Public Program Rahuri (India)

Sarvajanik Karyakram Date : 22nd February 1984 Place Rahuri ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK राहरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार ! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं , की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे , ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहुतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळे माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझे वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळे काही. मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे ? ठीक आहे की नाही? अशा सर्व मोठ्यामोठया लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे Read More …