Talk to yogis, Dhyana Madhe Nirvicharita Aurangabad (India)

Dhyanamadhe Nirvicharita “VIC 8th December 1988 Date : Place Aurangabad Seminar & Meeting Type मी मराठवाड्याची महती सांगितली आहे. आजसुद्धा पेपरात आलेले आहे की सुवर्णयुग येणार आहे. आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे. सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला जे दिसतं आहे ते मी सांगितलेलं आहे. त्यासाठी सर्व सहजयोग्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे. त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही. इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोमरोमात पोहोचवण्यासाठी सहजयोग्यांची फार जोरात तयारी पाहिजे. त्यात मुख्य म्हणजे सहजयोग्यांनी ध्यान- धारणा करणे. आपली चक्रे स्वच्छ करणे. खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे. निदान दोनदा तरी ध्यान केलेच पाहिजे. ध्यानामध्ये निर्विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते. आणि हे आत्म्याचं जे फळ मिळालं आहे त्याचं खरं स्वरूप आपल्याला मिळू शकतं. पण जर आपण ध्यान-धारणा केली नाही, तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही. त्यासाठी ध्यान-धारणा करायलाच पाहिजे. आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. ते काढण्याचा प्रयत्न करायला नको, फक्त त्यांच्याकडे बघितलं तरी ते निघून जातील. तेव्हा जसं काल भारूडामध्ये सांगितलं की या संसारातून वेगळं निघा आणि मग या संसाराकडे बघितलं. कारण जोपर्यंत तुम्ही या संसाराच्या उलाढालीमध्ये गुरफटलेले असाल तोपर्यंत तुम्हाला याच्यातले प्रश्न सोडवता येणार नाही. तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले, तर तुम्ही बाहेर कसे येणार ? तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे. जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटांगळ्या जाऊन त्याच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल. त्यानंतर तुम्ही इतर लोकांनासुद्धा पोहण्याचं शिकवू शकता. तसंच अध्यात्माचं आहे. Read More …

Being Bandhamukta – A free personality and Evening Program Ganapatipule (India)

Ganapatipule Seminar, India Tour. Ganapatipule (India), 5 January 1988. From yesterday’s programme, and all these days, you must have realised that to get your Kundalini working out, to get Her rush towards the Sahasrara and to widen your Sushumna Nadi it is not necessary that you should sit for meditation for three to five hours. Of course, you must meditate for a short time because that is at a point where you are alone, one with your God. But otherwise in the collective, when you merge into it, then the Kundalini rises the same way. It’s a very discreet way of understanding what happens. In the collective when you are, you compensate each other, compliment each other, and a subtler side of the cosmos starts manifesting in you. Then if you could really merge there’s a word in ‘merge’ in Sanskrit language or in Marathi language is very good is ‘ramamaana’. I don’t think “merging with joy” but there is no ‘with’ you see, merging into joy. So if you can merge into the joy of anything that is sahaj you can become a meditative personality, you can achieve that meditative mood within yourself. With that mood, with that force, new subtler dimensions start breaking out within you. Your different kind of conditionings which are like shackles, binding you down, just open out and you become a free person – bandhamukta. With that force everything breaks: your ego breaks, your conditioning breaks and you become one with the joy of Read More …

Yuva Shakti Starts and Evening Program Ganapatipule (India)

Idea to start Yuva Shakti, Ganapatipule (India), 4 January 1988. Mr. Pradhan is a very humble person. He didn’t tell you, that we have started a, I mean, he actually brought the idea to start a, another subsidiary you can call it, or whichever way you may say, another parallel movement, called as “Yuva Shakti”. Which is meant for the young people in Sahaja Yoga. For their guidance, for their expression, and for their dedication. And, this is spreading so fast now that I am told we have got Yuva Shakti even in Pune. And may be, it might spread to other places, to other countries, so that they can correspond, have a rapport, try to understand each other. So, this is a new movement, which was really suggested by Mr. Pradhan, and I really heartily congratulate him for putting it into action. (Applause). No doubt, we must care for our young people. And look after them and give them their due respect and they must know their due duties towards Sahaja Yoga. I found them to be excellent workers, very dedicated innocent hands that I have got. I am very proud of them. And please give them a hand to all the young people. (Applause). So there will be, we have another group, now here, it is Ashis who has come from Nagpur. He is a realized soul. He is a born realized, you see. And, like that we have many. Now here we have Ashok who is going Read More …

We should have patience, sweetness and genuineness, Evening Program Ganapatipule (India)

Talk to yogis, India Tour. Ganapatipule (India), 3 January 1988. I hope you are all very comfortable now and that you are enjoying the food as well. [Applause] Also we are approaching the fag end of our tour. This tour was arranged, as you know, like a journey through your Sushumna Nadi at different, different points different, different Chakras. In the same way we have passed through various places and now we have reached Ganapatipule where we have to get our Sahasrara fully drenched with blessings of Shri Ganesh. As you know Sahaja Yoga is a very subtler happening within us. It’s a very subtler happening and this subtler happening gives you sensitivity to Divine joy. When you start getting the Divine joy you don’t care for any comforts, you don’t care for all worldly type of pleasure giving things. To you, this becomes the most important thing and the only thing. Apart from that you start seeing the truth as it is. When I say you start seeing the truth many people can misuse this word. I’ve seen many people saying that they can decide things on vibrations and they have decided certain things on vibrations. But they commit mistakes. That means they have not yet grown up to that state where they can decide on vibrations. So nobody should arbitrarily decide but consult the collective, especially your leaders to find out if whatever decision you have taken, whatever you have thought of, is it all right or not. Read More …

A Sinless Life Ganapatipule (India)

Talk on New Year’s Day, Ganapatipule (India), 1 January 1988. Happy New Year to you all! May God bless you this year with all His divine powers. May all the choicest flowers of joy and happiness be showered upon you. May God give you wisdom to become great Sahaja Yogis, so that a new world can be created beautifully out of you. Very happy to meet you all today here. First day, I am sure there must have been lots of inconveniences. But Sahaja Yogis don’t feel any inconvenience. It’s important that you all are here, should meet each other, talk to each other about Sahaja Yoga. Try to understand what’s going on in the other parts of the world. There are certain problems which arise sometimes when you don’t listen to Me. So whatever I have said about swimming, the timings, please keep to it. We have to give up our old conditionings, I mean, we have to start a new life of understanding and wisdom. Today is a day when we should decide, take some vows in our hearts, what we want to do for our future, for Sahaja Yoga, for building of our lives. You know all the programs we have. Tomorrow we’ll be giving you the final list of the people who are getting married. And, also you should meet people whom you are getting married to. Talk to them and find out about them. Today I don’t want to say much. They say whatever you Read More …

