आजचा दिवस आपण ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस म्हणून मानतो आहे .पुष्कळ लोकांनी मला विचारलं की तुम्ही ख्रिस्ती धर्मात का जन्म घेतला . तर त्याला कारण दोन एकतर माझे आई वडील अत्यंत विशेष लोक होते .काहीतरी विशेष ,अत्यंत धार्मिक आणि फार उच्च प्रतीचे लोक होते ,असे आजकाल मिळणं कठीण आहे .आणि माझ्या आईने फर्ग्युसन कॉलेज मधून हॉनॉर्स गणितात केलं होत ,आणि रँग्लर परांजपेची शिष्या होती, आणि वडील संस्कृतचे पंडित होते ,त्यांना चौदा भाषा येत असत ,आणि या अशा दोन पुण्यवान लोकांच्या घरी आम्ही जन्माला यावं असा आम्ही बेत केला ,त्यात आणि ख्रिश्चन होते ते बर ,ख्रिचन लोकांची आपल्या हिंदुस्तानात अशी वाईट स्थिती आहे की त्यांना अस वाटत की ख्रिस्त हा इंग्लंड ला जन्माला आणि इंग्लिश लोकांचं अनुकरण करायचं ,त्यांच्या सारखं वागायचं ,त्यांच्या सारखे कपडे घालायचे , तस हुडदा यच ,हे सगळ काही म्हंजे ख्रिश्चन धर्माचं लक्षण ही पहिली गोष्ट आणि दुसरी म्हंजे आमचे प्रॉटेस्टंट ख्रिश्चन जे आहेत ते म्हंजे बुद्धिवादी त्यामुळे त्यांनी ख्रिस्ताला आपल्या बुध्दी त बसवले आहे, त्या चाकोरीत बसवले आहे ,आणि त्यानं च्य पेक्षा जास्त धर्ममार्तंड मी बघितले नाही इतकं अत्यंत अंधश्रधा ने भरलेली लोक आहेत ,अत्यंत,त्यांना काहीही कोणच कसलही चालत नाही ,रविवारी उठायच तयार बियार व्हायचं काहीतरी चर्च ला जायचं घरी यायचं झाल काम संप ल , सगळा धर्म तिथे आला कामाला आणि बाकीच्या वेळेला उखळ्या पाखाळ्या काढत बसायचय म्हंजे त्या बाबतीत महाराष्ट्रीयन तेव्हडा भाग जर सरला तर बिलकुल आपल्या महाराष्ट्रीयन बायका पुरुष असतात ना त्याच काढ याच काढ ,आणि ख्रिश्चन झाल्यावर सुद्धा जातीयता त्यांच्यात , म्हणजे आम्ही लोक आता शालिवाहन चे वंशज आणि शालिवाहन यांचं आता हे फार मोठे राजपूत होते चीतोडगडचे तर त्यांचं नाव आणायचं कुठून तर आता त्यांना शहाणा व कुळी मराठा बनवल ,आणि त्यांना साळवे अस नाव त्यांनी दिलं ,आणि त्या शहान व कुळीतले ख्रिश्चन च आम्ही लग्न करणार ,कुठ मिळणार शहाणं व कुलितले इथेच मिळत नाहीत तर त्यांच्यात काय मिळणार ,मग तुमचं गोत्र काय इथून सुरवा त , हिंदू लोकांना पण त्यांचं गोत्र माहित नसतं ,पण ख्रिश्चन जे मराठा आणि ब्रम्हणातले झालेत त्यांना पक्कं माहीत आहे त्यांचं गोत्र बित्र ,लग्न करायचं चर्च मधे जाऊन झाल तर झाल ,पण घरी येऊन सगळे तेच प्रकार ,अगदी त्याच्या मुळे मला सगळ माहित आहे,अजिबात काही मग तिकडे ख्रिश्चन धर्म दिसत नाही ,हे सगळ घास घालणे हे सगळं काही संबंध प्रकार तसा च्या तसा. म्हणजे नावाला ख्रिस्ती व्हायचं, आणि त्यातली एव्हडी तरी बाब त्यांची सुटली असती की जात नको तर ते ही सोडायच नाही .ते तस च्या तस म्हणजे एथे पर्यंत की आमच्या सगळ्यांच्या कुंडल्या काढल्या हो ,आणखी आपल्या कडे एक वाईट रीत आहे अत्त्या कडे देता येत ,माझया दोन्ही बहिणीना आत्या कडे दिली आणि माझया भावला मामा कडे दिले म्हटल नशीब माझया वेळेला असा काही प्रकार नव्हता . आणि गांधीजींच्या वेळेला गांधी जींकडे गेल्यावर ते म्हणाले सगळ्यांची लग्न बाहेर करा .