? त्याला मी जितकं ओळखते फार कमी लोक ओळखत असतील.इतकंच नव्हे तर माणसाची चातुरी तो ओळखत होता आणि मनुष्याचा अहंकार जरा जरा गोष्टीला दुखावतो . पण आईचं तसं नाहीये . आई जर बाहेर आली आणि तीने पाहीले कि हा मुलगा आपला ???? चुकला आहे . कि जी गाडी हिचे घोडं मागं आहे तर ती त्याला सांगेल काय वेड्यासारखं करतो? चल हे घोडे पुढे कर आणि चालू कर. आई म्हणेल , आई सरळ सांगेल हे चुकलेलं आहे. बघायलाहे काहीतरी कशाला करतो? वडील तिथे हासत बघत राहतील.बघूया कसं काय चाललंय? हा फरक आई आणि वडिलांचा आहे.कर्मफळ देवावर टाकता येणारच नाही जोपर्यंत तुम्ही अकर्मी होत नाही तुमच्या हातून काही कर्म होतंच नाही. नुसतं घडतंय असं जोपर्यंत तुमचं होणार नाही तोपर्यंत कर्मफळ आपण देवावर टाकू शकत नाही.आता आपले doctor आहेत. आजच आम्ही एका पेशंटला बघायला गेलो. भयंकर आजार आहे. [इनऑडिबल] साडेतीन वर्षांपासून होतंय. झालं, प्रेम द्यावं ,दिलं मग? बरे होतील कि नाही होतील, काही सांगता येत नाही.आम्हाला काय वाटलं ? बरे वाटले कि वाईट ? काही झालं नाही , आम्ही नुसतं तिथे गेलो होतो बघायला . जागृती झाली एवढं म्हणाल . झाली ! आम्ही केली असं कोणी काही म्हंटलं नाही . ते म्हणाले जागृती झाली . काहीतरी, काही नाही.पण ते जर नुसते doctor असते आणि realised नसते तर म्हणाले असते, कि अहो ह असं आहे कि मी इतकं केलं , हे तुमच्यासाठी मी केलं . ह्यांना मी बरं केलं किंवा मी ह्यांचं वाईट केलं . हा मोठा भारी फरक आहे दोन्ही गोष्टीत. तेव्हा आपलं कर्म फळ आम्ही देवाच्यावर टाकतो असा विश्वास घेऊन जे लोक चालतात ते स्वतःच्या भ्रांतीतच नाही पण आपल्या साठी ती एक मोठी [इनऑडिबल] . अश्या खोट्या भ्रामकल्पनेत राहून आजपर्यत कधी परमात्मा त्यांना मिळाला नाही . आणि ज्यांना मिळवायचा नाही ते आशाच कल्पनेत फिरून फिरून अनंत जन्माला पावतात आणि अनंत जन्म घेऊन सुध्दा त्यांना काहीही मिळत नाही . आणि असा ज्यांना विचार करायचा त्यांनी खूशाल करावा कृष्णाच्या बाबतीत पण मी असे म्हणेल थोडासा इकडेही विचार करा बरं . एवढंच म्हणेन कि मुलांना ऐकायला नाही आलं लवकर, समजलं नसतील , अजुन जरा समजाऊन सांगावं . बघायचं ,पटतं कि नाही . पुढे त्यांनी भक्तीचं सांगितलं , भक्तीपण बघा कसं डिप्लोम्यासीचा शब्द बघा. अनन्य भक्ती कर. पुष्पम फुलम तोयम. काही असलं तर ते मी स्वीकार करीन, स्वीकार करतो पण देतोस काय ? तेव्हा त्याने बरोबर सांगितलेले आहे कि तुम्ही अनन्य भक्ती करा . अनन्य हा शब्द संस्कृतात जाणणारे इथे पुष्कळ पुण्याला आहेत, अनन्य म्हणजे दुसरा कोणी नाही . आणि दुसरा जेव्हा कोणी नसतो तुम्हीच तो होऊन जाता तेव्हा कोणाची भक्ती करायची बुवा ? बघा आता , अनन्य भक्त आम्ही! अहो अनन्य भक्त कशे होणार तुम्ही? अनन्य झाले म्हणजे तुम्ही साक्षात्कारी आहात ज्यावेळेला तुम्ही अनन्य झाले तेव्हा तरी साक्षात्कार होतात मग तुम्ही भक्तीच्या रसात उतरता. भक्ती करायची काय ? उठले तर भक्ती , बसले तर भक्ती, चालले तर भक्ती . मग भक्ती म्हणजे काय?

परमेश्वराच्या हातात जर तुम्ही खेळणे झालात तर तोच भक्त. मग त्याने बसवल काय !उठवलं काय ! चुलीत घातले काय ! किंवा क्रुसावर टांगलं काय. काहीही केलं तरी ती भक्तीच . जे काही तो मनुष्य करेल ते सगळ परमेश्वराच्याच हातातलं खेळणं असल्यामुळे तो काही करतच नाही.[….] आता ह्याच्यावरती पुष्कळ लोक अगदी आधी कृष्णाचे कैवारी म्हणजे वकील आहेत इथं बरं का? इतके कैवारी आहेत, कृष्णाबद्दल जेव्हढा मला आदर आहे , तितका कोणाला नाही, असणं शक्य नाही.कारण त्याच्याबद्दल जाणायला पाहिजे .त्याचं नाव नुसतं घेऊन किंवा त्याचं कैवार घेऊन किंवा त्याच्यासाठी भांडणारे लोक पुष्कळ पहिले पण कृष्णाला जाणणारे मला कुणी एवढे दिसत नाही . कृष्णाला जाणलं पाहिजे , हे मुख्य संबंध गीतेचं सार हेच आहे कि तू मला जाण . सर्व धर्मं नाम परित्यजे . सर्वकाही बाहेरचं सोड आणि फक्त तू मला शरण हो. म्हणजे मी जी चैतन्य स्वरूप शक्ती आहे त्याच्यात तू एककार हो . हे त्यांनी इतक्या स्पष्टपणे सांगितलं तरी लोकांच्या लक्षात आलं नाही.लोकांच्या लक्षात येत नाही त्याला कारण आहे . आत्मसाक्षात्कार करा म्हंटलं कि लोक अर्धे पाळतात घरी . ते नको, आपल्याला बसायला जमणार नाही . पण मी तुम्हाला जर हातातून अंगठी काढून देते, काही जादूमंतर करून दाखवते कि झालं हा हा हा …. हजारो माणसं जमतील. काय अहो का.काय मिळालं त्याच्यात तुम्हाला? असा जर कोणी प्रश्न विचारला कि तुम्हाला ह्याच्यात काय मिळालं या चमत्कारामध्ये ? म्हणजे तुमचं लक्षच मुळी जड आहे.सगळ्या जड गोष्टीं वरती तुमचं लक्ष उतरलं आहे . आता प्रश्न कोणी विचारला कि गायत्री मंत्र जर शंभर माणसांनी , ब्राह्मणांनी म्हंटला , आहेत कुठे ब्राह्मण ? आहेत कुठे ते द्विज ?ते ब्राम्हण कुठे ज्यांचा खोचरातून जन्म झालेला आहे? तेच तर मी करायला आलेले आहे. पण असे मला म्हणतात कि त्या ब्राह्मणांनी गायत्री मंत्र म्हंटलं तर काहीही उपयोगाचं नाही. हे कनेक्शन होतं हे आपल्याला माहिती आहे . हे कनेक्शन जर आम्ही मेन्सला लावलं नाही तर ह्या १०० काय पण १००० लोकांनी माणसांनी मंत्र म्हंटला तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? त्यालाच मी ब्राह्मण म्हणते जो आत्मसाक्षात्कारी. ज्याचा जन्म पुन्हा झालेला आहे, ज्यांनी ब्रह्माला जाणलं आहे तोच ब्राह्मण आहे . हे इथून तिथून सगळ्यांनी सांगितल्यावरती तुम्ही उगीचच कुणाला ब्राह्माण म्हणतात ? म्हणून [……….], अश्या सगळ्या ब्राह्मणांना माझा नमस्कार वारंवार आहे. ब्राह्मणत्वाचे नाटक करता येत नाही . हे असलीयत आहे , खरी गोष्ट आहे. असायला पाहिजे , वस्तित्व आहे . ते व्हायला पाहिजे आणि म्हणून ज्यांना अगदी खोट्याचा तिटकारा त्यांनी हा खोटेपणा काढून टाकायला पाहिजे . एकदा ते साधल्या बरोबर आपल्याला कळेल कि ब्राह्मण हा आतमध्ये आहे. जसा पक्षी दोनदा जन्माला पावतो तसाच मनुष्य सुध्दा दोनदा जन्माला पावतो.हे सर्व धर्माच्या लोकांनी सांगितलं आहे. आणि ज्यांनी सांगितलं नाही ते आत्मसाक्षात्कार झालेले नव्हते . म्हणजे असे पुष्कळ आहेत इकडे कोपऱ्यात म्हणे आमचे गुरुजी आहेत त्यांनी सांगितलं कि हे सर्वकाही करायचं नाही . बर ! बरोबर आहे , पण ते कोण आहेत? काय आहेत ते देवाला ठाऊक. गुरु तोच जो तुमच्यापेक्षा वर जाऊन आणि ज्याला आत्मसाक्षात्कार कमीत कमी एवढं तरी झालं पाहिजे. धर्माच्या बाबतीत आपल्याला काहीही कल्पना नाही . जे काही पुस्तकात वाचलंय ते मान्य केलं. हि पुस्तकं तरी कोणी लिहली आहेत? आता समाजा आपण जर समजा मुद्रणालयात गेलो आणि तिथे जाऊन आपण पुस्तकं लिहली . ती छापली जातील . कोणीही जे छापलं ते रामायण होत नाही.. कोणीही म्हटलं कि ती गीता होत नाही . जे मेले ते सगळे संत होत नाहीत . हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यांची पुष्कळ लक्षण आहेत. १६:२३

