Dyan Ki Avashakta, On meditation New Delhi (India)

Dhyan Ki Avashakta 27th November 1991 Date : Place Delhi : Seminar & Meeting Type Speech [Marathi translation from Hindi] आज अनायासे आपण एकत्र जमलो आहोत म्हणून सहजयोगाबद्दल आपण जास्त समजून घेऊया. सहजयोग हा साऱ्या मानवजातीच्या भल्यासाठी आहे आणि तुम्ही लोक त्याचे माध्यम आहात. तुमच्यावर अर्थातच खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जर झाडाला किंवा दगडाला व्हायब्रेशन्स दिल्या तर त्या प्रवाहित होऊ शकत नाहीत, कार्यान्वित होऊ शकत नाहीत तर तुमच्याच श्रद्धेमधून व कार्यामधून त्या प्रवाहित होणार असतात. सहजमध्ये एक प्रकारचा दोष आहे तो म्हणजे तो सहजच प्राप्त होण्यासारखा आहे पण त्याला सांभाळणे तितकेच कठीण आहे. कारण आपण पोकळीत राहत नाही किंवा फक्त आध्यात्मिक वातावरणात राहत नाही तर तऱ्हेतऱ्हेच्या वातावरणात व लोकांमध्ये आपण राहतो. आपल्या स्वत:च्याही बऱ्याच उपाधी असतात आणि त्यांना आपण चिकटून असतो. म्हणून सहजयोगात आपण शुद्ध बनणे व ही शुद्धता आपल्या अंतरंगात रुजवणे हे कार्य आपल्याला करायचे आहे. शक्तीचे वाहक असणारे माध्यम शुद्ध हवेच. उदा.विजेची तार खराब असेल तर वीज प्रवाहित होणार नाही किंवा पाण्याच्या पाईपमध्ये कचरा असेल तर नळामधून पाणी येणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य पसरवणाऱ्या नसा शुद्ध असल्या पाहिजेत आणि ही जबाबदारी तुमची स्वत: ची आहे. एरवी तुम्ही माझ्याकडे श्रद्धा, भक्ती मागत राहता पण ही मुख्य गोष्ट तुम्ही स्वत:च समजावून मिळवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे नसा शुद्ध झाल्यावर तुम्हालाच आनंद मिळणार आहे. आपण काही कार्य करत आहोत हे ही तुम्हाला जाणवणार नाही. जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल; सर्व काही सहज घडून येईल. सर्व जमून येईल, योग्य प्रकारचे लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करतील. इतके की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कसे एका वरच्या स्तरावर येत आहोत. Read More …

Birthday Puja, Sahaja Yoga me pragati ki Teen Yuktiyaan New Delhi (India)

Janm Diwas Puja Date 30th March 1990 : Place Delhi : Type Puja आज नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे, यासाठी साऱ्या सृष्टीला गौरीजींनी पवित्रतेने न्हाऊन काढले आणि त्यानंतरच साऱ्या सृष्टीची रचना झाली. तर, जीवनामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य हे आहे, की आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वात उच्च गोष्ट समजणे, पण पवित्र याचा अर्थ असा नव्हे, की आंघोळ करून शूचिर्भूत होऊन, सफाई करून आपल्या शरीराला ठीक करणे, तर आपल्या हृदयाला स्वच्छ केले पाहिजे. हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे क्रोध आणि मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा जे पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्र्याचे दुसरे नाव आहे निव्व्याज्य प्रेम. ते प्रेम जे सतत वाहत असते आणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे, की ते सतत वाहत आहे आणि ज्यावेळी ते वाहत नाही त्यावेळी ते चिंतीत (अस्वस्थ) होते, तर पवित्र याचा अर्थ असा की आपण आपल्या हृदयाला प्रेमाने भरून टाका. क्रोधाने नव्हे. क्रोध आपला शत्रू आहे, पण तो विश्वासाचा शत्रू आहे. जगात जेवढी युद्धे झाली, जेवढी हानी झाली, ती सर्व सामूहिक क्रोधाची कारणे आहेत. क्रोधासाठी कारणे अनेक असतात, ‘मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते.’ प्रत्येक क्रोध कोणते तरी कारण शोधू शकतो. युद्धासारख्या भयानक गोष्टीसुद्धा क्रोधापासून उपजतात. Read More …

Adi Shakti Puja, Detachment Rahuri (India)

Adi Shakti Puja, “Detachment”, Rahuri (India), 11 December 1988. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता आपल्या सहजयोग्यांना सांगायचं म्हणजे असं आहे, की ह्या मंडळींपासून आपल्याला पुष्कळसं काही शिकायचं आहे. मी अजून ह्यांना सांगितलं की गळ्यात हार घालतात ते घालू नका. ही काही खूप मोठी चूक नाही. जरी हार घातले तरी काय झालं. त्यांना काय माहिती आहे ह्याबद्दल. पण आपण सहजयोगामध्ये काय करतो, ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती म्हणजे अशी, की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे. आपली मुलंबाळे सांभाळली पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदार चरितानां वसुधैव कुट्म्बकम्, म्हटलेले आहे. ते उदार चरित्र कुठे आहे? आता सगळ्यांचं इथे असं म्हणणं आहे, की माताजी, आश्रमाला तुम्ही इथे जागा द्या. आश्रम घ्या. अहो, पण त्याच्यात राहणार कोण? ते आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा देते. तर म्हणे माताजी, तुम्ही रहाल. म्हणजे मी तिथे आश्रमात राहणार आहे ? मला आश्रमात घालता का तुम्ही? माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहजयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे ? मला तर सगळं मिळालेच आहे. मी आहेच ती. तेव्हा म्हणे तुमच्या राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करतोय. म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देईन. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला.. त्यासाठी पैसे दिले, सगळे काही झालं. तिथे रहायलाच कोणी तयार नाही. पैसे देऊन कोणी रहायला तयार नाही. हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण, की आपल्याला काही सवयी झालेल्या आहेत. त्यातली Read More …