त्या मुळे आम्ही सुतलो .नाही तर आम्हाला पण मामा नाही तर आत्या च्या घरी देऊन टाकले असते .हा असला प्रकार या क्रिस्टी लोकांचा .दिसायला फार सोज्वळ दिसतात हे लोक.पन आकलेचे बारा वाजलेले अहेत.कहि त्यांच्या डोक्यात जाणार नाही .आता माझे या भारतात किती क्रिस्टी शिश्य आहेत माहीत आहे का,इन मिन बाबा मामा सोडून कुणीही नाही .आणि सगळ्या नि माझयावर बहिष्कार टाकला . क्रिस्टी म्हणतात किं मी हिंदू धर्माचा प्रचार करते आणि हिंदू म्हणतात की क्रिस्टी धर्माचा प्रचार करते .अरे सन्यसि ला कुठली जात असते का .हा प्रकार म्हणून मी याच्यात जन्म घेतला .आणि इतका मला अंदाज आला होता सुरवातीला की हे लोक क्रिस्टा च्या नावावर काय तमाशे करू लागलेत .आणि आता क्रिस्टा नंतर जन्म घ्यायचा म्हटल्यावर आता इथेच घ्यावा आणि बघा व मग सगळ्याना .जर ते सगळे प्रकार यांचे माहीत नसते तर या सगळ्याना मी ठिकाणावर आणल नसत .. म्हणजे हा सगळा प्रकार मला माहीत होता म्हणून यांच्या बरोबर मी बोलू शकले याना भेटू शकले ,यांच काय चुकल ते मला कलाल .पण हे जातीच खूळ इतक असत की तुम्ही मुसलमान झाळात तरी डोक्यात असत बौध धर्मी झले तरी जातपात बघतात .काय आपल्याला रोग लागलाय जातीचा ,जातीतच लग्न करायच काय फायदा आहे मला समजत नाही .मग तो दारू डा असेना मर्तुकाडा असेना पण जातीतच लग्न करायच .मग तो मूलीना मारेल ,त्याना मारुन टाक्ल तरी चालेल ,हे पाप आहे राक्षशी पणा आहे, आपल्या पोटाच्या पोरी ना तुम्ही असे कराल का,लहानपणी सगळे लाड करणार आणि मोठी झाल की जा चुली त ,नाहीतर विहिरित उडी मर.कहि केल तरी चालेल , हुंडा द्यायचा,हे सगळे जातीचे प्रकार तोडले पाहिजेत .आता मला बघायच आहेकी आपले सहज योगी तरी किती मुल मुली बाहेर लग्न करतात . त्यांच तरी सुटलाय का ,म्हणजे क्रिस्टी होतो आम्ही आमच सुटल नव्हत .आता सहज योगी झल्यावर तरी सूट तय का ते आता बघायच. त्या च्या वर ही सुटणार नाही ,जात अहो पण त्या जातीचा तुमचाकाय सबंध ,हे तुमचे सोयरे आहेत ना प्रत्येक दिवशी कोणाचाही पेपर उघडला ,त्या मुलीला जखमा केल्या ,तिला विहिरीत टाकलं ,दुसऱ्या मुलीला जाळून टाकलं .बघून बघून माझं नुसतं चित्त खवळून गेलं .दोन दिवस पासून मी हेच बोलते आहे सगळा सहज योग्य करून पण जर तुम्ही जातीपातीत जात असाल तर तुम्ही सहज योग्य सोडा ,आमचा तुमचा काही संबंध नाही ,तुम्ही त्या जातीतच जाऊन मरा ,तिथेच जोडे खा ,हुंडा नाही दिला म्हणून ,तुम्ही हे पाठवलं नाही ते पाठवलं नाही असं कस व्यवहार केला नाही ,अमुक पाठवलं नाही तमुक पाठवलं नाही ,सगळे भिकारडे इथून तिथून .त्यांचा कसला समाज ,अशे मागासलेले आपण किती आहोत ,अगदी जंगल्या सारखे आपण वागतो . सहज योगात मुळीच जातपात चालणार नाही , ज्यांना जातपात ठेवायची आहे त्यांनी कृपा करून सहज योग् सोडून जावा .हा हे माझं म्हणणं नाही कि तुमचं जर जातीत लग्न झालं ,आम्ही ठरवलं होत कि जातीत लग्न करायचं नाही ,दोन्ही जातीत नाही पण आम्ही किती प्रयत्न केला तरी आमच्या नशिबी हेच दोघे जण आले ,आम्ही इतका प्रयत्न केला कि बाहेर लग्न व्हावीत मुलींची पण ते काही जुळलं नाही .