परवा मी असं बोलताना म्हंटलं कि झोरस्टर हाच महंमद , झोरस्टर हाच जनकाचा अवतार ,आणि तेच साईबाबा आहेत.तर काही लोकांना हे असं खटकलं कि माताजी अशी कशी गोष्ट सांगतात ? आमचे साईबाबा कुठे? तुमचे कुठून आले ? ते स्वतःला सुध्दा मुसलमान सुद्धा म्हणत असत. पुष्कळदा त्यांच्या भाषे मध्ये मुस्लमानपणा आहे. पण त्याची प्रचीती अशी आली त्या लोकांना कि एका घरी झोरस्टरचा फोटो आणि साईबाबांचा फोटो होता.तर मग मी त्यांना म्हंटलं तुम्ही realised आहात ना? मग बघा तर हात करुन , दोन्हीकडे एकसारखेच vibrations ! हे कसे? मग म्हंटलं सांगा कोण आहे ? ओळखा कोण कोण आहे? जेव्हा एकसारखी दोन्हीकडून vibrations आणी तरंग येतायेत मग हि दोन्हीहि माणसं एकच आहेत आणि त्यांना वेगळं करुन तुम्ही गाठलय काय? एवढं मोठं सत्यकर्म लोक करत आहेत . आणि हा धर्म वेगळा तो धर्म वेगळा एवढं करुन कोणते ध्येय गाठलंय ? म्हणजे एकाने हे डोकं फोडायचं ,दुसऱ्याचा खून करायचा , त्याला मारायचं ,आपापसात द्वेष हेच तर आम्हाला मिळालेलं आहे .एका पेक्षा दुसरा धर्म उच्च आहे असं मानून तुम्ही कोणची कुठली उच्चता गाठली मला तरी काही दिसत नाही बुवा . मी सर्व धर्मातल्या फार मोठमोठ्या लोकांना भेटले , याना अगदी उच्चस्थानी बसवलं आहे पण एक सुध्दा अजुन पर्यंत मला realised मनुष्य भेटला नाही, ही सत्य गोष्ट आहे आणि तुमच्यातले जे realised आहेत त्यांनी स्वतः जाऊन बघाव , तुम्हाला मला सांगायला नको.मी सांगितलंय त्याच्यातले एक अक्षर जरी खोटं असेल तर आपण जाऊन स्वतः साक्षात्कार घ्यावा आणि ह्या मंडळींना येऊन सांगावं त्याची साक्षच आहे. अजूनपर्यंत तरी मला एक सुध्दा त्याचातला मनुष्य realised सुद्धा नाही भेटला. Realised सुध्दा. काही काही लोक आहेत , realised पण ते कोणत्या धर्माच्या पिठा बीठावर बसलेले नाहीत.कुणी जंगलात आहेत.ह्या आशा वेड्या समाजापासून दूर पाळलेले.पुष्कळशे आहेत , मी आता काश्मीरला गेले होते तिथे भेटले होते, हिमालयाच्या किनाऱ्यावर आहेत. मी त्यांना म्हंटलं “इथे काय करता? या ना ! मी एकटी कुणाकुणाशी वाद घालू आणि कोणाकोणाला सांगू? सगळ्या भ्रांतीमध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर, बोलायला तुम्ही आलं पाहिजे, तुम्हाला मानतील ते.”अहो म्हणे जर तुम्हाला ते मानत नाही तर आम्हाला काय मानतील? तुम्हाला निदान इंग्लिश भाषा तरी येते, मराठी तरी येते, आम्हाला तर काही भाषा येत नाही.” तेव्हा ते आपले पळून बसले जंगलामध्ये. बघूया आपण, काही उतरले.तुम्ही लोक जर […] झालात आणि त्यांना कळलं कि आमची डोकी फुटणार नाहीत तर येतील कदाचित. पण हा आत्मसाक्षात्काराचा अनुभव आपल्याला झाला पाहिजे. हे एका गृहस्तांनी फार ठासून मला सांगितलं आहे कि हा आनंदाचा क्षण आम्हाला का मिळू नये? आम्हाला सर्वांना मिळालाच पाहिजे. म्हंटलं वा ! […] असंच पाहिजे , मिळायलाच पाहिजे.का नाही मिळाला?मिळायलाच पाहिजे.”आम्ही अशी पापं केली, आम्ही हि कर्म केली , आमची हि कर्म कशी जाणार? आमचं हे कसं जाणार?” अशी जी माणसं रडत बसतील त्यांचं काही होणार नाही. पण जर मिळण्यासारखे आहे तर आम्हाला मिळालंच पाहजे असं म्हणणाऱ्या लोकांना मिळालंच पाहिजे.आज ह्या गृहस्थानी लिहून पाठवले आहे, त्यांना सांगायच आज नाही तर उद्या तुम्हाला हे मिळेलच.त्याबद्दल मला शंका नाही.एवढंच आहे कि आपल्या हिंदुस्थानात जर काम कठीण आहे कारणअजून आपलं डोकं जड वस्तूंवर फार आहे.जेवायला नाही मिळालं, खायला नाही मिळालं, अमुक नाही, तमुक नाही.हे सर्व काही चालू आहे. जरा ह्याच्यातून तुम्ही उठला, जर तुमचं हे चित्त गेलं तर कार्य होण्यासारखा आहे.अमेरिकेत त्यामानाने लोक जास्त तैयार आहेत. आत्मसाक्षात्कार लवकर घडतो पण स्थिरता किती लोकांना येते? कारण त्यांना मुर्त्या समजत नाहीत, त्यांना आपले देव देव समजत नाहीत.पण हिंदुस्थानात रडतफडत का होईना जर कोणी आत्मसाक्षात्कार घेतला कि तो खूप गहरात जातो, कारण त्यांच्यामागे संपदा हजारो वर्षांची आहे . हजारो वर्षांची संपदा ज्या माणसाच्या डोक्याच्या मागे आहे तो खटकन आतमध्ये जातो आणि संबंध आपल्या आतल्या अंतरंगाच्या सागरात बुडून जातो.तसं अमेरिकेच्या लोकांचं होत नाही. अमेरिकन लौकर पार होतात पण तिथल्या तिथे , जास्त आतमध्ये उतरत नाही. […] पार करणं काही सोपं काम नाही. ५ वर्षांपासून माझे मिस्टर […]. डॉक्टरसाहेबानीं तर आता सांगितलं आहे कि ७० साली मला कळलं कि मला आत्मसाक्षात्कार झाला. माझ्या आत्मसाक्षात्कारत आणि आपल्या आत्मसाक्षात्कारात फारच अंतर आहे. मला जे कळलं ते तुमच्याबद्दल आणि तुम्हाला जे कळणार आहे ते माझ्याबद्दल . मी जन्मले तेव्हापासूनच मला माहिती होते सर्वकाही . कारण ते आपल्यात कसं जायचं ? आत्म्याला कसं घडवयच ? हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. आणि तो प्रश्न कसातरी करून आपण जाणला पाहिजे म्हणून मी हजारो लोकांकडे गेले आणि लोकांकडून पत्ते घेतेले. पण माझ्या लक्षात हे आलं कि नाहीच कोणी इकडे.