We should have patience, sweetness and genuineness, Evening Program Ganapatipule (India)

Talk to yogis, India Tour. Ganapatipule (India), 3 January 1988. I hope you are all very comfortable now and that you are enjoying the food as well. [Applause] Also we are approaching the fag end of our tour. This tour was arranged, as you know, like a journey through your Sushumna Nadi at different, different points different, different Chakras. In the same way we have passed through various places and now we have reached Ganapatipule where we have to get our Sahasrara fully drenched with blessings of Shri Ganesh. As you know Sahaja Yoga is a very subtler happening within us. It’s a very subtler happening and this subtler happening gives you sensitivity to Divine joy. When you start getting the Divine joy you don’t care for any comforts, you don’t care for all worldly type of pleasure giving things. To you, this becomes the most important thing and the only thing. Apart from that you start seeing the truth as it is. When I say you start seeing the truth many people can misuse this word. I’ve seen many people saying that they can decide things on vibrations and they have decided certain things on vibrations. But they commit mistakes. That means they have not yet grown up to that state where they can decide on vibrations. So nobody should arbitrarily decide but consult the collective, especially your leaders to find out if whatever decision you have taken, whatever you have thought of, is it all right or not. Read More …

A Sinless Life Ganapatipule (India)

Talk on New Year’s Day, Ganapatipule (India), 1 January 1988. Happy New Year to you all! May God bless you this year with all His divine powers. May all the choicest flowers of joy and happiness be showered upon you. May God give you wisdom to become great Sahaja Yogis, so that a new world can be created beautifully out of you. Very happy to meet you all today here. First day, I am sure there must have been lots of inconveniences. But Sahaja Yogis don’t feel any inconvenience. It’s important that you all are here, should meet each other, talk to each other about Sahaja Yoga. Try to understand what’s going on in the other parts of the world. There are certain problems which arise sometimes when you don’t listen to Me. So whatever I have said about swimming, the timings, please keep to it. We have to give up our old conditionings, I mean, we have to start a new life of understanding and wisdom. Today is a day when we should decide, take some vows in our hearts, what we want to do for our future, for Sahaja Yoga, for building of our lives. You know all the programs we have. Tomorrow we’ll be giving you the final list of the people who are getting married. And, also you should meet people whom you are getting married to. Talk to them and find out about them. Today I don’t want to say much. They say whatever you Read More …

Talk on Marriage and Nirvikalpa Kolhapur (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. त्यांनी जात-पात पाहिली नाही, की शहाणवच कुळी असलं पाहिजे, की अमुकच असलं पाहिजे. असं काही पाहिलं नाही. त्यावेळेला जेव्हा इतके वर्षापूर्वी गागाभट्टांना इथे येऊन त्यांना राज्याभिषेक द्यावा लागला, जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवलं , की तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा नाही. तेव्हा तुमची तेव्हा ह्या कोणतीही जात असेना का, तुम्ही आज सहजयोगी झालात, तुमची जात बदलली. तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म ‘विश्व निर्मल धर्म’ आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे, त्यामुळे तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळं काही गेलं. पण हे भूत अजून काही गेलेलं नाही. तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी . दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिओ, नाहीतर काही करो. हंडा घेवो नाहीतर काही करो. मग ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे. मग तुम्ही सहजयोगी कसे ? मग सहजयोग सोडा तुम्ही. तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकता का ? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल ह्यांना मार खावा लागला. हे लोक ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणखीन आम्ही काहीच असं करत नाही असे उभे राहिले. त्यांनी Read More …

Puja, Attention on Quality Rahuri (India)

Become Beautiful Wands Of Vibrations Date 21st December 1987: Place Rahuri Type Puja हे नरकात होते. त्या नरकातून निघून स्वगात बसलेत आणि तुम्ही पृथ्वीतलावर होते ते नरकात चालले. काहीतरी अद्वितीय केल्याशिवाय तुम्ही सहजयोगी होऊ शकत नाही. कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्तांनी सांगितले आहे, की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाही. नुसतं स्वत:चं महत्त्व स्वत:च मिरवायचं सगळीकडे आणि स्वत:ला फार मोठ समजायचं, की आम्ही हे केलं आणि आम्ही ते केलं. त्याला काही अर्थ नाही. स्वत:चा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. जे आता हा मंडपच उभारला. तो सहजयोग्यांनी उभारला पाहिजे. मला चालतच नाही दूसर्यांनी उभारलेला, सहजयोगी नाहीत. माझ्या डोक्यावर छत्र धरलं आहे तुम्ही. माझ्या डोक्यावरती गंगासुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं आहे मी. गंगेला तुम्ही माझ्या डोक्यावर चढवलं तर तुम्ही गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेले म्हणून. तर तुम्हाला मी डोक्यावर बसून वाट्टेल त्याने माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय! वाट्टेल त्याने मेहनत करायची का? हे सगळं ठेवलेले आहे, म्हणून सहजयोग्यांनीच केलेल्या मेहनतीलाच मी पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्याने माझं डोकं जड होऊन जातं. हे सगळे मंडप वरगैरे तुम्ही स्वत: बांधायला पाहिजे. तुम्ही सहजयोगी आहात. त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो, इथे अजंठ्याची लेणी बघा, दहा पिढ्यांमध्ये बांधली आहेत. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. दहा पिढ्यांमध्ये एका पिढीनंतर दूसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कशी दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल! तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठेपण. सगळी हाताने मेहनत केली. तुम्हाला साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं! त्यांच्यासमोर बुद्ध Read More …

