Public Program (India)

Public Program,Vaitarna,India,16th January 1985 की ह्यात काहीतरी विशेष आहे. आपण जाणून घेतलं पाहिजे की ही मंडळी इतक्या लांबून इतक्या परदेशातून आली.  यांना इथे काय मिळतंय ते समजून घेतले पाहिजे. असा थोडासा आपण समजुतदारपणा ठेवला पाहिजे. <Pause >  कदाचित आम्हा लोकांच्या आर्थिक परिस्थिती मुळे आम्हाला लोकांना हा विचार शिवत नसेल. पण काहीतरी विशेष असल्याशिवाय ही चौदा  देशातली  मंडळी इथे का येतात असा आपण एकदा जर  मनात विचार घेतला तर पुष्कळ गोष्टींचा आपल्याला पत्ता लागू लागेल. अजून आपल्याला  आपल्या धर्माबद्दलच माहिती नाहीये मुख्य म्हणजे. आपला धर्म जरी अनादी होताय,  भारतीय धर्म जरी अनादी होता तरीसुद्धा त्याची अनेकदा पुनर्रचना  कर करून, शेवटी सहाव्या शतकात “आदिशंकराचार्य”  हयांनी अवतरण घेतलं आणि या धर्माची पुनर्स्थापना पूर्णपणे करून कुंडलिनी योगा वरती  त्यांनी  पुष्कळ  पुस्तक लिहिली. कुंडलिनी शिवाय आता मार्ग नाही असं ‘उघडपणे त्यांनी  “सत्य उघडे करूनी  सांगितले”. तसंच श्रीकृष्णाने सांगितलं होतं  की तुम्ही स्थितप्रज्ञ झालं पाहिजे म्हणजे , तुम्ही आत्मसाक्षात्कारी  झालं पाहिजे. आपल्याला हा शब्द समजतो आत्मसाक्षात्कारी ,पण ते म्हणजे काय हे  माहिती नाही. ते आज लोकांना देण्याची पाळी आलेली आहे. <Pause > पण आपला विचार सखोल नसल्यामुळे जे परंपरागत आपलं चालू आहे तेच चालू आहे. म्हणजे आता टाळ कुटत  जायचं पंढरी पर्यंत. अरे, पण त्याने आपल्या आई-वडिलांना काही मिळाले नाही. आम्हाला काही मिळालं नाही.  का आम्ही  टाळ कुटली ?    पंढरीनाथाला भेटायला.  पंढरीनाथाला भेटणं  म्हणजे देवळात जाऊन नुसतं डोकं फोडून घेणे नव्हे. हे समजलं पाहिजे.  जरी आपण अशिक्षित असलो तरी एक गोष्ट लक्षात येते.  उलट अशिक्षित लोकांच्या लवकर लक्षात यायला पाहिजे की तिथे देवळात जाऊन नुसती जर आपण डोकीफोड  केली तर आपल्याला परमेश्वर  मिळणार आहे का Read More …