Sahajayogyanmadhe Dharma Stapna Aur Sahajayog, Dharma has to be established Within Mumbai (India)

Sahajyogyan Madhe Dharma Sthapna Zali Pahije 18th December 1976 Place Mumbai Seminar & Meeting Type ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे. मी आपल्याला आधी सांगितले की मी गणपतीसारखं एक नवीन मॉडेल तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ही विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात . अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी पदोपदी मी जाणते. फक्त एवढं म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे, फारच हळुवारपणे सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेलं आहे, पण जर आपल्यामध्ये ती योग्यता नसती तर हे झाले नसते. पैकी आज हजारो मंडळी इकडेतिकडे धावत आहेत. वेड लागलंय लोकांना. विचार करत नाहीत की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे अनादी काळापासून, मोठमोठ्या तत्त्ववेत्त्यांनी आणि श्रीकृष्णांसारख्या महान, परमेश्वराचीच ती एक साक्ष आहे, त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या त्या सगळ्या एकीकडे फेकून, त्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेलं आहे, त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते महम्मद साहेबांनी लिहिलेलं असो किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो किंवा श्रीकृष्णांनी गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला ‘स्व’ जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असं म्हटल्याबरोबर लोक यापासून परावृत्त होतात कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना पटतच नाही मुळी. असत्य असलं तर ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुजतंही जास्त. असत्याची जास्त कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय तर तक्काची पायरी. तर्क गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. ते कलीयुगात दिसतंय आपल्याला चोहीकडे. बापाला मुलावर विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. Read More …

2nd Talk Mumbai (India)

2nd talk, 1976-12-18 [Marathi Transcript]  मी आज आपण सर्वाना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. हे योगायोग जुने असतात .जन्मजन्मांतराचे असता ते,आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी होते हे ,ते आपल्या एवढे लक्षात येणार नाही .कारण आपल्याला आपला  पूर्वजन्म माहित नाही .पण हे पूर्वजन्माचे योगायोग आहेत आणि त्यामुळेच आज परत हया जन्मात सुद्धा आपल्या सर्वाना भेटण्याचा हा उत्तम वेळ आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे कि खरंच तो मी शब्दांनी  कधीच वर्णन करून सांगू शकत नाही .   ग्रामीण विभागात सहजयोग फार उत्तम पणे पोचला जाईल .हे मला माहित  आहे . कारण  शहरात राहाणारी लोक हि मंडळी स्वतःला फारच शहाणी समजतात . एकतर बहुतेक पढत मूर्ख असतात. पढत मूर्ख  नसले तर पैशाच्या आणि सत्तेच्या दमावर स्वतःला काहीतरी विशेष समजतात . त्यांना असं वाटतं कि सर्व जग त्यांनीच निर्माण केलेले आहे . हे आकाश सुध्दा त्यांनीच निर्माण केलेले आहें . आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत . आणि परमेश्वर नावांची वस्तू काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतेही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही,  कि आपण हे अधर्माचं कार्य करीत आहोत. अजून आपल्या देशातील ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मुंबई परमेश्वरालाआठवून आहे . आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे . आणि रामानी आणि सीतेने पायी प्रवास करुन सर्व भूमीला पूनीत केलेले आहे. पवित्र केलेले आहे . ग्रामीण समाजामध्ये जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परमभक्ती आहे. (notclear )सुद्धा लोक करतात पण पुष्कळसे लोक खोटया गोष्टी सांगुन पैसे उकळतात . काहीतरी भोळ्याभाबडया लोकांना भुलवुन काहीतरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये विचित्र तऱ्हेच्या भावना उत्पन्न करून त्यांच्या कडून पैसे उकळत असतात.  हे प्रत्येक खेड्याखेड्यातून चाललेलं Read More …