Public Program Satara (India)

Shri Mataji arrives and is welcomed by the local sahajis. A Bhajan is sung. Then on a foreign sahaji gives a brief introduction about sahaja yoga.  Shri Mataji’s speech starts at time 22.06 आपलीच महती आपण जाणत नाही ही गोष्ट खरी आहे. जसं सूर्याला कळत नाही की तो प्रकाशमय आहे, तसंच महाराष्ट्राच्या लोकांना कळत नाही की त्यांच्यामध्ये परमेश्वराने किती आशीर्वाद दिले आहेत. म्हणून तो भ्रमिषष्ठासारखा इकडे तिकडे भटकत आहे. सारा समाज आज पश्चिम संस्कृतीने भारावून गेला आहे. आणि पश्चिमेचे लोक आता थकून भारताकडे बघत आहेत. आणि त्यांची दृष्टी लागली आहे की आम्हाला त्यांच्यापासून काय शिकायचा आहे? आपण स्वतःला फार पश्चिम मार्क  समजून खूप शिष्टासारखं वागतोय आणि त्यापासून आपल्याला काय लाभ होणार आहे किंवा नाही त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. साहेबांची बदली लंडनला झाली म्हणून आम्ही इंग्लंडला गेलो, आणि तिथे आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केली. त्यावेळी असं लक्षात आलं की पश्चिम देशांमध्ये  जी काही प्रगती झाली आहे ती एखाद्या झाडाची प्रगती व्हावी अशी झाली आहे. पण त्याची मूळ या भारतात आहेत. आणि जोपर्यंत ही मूळ जोपासली जाणार नाहीत तोपर्यंत  ते झाड उलथून पडणार आणि त्या स्थितीला आल आहे ते. पण आपण जे या मुळात बसलेला आहोत, ते मात्र पूर्णपणे आधीभिज्ञ आहोत. आपलं काय कर्तव्य आहे आणि आपली  काय जबाबदारी आहे. कोणतीही गोष्ट त्या लोकांपासून आली ती विशेष असं समजून आपण अंधानुकरण चालवलं आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडे दिशाभूल करणारे धर्मगुरू, मंदिरात बसलेले भटची बुआ. अशे  अनेक प्रकार असल्या मुळे पुष्कळ लोकांची अशी धारणा झाली आहे की परमेश्वरी ही गोष्ट अशी नाहीच. परमेश्वर आहे किंवा नाही हे आम्ही सिद्ध करू शकतो. पण तुम्ही कशावरून सिद्ध Read More …

Puja by the Krishna’s river Brahmapuri (India)

Devi Puja Date 27th December 1986: Place Brahmapuri Type Puja आता ही पाहणी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की, ‘कृपा करून ह्या सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक धन्यवाद द्या. आणि त्यांचे आम्ही फार अनुग्रहित आहोत आणि आभारी आहोत.’ त्याबद्दल मी अनेकदा त्यांना सांगितलं की, मी मराठीत त्यांना सांगतच असते, पण तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगा. म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांची ओळख करून घ्या. त्यांची मैत्री साधून घ्या. त्यांची नावं जाणून घ्या. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, की खेडोपाडी आमचे बांधव आहेत. आपण सगळे एका सूत्राने बांधले गेले आहोत. तुम्ही कोणत्याही देशातले असलात, कुठलेही असलात, तरी सगळी माझीच मुलं आहात. तेव्हा त्यात काहीही भेदभाव न पाळता सगळ्यांनी आपापसात मित्रता साधली पाहिजे. आणखीन सगळ्यांनी एकमेकांना ओळखून घेतलं पाहिजे. म्हणजे कोण कसं आहे, काय आहे. आता सांगायचं म्हणजे आजचा दिवस विशेष आहे. शनिवारचा दिवस, कृष्णा नदीच्या काठी. म्हणजे कृष्णाचं सगळें सुरू झालेलं दिसतंय साम्राज्य इकडे. आणि ह्या सगळ्या त्याच्या साम्राज्यात आजची तुम्ही पूजा मांडलेली आहे. पूजेत सांगायचं काहीच नसतं खरं म्हणजे. कारण स्वत:च चैतन्य वाहून तुम्हाला भरपूर करून टाकत असतं. तेव्हा तेच फक्त तुम्ही आपल्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे. सहजयोगाची विशेषता ही आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान-धारणा करावी लागते. जर तुम्ही ध्यान- धारणा केली नाही, तर मात्र सहजयोग जमत नाही. म्हणून थोडा तरी वेळ ध्यान- धारणेस दिला पाहिजे. आणि आपल्यामध्ये कुठे चुकतं ते तुम्हाला ध्यानातच कळू शकेल. ते तसेच पाळत ठेवायचं नाही. ते काढून टाकलं पाहिजे. ते काढून टाकल्याबरोबर त्याचे जे काही आपल्याला लाभ होतील, त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, की किती त-्हेचे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडून येतील. आणि तुम्ही ते इतरांनासुद्धा सांगू शकाल. Read More …

Public Program Angapur (India)

Shri Mataji is welcomed by the sahajis at the public program. Bhajans are sung. Shri Mataji’s speech starts at time 21.45आपणा सर्वांचा उत्साह आणि प्रेम बघून, एका आईचं हृदय किती गहिवरू शकतात हे समजण्याची क्षमता तुम्हा आयांना असू शकते मुलांना असू शकते. कारण हा देश आईंचा देश आहे. आईची थोरवी इथे  माणलेली  आहे आणि महाराष्ट्राची आई बहुतेक सुज्ञ बाई असते. आपल्या अंगापूरच्या योगभुमीत, आधी रामदास स्वामींनीच तपश्चर्येने पुष्कळ कार्य करून ठेवलेलं आहे. परवा तुकारामांच्या भजनात एक अभंग म्हणून दाखवला, तेव्हा ते म्हणाले मी तुम्हाला निरोप द्यायला आलोय. एक महत्त्वाचा निरोप – हा मार्ग, परमेश्वराचा मार्ग फार सहज सरळ आणि सुलभ होणार आहे. या सर्व साधू संतांनी आमच्यावर फार मेहरबानी केली, त्यामुळे लोकांना आज महाराष्ट्रात आज जाणीव आहे, की  आत्मसाक्षात्कार शिवाय जगात काहीही दुसरं मौल्यवान नाही.  पण ही जाणीव इथे दिसत नाही की, किंवा आपण असं म्हणूया, हिंदुस्थानात ही जाणीव कमी आहे. ही आपल्या महाराष्ट्रात संतांची फार मोठी देणगी आहे. आणी तो वारसा त्यांनी गीतेतुन, ज्ञानेश्वरी सारखी सुंदर कविता रचून,  अनेक ग्रंथ लिहून, लोकांना जाणीव दिली की आत्मसाक्षात्कार म्हणजेच परमेश्वराला मिळवणं आहे आणि त्यातच सगळं काही आहे. पण त्या संतांच्या सांगण्यावरून, आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, या दिवसाची वाट पाहणे, हे सुद्धा काहीतरी  विशेष पूर्वसर्वतामुळे  घडतं. म्हणून असं म्हटलं पाहिजे की अंगापूर आणि सातारा जिल्ह्यातले जी  लोक इथे आलेली आहेत, त्यांची काहीतरी पूर्व पुण्याई ही फार असली पाहिजे,  पूर्व सुखरूप काहीतरी असलं पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी इतके लोक मला सहज योगी दिसत आहेत. सहज योगाचे लाभ किती आहेत हे तुम्हाला माहित आहे. ते तुम्हाला परत परत काय सांगावे. पण एक गोष्ट Read More …

Christmas Puja Pune (India)

Christmas Puja – Stn Pavan Dam 25th December 1986 Date: Place Pune Type Puja आज मी मुद्दामून इंग्लिशमध्ये बोलले, पण तुम्हा सगळ्या पुणेकरांना इंग्लिश येतंय. तेव्हा जास्त काही त्याचा खुलासा करून सांगायला नको. पण ह्या लोकांना आज, ख्िसमसच्या दिवशी काहीतरी ख्रिस्ताबद्दल सांगावं म्हणून मी सांगितलेले आहे. आता आपल्या संस्कारांमुळे ख्रिस्तांची आपल्याला फारशी माहिती नाहीये. पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ती माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण तो आज्ञा चक्रावर बसलेला आहे. आज्ञा चक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही, तर आपण गणेशाला जाणलं नाही. कारण गणेश हाच ख्रिस्त आहे. तेव्हा गणेशाने जगामध्ये येऊन काय कार्य केलं? त्याने अवतरण घेऊन काय काय कमाल केली? त्याने काय आपल्यासाठी केलंय? त्याचं जे काही कार्य आहे आणि त्याचा जो काही प्रादर्भाव आहे, तो आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात मिळतो. नुसत गणपती, गणपती करून बसतो. गणपती बसला, गणपती हे, ते, पण गणपती म्हणजे काय, करतो तरी काय आपल्यामध्ये? त्याचे काय गुण शुभकारी आहे, अमूक आहे, तमूक आहे. त्याने कसं शुभ केलं! त्याचं जे काही कार्य होतं ते ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून सर्व लोकांनी ख्रिस्ताचं चरित्र वाचून काढलं पाहिजे आणि आहेत ? तो विचारणा केली पाहिजे. आता हे जे काही मागचे संस्कार आहेत त्याप्रमाणे वागून चालत नाही. जसे इकडे हे लोक ख्रिस्ती धर्मातून आलेले आहेत. त्यांनी आपल्याकडचे सर्व अवतार कोणते होते? त्यांनी काय काय कार्य केलं? ह्याबद्दल माहिती करून घेतली. आणि कधीतरी तर ते आपल्यापेक्षाही जास्त आहेत. तेव्हा आपणही खरिस्तांबद्दल, मोहम्मदांबद्दल, इतरही जे मोठमोठाले सद्गुरु झाले त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. ह्याला कारण असं आहे, की उद्या तुम्हाला गुरुपद मिळालं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ असलात, Read More …

Welcome Puja at Chalmala Chalmala, Alibag (India)

Shri Mahadevi Puja – Chalmala 21st December 1986 Date: Alibag Place Type Puja सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. तसेच तुम्ही सहजयोगीसुद्धा त्याचा स्रोत आहात. म्हणून देवाने हा सबंध आरसा त्याच्यासाठी तयार केला. हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. आणि ह्या की आरशात बघून देव संतुष्ट होतो. पण ह्या आरशात आणखीन एक त्याला बघायचं आहे, ते म्हणजे असं, मानवामध्ये हा आरसा जागृत झाला की नाही. जो मी मानव तयार केलेला आहे, जो मी मनुष्य तयार केलेला आहे, त्या मनुष्यामध्ये हे सौंदर्य आलं की नाही? त्याला ह्याची जाणीव झाली की नाही, की तो किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे. हे सगळं जाणण्याची त्याच्यामध्ये पात्रता आली की नाही? तुकारामांनी म्हटलेले आहे की, ‘अणू-रेणूहनही थोडका , तुका आकाशाएवढा.’ मी ह्या अणूरेणूपेक्षा जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा मोठा आहे. ज्याने हे एकदा बघितलं स्वत:बद्दल, मग तो क्षुल्लक गोष्टींसाठी, भलत्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालविणार नाही. व्यर्थ गमवणार नाही आपलं आयुष्य ह्या क्षुल्लक गोष्टीकरता गमावणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आता अनेक घाणेरड्या गोष्टी आलेल्या आहेत. ते आपल्याला माहिती आहेत. आता दारू पिणे. कोणी म्हटलं, Read More …

Diwali Puja Pune (India)

Diwali Puja (Hindi/Marathi). Pune (India), 1 November 1986. मराठीत म्हणतात, ‘त्याला पाहिजे जातीचे,’ आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, ‘या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता।’ सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको. ते ही आहेत, जाऊ देत. असेही लोक आहेत जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले आहेत. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं ते ही सुटत नाही. कितीही सांगितलं तरी सुटत नाही. जाऊ देत. ते ही आहेत. त्याहन असे ही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. त्यांची बुद्धी त्याबाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसतय की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय! हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहजयोग वर्णिता येत नाही. सहजयोगाला समजण्यासाठीसुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजेत. सहजयोगी सहजयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. ‘माताजी, ते फार श्रीमंत लोक आहेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.’ ‘बरं मग पुढे काय!’ ‘ते म्हणतात आम्हाला एकदा माताजींना भेट्ू द्या.’ ‘मग त्यांना काय पाहिजे?’ ‘काही नाही, ते भेटायचं म्हणतात.’ मी म्हणते, ‘अहो, राहू देत, त्यांना अजून थोडसं बघू द्या.’ लोकांना समजत नाही, असं कसं माताजी म्हणाल्या? एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत ते. पैसे आले म्हणून पॉलिटिशियन आहेत. तुम्ही भेटा. म्हटलं, दरून नमस्कार! Read More …

Navaratri, Shri Gauri Puja Pune (India)

