Public Program Kolhapur (India)
1982-1230-Public Program (Malharpeth) Marathi कलियुगा मध्ये जन्म घेणं आणि तेही आई’च्या रूपाने म्हणजे फार कठीण काम आहे. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचक असतो, आई म्हटली की प्रत्येक मानवरासारखच (मानवासारख) आपल्या जी हक्काची आई आहे आपण कसंही तिच्याशी वागलं तर ती आपल्याला क्षमाच करणार तेव्हा सहज योग आई’च्या रूपाने साध्य करण तर व्हावंच लागतं कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं आईच व्हायला पाहिजे दुसऱ्या कोणाच्या शक्तीततच नव्हत हे काम. तर मल्हार पेठेत सत्कार बघून आईचा या कलियुगात फार आश्चर्य वाटतं आणि फार आनंद झाला म्हणजे कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे ते खरं आहे हे आज मला मात्र पटलं. आम्ही एक स्त्री आहोत तेही एक आई आहोत म्हणजे एकतऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला तुमचं काही वाईट झालं तर तेही दुखतं ,घनिष्ठ आहात तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो की कसंही करून यांना एकदा मिळालं पाहिजे कारण आईला स्वतःचं काहीच नसतं तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ती मिळाली त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं त्याच्या पलीकडे काय यायला नको .तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे ते झालं म्हणजे कृतार्थ वाटतं त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नाही ,आपण इतकी मंडळी मल्हार पेठेत सहज योगाच्या कार्यक्रमाला आलात म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक लोक, परत संत तुकारामांच्या नावाने इथे एवढी सुंदर शाळा काढलेली आहे याबद्दल मला इथले मुख्याध्यापक जे आहेत ते मला दिसले नाहीत कोण आहेत ते .तर त्यांना अत्यंत त्यांचे आभार मानायचे आहे संत तुकाराम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचेच आत्मिक स्वतःचे आहेत त्यांनी तर सहज योगाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती त्याचीच तयारी आपल्या Read More …