तेव्हा एकदा आकस्मातच मला असं कळलं कि माणसामध्ये एक छोटीशी पोकळी आहे सुषुम्ना नाडी मध्ये ती मी आपल्या जर प्रेमाने भरली तर कुंडलिनी सहज

वर इथून जाईल आणि सहस्राराला सहजच छेदून त्या माणसाला […] हे तुमच्या साठी आम्ही शोधून काढलंआहे. तर त्या साठी लोक काय मला मारायला धावणार आहेत? तुमचं मंगल करण्या साठी म्हणून आहे . माझ्या हातून शोधलं गेलं म्हणून मला मारणार आहेत ? आणि कृष्णाच्या हातून सर्व शोधलं नाही गेलं म्हणूनही मलाच मारणार आहेत ? अहो त्याला आम्ही शोधून दिलं तेव्हाही आम्हीच होतो . तेव्हा प्रयत्न सर्वांबरोबर केलेलेच आहेत, आम्हीपण . आणि जर आधि नाही कुणी केलं आम्ही आता करत आहोत आणि जर काही आम्हाला मिळालेलं आहे त्या साठी तुम्ही काय आता माझ्यावरती का आता बहिष्कार घालणार आहेत?

तुम्हाला काय मिळालं आणि कसं मिळालं? तुम्ही कोण होता घेणारे .मला असं विचारायच ,तुम्ही विचारणारे तरी कोण? तुमच्यात जर धर्माची अशी कोणती मोठी सत्ता आहे कि ज्याच्या दमावर तुम्ही मला विचारता?जर तुम्ही धर्मावर उभे आहात तर माझ्या समोर या. आणि मग मी त्याचं उत्तर दयायला तयार आहे. पण आधी धर्म काय आहे हे तर जाणलं पाहिजे .साक्षात्कार तरी झालेला आहे का?

तुमच्या मध्ये तो धर्म तरी आलेला आहे का? हा काही धर्म नाही कि देवळात गेले , तिकडे रामाला नमस्कार केला आणि इकडे महंमद ला १०० शीव्या दिल्या . हा काही धर्म नाही. धर्म म्हणजे सगळया मध्ये वाहणारे चैतन्य. त्याच्या धारे मध्ये उतरणं हा धर्म आहे त्याची जी धारा आहे तीला आपल्या मध्ये धारण करणं हाच धर्म आहे . हे आपल्या हिंदु शाश्त्रामध्ये सगळ्यांना सांगितलं आहे इतक्या स्पष्टपणे आणि कोणत्याही शास्त्रात नाही.आपण म्हणजे अगदीच विपरीत लोक झालेलो आहोत . म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे कि फक्त हिंदू शास्त्रा मध्ये कुंडलिनी बद्दल इतकंसुंदर वर्णन ह्यांच्यातल्या दृष्ट्यांनी दिले आहे.