1986-10-05 Navaratri, Shri Gauri Puja (Hindi/Marathi) मराठी भाषा फार चांगली आहे कारण तिला तोड नाही. विशेषकरून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो. आणि या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारण असे आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. त्यांच्या भाषेतच नाही. त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही. तेव्हा थोडेसे हिंदीत बोललेले बरे कारण तुम्हाला सगळे आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळे पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा. पण तरीसुद्धा असे म्हटले पाहिजे की आपल्याला फार मोठी संतांची इथे शिकवण जी मिळालेली आहे हा एक इतका मोठा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने संस्कृती म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. पुण्य म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. हे चांगले-वाईट काय ते आपल्याला माहिती आहे. कळतं पण वळत नाही. कळतं सगळं की हे सांगितलेले आहे, वाईट आहे. असा पुण्यसंचय आपण पुष्कळ केलेला आहे. म्हणूनच या पुण्यामध्ये, या पुण्यनगरीमध्ये आपला जन्म झाला हे कबूल, पण तरीसुद्धा इतर लोकांना बघून आपल्याला असं वाटतं की आम्ही पुणेकर म्हणजे काही जास्त श्रीमंत नाही, मुंबईकर जास्त श्रीमंत आहेत. त्याच्याहून असं वाटतं की मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक अधिक श्रीमंत. त्यांच्याजवळ पैसे जास्त असतात. तिथे दिल्लीला तख्तच असल्यामुळे तिथे त्यांच्याजवळ मान, बुवा पान, आदर हे सगळे काही बाह्यत: पुष्कळ दिसतं. तेव्हा असं वाटतं केवढे मोठे लोक आहेत हे. ह्यांचे केवढे मोठे पण आमचं काय, आम्ही गरीब अजून. पण तुम्ही पुण्यवान आहात. पण ह्या पुण्यातच असे लोक आहेत देवालाच मानत नाहीत. मोठे मोठे धुरंधर मी पाहिले. मोठे, मोठे विद्वान लोक मी पाहिले ते देवालाच मानत नाही म्हणजे इतके शिष्ट Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 8th March 1986 Date : Place Pune : Type Puja या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो मनुष्य आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून, त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठीत असतो. आत्मतत्त्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्त्व, मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्त्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मास्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचे प्रतिबिंब जे हृदयात आहे, ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो. एकमेकांना ओळखत नाही, एकमेव एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते. त्याबद्दल भ्रामकता असते. जाणिवेसाठी ज्याला अॅबसल्यूट म्हणतात, तो आत्माच मिळविला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसानसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद् म्हटलेले आहे, की विद् झाले पाहिजे. ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसानसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही कितीही म्हटलं की आम्ही जातियता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब-श्रीमंत मिटवून टाकू. म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या, की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू किंवा सर्व जगात एकच साम्राज्य आलं पाहिजे अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते Read More …

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 11th January 1986 Date: Place Shrirampur Public Program Type श्रीरामपूरच्या सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या साधकांना आमचा प्रणिपात असो. आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने आम्हाला इथे बोलवलं आणि परमेश्वर प्राप्तीची उत्कंठा दर्शवली त्यातच आम्ही कृतार्थ झालो. तसंही जीवन आहे. आपण जे काही शिकत असतो, त्यामध्ये आपण आनंद शोधत असतो. काहीही आपण करतो ते आनंदासाठी करतो. कोणीही दु:खासाठी शोध करत नाही. दु:ख कुठे म्हणून शोधायला जात नाही. पण जिकडे आनंद आहे. तिकडे माणसाचं लक्ष वेधलेलं असतं. जीवनामध्ये आनंद काय आपल्याला समजत नाही. सुख आणि दुःख ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो सुखाकडे म्हणून धावतो त्याला शेवटी दुःख होतं. ह्याला काय कारण असलं पाहिजे? जो निव्वळ आनंद, ज्याने सुख आणि दुःख दोन्ही संपून, जातात अशी कोणती स्थिती असली पाहिजे? असा विचार जेव्हा माणसाच्या मनात उद्भवतो त्यावेळी तो एकसांख्य होतो आणि तो परमेश्वराला शोधू लागतो. परमेश्वराच्या नावावर लोकांनी पुष्कळ दुकानं मांडलेली आहेत. दुकानात गेलं म्हणजे परमेश्वर मिळतो असा आपला पुष्कळांचा विचार आहे. सहजयोगात तुम्ही पैसे देऊ शकत नाहीत, असं म्हटल्याबरोबर अर्धे लोक उठून चालले जातात. पैशाने तुम्ही परमेश्वर विकत घेऊ शकत नाही. परमेश्वर घेताच येत नाही आपल्याला. विकाऊ वस्तू नाही आहे परमेश्वर . तर परमेश्वर काय आहे ? ज्याने ही सृष्टी रचली, ज्याने पृथ्वी आपल्याला दिली, ज्या पृथ्वीतलावर आपण जन्माला आलो, हे सगळं करणारा जो परमेश्वर आहे, तो आहे तरी काय? असा प्रश्न मनामध्ये उभा राहतो. पुष्कळसे लोक अशा भ्रामक कल्पनेत इकडे तिकडे भटकतात आणि भटकले आहेत. धर्माच्या नावावरतीसुद्धा पुष्कळांना भरकटवून टाकलेले आहे. ज्याला आपण धर्म म्हणतो, कधी कधी असं वाटतं, की हा धर्मच नसावा. जे धर्मावरती बोलतात त्यांचासुद्धा एवढा अधर्मीपणा! आपल्याला Read More …

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 6th January 1986: Place Sangli Puja Type आता सांगलीकरांना सांगायचं असं की ते आपण पूर्वी एक पूजा केली होती आणि आता परत केलेली आहे. सांगलीला बरच पेपरमध्ये वगैरे आल्यामुळे बरच काम झालेलं आहे आणि इथे सहजयोग बसूही शकतो. कारण वातावरण फार छान आहे. शांत आहे आणि इथले एकंदर लोक मदत करायला तयार आहेत. थोडी सांगलीकरांना आमच्यातर्फे एक लहानशी भेट देणार आहोत. तर ती भेट त्यांनी स्वीकारावी. अशी माझी विनंती आहे आणखीन एक वस्तू आहे, पण ती अजून बाजारातच रातहिली आहे. ती आल्यावरती देऊ. कोण घेत आहे ? (भेट) (अनुवाद-श्री.तावडे, जे इथले मोठे सहजयोगी आहेत. त्यांनी भेट स्वीकारली.) आता आजच्या पूजनाला खरोखर महत्त्व असं आहे, की आज महालक्ष्मीचं पूजन आहे. आणखीन महालक्ष्मीचं जे महात्म्य आपल्या सहजयोगात आहे, ते कोणत्याच शक्तीचं नाही. कारण महालक्ष्मी ही शक्ती जिला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, त्यात वास करते आणि त्याने पॅरासिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीमचं चालन होतं. ह्या महालक्ष्मीला सशक्त करण्यासाठी आपल्या उत्क्रांतीमध्ये ज्या ज्या घटना झाल्या, त्यात मुख्य म्हणजे महालक्ष्मीचं अवतरण आहे. महालक्ष्मीने अनेकदा अवतार घेतले आणि तिचीच एवढी हिंमत आहे, की तिने एक शरीर धारणा करून ह्या संसारात जन्म घेतला आणि कार्य केलेल आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की आपल्याला सर्व ह्या महालक्ष्मीच्या अवतरणाबद्दल कोणी माहिती दिलेली नाही किंवा इतकं गहन कोणाला त्याच्याबद्दल, सविस्तर वर्णनच माहिती नाही. आता महालक्ष्मीचं तत्त्व म्हणजे लक्ष्मीच्या तत्त्वावरचं आहे. म्हणजे लक्ष्मीची आई महालक्ष्मी म्हटलं पाहिजे. लक्ष्मीची आई म्हणजे लक्ष्मी जी आहे, जेव्हा माणसाजवळ लक्ष्मी येते, लक्ष्मीसुद्धा एक संतुलन असलेली, एक स्त्री स्वरूप देवी आहे. इतकी संतुलनात आहे ती की ती एका कमळावर उभी राहते. तिच्या हाता दोन कमळं Read More …

Public Program Ganapatipule (India)

Sarvajanik Karyakram 3rd January 1986 Date: Ganapatipule Place Public Program Type गणपतीपळे आणि मालगुंड ह्या पवित्र परिसरात राहणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो! गतवर्षी सहजच गणपतीपुळेला येणं झालं आणि इथलं पवित्र वातावरण पाहन ही परमेश्वरी सोन्याची खाण इतके दिवस का लक्षात आली नाही हेच मला समजलं नाही. आणि ह्या ठिकाणी जी मालगुंडची मंडळी राहतात आणि गणपतीपुळ्याची मंडळी राहतात त्यांना तरी ह्या खाणीची माहिती आहे की नाही असा मला प्रश्न पडला, तेव्हा काहीही झालं तरी आम्ही आमचा प्रोग्रॅम गणपतीपुळ्यालाच घेऊ या, असं मी सर्वांना सांगितलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी हा शब्द उचलून धरला. नागपूरहन इथे मंडळी आली. तसेच इतर ठिकाणाहून, फार लांबून, दिल्लीहून, कोलकाताहून, फार लांबून मंडळी इथे आली. मद्रासची पण मंडळी इथे आली. माताजींनी गणपतीपुळ्याला एवढ महत्त्व दिलं तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात होता. पण इथे आल्याबरोबर त्यांना मोठा आश्चर्यजनक आनंद झाला. कारण हे वातावरण इतक शुद्ध आणि पवित्र आहे, की ते एका आत्मसाक्षात्कारी माणसालाच जाणवू शकतं. ही जाणीव व्हावी लागते. नुसतं असं म्हणून की आम्ही गणपतीपुळ्याला गेलो, ह्या अष्टविनायकाला गेलो, तिथे गेलो, असं केलं, तसं केलं, त्याला काही अर्थ रहात नाही. तुम्हाला काय मिळालं? असं विचारलं, तुम्ही अष्टविनायकाला गेलात, तुम्ही इतकी तीर्थयात्रा केलीत, तुम्हाला काय मिळालं? जसेच्या तसेच. इकडे गेलो, हे खर्च केले. तिकडे गेलो, हे केलं. दानधर्म केला, अमुक केलं, तमुक केलं, तीर्थयात्रा केल्या, पण का केल्या आणि तुम्हाला मिळालं काय? आता हे अष्टविनायक कोणी शोधून काढले? अष्टविनायक आहेत हे कोणी सिद्ध केलं? ही फार पुरातन गोष्ट आहे. आजची गोष्ट नाही. फार पुरातन गोष्ट आहे. तेव्हा त्या वेळेला जे आत्मसाक्षात्कारी मोठे लोक झाले, त्यांना लोक Read More …

Public Program Atit (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . अतीत बद्दल मी ऐकल होत कि इथे पुष्कळ साधक आहेत आणि सहजयोग चांगलाच रंगलेला आहे . इथे आल्याशिवाय ते सत्य द्रीष्टी समोर आलं नाही . आणि पाहून मला मोठं आश्चर्य वाटलं कि या ठिकाणी प्रथमच मी आले आणि लोकांचा उत्साह त्यांचं प्रेम किती भव्य आहे किती मोठं आहे . आपण नेहमीच सत्याला शोधत असतो . जाणता जाणता आपण शोधत असतो ते सत्य . कारण सत्य हेच प्रेम आहे . एखाद्या बद्दल आपल्याला जर प्रेम वाटलं तर आपण त्याच्या बदल सगळं काही असेल ते जाणतो ,जे सत्य आहे ते जाणतो . बाह्यतः सुद्धा . आणि ते प्रेम आनंददायक असत . तेव्हा ते सत्यच आनंदाचा स्रोत आहे . आपल्याला असं वाटत कि सत्य म्हणजे काहीतरी कोरड असेल कारण जे सत्यवचनी असतात ते करारी लोक ,बाणेदार लोक आणि हातात नेहमी तलवार धरूनच असतात . त्यांच्या जवळ जायचं म्हणजे अगदी विचार करावा लागतो . त्यांच्या जवळ जायचं तरी कस एखादा तडाखा दिला तर कस होईल आपलं . सत्य हे प्रेममय आहे ,आनंदमय आहे . ,सौन्दर्य शाली आहे . सुखमय आहे . ते आपण सत्य शोधत असतो . पुष्कळसे लोक असं समजतात कि आम्ही जर मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्या तर आम्हाला आनंद होईल . पुष्कळसे लोक भौतिकतेत पडतात त्यांना वाटत कि आम्ही जर मोठमोठाले बंगले बांधले किंवा मोठाल्या गाड्या ठेवल्या श्रीमंत झालो म्हणजे आम्हाला आनंद मिळेल . सुख दुःखाचा हा फेरा आहे . हा आनंदाचा सागर नव्हे . सुख तेव्हा होत जेव्हा माणसाचा अहंकार बळावतो . एखाद्या माणसाने उदोउदो केला म्हणजे माणसाला सुख वाटत . आणि Read More …

Public Program Sangamner (India)

परमेश्वराला  शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . ह्या भारत भूमीत ह्या योगभूमीत महाराष्ट हे एक विशेष प्रकारचं राष्ट्र  आहे . आणि अनादी काळापासून याला महाराष्ट्र असं म्हंटल आहे . महाराष्ट्र का म्हंटल असं कुणाला विचारलं तर लोकांना ते सांगता येत नाही . आणि केव्हा पासून म्हंटल ते सुध्दा त्यांना सांगता येत नाही . असे अनादी नाव कोणत्याही देशाला आजपर्यंत महाराष्ट्र असं दिलेलं नाही . तेव्हा ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असं आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे . म्हणजे एव्हड्या मोठ्या राष्ट्रात जर जन्म झालेला आहे ,हे राष्ट्र संबंध पृथ्वी तलावावर महान मानलं जात तेव्हा याच जे आपण मोठं नाव ठेवलेलं आहे किंवा नाव आहे त्याला साजेस काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहजे . राजवाड्यात जे राहतात त्याना रजवाडे म्हणतात . तसच ह्या महाराष्ट्रात जे राहतात त्यांना महाराष्ट्रीयन म्हणतात . किंवा महाराष्ट्र वासी म्हणतात . पण त्यातलं ब्रीद काय आहे ते ओळखून घेतलं पाहिजे . त्याच्या शिवाय स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायचं नाही . कारण सत्य हे आहे कि हा देश अत्यंत महान आहे . आणि आधी मी आपल्याला सांगितलं आहे कि सर्व विश्वाची कुंडलिनी  ह्या महाराष्ट्रा च्या पठारामध्ये जशी त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपल्यात  ती बसलेली आहे तशीच हि कुंडलिनी आपल्या ह्या महाराष्ट्रात बसलेली आहे . हि महान आदी कुंडलिनी ह्या महाराष्ट्रात आहे . तिची तीन पीठ आपल्याला माहीतच आहे .   महाकालीच ,महासरस्वतीच आणखीन महालक्ष्मीचं . पण जे मुख्य आहे ते सप्तशृंगीचं अर्धमात्रा , ती आदिशक्ती आहे . ती नाशकाच्या जवळ आपल्याला माहित आहे . अशी साडेतीन पीठ ह्या भूमातेच्या पाठीच्या कणावर महाराष्ट्रात आहेत . म्हणजे इथे चैतन्याच्या नुसत्या लहरी वहात आहेत . चैतन्य नुसतं उफाळून आलेलं Read More …