Talk on Marriage and Nirvikalpa Kolhapur (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. त्यांनी जात-पात पाहिली नाही, की शहाणवच कुळी असलं पाहिजे, की अमुकच असलं पाहिजे. असं काही पाहिलं नाही. त्यावेळेला जेव्हा इतके वर्षापूर्वी गागाभट्टांना इथे येऊन त्यांना राज्याभिषेक द्यावा लागला, जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवलं , की तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा नाही. तेव्हा तुमची तेव्हा ह्या कोणतीही जात असेना का, तुम्ही आज सहजयोगी झालात, तुमची जात बदलली. तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म ‘विश्व निर्मल धर्म’ आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे, त्यामुळे तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळं काही गेलं. पण हे भूत अजून काही गेलेलं नाही. तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी . दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिओ, नाहीतर काही करो. हंडा घेवो नाहीतर काही करो. मग ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे. मग तुम्ही सहजयोगी कसे ? मग सहजयोग सोडा तुम्ही. तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकता का ? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल ह्यांना मार खावा लागला. हे लोक ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणखीन आम्ही काहीच असं करत नाही असे उभे राहिले. त्यांनी Read More …

Christmas Puja, Reach Completion of Your Realization Pune (India)

Christmas Puja Talk IS 25th December 1987 Date: Place Pune Type Puja आज मी इंग्लिशमध्ये बोलले. कारण हा त्यांचा विषय आहे. पण आपणसुद्धा पुष्कळ ख्रिस्ताबद्दल जाणत नाही आणि जे काही जाणतो ते इतकं थोडं आहे, की त्यावरून जो काही आपण अंदाज लावतो तो ह्या ख्रिस्ती लोकांना बघून कळतं चुकीचा आहे. तसं म्हणाल, तर कोणत्याच जातीत मी तसे शहाणे लोक पाहिले नाहीत. मग ते हिंदू धर्माचे असेनात का किंवा ख्रिस्ती धर्माचे असेनात का. कोणत्याही धर्मात वेड्यांचाच भरणा जास्त आहे. तेव्हा ह्या वेड्या लोकांमधून आपण काही शिकायचं नसतं, पण कोणतही अवतरण ह्या जगात आलं त्यांचं फार वैशिष्ट्य असतं. त्यातल्या त्यात ख्रिस्तांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं आयुष्य अगदी सोनं जसं तावून सुलाखून निघावं तसं आहे. त्यांच्या आयुष्याबद्दल कोणीही एका अक्षराने अस म्हणू शकत नाही, की ख्रिस्तांनी ही गोष्ट थोडी चुकीची केली किंवा असं कसं केलं? काही प्रश्न उभे राहू शकत नाही. इतकं थोडसं आयुष्य असतांनासुद्धा त्यांनी जी कमाल केलेली आहे, आणि ते ज्यांनी एकंदर आपल्या सर्व कार्याला जी सार्थकता आणली, व्यवस्थितपणे, एकानंतर एक, ती अगदी कमालीचीच आहे आणि तेच आज मला आपल्याला सांगायचं आहे. जसा ख्रिस्ताचा जन्म वडिलांशिवाय फक्त पवित्र आत्म्यामुळे म्हणजे होली घोस्टमुळे झाला, तसाच तुमचाही जन्म झालेला आहे. तेव्हा तुम्ही त्याच पावित्र्यात आलं पाहिजे आणि त्याच पावित्र्यात राहून ख्रिस्तासारखं जीवन दाखवलं पाहिजे जगाला. तर लोक म्हणतील ख्रिस्ताचा जो आदर्श तुमच्यासमोर आहे त्याचं हे फळ आहे. अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ. स्फटिकासारखं चमकणारं त्यांचं जे आयुष्य होतं ते तुम्हाला नेहमी प्रकाशित करत राहील. ते प्रकाश आहेत. त्या प्रकाशाला आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या प्रकाशातच आपलं पाऊल टाकलं पाहिजे. जपून जर आपण समजून उमजून ह्या Read More …

Public Program (India)

1987-12-23_Sarvajanik Karyakram- Atmyache Darshan_Akole-MARATHI अकोल्या गावामध्ये जी आत्मानुभावाची प्रगती झालेली आहे त्याला अगस्त्य मुनिंचे आर्शीवाद तसेच लव आणि कुश यांचे गेलेले बालपण आणि श्री सितेची शुभेच्छा सर्वच कारणीभुत आहेत. ह्या महाराष्ट्रात संत साधुंनी फार मेहनत घेतली आहे. ते जिवंत असतांना लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही. जे धर्ममार्तंड होते त्यांनी त्यांचा छळ केला. आणि जनसाधारणा मध्ये एव्हढी शक्ती नव्ह्ती की त्यांना या छ्ळवाद्यां पासन संरक्षण द्यावे. ती गोष्ट कधी-कधी जिवाला लागुन राहते. ऋषिमुनींच्या वेळेला असला प्रकार नव्हता. पण ह्या कलीयुगामध्ये मोठ-मोठ्या संत साधुंनी फार छळ सहन केला. कारण मानवाला त्यांच्या शक्तीची जाणीव नव्हती, त्यांच्या व्याक्तीत्वाची कल्पना नव्हती. ते केव्हढ मोठ कार्य करत होते त्या बद्धल जाणीव नव्हती, आज त्यांच्याच कार्यावर आम्ही हा सामुहिक सहाजयोग उभारलेला आहे, त्यांच्याच मदतीनी, त्यानींच पेरलेली बिये आज फुलली आहेत आणि त्यावरच आमच काम चालु आहे, तेव्हा त्यांना अनेकदा नमस्कार करुन, माझी आपल्याला अशी विनंती आहे की जे झाल–गेल ते विसरुन जावं आज वर्तमान काळात हया वेळेला ह्या कलीयुगामध्ये जेव्हा सगळी कडे आपल्याला अंधकार दिसतो आहे. राक्षसांचे जसे काही थैमान चालले आहे. कुठे जाव – काय कराव काही कळत नाही, कश्या रितीने या संकटातुन मुक्त व्हाव, सर्व देश त्राही-त्राही करत असतांना, हा सहजयोग आपल्या समोर उभा राहीलेला आहे, एकदा नळाला(नल राजा) कली सपडला, कली सापड्ल्या वर नळानी त्याला असा जाब विचारला कि तु महाद्रुष्ट आहेस, तुझ्यामुळे जगामध्ये परमेश्वरी तत्व नष्ट होतेय, तुझ्यामुळे लोकांची द्रुष्टी भलत्या गोष्टींकडे जाते, त्यांच्या चित्तामध्ये अनेक तऱ्हेचे विकल्प येतात तसेच अनाचार आणि अत्याचार याचा सुळसुळाट होतो. तेव्हा अश्या तुला मी नष्ट का करु नये?, तु सुध्दा माझा आणि माझ्या पत्निचा विरह घडवुन आणलास Read More …

Public Program Sangamner (India)

