Shri Mahalakshmi Puja Sangli (India)

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. पण जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. आणि कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं काढायची असली तर त्यासाठी एक मशिन घातलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल अजून पुष्कळशा लोकांना काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. पैकी आपल्याकडे पुष्कळसे असे पंथ आहेत, संप्रदाय आहेत, जे आधीपासूनच कार्यान्वित आहेत. पण हे पंथ आणि संप्रदाय ह्यांचा आपल्याला काही फायदा झालेला नाही.       ‘इतके दिवस आम्ही पंढरीला गेलो, इतके दिवस आम्ही तुळजापूरच्या भवानीची सेवा केली, इतके दिवस आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात होतो, सगळं काही केलं आम्ही. व्रत- वैकल्य केली. सगळं करून माताजी, आम्हाला काही मिळालं नाही.’ त्यातून तुमची मुलं उद्या मोठी होतील आणि ती तुम्हाला म्हणतील ‘इतका तुम्ही वेळ घालवला, पैसे घालवले, मेहनत केली आणि शेवटी तुमच्या हाती काही आलेलं नाही. म्हणजे परमेश्वरच नाहीये.’ जर तुम्हाला सांगलीला यायचं आहे, तर  सांगलीच्या रस्त्यावर यायला पाहिजे. जर तुम्ही उलट मार्गाने गेलात तर तुम्ही सांगलीला पोहोचणार नाही. तेव्हा इतक्या वर्षानंतरही तुम्हाला सांगली मिळाली नाही,  याचा अर्थ असा आहे, की कोणत्यातरी चुकीच्या रस्त्यावर आपण चाललो होतो.  त्याच रस्त्यावर आपण भटकत आहोत.  त्यातून अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. हा सुज्ञपणाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण आपल्याला अजून काही मार्ग मिळालेला नाही. काही साध्य झालेलं नाही. तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, असा एक  वेळ तरी  विचार करून सहजयोग काय आहे ते समजून लोकांना सांगितलं Read More …

Public Program Sangli (India)

पब्लिक प्रोग्राम, सांगली, डिसेंबर 30, 1986, मराठी Shri Mataji addressing the seekers and their questions. Below are the conversations. Seeker’s talk/ questions are in brackets.  या इकडे या म्हणजे मी ऐकते.  (श्री माताजींना प्रश्न विचारला ” श्री माताजी माझी जागृती झालेली आहे, पण मला व्हायब्रेशन फक्त हृदया चक्रापर्यंत जाणवतात, त्याच्यावरती जाणवत नाही. कृपा करून आपण मला मार्गदर्शन द्याल का?)अर्थातच अगदी अगदी बसा आपण, मी सांगते आता. हे म्हणाले की कुंडलिनी त्यांच्या हृदयापर्यंत येऊन त्यांना जाणीव होते, आणि वर येत नाही म्हणजे विशुद्धी चक्रावरती दोष आहे. तर आता विशुद्धी चक्रावर काय दोष आहेत हे पाहिले पाहिजे. विशुद्धी चक्र कशाने खराब होऊ शकतं, जर तुम्ही खूप बोलत असाल, भाषण देत असाल तर घसा खराब होतो किंवा सिगरेट पीत असाल तंबाखू खाल्ले तर त्यांनी घसा खराब होतो किंवा सर्दी ने होऊ शकतो. कोणत्याही कारणाने जर घसा खराब झाला, विशुद्धी चक्र खराब झालं तर ही कुंडलिनी वर चढत नाही. पण ते आम्ही बघून टाकू, कुंडलिनी आम्ही चढवून टाकू, त्याची काळजी करू नका. त्याचा काही प्रॉब्लेम नाही.  हा पुढे काय? आणखीन कोण? काय प्रश्न असतील तर विचारा  Shri Mataji waiting  काय आहेत का प्रश्न? काय म्हणता? इकडे या इकडे……  (आपले कुठे आश्रम आहेत का?) आश्रम? आमचे अजून कुठेच आश्रम नाहीत. अहो सांगलीमध्ये सुद्धा नाहीत. सांगलीमध्ये आपले तावडे साहेब आहेत ना, त्यांच्या घरी सध्या प्रोग्राम आणि सेंटर होतात. सध्या आमचे कुठेच आश्रम बसवलेले नाहीत. कारण तुम्हाला माहित आहे, आपल्या देशाची काय स्थिती आहे. नंबर एक भ्रष्टाचार, त्यामुळे कुठेही जमीन घ्यायची म्हटली, की ते म्हणतात तुम्ही किती ब्लॅकचे पैसे द्याल? तर मी म्हटलं आमच्याकडे ब्लॅक बिग चे Read More …