Puja Nashik (India)

Saptashrungi Puja Date 17th December 1985: Place Nasik Type Puja आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.’ तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं-घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखाद बी घातलंत, तर तिचं देणं-घेणं एवढच आहे की, ‘बाबा, तुझ्यामध्ये मी अंकूर फोडते.’ पण त्यानंतर बघायला नको. तेव्हा जरी हे अगदी सहज असलं, तरी आता आम्ही संत झालो, हे समजण फार कठीण आहे. आता आम्ही बी घडलो. हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे. अजून आम्ही तेच आहोत, असं सारखं आपल्याला वाटत असतं किंवा तस नाही वाटलं, तरी आपली वागणूक तशीच असते. तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आता आम्ही संत झालोत . संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी! प्रत्येकाने सांगितलेली आहे. त्या संतांमधली आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजे. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोचर का होत नाही? लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाहीत ? ते आपल्यात त्यांना दिसत का नाही ? त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे, कि परमेश्वराने आपल्याला अंकुरलं आहे. बरं, झालं. आता पुढे काय? आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी ? आम्हाला सहजयोगामध्ये हे माहिती आहे, की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ योग मिळाला तुम्हाला, क्षेम घ्याच. ते त्याच्याच बरोबर येतं समजा. बिल्ट इन. त्याला काही करायला नको. क्षेम घ्या. पण क्षेमाबरोबर एक Read More …

Public Program Nashik (India)

परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . ह्या सर्व सृष्टी मध्ये पृथ्वी हि विशेष मानली जाते आणि त्या पृथ्वीवर विशेष म्हणजे भारत भूमी आहे . तिला योग भूमी असं म्हंटल आहे . त्या योग भूमी मध्ये तपोभूमी जी आहे ती नाशकाच्या आसपास आहे . अशा पवित्र भूमीत तुम्ही आला आहात . आणि इथे माझं कार्य फार होईल अशी मला अपेक्षा आहे . पुष्कळ दिवसापासून अनेकदा इथे आल्यावर सुध्दा माझ्या दृष्टीत असं आलंय कि इथले लोक इतकी मोठी संपदा असून सुध्दा ,एव्हडी मोठी तपोभूमी त्यांच्या पायाखाली असून सुध्दा ,इतक्या साधुसंतांनी आणि ऋषीमुनींनी इथे त्याग आणि तप केलेलं असून सुध्दा ह्या क्षेत्र भूमी मध्ये लोकांचं लक्ष परमेश्वराकडे कमी आहे . त्याला कारण शोधता असं कळलं कि प्रत्येक क्षेत्र ठिकाणी ,महाराष्ट्रात किंवा कोणत्याही ठिकाणी इतकच नव्हे तर तुम्ही जर रोमला गेलात किंवा इतर क्षेत्र स्थळी गेलात जिथे ख्रिश्चन धर्म आहे ,मुसलमानांचा धर्म आहे किंवा जैन धर्म आहे कोणाचाही धर्म असो त्या क्षेत्र स्थळी परमेश्वर उठलेला दिसतो . त्याला कारण काय तर तिथे लोक बसून देवाच्या नावावर पैसे कमावतात . आम्हाला देव सगळा माहित आहे . बाकी कुणाला देव समजत नाही . अशा रीतीने जे भाविक अत्यंत सोज्वळ लोक आहेत त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना अशा मार्गाला घालतात कि ते अभिभूत होऊन अशा कर्माला पडतात कि ज्याला आपण म्हणतो कि हे लोक बाधित झाले . ह्यांचे धंदे अशे असल्या मुळे प्रत्येक क्षेत्रस्थळी हा प्रकार झालेला आहे . पण जी मंडळी अत्यंत साध्या  प्रवृत्तीची आहेत आणि भाविक आहेत ज्यांनी अनेक जन्म परमेश्वरासाठी टाहो फोडलेला आहे त्यांना आज हि अशी संधी आहे कि त्यांनी आत्म्याचं आपलं दर्शन घ्यावं . त्याला कारण असं कि Read More …

Birthday Puja Mumbai (India)

जनम दिवस पूजा २१ मार्च १९८५ , मुंबई आज के ६३वें जन्मदिवस पर आपने जो समारोह रचा है उसके लिए एक माँ को क्या कहना चाहिए? क्योंकि जो कुछ भी है सब आपके लिए ही है। ये सारी उम्र भी आपके लिए है इसलिए इसके लिए यदि आप इस समारोह को मानते हैं तो इतना ही कहना है कि यह अपनी चीज़ है। और इसका आपको पूरा उपयोग करना चाहिए। क्योंकि जिन्दगी बहुत महत्वपूर्ण है । आज तक परमात्मा ने अनेक लोगों को संसार में भेजा। उन्होंने भी कार्य किया है । उस कार्य की ही स्वरूप आप लोगों ने सहजयोग पाया है। लेकिन अभी तक आप लोग शायद इसका महत्व नहीं जान पाए। पहले तो लोग पहाड़ों में घूमते थे, बहुत तपश्चर्या करते थे, परमात्मा की खोज में रहते थे । अब फलश्रुति हो रही है। आज उसी कार्य के आशीर्वाद आपने सहज में ही आज अपनी आत्मा को प्राप्त किया, इतना सहज और सरल मिला है, और उससे इतना क्षेम प्राप्त हुआ है। इस कदर आपने शक्तियों को प्राप्त किया है, उसमें कभी भी ऐसा आपको लगा नहीं कि इस चीज़ को मिलने में कितना प्रयत्न करना पड़ा, कितने जन्म लेने पड़े, कितनी जिन्दगियाँ बितानी पड़ीं, उसके बाद आज आप सहजयोग को प्राप्त हुए । और इस दशा में आये हो कि आज आप एक साधु स्वरूप हैं। बहुत लोग सोचते हैं कि सहजयोग में आने से हमारी घर की सांपत्तिक स्थिति ठीक हो गयी या हमारे बच्चे ठीक हो गये। लड़कियों की शादियाँ हो गयीं, लड़कों को Read More …

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja 3rd February 1985 Date : Warnali Place Type Puja आता मराठीत काय सांगायचे, की ह्या इतक्या सुरम्य स्थानी तुम्ही आलात आणि इथे जगताप साहेबांनी आपली इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी पूरे पडणार नाहीत. इतकं प्रेमाने सगळ्यांना दिले आणि केले. त्याबद्दल हे सगळे सहजयोगी इतके आश्चर्यचकित झाले, की आपल्या देशात असा असेल तर किती होऊ शकेल! एवढे प्रेमाने वागून, सगळ्यांची प्रेमाने व्यवस्था करणे हे फार जर एकतरी मनुष्य मोठे काम आहे. हे ह्यांनी साधलेले आहे. त्याची ह्यांना कमाल वाटते. तसेच तुम्ही लोकांनी इतकी मेहनत केली, सगळ्यांनी ब्रह्मपुरीलाही येऊन इतकी सुंदर व्यवस्था केली. जंगलामध्ये. नंतर इथेही सगळ्यांची इतकी व्यवस्था केली. खूप मेहनत घेतलीत. आम्ही तुम्हाला काय देणार? काय विशेष देणार आहोत ? इतके तुम्ही रात्रंदिवस आटोकाट प्रयत्न करता. इथे एक पाटील साहेब आहेत. ते सहजयोगी नव्हते, पण त्यांनी एवढी मदत केली आहे. ह्या लोकांची तुम्ही केवढी सेवा केलेली आहे. त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. फार ऋणी आहे. अनेकदा सांगितलं तुम्ही, की माताजी, तुम्ही ह्याचा उल्लेख करावा. आम्हाला ह्यांच्याबद्दल फार आदर वाटतो. आम्हाला वाटते फार मोठे ह्या लोकांनी केलेले आहे. किती त्यागी लोकं आहेत ! आम्ही इतके करू शकत नाही. तेव्हा आज आपला शेवटचा दिवसच म्हटला पाहिजे टूरचा. कारण ही मंडळी निघालेली आहेत ह्या सर्वांच्या वतीने मी आपले फार फार आभार मानते. सगळ्यांचेच. एकएकाचे नाव सांगण्यासारखे नाही. पण मोदी साहेबांचे तुम्ही विशेषकरून आभार मानले पाहिजेत.

Public Program (India)

ताराराणी हायस्कूल चे संचालक , तसेच शिक्षक वृंद , कोल्हापूरचे अबालवृद्ध आणि आसपास च्या खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . आजचा विषय सहजयोग तर आहेच आणि सहजयोगावर मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं आहे कि सहजयोग म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला योगाचा जन्मसिध्द अधिकार . सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला . हि जिवंत क्रिया आहे . आणि ती जिवंत क्रिया आपल्या मध्ये घाटीत होते त्या साठी काहीही क्रिया करावी लागत नाही . अक्रियेत ते घडत हे मागच्या वेळेला तुम्हाला समजावून सांगितलं होत . पण महालक्ष्मीच्या परिसरात बसल्यावर हि महालक्ष्मी कोण ?तिचा आपला काय संबंध? ,आपण देवळात जाऊन काय मिळवायचं ? वैगेरे ह्या गोष्टींची कुणाला माहिती नाही . देवळात जायचं खणानारळानीं ओटी भरायची एव्हडं जे साधुसंतांनी सांगितलेलं आहे तेव्हड आपण करतो . तिच्या परिसरात राहून तिच्या आशीर्वादाने हि सश्यशामला भूमी पुनीत झालेली आहे तिचा पूर्ण उपभोग घ्यायचा ती आपली एक प्रवृत्ती आहे . तरी सुध्दा हि महालक्ष्मी कोण ?हि महालक्ष्मी तत्व रूपाने आपल्या मध्ये वास करत असते . आणि जी सुषुम्ना नाडी अशी जी आपल्या मध्ये जी मधोमध आपल्या मध्ये आहे ,जिच्यातून कुंडलिनीच उत्थापन होत त्या नाडीला महालक्ष्मीची नाडी असं म्हणतात . डावी कडे महाकाली आणि उजवी कडे महासरस्वती ह्या दोन्हीच्या मिलनानी बनलेल जे मधोमध अशी पोकळी आहे ह्या पोकळीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात . म्हणजे महालक्ष्मी हि सुषुम्ना नाडी आहे आणि तिच्यातूनच कुंडलिनीच उत्थापन होत म्हणून जरी हि महालक्ष्मी आहे तरी तिच्या समोर जाऊन आपण उदे उदे आंबे असं म्हणतो . अंबा हि कुंडलिनी आहे . जो आपण जोगवा म्हणतो तेही तेच आहे . ग्रामीण विभागा मध्ये जोगवा म्हंटला जातो ते हि Read More …

Public Program (India)

 सांगलीचे चीफ इंजिनिअर श्री जगताप साहेब तसेच ह्या शाळेचे मुख्याधापक ,इथे राहणारे सर्व आबालवृध्द ,सत्याच्या शोधात आलेले सर्व साधक या सर्वाना आमचा प्राणिपाद असो . कुंडलिनीचा विषय थोड्या शब्दात किंवा थोड्या वेळात मांडणं हे सोपं काम नाही . पण तरी सुध्दा आपण असा विचार केला पाहिजे कि हि जी मानव आकृती तयार झाली ती का झाली . हा मानव निर्माण करताना इतका वेळ घालवला अनेक योनीतुन आपण संचार केला शेवटी ह्या मानव स्तीतीला आपण आलो . तेव्हा ह्या मानव स्तितीत येऊन पुढे काही आहे किंवा नाही हा एकदा विचार मनात जरूर डोकावतो . आणि जेव्हा हा प्रश्न डोक्यात उभा राहतो त्या वेळी साधक तयार होतात . आणि हे साधक परमेश्वराच्या शोधात, सत्याच्या शोधात ,निर्गुणाच्या शोधात कुठेना कुठे तरी भटकत असत . त्या साठी श्री कृष्णाने फार सुंदर विश्लेषण करून सांगितलं आहे . कि जगामध्ये तीनच जाती आहेत . तीनच तऱ्हेचे लोक आहेत म्हणजे एक तामसिक ,एक राजसिक आणि एक सात्विक . तामसिक मंडळी म्हणजे ती कि जे चूक असेल त्याला सत्य मानायचं आणि त्याच्या मागे धावायचं . ज्याचं काही महत्व नसेल ते महत्वपूर्ण करायचं आणि त्यासाठी संबंध आपलं आयुष्य घालवायचं . त्या बद्दल विचार करायचा नाही ,त्या बद्दल कोणचंही संतुलन ठेवायचं नाही . नुसतं वेड्यासारखं त्याच्या मागे लागायचं . जी आज पाश्चिमात्य देशांची स्तिती आहे ते राजसिक लोक आहेत . राजसिक लोक ते ज्यांना बरोबर काय आणि चूक काय ते समजत नाही . शुध्द काय आणि अशुध्द काय ते समजत नाही . पवित्र काय आणि अपवित्र काय ते समजत नाही . दोन्हीही चांगलं असं ते आपल्या अहंकाराच्या दमावर म्हणतात . तर राजसिक माणसाचा अहंकार फार बळावलेला असतो Read More …