1987-12-22 Sangamner Public Program (Marathi) १९८७-१२-२२, मराठी सार्वजणिक कार्यक्रम, सगंमणेर – १/३ (मराठी भाषणाचे लिखीत रूपातंर) पर्मेश्वरी शक्तीला शोधंणार्‍या सर्व साधकांना, भाविकांना {मोठा विलबं (Big pause)….} आमचा प्रणिपात. एवढ्या थोड्या वेळातचं सगंमणेरला सहजयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हंणजे एक फारचं मोठं समाधान आहे. कुंडंलीनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होत. जनक राजाने एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षातकांर दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षातकांर घ्यावा लागला अशी एक दोन उदाहरणे आपल्याला पुर्व काळात मिळतात. इतिहास सुद्धा असचं सांगतो की फारच कमी लोकनां आत्मसाक्षातकांर झाला होता. पण संत साधू हे वारंवार आपल्या कार्यासाठी भारतात आले, विशेष़तः महारा्ष्ट्रात आणि त्यांनी अनेकोपरी समजवून सांगितंल की आत्मानुभंवाशिवाय तुम्हाला काहीही मिळालेल नाही. आधंळ्याला जशी दृष्टी नसते तसीचं मानवला जोपर्यतं तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यतं त्याला सत्य कळु शकत नाही, केवळ सत्य कळू शकत नाही. धर्मानी फारतरं फार मनुष्य सदाचरणी बनू शकतो. पण कोणत्याही धर्मातला मणूष्य मग कोणत्याही तो जातीचा असेना कां? कोणच्याही वर्णाचा असेना कां? कोणतेही पाप करु शकतो, त्याला कोणी रोकू शकत नाही कारण त्याला रोकणारी जी शक्ती ती आत्म्यामध्ये स्थित आहे आणि तो आत्मा अजून आपल्या चित्तात प्रकाशित झाला नाही म्हंणून सामर्थ्थ माणसांमध्ये नाही की त्या पापाच्या प्रलोभनातंन तो मुक्त होईल. सहजयोगाचे अनेक फायदे आहेत, पण सर्वात मुख्य म्हंणजे असे की, सदाचंरणानी मणूष्याला पुर्नत्व येऊ नाही. आत्मानुभंवातनं त्याला पुर्नत्व येतं. जो पर्यतं आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडत नाही तो पर्यतं आपल्याला खरं आणि खोटं याचा पुर्ण अदांज, सपुंर्ण कल्पना येऊ शकत नाही, त्याशिवाय आत्मानुभंव म्हंणजे जिवा शिवाची भेट, म्हंणजे पर्मेश्वराशी संबंध, म्हंणजे पर्मेश्वरी शक्तिचा आपल्यामध्ये आलेला सबंधं प्रवाह. जशी आज आपण सगळीकडे वीज बघतो Read More …

Puja, Attention on Quality Rahuri (India)

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. स्वत:चा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. जे आता हा मंडपच उभारला. तो सहजयोग्यांनी उभारला पाहिजे. मला चालतच नाही दूसर्यांनी उभारलेला, सहजयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलं आहे तुम्ही. माझ्या डोक्यावरती गंगासुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं आहे मी. गंगेला तुम्ही माझ्या डोक्यावर चढवलं तर तुम्ही गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेले म्हणून. तर तुम्हाला मी डोक्यावर बसून वाट्टेल त्याने माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय! वाट्टेल त्याने मेहनत करायची का? हे सगळं ठेवलेले आहे, म्हणून सहजयोग्यांनीच केलेल्या मेहनतीलाच मी पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्याने माझं डोकं जड होऊन जातं. हे सगळे मंडप वरगैरे तुम्ही स्वत: बांधायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजंठ्याची लेणी बघा, दहा पिढ्यांमध्ये बांधली आहेत. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. दहा पिढ्यांमध्ये एका पिढीनंतर दूसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कशी दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल! तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठेपण. सगळी हाताने मेहनत केली. तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं! त्यांच्यासमोर बुद्ध Read More …

Public Program (India)

Public Program Marathi Maheshwari Dharamshala India आपण सर्वानी थोडी वाट पाहिली . मला क्षमा करा मला माहित नव्हतं आज प्रोग्रॅम आहे म्हणून . आत्ता कळलं कि इथे प्रोग्रॅम आहे म्हणून . तेव्हा येन झालय तरी सर्वानी क्षमा करावी . सर्वप्रथम पैठण मध्ये आम्ही अलोत . आमचे पूर्वज ह्याच गावी रहात असत असे म्हणतात . ह्या गावाचं नाव पूर्वी प्रतिष्टान होत . आणि देवीला फार मानत असत असा हा देश विशेष आहे . त्यातल्या त्यात इथे बरेच वर्ष देवीची आराधना वैगेरे होत असे . आणि देवी बद्दल पुष्कळ माहिती लोकाना  होती . ज्ञानेश्वरांची सुद्धा कृपा झालेली आहे . सर्वानीच ह्या जागी फार कृपा केलेली आहे . आणि पैठण हे गाव सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . पण मला इथे इतके दिवस येता आलं नाही . इतकी इच्छा  असताना सुद्धा आणि आज आपण सर्वानी बोलावलं हि मी आपली कृपा समजते . आज जो विषय मी आपल्या समोर मांडणार आहे तो आपण कदाचित ऐकला असेल .  हा जो कि  ज्ञानेश्वरी मध्ये सहावा अध्याय जो ज्ञानेश्वरांनी वर्णिला आहे . आणि तो वाचू नये असं सांगण्यात आलं होत . आणि त्या मुळे पुष्कळांना ह्या गोष्टीची माहिती नव्हती . कि आपल्या मध्ये एक अशी सुप्तावस्थेत बसलेली अशी शक्ती आहे ज्या शक्तीने आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो . हे वाचू नये असं का सांगितलं हे मला सांगता येणार नाही . कारण हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे . सर्व आपण पूजा पाठ परमेश्वराबद्दल श्रवन ,ध्यानधारणा वैगेरे सर्व करतो पण तरीसुद्धा परमेश्वर मिळत नाही . त्या शिवाय पुष्कळशा लोकांनी ज्यांचा देवावर विश्वास नाही मला असा प्रश्न टाकलेला आहे कि जे देव देव म्हणतात त्यांच्या तरी आयुष्यात देव आलेला दिसत नाही . Read More …

Public Program Astagaon (India)