Puja, Complete Your Realization Aurangabad (India)

Puja in Aurangabad (India), 19 December 1987. English Part I’m sorry I was dealing with some newspaper people, journalists, and they came very late, whatever it is. I found them to be very sensible and very understanding. All of us have come to Aurangabad, and it seems this place is full of vibrations. Maybe here Shalivahana has ruled in this area, but also there have been many saints who were born on this side of Maharashtra, and they perpetuated dharma. They always talked about self-realization. Dharma gives you the balance. It gives you the establishment into proper behavior, proper understanding, proper living, but it doesn’t give you the completion of your journey. It doesn’t give you the satisfaction of reaching the destination. And your personality is still incomplete. So, one has to have the experience of the spirit. As I was discussing with them today, I told them that those who do not have the experience of the spirit, are not only incomplete, but are limited people. So whatever they see, or whatever they know, or whatever they criticize, is limited. As in English we say that “hate the sin and not the sinner.” Like many people who find something wrong with Christianity start blaming Christ. Christ did not create Christianity, first of all. He did not create Christianity. He did not create Christians. So, there is no relationship between the two. As you know, recently, they have found out the books written by Thomas, the disciple of Christ who Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 21st March 1987 : Place Mumbai Puja Type Speech Language Marathi आणि माझी सर्वांना विनंती आहे, की राष्ट्रभाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये एक समत्व आहे. अर्थात् मराठी भाषेसारखी आध्यात्मिक भाषा आज तरी प्रचलित नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रभाषा ही शिकली पाहिजे. कारण आपले जे इतर बंधू आहेत, जसे तामीळचे लोक आहेत किंवा बांग्लादेश, बांगला भाषा बोलणारे लोक आहेत किंवा इतर देशातले जे लोक आहेत, त्या लोकांचे जे काही विचार आहेत, ते सगळे आधी हिंदी भाषेत देऊयात, इंग्लिश भाषेत जाऊ दे. कारण आपल्या संस्कृतीत आणि इंग्लिश संस्कृतीत फार तफावत आहे. तेव्हा ती आधी हिंदीतच फोफावी लागते. जरी आपली मातृभाषा कोणतीही असली, तरी हिंदी भाषा ही शिकली पाहिजे. मग त्यापासून तुम्ही इतर संस्कृत वरगैरे सगळे शिकू शकता. पण आधी हिंदी भाषा शिकली पाहिजे. सगळे फारेनर्स आता हिंदी भाषा शिकत आहेत आणि मला म्हणतात, ‘माताजी, ह्या लोकांना तरी हिंदी येतं ! मराठी लोकांना तर हिंदी येतच नाही. मग त्यांच्याशी कसं बोलायचं?’ म्हणजे त्यांनी चौदा भाषा शिकायच्या का? आता आपलं विश्वाचं कार्य आहे. आता राष्ट्रभाषेचे तसेच धिंडवडे निघालेले आहेत. म्हणजे त्यांनीच काढलेले आहेत. निदान आपण तरी महाराष्ट्रात त्याला नीटपणे सजवलं पाहिजे. मी राष्ट्राभिमान म्हणून म्हणत नाही. पण मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नाही. हिंदी भाषेशिवाय ही संस्कृती आपण जगभर कशी पसरवू शकतो? एक तर सगळ्यांना मराठी भाषा शिका म्हणून म्हणावं लागेल. तसं काही जमायचं नाही. पण आता हिंदी भाषा तरी शिकली पाहिजे. महाराष्ट्रीयन लोकांना कठीण नाहीये हिंदी भाषा शिकणं! ती शिकली तर बरं होईल. तसं महाराष्ट्रात फिरत असतांना मी मराठीतच बोलत असते आणि अध्यात्माला फार पोषक आहे, हे सर्व जरी Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shakti and Shri Jesus Mumbai (India)