तेव्हा आज ख्रिस्त च्या या जन्माच्या शुभ प्रसंगी आपण असा विचार केला पाहिजे , की त्यानी एव्हडे आपल्या साठी हाल सोसले,आणखीन त्याला क्रॉस वर चढवल ,खांबी दिल ,मारुन टाकला ,हे सगल आपल्या साठी झाल ना .कारण आपण मूर्ख होतो .पण आता आपल्या मूलीनाच आपण सुलावर चढवतो आहे म्हणजे केव्हडे मोठे आपण खरे लोक आहोत बर ,मूलीना सुलावर चढवून टाकायच ,बोललिस तर खबरदार ,तुला मी मारुनच टाकिन तुझया नवर्याचा मी खून करून टाकिन , बाकी मर्दुमकी काही नाही ,मुलीवरच सगळी मर्दुमकी चालवायची .रामदास काय म्हणतात मराठा तितुका मिळवावा ,तर मराठ्यना बघायला गेले तर कुठे गेले मराठे ,बस्त्याला बसले ,तलवारी कुठे आहेत ,आता तलवारी कुठे माताजी ,फेटे लाउन बसलेत तिकडे बस्त्याला ,हे नवीनच काढलाय बस्त्याला ,मूर्खाना काय साड्यंच समजत का , साड्या खरेदी करा म्हणाव आणि नेसा नंतर .शहणाव कुळी आहेत म्हणे ,तर ह्या सर्व गोष्टीन च्या मुळे कधी कधी अस वाटत की एव्हडे मोट मोठाली आपली अवतरन झाल ,इतके उदाहरण झाले अहो तहत किती वर्षा पासून जाती पाती वर लोकानि अगदी शरसंधान केल पण ते कुणाच्या डोक्यताच जात नाही का .गांधी जिंचा पुतळा उभारा त्याना हार घाला ,ते गांधीजी काय बोलत होते ,टिळक काय बोलत होते ,आगरकर काय बोलत होते,आगरकरणी तर केव्हड ब्राम्हनांनं वर काढल ,दासगानू काय म्हणत होते ,नुरसिह सरस्वती काय म्हणत होते ,अहो ते काय जरी असले तरी माताजी आम्ही माली आहोत ना मग माली टच लग्न झाळेल बर ,आणि तो माली करतो काय तर तसा चांगला अहेपण तो दारू पितो आणि बायकांचा पण नाद आहे म्हणे ,पण तो माली आहे ना मग काय,पण तो तुम्हाला स्पेशल काही करणार आहे का , असा क्राइस्ट नि असा आपला त्याग केला,जगात आले किती मोट कार्य केल,कुठे जन्मले ते बघा ,कस त्यानी करून दाखवलेले आहे ,की एका कुमारिकेच्या पोटी जन्म घेतला ,किती पावित्र्य आहे त्याला ,आणि ते पावित्र्य परमेश्वरई आहे ,आता कुमारिकेच्या पोटी जन्म झला तर झाल सगळेच मरायचे लोक .चुक पुरुषाची असली तरी त्या मुलीलाच मारायच ,तुझच चुकल ,एखाद्या पुरुषाने बाईला टाकली तरी तीचीच चुक ,अरे त्या बाईला टाकली त्या पुरुषाने त्याच नाही चुकल त्या बाईच च चुकल आणि तिने झुरून झुरून मरायच .कुणाला वैध व्य आल तर त्या बाईने तिच्या नवर्याला खाल्ल,खाल्ल म्हणजे खाल्लच व्यवस्थित .हे प्रकार क्रिस्टी धर्मात नव्हते,म्हणून आमच्या पूर्वजानी क्रिस्टी धर्म घेतला .पण त्यातले जे भोपळ्याचे प्रकार पहिले ,त्यातले जे डोक्याच जे भोपल झाल आहेटे पाहून मी थक्क झाले तर आता जायच तर कूट जायच आणखी .आता कोणाचा धर्म आहे तर हा आपला सहज धर्म आहे ,या मधे बुद्धी ही तल्लख पाहिजे ,अक्कल पाहिजे आणि रिधय ही मोट पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण मागसलेले नाही आहोत ,अल्ट्रा मॉडर्न लोक आहोत आपण ,मॉडर्न च्या पण वर गेलेले ,प्यरामोडारनिजाम आहे सहज योग म्हणजे ,तेव्हा घरात टेलिफोन लावा ,टेलिविजन लावा सगळ लावा पण मुलीला मात्र चूप बस तिकडेच का तर अहो उद्या सासू मारेल तिला निदान थोडीशी तिला प्रॅक्टिस आसूद्या . पण तिला मारायला कशाला पाठवता त्या सासू कडे ,म्हणजे तुम्हाला काही प्रेम आहे की नाहीया मुळीच .