Awakening Of Kundalini Is Not A Ritual Shivaji Park, Mumbai (India)

1999-02-20 Awakening Of Kundalini Is Not A Ritual, Mumbai, India Hindi सत्य को खोजने वाले आप सभी साधकों को मेरा प्रणाम.  सत्य के और हमारी नज़र नही होती, इसकी क्या वजह है? क्यों हम सत्य को पसंद नहीं करते और आत्मसात नहीं करते? उसकी नज़र एक ही चीज़ से खत्म हो जाये तो बातकी जाए, पर ये तो दुनिया ऐसी हो गई की गलत-सलत चीज़ों पे ही नज़र जाती है। सो इस पर यही कहना है कि ये घोर कलियुग है, भयंकर कलियुग है। हमने जो लोग देखे वो बहुत निराले थे और आज जो लोग दिखाई दे रहे हैं, वो बहुत ही विक्षिप्त, बहुत ही बिगड़े हुए लोग हैं। और वो बड़े खुशी से बिगड़े हुए हैं, किसी ने उन पे ज़बरदस्ती नही की । तो अपने देश का जो कुछ हाल हो रहा है उसका कारण यही है कि मनुष्य का नीति से पतन हो गया। अब उसके लिए अपने देश में अनेक साधु-संतों ने मेहनत की, बहुत कुछ कहा, समझाया। और खास कर भारतवर्षीयों की विशेषता ये है कि जो कोई साधु-संत बता देते हैं उसको वो बिलकुल मान लेते हैं, उसको किसी तरह से प्रश्ण नही करते। विदेश में ऐसा नही है। विदेश में किसे ने भी कुछ कहा तो उसपे तर्क करने शुरू कर देते है। लेकिन हिंदुस्तान के लोगों की ये विशेषता है कि कोई ग़र साधु-संत उनको कोई बात बताए तो उसे वो निर्विवाद मान लेते है कि ये कह गए है ये हमें करना चाहिए। छोटी से लेकर बड़ी बात तक हम लोग ऐसा करते हैं। ये भारतीय लोगों की Read More …

Shri Kartikeya Puja, On Shri Gyaneshwara Mumbai (India)

Marathi Transcription of Shri Kartikeya Puja. Mumbai (India), 21 December 1996. कार्तिकेय पूजा वाशी २१/१२/१९९६ आज आपण सर्वांनी श्री महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली आहे पण या महाराष्ट्रात महालक्ष्मीची पूजा तर सतत चालू आहे आणि स्वत: त्यांनी इथे प्रकटीकरण केले आहे, पण माझ्या मते इथे सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावे अशी आंतरिक इच्छा झाली कारण त्यांनी या महाराष्ट्रातच जन्म घेतला आणि ते म्हणजेच ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितले नाही कारण महाराष्ट्रीयन लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. स्वत: साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतावनुभव असे दोन मोठे फारच महान असे ग्रन्थ लिहीले. हे जर तुम्ही व्हायब्रेशन्स वर बघू शकाल, तर एकदम महासागरात, आनंदाच्या लहरीत तुम्ही स्वत:ला शोधू शकाल. एवढी मोठी गोष्ट मी महाराष्ट्रात सांगितली नाही. त्याला कारण महाराष्ट्रीयन लोकांची प्रवृत्ती झाली आहे. कदाचित आपल्याकडे राजकारणी लोक पूर्वी इतके भयंकर झाले. त्यांचा भयंकरपणा व घाणेरडेपणा महाराष्ट्रात पसरला असेल आणि कार्तिकेय हे महाराष्ट्राचे. आम्ही कार्तिकेय असे समजणे म्हणजे अगदी व्यवस्थित साधं महाराष्ट्रीयन डोक आहे. आम्ही काहीतरी शिष्ट. आता यांनी सांगितली खरी गोष्ट आहे की चाळीस आय.ए.एस. ऑफिसर्स आले होते आणि मी येतांना बघितल तिथे पोलिसचे तीन घोडेस्वार उभे होते. म्हटलं ‘हे कोण आले होते ?’ तर म्हणे स्वत: चीफ सेक्रेटरी आले होते. तिथल्या गव्हर्नरनी सुद्धा मला पाचारण केले की, ‘माताजी, मी जर तुमचे पाचारण केले नाही तर लोक मला उचलून फेकतील.’ अशी तिथल्या लोकांची जागृती. तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला नाही. फक्त या महाराष्ट्रात का जन्म घेतला ते आता मला लक्षात येतयं. तेवीस वर्षातच ‘नको रे बाबा हा महाराष्ट्र’ म्हणून त्यांनी समाधी घेतली. जितकं संतांना महाराष्ट्रात Read More …

Mahashivaratri Puja Mumbai (India)