Advice (Hindi) “Shri Kundalini Shakti and Shri Jesus Christ”. Hinduja Auditorium, Bombay (India), 27 September 1979. [Translation from Hindi to Marathi] ‘श्री कुंडलिनी शक्ती आणि श्री येशु ख्रिस्त’ हा विषय फारच मनोरंजक व आकर्षक असून सामान्य लोकांसाठी एक अभिनव विषय आहे कारण की आजपर्यंत कधीही कोणीही श्री येशु ख्रिस्ताचा संबंध कुंडलिनी शक्तीशी लावलेला नाही. धर्माच्या विराट वृक्षावर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारच्या भाषांमध्ये अनेक प्रकारचे पुष्परूपी साधु-संत होऊन गेले. ह्या विभूत्तींचा आपापसात काय संबंध होता ते फक्त त्या विराट वृक्षालाच माहीत आहे. जेथे जेथे पुष्परूपी साधु-संत झाले तेथे तेथे त्यांनी धर्माचा सुगंध पसरविला. परंतु आसपासच्या लोकांना या सुगंधाचे किंवा साधु-संतांचे महत्त्व समजले नाही. तेव्हा एखाद्या संताचा संबंध आदिशक्तीशी असू शकतो किंवा नाही ह्याची जाणीव इतरजनांना असणे दूरच. मी ज्या स्थितीवरून आपणास हे सांगत आहे ती स्थिती आपणास प्राप्त झाल्यास वरील गोष्टीची अनुभूती आपणास येईल. कारण मी जे आपणास सांगत आहे हे सत्य आहे किंवा नाही हे जाणण्याचे तंत्र सध्या आपणाकडे नाही किंवा सत्य काय आहे ह्याची सिद्धता आपणाकडे सध्या नाही. तोपर्यंत आपले शारीरिक यंत्र वरील गोष्ट पडताळून पहाण्यास परिपूर्ण नसते. परंतु ज्यावेळी आपले शारीरिक यंत्र सत्याशी जोडले जाते, त्यावेळी आपण वरील गोष्टीचा पडताळा घेऊ शकतो.. याचाच अर्थ प्रथम आपण सहजयोगात येऊन ‘पार’ होणे आवश्यक आहे. ‘पार’ झाल्यानंतर आपल्या हातातून चैतन्य लहरी वाहू लागतात. एखादी गोष्ट सत्य असल्यास आपल्या हातात थंड थंड चैतन्य लहरींचे तरंग येऊ लागतात व असत्य असेल तर गरम लहरी येतात. अशा तऱ्हेने प्रयोग करून आपण एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे जाणू शकतो. ख्रिश्चन मंडळी श्री येशु ख्रिस्ताबद्दल जे जाणतात ते ‘बायबल’ ह्या ग्रंथामुळे. ‘बायबल’ हा ग्रंथ Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच्या या पुण्यभूमीत,  अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे, तेंव्हा गणेशाचे महात्म्य काय आहे, या अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नसतात याचे मला फार आश्चर्य वाटते. कदाचित जे सर्व काही समजत होते, ज्यांना सगळे काही माहीत होते असे जे मोठेमोठे साधुसंत ह्या आपल्या संतभूमीवर झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार. किंवा त्यांचे कोणी ऐकून घेतले नसेल, पण याबद्दल सांगावे तितके थोडे आहे आणि एकाच्या जागी सात भाषणे जरी ठेवली असली, तरीसुद्धा श्री गणेशाबद्दल बोलतांना मला ती पुरणार नाहीत.  आजचा सुमुहर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादि आहे म्हणजे ज्यावेळेला या सृष्टीची रचना झाली, अनेकदा. एकाच वेळी सृष्टीची रचना झालेली नाही तर ती अनेकदा झालेली आहे, जेंव्हा या सृष्टीची रचना  झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी लागली. घट म्हणजे काय? हे अत्यंत सूक्ष्मात समजले पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जी एक स्थिती, परमेश्वराचे वास्तव्य असते, त्याला आपण इंग्लिशमध्ये entropy म्हणू.  जेंव्हा काहीही हालचाल नसते.  त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर ‘परमेश्वराला’ येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा समावते.  आता काहीतरी संसारामध्ये सृजन केले पाहिजे. क्रिएट केलं पाहिजे.  त्यांना ही इच्छा का होते? ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणे माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. अशा पुष्कळशा गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण Read More …

Seminar in Dole Rahuri (India)

1979-0227 Seminar Dhule , Maharashtra  [ 1 ] ही पुण्यभूमी आहे. राऊल बाई सारख्या योगिनी जिथे वास करतात, ती भूमी आम्हाला फार पूजनीय आहे. तसेच राहुरी चे धुमाळ साहेब जे आपल्या समोर आज भाषण देत होते, त्यांनीसुद्धा क्रांती घडवून आणलेली आहे खेड्यापाड्यातून. त्यांच्याबरोबर राहुरीहून अनेक सहजयोगी आलेले आहेत.  आणि एक एक हिऱ्यासारखे तासलेले सुंदर सहजयोगी आहेत. हे किती विद्वान आहेत आणि किती परमेश्वरतत्वाबद्दल जाणतात हे जर बघायचं असलं तर त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा करून बघितली पाहिजे. सहजयोग म्हणजे सहज, सह म्हणजे आपल्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. सहजयोग हा एक महायोग आहे. हा आपल्याबरोबर जन्मलेला आहे. [ 2 ]   असे हात करून बसा, कुंडलिनी जागृत व्हायची तर असे हात करून बसा साधे, टोप्या जरा काढा, काळे कारगोते असतील तर काढून घ्या, म्हणजे बरोबरच होईल ते काळे. काही गळ्यात माळाबीळा असतील तर काढून ठेवलेल्या बऱ्या, कारण त्याने रुकते, कुंडलिनी तिथे थांबते.  आता आपल्यामध्ये कुंडलिनी ही संस्था आहे असं अनादी काळापासून लोकांनी सांगितलेलं आहे. विशेष करून आदिशंकराचार्यानी, मार्केंडेयस्वामींनी त्याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेलं आहे. त्यानंतर कबीर, नानक यांनीसुद्धा याच्यावर विस्तारपूर्वक लिहिलेल आहे. ही तुमची आई आहे आणि आई हे फार पवित्र स्थान आहे. आता फ्रॉईड सारख्या घाणेरड्या माणसाने आपल्या आईशी घाणेरडा संबंध ठेऊन आणि फारच घाणेरडी स्थिती काढलेली आहे. आणि त्यामुळे आज पाश्चिमात्य देशामध्ये त्यांची जितकी हानी झालीये ती जाऊन बघावी आणि मग आश्चर्य वाटत कि ह्या राक्षसांनी, हिटलरनी तर नुसता लोकांचा शिरच्छेद केला पण याने सगळ्यांची ही कुंडलिनीच फिरवून टाकलेली आहे कारण कुंडलिनी ही आई आहे आणि ती पवित्र आई आहे. आईचं पवित्रपण भारतीय माणसाला सांगायला नको. जे लोक आईचं पवित्रपण जाणत नाही त्यांना सहजयोग लाभू शकत Read More …