Puja Brahmapuri (India)

Puja at Brahmapuri. Brahmapuri (India), 29 February 1985. Marathi Transcript इथे या लोकांच आगमन झाल आहे,तुम्ही लोका नि त्यांच स्वागत केल ,इतकी व्यवस्था केली,आणि इतकी सुंदर जागा शोधून काढली त्यांच्या साठी तेव्हा त्यांच्या वतीने मीतुमच्या सगळयांचे आभार मानते .या लोका नि इथे फार आनंदात वेळ काढलेला आहे .देव कृपेने यांच्या जवळ यांच्या देशात सगल काही आहे .तुम्ही जाउन बघितल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे लोक अत्यंत श्रीमंतीत वाढलेले आहेत आणि सगळ्या तरहेचा ऐशो आराम याना आहे,आपले रस्ते आपली धूळ तुडवत इथे ते आले आणि मी त्याना संगितल इथे श्रीरामाची आणि सीतेची मूर्ती मिळाली होती ,ही अशी पवित्र जागा आहे जिथे रामदास स्वमिनि या मूर्ती प्राप्त केल्या आणि त्या चाफळ ला नेऊन बसवल्या .या एका गोष्टीवर ही मंडळी म्हणायला लागली की आम्हाला तिकडे जायच आहे . तसच मी इथल्या मंडळिना संगितल की बर तुम्ही तिथे व्यवस्था करा ,त्या सर्व आरमाला सोडून ,त्या सर्व सुखा ला सोडून ते परमेश्वराच्या आनंदा साठी इथे आलेले आहेत . तसाच आपण सुधा ज्या पवित्रा जागा आहेत त्याच महत्व आपण समजल पाहिजे .आणि त्या पवित्र तेच आपण रक्षण केल पाहिजे . आपल्या मधे ती पवित्र ता आली पाहिजे. हे लोक इतके कुशाग्र आहेत की याना माहीत आहे की महाराष्ट्रात विशेष करून या भारत भूमी पेक्षा  सबंध महाराष्ट्रात अत्यंत सुंदर ,रम्य अशी अध्यात्मिक ठिकाणे आहेत . ते दिसायला आपल्याला सुंदर दिसेल या पेक्षा कितीतरी सुंदर त्यांच्या कडे फार सुंदर निसर्ग आहे ,फार सुंदर निसर्ग आहे .म्हणजे अगदी बघता च अस वाटत की काय विशेष आहे .पण त्यात चैतन्य नाही. इथे चैतन्य आहे म्हणून ते लोक आले ,तसेच Read More …

Public Program Angapur (India)

अंगापूरच्या या पंचक्रोशीत या पवित्र भूमीत आज येत आलं त्या साठी मी इथल्या सहजयोग्यांचे फार आभार मानते . अंगापूर बद्दल बरीच माहिती मी आधी वाचली होती . श्री रामदास स्वामींना इथे श्रीराम आणि सीतेच्या मूर्ती मिळाल्या त्यांनी त्या चाफळ मध्ये नेऊन ठेवल्या . त्याही मी पहिल्या आहेत . तेव्हा कधीतरी अंगापूरला जावं अशी माझी फार इच्छा होती . हि पवित्र घटना आहे आणि त्या एका घटने मुळे रामदास स्वामी नि अनेक ठिकाणी श्री हनुमानाचे सुंदर मंदिर बांधलेले आहे . त्यांनी जे कार्य केलं ते समाजोन्मुख होत ,समाजाकडे त्यांची द्रीष्टी होती . समाजाला परमेश्वरी ओळख झाली पाहिजे ,परमेश्वर मिळवल्या शिवाय माणसाचं कल्याण होऊ शकत नाही हि त्यांची ठाम समजूत होती . रामदास स्वामींना एकदा विचारण्यात आलं कि हा परमेश्वरी साक्षात्कार करायला किती वेळ लागतो . त्यांनी सांगितलं तत्क्षण . त्यांनी सहज शब्द अनेकदा वापरला पण सहज लोक नाहीत त्यांची वृत्ती सहज नाही . त्याला कारण श्री कृष्णांनी सांगितलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेचे लोक असतात . एक तामसिक लोक असतात दुसरे राजसिक असतात आणि तिसरे सात्विक लोक असतात .  तामसिक लोक ते असतात जे काहीतरी चुकीचं डोक्यामध्ये भ्रामक घ्यायचं आणि त्याच्या पाठीमागे सगळं आपलं आयुष्य घालवत असतात . आणि राजसिक लोक ते असतात ज्यांना चूक आणि बरोबर यातला फरक कळत नाही वाईट काय आणि चांगलं काय यातला फरक कळत नाही . हे अशे राजसिक लोक असतात . आणि तिसरे सात्विक लोक असतात जे परमेश्वरच नाव घेतात कारण त्याना माहित आहे कि सन्मार्गाने एकदा आपण वागलो कि आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल . ह्या विचाराने जे राहतात ,या ध्येयाने जे राहतात ते खरे सात्विक म्हणायचे . जे लोक उगीचच देवाचं नाव Read More …

Public Program Akluj (India)

यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि इतर संचालक वर्ग ह्या तालुक्यात राहणारी सर्व साधक मंडळी अबालवृद्ध सर्व भक्त मंडळांना तसेच अत्यंत सुंदर स्वरात भजन गाणाऱ्या ह्या सर्व भजन मंडळींना आमचा नमस्कार असो . सर्व प्रथम फार उशीर झाला आपल्याला वाट पाहावी लागली याच मला फार वाईट वाटत . त्या बद्दल मी क्षमा मागते सर्वांची . पण जे व्हायचं असत जी वेळ योगायोगाची असते त्या वेळेस ते कार्य घडत . असं मानून तुम्ही सर्वानी मला क्षमा करावी . ह्या कारखान्याचे दिग्दर्शन झाल्या पासून मला फार ह्या देशा बद्दल आशा वाटू लागली आहे . कारण आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती खरोखरच फार हालाकीची आहे . आणि जरी थोड्या जागी हि परिस्थिती सुधारली आहे तरी सर्व देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात अजून पुष्कळ स्तिती सुधारायची आहे . पण तरी सुद्धा अशा संस्था निघाल्या मुळे आर्थिक परिस्थिती हि सुधारू शकते आणि त्यांनी सुधारून इथे नंदनवन उभं केलं आहे हे पाहून मला खरोखर फार आनंद झाला . पण हे लक्षात ठेवलं पाहिजे कि नुसती आर्थिक परिस्थिती सुधारून सगळं ठीक होत नाही . आम्ही परदेशात फिरत असतो आणि माझ्या बरोबर चौदा देशातले परदेशी पाहुणे इथे आलेले आहेत . अर्थात ते इथे नाहीत साताऱ्याला सरळ गेले ,पुढल्या वेळेस त्यांना इथे घेऊन येईन . त्या लोकांना पाहिल्यावर हि गोष्ट लक्षात येते कि आर्थिक परिस्थिती जरा ठीक झाली तर माणूस वाईट मार्गाला लागतो . त्याच लक्ष मग अशा मार्गावर जात कि जिथून त्याच पतन सुरु होत . ह्या देशांची स्तिथी जरी वरून चांगली दिसते कारण यांच्या जवळ चांगली घर आहेत ,मोटारी आहेत ,सगळी व्यवस्था आहे दळणवळणाची ,काही अशे हालअपेष्टा नाहीत. पण तरीसुद्धा यांच्या मनाच्या Read More …

Public Program Pimpri, Pune (India)

आता आपल्या समोर श्रीमती उमाशंशी भालेराव यांनी इतकं सुंदर भजन म्हंटल आहे , कि त्या भजना मध्ये जे काही सांगायचं ते आधीच सांगून टाकलेलं आहे . तुम्हा सगळ्यांच्या तर्फे आणि इथे जमलेल्या सहजयोगांच्या तर्फे ,पिंपरीच्या सर्व सहजयोग केंद्रांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानते . आणि परत परत असं सुश्राव्य भजन भाषणा ऐवजी ऐकायला मिळेल अशी मला आशा आहे . कारण मी भाषण देऊन देऊन आता कंटाळून गेले आहे . आणि किती भाषण दिली तरी ती डोक्यात केव्हा येणार आहेत असा विचार येतो . सहजयोगा बद्दल अनेकदा पिंपरीला प्रोग्रॅम झाला आणि आपण सर्व मंडळी तिथे आला होतात . त्याच्यावर आपण विचारविनिमय केला आहे .  सहजयोग म्हणजे तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे . सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला ,असा हा योग तुम्हाला प्राप्त करण्यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी परिस्थिती आता आलेली आहे . सहजच ते घडत सुद्धा म्हणून मराठीत सहजला दोन अर्थ आहेत सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला आणि सहज म्हणजे अगदी सहजगत्या ,विनासायास . आणि जे आपल्या बरोबर जन्मलेलं आहे ते सगळं सहज आहे . आपल्या डोळ्यांनी आपण काही बघतो ते किती सहज बघून आपण जाणतो कि हे काय आहे . कानांनी आपण ऐकतो ते किती सहज जाणतो कि ते किती सुश्राव्य आहे . अशा प्रकारे सहजयोग सुद्धा अत्यंत सहज असून तो तुमच्या बरोबर जन्मलेला एक योग आहे . आता हा सहजयोग प्रत्येकाला उपलब्ध का व्हावा हे पुष्कळांनी विचारलं . कारण पूर्वीच्या काळी  कुंडलिनी जागरण म्हणजे  काहीतरी बागुलबुवा होता . अशी सगळ्यांनी कल्पना केली होती . कुंडलिनी जागरण म्हणजे काही सोपं काम नाही ,कुंडलिनी जागरण व्हायचं म्हणजे काही काही प्रकार होतात . सहावा अध्याय म्हणजे Read More …

Devi Puja, Republic Day Pune (India)

Republic day puja, Devi puja, Pune India, 26/01/1985 आज आपला फार मोठा दिवस आहे परत वसंत पंचमी पण आहे , त्यातून आज राखी पण आहे .हा दिवस दिसेल म्हणून किती लोकांनी तडफडाट केला किती लोकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला होता .किती तरी गोष्टी अशा झालेल्या आहेत पण आपण मात्र अजून त्या स्तिती ला आलो नाही जिथे आपण जाणू कि हा देश मोठ्या मेहनतीने ,त्यागाने  लोकांनी जिंकलेला आहे या देशात सुद्धा जेव्हा आपण बंड पुकारलं तेव्हा गांधीजींनी असा विचार केला कि या देशाची जी खरी संपत्ती आहे ती आत्मिक आहे आणि आत्मबळ हे हिंसेत नसून अहिंसेत आहे .म्हणून त्यांनी अहिंसेवर सगळं उभारलं .कोणाची हिंसा न करता आपण हा देश जिंकलेला आहे .जेव्हा असं झालं तेव्हा हे आपल्या लक्षात आलं नाही कि हि जी आपल्याला एव्हडी मोठी संपत्ती मिळालेली आहे ,हा जो आपल्याला ठेवा  मिळाला आहे हा जो आपल्याला शिरा मिळाला आहे हा कोणच्या कोंदणात बसवायचा .तर त्याचे जे कोंदण आहे ते या मातीचेच असले पाहिजे आणि ह्या मातीच जे कोंदण आहे ते आत्मबलाच कोंदण आहे .आपल्या जवळ दुसरं काही नाही .या देशाचं सगळ्यात मुख्य आहे म्हणजे  साऱ्या जागाच जे तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मबलाच तत्व आहे .आणि त्या आत्मबळावरच आपण याची कोंदण बसवली पाहिजे .जो पर्यंत स्वातंत्र्याची कोंदण आत्मबळावर बसवली जाणार नाहीत तो पर्यंत या देशाचं कल्याण होणार नाही .पण त्यासाठी अशी मंडळी तयार केली पाहिजेत जी या आत्मबोधाला प्राप्त झाली .पण अजून मी असं बघते कि आत्मबोधाला प्राप्त झालेली मंडळी सुद्धा ,ज्यांनी आत्मबोध मिळवला आहे ते सुद्धा अजून अत्यंत कोट्या वृत्तीने वागत आहेत .आणि अत्यंत भांडकुदळ वृत्तीने राहत आहेत .त्यांच्या मधले जे प्रकार आहेत त्यांनी कालच Read More …

Welcome Talk Ahmednagar (India)

Welcome Talk 1985 01 25 Ahmednagar, Maharashtra, India. [English Transcript] Mr Pankay, the administrator of Municipal corporation of Ahmednagar, and other officers who are being very kind to host you to this beautiful function. And all the public from Ahmednagar. From all the Sahaja yogis abroad who have come all the way here, also the Sahaja yogis who are Indians, I would like to Thank administrator Mr Pankay for his kind invitation to this gracious occasion. [Clapping..]Tomorrow is a great day, in my life also, that it’s our republic day, we got our independence on the 15th of August, but we celebrate 26th as the republic day and as you know that my father, my mother, all my family sacrificed everything that they had to achieve this freedom. Even I, as you know, I have done my bit in this respect, and I have been a great leader of young students at that time. So, it is such a great thing to see this dream come true that without getting your freedom, your political freedom, you cannot ask for your spiritual freedom. Today, we don’t have Mahatma Gandhi with us, but if he was here, he would have supported Sahaja Yoga out and out. [Clapping..] As Mr Pankay has pointed out that it is our heritage of our culture which has kept us together, in this diversity, the unity is expressed because we have set certain basic fundamental ideas which are common, whatever religion, whatever race we may have. One Read More …