आजचा दिवस फार मोठा शुभा शिशाचा आहे . कारण आज आपल्याला माहित असेलच कि शाकंबरी देवीच्या नवरात्राचा पौर्णिमेचा दिवस आहे . म्हणजे आज शेवटची रात्र आहे . शाकंबरी देवी हि शेतकरी लोकांची देवी आहे . आणि तिचा प्रादुर्भाव मेरठ जिल्ह्यात झाला होता . त्या वेळी आमचे साहेब तिथे कलेक्टर होते मेरठ जिल्ह्यात तेव्हा मी तिथे पुष्कळ शेतीच काम केलं होत . आणि त्या शेतीत पुष्कळ चमत्कार घडले . आणि लोकांना आश्चर्य वाटलं कि इतक्या तर तऱ्हेच्या भाज्या आणि पीक एव्हड्या मोठ्या प्रमाणात पण एव्हड्या लहानशा जागेत कस आलं . असो . आजचा दिवस विशेष आशिर्वादाचाच आहे . कारण आजच्या दिवशी शाकंभरीदेवीने सर्व जगाला आशीर्वाद दिला होता . आणि शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला होता . कि त्यांच्या हातून अशी पीक आणि अशी धान्य तशीच उत्तम भाजी ,फळे सगळी ह्या सगळ्या संसारात शेतकऱ्यांच्या हाती ,त्यांच्या करवी ,त्यांच्या मेहनतीने सर्व जगाला मिळूदे . ह्या त्यांच्या आशीर्वादाचा उल्लेख करावासा वाटतो . त्यांच्याच आशीर्वादाने आपण लोक शेतकरी झालात . आणि जी काही सुजलाम सुफलाम आपली भूमी आहे तिचा फायदा यांनीच होतो .  आता हे परदेशी लोक इथे आले आहेत . आणि यांना महाराष्ट्रा विषयी फार आस्था आणि भक्ती आहे . त्याला कारण असे आहे कि महाराष्ट्रामध्ये फार मोठे मोठे संतसाधु होऊन गेले . त्यांनी इथे आपलं रक्त ओतलं . आजच एका नवीन गुरूंची ओळख झाली त्यांचं नाव हैबती . खरोखरच ते आत्मसाक्षात्कारी असतील पण त्यांना दोनचार माणसंच जाणतात . पण ह्या लोकांची शुध्दबुध्दि आहे . त्यातून पैसे वैगेरे मिळवायचे याच त्याच्या मागे त्रांगड नाही आहे . सगळे श्रीमंतीत राहणारे लोक आहेत . त्यांना पैशाची कदर नाही आहे . परमेश्वराची कदर आहे . आणि ज्या महाराष्ट्रात एव्हडे मोठे साधुसंत झाले त्यांची पुस्तक Read More …

Public Program Shrirampur (India)

श्रीरामपूरच्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात . ह्या सुंदर स्वागतपर गायना नंतर अगदी गहिवरून आलं . तसच वडाळ्याला इतकी मंडळी एकत्र जमली होती . आणि दोन क्षणात सगळेजण पार झाले हे बघून असं वाटत कि ह्या महाराष्ट्र भूमी मध्ये इतकी शक्ती आहे आणि त्यातून इथे लोकांमध्ये इतकी भक्ती आहे त्याच सार्थक झालं पाहिजे . आणि ते सहजच होत . आजकालच्या काळात देवाचं नाव सुद्धा लोकांना ऐकावंस वाटत नाही . पुष्कळांच असं म्हणणं आहे कि देव नाहीच आहे . पण हि काही शास्त्रीय प्रवृत्ती झाली नाही . जे सायन्टिफिक  लोक आहेत त्यांनी जर असं आपलं ठाम मत करून ठेवलं कि हि गोष्ट नाहीच आहे म्हणजे ते सायन्टिफिक नाही . कारण त्यांचं डोकं उघड असलं पाहिजे . मुभा असली पाहिजे . विचारांना मुभा असली पाहिजे . कोणाचाही विचार बांधून आणि त्यावर विश्वास ठेऊन काम करण  हे आंधळे पणाचे लक्षण आहे . म्हणूनच संतसाधुनी ह्या महाराष्ट्रात आपलं रक्त ओतलं आहे . काहीतरी विशेष ह्या भूमीत असलं पाहिजे . आणि वारंवार त्यांनी सांगितलं आहे कि परमेश्वर हा आहे फक्त तुमच्यातला परमेश्वर जागृत झाला पाहिजे . ते काही आजकालचे भ्रामक भामटे लोक नव्हते . त्यांनी जे सांगितलं ते सत्य सांगितलं तंतोतंत ते खर आहे . हे सिद्ध करण आज शक्य आहे त्यावेळी शक्य नव्हतं . म्हणून लोकांनी त्यांना छळलं त्यांचं ऐकलं नाही . पण आज ते शक्य आहे .  ह्या धकाधकीच्या काळामध्ये चारीकडे माणसाला जेव्हा वणवा पेटल्या सारखा वाटतो आणि कुठे जाऊ आणि काय करू अशी त्याची स्तिती झालेली आहे . अशा ह्या भ्रमित स्तिती मध्ये तो विचार करू लागतो कि परमेश्वर आहे तर तो आहे तरी कुठे ?. आणि मग तो माझी का मदत करत नाही . पुष्कळशे Read More …

Evening Program, Beauty must have auspiciousness Ganapatipule (India)

Evening Program, Beauty Must Have Auspiciousness [English Transcript] God almighty created this universe, in a very beautiful manner. I have told you many a time the story of creation, and how the evolution took place. The mirror, is made to see your face, and God almighty could not see himself. His qualities, His greatness, His generosity, His magnanimity. Like the sun cannot see itself. Moon cannot see itself. Like the gold cannot see itself. A pearl, how can it go inside itself and see itself? So, this creation was made like a mirror, for God to see His reflection. Ultimately He created the most beautiful mirror that is human beings. At this point it would have been alright, if, Adam and Eve had not used their freedom wrongly. There would have been not such a long time and, had to go through evolutionary process with all the [UNCLEAR incarnations] coming in, guiding people. And today, at this time, to get to your spirit, to express God in your mirror fully. This has taken a long long process. But if you see it’s so beautifully done. I think, that’s the play of Mahamaya. That, first of all, beautiful worlds were created, beautiful starts were created, you see them around. Then beautiful mountains and rivers. Then beautiful plant kingdom came in, and the beautiful variety of trees. So much of Varieties. Varieties bring forth the beauty of God’s own imagination. A leaf of any tree cannot match, with any other leaf, and Read More …

Innocence and Ganesha Ganapatipule (India)

Talk about Innocence, Ganapatipule (India), 2 January 1987. [English Transcript] Today, in this blessed place of Mahaganesha, we have all assembled to go deep into our own beings, to enjoy our own glory. One has to remember that the very first thing God created on this earth was Shri Ganesha because He could emit holiness. He exists as chaitanya and this chaitanya exists in the atom and molecules as you know very well, as vibrations – symmetric and isometric. These vibrations later on start expressing themselves in the plant kingdom as life force and you see how they are kept under a bondage. A tree that is a mango tree will go up to a certain point. A coconut tree will grow up to a certain point. It’s all under control, and then it is expressed in the animals, where it binds them. That’s why they are called as pashus, means under bondage. But in the human being it is expressed as auspiciousness and ultimately as the epitome, as holiness. Holiness is to be understood in its essence as well as in its contents.Holiness is an innate quality of a personality, where a person rejects all that is unholy, all that is inauspicious. The ego doesn’t play any part. Up to the animal stage, ego doesn’t exist. But in the human stage, you are given freedom to choose whether you want holiness or not. But in the ego of man, he might say, “What’s wrong?” and he may defy all Read More …

Public Program Sangli (India)