Puja Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९ आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, की ‘सत्यं वदेत, हितं वदेत आणि प्रियं वदेत’ म्हणजे जे आत्म्याला हितकारक आहे, हित म्हणजे आत्म्याचा संतोष. ते जरी अप्रिय असले तरी शेवटी ते प्रिय होते आणि ते सत्य असते. समजा, उद्या जर एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि त्याने येऊन असे विचारले, की अमका मनुष्य इथे लपलेला आहे का ? आणि हातात सुरा घेऊन आलेला आहे. तर राजवाड्यांनी काय सांगावे त्याला. ‘तो लपलेला आहे’ हे सत्य आहे. ते त्याला सांगायचे का, की ‘तो इथे लपलेला आहे.’ किंवा ते सत्य जर सांगितले तर ते ठीक होईल का, ते हितकारक होईल का? असा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा पहिली गोष्ट त्याला अशी की ही अनाधिकार चेष्टा आहे. त्यांनी जर म्हटले, की ‘त्या माणसाचा मला पत्ता सांगा,’ तर ‘हा कोण विचारणारा?’ तुम्हाला विचारणारा हा कोण? ही अनाधिकार चेष्टा आहे. तेव्हा कोणत्याही अनाधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे, हे काही हितकारी होणारच नाही मुळी . अधिकार असावा लागतो. तसेच सहजयोगात आहे. जरी आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि ही आमची हार्दिक इच्छा आहे, की सगळ्यांनी सहजयोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या Read More …

Sahajayogyanshi Hitguj Pune (India)

सहजयोग्यांशी हितगुज पुणे, २५ फेब्रुवारी १९७९ आता सगळी इथे सहजयोगी मंडळी जमलेली आहेत. त्यामुळे हितगुज आहे आणि भाषण नाही. हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे, जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायचे. आणि पूर्वी असे म्हणत असत, की ‘सत्यं वदेत, प्रियं वदेत.’ यांची सांगड कशी घालायची? सत्य बोलायचे तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचे तर ते सत्यच असले पाहिजे असे नाही. याची सांगड बसायची म्हणजे फार कठीण काम. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा दुवा काढला आणि सांगितले, की ‘सत्यं वदेत, हितं वदेत आणि प्रियं वदेत’ म्हणजे जे आत्म्याला हितकारक आहे, हित म्हणजे आत्म्याचा संतोष. ते जरी अप्रिय असले तरी शेवटी ते प्रिय होते आणि ते सत्य असते. समजा, उद्या जर एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि त्याने येऊन असे विचारले, की अमका मनुष्य इथे लपलेला आहे का ? आणि हातात सुरा घेऊन आलेला आहे. तर राजवाड्यांनी काय सांगावे त्याला. ‘तो लपलेला आहे’ हे सत्य आहे. ते त्याला सांगायचे का, की ‘तो इथे लपलेला आहे.’ किंवा ते सत्य जर सांगितले तर ते ठीक होईल का, ते हितकारक होईल का? असा प्रश्न पुढे उभा राहतो. तेव्हा पहिली गोष्ट त्याला अशी की ही अनाधिकार चेष्टा आहे. त्यांनी जर म्हटले, की ‘त्या माणसाचा मला पत्ता सांगा,’ तर ‘हा कोण विचारणारा?’ तुम्हाला विचारणारा हा कोण? ही अनाधिकार चेष्टा आहे. तेव्हा कोणत्याही अनाधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे, हे काही हितकारी होणारच नाही मुळी . अधिकार असावा लागतो. तसेच सहजयोगात आहे. जरी आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि ही आमची हार्दिक इच्छा आहे, की सगळ्यांनी सहजयोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या Read More …

Parmeswarane Aplya Samrajyat Bolavale Aahe Pune (India)