आज क्रिस्टा च्या या जन्मा दिवशी सगळ्यां नि हे व्रत घेत ल पाहिजे की आम्ही जाती पती मोडून काढणार ,एकदम आम्ही हे मोडून काढणार .एकवेळ ब्राम्हण मोडतील पण मराते नाही मोडायचे .म्हणून मराट आ मधे एकही संत साधू झाला नाही आज पर्यंत . एक मीच आहे म्हटल तर बाकी एकही संत या मराट आ मधे झाला नाही कारण ते तिकडे जाउ न बसतात ना ते बस्त्याला ,ते ध्यानाला कधी बसणार आहेत .तेव्हा आपल्या मुलींचे असे हाल करू नका .त्यांच आयुष्य ठीक करा आणि डोक उघड करा .भुता च्या आहारी जायच नाही .क्रिस्टा च्या आयूषाला फारच थोडे दिवस असे मिळाले की तो लोका ना समजावून सांगू शकला फक्त चार वर्षात किती काम करून गेले ते .पण त्याची घाण मात्र या लोका नि करून टाकली .त सच आपल्या इथे जात पात नको म्हणून सगळ्या सुधारका नि इतकी मेहनत घेतली पण आता जातीच म्हणजे इतक मोट शेपूट ला उ न घेट्ल आहे की एक वेळ शरीर तुटे ल पण शेपूट तुटणार नाही अशी वेळ आली आहे .आणि हे नवीन च उगवलेले आहे,तुम्हाला सांगते जेव्हा गांधीजी आम्हाला सांगत असत जवळ जवळ ही गोष्ट आहे तिस चाळीस वर्षा पूर्वीची तेव्हा कुणी जातीत जातीत लग्न केल तर लोक त्याना वाळीत टाकत असत .की हा कोण मागसलेला मूर्ख माणूस आहे ,कोण च्या खेड्यातून आला काय खेडवळ ,लोक त्याच्या बद्ल बोलत असत असे ,आता उलट झाल आहे आतां मोठमोठाले श्रीमंत ,शिकलेले ,विद्वान बसून चर्चा करतात की साडी कोणती द्यायची .वा वा वा अशी प्रगती आपण करून ठेवली आहे .आणि नाही बोलल तर रुसयच ,राग वायच ,कुठल्या स्ती ती ला आपण आलोय आता ,अहो आम्ही असे धूरंदर लोक पाहिलेत आणि हे कुठले हे बाजार बून गे मला समजत नाही कुठं न आले ,कोण च्या देशातून हे बाजार बून गे इथे जन्माला आलेत .भलत्या गोष्टी करायच्या ,काही सुध्दा त्याच्या बदद्ल मोठेपणा नाही .तर आजच्या या मोठ्या समारंभा दिवशी एक च विनंती आहे की क्रिस्टा ला तुम्ही वचन द्याव की तू जात पात मानली नाहीस तशी आम्ही पण मानणार नाही .अस वचन मनापासून सगळ्यां नि द्याव .कोणतीही जात पात मानायची नाही .आणि तेच मी आता या सहज योग्या ना समजावून सांगत होते . ख्रिसमस पूजा, पुणे
From now you need to login to access freely to all the Puja videos in Nirmala Vidya Amruta.
This is made in compliance with the recommendations on the use of the Intellectual Property of Shri Mataji prepared by NIPC. You can read the guidelines here.
Log In
or
Create New Account
Forgotten password?
From now you need to login to access freely to all the Puja videos in Nirmala Vidya Amruta.
This is made in compliance with the recommendations on the use of the Intellectual Property of Shri Mataji prepared by NIPC. You can read the guidelines here.