Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बद्ल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकी कडनं वाढतो आणि एकी कडनं आयुष्य कमी होतं. पण सहज योग्यचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं कि आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली आहे. आपलं आत्मिक वृक्ष वाढत चाल्लय. जरी आयुष्य कमी होतं चाललं तरी सुद्धा आत्मयचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणी प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलौकीत करून टाकतं. तेव्हा जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत हा आत्मा अधिक आणि अधिक आपल्या चित्ता मध्य प्रकाश ओढवतो. आयुष्याचा विचार मनुष्याने केला नाही पाहिजे. योग मिळाल्यावर जे आता आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा एक एक क्षण महत्वाचं आहे प्रत्यक क्षणी आम्ही आपली वाढ करून देऊ शकतो. असं समजलं पाहिजे कि जसे बी ला अंकुर फुटतं आणि अंकुर फुटताना बी ला असं वाटतं कि आपलं आयुष्यं संपून गेलंय पण खरोखर त्याचं रूपांतर आता मुळांन मध्ये झालेलं आहे. योग्यांच्या आयुष्याचं महत्व हे आहे कि जेव्हा योग्यांना मरणं येतं तेव्हा त्यांचे अंकुर गौरवांचे अंकुर पृथिवीच्या बाहेर निघतात आणि झाडं कीर्ती रूपानं झळकू लागतं. म्हणजे देह त्याग झाल्या नंतर मनुष्य कीर्ती रूप उरतो तेव्हा योगानंतर जे आयुष्यं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण आता संतांची किती लक्षणं सांगावी. ज्ञानेश्वरांना आपल्या हयातीत लोकांनी किती त्रास दिला, हा काय तरीच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो असं सुद्धा लोकं त्यांना  म्हणाले. कबीरांना किती लोकांनी त्रास दिला. नानकांना किती त्रास झाला. तुकारामांना लोकांनी कधींच मान्य केलं नाही, नामदेवांना सुद्धा लोकांनी Read More …