[.. . ] भारतीयातल्या लोकांना ज्याच जेवढं ज्ञान झालेलं आहे ते कुणालाही सबंध पृथ्वी लोकात नाही झालं आणि इतकं सांगून सार व्यवस्थित त्याचं वर्णन केलं आहे. आणि त्याचा जर शोधच हिंदुस्थानात लागला आहे तर त्याबद्दल तुम्ही मलाच मारायला उठल्यावर लोक तुम्हाला तरी काय म्हणतील ईतिहासात ?कि काय हे वेडे लोकं आहेत ? थोडा विचार करा आईच समजावंण आहे. थोडा विचार करा .तेव्हा डोकं थोडं उतरवा तिकडण. म्हणजे पुढची गोस्ट सांगता येईल कि आत्मसाक्षात्कार म्हणजे काय?मी आपल्याला सांगितलं आहे कि आपल्या मध्ये […] शक्ती चैत्यन्य भरलेलं आहे ते कुंडलिनीच्या द्वारे. ते आपल्या मध्ये असतं, स ह ज म्हणजे स्वतः बरोबर असलेले जन्मतः . हि तुमची आई जी तुम्हाला जन्म देणार आहे ती तुमच्यातच आहे. आपल्याला तिची माहिती नसते पण तिला आपली माहिती असते.तिला आपली ह्या जन्माचीच नाही तर जन्मांतराची सगळी तिला माहिती आहे. इतकंच नाही तर आपल्या शरीरामध्ये असलेले जितकी काही दुःखे आहेत. जितके मानसिक ताप आहेत , जन्मजन्मांतरातले बुद्धीमध्ये जेव्हडे काही […] आहेत ते सर्व काही तिला माहित आहे. ती फक्त वाट बघत असते कि माझा जर मार्ग मोकळा झाला आणि कोणी जर माझ्या मुलाला संभाळून हा जन्म दिला तर मी त्या कार्याला तयार आहे . म्हणून त्या […] वाटेमध्ये ती बसलेली आहे (२५:३०) तिची वाट बघत बसलेली असते कि अशी कोणी […] जरआली तर माझ्या मुलाला काही त्रास झाला नाही पाहिजे . तिचं सगळं समजणारी ,त्या मुलाच्या आतला सगळा भार कसा अगदी जपून सांभाळून त्या कुंडलिनीला वर उठवेल अशी ती कुंडलिनी सारखी तुमची आई . हे मला माहित होतं . पण तिला वरती आणायला एकच प्रश्न होता कि मधे एक पोकळी आहे त्याच्यामध्ये काय करायचं ? त्या पोकळीला आल्याबरोबर ती कुंडलिनी मागे यते . कुंडलिनी कधीही दुसऱ्या कोणत्याही मार्गानी कधीही उठणार नाही . इडा आणि पिंगलाने कुंडलिनी उठत नाही. काहीही करून कुंडलिनी कधीही उठणार नाही . तुम्ही आईला प्रेम करायला काय करता? ती करतेच तुम्ही मारलं तिला तरी ती तुमच्यावर प्रेम करते आणि त्याच्यावर पुढे गेलेले लोक असं म्हणतात कि तुम्ही जर सेक्स ??? वाढले तर कुंडलिनी वाढेल. म्हणजे तुम्ही तुमच्या सख्या आईवर तुम्ही कोणचा आरोप करता म्हणजे आहे काय हे? आणि त्यावर जर ती कुंडलिनी चिडली आणि संतापली ह्याच गोष्टीवर आपली आई चिडेल . आईचा जर खून जरी केला, तिच्या नवऱ्याचा जरी तुम्ही खून केला तरी ती मानून घेईल पण तुम्ही जर तिच्यावर असा खाणेरडा आरोप केला तर तिच्या पावित्रावरच तुम्ही बसल्यामुळे म्हणजे ती चिडते .आणि ती चिडल्या मुळे आतून ज्या लहरी त्या रागाच्या ज्या उठतात, त्या फक्त ईडा पिंगलावर जाऊन बसतात म्हणुन लोकांना असं वाटतं कि कुंडलिनी वर आली की आपण जळून जाऊ . जळणारच कारण तुम्हाला माहित कुठे आहे त्याची अक्कल पाहिजे . खरोखर कुंडलिनी कधीही कुणाला जाळत नाही. ती प्रेममय तुमची आई आहे. चैतन्य स्वरूप तुमची आई तुमच्यात बसलेली तुमच्यासोबत जन्मलेली आहे आणि तुम्हालाच पुन्हा जन्म देण्यासाठी […] आहे. पण तिचं पवित्र तिचं गौरव , तिच्या गौरवा कडे लक्ष दिलं पाहिजे .आपण तिला इतक्या निम्न श्रेणीला आणलं कि ती तरी काय करणार? आता ह्या कुंडलिनी जागरणाने आत्मसाक्षात्कार घडतो असं पुष्कळांनीं म्हंटलेलं आहे म्हणजे आपल्याकडे लेखकांची असे लेखक आहेत ज्यांनी कधीही कुंडलिनी कशाशी खातात ते जाणले नाही त्यांनी सुद्धा कुंडलिनीवर लिहलंय. कुणाची तरी पुस्तकं लॅब्ररीत बसायचंआणि लिहून काढायच. त्याच्याबद्दल पूर्णपणे जो पर्यंत तुम्हाला काही अनुभव नाही त्याबद्दल तुम्ही लिहता कसं ? असं म्हटलं कि धर्माच्याबाबतीत कोणीही बोलू शकत .म्हणजे हिटलर जर उद्या धर्माच्या बाबतीत बोलला तरी कोर्टात त्याला खेचणार कोण? कारण धर्माच्या बाबतीत कोणीही बोलू शकतो . कोणताही मनुष्य धर्माच्या बाबतीत बोलू शकतो त्याला कोणी धरत नाही किंवा म्हणत नाही . तेव्हा वाट्टेल त्याने वाट्टेल ते बोलावं आणि ह्या आपण ते कोळून प्यावं एवढं आपल्यामध्ये ते बुद्धीचातुर्य आहे . आम्हाला जर काही अनुनभव आला नाही आत्मसाक्षत्काराचा तर आम्ही कोणालाही मानणार नाही हि पहिली पायरी, आत्मसाक्षात्कार म्हणजे पार झाले पाहिजे. आत्मसाक्षात्कार म्हणजे तुम्ही निर्विचारतेत उतरले पाहिजे .म्हणजे मनुष्य आहे काय ? मनुष्याचं जे मन आहे ते सारखं इकडून तिकडे , तिकडून इकडे धावतं आहे. त्या मनाला चालना देते ती विचारांनी. जे विचार आपल्या मनातुन येत असतात त्या मध्ये सारखं हे मन तरंगत आहे .एक मिनिट सुद्धा ते विचार थांबवायला तयार नाही. तुम्ही जबरदस्ती थांबवायला गेलात तर तुम्ही परत सिम्पाथेटीक वर जाता आणि तुमचा परलोकाशी संबंध होऊन तुमचा त्या भूतप्रेतांशी संबंध होतो आणि तुम्ही सिध्दीला पावता. जबरदस्ती तुम्ही कशाहि गोष्टींची केली कि असं होतं . तेव्हा विचार त्यांच्या पलीकडे जायचं तरी कसं ? हा प्रश्न आहे . कारण विचारांच्या पलीकडे फक्त चैतन्य आहे . आणि चैतन्याचं स्वरूप हे निराकार आहे . तेव्हा निराकारात जायचं कसं ? आपलं लक्ष माझ्याकडे आहे कारण मी साकारात उभी आहे . पण समजा मी म्हंटलं कि तुम्ही अर्धवट मधे बघा. तुम्ही नाही बघु शकत.आतमध्ये चित्त जाणं कठीण का? कारण निराकारात चैतन्य असल्यामुळे त्याला आम्ही कसं आतमध्ये बघणार ? म्हणूनच लोकांनी आधी निराकाराची स्वरूपे बनवून सिम्बॉल , प्रतीके बनवून ती […] आहेत , बनवून नाही, आहेत ती,त्यांची होतात तीआपल्याला दिसतात वेगळ्या वेगळ्या चक्रांवरती मी आपल्याला काल सांगितलं आहे .पण ते सांगितल्या बरोबर लोक चिकटले त्या प्रतिकांना , त्याच्या मागे चैतन्याकडे जाऊन त्याच्या मागच्या चैतन्याकडे जाऊन म्हणजे फुलातला मध घ्यायचा असला तर फुलांबद्दल सांगितले तर फुलांना चिकटले .मग म्हंटले नाही नाही हे काही जमलं नाही म्हणजे त्याच लोकांनी मग दुसरा जन्म घेतला. मग त्यांनी असं धर्म स्थापन केलं कि निराकाराबद्दल बोलणार नाही. पण तेही का ?मधाबद्दल बोललातकाय किंवा फुला बद्दल बोललात काय, बोलाचीच भात बोलाचीच कढी , त्यांना काही अनुभव नाही. तर मग जर मध तुम्हाला एकत्र करायचाय तर तुम्हाला मधुकर झालं पाहिजे हे साधं ,म्हणजेच तुमच्यात ती घटना घटली पाहिजे आणि तुम्ही त्या चैतन्याला जाणलं पाहिजे. जेवढं काही नुसत्या हस्ती […] तसंच गळून जाणार. जो पर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत आपल्याला अंधारात पुष्कळआकृती प्रकृती दिसतात. प्रकाश आल्या बरोबर हे सगळं काहीतरीच काय म्हणून आपलंआपल्यालाच हसायला येतं .चैतन्य […] चैतन्याचं स्वरूप स्वतः प्रेमचआहे. परमेश्वराचं प्रेम म्हणजेच हे चैतन्य आहे. आणि तेच प्रेम म्हणजे ज्ञान आहे. आईला एखादया मुलाबद्दल किती माहिती असते ?पण जन्मल्या बरोबर तिला इतकं प्रेम येतं कि तिला सगळं काही कळायला लागतं .लहान लहान मुली सुध्दा आया होतात ,आणि आपल्या मुलांना कसं प्रेमानं ठेवतात? ते कसं काय होतं ? हे त्या प्रेमामुळेच आहे. ज्या बाईने आपल्या नवऱ्याला कधी पाहिलं नाही लग्नानंतर ती त्याची इतकी एकनिष्ठ पत्नी होऊन राहते त्याला कारण प्रेम. तिला मग सर्व कळतं कि नवऱ्याला काय हवं ,काय नको,काय आवडतं, काय दिलं पाहिजे,काय जेवायला पाहिजे. प्रेम असलं म्हणजे आपल्याला सगळं काही कळतं. चैतन्य हे प्रेमस्वरूप असतं, तरी ते ज्ञान आहे. प्रेमानं होणारं ज्ञान दोन्ही एकच असतं .जसा चंद्र आणि चांदणीचा संबंध आहे.किंवा अर्थ आणि शब्दाचा संबंध आहे. तसाच संबंध आहे प्रेम आणि ज्ञानात. ज्ञानयोग ज्याला म्हणतात तो खरोखर प्रेमानेच असतो आणि तोच प्रेमयोग म्हणजेच ज्ञान आहे. तेव्हा आपल्या हातून जेव्हा परमेश्वराचं प्रेम झरझर वाहू लागतं साऱ्या संसारात तेव्हा आपल्या हातून जेव्हा त्या लहरी वाहू लागतात तेव्हा आपल्याला ज्ञान कसलं होतं ते दुसऱ्याच्या कुंडलिनीचं.आता पर्यंत आपलं लक्ष बाहेर होतं म्हणजे हे शरीर आहे तिकडे लक्ष होतं म्हणजे मायेच्या आत मधनं वाहणारा जे चित्रआहे त्या चित्रावर होत. तर आपण जोपर्यंत आतमध्ये जात नाही,जो पर्यंत आपण आपल्या आतमध्ये उतरत नाही तोपर्यंत त्या सूत्रावर आपले लक्ष कसे जाणार. जे सगळ्यांच्या आतून जात आहे. आपल्या पुरतं आपलं लक्ष आहे जेव्हा आपण त्या सूत्रावर येतो लगेच आपल्या मध्ये सामूहिक चेतना आपोआप घाटीत होते म्हणजे आपण काही करत नाही. आता तुम्ही असं पाहिलं असेल कि लहान लहान मुलं सुध्धा […] पार होतात. म्हणजे काही लोक नाही झाले पार तर इतके चिडतात ते माझ्यावर. आता जर नाही झालं तर मी तरी काय करू? तुम्ही सांगा. मग काहीतरी लिहून