परमेश्वराने आपल्या साम्राज्यात बोलवले आहे पुणे, २५/२/१९७९ पुण्यनगरीतीलपुण्यनगरीतील नागरिकांना माझे त्रिवार वंदन. आपल्यापुढे विस्तारपूर्वक सहजयोगाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण आपण परमेश्वराच्या दृष्टीने जर विचार केला तर माणसापेक्षा. परमेश्वराने ही सृष्टी रचली. आपल्याला माहीतच आहे, इथे पुष्कळ विद्वान लोक आहेत, की कशी पृथ्वीची रचना ओंकारापासून झाली आणि किती त्याच्यावर परमेश्वरानी मेहनत घेतली आहे. त्यापुढे त्या पृथ्वीवर वनस्पती, त्यानंतर अनेक प्राणी निर्माण करून त्यांची हजारो वर्षे जोपासना केली. त्या जोपासनेतून हळूहळू त्यांची निवड करून त्यांना या अशा स्थितीला आणून पोहोचवलंय जिथे आपण त्या प्राण्यांना मात करून आज मानव प्राणी तयार केलेला पहातो आहोत. याचं महत्त्व परमेश्वराला जास्त आहे, १ म्हणजे हा मानव किती मेहनतीने तयार केलेला आहे. हजारो वर्षे याच्यावर मेहनत करून आणि निवडसुद्धा फारच मेहनतीने करून याला आपल्याला जो गरजेंद्र मोक्षाचा प्रसंग माहिती आहे, तिथेसुद्धा मॅमल्स सारखे जे मोठे मोठे प्राणी होते त्यातले काहीतरी वाचवलेच पाहिजेत, पैकी हत्ती हा प्राणी हे देवीचे वाहन आहे. आपल्याला माहीत आहे, ते लक्ष्मीचे वाहन आहे, तसेच गणेशाचे स्वरूपही आहे त्याच्यात. तेव्हा ते वाचवण्यासाठी त्यांनी गजेंद्रमोक्षामधे जे अवतरण घेतलं, श्री विष्णूंनी त्याचं रक्षण केलं, ते काहीच नव्हतं, जे पुढे जाऊन देवीला आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, आपल्याला माहिती आहे त्यांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेकदा या संसारात जन्म घेतला आणि किती तरी राक्षसांचं पारिपत्य केलं, त्यांच्याशी लढाया केल्या आणि आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे. ही मेहनत हजारो वर्षे चालली. चौदा हजार वर्षांपूर्वी सुद्धा लढाया होत होत्या. त्यानंतर श्रीरामांच्या काळातसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आठ हजार वर्षाचा काळ म्हटला पाहिजे, जेव्हा श्रीराम या संसारात पुरुषोत्तम म्हणून वावरत होते. त्यांना ते कार्य करायचं होतं, की एक आदर्श राजा कसा असला पाहिजे, त्याची Read More …

Seminar Day 3 Rahuri (India)

विज्ञान म्हणजे सत्याला शोधून काढणे राहुरी, २४/२/१९७९ अनुभव किंवा स्वत:चे विचार सांगितलेले आहेत. वेळ कमी असल्यामुळे ते काही तुम्हाला पूर्णपणे सांगू शकले नाहीत. तरी सुद्धा एक गोष्ट त्यात लक्षात घेतली पाहिजे, की यांच्या भाषणामध्ये आपल्या भारताची केवढी थोरवी यांनी सांगितली आहे. आता आपल्याला ज्या पाश्चिमात्य लोकांनी सहजयोगाबद्दल स्वत:चे इतकेच नव्हे, तर आपल्या देशामध्ये जी मर्यादा आहे, जी श्रद्धा आहे आणि धर्म आहे, किती महत्त्वाची आणि विशेष वस्तू आपल्याजवळ आहे, त्यावर त्यांनी फार भर दिलेला आहे. कारण हे सगळे त्यांनी घालविलेले आहे. परदेशात मी अनेकदा गेले होते पूर्वी, पण तिथली स्थिती इतकी भयंकर आणि गंभीर असेल अशी मला मुळीच कल्पना नव्हती. जेव्हा आमच्या साहेबांची निवडणूक झाली आणि मला लंडनला जावे लागले, तिथे रहावेच लागले, त्यानंतर मी तिथे सहजयोगाच्या कार्याला सुरुवात केली म्हणण्यापेक्षा याच लोकांनी सुरुवात करवली कारण यांना लोकांकडून कळले होते, की माताजी इथे आलेल्या आहेत. तेव्हा त्या समाजाशी संबंध आल्यावर मला आश्चर्य वाटले, की सायन्सच्या दमावर हे लोक सत्यापासून किती दूर गेलेले आहेत. सायन्स म्हणजे सत्याला शोधून काढणे. सायनंस म्हणजे जे काही असेल त्यातील खरे काय आहे ते शोधून काढणे, पण यांचे सायन्स जे काही असेल ते सत्यापासून दूर का निघाले, ते आपण बारकाईने समजावून घेतले पाहिजे. मनुष्य जसा आहे, तसा अपूर्ण आहे. तुम्ही अजून पूर्णत्वाला पोहोचलेले नाहीत मुळी. जसे हे मशीन आहे. त्याला मी मेन्सला लावले नाही तर याचा काहीच उपयोग नाही किंवा याला काहीही अर्थ लागत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे आहे. जोपर्यंत माणसाची आत्म्याशी ओळख झालेली नसते, जोपर्यंत त्याचा संबंध परमेश्वराशी आलेला नसतो, जोपर्यंत त्याचे आत्म्याचे डोळे उघडलेले नसतात, तोपर्यंत तो अपूर्णच आहे. त्यामुळे सत्य काय आहे ते लक्षात Read More …

Seminar Ahmednagar (India)

कुण्डलिनी शक्ती आणि सात चक्र अहमदनगर, २३ फेब्रुवारी १९७९ अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला आमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले फार आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काही तरी मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. ही सगळी तयारी अनादिकालापासून मानवामध्ये झालेली आहे.  मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोहोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला. तो अमिबापासून या दशेला का आला ? एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली? तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे की नाही ? ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेले आहे त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळे माहीत झालेलं आहे? परमेश्वराबद्दल जे त्याच्यामध्ये कुतूहल आहे, काहीतरी उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे. परमात्मा म्हणून कोणी तरी शक्ती संसारात आहे, असं प्रत्येक मानवाला वाटत असतं. ते त्यानं कसं जाणलं, कुठून जाणलं? त्याबद्दल त्याने पुष्कळ पुस्तकं लिहिली आहेत, संतांची पूजा केलेली आहे. त्रास ही दिलेला आहे. अशा या मानवाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. वायफळ कुणीतरी इतकी मेहनत केलेली नसणार. निदान परमेश्वराने तरी केलेली नसणार. जर समजा आम्ही हे एक यंत्र बनवलं. त्याचा आधी पाया घातला, त्याची सबंध व्यवस्था केली तर सहजच आपण विचाराल की ‘माताजी, कोणासाठी? काय आहे हे? काय बनवणं चालवलंय तुम्ही? याच्यातून काय होणार?’ हे सगळं Read More …