Mahashivaratri Puja Date 19th February 1993 : Place Mumbai Type Puja [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] ि महाशिवरात्री पुजा (दि. १९/२/९३ मुंबई) THIE ु क जिथे सर्व काही आपोआप घडते व कार्यान्वित होते, त्था ठिकाणी भगवान शिवाचे कार्य काय असावे? ते प्रत्येक शिवपूजा फार महान आणि विशेष पूजा असते. शिव तत्वाची प्राप्ती है मानवाचे अंतिम ध्येय असते. शिवतत्व गोष्टीस अवोधितपणात साक्षी असतात, शक्तीने सर्व विश्वाची मानवी युध्दीच्या पलिकडे असून युध्दीने जाणता येणार नाही. आत्मसाक्षात्कार मिळ पर्यंत आत्मा व शिवतत्व यांचे ज्ञान श्री शिवचि कार्य केवळ साक्षी असते एवढेच आहे. त्याच्या होऊ शकत नाही. श्री शिवांच्या नांवाखाली खोटेपणा, मिथळ्व साक्षी स्वरपतत्वामध्यच सर्व काही घटील होते. त्याची दृष्टी आणि अधश्रध्दा निर्माण झाल्या आहेत. आत्मसाक्षात्कारी झाल्या ज्या व्यवतीवर पडते त्या व्यवतीचा उध्दार होतो. त्यांची शिवाय व्यक्तिला भगवान शिवांचे शान होणे अशक्य आहे. कारण त्यांचा तो स्वभावच आहे की त्यांना समजण्यासाठी खेळच आहे. त्यांना मुद्दाम काही कयला लागत नाही. जस व्यवतीला ज्या पालळीवर सर्व संदगुण अंतयमी प्रस्थापित होतील त्या उंची पर्य पोचावे लागते ते निरागस शंकर आहेत असे म्हटले जाते. आजकाल अनेक, बुध्दीवादी लोक निर्माण झाले आहेत. त्यांनी त्यांच्या दुष्ट मनुष्य, निष्पाप, सत्यवचनी आणि न्यायी माणसास बुध्दीच्या भराऱ्या मारताना जो कांही मुखपणा त्यांच्या डोक्यात त्रास देतो त्या वेळी तो सूप रागायतो, त्याचा क्रोध भयंकर शिरला तो ते लिहून काढतात. त्यांच्या मते भगवान कषिवांच्या असतो. हुमार माणूस त्याचा राग शांत करण्यात यशस्वी होतो, अयोधितेला काही महत्व नाही. व्यक्ती जेवढी धूर्त व कारस्थानी परंतु अयोधित मागूस हसंत राहती कारण त्याच्यावर काहीही असेल तेवदी ती अधिक प्रसिध्द होते तर मग असे असताना परिणाम Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 17th March 1992 : Place Mumbai Puja Type [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] नाही अथवा बुद्धांचा त्यांच्याशी नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही माझा वाढदिवस साजरा करीत आहात. तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही घटित झाला आहात आणि तुम्ही काहीतरी मिळविले आहे. मी जी आहे तीच आहे. मला काहीच व्हायचे नव्हते. तुम्हाला तुमच्या आत्यामधून आत्मबोधाची प्राप्ती झाली आहे. ही अतिशय महान गोष्ट आहे. सर्व सहज योगी आता फारच चांगले व धार्मिक झाले आहेत. दुसर्या धर्माच्या लोकांना पाहिले, तर असे दिसते की त्यांच्या धर्माच्या सर्व नियमांचे महत्प्रथासाने ते पालन करतात, उपास करतात, हिमालयांत जातात. डोक्यावर उभे रहातात व इतर अनेक गोष्टी करतात. पण त्यांचा आत्मा प्रकाशित झाला नाही. त्यांच्या गुरुंच्यावर | की इस्लाम आणि मुसलमान लोक यांच्यात फारच फरक आहे. ते लोक देवावर ते विश्वास ठेवतात पण ते गुरुच्या सारखे होण्याचा प्रयतल करतात कां? त्यांच्या गुरुंच्या शक्तीमुळे व गुणामुळे ते प्रकाशित झाले नसल्यास केवळ विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. कोणताच धर्म वाईट नसतो. लोक त्याचे कसे आचरण करतात त्यांच्यावर सर्व काही आहे. काही डाव्या बाजूमध्ये तर काही उजव्या बाजूमधे गेले. खिश्चन धर्मातही असेच झाले. त्यांना अंतर्यामी काही शक्ति मिळवायच्या होत्या. म्हणून त्यांनी लोकांना कुसावर चढविले आणि श्री. खिस्तांच्या नावाखाली अनेक प्रकार केले. अजूनही तुम्हाला अझर बैजान मधे हजारो लोकांना कसे मारले ते आमेनियामधे पहायला मिळते. मारतेवेळी ते एका हातांत बायबल ध्यायचे, जणूं काही त्यांच्या बरोबर परमेश्वरच होता, आणि त्यांना वाटते की त्यांच्याच धर्म बरोबर आहे, आणि मुस्लिम लोक वाईट आहेत. मुस्लिम सुद्धा तेच करतात. इस्लाम फारच सुंदर व महान धर्म आहे. मुस्लिम Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja, Mumbai (India), 21 March 1988. I have told them, in Marathi language because most of them are Maharashtrians here, that in every part of the country one has to work hard and one has to spread Sahaja Yoga with complete dedication and understanding. That today is the day for us to achieve that power, to absorb that power by which we are going to spread Sahaja Yoga all over the world. It’s you who can enlighten other people. It’s you who can show them the path and it’s you who can bring forth this new transformation which has been promised thousands of years back. That is going to happen and should happen in our country, much more than in any other country. But, what I find, it is working out better in other countries than in India. The reason, I try to find out why Indians can not get to Sahaja Yoga with that depth. They may be in numbers but not in that depth. What is the reason, why can’t they get into that depth and when I try to locate, I shouldn’t say this today but it is a very obvious thing that we had such great and great people like Shri Rama, Shri Krishna, great saints, people in our ancient times. Such ideals, very great kings that we have, ideals of the highest types before us. And when we started following them, we developed a very special type of character which is called as hypocrisy, Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 21st March 1987 : Place Mumbai Puja Type Speech Language Marathi आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, इंग्लिश भाषेत जाऊ दे. कारण आपल्या संस्कृतीत आणि इंग्लिश संस्कृतीत फार तफावत आहे. तेव्हा ती आधी हिंदीतच फोफावी लागते. जरी आपली मातृभाषा कोणतीही असली, तरी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. मग त्यापासून तुम्ही इतर संस्कृत वरगैरे सगळे शिकू शकता. पण आधी हिंदी भाषा शिकली पाहिजे. सगळे फारेनर्स आता हिंदी भाषा शिकत आहेत आणि मला म्हणतात, ‘माताजी, ह्या लोकांना तरी हिंदी येतं ! मराठी लोकांना तर हिंदी येतच नाही. मग त्यांच्याशी कसं बोलायचं?’ म्हणजे त्यांनी चौदा भाषा शिकायच्या का? आता आपलं विश्वाचं कार्य आहे. आता राष्ट्रभाषेचे तसेच धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे त्यांनीच काढलेले आहेत. निदान आपण तरी महाराष्ट्रात त्याला नीटपणे सजवलं पाहिजे. मी राष्ट्राभिमान म्हणून म्हणत नाही. पण मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. हिंदी भाषेशिवाय ही संस्कृती आपण जगभर कशी पसरवू शकतो? एक तर सगळ्यांना मराठी भाषा शिका म्हणून म्हणावं लागेल. तसं काही जमायचं नाही. पण आता हिंदी भाषा तरी शिकली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांना कठीण नाहीये हिंदी भाषा शिकणं! ती शिकली तर बरं होईल. तसं महाराष्ट्रात फिरत असतांना मी मराठीतच बोलत असते आणि अध्यात्माला फार पोषक आहे, हे सर्व जरी Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बद्ल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकी कडनं वाढतो आणि एकी कडनं आयुष्य कमी होतं. पण सहज योग्यचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं कि आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली आहे. आपलं आत्मिक वृक्ष वाढत चाल्लय. जरी आयुष्य कमी होतं चाललं तरी सुद्धा आत्मयचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणी प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलौकीत करून टाकतं. तेव्हा जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत हा आत्मा अधिक आणि अधिक आपल्या चित्ता मध्य प्रकाश ओढवतो. आयुष्याचा विचार मनुष्याने केला नाही पाहिजे. योग मिळाल्यावर जे आता आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा एक एक क्षण महत्वाचं आहे प्रत्यक क्षणी आम्ही आपली वाढ करून देऊ शकतो. असं समजलं पाहिजे कि जसे बी ला अंकुर फुटतं आणि अंकुर फुटताना बी ला असं वाटतं कि आपलं आयुष्यं संपून गेलंय पण खरोखर त्याचं रूपांतर आता मुळांन मध्ये झालेलं आहे. योग्यांच्या आयुष्याचं महत्व हे आहे कि जेव्हा योग्यांना मरणं येतं तेव्हा त्यांचे अंकुर गौरवांचे अंकुर पृथिवीच्या बाहेर निघतात आणि झाडं कीर्ती रूपानं झळकू लागतं. म्हणजे देह त्याग झाल्या नंतर मनुष्य कीर्ती रूप उरतो तेव्हा योगानंतर जे आयुष्यं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण आता संतांची किती लक्षणं सांगावी. ज्ञानेश्वरांना आपल्या हयातीत लोकांनी किती त्रास दिला, हा काय तरीच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो असं सुद्धा लोकं त्यांना  म्हणाले. कबीरांना किती लोकांनी त्रास दिला. नानकांना किती त्रास झाला. तुकारामांना लोकांनी कधींच मान्य केलं नाही, नामदेवांना सुद्धा लोकांनी Read More …