Public Program Rahuri (India)

श्री पंडित राव जाधव ,गौतम पब्लिक स्कूल चे मुख्य संचालक ,उपसंचालक तसेच शिक्षक वृंद , फॅक्टीरीतले माननीय डिरेक्टर्स तसेच इथे जमलेले इतर ह्या शाळेचे सहाय्यक लोक ,सहजयोगी जे बाहेरून आलेले आहेत आणि इथे आहेत ते पण . सगळ्यात मुख्य म्हणजे इथे जमलेला हा सुंदर बालवृन्द . इतकी सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे प्रेमाची कि काय बोलावं ते च समजत नाही . प्रेमाला भाषा नसते हे मी जाणते . पण नुसतं इतकं हृदय भरून येतंय कि त्यांना शब्दात घालून कस सांगायचं ते मला समजत नाही . हि अबोध ,निष्पाप मूल इथं बसलेली आहेत हीच उद्या आपल्या या महान देशाची नागरिक सेना आहे . आपल्या देशांनी हजारो वर्षांपासून तपस्या केलेली आहे . आणि त्या तपस्वितेचं फळ म्हणजे अनेक संतसाधु ह्या भारताच्या सुंदर प्रांगणामध्ये आले त्यांनी आशीर्वाद दिला . लोकांना हिताचा उपदेश केलेला आहे . आता आपला देश प्रगतीपर होत आहे . आपण प्रगतीकडे वाढत आहोत . हि फार मोठी गोष्ट आहे कि देश जो कि ३०० वर्ष गुलामीत खितपत पडला होता तो आज स्वातंत्र्याच्या नवीन विचारांनी आज वाढत आहे .  ह्या वेळी मला शिवाजी महाराजांची आठवण येते , त्यांनी सांगितलं होत कि स्व च तंत्र ओळखलं पाहिजे . स्वतंत्र व्हा . तसच ज्ञानेश्वरांनी म्हंटल आहे जेव्हा त्यांनी पसायदानातून परमेश्वराला प्रार्थना केली तेव्हा सांगितलं कि आता विश्वात्मके तोषावे ,तोषोनि दयावे पसायदान . पसायदान म्हणजे काय ?त्यांनी सांगितलं कि सगळ्यांना आत्मबोध झाला पाहिजे . आत्मबोध होताच हातातून ज्या चैतन्याच्या लहरी वाहतात ते पसायदान . त्यांनी तो शब्द वापरला जो शिवाजी महाराजांनी वापरला होता “विश्व स्वधर्म सूर्य पाहो “, स्वधर्म सूर्य पाहो ,स्व म्हणजे आत्मा त्या धर्माचा जो सूर्य आहे तो ह्या विश्वानी पाहो असं एक सुंदर भाकीत Read More …

Public Program – Sugarcane Factory Rahuri (India)

कोळपेवाडी साखर कारखान्याचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तशी इतर कारभारी मंडळी ,इथे काम करणारी सर्व मंडळी तसेच कोळपे वाडीत राहणारी सर्व अबालवृद्ध मंडळी ,सर्वाना आमचा नमस्कार . आजच्या या शुभ दिवशी श्री गणेशाचा जन्म झालेला आहे . आकाशामध्ये बघितलं तर सूर्य नसताना सुध्दा चंद्राची झाक अत्यंत सुंदर आहे . आणि त्या चंद्राबरोबर आज एक विशेष योग मी बघितला तो फार कमी असतो . तो म्हणजे शुक्र आणि मंगळ . चंद्रमा आपल्या योगशास्त्रात मानलेला आहे आणि म्हणूनच तो शंकराच्या डोक्यावर बसलेला आहे . छान असा तो चंद्र आणि शुक्र हि देवता आहे जी प्रेमाची शक्ती आहे . देवाच्या प्रेमाची शक्ती हि शुक्र आहे आणि मंगळ हे श्री गणेश ,अशी आज हि त्रिविध युती झालेली आहे . हे काहीतरी कोळपेवाडी हि विशेष जागा असल्या शिवाय होणार नाही .  तेव्हा ह्या भारतात तुम्ही जन्माला आलात हेच फार मोठं सुकृताचं लक्षण आहे . असं सर्व शास्त्रात लिहिलं आहे आणि पाश्चिमात्य देशात सुध्दा लोक मानतात कि भारतवासी म्हणजे काहीतरी विशेष लोक आहेत . आज आपल्याला सांगितलं कि माझे यजमान लंडनला फार मोठ्या पदावर नोकरीला आहेत . आणि जरी तुम्ही मला संत म्हणता पण मी एक गृहस्थातील बाई  आहे . आणि मी गृहस्थाश्रमातच सहजयोग थाटलेला आहे . त्यांच्या हुद्याला धरून मला पुष्कळ ठिकाणी जावं लागत . तेव्हा तिथले जे पंतप्रधान आहेत त्यांना भेटण्याचा खूप वेळा योग आला . तेव्हा त्या मला एकदा म्हण्याला कि तुमच्या देशामध्ये लोकांमध्ये असं काय आहे किज्याच्या मुळे  इतकं स्थैर्य त्यांच्या मध्ये आहे . स्थैर्य कुठून आलं आहे . आत्म्याचं बळ असल्याशिवाय इतकं स्थैर्य लोकांमध्ये येऊ शकत नाही . आमच्या लोकांमध्ये हे स्थैर्य नाही . आणि हि गोष्ट खरी आहे . Read More …

Public Program Deolali Pravara (India)

स्वधर्म सूर्य विश्व पाहो , स्व म्हणजे आत्मा . त्याच्या धर्माचा सूर्य सर्व विश्वानी पहिला पाहिजे . असं त्यांनी सांगितलं होत . शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे कि स्वधर्म जागवावा . शिवाजी महाराज सुध्दा एक साक्षात्कारी पुरुष होते . त्याशिवाय एव्हडं संतुलन एखाद्या माणसात येऊ शकत नाही . एव्हडा धर्म अंगात बाणवू शकत नाही . आणि इतकं संतुलन त्याच्या मध्ये होत ते येऊ शकत नाही . आणि त्यांच्यावर देवीची विशेष कृपा होती . त्यांनी सुद्धा स्वधर्म जोडावा ,नेहमी ते स्वधर्म जोडावा असं म्हणायचे . आता स्वातंत्र्य हा शब्द पण आपण पहिला तर स्व च तंत्र जाणणे हाच अर्थ होतो . स्व म्हणजे आत्मा त्याच तंत्र जाणल्या शिवाय आपल्या भारतात तरी काहीही साध्य होणार नाही . म्हणून भक्तीचे मार्ग काढले ,भक्ती करा ,परमेश्वरात रत राहा . वाईट मार्गाला जाऊ नका ,वाईट काम करू नका . त्याच्यात पण एकांगी पणा करायचा . भक्ती म्हणजे भक्ती . म्हणजे एखाद्या घाण्याला बैल बांधावा आणि त्याला झापड घालावी तशी आपण गोलगोल त्यालाच फिरत आहोत .  तेव्हा संतांनी स्पष्ट लिहिलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेच्या प्रवृत्या आहेत . एक असते ती तामसिक दुसरी असते ती राजसिक आणि तिसरी जी उत्तम असते ती सात्विक . तामसिक लोक जे आहेत ते एखाद्या कोणत्या तरी चुकीला धरून बसतात किंवा कोणत्या तरी एका कडेला जातात आणि ते धरून तेच तेच करत बसतात . म्हणजे ती तामसिक वृत्ती . आता आपल्या कडे कोणत्याही गोष्टीला धरलं म्हणजे उपास करायचा म्हणजे सगळे दिवस उपास करायचा . हे कुणी सांगितलं आहे . देवांनी तर सांगितलं नाही ,कुठेही तुम्ही शास्त्रात  आधार दाखवा मला ,तुम्ही उपास करा देवाच्या नावाने असं लिहिलेलं नाही . Read More …

Devi Puja: On Leadership (Morning) Rahuri (India)

Talk about leadership, Rahuri, Maharashtra, India, 22nd January 1985. (English/Marathi) English Transcript …and this is the place where my forefathers reigned as kings, and they had a dynasty also. Now, the other place we went to, Musolwadi, is the place where the Goddess first of all hit him with a beam, so it is called as Musolwadi. It means a beam, ‘musol’ means a ‘beam’. So this is a place where [the] Goddess has done a lot of work. There is another place called Aradgao where he was running and he was screaming, so it’s called as arad. ‘Arad’ means ‘screaming’ (‘gao’ means village). So the whole place is already very much vibrated because also the Nathas, the nine Nathas — we saw one Ganifnath there — but all of them lived in this area and worked very hard. The last of all, Sainath, was very near here, as you know, in Shirdi. So this is a very, very holy place and a place of great worship where many a times the Goddess was worshipped. Rahuri itself, if you go round, you find there are nine deities sitting there. These are also created by Mother Earth. They are beautiful things. No one knows about them. You can go and have a look. There are nine of them and these represent the nine incarnations of the Goddess, or nine styles of the Goddess. Now, in this beautiful place we are here, though it is spoiled by many things, but, as you Read More …

Public Program (morning) Musalwadi (India)

मुसलवाडीच्या सर्व गावकऱ्यांना आमचा नमस्कार .  आपल्या देशामध्ये आपण अजून पुष्कळ अंधारात आहोत . ते अजून आपण समजून घेतलं पाहिजे . आपल्या देसाची अशी दुर्दशा का म्हणून लोक विचारतात . हि मोठी भारी योग भूमी ,महाराष्ट्र म्हणजे फार मोठी पुण्य भूमी आणि संतांची भूमी . हे सगळं असताना आपल्या देशाची अशी दशा का होती आहे . आता आम्ही गेलो होतो एका खेडेगावात त्याच नाव कोमलवाडी आणि तिथे कानिफनाथांची समाधी आहे . असं लोकांनी शोधून काढलं . ते सहजयोगीच शोधून काढू शकतात . कारण चैतन्याने कळत . आता आम्ही जस मुसलवाडीला म्हसोबाचं स्थान आहे हे शोधून काढलं ते सुध्दा चैतन्याच्या दमावर . आणि तिथे बघितल्यावर एकदम दुष्काळ ,भयंकर परिस्तिथी .लोक अगदी वाईट मार्गाला लागलेले काही विचारू नका ,असं वाटलं कि नरकात आपण आलो कि काय . आणि जिकडे पहाव तिकडे म्हणून काही हिरवं असं दिसतच नव्हतं . त्यांनी सांगितलं पाच वर्षातून एकदा पाऊस पडतो आणि पडला तरी थोडा पडतो . आता हिवाळ्यात हि स्तिती तर उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी पण मिळणार नाही . मग एकानी प्रश्न विचारला कि माताजी हे एव्हडे कानिफनाथ इथे असताना ,एव्हडं त्यानी इथे काम केलं मग अशी स्तिती का ?प्रश्न येतो कि नाही कि देवाचं एव्हडं साम्राज्य आहे तर मग लोकांना एव्हडा त्रास का होतो आहे . म्हणजे कारण असं आहे कि कानिफनाथांना फार छळल इथल्या लोकांनी . ते जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांना छळल ,तो मुसलमान ,अमका ,ढमका म्हणून त्यांचे नुसते हाल करून टाकले . त्या शिवाय असं म्हणतात कि त्यांना मारून टाकलं . म्हणून त्या अशा दुसऱ्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला . कुणीतरी तिथे समाधी बांधली पण ती समाधी बघून तर मला रडू कोसळलं . त्याच्यावर थोडे बहोत Read More …

Public Program Sangamner (India)

संगमनेरचे सहजयोगी तसेच संगमनेरचे रहिवासी आणि आसपास च्या गावातून आलेल्या अशा सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार . मी आधीच म्हंटल आहे कि सत्यशोधक असायला पाहिजे . ज्यांना सत्य शोधायचं असत ते सत्य शोधल्या शिवाय चैन घेत नसतात . अनेक जन्म जन्मांतरातलं जे आपण पुण्य गाठलेल आहे ,सत्य शोधताना आपण ज्याज्या गोष्टी मान्य करत गेलात आज त्याच्याच पुण्य प्रतापाने आपला जन्म या आधुनिक काळा मध्ये या महान थोर योगभूमीत भारत भूमीत झालेला आहे . हि भारत माता योगभूमी आहे . योगभूमी म्हणजे इथे जन्मलेल्या मनुष्याला योग प्राप्त होऊ शकतो फार सहज . त्याला कारण या देशा  मध्ये अनेक संतसाधु झाले . कित्येक अवतरण झाली . विशेष करून महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे स्वतः रामचंद्र सुध्दा अनवाणी आणि साक्षात सीता देवी हि सुध्दा इथे अनवाणी चाललेली आहे . अशा या पुण्य भूमीत आपला जन्म झालेला आहे . आता येताना मी कोमलवाडी म्हणून गाव आहे तिथे बघायला गेले होते . फार भयंकर दुष्काळ ग्रस्त असे ते गाव आहे . जवळ पासची बरीच खेडी तशाच स्तिथीत आहेत . ओसाड पडलेली . तिथे मला कळलं कि कानिफनाथांची समाधी आहे . त्या समाधीची स्तिती बघून मला इतकं आश्चर्य वाटलं कि एव्हडा महान आत्मा या ठिकाणी स्तीत आहे आणि त्याच्या कडे कोणाचंच लक्ष नाही . कुणीतरी प्रश्न विचारला कि माताजी एव्हडे मोठे महात्मा इथे झाले मग ह्या लोकांची स्तिती अशी खराब का . तर मी असं सांगितलं कि ह्या साधुसंताना आम्ही लोकांनी फार छळलेल आहे ,त्यांना मुसलमान म्हंटल ,त्यांना मारलं . इतकं लोक म्हणतात कि त्यांना मारून नाही टाकलं . त्यांना खायला प्यायला सुध्दा पाणी दिल नाही . पण तसाच एखादा भामटा आला जेल मधून सुटून ,आणि त्यांनी जर ढोंग केलं आणि तो जर भगवे वस्त्र घालून आला कि लागले Read More …