पब्लिक प्रोग्राम, सांगली, डिसेंबर 30, 1986, मराठी Shri Mataji addressing the seekers and their questions. Below are the conversations. Seeker’s talk/ questions are in brackets.  या इकडे या म्हणजे मी ऐकते.  (श्री माताजींना प्रश्न विचारला ” श्री माताजी माझी जागृती झालेली आहे, पण मला व्हायब्रेशन फक्त हृदया चक्रापर्यंत जाणवतात, त्याच्यावरती जाणवत नाही. कृपा करून आपण मला मार्गदर्शन द्याल का?)अर्थातच अगदी अगदी बसा आपण, मी सांगते आता. हे म्हणाले की कुंडलिनी त्यांच्या हृदयापर्यंत येऊन त्यांना जाणीव होते, आणि वर येत नाही म्हणजे विशुद्धी चक्रावरती दोष आहे. तर आता विशुद्धी चक्रावर काय दोष आहेत हे पाहिले पाहिजे. विशुद्धी चक्र कशाने खराब होऊ शकतं, जर तुम्ही खूप बोलत असाल, भाषण देत असाल तर घसा खराब होतो किंवा सिगरेट पीत असाल तंबाखू खाल्ले तर त्यांनी घसा खराब होतो किंवा सर्दी ने होऊ शकतो. कोणत्याही कारणाने जर घसा खराब झाला, विशुद्धी चक्र खराब झालं तर ही कुंडलिनी वर चढत नाही. पण ते आम्ही बघून टाकू, कुंडलिनी आम्ही चढवून टाकू, त्याची काळजी करू नका. त्याचा काही प्रॉब्लेम नाही.  हा पुढे काय? आणखीन कोण? काय प्रश्न असतील तर विचारा  Shri Mataji waiting  काय आहेत का प्रश्न? काय म्हणता? इकडे या इकडे……  (आपले कुठे आश्रम आहेत का?) आश्रम? आमचे अजून कुठेच आश्रम नाहीत. अहो सांगलीमध्ये सुद्धा नाहीत. सांगलीमध्ये आपले तावडे साहेब आहेत ना, त्यांच्या घरी सध्या प्रोग्राम आणि सेंटर होतात. सध्या आमचे कुठेच आश्रम बसवलेले नाहीत. कारण तुम्हाला माहित आहे, आपल्या देशाची काय स्थिती आहे. नंबर एक भ्रष्टाचार, त्यामुळे कुठेही जमीन घ्यायची म्हटली, की ते म्हणतात तुम्ही किती ब्लॅकचे पैसे द्याल? तर मी म्हटलं आमच्याकडे ब्लॅक बिग चे Read More …

Public Program Satara (India)

Public Program Until the Time 11.50 mins – Flowers offering at the Lotus Feet of Shri Mataji by various local centre representatives from Satara district of Maharashtra  15.30 mins – Shri Mataji’s speech starts  सातारा जिल्ह्यातील सहजयोगींचे कार्य बघून आत्य आनंद होतोय. तुम्ही गुलाल उडवत मिरवणूकित आपला आनंद प्रदर्शित केला, हा आनंद सातारा जिल्ह्यात पसरून 15 सेंटर उभी केली गेली हे फार मोठं काम आहे. श्री रामदासांची भूमी ही, स्वतः ते हनुमानांचे अवतरण होते. त्यांच्या कार्याची सुरुवात कधीच झाली होती, पण त्याची फल स्तुती मात्र आज दिसते की सातारा जिल्ह्यामध्ये 15 केंद्र उघडण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत साधू होऊन गेले आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या सर्व आपण सहज योगात बघू शकतो. सर्वप्रथम त्यांनी असं सांगितलं, की सद्गुरु तो जो तुम्हाला परमेश्वराशी ओळख करून देतो, ब्रह्मनिष्ठ बनवतो. जो तुमच्याकडून पैसे घेतो तुमची दिशाभूल करतो, तुम्हाला चूक मार्गात घालतो तो गुरु नव्हे. एकच लक्ष मानवाकडे असलं पाहिजे आणि ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय, आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, त्यापेक्षा मुकच राहिलेलं बरं.असं सुद्धा ज्ञानेश्वरांनी शेवटी म्हटलं. कारण आत्मसाक्षात्कार झाला नाही डोळे बंद आहेत आणि डोळे बंद असताना जी तुमची श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेला काही अर्थ नाही. आज  मी असं ऐकलं आहे की इथे एक अंधश्रद्धा निर्मूलन संस्था काढली आहे, हे बरं झालं म्हणा, हे आम्ही बरेच वर्षापासून म्हणत होतो. पण जे लोक अंधश्रद्धा काढतात त्यांची अंधता गेली आहे का नाही हे आधी बघायला पाहिजे. अंधश्रद्धा कोणात आहे आणि कुणात नाही हे जाणण्यासाठी डोळस व्हायला पाहिजे. जी मंडळी डोळस झालेली नाही, ती दुसऱ्यांना आंधळे झाले आहात हे Read More …

Public Program Satara (India)

Shri Mataji arrives and is welcomed by the local sahajis. A Bhajan is sung. Then on a foreign sahaji gives a brief introduction about sahaja yoga.  Shri Mataji’s speech starts at time 22.06 आपलीच महती आपण जाणत नाही ही गोष्ट खरी आहे. जसं सूर्याला कळत नाही की तो प्रकाशमय आहे, तसंच महाराष्ट्राच्या लोकांना कळत नाही की त्यांच्यामध्ये परमेश्वराने किती आशीर्वाद दिले आहेत. म्हणून तो भ्रमिषष्ठासारखा इकडे तिकडे भटकत आहे. सारा समाज आज पश्चिम संस्कृतीने भारावून गेला आहे. आणि पश्चिमेचे लोक आता थकून भारताकडे बघत आहेत. आणि त्यांची दृष्टी लागली आहे की आम्हाला त्यांच्यापासून काय शिकायचा आहे? आपण स्वतःला फार पश्चिम मार्क  समजून खूप शिष्टासारखं वागतोय आणि त्यापासून आपल्याला काय लाभ होणार आहे किंवा नाही त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. साहेबांची बदली लंडनला झाली म्हणून आम्ही इंग्लंडला गेलो, आणि तिथे आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केली. त्यावेळी असं लक्षात आलं की पश्चिम देशांमध्ये  जी काही प्रगती झाली आहे ती एखाद्या झाडाची प्रगती व्हावी अशी झाली आहे. पण त्याची मूळ या भारतात आहेत. आणि जोपर्यंत ही मूळ जोपासली जाणार नाहीत तोपर्यंत  ते झाड उलथून पडणार आणि त्या स्थितीला आल आहे ते. पण आपण जे या मुळात बसलेला आहोत, ते मात्र पूर्णपणे आधीभिज्ञ आहोत. आपलं काय कर्तव्य आहे आणि आपली  काय जबाबदारी आहे. कोणतीही गोष्ट त्या लोकांपासून आली ती विशेष असं समजून आपण अंधानुकरण चालवलं आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडे दिशाभूल करणारे धर्मगुरू, मंदिरात बसलेले भटची बुआ. अशे  अनेक प्रकार असल्या मुळे पुष्कळ लोकांची अशी धारणा झाली आहे की परमेश्वरी ही गोष्ट अशी नाहीच. परमेश्वर आहे किंवा नाही हे आम्ही सिद्ध करू शकतो. पण तुम्ही कशावरून सिद्ध Read More …

Public Program Angapur (India)