Birthday Puja Mumbai (India)

जनम दिवस पूजा २१ मार्च १९८५ , मुंबई आज के ६३वें जन्मदिवस पर आपने जो समारोह रचा है उसके लिए एक माँ को क्या कहना चाहिए? क्योंकि जो कुछ भी है सब आपके लिए ही है। ये सारी उम्र भी आपके लिए है इसलिए इसके लिए यदि आप इस समारोह को मानते हैं तो इतना ही कहना है कि यह अपनी चीज़ है। और इसका आपको पूरा उपयोग करना चाहिए। क्योंकि जिन्दगी बहुत महत्वपूर्ण है । आज तक परमात्मा ने अनेक लोगों को संसार में भेजा। उन्होंने भी कार्य किया है । उस कार्य की ही स्वरूप आप लोगों ने सहजयोग पाया है। लेकिन अभी तक आप लोग शायद इसका महत्व नहीं जान पाए। पहले तो लोग पहाड़ों में घूमते थे, बहुत तपश्चर्या करते थे, परमात्मा की खोज में रहते थे । अब फलश्रुति हो रही है। आज उसी कार्य के आशीर्वाद आपने सहज में ही आज अपनी आत्मा को प्राप्त किया, इतना सहज और सरल मिला है, और उससे इतना क्षेम प्राप्त हुआ है। इस कदर आपने शक्तियों को प्राप्त किया है, उसमें कभी भी ऐसा आपको लगा नहीं कि इस चीज़ को मिलने में कितना प्रयत्न करना पड़ा, कितने जन्म लेने पड़े, कितनी जिन्दगियाँ बितानी पड़ीं, उसके बाद आज आप सहजयोग को प्राप्त हुए । और इस दशा में आये हो कि आज आप एक साधु स्वरूप हैं। बहुत लोग सोचते हैं कि सहजयोग में आने से हमारी घर की सांपत्तिक स्थिति ठीक हो गयी या हमारे बच्चे ठीक हो गये। लड़कियों की शादियाँ हो गयीं, लड़कों को Read More …

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत, आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, आम्हाला अशी मेहनत पडली किंवा आम्हाला असा त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. पण जे ह्यांना सांगते तेच आपल्याला सांगते. आज आपण तिळगूळ देतो. कारण सूर्यापासून जे त्रास आहेत ते आपल्याला होऊ नयेत.  पहिला त्रास, सूर्य आला म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो. एक दुसऱ्याला उणंदुणं बोलतो. त्याच्यामध्ये अहंकार बळावतो. सूर्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना फार अहंकार आहे. म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा मंत्र आहे, की ‘गोड गोड बोला. ‘ तिळगूळ घेतल्याबरोबर अंगात गरमी येते आणि लागले वसकन् ओरडायला. म्हणजे झालं! अहो, आत्ताच तिळगूळ दिला. निदान तेवढं तरी तुम्ही गोड बोला माझ्याशी. ते सुद्धा जुळत नाही. तिळगूळ घेतला नी लागले ओरडायला. कसला तिळगूळ तुमचा, फेका तिकडे. तेव्हा आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं, की ही फार सुसंधी आहे. माताजी आल्या आणि माताजींनी आम्हाला कितीही सांगितलं तरी ते आमच्या डोक्यात जाणार नाही. जर आमच्या डोक्यात गरमी असली तर काहीही जाणार नाही. ही गरमी निघायला पाहिजे. आणि ही गरमी आपल्यामध्ये कुठून येते ? तर ती अहंकारामधून येते. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला, तेव्हा सगळ्यांच्या भांडाभांडी असायच्या. म्हणजे इथपर्यंत की डोकी फोडली नाही हे नशीब! बाकी डोकी शाबूत आहेत सगळ्यांची आता. पण भांडणं फार. कुणाचं कशावरून Read More …

Sarvajanik Karyakram Mumbai (India)

Sarvajanik Karyakram 29th November 1984 Date : Place Mumbai, Public Program ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सत्याच्या शोधात असणाच्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार! आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे की, प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे ? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द ‘प्रपंच’ हा काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. ‘प्र’ आणि ‘पंच’. ‘पंच’ काय तर आपल्यामध्ये जी पंचमहाभूते आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती ‘प्र’ लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. ‘प्र’ म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. ‘अवघाची संसार सुखाचा करेन’ असे जे म्हटले आहे ते सुख प्रपंचातच मिळायला पाहिजे. प्रपंच सांगून परमेश्वर मिळविता येत नाही. पुष्कळांची अशी कल्पना आहे की, योग म्हटला म्हणजे कुठे तरी हिमालयात बसायचे आणि गारठून मरायचे. हा योग नव्हे. हा हट्ट आहे. हट्टच नव्हे तर थोडासा मूर्खपणाच आहे. ही जी कल्पना लोकांनी धर्माबद्दल केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. विशेषकरून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत – होऊन गेले. त्या सगळ्यांनी प्रपंच केला फक्त रामदासस्वामींनी प्रपंच नाही केला. पण प्रत्येक दासबोधातून प्रपंच वाहतो आहे. ‘प्रपंच काढून कोणी परमेश्वर मिळवू शकत नाही’ हे त्यांचे वाक्य अनेकदा आले आहे . प्रपंचातून उठून आपण परमेश्वर मिळवायचा ही कल्पना बरेच वर्षापासून आपल्या देशात आलेली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. कारण बुद्धाला उपरती झाली, तो संसार सोडून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्याला आत्मसाक्षात्कार झाला. पण तो जेव्हा संसारात होता तेव्हाही त्याला उपरती झाली नसती अशी गोष्ट नाही. समजा आम्हाला दादरला जायचे आहे. तेव्हा आम्ही सरळ, धोपट मार्गाने तेथे पोहचू शकतो, पण जर आम्हाला इथून भिवंडीला जायचे आहे, मग तिकडून आणखी पुण्याला जायचे, आणखीन फिरून चार ठिकाणी मग Read More …

Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful Mumbai (India)

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहून सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर -द्वार, आई – वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱ्हेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही . पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, Read More …

Birthday Puja and Havan Mumbai (India)

Celebration of Shri Mataji’s Birthday. Bombay (India), 30 March 1983. First Bhajan, “Bbhay kaya taya Prabhu Jyachare,” was sung. Shri Mataji remarked, “That was My father’s favorite song”. Many people have always asked me that why God created this Universe. Of course, we are not supposed to ask questions to God. It’s easy to ask questions to Mataji when She is giving a lecture. But God is a person who is beyond questions. And why He created Universe is something like why I wore all these ornaments. As I am not habituated of wearing ornaments, but I have to do it. I have to do it just to please you people, or we can say that God created this earth, just to please His own children, just to make them happy, just to make them enter into the Kingdom of God, to give all that what He has got. So He had to create this creation in such a way that He could create His own image, reflect it and make it enjoy itself. It’s a very mutual appreciation, as we call it, andolan. Whatever He does for us, is for His own pleasures. But the beauty of it is that your pleasure is His pleasure. And the other way round is, His pleasure should be your pleasure, too. Once that becomes the fact that the pleasure of God becomes your pleasure, you enter into that beautiful arena of heavenly joy, swargiya anand. Only if it is one-sided enterprise or Read More …

Talk to Sahaja Yogis Mumbai (India)

Sahaj Seminar Date : 10th December 1980 Place Mumbai Туре Seminar & Meeting Speech Language Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता चव्हाणांनी आपल्याला सहजयोगाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. पण कोणत्याही गोष्टीची जर माहिती मिळाली, तर ती गोष्ट मिळाली असं नसतं. माहितीने आपण फक्त जाणतो, की अमुक वस्तू अशी आहे. समजा आम्ही लंडनची आपल्याला माहिती दिली. तरी तुम्ही काही लंडनला अजून गेले नाहीत नां ! तेव्हा लंडनला जाऊन तिथलं वातावरण कसं काय आहे, त्याचा अनुभव यायला पाहिजे. त्यानंतर सबंध लंडनमध्ये काय काय प्रकार आहेत, कोणते रस्ते आहेत, कोणत्या इमारती आहेत, त्या सर्वांचेसुद्धा ज्ञान व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर, ते सगळे कळल्यावर तिथले कायदेकानून काय आहेत ? मग आपण तिथे वागायचं कसं? ज्याने आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होईल, ज्यासाठी आपण आलो. हा सगळा विचार करावा लागतो. अगदी तसेच सहजयोगाचे आहे. फक्त फरक एवढाच आहे, की सहजयोग ही जिवंत क्रिया आहे. जिवंत क्रियेत आणि कृत्रिम क्रियेत फार अंतर असतं. जिवंत क्रियेत कोणती गोष्ट कशी घडेल ते सांगता येत नाही. म्हणजे आता एखादं झाड जर तुम्ही लावलं, त्याला कुठे फांदी फुटेल, कुठे फुलं येतील, कधी येतील, कशी उमलतील, किती फळें येतील? ते काही आधी सांगता येत नाही. परत ते दिसायचं नाही काही सकाळी उठले फुलं आली. नंतर एखाद्या दिवशी सकाळी उठले फळं झाली. तसं सहजयोगाचं आहे. आधी पार व्हायचं. म्हणजे तुमचे कोंब फुटले. पार झाल्यावर, आता काय काय होतंय आमच्या आतून ते बघत रहायचं, साक्षी स्वरूपात. त्यासाठी पोषक काय करावे लागेल, तेवढं करत जायचं आणि ते करण्यासाठी शक्ती येते माणसामध्ये. म्हणजे मी आता कधीही प्रोग्रॅमच्या आधी म्हणत नाही की तुम्ही दारू पिऊ नका, की सिगरेट पिऊ Read More …

Seminar Mumbai (India)