Seminar (India)

Aapan Dharma Janla Pahije Date 19th January 1979 : Place Kalwe Seminar & Meeting Type Speech Language Marathi लंडनहुन मुंबईला यायचं म्हणजे फार बरं वाटतं कारण लंडन फारच गजबजाटातलं आणखीन अत्यंत यांत्रिक शहर आहे आणि तिथल्या लोकांची एकंदर प्रवृत्तिसुद्धा यांत्रिक झालेली आहे. मग मुंबईहन कळव्याला यायचं की त्याहून बरं वाटतं. कारण शहरातून जी स्थिती आज लोकांच्या मनाची आणि श्रद्धेची होत आहे ती पाहून असं वाटतं की कुठूनतरी दोन-चार मंडळी खऱ्या श्रद्धेची असतील अशा ठिकाणी जावं . आमचा सहजयोग हा खेड्यापाड्यातून होणार आहे , शहरातून होणार नाही. हे मागे मी बोलले होते आणि त्याची प्रचिती आम्हाला येते. आता तुम्ही मुंबईच्या जरा जवळ असल्यामुळे थोडंबहूुत शहराचं वातावरण आलं आहे तुमच्यात, पण तरीसुद्धा ह्या प्रसन्न, नैसग्गिक वातावरणात रहाणाऱ्या लोकांना परमेश्वराची जाणीव सतत असते. परमेश्वर आहे किंवा नाही त्याबद्दल आपण आजपर्यंत जे काही वाचत आलो होतो त्यात काही अर्थ आहे की उगीचच आपल्याला काहीतरी भुलवण्यासाठी म्हणून लोकांनी हे ग्रंथ लिहिले आहेत, हे पडताळून पहाण्याची आणि त्याची पूर्णपणे प्रचिती घेण्याची ही वेळ आहे कारण आपण देवाच्या नावावर अनेक उपटसुंभ लोकच बघत असतो. देवळात गेलं की तुम्हाला पैसे द्यावे लागतात. दोन पैसे द्या तेव्हा तुम्ही जवळ राहणार. एखादा श्रीमंत मनुष्य जर देवळात आला की लगेच पहिल्यांदा त्याच्या गळ्यात हार, सगळ्यात मोठा हार देवाचा त्याला घातला जातो. जसं काही देवालासुद्धा पैशाचं फार समजतं ! त्यातनं जर तो एखाद्या मोठ्या मोटारीतून आला तर त्याला आणखीनच फार जवळ समजलं जातं. पण देव हा भावाचा भूकेला आहे. त्याला पैसा, अडका आणि बाहेरची श्रीमंती समजत नाही. त्याला श्रद्धेची श्रीमंती समजते. तो श्रद्धेचा भुकेला आहे आणि श्रद्धाच त्याला ओळखू शकते. आता श्रद्धेचा Read More …

The Creation New Delhi (India)

“The Creation”, New Delhi (India), 20 February 1977 [Marathi translation from English] आज आपण ‘सृजन’ बद्दल बोलण्याचे ठरविले आहे. पण आपल्या आयोजकांना आपल्याला खडू व फळा देणे जमले नाही. मला माहीत नाही, चित्र काढल्याशिवाय ते समजावण्याचा मी प्रयत्न करते. हा फार अवघड विषय आहे, पण तुम्हाला समजेल असा तो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण सृष्टीची निर्मिती (सृजन) अशा अवघड विषयाकडे पूर्ण लक्ष द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करते. तुमच्यापैकी पुष्कळांना चैतन्य लहरी समजतात हा आजचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि एवढेच नाही, तर तुम्हाला याचे ज्ञान व समज (अनुभव) आहे, की चैतन्य लहरी विचार करू शकतात व प्रेम करू शकतात. हा फार मोठा आशीर्वाद आहे. अर्थात्‌ तुमच्या पैकी काहींना ते मिळाले नाही. पण ज्यांना मिळालंय त्यांना हे ज्ञान आहे, की चैतन्य लहरी (व्हायब्रेशन्स) संघटित करू शकतात, कारण ते कुंडलिनी चढवतात. जिथे कमतरता तिथे दयेने जातात, त्या भागात जातात जिथे कमतरता (व्हायब्रेशन्सची) आहे. त्यांना समजते, त्यांचे वैश्‍विक स्वरूप, त्यांचा वैश्‍विक स्वभाव, ती संघटित करतात आणि ती प्रेम करतात. ती तुमच्या प्रश्‍नांना उत्तरे देतात, तुम्ही प्रश्‍न विचारता तेव्हा त्यांच्याकडून उत्तरे मिळतात. ती जिवंत व्हायब्रेशन्स आहेत. ती व्हायब्रेशन्स परमेश्वरी (डिव्हाईन)’ कडून येतात. या परमेश्वराला ब्रह्म, ब्रह्म तत्त्व – ब्रह्माचे तत्त्व असे म्हणतात. आपल्याला असे म्हणता येईल, की सृष्टीचे सृजन ही चिरंतन प्रक्रिया आहे, म्हणजे बीजाचा वृक्ष होतो आणि तो वृक्ष पुन्हा बीज होतो व ते बीज वृक्ष होते. हे होतच असते. हे चिरंतन आहे. याला सुरूवात नाही आणि याचा शेवटही होऊ शकत नाही. हे होतच राहते. म्हणून याच्या अस्तित्वाच्या विविध अवस्था असू शकतात. तुम्ही असे म्हणू शकता, की ‘असण्याची’ अवस्था. तेव्हा प्रथम Read More …