Shri Mataji is welcomed by the sahajis at the public program. Bhajans are sung. Shri Mataji’s speech starts at time 21.45आपणा सर्वांचा उत्साह आणि प्रेम बघून, एका आईचं हृदय किती गहिवरू शकतात हे समजण्याची क्षमता तुम्हा आयांना असू शकते मुलांना असू शकते. कारण हा देश आईंचा देश आहे. आईची थोरवी इथे  माणलेली  आहे आणि महाराष्ट्राची आई बहुतेक सुज्ञ बाई असते. आपल्या अंगापूरच्या योगभुमीत, आधी रामदास स्वामींनीच तपश्चर्येने पुष्कळ कार्य करून ठेवलेलं आहे. परवा तुकारामांच्या भजनात एक अभंग म्हणून दाखवला, तेव्हा ते म्हणाले मी तुम्हाला निरोप द्यायला आलोय. एक महत्त्वाचा निरोप – हा मार्ग, परमेश्वराचा मार्ग फार सहज सरळ आणि सुलभ होणार आहे. या सर्व साधू संतांनी आमच्यावर फार मेहरबानी केली, त्यामुळे लोकांना आज महाराष्ट्रात आज जाणीव आहे, की  आत्मसाक्षात्कार शिवाय जगात काहीही दुसरं मौल्यवान नाही.  पण ही जाणीव इथे दिसत नाही की, किंवा आपण असं म्हणूया, हिंदुस्थानात ही जाणीव कमी आहे. ही आपल्या महाराष्ट्रात संतांची फार मोठी देणगी आहे. आणी तो वारसा त्यांनी गीतेतुन, ज्ञानेश्वरी सारखी सुंदर कविता रचून,  अनेक ग्रंथ लिहून, लोकांना जाणीव दिली की आत्मसाक्षात्कार म्हणजेच परमेश्वराला मिळवणं आहे आणि त्यातच सगळं काही आहे. पण त्या संतांच्या सांगण्यावरून, आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, या दिवसाची वाट पाहणे, हे सुद्धा काहीतरी  विशेष पूर्वसर्वतामुळे  घडतं. म्हणून असं म्हटलं पाहिजे की अंगापूर आणि सातारा जिल्ह्यातले जी  लोक इथे आलेली आहेत, त्यांची काहीतरी पूर्व पुण्याई ही फार असली पाहिजे,  पूर्व सुखरूप काहीतरी असलं पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी इतके लोक मला सहज योगी दिसत आहेत. सहज योगाचे लाभ किती आहेत हे तुम्हाला माहित आहे. ते तुम्हाला परत परत काय सांगावे. पण एक गोष्ट Read More …

Diwali Puja Pune (India)

Diwali Puja (Hindi/Marathi). Pune (India), 1 November 1986. मराठीत म्हणतात, ‘त्याला पाहिजे जातीचे,’ आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, ‘या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता।’ सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको. ते ही आहेत, जाऊ देत. असेही लोक आहेत जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले आहेत. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं ते ही सुटत नाही. कितीही सांगितलं तरी सुटत नाही. जाऊ देत. ते ही आहेत. त्याहन असे ही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. त्यांची बुद्धी त्याबाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसतय की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय! हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहजयोग वर्णिता येत नाही. सहजयोगाला समजण्यासाठीसुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजेत. सहजयोगी सहजयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. ‘माताजी, ते फार श्रीमंत लोक आहेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.’ ‘बरं मग पुढे काय!’ ‘ते म्हणतात आम्हाला एकदा माताजींना भेट्ू द्या.’ ‘मग त्यांना काय पाहिजे?’ ‘काही नाही, ते भेटायचं म्हणतात.’ मी म्हणते, ‘अहो, राहू देत, त्यांना अजून थोडसं बघू द्या.’ लोकांना समजत नाही, असं कसं माताजी म्हणाल्या? एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत ते. पैसे आले म्हणून पॉलिटिशियन आहेत. तुम्ही भेटा. म्हटलं, दरून नमस्कार! Read More …

Navaratri, Shri Gauri Puja Pune (India)

1986-10-05 Navaratri, Shri Gauri Puja (Hindi/Marathi) मराठी भाषा फार चांगली आहे कारण तिला तोड नाही. विशेषकरून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो. आणि या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारण असे आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. त्यांच्या भाषेतच नाही. त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही. तेव्हा थोडेसे हिंदीत बोललेले बरे कारण तुम्हाला सगळे आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळे पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा. पण तरीसुद्धा असे म्हटले पाहिजे की आपल्याला फार मोठी संतांची इथे शिकवण जी मिळालेली आहे हा एक इतका मोठा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने संस्कृती म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. पुण्य म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. हे चांगले-वाईट काय ते आपल्याला माहिती आहे. कळतं पण वळत नाही. कळतं सगळं की हे सांगितलेले आहे, वाईट आहे. असा पुण्यसंचय आपण पुष्कळ केलेला आहे. म्हणूनच या पुण्यामध्ये, या पुण्यनगरीमध्ये आपला जन्म झाला हे कबूल, पण तरीसुद्धा इतर लोकांना बघून आपल्याला असं वाटतं की आम्ही पुणेकर म्हणजे काही जास्त श्रीमंत नाही, मुंबईकर जास्त श्रीमंत आहेत. त्याच्याहून असं वाटतं की मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक अधिक श्रीमंत. त्यांच्याजवळ पैसे जास्त असतात. तिथे दिल्लीला तख्तच असल्यामुळे तिथे त्यांच्याजवळ मान, बुवा पान, आदर हे सगळे काही बाह्यत: पुष्कळ दिसतं. तेव्हा असं वाटतं केवढे मोठे लोक आहेत हे. ह्यांचे केवढे मोठे पण आमचं काय, आम्ही गरीब अजून. पण तुम्ही पुण्यवान आहात. पण ह्या पुण्यातच असे लोक आहेत देवालाच मानत नाहीत. मोठे मोठे धुरंधर मी पाहिले. मोठे, मोठे विद्वान लोक मी पाहिले ते देवालाच मानत नाही म्हणजे इतके शिष्ट Read More …

Public Program Day 1: Bhakti aur Karma Sir Shankar Lal Concert Hall, New Delhi (India)