मग काहीच्या काही लिहून पाठवतात माझ्याकडे. अहो नाही झालं, आज नाही झालं तर उद्या होईल, लहान लहान मुलं सुध्दा म्हणतात अहो नाही झालं श्री माताजी. अहो नाही झालं म्हणजे नाही झालं एवढ काय? त्या सूत्रावर चित्त आपलं जातं ते दोन विचारांच्या मधो मध्ये एक लहानशी जागा असते त्या विलंबातन एक क्षणात. कानाचा त्या थोड्याशा भागात कणासारखं ते आतमध्ये आहे. आणि तिथे गेल्याबरोबर त्या चैतन्यस्वरूपी परमेश्वराशी ते एकाकार होतं. ते खरच आहे खोटं नाही. पण काहींचं नाही होत काहींचं होतं. पण सगळ्यांचं झालं पाहिजे म्हणजे हे राशनच दुकान नाही. जसं आपण राशनच्या दुकानाला आम्हाला राशन का नाही देत ? ते बरोबर आहे तुम्हाला राशन का नाही दिलं. राशनच दुकान नाही हे. प्रत्येकाची आपली आपली उत्क्रांती असते. ज्या माणसाच्या लक्षातच कधी आलं नाही कि या दुनियेच्या पलीकडे काही दुनिया असली पाहिजे किंवा ह्याच्यात काही राम वाटत नाही ,आता ह्याच्या पलीकडे काही दिसतंय. अशा माणसाचं चित्तच जिथे जडातच घुसलेलं आहे अशा माणसाला रियलाझेशन कसं होणार? असं पुष्कळशी लोकं मला सांगतात आमचं का नाही झालं मग ?तुम्ही आमचं का नाही केलं म्हणजे अगदी हातात बंदूक बिंदुक घेऊन खडेच आहेत.द्या आम्हाला, रियलाझेशन देतात कि नाही? हे जिवंत काम आहे.आता तुम्ही एका झाडासमोर बंदूक घेऊन उभे रहाणार हे बघ तू फळ देतोस कि नाही देत. तर तो नुसती त्याची पान हलवेल. या तुम्ही उद्या या. जेव्हा घडायचं तेव्हा घाटीत होईल. जेव्हा व्हायचं तेव्हाच ते होणार. हे जिवंत काम आहे.मेलेलं कार्य आपण म्हणू शकतो कि हे आम्ही चार वाजता करून त्याचे ते दहा नग तुमच्याकडे पाठवून देतो, बरोबर आहे. मशीनने हे होऊ शकते . पण ते परमेश्वाची लहर आहे लागेल तर देईल नाही तर नाही देणार. हे जिवंत कार्य आहे. हे जिवंत जे घटायचं ते आपल्यामध्ये आणि हेच जिवंत कार्य मनुष्य करू शकतो बाकी कोणतंही जिवंत कार्य मनुष्य करू शकत नाही. एका बी मधून आपण एक झाड काढू शकत नाही. पण दुसऱ्याला आपण रियलाझेशन घडवून आणू शकतो. म्हणजे मधे उभे राहून ती जी शक्ती आहे ती आपल्यातुन त्याच्यात घालून त्याला रियलाझेशनचा अनुभव आपण देऊ शकतो. चॆतन्य म्हणजे काय? चॆतन्य म्हणजे इलेक्ट्रिसिटीच आहे का? आहे इलेक्ट्रिसिटी आहे. त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम आहे का? ते सुध्दा आहे. त्याच्यामध्ये लाईट आहे का? हो ते सुध्दा आहे. पण ह्या सर्व जडशक्तींच्या पलीकडे त्याच्यात जे आहे ते म्हणजे प्रेम. आता सायंटीस्ट लोकांना प्रेम कसं समजवायचं ते मला समजत नाही. तर आता इकडे तर हे भाविक लोकं माझं डोकं फोड करतात आणि तिकडे ती सायन्सची लोकं माझं डोकं फोड करतात. सायन्सच्या लोकांना प्रेम कसं सांगता येईल ते मला समजत नाही. कितीहि मोठा सायंटिस्ट असला तरी त्याला आपल्या आईचं प्रेम कळत असेल तर त्याने ते सायन्समध्ये सांगावं.

जे चैतन्य सगळं काही जाणत,ज्याला सबंध अंडरस्टॅण्डिंगअसतं, सबंध समजतंय त्याला,जे सबंध प्लँनिंग करत आहे हि सगळी व्यवस्था करतोय ते इतकी व्यवस्था बारीक आहे त्याची. जर तुमची आर्तता खरी असली तर तुम्ही कसंना कसं करून माझ्याकडे पोहचाल. आता एक उदाहरनार्थ सांगते. म्हणजे तुम्हाला वाटेल हे कसं काय माताजी सांगताय. आहे,आहे तसंच आहे. एक गृहस्थ आहेत, बेलापूरच्या तिथे राहत असत. त्यानी माझ्याबद्दल ऐकलं आणि धावत मुंबईला आले . त्याचाजवळ पत्ता वैगरे हरवला आम्ही तिथे रहात होतो. त्या सगळ्यांना विचारले कि माताजी कुठे आहेत वैगरे तर ते म्हणाले अमुक माताजी, तर ते म्हणाले नाही हे नाही. हि इथली माताजी आहे, ते तिकडे गेले ती तिथली माताजी , नाही पण आमच्या माताजी कुठे आहेत? तर ते म्हणे तीन दिवस मी असा भटकत राहिलो, वेड्यासारखे. मला समजेना आता कसं तुम्हाला भेटायच माताजी?काय करायचं ? मग मी असं म्हंटल माताजी आता तुम्हीच करा बरं माझी व्यवस्था आणि मी बस मध्ये बसलेल असताना तितक्यातच एक मनुष्य माझ्या शेजारी बसला त्याने तुमचा असा तो फोटो काढला. आणि त्यांन नमन केलं आणि म्हंटल अहो ह्या माताजी कुठे रहातात? म्हणे इथेच, हे जे आहेना हे इथेच उतरा तुम्ही, ह्याच्यासमोर असं गेला कि त्या गल्लीत माताजींचं घर आहे. तुम्ही जाऊन तिथे विचार तुम्ही. आणि मी जेवत होते.आणि ते धावत धावत आतमध्ये आले. माताजी मला तुम्ही सापडल्या . मी हात धुतला आणि तिथेच बसले आणि पटकन पार झाले. हे सगळं घडवलं कोणी? हे सगळे योगायोग सगळे संबन्ध घडवले कोणी? पण ते त्यांचेच घडणार जे खरंच शोधतायेत पण त्यांचे नाही घडणार जे शब्दांच्या जाळ्यात मला पकडायला बघतात. हे लोक आपल्या पासन स्वतःचं ???? करून स्वतःलाच ठगवत बसलेले आहेत. काही असं विशेष शहाणपण नाही. स्वतःचच शेपूट कापून माकडपणा करण्यात काही अर्थ नाही,असं एक आई म्हणून तुम्हाला मी समजावून सांगते. जर तुम्हाला हे नको असेल तर माझी काय तुम्हाला जबरदस्ती तर करताच येण्यासारखी नाही आणि नको असलं तर तुम्ही परत जावं. पण काही काही लोकांनी म्हणजे आजकाल असा बिझनेस घेतलेला आहे कि माताजींना हाणून हे काढलंच पाहिजे कारण ??????? कधी कधी इतकं मला हसायला येतं ,कि उद्या तुम्ही आपल्या आईला सुध्दा हाणून काढाल . तुमचा काही ठिकाणा ,कारण सगळ्यांमध्ये संचारलंयना राजकारण अख्ख. अहो तुमच्या भल्यासाठीच, तुमच्या मंगलासाठीच, परमेश्वराने स्वतःची युक्ति शिकवलेली आहे मला. हि आपण वापरून बघायची आणि जमली आहे, पुष्कळांना जमलेली आहे. आपल्या पुणे शहरातच मला पक्का आकडा माहिती नाही पण पहिल्या दिवशी अडीचशे माणसं पार झाली म्हणजे हि काय पुण्यभूमी आहे.(40 :15h) आमच्या मुंबईला असा देखावा कधी दिसत नाही. मुंबईकरांनी क्षमा करावं. अन मग मी मुंबईकरांना म्हंटल कि आता मी पुण्यालाच येऊन राहते तर मग लगेच सपकपले हे काय माताजी, असं कसं ?आम्ही एवढी मेहनत घेतली. बरोबर आहे पण हि पुण्यभूमी, मोठमोठाले भक्त इथे जन्माला आले आहेत.मोठमोठाले संत आहेत ते. आता ???? झ्हाले म्हणून ते सूट बूट घालून आले म्हणून काय आता ते संत नाहीत ? आता पुष्कळदा लोक मला म्हणतात हे तुम्ही काय करता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? कारण आमच्यातल्या ज्या बायका आहेत त्या ताट??? ठेवतात. तर त्यांना समजत नाही मी कुकर्म कशाला करते. त्यांना मी हे सांगते कि मी संतांची सेवा करते . ते म्हणतात संत कुठे? म्हंटल आजकाल बुश शर्ट बिश शर्ट घालून येतात, तुम्हाला माहित नाही. तुम्ही संत आहात म्हणून आले . तुम्हाला महंत करायचंय. तुम्ही मोठे जीव आहात म्हणूनच तुम्हाला हे दर्शन होणार आहे आणि होत आलं. आता मी इथं तुम्हाला पटवते काय आहे? कि तुम्हाला हे होणारआहे. घ्या हो ,घ्या हो घ्या. पण त्यातले असे थोडेच आहेत बरं का? अधिक बहुतेक लोक अशेच आहेत कि ज्याना हवं आहे आणि ते काय आहे? तेच ऐकण्यासाठीं इथे आलेले आहेत. तेव्हा अशे जे थोडेसे आहेत त्याला विघ्न पंत असं म्हणतात असं मला वाटतं. अश्या लोकांनी थोडंसं आपलं डोकं शांत ठेवा आणि सगळ्यांच्या उद्धारासाठी एवढी धडपड करू नये. उत्तर सगळ्याना मिळालं असेल. आता जे लोक खरच आर्त आहेत आणि जे शोधत आहेत त्या परमतत्वाबद्दल पूर्णपणे आपण जाणून घेतलं पाहिजे. परमतत्व हिच चेतना आहे. आणि हि चेतना सर्वव्यापी आहे सर्वगामी आहे सर्व?? आहे. जडत शक्ती काहीही करत नाही. तिला चालना चेतनशक्ती देते आणि संबंध पृथ्वीची रचना त्या चेतनशक्तीमुळे होते. तीला आपल्याकडे शिवाची शक्ती, हरीची माया आदी पुष्कळ गोष्टीने आपण संबंधीत करत असतो. अशी पुष्कळशी नावं आपण दिलेली आहेत. हे चैतन्य प्रत्येक मानवामध्ये कुंडलिनीच्या स्वरूपात विराजमान आहे. आणि ते चैतन्य आपण रोज वापरत आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात आपण ते वापरत आहे. पण त्याला परत भरण्याची किंवा त्याला परत आपल्यामध्ये घेण्याची काहीही शक्ती किंवा काहीही युक्ती आपल्याला माहित नाही. एकच चेतना आहे.ह्या अनेक नाही हे लक्षात घेतलं पाहिजे.