1980-12-09 Seminar India (Marathi) Sahaj Seminar Date : 9th December 1980 Place Mumbai Туре Seminar & Meeting Speech-Language Marathi CONTENTS | Transcript Marathi 02 – 15 English Hindi || Translation English Hindi Marathi FINAL TRANSCRIPT MARATHI TALK  सर्व संसारिक गोष्टींकडे लक्ष, जसे माझ्या मुलीचं लग्न, झालं माताजींचे पाच तास त्याच्यात. इथे जागृती नाही. लंडनला हृदय आहे. इथे लोकांना हृदय राहिलेलं नाही. हृदय गेलं त्यांचं, संपलं. ते मागेच पार वितळून गेलेलं दिसतं कुठेतरी. संपलय. ते हृदय नाही, फ्रोजन हार्ट , थिजलंय हृदय त्या लोकांचं. झालं. तिसरं झालं, युरोप, ते दारूने सबंध भरलंय! तिथलं लिव्हर कसं असणार? तेव्हा ही दशा झालेली आहे विराट पुरुषांची.  आता तुम्ही जागृत व्हावं. तुमचं लक्ष परमेश्वराकडे वेधलं पाहिजे. काही नाही, आम्ही जातो की हनुमानाला. एखादा नमस्कार घातला की झालं. सकाळी जातो ना! बरं बुवा झालं. पुष्कळ झालं. आम्ही नमस्कार तर करतो. आहे आमचा विश्वास हं परमेश्वरावर! अगदी उपकारच आहेत परमेश्वरावर सगळ्यांचे! अहो, तुम्हाला काही मिळवायचं आहे की नाही असा प्रश्न चार लोकांना विचारायला पाहिजे. सहजयोग्यांचं मुख्य कार्य म्हणजे असं आहे, की प्रकाश मिळाला दिव्याला, तर तो काय करतो? सहजयोगानंतर मग काय करायचं? प्रकाश द्यायचा असतो. किती लोकांना प्रकाश दिला आम्ही? केवढा सुगंध आहे तुमच्यात. केवढा आनंद आहे तुमच्यामध्ये! तो वाटला का तुम्ही का स्वत:च आनंदात बसले. माझी साधना चांगली असली म्हणजे झालं. ‘मी साधना खूप करतो माताजी, माझ्या घरी बसून. आणि काहीच प्रगती होत नाही.’ होणार कशी? पसरायला पाहिजे नां! जोपर्यंत कलेक्टिव्हिटी येणार नाही, जागतिकता येणार नाही, सार्वभौमिकता येणार नाही, तोपर्यंत तुमच्या सहजयोगाला काहीही अर्थ नाहीये. अगदी बेकार आहे. जंगलामध्ये जर एखादं फूल आलं, आणि त्याला कितीही Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979. [Translation from Hindi to Marathi] ‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. जेथे जेथे पुष्परूपी साधु-संत झाले तेथे तेथे त्यांनी धर्माचा सुगंध पसरविला. परंतु आसपासच्या लोकांना या सुगंधाचे किंवा साधु-संतांचे महत्त्व समजले नाही. तेव्हा एखाद्या संताचा संबंध आदिशक्तीशी असू शकतो किंवा नाही ह्याची जाणीव इतरजनांना असणे दूरच. मी ज्या स्थितीवरून आपणास हे सांगत आहे ती स्थिती आपणास प्राप्त झाल्यास वरील गोष्टीची अनुभूती आपणास येईल. कारण मी जे आपणास सांगत आहे हे सत्य आहे किंवा नाही हे जाणण्याचे तंत्र सध्या आपणाकडे नाही किंवा सत्य काय आहे ह्याची सिद्धता आपणाकडे सध्या नाही. तोपर्यंत आपले शारीरिक यंत्र वरील गोष्ट पडताळून पहाण्यास परिपूर्ण नसते. परंतु ज्यावेळी आपले शारीरिक यंत्र सत्याशी जोडले जाते, त्यावेळी आपण वरील गोष्टीचा पडताळा घेऊ शकतो.. याचाच अर्थ प्रथम आपण सहजयोगात येऊन ‘पार’ होणे आवश्यक आहे. ‘पार’ झाल्यानंतर आपल्या हातातून चैतन्य लहरी वाहू लागतात. एखादी गोष्ट सत्य असल्यास आपल्या हातात थंड थंड चैतन्य लहरींचे तरंग येऊ लागतात व असत्य असेल तर गरम लहरी येतात. अशा तऱ्हेने प्रयोग करून आपण एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे जाणू शकतो. ख्रिश्चन मंडळी श्री येशु ख्रिस्ताबद्दल जे जाणतात ते ‘बायबल’ ह्या ग्रंथामुळे. ‘बायबल’ हा ग्रंथ Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच्या या पुण्यभूमीत,  अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे, तेंव्हा गणेशाचे महात्म्य काय आहे, या अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नसतात याचे मला फार आश्चर्य वाटते. कदाचित जे सर्व काही समजत होते, ज्यांना सगळे काही माहीत होते असे जे मोठेमोठे साधुसंत ह्या आपल्या संतभूमीवर झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार. किंवा त्यांचे कोणी ऐकून घेतले नसेल, पण याबद्दल सांगावे तितके थोडे आहे आणि एकाच्या जागी सात भाषणे जरी ठेवली असली, तरीसुद्धा श्री गणेशाबद्दल बोलतांना मला ती पुरणार नाहीत.  आजचा सुमुहर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादि आहे म्हणजे ज्यावेळेला या सृष्टीची रचना झाली, अनेकदा. एकाच वेळी सृष्टीची रचना झालेली नाही तर ती अनेकदा झालेली आहे, जेंव्हा या सृष्टीची रचना  झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी लागली. घट म्हणजे काय? हे अत्यंत सूक्ष्मात समजले पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जी एक स्थिती, परमेश्वराचे वास्तव्य असते, त्याला आपण इंग्लिशमध्ये entropy म्हणू.  जेंव्हा काहीही हालचाल नसते.  त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर ‘परमेश्वराला’ येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा समावते.  आता काहीतरी संसारामध्ये सृजन केले पाहिजे. क्रिएट केलं पाहिजे.  त्यांना ही इच्छा का होते? ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणे माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. अशा पुष्कळशा गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण Read More …

Sahajayogyanmadhe Dharma Stapna Aur Sahajayog, Dharma has to be established Within Mumbai (India)

Sahajyogyan Madhe Dharma Sthapna Zali Pahije 18th December 1976 Place Mumbai Seminar & Meeting Type ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे. मी आपल्याला आधी सांगितले की मी गणपतीसारखं एक नवीन मॉडेल तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ही विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात . अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी पदोपदी मी जाणते. फक्त एवढं म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे, फारच हळुवारपणे सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेलं आहे, पण जर आपल्यामध्ये ती योग्यता नसती तर हे झाले नसते. पैकी आज हजारो मंडळी इकडेतिकडे धावत आहेत. वेड लागलंय लोकांना. विचार करत नाहीत की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे अनादी काळापासून, मोठमोठ्या तत्त्ववेत्त्यांनी आणि श्रीकृष्णांसारख्या महान, परमेश्वराचीच ती एक साक्ष आहे, त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या त्या सगळ्या एकीकडे फेकून, त्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेलं आहे, त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते महम्मद साहेबांनी लिहिलेलं असो किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो किंवा श्रीकृष्णांनी गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला ‘स्व’ जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असं म्हटल्याबरोबर लोक यापासून परावृत्त होतात कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना पटतच नाही मुळी. असत्य असलं तर ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुजतंही जास्त. असत्याची जास्त कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय तर तक्काची पायरी. तर्क गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. ते कलीयुगात दिसतंय आपल्याला चोहीकडे. बापाला मुलावर विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. Read More …

2nd Talk Mumbai (India)