चैतन्य लहरी सप्टेंबर / ऑक्टोबर २००० भक्ति आणि कर्म प. पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) दिल्ली २१-२-८६ स्त्रीत्वाची जाणीव विसरून पुरुषीपणाचे स्वभावधर्म दाखवू आजकाल आपल्यासमोर मानवी-जीवनासंबंधी अनेक पाहतात. हे एक प्रकारचे कठीण काम आहे. ही कुण्डलिनी प्रश्न आहेत. आपल्यामध्ये जो बौद्धिक वर्ग आहे त्या लोकांना तुमची प्रत्येकाची स्वतःची आई आहे व पुत्राला पुनर्जन्म देण्यासाठी ती सदैव वाट पाहत असते. म्हणून ती जागृत झाली पाहिजे व तेही सामूहिक प्रकारे होणे जरूर आहे. पूर्वीच्या काळी असे आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेले थोडेफार लोक होते. मला कुणाशी वादविवाद वा भांडण कराचये नाही. आईची एकच इच्छा असते की तिने प्रेमाने तयार केलेले जेवण खाऊन पुत्राने दिल्लीमधील सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना नमस्कार. वाटते की आजपर्यंत झालेल्या अवतरणांनी हे कार्य का नाही केले? याला काय उत्तर देणार? वृक्ष जेव्हा बीजापासून तयार होतो त्या प्रक्रियेत अनेक अवस्था असतात. म्हणून मी नेहमी हेच सांगते की सध्याचा काळ हा बहराचा समय आहे आणि या काळांतच माणसाला त्याच्या पूर्व-पुण्याईची फळे मिळणार आहेत. हे फार पूर्वीच सांगितले गेले व लिहिलेलेही आहे. नल- दमयंती आख्यानामधेही हे सांगितले आहे की कलियुगामध्ये कलीने नलाचा पत्नीपासून विरह घडवून आणला व त्याचप्रमाणे लोकांना भ्रमामध्ये गुंतवून सर्वनाशाकडे पाठवले या दुष्कृत्याची तृप्त व्हावे. ही एक सरळ, सहज गोष्ट आहे. हा विषय सूक्ष्म व गहन आहे म्हणून सुरवातीला लोकांना इकड़े वळवणे हीच अडचण येते. थोड़ा वेळ स्थिर होणे अवघडच होते; मगच एकाग्रता व नंतरची समग्रता अनुभवता येते. म्हणून माझी विनंति आहे की तुम्ही सर्वांनी थोडा वेळ मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. शास्त्रीय प्रणालीमध्ये प्रथम एखादी गोष्ट वा सिद्धांत गृहीत धरला जातो व नंतर प्रयोग केल्यावर तो सिद्ध झाला Read More …

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 11th January 1986 Date: Place Shrirampur Public Program Type श्रीरामपूरच्या सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या साधकांना आमचा प्रणिपात असो. आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने आम्हाला इथे बोलवलं आणि परमेश्वर प्राप्तीची उत्कंठा दर्शवली त्यातच आम्ही कृतार्थ झालो. तसंही जीवन आहे. आपण जे काही शिकत असतो, त्यामध्ये आपण आनंद शोधत असतो. काहीही आपण करतो ते आनंदासाठी करतो. कोणीही दु:खासाठी शोध करत नाही. दु:ख कुठे म्हणून शोधायला जात नाही. पण जिकडे आनंद आहे. तिकडे माणसाचं लक्ष वेधलेलं असतं. जीवनामध्ये आनंद काय आपल्याला समजत नाही. सुख आणि दुःख ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो सुखाकडे म्हणून धावतो त्याला शेवटी दुःख होतं. ह्याला काय कारण असलं पाहिजे? जो निव्वळ आनंद, ज्याने सुख आणि दुःख दोन्ही संपून, जातात अशी कोणती स्थिती असली पाहिजे? असा विचार जेव्हा माणसाच्या मनात उद्भवतो त्यावेळी तो एकसांख्य होतो आणि तो परमेश्वराला शोधू लागतो. परमेश्वराच्या नावावर लोकांनी पुष्कळ दुकानं मांडलेली आहेत. दुकानात गेलं म्हणजे परमेश्वर मिळतो असा आपला पुष्कळांचा विचार आहे. सहजयोगात तुम्ही पैसे देऊ शकत नाहीत, असं म्हटल्याबरोबर अर्धे लोक उठून चालले जातात. पैशाने तुम्ही परमेश्वर विकत घेऊ शकत नाही. परमेश्वर घेताच येत नाही आपल्याला. विकाऊ वस्तू नाही आहे परमेश्वर . तर परमेश्वर काय आहे ? ज्याने ही सृष्टी रचली, ज्याने पृथ्वी आपल्याला दिली, ज्या पृथ्वीतलावर आपण जन्माला आलो, हे सगळं करणारा जो परमेश्वर आहे, तो आहे तरी काय? असा प्रश्न मनामध्ये उभा राहतो. पुष्कळसे लोक अशा भ्रामक कल्पनेत इकडे तिकडे भटकतात आणि भटकले आहेत. धर्माच्या नावावरतीसुद्धा पुष्कळांना भरकटवून टाकलेले आहे. ज्याला आपण धर्म म्हणतो, कधी कधी असं वाटतं, की हा धर्मच नसावा. जे धर्मावरती बोलतात त्यांचासुद्धा एवढा अधर्मीपणा! आपल्याला Read More …

Public Program Sangli (India)

Public Program Sangli, 6th January 1986 सांगली तसच कोल्हापूर दोन्हीही ठिकाणच्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात . मागच्या वर्षी आम्ही इथे आलो होतो, आणखीन  सहजयोगाबद्दल  लोकांना माहिती दिली होती . आता आपण असा विचार केला पाहिजे , की  ह्या जगामधे आपण आलो ते कशासाठी ? त्याबदद्ल आपल्या मनामधे पुष्कळ भ्रम आहे . तो विचार आपण करू नये असे पुष्काळांचे मत आहे. कारण असा विचार करून फायदा काय होणार ? आपल्याला पुढचं काय ते काय माहीत नाही . पण जर आपण लक्षात घेतल तर अनेक हजारो वर्षांपासनं  आपल्या देशामधे विशेषत: ह्या महाराष्ट्रात  , ह्या संतभुमिमधे संतानी अस संगितलेल आहे  की, अवघाची संसार सुखाचा करीन ! इतकच नव्हे तर पसायदान म्हणून जे काही ज्ञानेश्वरांनी लिहलय ते सुद्धा वर्णन आपल्याला खर वाटत नाही की , जे जो वांछील ते तो लाहो ! हे कस होणार?, ह्याला मार्ग काय ? जी जी वर्णन अशा परमेश्वरी साम्राज्याची आपल्या शास्त्रात करून ठेवलीय . त्यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो की, अस साम्राज्य आलं  पाहिजे .पण ते येणार कस ? आता कम्युनिस्ट लोकांच अस म्हणन आहे की , मार्क्सनी, मार्क्सवादी लोकांच अस  म्हणन आहे की मार्क्सनी अशी रचना केली होती की,असे विशेष लोक तयार होणार आहेत , की ज्यांना ग्व्हर्नमेंटची गरज नाही , ज्यांना पोलिसांची गरज नाही ,ज्यांना कशाचीही गरज नाही .पण ते कसे होणार ? त्याचा कुठे कोणी उल्लेख केलेला नाही. ते कसं घडून येणार आहे ?अस होणार तरी कसं  ? म्हणून त्यांनी जबरदस्ती केली ,कसतरी  करून कम्युनिझम आणला.पण त्याचा काही फायदा झाला नाही. मनुष्य होता तसाच आहे . तेव्हा त्याला काहीतरी कारण असलं पाहीजे  , ते Read More …

Public Program Ganapatipule (India)