आपल्याला अशी कल्पना असते कि चेतना अनेक आहे. ???नाही ती अहोम आहे. एकच आहे. एकच चेतनेतनं सगळंकाही. मग हि चेतना आणि जड शक्ती, आदी जे काही संपूर्ण संसारात आहे ते सगळं एकत्र येऊन बीज रुपाने जेव्हा राहतं तेव्हा त्याला आपण ब्रह्म ???म्हणजे ब्रह्मामध्ये सगळं समावलेलं आहे. आणि त्या ब्रह्मातून निघाले चेतनाशक्ती,जड शक्ती आणी अवतारशक्ती अश्या तीन शक्त्या कार्य करीत आहेत. परत सगळी कार्य संपली कि परत बीज रूपाने जसं काही एखादं बीज त्याच्यामध्ये संबंध त्याच्यात निघण्याचा झाडांचा नक्षा असतो ते परत बियांत जातात आणि एकच बिज एकच बिज होऊन जातं. तसंच सगळं काही घडतं, घटीत होतं आणि परत एक बीजातून परत परत सृष्टी तयार झाली आणि त्यात मानव हा उभा झालेला आहे. आता मानवाला मानसाने उभं करुन इतकं सुंदर रुप दिलेलं आहे. आतून आणि बाहेरुन दोन्हीही. इतकी सुंदर कलाकृती बनवलेली आहे. ती अगदी फारच तैयार अगदी त्याला म्हंटलं पाहिजे मशीन. एखादा फारच सुंदर रेडिओ किंवा फारच सुंदर टेलिव्हिजन त्याच्यामध्ये फारच क्लिअर लाऊडस्पिकर असेल त्याच्याचमध्ये फारच सुंदर अश्या मशिन्स असतील त्या टेंप रेकॉर्ड करु शकतील अशा तऱ्हेच्या संबंध मशीन ह्या शरीरामध्ये परमेश्वराने करवुन ठेवलेल्या आहेत. फक्त आता हे मेनला लावायचं प्रश्न आहे.तर ते कसं लावायचं? तेव्हा हे काही लावू शकणार नाही.परमेश्वर स्वतःच ते लावायला येत आहे.ते घडणार आहे घटीत होणार आहे आणि म्हणूनच ते सहज आहे.त्याच्यासाठी माणसानं काय करायला पाहिजे ? आम्ही काय करायला पाहिजे? एका शब्दात काहीही करायला नको. पण असं मानवाला म्हंटलं की त्याचा अहंकार जरासा दुखतो. काही करायचं नाही म्हणजे हे काय?. तुम्ही काही करायचं नाही. ज्याला पोहता येत नाही तो जर बुडत असेल तर त्याने काही करायचं नाही. (45 :30) ज्याला पोहायला येतं त्यांनी फक्त काहीतरी मेहनत करुन त्याला वर आणलं पाहिजे. तेव्हा ज्याला पोहायला येत नाही त्यानं काहीही करायचं नाही. ज्याला पोहायला येतं त्यांनी मेहनत करायची आणि बुडणाऱ्याला वाचवून द्यायचं आणि त्यांनाही पोहायला शिकवायचं आणि मग त्यांना सांगायचं की आता तुम्ही सुध्दा ते जे बुडत आहेत त्यांना मदत करा. एक दिवा पेटवायचा त्यानं दुसरा दिवा पेटवायचं आणि एक एका दिव्यानं हजारो दिवे पेटवायचे. असं केल्याशिवाय हा संसारातला अंधकार नष्ट होणार नाही. आणि परमेश्वराचं जे कार्य ,उद्दिष्टआहे, त्याला जे साधायचं आहे आपल्यामध्ये एवढ की तुम्ही मला जाणा. त्याला जाणण्यासाठी म्हणुन त्यानं तुम्हाला असं तयार केलेलं आहे. आणी त्याला जाणल्यावर पुन्हा जन्म होतो की नाही? मग आम्हाला मोक्ष मिळेल का? वैगरे वैगरे सर्व वाचलेलं. लोक मला प्रश्न विचारतील आत्मसाक्षात्कारानंतर, आत्मसाक्षात्काराच्या वेळेला काय होतं हे आधी पाहिलं पाहिजे. निर्विचरिता येते म्हणजे विचार येत नाहीत.आणि हातातून व्हाब्रेशन थंड थंड जाऊ शकतात.

थंड शब्द लक्षात ठेवा. गरम जर कुणाला व्हायब्रेशन्स आले तर् त्याचा अर्थ असा आहे कि माझे जे प्रेमाचे व्हाब्रेशन जातात त्याच्या विरोधात आहेत तुमचे व्हायब्रेशन्स. तुमचे नाही. ते कुण्या दुसऱ्याचे आहेत. तुम्ही नाही करणार . तेव्हा ते हळुहळु थंड होतात आणि एकदम थंड होऊन जातात. तेव्हा थंड थंड हातातन व्हायब्रेशन्स जातात आणि दुसरा माणुस जो आपल्या समोर असतो, त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे व्हायब्रेशन्स जाणवतात. हे एकदम होतं म्हणजे एखादया लहान मुलगा पार झाला आणि त्याला लगेच उभं केलं आणि त्याला सांगितलं कि सांग तुझ्या हातात येतंय कि जातंय? तो सांगेल माझ्या हातात व्हायब्रेशन्स येतायेत. येतायेत म्हणजे मनुष्य पार झालेला आहे.हेच त्यांना माहिती नव्हतं हे सहस्त्रार सुटलं पाहिजे, ????????. कुंडलिनीचं जोपर्यंत सहस्त्रार चालत असतं म्हणजे आता कधी ???? कबीर साहेबांनी म्हंटलेलं आहे,शुन्य शिखर ते अहम बोले म्हणजे अहम बोलत असतात तेव्हा पार नाही. अहम जेव्हा संपला तिथे,सुटला सगळं बोलणं सुटलं तिथे मनुष्य पार झाला. तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार झाला. आता माताजी ह्याच्यात आत्मसाक्षात्कार काय झालं?कारण आत्म्या बद्दलही आपल्याला काही कल्पना आहे का? आत्मा पाहायचा नसतो जाणायचा असतो . आपण आत्मा झालो आहे हे कसं कळलं?. कारण आपण साक्षी होऊन जातो. आतुन आपण पोकळ होऊन जातो. ती आपल्या मनाची स्तिथी होते. आपण साक्षी होऊन जातो.हे सगळं नाटक आहे. हा सारा संसार ?????. हे सगळं नाटक आहे. आपलं लहान मुलांना बघितलं कि तुम्हाला कळेल. लहान मुलांना साक्षीत्व असतं. आणि ते साक्षीत्वावर राहतात. त्यांना काही वाटत नाही. त्यांना इच्छा झाली कि सांगतील हे काही तुम्ही हा काही महामेळावा आहे, हे काही नाटक चाललेलं आहे. त्याच्यात ते रमणार नाही. तेव्हा जसं एखाद नाटक बघता बघता आपल्याला वाटतआपणच कसं शिवाजी झोलो. तलवार घेऊन आपण असे खडे राहिलो??? होतं कधी कधी काही काही लोकांचं.फार असे नाटकात रमले असे. मग अहो हे नाटक आहे. आम्ही इकडे बसलो.आता नाटक संपलं आता घरी जावा. पुष्कळ बायका रडतात बिडतात . आपण पाहिलंय नाटकात पुष्कळांना असं रडायला सुध्दा येतं. ते नाटक आहे पण आपण विसरतो ते कि ते नाटक आहे. ती माया आहे. हे नाटक चालतंय आणि कळतं कि आपण नाटक बघत होतो.हे आपोआप घडतं. तुम्हाला सांगायलाही लागत नाही कि आम्ही हे नाटक बघत अहो. तसं नाही. ते झालं पाहिजे.आपोआप होतं. साक्षित्व येत . अंतरंगामध्ये साक्षित्व येत. आता कालच एका मुलीने मला प्रश्न विचारला, कि मग आपल्या निती आणि अनीतीच काय होतं ? अहो आपल्याला काय नीती आणि अनीतीचे धडे मिळालेत? हे मानवाने आपलया डोक्यानं बनवलं आहे. कारण त्यांना राज्य चालवायचंय? ख्रिस्ताला तुम्ही क्रुसे वर टाकलं.