2nd talk, 1976-12-18 [Marathi Transcript]  मी आज आपण सर्वाना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. हे योगायोग जुने असतात .जन्मजन्मांतराचे असता ते,आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी होते हे ,ते आपल्या एवढे लक्षात येणार नाही .कारण आपल्याला आपला  पूर्वजन्म माहित नाही .पण हे पूर्वजन्माचे योगायोग आहेत आणि त्यामुळेच आज परत हया जन्मात सुद्धा आपल्या सर्वाना भेटण्याचा हा उत्तम वेळ आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे कि खरंच तो मी शब्दांनी  कधीच वर्णन करून सांगू शकत नाही .   ग्रामीण विभागात सहजयोग फार उत्तम पणे पोचला जाईल .हे मला माहित  आहे . कारण  शहरात राहाणारी लोक हि मंडळी स्वतःला फारच शहाणी समजतात . एकतर बहुतेक पढत मूर्ख असतात. पढत मूर्ख  नसले तर पैशाच्या आणि सत्तेच्या दमावर स्वतःला काहीतरी विशेष समजतात . त्यांना असं वाटतं कि सर्व जग त्यांनीच निर्माण केलेले आहे . हे आकाश सुध्दा त्यांनीच निर्माण केलेले आहें . आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत . आणि परमेश्वर नावांची वस्तू काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतेही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही,  कि आपण हे अधर्माचं कार्य करीत आहोत. अजून आपल्या देशातील ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मुंबई परमेश्वरालाआठवून आहे . आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे . आणि रामानी आणि सीतेने पायी प्रवास करुन सर्व भूमीला पूनीत केलेले आहे. पवित्र केलेले आहे . ग्रामीण समाजामध्ये जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परमभक्ती आहे. (notclear )सुद्धा लोक करतात पण पुष्कळसे लोक खोटया गोष्टी सांगुन पैसे उकळतात . काहीतरी भोळ्याभाबडया लोकांना भुलवुन काहीतरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये विचित्र तऱ्हेच्या भावना उत्पन्न करून त्यांच्या कडून पैसे उकळत असतात.  हे प्रत्येक खेड्याखेड्यातून चाललेलं Read More …

Sahajyog Sagalyana Samgra Karto Mumbai (India)

Sahajyog Sagalyana Samgra Karto 29th May 1976 Date : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK असल्या विचित्र कल्पना घेऊनसुद्धा पुष्कळ लोक इथे येतात. तेव्हा तुम्ही शहाणपणा धरा. शहाणपणा धरला मी पाहिजे. शहाणपणा हा फार मुश्किलीने येतो. मूर्खपणा फार लवकर येतो. तेव्हा आपल्यामध्ये शहाणपणा धरा. आई आहे. मी तुमचा मूर्खपणा किंवा तुमचा जो वाईटपणा आहे त्याला मी सांगणार. तुम्ही करू नका. ते तुमच्या भल्यासाठी आहे. मी काही गुरुबिरू नाही. मला तुमच्या कडून काही नको. फक्त हे एवढंच. तुमचं भलं आणि कल्याण झाले पाहिजे. तुमच्या हितासाठी जे चांगलं आहे ते मी सांगणार. त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही. आता नवीन मंडळी आलेली आहेत, त्यांना मी सांगते. कोणी वाईट वाटून घेतलं, तर ते गेले कामातून. व्हायब्रेशन्स जाणार. मी काढत नाही हं. डॉक्टरसाहेबांची डोकी म्हणजे खोकी करून ठेवलेली आहेत. कोणी ऐकायला तयार नाही हो! मी करू तरी काय? मलाच समजत नाही. घरामध्ये देवाचा फोटो ठेवतील पण मी जर म्हटलं तुम्हाला देवाचा आणि कॅन्सरचा संबंध दाखविते तर तयार नाहीत म्हणजे त्यांच्याशी बोलायचे तरी कसे ? प्रॉब्लेमच आहे ना….. आता जी मंडळी पार नाही झालेली त्यांनी हात असा करा आणि जी मंडळी ध्यानात बसलेली आहेत त्यांनी येतंय थंड? …..तुम्हाला? हातामध्ये थंड वाहतंय…उत्तम….! जरा असे बघायचे. बघुया. तो असतो. तुम्हाला जो आवाज आला किनई असाच आवाज आपल्या ‘ओम’ जो आवाज म्हणतात, कळलं का! म्हणजे ही एनर्जी वाहत आहे नं, आणि जेव्हा ती वाहते आहे पण ती पूर्णपणे चैनलाइज्ड झालेली नाही, त्यावेळेला तसला आवाज येतो. ती चैनलाईज व्हायला सुरुवात झाली म्हणजे असा आवाज येतो म्हणून आपल्यामध्ये ‘ओम’चा आवाज कधी कानामध्ये येणार, कधी Read More …

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche Mumbai (India)

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976. सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त त्रास आहे आणि ते काढायचं, तर त्याला एक पुराण लागेल सगळें काही सांगायचं म्हटलं. अर्थात् एक पुस्तक पातंजली योगशास्त्र एवढं मोठं आहे. ते एक हं मात्र. बाकी अनेक असतील अशी. आणि पुष्कळ असे शास्त्र वगैरे लिहिले गेले, मनुष्याने अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची, वगैरे वरगैरे अनेक पुराणं आपल्याकडे लिहिली गेलेली आहेत. त्यापैकी काही खरी आहेत, काही खोटी आहेत. काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे मूर्खपणा पण आहे. त्यात कारण असं, की जे शोधणारे होते, ते मुळात आंधळे होते. पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं, तेव्हा डोळस झाले आणि डोळस झाल्यावर आम्ही आंधळेपणातून हे सगळे काही मिळविलेले आहे, तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसेच मिळेल. अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. ते बरोबरच आहे. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीतून नेहमी प्रवास करतो, त्याला एरोप्लेनच्या प्रवासाची काय कल्पना येणार! कितीही कितीही कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार? तसंच आहे आमच्या या सहजयोगाचं! अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसतं आपल्या तंगड्या तोडल्या, डोक्यावर उभे राहिले वर्षानुवर्ष. श्वासोच्छवास Read More …

Nirvicharita Mumbai (India)

Nirvicharita “VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या त्त्ववेत्त्ांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा Read More …

Talk to Yogis Mumbai (India)