Public Program Komalwadi (India)

कोमलवाडीचे सहजयोगी तसेच इथले व्यवस्थापक ,इथले सगळे रहिवासी ,तसेच आसपास च्या गावातून आलेले सर्व भक्तजन ह्या सर्वाना आमचा नमस्कार . भारताच्या खेडेगावातच भारताचा आत्मा राहतो . शहरात रहात नाही . खेडेगावातूनच भारत उठवला पाहिजे . जी जागृती करायची ती खेडेगावातच करायला पाहिजे . शहरातून प्रगती करून काही फायदा होणार नाही आहे . हि गोष्ट अनेकदा अनेक पुढाऱ्यांनी सांगितली . तरी सुध्दा पुष्कळांना ती गोष्ट समजलेली दिसत नाही . त्यामुळे अजून सुध्दा आपल्या खेडेगावची स्तिती पहिली कि माझं हृदय अगदी भारावून जात . आणि काय बोलावं आणि काय बोलू नये हेच समजत नाही . कानिफनाथांची इथे समाधी आहे हे समजल्यावर माझ्या लक्षात आलं कि हि जागा आमच्या मोक्याची आहे . कारण आमचा त्यांचा फार संबंध आहे . ते आमचेच आहे म्हंटल तरी चालेल . आमची त्यांची जात एक आमचं त्यांचं सगळं काही वागणं ,विचार सगळं एक आहे . तेव्हा त्यांच्या गावी येन भाग्याच आहे . त्यातून तुमचं हे विशेष सुकृत दिसत ह्या गावी तुम्ही जन्माला आलात . हि पुण्य भूमी जिथे त्यांच्या सारख्यांच्या वास राहिला . ते इथे पायी हिंडले ,फिरले ,गरीबांची सेवा केली . परमेश्वराच्या आशिर्वादाला सगळ्यांना साक्ष म्हणून ते इथे आले होते . अशा महान व्यक्ती इथे तिथे हिंदुस्तानात राहिलेल्या आहेत ,पण त्यांची आपल्याला ओळख नव्हती ते जेव्हा जिवंत राहिले तेव्हा त्यांना सगळ्यांनी त्रास दिलेला असणार . त्यांना कुणी मानलं नसणार . कुणी मुसलमानातून आले तर कुणी हिंदूंतून आले तर त्यांना म्हणायचं तुम्ही मुसलमान ,हिंदूंतून आले तर त्यांना म्हणायचं तुम्ही हिंदू . अशी नसती भांडण करून, लहान लहान गोष्टीन कडे लक्ष देऊन ,ते काय खातात ,ते काय बोलतात असतंस बघून ,त्यांचं जे भव्य स्वरूप होत ते बघायचं नाही आणि कोणत्यातरी लहान गोष्टीत अडकून Read More …

Public Program Kamhala (India)

 कामहाला गावचे सरपंच साहेब तसेच उपसरपंच ,नंतर इथली जी सेवक मंडळी आहेत ,इथले रहिवाशी आहेत सगळ्यांना आमचा प्रणिपात . हि हनुमानाची जन्मभूमी आणि अंजनी देवीचं  हे स्थान  आहे . त्यामुळे त्या वेळच वर्णन करावं तितकं थोडं आहे . आम्ही सहजयोगा मध्ये अंजनी देवींना महासरस्वतीच स्थान मानतो . फार उच्च स्थानावर आहेत त्या . जी परमेश्वराची शक्ती जी आदिशक्ती जिचे तीन अंग आहेत पैकी जीनी सर्व सृष्टी रचली ती महासरस्वतीची शक्ती आहे . आणि तीच अंजनी देवी आहे असं आम्ही मानतो आणि ते खर आहे . आता त्यांचा इतिहास सांगायची आज वेळ नसली तरी त्यांच्याच कृपेने आणि हनुमानाच्या आशीर्वादाने च आज मला इथे येता आल . त्याबद्दल आता परत दिलगिरी दाखवली पाहिजे कि मी त्या दिवशी म्हंटल होत त्या दिवशी येऊ शकले नाही ,पण आज हि संधी मिळाली आणि तुम्हा सर्वाना भेटून मला आज फारच आनंद झाला आहे . बघितलं म्हणजे अगदी जीव भरून येतो . आणि काय बोलावं आणि कस सांगावं ते समजत नाही . कि आपल्या देशाची काय हालाखीची स्तिती आहे ती लोकांना काही माहीतच नाही असं वाटलं . ते बघतच नाहीत कशे लोक राहतात त्यांची राहणी खाणी कशी आहे ,घरदार कशी आहेत ,कशा परिस्तितीत राहतात ,कस तरी आयुष्य काढून राहिले . ओसाड जमिनी पडलेल्या आहेत ,त्यांनी तरी काय करायचं कस जगायचं ?. पण तिकडे कुणाचं लक्ष दिसत नाही मला वाटत . म्हणून एकच मी असा प्रयोग करायचा ठरवला आहे . तो जर जमला तुमच्या ह्या गावच्या जमिनीत ,जर ती मिळाली वेळेवर, तर पंचानी वैगेरे ठराव ठरवून त्यांची कबुली दिली असली तरी अजून ते व्हायला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही पण जर का Read More …

Public Program, Rudhigat hone hi tamasik pravrutti ahe Nashik (India)

Rudhigat Hone Hi Tamasik Pravrutti Aahe Date 18th January 1985: Place Nasik Public Program Type सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार असो! नाशिकला आजपर्यंत अनेकदा येणे झालेले आहे आणि पूर्वजन्मी नाशकात काही वेळ घालवलेला आहे. पण त्या जन्मात आणि ह्या जन्मात इतके अंतर आलेले आहे, की हे क्षेत्रस्थळच आहे की काय आहे? अशी मला शंका वाटू लागते. इतर ठिकाणी खेडेगावात जिथे श्रीरामचंद्रांनी पायसुद्धा ठेवले नव्हते, लोकांमध्ये धर्माची जाणीव, धर्माची चुणूक आणि कुशाग्रता जास्त आहे आणि नाशिकमध्ये एवढी का कमी आहे, याचा मी अनेकदा विचार केलेला आहे. त्याला कारण असे आहे मला वाटते, क्षेत्रस्थळी अनेक रूढी बांधल्या जातातच. कारण पोटभरू लोक, ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ते काहीना काही तरी अशा रीतीचे प्रबंध आणि दंडक बांधत असतात, की त्याने माणसं त्यात गोवली जातात. जसं एखाद्या बैलाला घाण्याला जुंपतांना आपण झापड घालतो, तशीच अशा ठिकाणी झापड लोकांना बांधली जाते आणि त्या झापडीत ते असेच गोल गोल फिरत असतात. त्यात आपली काही प्रगती झाली की नाही ते बघत नाहीत. त्यामुळे जिथे श्रीरामांचा वास झाला, जिथे शूर्पणखेला एवढे अपमानित केलं गेलं त्याच ठिकाणी अशा गोष्टी का घडाव्यात? ह्याचं मला वारंवार आश्चर्य वाटत होतं . पण एकंदर आराखडा घेतांना असं समजलं, की रूढीगत होणे, ही खरोखर तामसिक प्रवृत्तीच्या लोकांना असते. आपल्यामध्ये बहुतके करून राजसिक आणि तामसिक प्रवृत्तीचे लोक असतात. त्यापैकी राजसिक लोक जे असतात ते वाईट काय, चांगलं काय ते बघत नाहीत. वाईट काय आणि उत्तम काय ते त्यांना समजत नाही. पाश्चिमात्त्य देशामधील लोक राजसिक आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही धर्म करा तर तोही बरा, अधर्म करा तर तोही बरा. हेही चालेल आणि तेही चालेल. त्यांना कोणतं चांगलं Read More …

Sarvajanik Karyakram Mumbai (India)

Sarvajanik Karyakram 29th November 1984 Date : Place Mumbai, Public Program ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सत्याच्या शोधात असणाच्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार! आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे की, प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे ? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द ‘प्रपंच’ हा काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. ‘प्र’ आणि ‘पंच’. ‘पंच’ काय तर आपल्यामध्ये जी पंचमहाभूते आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती ‘प्र’ लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. ‘प्र’ म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. ‘अवघाची संसार सुखाचा करेन’ असे जे म्हटले आहे ते सुख प्रपंचातच मिळायला पाहिजे. प्रपंच सांगून परमेश्वर मिळविता येत नाही. पुष्कळांची अशी कल्पना आहे की, योग म्हटला म्हणजे कुठे तरी हिमालयात बसायचे आणि गारठून मरायचे. हा योग नव्हे. हा हट्ट आहे. हट्टच नव्हे तर थोडासा मूर्खपणाच आहे. ही जी कल्पना लोकांनी धर्माबद्दल केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. विशेषकरून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत – होऊन गेले. त्या सगळ्यांनी प्रपंच केला फक्त रामदासस्वामींनी प्रपंच नाही केला. पण प्रत्येक दासबोधातून प्रपंच वाहतो आहे. ‘प्रपंच काढून कोणी परमेश्वर मिळवू शकत नाही’ हे त्यांचे वाक्य अनेकदा आले आहे . प्रपंचातून उठून आपण परमेश्वर मिळवायचा ही कल्पना बरेच वर्षापासून आपल्या देशात आलेली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. कारण बुद्धाला उपरती झाली, तो संसार सोडून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्याला आत्मसाक्षात्कार झाला. पण तो जेव्हा संसारात होता तेव्हाही त्याला उपरती झाली नसती अशी गोष्ट नाही. समजा आम्हाला दादरला जायचे आहे. तेव्हा आम्ही सरळ, धोपट मार्गाने तेथे पोहचू शकतो, पण जर आम्हाला इथून भिवंडीला जायचे आहे, मग तिकडून आणखी पुण्याला जायचे, आणखीन फिरून चार ठिकाणी मग Read More …

Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful Mumbai (India)

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहून सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर -द्वार, आई – वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱ्हेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही . पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, Read More …

Public Program in Shri Ram Temple (India)

Public Program in the Shri Ram Temple (Marathi), Phaltan near Satara, Maharashtra (India). 7 March 1984. फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार! आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याही पेक्षा जास्त उत्कंठतेने तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून जातो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की ‘बाबा, आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे ती दे.’ ही आपल्या देशाची खरोखरच हलाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही की तुम्हाला कळवायला की कसं पोहोचायचं? कसं झालंय. म्हणजे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही यावेळेला पोहोचू, त्यावेळेला पोहोचू, पाहोचले तर नशीब! आदळत, आपटत. एका शरीरात जर पोहोचले (काहीही इजा न होता) तर स्वत:ला मानायचं की बाबा पोहोचलो! पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे. आणि लोकांमध्ये एकतऱ्हेचे समाधान, शहाणपण आहे. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून आहोत. जर अशी स्थिती परदेशात कुठेही असती, तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असतं. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी आहेत आणि जसं असू दे बाबा, परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नांना ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते की नाही अशी सुद्धा मला शंका आली होती. आजचा विषय ‘सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती’ असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा Read More …

Public Program (India)

महालक्ष्मी आणि त्याचे महत्त्व कोल्हापूर, ४/३/१९८४ कोल्हापूरच्या सर्व भाविक आणि श्रद्धवावान साधकांना आमचा नमस्कार! कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली, एक नाटकच होतं म्हटलं तरी चालेल. कारण आमचे सहजयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा. माझा फोटो घेऊन जा. तुमच्या हातून हजारो लोक पार होतील. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेषकरून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहतेक क्षेत्रस्थळी लोक पोटभरू, जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच. त्यांना असं वाटतं की देऊळ थे असून आम्हाला काय फायदा झाला आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटं भरून राहिलेत. यांच्यातही आयुष्यात काही विशेष आहे का? त्यांचंतरी आयुष्य काही उज्वल आहे का? त्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का ? हे एवढं देवीची पूजा करतात, पाच-पाच त्यांच्या आरत्या करतात, तरी यांच्यामध्ये काही बदल होत नाही, पण असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का? त्यामुळे कोणताही बुद्धीजीवी वर्ग याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ ! आपले देवळात गेले, दोन पैसे घातले झालं काम! तेव्हा त्याची ती जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत कारण क्षेत्रस्थळी जन्माला आलेले आहेत हे मोठं भाग्याचं आहे ह्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्ट व्हायला सुरुवात होते ‘अति Read More …

Public Program – Rahuri School Rahuri (India)