सीतेला तुम्ही जंगलात पाठवलं ते कोण ते सगळे तिथे बसले होते एवढे मोठेमोठे मी आजही विचारते कि त्या धोब्याच्या सांगण्यावरुन त्या सीतेला तुम्ही वनात पाठवली तेव्हा कोणाला बोलायला झालं नाही , सांगायला झालं नाही? हि कुठली नीती? मोठेमोठे ???? उभे आहेत. ह्यांची ही नीती कुठली आहे मला समजत नाही.नीती म्हणजे काय? नीती आणि अनिती म्हणजे काय हे देवाला माहिती आपल्याला काय माहीत ? आपण आपल्या मनालाच असं नीती समजतो. एखाद्याला छळनं??? पण साक्षात्कारी मनुष्य कधीही कुणालाही कधी छळू शकत नाही. त्याला कारण असं आहे कि सर्व आपल्या शरीराचे अंग आणि प्रत्यंग आहेत असं वाटतं.मी काय माझ्या बोटाला छळील काय?(50 :30h) जेव्हा तुम्ही माझी बोटंच झाला. माझे हातच झाला तर मी काय माझ्या हातालाच मारेल काय? म्हणजे इतके मूर्ख तुम्ही. साक्षात्कारी मनुष्य प्रेमात पूर्णपणे विरघळतो.मग त्याला लोक असे म्हणतात कि आपल्याकडे सगळ्यांना फार समजतं जास्त.तर असंही सांगतात कि माताजी तुम्ही प्रत्येकाला काय हो साक्षात्कार देता? म्हणजे आता त्यांनी वापरलं ते वाईट गोष्टींसाठी तर ? म्हंटलं कशासाठी वापरणार? तुम्ही व्हायब्रेशन दिल्या बरोब्बर दुसरा मनुष्य त्याची तब्बेत बरी होते. त्याला बरं वाटतं.हलकं वाटतं. झोप नसेल येत तर झोप येते. किंवा जागृती येते. तर ह्यांच्यातलं कोणतं वाईट आणि चांगलं ते मला सांगा. दुसरं तुम्ही काही करु शकत नाही.तुम्ही म्हंटलं कि कोणाला शाप द्यायचा . तुम्हाला तर ते जमायचंच नाही म्हणजे शाप देणार कोठे?आता गायत्रीमंत्रा बद्दल कुणीतरी विचारलेलं आहे , गायत्रीमंत्र किंवा ???? मंत्र, सावित्रीच सुद्धा फार सांगितलेलं आहे. हे सुर्य नाडी वरचं काम आहे. सुर्यनाडीने गायत्रीमंत्र म्हंटल्याने सूर्या सारखी तेजस्वीता येते ?????. आपल्याकडे पुष्कळश्या ऋषी मुनींनी लोकांना शाप दिलेला आपल्याला माहित आहे. हे शाप द्यायची शक्ती त्यांच्यात गायत्री मंत्र ??????. गायत्री मंत्रा पेक्षा कलियुगामध्ये भगवती मंत्र घेतलेला बरा. ही सगळ्यांची आई आहे. गायत्री काय,सावित्री काय??? काहीतरी काय. सगळ्यांची आई फक्त भगवती आहे. तेव्हा दुसर्यांना अगदी होरपळून टाकण्याची शक्ती घ्यायचीच का आपण? तेव्हा गायत्रीमंत्र म्हणायचा का? म्हणाना काही हरकत नाही आम्हाला.त्याचे मग जे उपदव्याप आहेत ते सहन करायला पाहिजेत. सूर्यनाडी किंवा चंद्रनाडी, तीला इडा किंवा पिंगला म्हणतात त्याच्यावरती मला काम करायचं नाही. ज्यांना करायचंय ते करतातच,आणि करतीलच. कितीही सांगितलं तरी ते तिथेच बसणार आहेत. तेव्हा त्यांना करुदे. ज्यांना त्यांच्याकडे जायचं आहे त्यांनी खुशाल जाऊन आपल्या संबंध चक्राना ठिकाणावर लावावं.आणी मग मात्र माझ्याकडे येऊ नये. कारण नंतर तुमची सगळी चक्र सुटल्यावर ह्या मंत्रांच्यामुळे मी काही त्याला निमित्त नाही. जर तुम्ही कुणाला जर कधीही शाप दिला तर तो शाप तशाचा तसाच तुमच्याजवळ परत येणार आहे.ती पॅरॅबोलिक मुव्हमेंट म्हणतात त्याच्यावरती आणखीन मी पुष्कळ प्रकारच्या ??? प्रत्येक गोष्ट ही सरळ जाते पण पॅरॅबोलिक जात नाही. म्हणजे ज्या स्थितीत जाते तशीच परत येते. आता हे फार जुने तत्व आहे. तेव्हा शिव आणि शक्ती. शक्ती आपण जर पाहिलं तर ??? ती एका बिन्दु पासुन त्याच बिन्दु पर्यंत परत येणार.जर तुम्ही कुणाला शाप दिला तर तो शाप तुमच्याकडे परत येणार. त्यावेळी तो गायत्रीमंत्र तुम्हाला सोडवणार नाही. म्हणुन फक्त प्रेमाचा संदेश पाळावा.म्हणजे माझ ऐकायचं असेल तर. नंतर पार झाल्यावर मग कोणताही मंत्र म्हंटला तर त्याचा अर्थच येणार आहे. म्हणजे कनेक्शन लागतं ना.पार व्हायच्या आधि फक्त आपल्या आसपासच्या लोकांवर आपण प्रेम केलं कि नाही ते बघा. त्याबद्दल मी पहिल्या दिवशी सांगितलं होत कि ज्या माणसाला प्रेम करता येत नाही त्याला आत्मसाक्षात्कार होणार नाही. ????????? अशा माणसाने इथे येऊ नये. अशा छळनाऱ्या लोकांना परमेश्वर छळेल.का छळनार नाही? पार करनाऱ्या लोकांना त्रास करु नये. तो बसलेला आहे सगळ्यांना बघायला. जे लोक आत्म्याचे दीन आहेत त्यांना सगळीकडे तो बघतो आणी जे लोक दुसऱ्यांच्या आत्म्याला खातात त्यांनी साक्षात्काराची स्वप्नं ह्या जन्मात तरी बघु नये. आधी आपल्या घरी जाऊन आपल्या आसपासच्या लोकांना बघुन थोडं तरी लक्षात घ्यावं कि आपण कुणाचा छळ तर करत नाही.इतके छळवादी असतात. जोपर्यंत आपल्या शिक्षांचा त्राण पूर्णपणे निघत नाही तोपर्यंत त्यांना प्रेमच करता येत नाही. त्यांच्यापासुन ????????? तर असल्या तऱ्हेचे लोकं असल्या गुरुकडे जावेत. आमच्याकडे फक्त प्रेम करणे शिकवण्यात येतं.आणि त्यांना प्रेमच येतं आणि ते सुध्दा परमेश्वराचं प्रेम ,अनंत चैतन्य स्वरुप प्रेम.जे अनन्यआहे.जे अनंत आहे. अनलिमिटेड.आपण जेव्हा आपल्या आईला बहिणींना ह्यांना त्यांना प्रेम करतो तेव्हा ते अनंत जे आपण अनंताला आपल्या अंतामध्ये घालुन आपण त्याचा अंत करतो. लिमिटेड लव्ह इज जस्ट ऑपोसिट ऑफ डिव्हाईन लव्ह .अशा माणसाला हि माझी मुलगी आणी ती त्याची मुलगी असं दिसत नाही. पण हे एकदम त्या क्षणी होतं,त्या क्षणी फक्त निर्विचरिता येते. त्या क्षणी फक्त निर्विचरिता येते आणि हातातुन व्हायब्रेशन्स येत असतात. आणी आत मध्ये शांतता येते. जो मनुष्य बरेच दिवसात झोपु शकला नसेल तो घरी जाऊन भरपुर झोप काढतो. ??????????जे लोकं झोपतात तसंच झोपतात. झालं,गंगेत घोडं न्हालं.अशी त्याला भावना येते. त्याला असं वाटतं कि डोक्यावर जे मी ओझं घेऊन चालत होतो ते थपकन खाली पडलं. हि भावना आलयावर तो बेसुमार झोपतो.काहीकाही लोक तर मी पाहिलेले आहेत, जे अगदी सध्या सध्या गोष्टीसाठी आम्ही तुम्ही करत बसतात ते लोकं व्यवस्थितअगदी आतमध्ये आहेत. काय निराकार ??????????? अश्या लोकांची तब्येत ?????. ते आपली तब्येत संभाळत बसत नाही. आपल्या तब्येतीबद्दल ते कुणाला दुःख देत नाही. फक्त तुम्ही त्यांना दुःख देऊही शकत नाही.कारण ते काही घेऊही शकत नाही. तेव्हा अशा वेळेला निर्विचारता येते आणि त्यानंतर निर्विकल्प येतो. हि निर्विचरिता नंतर निर्विकल्प आल्या बरोबर ???? माणसाने आपल्याला सेल्फ रेअलाइज्ड झालं रे झालं??????? निर्विकल्पतेचा अर्थ असा आहे कि आपल्या चैतन्याबद्दल आपल्याला काहीही शंका राहत नाही. ह्या हातातून वाहतं,लोकांना बरं करतं. हे देऊन देऊन लोक मग आपण फार श्रेष्ठ आहोत अशी आपल्यामध्ये जेव्हा कल्पना होते तेव्हा त्याला मी ???????. मग अशी माणसं मला सांगतात माताजी हि बघा माझी सहस्त्रार बघा. इकडे बघा ????? म्हंटलं कि मी माझी कुंडलिनी हि डोक्यावर असते तर हे दिसायला लागलं रे लागलं कि निर्विचरिता येते. पण त्याच्या आधी तुम्ही ????????????????????????जे आहे ते अस्सल आहे हे असच आहे.वास्तविक आहे. असच आहे दुसरं काही नाही. लोकांना ???? आत्मसाक्षात्कार झाला मग आम्हाला ?????????????सुरवातीला तुम्ही ????????????????????????????????????????????????मी त्यांना असं स्पष्ट शब्दात सांगते ???????????????????????????????????? निर्विचारता येते त्यानंतर निर्विकल्प येतो