1975-12-21 Talk to Yogis Mumbai Marathi कसलि ग-हाणी आणी कसली रडकथा, कही मला ऐकायच नाही, तोंड बंद ठेवा. आनंदाच सर्व साम्राज्य उघडलेले आहे. काय वेड्या सारख लावलेल आहे, रडगाणी, मला येत हसायला, तुम्हाला येत रडायला, वेडे कुठले, खुळे. अरे काय वेड्या सारख करता.आता सांगु तरी कस, तेच मला समजत नाही. नसते सिरियस झाले वेड्यासारखे.लहान मुला सारख व्ह्यायला पाहीजे.समोर सुर्यासारख सगळ दिसत असुन सुध्दा दिसत नाही  म्हणजे काय म्हणायचे त्यांना?. अहो अंधळा असला तर त्याला म्हणता येइल कि बॉ हा अंधळा आहे. पण सुर्यासारख सगळ समोर दिसत असुन त्या आनंदाचा हाच व्दार आहे. आणी तरी तुम्ही आनंदाला मिळवत नाहि. म्हणजे आहे काय तुमाच्यात दोष. तुमच्यात भोक पडली आहेत, का झालय काय?. वरुन सगळ नुसतं सगळ वाहत सुटल आहे तुमच्यावर. ते जुने प्रकार आहे सोडा ते. एकदा सोडला न तो- जो आपल्यात आहे. की आपण आपले होतो. जो हमे सता रहा उसको पहले उधर छुट्टि करके आओ, उसको बाहर. फिर देखो आप कितने अंदर होते हैं. सब छोडो पिछे. हर एक क्षण पिछे छोड दो. ये क्षणमे खडे हो जावो.  अंधर घुसने कि बात है, हम बैठे हुये है यहा पर  सबको धकेलने के लिये, सबके सब मेरे खोपडी पे मत गिर जाना. दो चार गिरेगे तो ठिक है. ह्सत खेळत- मजेत सगळ होणार आहे. अहो नुसती रास लिला, आहे काय त्यात मोठ भारी? काय तुम्हाला करायच आहे? घागरी सुध्दा फोडल्या नाही तुमच्या. सगळ्यांची मडकी फोडली असती तर बर झाल असत. तसही काही केलेल नाही. आणी फोडली आहेत मडकी. वरुन झर-झर-झर वरती खाल पर्यंत धावत आहे न सगळ. काही वादविवाद घालायचे नाहीत. Read More …

Public Program Bharatiya Vidya Bhavan, Mumbai (India)

१७ मार्च १९७५              काही विशेष रूपाने मी आपल्याला सांगितलेले आहे , आणि ज्या चैतन्य  स्वरूपा ची गोष्ट प्रत्येक धर्मात प्रत्येक वेळेला सांगितलं आहे त्यात पण आपल्यामधून भरपूर लोक चांगलेच ओळखून आहे. त्यावर पण जेव्हा मी काई म्हणते कि तुम्ही संसारा मध्ये राहता आणि तुम्ही हाथ योग कडे नाही गेले पाहिजे  भरपूर लोक माझ्यावर नाराज होतात, आणि जेव्हा मी काई म्हणते कि ह्या सन्यास च्या मागे तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालायू आणि त्यांना हवं (१.१५)याना हवं कि सांसारिक लोक ____ हवं , असं तर मी सर्व च धर्म बद्दल सांगायची इच्छा ठेवते. एवढंच नाही पण जे काई त्यात अर्धवट पण माहिती होत आहे त्याला मला पूर्ण करायचं आहे . मी कधीच कोणत्या शाश्र आणि धर्माच्या विरोधात असूच शकत नाही पण अशाश्र च्या नक्कीच विरोधात आहे आणि अधर्मच्या. आणि जिथे कोणती गोष्ट अधर्म होते आणि अशाश्र होते ,एका आईच्या नात्याने मला आपल्याला स्पष्ट्पणे सांगावं लागेल. नंतर आपल्याला सुध्दा अनुभव येईल कि मी जे म्हणते ते एकदम सत्य आहे आणि प्रात्यक्षिक आहे.             जेव्हा तुम्ही ह्या तुमच्या हातातून वाहणाऱ्या चैतन्य चा उपयोग कराल तेव्हा तुम्ही समजून घ्याल कि मी जे काई म्हणते एकदम सत्य म्हणजे आणि पूर्णपणे आपल्या हित साठी आणि तुमच्या उथ्थान च्या मार्गासाठी व्यवस्तीत रूपाने प्रकाशित होण्यासाठी सांगते. हीच एक शोचनीय स्थिती आहे कि मानव सत्य ला घ्यायला खूप वेळ लावतो. जर खोट्टं कुणी  पसरवत असेल तर मानव ते खूप लवकर स्वीकारतो किंवा अशी काही गोष्ट ज्याने त्याच्यातल्या कमीपनाला प्रगल्भता मिळेल किंवा त्याच्या अहंकाराला पुष्टी मिळेल तर मानव त्याला खूप लवकर Read More …

Talk, Bholepana ani nirvicharitecha killa Mumbai (India)

[Marathi transcript ver 1] भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही. असे म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठतील. शिक्षणाने संसारातील सर्व लौकिक गोष्टी जाणता येतील. पण परमेश्वराच्या कार्याला जाणण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजेत. दूसरे गुण पाहिजेत. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपणा. ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इनोसन्स म्हणतात. लहान मुलांमध्ये असतो बघा भोळेपणा. काही काही मोठी माणसेपण फार भोळी असतात हो! ठगविली जातात ती. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात. छळतातही फार ! म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय या जगाने आणि आज ही छळताहेत. याचेच रडू येते कधी, कधी. आपण जी मंडळी पार झालात ती सुद्धा संत मंडळी आहात. संतच नव्हे तर देवता स्वरूप आहात. आज देवतांच्या ठिकाणी तुम्ही आलात. हीच देवता हेच ते देव ज्यांचे वर्णन आपण पुराणात वरगैरे वाचले असेल. हे देव जागवले गेलेत आपल्यामध्ये. हे देवपण आलेले आहे आपल्यामध्ये. तेव्हा आ देवपणामध्ये भूते ही पिंगा घालणारच! आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ देत. कुठवर त्रास देणार? जिथप्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त तीन आयामात, तीन डायमेंशनमध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे. फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील. करू दे. शरीर हे नश्वरच आहे. Read More …

Teen Shaktiya Mumbai (India)

