Seminar Part 3 Akurdi (India)
Public Program, Marathi, Penicillin Factory, Akurdi, Pune 1980-12-09 Akurdi session मागच्या वर्षी आकुर्डीला आमचा प्रोग्रॅम झाला, तेंव्हा मी म्हटलं होतं सहजच की पेनिसिलीन फॅक्टरी मध्ये बघा प्रयत्न करून, बरीच मंडळी पार होतील . तेंव्हा लोकांच्या लक्षात आलं नाही की माताजींनी पेनिसिलीन फॅक्टरीचं नाव का घेतलं? त्याला कारण असं की माझ्या भावाच्या लग्नात मी आले होते इथे पुण्याला. आणि तुमच्या गेस्ट हाऊस मधेच थांबले होते. तेंव्हा सकाळी उठून इकडे खूप अनवाणीने फिरले, आणि माझी अशी इच्छा होती , की ही जर जागा सुद्धा चैतन्यमय झाली, तर जी कामगार मंडळी इथे येतील, त्यांच्यावर या वातावरणाचा अवश्य परिणाम होईल. आणि त्याचा आज मात्र दृश्य दिसलं. तेंव्हा सीता आणि राम या महाराष्ट्रामध्ये अनवाणी का फिरले, त्याचंही कारण आपल्या लक्षात येईल. परमेश्वरानी फार कार्य केलेलं आहे. त्याची आपल्याला जाणीव नाही, की आपल्यासाठी परमेश्वरानी काय काय कार्य केलेलं आहे. सबंध सृष्टीच बघा किती सुंदर परमेश्वरानी रचली. रोजच्या आपल्या व्यवहारात सुद्धा आपण बघतो पण आपल्या लक्षात येत नाही की आपण जे अन्न खातो, जी आपण फळं खातो, ही फळंसुद्धा ,परमेश्वरानी आपल्यासाठीच तयार केलेली आहेत. एका फुलातनं आपण फळं काढू शकत नाही. एक सुद्धा आपण जिवंत कार्य करू शकत नाही. सायन्सचं असं म्हणणं आहे की आम्ही अमीबा पासनं माणसं झालो. ते तरी परमेश्वरानीच केलेलं आहे. अनेक वेळा या संसारामध्ये परमेश्वराचं अवतरण झालं. विष्णू स्वरूपात . आणि त्यांनी हे उत्क्रांतीचं कार्य हे इवोल्युशनचं कार्य केलेलं आहे. पण जेंव्हा जेंव्हा ही अवतरण संसारात झाली तेंव्हा लोकांना हे समजलं नाही की याचा आपल्याला काय लाभ होतो. त्यामुळे आपल्यामध्ये कोणची अशी बांधणी नव्हती. त्यामुळे कोणची आपल्याला अशी वरची पायरी नव्हती. श्री विष्णूनी कशाला Read More …