आणि त्याच्यानंतर मनुष्य सोहम स्थितीला येतो म्हणजे संबंध ???????????????त्याला काही धरत नाही त्याला काही पकडत नाही तो [59 :45 to 65 :00 inaudiable + blank ] तेव्हा आत्मसाक्षात्कार त्याच्या साठी काहीही करायची गरज नाही म्हणजे एखाद्या लहान मुलासारखं अबोध म्हणतात ती गणेशाला ????? कारण काय आपल्याला लहान मुलासारखं होता येत नाही.आपण म्हणजे आपलं डोकं फार आहे ना.आपण आपल्या बुध्दीने आपल्याला ठकवत असतो हे ???????आपणच आपल्या मागे लागुन आपल्या डोक्याला अश्या कल्पना वैगरे देत असतो आणि अश्या गोष्टी सांगत असतो कि त्यानी ?????. आणि आपण जे काही ?????? तेव्हा ज्यांनी ज्यांनी आज मला प्रश्न विचारलेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, कि ह्याचा लभ्ययांक काय?ह्याच्यात तुम्हाला हवं आहे काय ? स्वतः कडे लक्ष द्या. ह्याच्यात तुम्हाला मिळवायचा काय ? निदान आपला स्वार्थ तरी घ्या आता. स्वार्थ म्हणजे स्व चा अर्थ जर तुम्हाला मिळाला तरी साक्षात्कार झाला. जसा होता तसाच आहे. त्या बद्दल कुणीही काहीही लिहलेलं असलं तरी ते नाही ते नाही. पुष्कळ लोकांना गप्पा मारण्याची पण सवय आहे. असे लोक पुस्तकं सुध्दा फार लिहतात. त्याला आपण भारळून जातो. ती पुस्तकं नाही. ??????चांगली भाषा एखाद्या माणसाला येते म्हणुन तो जाणता नाही. ओळख आहे. ???????आपल्याला आपली ओळख पटवायची असली तर अश्या माणसाची सुध्दा ओळख आहे. आणि माझ्याजवळ अशी इतकी सहज सरळ ओळख आपल्याला ????????अश्या तऱ्हेचा मनुष्य जेव्हा माझ्या पुढे येतो किंवा माझ्या द्रुष्टीत येतो तेव्हा किंवा कुठेतरी ???????मी डॉक्टर साहेबांना दाखवलंय माझ्या डोक्यात इतकं गरगर फिरतं ???????????

आता सगळ्यांनी माझ्याकडे असा थोडासा हात करुन त्याची प्रचिती घेऊया. तर इतकी आता मंडळी सगळ्यांनी असं समजुन घेतलं पाहिजे कि आम्ही ते आता शक्य करणार आहोत. होऊ शकतं सगळ्यांना. सगळ्यांनी आता माझ्याकडे हात करा. ते पांच दहा मिनिटाचे काम आहे . ??????ते आपलं रेअलायझेशन झालं कि आपल्या हातातुन अश्या थंड वारं येतं. आणि डोक्यामध्ये निर्विचरिता येते. बाहेर ????? आणि डोक्यावर हात ठेवला तर इथे काहीही ???? ते बघुन घ्यायचं जो ????? स्वतःच स्वतःला ???? घ्यायचं. तर आपण डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे.

राजवाडे साहेब हे सुध्दा एक फार मोठे परम भक्त आहेत. परम साधु आणि डॉक्टर साहेब सुध्दा फार मोठे आहेत. त्यांचा मोठेपणा त्यांना अजुन माहित नाही. आता आपल्याला कधीच मोठं म्हणु शकणार नाही कारण त्यांचा अहंकारच सुटलेला आहे तेव्हा ही त्यांची डोकी खराब होऊ शकणार नाही. कारण ही फार मोठी मंडळी आहेत. फार मोठी संतमंडळी आहेत. आणि परमेश्वरावर फार मोठा दावा आहे त्यांचा. तेव्हा ते जे कार्य करत आहेत ते सगळ्या देशांचं आहे. हिंदुत्वाचं वृक्ष आहे???????? तेव्हा त्यांच्याशी जडती वैगरे करायची म्हणजे मुर्खपणा आहे. तेव्हा त्यांच्याकडून तुम्ही मदत घ्या. ते तुम्हाला सांगतील तुम्ही पार झाले आहात कि नाही. त्यांना माहिती आहे. ?????? दोन तीन वर्षाचा मुलगा सुध्दा नाही होत पार. हे होतं . पुष्कळदा असंही असतं कि एखादा फार आपण भक्त समजतो तो मनुष्य पार होऊ शकत नाही आणि एखादया माणसाला फार वाईट समजतो???????? काही नाही आतलं अंतरंग कुणी पाहिलंय???????? स्वतःला वाईट समजायचं नाही तुम्ही सगळ्यात सुंदर कलाकृती आहात . हजारो फुलं जरी मानवाच्या पायावर घातली तरी एका माणसाची सर त्याला येनार नाही. संबंध नंदनवन जरी त्याच्या पायावर घातलं तरी एक माणुस तयार होऊ शकनार नाही. इतकं सौंदर्य माणसामध्ये आहे. इतकं ते गौरव पुर्व आहे. त्याला फक्त जाणलं कि आपल्याला कळतं कि आपण किती चुका करत होतो जेव्हा आपण आपल्या पासुन दूर पळत असतो. मग मनुष्य कधी बोर होत नाही आपल्या आनंदात असतो. आणि ते सर्व धर्मानी. कुठल्याही धर्मानी असं सांगितलं नाही आम्ही ??? किंवा आम्ही तुम्हाला बांगड्या काढून देऊ , कि तुम्हाला अंगठ्या काढून देऊ , तुम्हाला आम्ही नारळ घालु असं कोणत्याही धर्मात लिहलेलं नाही……………incomplete