फत्तेबादच्या या एज्युकेशन सोसायटी चे फार उपकार आमच्यावर आहेत असं वाटत मला .कारण पूर्वी हि मी फत्तेबदला आले होते आणि या ठिकाणी परत एकदा प्रोग्रॅम झाला तर बरा  अशी  माझी फार इच्छा होती .आणि त्या इच्छे प्रमाणे आज हे घडून आलं .त्या बद्दल या शाळेचे जे मुख्य अध्यापक आहेत त्यानं चे मी फार आभार मानते .तसेच इथले शिक्षक वर्ग ,विद्यार्थिनी आणि विध्यर्थी आणि फत्तेबाद शहरातील भाविक ,सात्विक अशी मंडळी या सर्वाना आमचा नमस्कार .आपल्या समोर सहजयोग म्हणजे काय आता व्यवस्तीत रूपाने चव्हाण साहेबानी मांडलेलं आहे . रस्त्याने चालताना कुणाशी बोलत नाही जस काही कुणी घरात मेल आहे ,सुतक पाळतात असेच ते वागत होते .तर त्यांना विचारलं तुम्हाला असं का वाटतंय ,तुम्ही दुःखी  का .तर ते म्हणतात आम्ही एव्हडी धावपल केली सगळं काही मिळवलं पण आमची चूक झाली नसेल ना काही  .तुकाराम बुवांनी कोणती चूक केली नाह ज्ञेनेश्वरांनी   कोणती चूक केली नाही आणि ते आनंदात होते म्हणजे त्यांच्या त काहीतरी आपल्या पेक्षा विशेष होत .हे लक्षात आणलं पाहिजे .आता आपली मी प्रतिज्ञा ऐकली फार आनंद झाला आणि मला अगदी आनंदाश्रू आले .संत साधू ज्या भूमीवर जन्माला आले आणि रामाला सुद्धा आपल्या पायातल्या वहाणा काढून अनवाणी चालावं लागलं अशी पुण्यभूमी बघण्या साठी म्हणून हे लोक आले पण आपल्याला मात्र त्याची कदर नाही .आपल्याला त्याची माहिती नाही .त्याला कारण असे आहे कि हि जी मंडळी येत आहेत त्यांना काहीतरी मिळालेलं आहे ;आणि जे मिळालाय त्यामुळे त्यांना समजत कि हि भूमी काय विशेष आहे .तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार भेटेल .नामदेवांनी सांगितलं आहे फार सुंदर  कि आकाशात पतंग उडते आणि मुलगा हातात पतंग उडवत आहे पण जरी Read More …

Public Program Rahuri (India)

Sarvajanik Karyakram Date : 22nd February 1984 Place Rahuri ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK राहरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार ! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं , की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे , ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहुतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळे माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझे वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळे काही. मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे ? ठीक आहे की नाही? अशा सर्व मोठ्यामोठया लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे Read More …

Public Program (India)

Music, dance, Public Address at Vaitarna Temple (Marathi/English). Vaitarna (India) , 18 February 1984. आज मला फार आनंद झाला तुम्ही सगळे आलात परत आणि आज तुमच्यात चेतना आलेली दिसते .फार फरक झालेला आहे .मागच्या वेळे पासून ह्या वेळेला सगळ्या मुलांच्या हातात थंड थंड व्हायब्रेएशन दिसतात .त्यांच्यात  फार जागृती झालेली दिसते आहे .चेहरे बदलेले दिसले .आणि बायकां न च्या चेहऱ्यात सुद्धा तेजस्विता दिसली .पुरुष पुष्कळ सुधारलेले दिसले .सगळ्या न मध्ये एकूण आशा जशी चमकावी तस डोळ्यामध्ये आशेच तेज चमकू राहील आहे .हे पाहून फार आनंद झाला .आपल्या देशाचे दुर्दिन होते ते बदलण्याचे दिवस आलेले आहेत .सगळं काही भलं झालेलं आहे .सगळं दारिद्र्य ,दुःख सगळं काही बदलणार आहे .हे बदलच पाहिजे .त्याच्या साठी आपल्याला योग मिळवला पाहिजे .तो तुम्ही मिळवला ,आणि हळू हळू तुमच्या लक्षात येईल कि तुमच्यात केव्हडा बदल झाला .तुमच्या वातावरणात केव्हडा बदल आला .तुमच्या परिस्थितीत किती बदल झाला .आणि संबंध जी काही आपली जी मनस्थिती होती जी अत्यंत दुःखात राहत असे त्याच्यात किती समाधान आलं .ते समाधान तुमच्या हृदयात बसलेल्या आत्माराम च आहे .ते समाधान तुम्ही अनुभवावं त्याचा आनंद घ्यावा ,आणि त्या आनंदात तुम्ही डुंबत राहावं हीच माझी इच्छा आहे .आज सगळ्यांना फार आनंद झाला सगळे फार खुश झाले आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं कि तुम्ही लोक सुद्धा इतक्या एकजुटीने तिथे आलात ,सगळे जण नाचला त ,सगळ्यांनी आनंदानी जयजयकार केला .आता हे लोक पूर्वी आपल्या देशावर राज्य करत होते .तेव्हा त्यांना आपली काही कदर नव्हती .तेच आज तुमच्या चरणावर आलेत इथे ,तुम्हाला भेटायला आलेत .तुमच्यावर प्रेम करायला आलेत ,तुम्हाला सुख द्यायला आलेत ,तुम्हाला ओळखायला आलेत .आणि त्यांना वाटत कि तुम्ही किती मोठ्या अशा भारतभूमी तल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीत  या Read More …

Shri Chandrama Puja Vaitarna (India)

Shri Chandrama Puja, Vaitarna (India), 18 February 1984. आता तुम्हां लोकांना सांगायचे म्हणजे असे की आज तुम्ही पुजेला आलात ना तर पुजेचा उपयोग असा झाला पाहिजे कि तुमच्यामध्ये ज्या काही देवी देवता आहेत त्या जागृत झाल्या पाहिजेत. आणि त्या देवी देवता जागृत होण्यासाठी आजची पूजा आहे. तेव्हा वेगळया वेगळया देवी देवतांना कसे लोक जागृत करतात? ते शिकून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जरा मोठे झाले की तुम्हाला मंत्र शिकवून देऊ. मग तुम्ही दुसऱ्यांनाही जागृती देऊ शकता. मग तुम्हाला हे कळेल की त्यांच्यामध्ये कुठे काय धरलेले आहे? त्यांना कोणचे त्रास आहेत? ते कसे स्वच्छ करायचे? हे तुमच्या लक्षात येईल. मग आलं म्हणजे तुम्हीसुद्धा योगीजनच झालात ना ! तुम्हीसुद्धा नुसते असे हात फिरवून त्यांची कुंडलिनी जागृत करू शकता! आणि त्यांच्या डोक्यावरती थंड येईल. तुम्ही बघाल, आताही तुम्ही कुणावरती करून बघा. तुम्हाला दिसेल कि तुमच्या हातातून अशी कुंडलिनी तुमच्या हातातून वाहते आहे. तुम्ही जरासं असं वरती केलंत कि तुम्हाला वाटेल डोक्यावरती थंड थंड आलं. तीनदा उचलली कि तुम्हाला वाटेल थंडच येईल. पण हयाच्यासाठी म्हणून नेहमी पूजन करावं लागतं. आता तुम्हाला फोटो वगैरे नसले तर तुम्ही फोटो घ्या. त्याला थोडेसे कुंकू लावायचे सकाळी, त्याला नमस्कार करून आणि शाळेला जायचे. घरी झोपायच्या आधी फोटोवरती एक दिवा ठेवायचा लहानसा. दोन्ही हात फोटोवर ठेवायचे, पाय पाण्यात ठेवायचे थोडेसे, आणखी नंतर मीठ घालायचे त्या पाण्यात, थोड़ा वेळ असं बसायचं फोटोकडे हात करून आणि मग पाय पुसून सुकवायचे. बस एवढंच ध्यान आहे. दुसरं काहीही करायचे नाही. पाच मिनीटं संध्याकाळी आणि पाच मिनिटं सकाळी.. सकाळच्या वेळी एक हात आधी फोटोकडे असा करायचा. डाव हात जेव्हा फोटोकडे असेल तर उजवा हात खाली. आणि Read More …

Devi Puja, What is expected of Sahaja Yogis and where are we, Advice to Brides Bordi (India)

Devi Puja, Bordi, India 13-02-1984 अब मैं हिंदी में थोडासा आपको बताना चाहती हूँ कि सहजयोग में हम लोग अब ये नही जानते कि हमारे बारे में हजारो वर्षसे ये बताया गया था कि ऐसे महान लोग संसार में आयेंगे और पहाड के पहाड ऐसे बडे बडे वृक्षों के बड़े बडे अरण्य संसार में घुमेंगे | जो बोलते हुए, चलते हुए दुनिया को उनकी इच्छाओं की पूर्ती केकल्पतरू मिलेंगे । जैसे उनको आशिर्वाद देंगे और उनकेएक एक व्यक्ती में जैसे सागर उमडते हो । जिसमें किअमृत बोलता हो ऐसे सागर ऐसे सूरज होएंगे। चमकते हुए सूरज किजिसके अंदर कोई भी दाह नही, अग्नी नही ऐसे चंद्रमा जिसके उप्पर कोई कलंकनही यह आपकेवर्णन हजारो वर्ष पहले उन्होने किए और तीनसो वर्ष पहले ज्ञानेश्वरजी ने किए कि कितना आपका महत्त्व उन्होंने बताया कितना महत्त्व आपको दिया? किकितना जरूरी हैं सारे दुनिया केलिये एक आशा थी । इस तरह से हो रहा और हो गया | लेकिन अभी इसकी प्रगति मेरे विचार से बहोत बहोत धीमी हैं । इसकी प्रगति बहोत धीमी हैं। प्रगति आपकेवजह से धीमी हो जाती हैं । ऐसी जगह तब मन लगता हैं जहाँ हम अपने को गिरा लेते हैं । अपना चित्त इस पेड का जैसा पृथ्वी से पूरी तरह से निगडीत हैं ऐसा आपको अपने माँ केसाथ निगडीत रखना चाहीये । और उसकी जो ऊंचाई हैं उसके ओर दृष्टी रखनी चाहिए । यह ऊंचाई जो भी इन्होंने हासिल की हैं वो इस वातावरण से लढकर, झगडकर बाहर आकर अपना सर ऊंचा उठाकर और जो लोग अपना सर Read More …

Shivaji the Anchavatara Satara (India)

Puja in Satara: Shivaji the Anchavatara. Satara (India), 7th February 1984 Marathi Transcript शिवाजी महाराजान  बद्दल सांगत होते कारण साताऱ्याला राजधानी स्थापन केली होती .त्यांच्यात जे गुण होते ते आपण घेतले पाहिजेत .त्यांच्यातला विशेष गुण  असा होता कि त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते जे आपल्या माणसं मध्ये दोष असतात कुणाला कशाची सवय कुणाला कशाची लत  ,कुणाला काहीतरी वेड्या सारखं कशाच्या मागे लागले तर लागले .त्या च्या वरून हे सिद्ध होत कि ते अंशावतार होते .अंशावतार असल्या मुळे त्यांना कोणतीच वाईट सवय ,वाईट खोड ,खोट बोलणं ,दारू पिणं ,या गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्याचं नाहीत .ते तसे नव्हतेच .दुसरं अत्यंत स्वभावाने गोड होते .स्वभाव फार गोड होता .अत्यंत गोड स्वभावाचे आणि आईला पूर्णपणे समर्पित होते .कधीही त्यांनी कुणाला वाकडा शब्द बोलला नाही किंवा कुणावरही ओरडले नाहीत का कुणावर बिघडले नाहीत .हे दोन गुण फार कठीण असतात .जेव्हा मनुष्याला इतकं आईच वरदान असत आणि त्या वरदाना मध्ये एक महत्व हि येत कारण ते महाराज होते .पण तरी सुद्धा स्वभावा मध्ये अत्यंत गोडवा होता .आणि स्वतः बद्दल शिष्ट पणा नव्हता कि मी राजा आहे आणि हे गोर गरीब आहेत आणि हे मावळे आहेत त्यांच्याशी कस बोलायचं .त्यांच्या बरोबर बसायचं त्यांच्या बरोबर भाकरी खायची ,कांदा भाकरी त्यांच्या बरोबर मजेत खात असत .रात्रन दिवस प्रवास करायचे ,घोड्यावर कुठे हि रात्रीच झोपायचं ,काही करायचं अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं .आणि अत्यंत हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि त्याच्या नंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांचं भांडण झालं त्याला कारण एकाच होत भाऊबंदकी .त्या आपल्या मराठा लोकां न  मध्ये स्वभाव आहे कि अंगात वळण आलेलं आहे त्याच्या Read More …

Devi Puja Rahuri (India)

Devi Puja 26th January 1984 Date: Place Rahuri Type Puja राहरीबद्दल ह्यांना मी सांगितलं नाही, की राहरीचं काय महात्म्य आहे. राहरीमध्ये शालिवाहनांचं राज्य राहिलं. आदि काळामध्ये इथे एक राहर म्हणून राक्षस होता. फार दष्ट आणि तो लोकांना छळत असे. आणि त्याच उच्चाटन करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि तिने त्या राहुला ह्या राहरीमध्ये मारलं. ‘री’ शब्दाचा अर्थ होतो, ‘री’ म्हणजे महालक्ष्मी स्वरूप. महालक्ष्मी स्वरूपाने मारलं. म्हणून, आपण असं देवी महात्म्य असं वाचत नाही. कारण देवीमध्ये फक्त महाकालीचं वर्णन आहे. राहुला मुसळवाडीमध्ये मुसळाने मारलं. तरी तो पळत होता. नंतर ओरडला. म्हणून त्या गावाला आरडगाव म्हणतात. मग तो इथे येऊन धाराशाही झाला. मेला इथे म्हणून राहुरीचं महात्म्य आहे. पण त्याचं किती लांबलचक आहे ते बघितलं पाहिजे, कि आज इतक्या वर्षानंतर, हजारो वर्षानंतर शालीवाहनांचे बभ्रूवाहन राज्य करत असतांना त्यांनी विक्रमादित्याला हरवलं. विक्रमादित्य हा एक उज्जैनचा राजा होता. त्याचं स्वत: च एक पंचांग होतं . कॅलेंडर होतं. त्यांनी आपलं एक कॅलेंडर सुरू केलं. त्याचं नाव शालिवाहन. शक त्यांनी सुरू केलं आणि त्या शालिवाहन शकाप्रमाणे १९८८ का काहीतरी वर्षे झालेली आहेत. (थोडे इंग्लिश, नंतर मराठी सुरू) तर ह्यांना मी असं सांगत होते की शालिवाहनाचं जे कॅलेंडर होतं, ते त्यांनी केल्यानंतर मग त्यांनी जे राज्य स्थापन केलं, आणि सुरू त्याच्यात राहिले ते गुढीपाडवा, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. ह्यांना मी इंग्लिशमध्ये सांगितलं. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे ती शाल, जी शाल ते वाहत असत म्हणून त्याला शालिवाहन देवीची शाल आणि ह्या देवीच्या शॉलमध्ये काय असतं, तुम्हाला माहिती आहे, की त्या शालीने तिला सौंदर्य येतं. आणि त्याशिवाय ती त्याने आपल्या अंगाचं रक्षण करते. म्हणजे थंडीवार्यापासून रक्षण करते. तिच्या Read More …