Teen Shaktiya [Marathi Transcript – Soundcloud track: 1975-0121 Seminar Mumbai (Marathi), from 18:13 to 21:00] ते ही अत्यंत दुःखी लोक आहेत. रडत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अन्न पचत नाही त्यांना. काय फायदा! जिथे खायला नाही ते रडतात, ज्यांना खायला आहे ते ही रडतात. आत्महत्या करतात. जे आजारी आहे ते रडतात, जे आजारी अस्सल आहे. आम्ही अस्सल द्यायला आलो आहोत. तुम्ही काय नकली गोष्टी मागता आमच्याकडे. तब्येत बरी नाही ते ही रडतात. काय सुरू आहे? सगळा वेडेपणा आहे. मागायचं तर ते मागा जे करून द्या. अमकं ठीक करून द्या. तमकं करून द्या. अरे, होईल ते. त्याचं काय! अस्सल माल घ्या आधी. त्याचे मूल्य नाही. अरे संसारात सगळ्यात महत्त्वपूर्ण तेच आहे. ते मिळाल्याशिवाय आनंदच मिळणार नाही. काहीही बाकी सगळं व्यर्थच ठरतं. आता परिसासारखे जे आहे ते मागा. असे मागणारे असते, तर देणारे आम्ही आहोत इकडे बसलेले, पण आहेत कुठे मागणारे? आईला मागितलं तर विशेषच मागायला पाहिजे. असलं कसलं काय मागायचं! भाडोत्री! सगळी कमाई देऊन टाकू तुम्हाला. मागा तर खरी. सगळी पुण्याई तुमच्यासाठी लावून टाकू पणाला. उभे तर रहा! तुमच्या चरणावर येऊन पडलो तरी तुमच्या लक्षात येणार नाही. ही केवढी तळमळ आतून आहे. समजलं पाहिजे. कळेल का? ध्यानात जायचे आहे प्रेमाने. सगळे प्रेमाचे खेळ आहेत. अगदी शांतपणे डोळे मिटायचे. काही करायचं नाही. स्वत:चं, जे तुमच्यातलं आहे, ते अगदी वर आहे.

Guru Purnima, Sahaja Yoga a New Discovery Mumbai (India)

Guru Purnima Puja. Mumbay (India), 1 June 1972. Translation from Hindi to Marathi सहजयोगाचा एक अभिनव असा आविष्कार होत आहे. जे सत्य आहे जे ‘आहेच’ त्याचा आविष्कार कसा होतो हे समजून घ्या. कोलंबस हिंदुस्थान शोधायला बाहेर पडला. तेव्हाही हिंदुस्थान होताच; नसला तर शोध कशाचा घ्यायचा? तसेच सहजयोग होताच, पण त्याचा अनुभव आता तुम्हाला घ्यायचा आहे, काही जणांना मिळालाही आहे. सहजयोग हा त्या परमतत्त्वाकडे जाण्याचा एक मार्ग आहे; एक व्यवस्था आहे; एक प्रणाली आहे; मानवजातीला उन्नत स्थितीवर येण्यासाठी जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी ही एक व्यवस्था आहे. ज्यामध्ये मानव या विश्वव्यापी चैतन्याची ओळख करून घेऊ शकेल आणि ते परमचैतन्य आत्मसात करू शकेल. याच परमतत्त्वाकडून सारी सृष्टी चालवली जात आहे व त्याच्यातूनच मानव जन्माला आला आहे. फार प्राचीन कालापासून याचा शोध चालत आला आहे. त्याच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे; प्रेम, पैसा, सत्ता अशा विविध क्षेत्रांमध्ये मानवाचा हा शोध चलत आला आहे. तरीही मानव अजून स्वतःला नीट ओळखू शकला नाही. तसे पाहिले तर हा एक आनंदाचा शोध आहे. पण मग कुणी संपत्ती मिळाली की आनंद मिळेल असे समजून पैशाच्या मागे लागले, पण त्याचबरोबर ज्यांनी अमाप संपत्ती मिळवली त्यांनाही दुःखापासून सुटका मिळाली नाही; काही लोकांनी तर या निराशेपोटी आत्महत्या करून घेतली. असे करता करता कुठेच आनंद मिळाला नाही म्हणून लोक धर्माच्या मागे लागले. धर्माच्या पाठीमागे लागल्यावरही त्यांचे चित्त बाहेरच्या गोष्टींमधेच अडकून राहिले आणि त्यांना खरी ‘स्व’ (स्वतःची) ओळख झाली नाही. हे असे का होते? कारण माणूस खऱ्या स्व बद्दल अपरिचीत असतो आणि त्यामुळे त्या ‘स्व’ चे वैभव, ऐश्वर्य, महानता, प्रेम हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्या अवर्णनीय आनंदाला तो पारखाच राहतो. मानव स्वतःच आनंदस्वरूप Read More …

Talk Mumbai (India)

लहान मुलांना घड्याळ बघता येत नाही आणि रागवता येत नाही. माझी अशी इच्छा आहे,  या वेळेला, थोडं लहान मुलासारखं आपल्या मनामध्ये, आपल्या आईकडे कशी आपली दृष्टी असते, तसा दृष्टीने जरा घड्याळ बिड्याळ बाजूला काढून, डोक्यावरची सगळी ओझी एकीकडे उतरवून आरामात बसा. आपण आईकडे गेलो म्हणजे सगळं फेकून बेकून आईच्या मांडीवर डोकं ठेवतो – आता पुष्कळ झालं सगळं, आता थोडं आरामात राहू द्या आम्हाला. असं समजून, थोड्यावेळ आराम करायला आलाय, असं समजून सहज भावनेत बसा. मी कधी कधी थट्टेनी सांगत असते, की काही अडाणी लोकं, ट्रेन मधून पहिल्यांदा चालले होते आणि आपल्या डोक्यावर पुष्कळस  सामान लादून घेतलं होतं. लोक म्हणाले हे काय करता तुम्ही? आम्ही हे ट्रेनचं ओझं जरा कमी करतोय. तसंच आपण घरातून पुष्कळ ओझी घेऊन आलोय, पैकी आठ वाजता इकडे जायचं दहा वाजता तिकडे जायचं आहे. देवाच्या घरात काही घड्याळ नाही, तेव्हा त्यांना म्हटलं अहो काय तुम्ही ओझी लादत्ता? तुम्ही ज्या ट्रेनमध्ये बसला आहात, तीच ट्रेन तुमचं सगळं वजन घेत आहे, तुमचही आणि तुमच्या डोक्यावर आहे त्याचाही. तसंच आपण आपल्या डोक्यावर उगीचच बोजी घेऊन सगळ्या जगाचं कर्तृत्व घेऊन बसले आहोत आणि कर्ता झालेलो आहोत  खरं करणारा तर परमात्मा आहे, आपण काहीही करत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की उद्या हा माईक म्हणायला लागेल की मी भाषण देतो, आपण त्याच्यावर हसू पण आपली स्थिती ही तीच आहे. आपण नुसतं परमात्म्याच्या हातातले एक खेळणं आहोत.  ही जाणीव सामूहिक भाषणांनी, विवादांनी याने त्याने येत नाही. ही जाणीव फक्त एकदा झाली की आपण मोकळे होतो. जी मंडळी आम्ही म्हणतो की पार झाली, घरी जाऊन  घोडे विकून जसे झोपतात तसे झोपून जातात. कारण झालं पुष्कळ उचललं उगीचच.   तुम्ही Read More …