Sarvajanik Karyakram 3rd January 1986 Date: Ganapatipule Place Public Program Type गणपतीपळे आणि मालगुंड ह्या पवित्र परिसरात राहणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो! गतवर्षी सहजच गणपतीपुळेला येणं झालं आणि इथलं पवित्र वातावरण पाहन ही परमेश्वरी सोन्याची खाण इतके दिवस का लक्षात आली नाही हेच मला समजलं नाही. आणि ह्या ठिकाणी जी मालगुंडची मंडळी राहतात आणि गणपतीपुळ्याची मंडळी राहतात त्यांना तरी ह्या खाणीची माहिती आहे की नाही असा मला प्रश्न पडला, तेव्हा काहीही झालं तरी आम्ही आमचा प्रोग्रॅम गणपतीपुळ्यालाच घेऊ या, असं मी सर्वांना सांगितलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी हा शब्द उचलून धरला. नागपूरहन इथे मंडळी आली. तसेच इतर ठिकाणाहून, फार लांबून, दिल्लीहून, कोलकाताहून, फार लांबून मंडळी इथे आली. मद्रासची पण मंडळी इथे आली. माताजींनी गणपतीपुळ्याला एवढ महत्त्व दिलं तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात होता. पण इथे आल्याबरोबर त्यांना मोठा आश्चर्यजनक आनंद झाला. कारण हे वातावरण इतक शुद्ध आणि पवित्र आहे, की ते एका आत्मसाक्षात्कारी माणसालाच जाणवू शकतं. ही जाणीव व्हावी लागते. नुसतं असं म्हणून की आम्ही गणपतीपुळ्याला गेलो, ह्या अष्टविनायकाला गेलो, तिथे गेलो, असं केलं, तसं केलं, त्याला काही अर्थ रहात नाही. तुम्हाला काय मिळालं? असं विचारलं, तुम्ही अष्टविनायकाला गेलात, तुम्ही इतकी तीर्थयात्रा केलीत, तुम्हाला काय मिळालं? जसेच्या तसेच. इकडे गेलो, हे खर्च केले. तिकडे गेलो, हे केलं. दानधर्म केला, अमुक केलं, तमुक केलं, तीर्थयात्रा केल्या, पण का केल्या आणि तुम्हाला मिळालं काय? आता हे अष्टविनायक कोणी शोधून काढले? अष्टविनायक आहेत हे कोणी सिद्ध केलं? ही फार पुरातन गोष्ट आहे. आजची गोष्ट नाही. फार पुरातन गोष्ट आहे. तेव्हा त्या वेळेला जे आत्मसाक्षात्कारी मोठे लोक झाले, त्यांना लोक Read More …

Public Program Atit (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . अतीत बद्दल मी ऐकल होत कि इथे पुष्कळ साधक आहेत आणि सहजयोग चांगलाच रंगलेला आहे . इथे आल्याशिवाय ते सत्य द्रीष्टी समोर आलं नाही . आणि पाहून मला मोठं आश्चर्य वाटलं कि या ठिकाणी प्रथमच मी आले आणि लोकांचा उत्साह त्यांचं प्रेम किती भव्य आहे किती मोठं आहे . आपण नेहमीच सत्याला शोधत असतो . जाणता जाणता आपण शोधत असतो ते सत्य . कारण सत्य हेच प्रेम आहे . एखाद्या बद्दल आपल्याला जर प्रेम वाटलं तर आपण त्याच्या बदल सगळं काही असेल ते जाणतो ,जे सत्य आहे ते जाणतो . बाह्यतः सुद्धा . आणि ते प्रेम आनंददायक असत . तेव्हा ते सत्यच आनंदाचा स्रोत आहे . आपल्याला असं वाटत कि सत्य म्हणजे काहीतरी कोरड असेल कारण जे सत्यवचनी असतात ते करारी लोक ,बाणेदार लोक आणि हातात नेहमी तलवार धरूनच असतात . त्यांच्या जवळ जायचं म्हणजे अगदी विचार करावा लागतो . त्यांच्या जवळ जायचं तरी कस एखादा तडाखा दिला तर कस होईल आपलं . सत्य हे प्रेममय आहे ,आनंदमय आहे . ,सौन्दर्य शाली आहे . सुखमय आहे . ते आपण सत्य शोधत असतो . पुष्कळसे लोक असं समजतात कि आम्ही जर मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्या तर आम्हाला आनंद होईल . पुष्कळसे लोक भौतिकतेत पडतात त्यांना वाटत कि आम्ही जर मोठमोठाले बंगले बांधले किंवा मोठाल्या गाड्या ठेवल्या श्रीमंत झालो म्हणजे आम्हाला आनंद मिळेल . सुख दुःखाचा हा फेरा आहे . हा आनंदाचा सागर नव्हे . सुख तेव्हा होत जेव्हा माणसाचा अहंकार बळावतो . एखाद्या माणसाने उदोउदो केला म्हणजे माणसाला सुख वाटत . आणि Read More …

Public Program Sangamner (India)

परमेश्वराला  शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . ह्या भारत भूमीत ह्या योगभूमीत महाराष्ट हे एक विशेष प्रकारचं राष्ट्र  आहे . आणि अनादी काळापासून याला महाराष्ट्र असं म्हंटल आहे . महाराष्ट्र का म्हंटल असं कुणाला विचारलं तर लोकांना ते सांगता येत नाही . आणि केव्हा पासून म्हंटल ते सुध्दा त्यांना सांगता येत नाही . असे अनादी नाव कोणत्याही देशाला आजपर्यंत महाराष्ट्र असं दिलेलं नाही . तेव्हा ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असं आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे . म्हणजे एव्हड्या मोठ्या राष्ट्रात जर जन्म झालेला आहे ,हे राष्ट्र संबंध पृथ्वी तलावावर महान मानलं जात तेव्हा याच जे आपण मोठं नाव ठेवलेलं आहे किंवा नाव आहे त्याला साजेस काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहजे . राजवाड्यात जे राहतात त्याना रजवाडे म्हणतात . तसच ह्या महाराष्ट्रात जे राहतात त्यांना महाराष्ट्रीयन म्हणतात . किंवा महाराष्ट्र वासी म्हणतात . पण त्यातलं ब्रीद काय आहे ते ओळखून घेतलं पाहिजे . त्याच्या शिवाय स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायचं नाही . कारण सत्य हे आहे कि हा देश अत्यंत महान आहे . आणि आधी मी आपल्याला सांगितलं आहे कि सर्व विश्वाची कुंडलिनी  ह्या महाराष्ट्रा च्या पठारामध्ये जशी त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपल्यात  ती बसलेली आहे तशीच हि कुंडलिनी आपल्या ह्या महाराष्ट्रात बसलेली आहे . हि महान आदी कुंडलिनी ह्या महाराष्ट्रात आहे . तिची तीन पीठ आपल्याला माहीतच आहे .   महाकालीच ,महासरस्वतीच आणखीन महालक्ष्मीचं . पण जे मुख्य आहे ते सप्तशृंगीचं अर्धमात्रा , ती आदिशक्ती आहे . ती नाशकाच्या जवळ आपल्याला माहित आहे . अशी साडेतीन पीठ ह्या भूमातेच्या पाठीच्या कणावर महाराष्ट्रात आहेत . म्हणजे इथे चैतन्याच्या नुसत्या लहरी वहात आहेत . चैतन्य नुसतं उफाळून आलेलं Read More …