Shri Saraswati Puja Dhule (India)

Shri Saraswati Puja, Dhulia (India), 14 January 1983. [Marathi Transcript] आता धुळ्याच्या सहजयोग्यांसाठी अस सांगायचं की, आता बरेच लोकं काल पार झालेले दिसले. आणखी थोडं सिरियसली पण सहज योगात येतायत अस वाटलं. तेव्हा धुळ्यांच्या लोकांनी मात्र काळजी घ्यायला पाहिजे. राऊळ बाईंनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याचं घर‌ इथे आहे, तुम्हाला माहिती आहे. तिथे सगळ्यांनी रविवारी सकाळी अगदी व्यवस्थित पणे ध्यान हे केलं पाहिजे. तसंच घरी रोज बैठक पाहीजे. बैठक जर तुम्ही केली नाही तर सहजयोगी जमणार नाही. तुमच्या वर अवलंबून आहे. जितकी तुम्ही बैठक कराल, जितकी तुमच्या मध्ये गहनता येईल, तितका सहजयोग वाढणार आहे. जर तुम्ही स्वतः मेहनत नाही केली, तर सहज योग वाढणार नाही आणि तुम्हालाही सहजयोगाचा काही लाभ होणार नाही. म्हणून रोज अगदी न चुकता सकाळ-संध्याकाळ बैठक ही पाहिजे. सकाळी जरी थोडा वेळ असला, तरी संध्याकाळी व्यवस्थित आरामात बैठक पाहिजे. हळुहळू तुम्हाला आश्चर्य वाटेल तुमच्या जवळ पुष्कळ टाईम वाचू लागले, कारण बाकीचे तुम्हाला काय आवडणारच नाही. इकडे जायचं, तिकडे जायचं, गप्पा मारायच्या, फालतूच्या गोष्टी तुम्हाला काही आवडणार नाही.  नको रे ते असं होईल उगीचच्या गोष्टी करत राहतात. उलट तुम्हाला वाटेल की काय बसून राहिलेत सगळे, बेकारचे लोक यांना काही समजत नाही. उगीचच आपला कशाला इथे वेळ घालवायचा. तेव्हा ते ही सुटून जाईल आणि त्याच्या नंतर मग, तुम्हाला आश्चर्य वाटेल जसे तुम्ही जमू लागला, जसे तुम्ही मूळात जाल. मुळं दोन चारच असतात पण ती जेव्हा खोल जायला लागतात झाडं वाढू लागतं. असा सहज योग वाढताना तुम्हाला दिसेल. म्हणून माझा तुमच्यावरअनंत आशिर्वाद आहे. काल मी धुळ्याच्या लोकांना खूप समजावून सांगितले. पण तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली पाहिजे, खूप पॉजिटिवली राहिलं Read More …

Shri Ganesha Puja and Devi Puja Rahuri (India)

Shri Ganesha And Devi Puja Date 7th January 1983: Place Rahuri Type Puja तुम्हा सगळ्यांना पाहून इतका आनंद झाला मला आणि कधी राहरीला जाते असं झालं होतं. एकदाचे आम्ही पोहोचलो आणि ह्या राहरीच्या ह्या पवित्र परिसरात पूर्वी अनेक कार्य देवीने केलेली आहेत. पण आताचे जे कार्य आहे ते सगळ्यात मंगलमय आणि सुखदायी आहे. राक्षसांना मारायचं म्हणजे हे काही विशेष सुखदायी वगैरे कार्य नव्हतं आणि अशा घाणेरड्या लोकांशी झुंजत राहण्यापेक्षा कधीतरी असे लोक जे कमळाच्या सुंदर कळ्यांप्रमाणे कुठेतरी वाट बघत बसले आहेत, त्यांची फुलं करण्यात जी मजा येणार आहे किंवा त्यांची फळ करण्यात जी मजा येणार आहे, ती कधीतरी लुटावी असं फार वाटत असेल ते मात्र या जन्मात पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्हा लोकांचे आनंद बघून फार आनंद वाटला. कितीही म्हटलं तरी ह्या भारतभूमीच्या पाठीवर ही जी महाराष्ट्राची भूमी आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कुंडलिनी आहे हे मी आपल्याला अनेकदा सांगितलेले आहे . बरं त्याच्यात शास्त्रात आधार असा की ह्याच्यात साडेतीन पीठ आहे असं सांगितलेले आहे. साडेतीन पीठ फक्त कुंडलिनीला असतात. तसेच अष्टविनायक आहेत. हे सुद्धा सर्व महाराष्ट्रात आहेत. ते खरे की खोटे हे तुम्ही पार झाल्याशिवाय जाणू शकत नाहीत. कारण पार झाल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यातून येतय ते. पण मुसळवाडीला तर साक्षात् सहस्रारच मुळी आहे. तेव्हा ही किती महान भूमी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि इथे जे चमत्कार घडणार आहेत ते कुठेही अशाप्रकारचे घडू शकत नाहीत. म्हणजे ह्या परिसरात. कारण ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ही फार चमत्कारपूर्ण जागा आहे. मच्छिंद्रनाथांसारख्या माणसाने, जे फार मोठे दत्तात्रयाचे अवतार होते, त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्याच्याआधी या भूमीला शांडिल्य वगैरे अशा मुनींनी पावन Read More …

Vastushanti Puja (India)

आता शेवटला परत हात जोडून विनंती आहे आपण जावं कारण ह्या लोकांना मी काय बोलते आहे ते  आपण ऐकलं आहे म्हणून त्यांना लाजल्या सारखं होईल कि नाही ,थोडासा लक्षात घ्या त्यांना बोलायला हीच जागा आहे ,आता कुठं बोलायला मिळत नाही ,त्यांना काहीतरी मी सांगते तर पुन्हा पुन्हा आपण तुमच्या समोरच बोलायचं ते त्यांना बरोबर दिसत नाही तेव्हा कृपा करा काय कस मला समजत नाही दोन शब्द या लोकांना मला सांगायचे आहेत ते सुद्धा खाजगी रित्या ,तुमची एव्हडी स्तुती तोंड भरून करते आणि ते बसले कि तुम्ही इकडून तिकडे तिकडून इकडे फिरून राहिलात  याची काय गरज आहे .मला समजताच नाही असं काय करायचं  .या लोकांना तरी दिसलं पाहिजे ना कि आपण मानाची लोक आहोत ना ,असं कशाला करायचं ,तुम्हाला माझ्या बद्दल फार वाटत मला माहित आहे पण त्यांना हे समजणार नाही त्यांना असं वाटेल कि मुद्दाम हुन इथे उभे आहेत आणि आम्हाला आई बोलते आहे तर तेच ऐकू लागलेत .आता शहाणपणा करा आणि थोडासा त्यांना खाजगी बोलायचं आहे त्यांना सोडून द्या . मी सांगितलं ना तुम्हाला सहज योगी नाहीतर कशाला बसले तुम्ही इथे ,आता मी सांगितलंच होत बंधन घाला सोडून टाका .आता आणखीन कुना कुणाला फिट यायला हवी असेल त्यांनी इथे उभं राहायचं .जे लोक पार नाहीत त्यांनी इथे उभं राहू नका सगळ्यांना तुम्हाला फिट येतील .आधीच सांगितलं मी कोण कोण उभे आहेत जा बर .म्हणून सांगत होते मी कृपा करून बसू नका . त्यांना थोडं कुंकू लावा जाईल फिट ,आता कृपा करून इथं उभं राहू नका .किती म्हंटल कि तुम्हाला त्रास होईल बसू नका ,तुमच्या भल्या साठी सांगते आहे .आता हे Read More …

Shri Mahakali Puja (India)

Shri Mahakali Puja, Lonawala, Maharashtra (India), 19 December 1982. [Marathi Transcript] ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता मराठीत सांगते थोडसं. इंग्लिश भाषेचा असा दोष आहे, की त्यांच्याविरूद्ध काही सांगायचं असलं तर ते तुम्हालाही कळेल. पण मराठी भाषेचा हा फायदा आहे, की मराठी भाषेत तुमच्याविरूद्ध काही बोलायचं असेल तर ते त्यांना कळणार नाही. हा तुमचा फायदा आहे! म्हणजे ते गुप्त राहतं सगळं. तुम्ही जे धंदे करता ते सगळे गुप्त असतात. हा तुम्हाला मराठी भाषेचा फार मोठा फायदा आहे आणि त्यामुळे माताजींनासुद्धा कळत नाही, असं जे लोकांना वाटतं, तर मला मराठी भाषा कळते आणि हिंदीही कळते आणि त्याहन भुतांची भाषा फार चांगली कळते. तेव्हा आज जे महाकालीच मी सांगितलं, तिकडे लक्ष दिलं पाहिजे, की महाकालीकडे लक्ष असायला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे दोष आहेत ते काढायच्या मागे असलं पाहिजे. आता प्रथम आपल्याला जे प्रकार होतात, ते मी आधीच सांगितलंच की, ‘माझ्या मुलाला बघा.’ ‘काय झालं तुमच्या मुलाला? ‘काही नाही. फक्त लहानपणापासून बिछान्यातच असतो. हातपाय त्याचे मोडलेले आहेत. डोकं फिरलेल आहे. काही खात नाही. पित नाही. कंबर त्याची वाकत नाही. फक्त एवढं एकदा माताजी, तुम्ही पाय तिथे लावलेत तर बरं होईल.’ फक्त पूर्वकर्म बोलताहेत. ती मी कुठवर एवढं झालं. आता हे कशामुळे झालेलं आहे. सांगायला नको. ही तुमची जिंकणार. किती खाणार आहे? असा जीव आहे, त्याला वाचवून तरी काय करायचं? त्याला क्षमा करते, की त्याला परत जन्म घेऊ देत . समजलं पाहिजे. त्याच्यावरही कृपा करा, स्वत:वरही करा आणि माझ्यावर विशेषतः. पण तुमचे पाय माताजी घरी लागू द्या. तुम्हाला समजतं ना हे सगळं की माताजी अमुक आहेत. तुम्हाला सांगावं लागत नाही. ‘पाच मिनिटं तरी, बरं दोनच मिनिटं. Read More …

Shivaji School, Vishesh goshti sathi vel aali aahe Rahuri (India)

Vishesh Goshti Sathi Vel Aali Aahe 3rd February 1982 Date : Place Rahuri Public Program [Marathi Transcript] ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK परमेश्वराच्या अनेक कृपा आपल्यावर होतात. माणसावरती अनेक त्याच्या कृपा होतात. त्याच्या आशीर्वादाने अनेक उत्तम आणि उत्तम असं जीवन त्याला मिळतं, पण मनुष्य मात्र परमेश्वराला प्रत्येक क्षणी विसरत असतो. परमेश्वराने साक्षात ही सर्व पृथ्वी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे आणि ती पृथ्वी निर्माण करून त्याच्यामध्ये विशेष रूपाने एक स्थान बनवलं आहे, ज्याच्यामुळे ती फार सूर्याच्या जवळ नाही, चंद्रापासून तितकी दर आहे जितकी तिला रहायला पाहिजे. आणि त्या पृथ्वीमध्ये हे जीवजंतू तयार करून आज ते सुंदर दूर कार्य मनुष्य निर्मितीमध्ये फलद्रूप झालेले आहे, म्हणजे आता तुम्ही मानव झालात. आता मानव स्थितीत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं हे बरोबर नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिलेली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात, पण ज्या लोकांना परमेश्वराने एवढा आराम दिलेला नाही, जे अजून दारिद्रियात आहेत, दु:खात आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत ते मात्र परमेश्वराची आठवण करत राहतात. पण ज्या लोकांना परमेश्वराने दिलेले आहे ते मात्र त्याला विसरून जातात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्यांना आशीर्वाद दिला ते मात्र परमेश्वराला साफ विसरून जातात आणि ज्यांना दिला नाही ते मात्र त्याची आठवण काढत राहतात. मग त्याची आठवण केल्यावर, त्यांनाही आशीर्वाद मिळाल्यावर ते ही विसरून जातील. मानवाचं असं विचित्र डोकं आहे की त्याला काहीही दिलेलं झेपतच नाही. म्हणून हे आपण समजलं पाहिजे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण बसून मोजत बसलो की परमेश्वराने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला किती तऱ्हेने आशीर्वादित केलेले आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल! आजच माझ्याकडे पुण्यातले पुष्कळ श्रीमंत लोक आले. त्यांच्या घरी Read More …