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche Mumbai (India)

Sahajayoga Baddal Sarvanna Sangayche,Bombay (India), 27 May 1976. सहजयोगावर एका सहजयोग्याने म्हंटले आहे की , ‘माताजी, तुम्ही आधी कळस मग पाया देता, आधी तुम्ही आमचा कळस बांधता.’ आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे. म्हणजे समाधीला आत्तापर्यंत साधारणपणे जे काही लोकांनी केलं, मेहनत केली वगैरे वरगैरे, योग म्हणा, हठयोग म्हणा, काही राजयोग म्हणा, जे काही केलं असेल ते, अर्थात त्याच्यातले काही खरे आणि काही खोटे असे सगळे मिळून त्या लोकांनी जे काही साधलं किंवा केलं, ती पद्धत म्हणजे ज्याला द्राविडी प्राणायाम म्हणतात, त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त त्रास आहे आणि ते काढायचं, तर त्याला एक पुराण लागेल सगळें काही सांगायचं म्हटलं. अर्थात् एक पुस्तक पातंजली योगशास्त्र एवढं मोठं आहे. ते एक हं मात्र. बाकी अनेक असतील अशी. आणि पुष्कळ असे शास्त्र वगैरे लिहिले गेले, मनुष्याने अध्यात्म कसा घडवून आणायचा आणि अध्यात्माने वर कसं यायचं आणि उंची कशी गाठायची, वगैरे वरगैरे अनेक पुराणं आपल्याकडे लिहिली गेलेली आहेत. त्यापैकी काही खरी आहेत, काही खोटी आहेत. काही घोटाळे आहेत आणि काही म्हणजे मूर्खपणा पण आहे. त्यात कारण असं, की जे शोधणारे होते, ते मुळात आंधळे होते. पण शोधता शोधता जेव्हा त्यांना सापडलं, तेव्हा डोळस झाले आणि डोळस झाल्यावर आम्ही आंधळेपणातून हे सगळे काही मिळविलेले आहे, तेव्हा तसंच सगळ्यांनी मिळवावं किंवा तसेच मिळेल. अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली. ते बरोबरच आहे. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे. आता असं आहे की जो मनुष्य बैलगाडीतून नेहमी प्रवास करतो, त्याला एरोप्लेनच्या प्रवासाची काय कल्पना येणार! कितीही कितीही कल्पना केली तरी त्याला काय कल्पना येणार? तसंच आहे आमच्या या सहजयोगाचं! अध्यात्मामध्ये ज्यांनी नुसतं आपल्या तंगड्या तोडल्या, डोक्यावर उभे राहिले वर्षानुवर्ष. श्वासोच्छवास Read More …

Nirvicharita Mumbai (India)

Nirvicharita “VIC Date 6th April 1976 : Place Mumbai Seminar & Meeting Type Speech Language Marathi हे सहजयोगाचे कार्य किती विशेष आहे! मी आपल्याला आधी सांगितलं की गणपतीसारखं एक नवीन मॉडेल मी तयार केलं आहे तुमचं. एक नवीन पद्धत आहे ही. ती विशेष रूपाने तुम्ही ग्रहण केली कारण तुम्ही त्या ग्रहणाला योग्य आहात. अयोग्य दान नाही दिलेलं मी. तुमची योग्यता क्षणोक्षणी, पदोपदी मी जाणते. फक्त एवढे म्हणता येईल की आईच्या प्रेमामुळे फारच हळुवारपणे, सांभाळून, प्रेमाने, अत्यंत काळजीपूर्वक हे कार्य झालेले आहे. पण आपल्यामध्ये ती योग्यता नसती, तर हे झालं नसतं. पैकी आज हजारो मंडळी इकडे-तिकडे धावत आहेत. वेड लागलं आहे लोकांना. विचार करीत नाही, की आजपर्यंत शास्त्रांमध्ये जे सांगितलेले आहे, अनादी कालापासून, जे मोठ्या-मोठ्या त्त्ववेत्त्ांनी आणि कृष्णासारख्या महान परमेश्वराने, ते त्याचीच एक साक्ष आहे. त्यांच्या तोंडूनही ज्या गोष्टी निघाल्या, त्या सगळ्यांना एकीकडे फेकून ह्या लोकांनी ज्या नवीन नवीन पद्धतींनी लोकांना आपल्या जाळ्यात फसवलेले आहे त्याबद्दल कोणताही विचार हे लोक का करीत नाहीत ? कोणत्याही शास्त्रात, मग ते मोहम्मद साहेबांनी लिहिलेले असो, किंवा ख्रिस्तांनी सांगितलेले असो, किंवा कृष्णाने गीता म्हटलेली असो, सगळ्यामध्ये जे तत्त्व आहे, की तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेला स्व जाणला पाहिजे आणि त्याची शक्ती तुम्हाला लाभते. पण असे म्हटल्याबरोबर लोक त्यापासून परावृत्त होतात. कारण सत्याच्या गोष्टी केल्या की लोकांना ते पटतच नाही मुळी. असत्य असलं की ते लगेच पटतं आणि असत्याच्या मार्गावर चालण्याची सवय पडल्यामुळे ते रुचतंही जास्त. असत्याची कास धरून मानवाने शेवटी गाठलंय काय? तर नरकाची पायरी. नरक गतीला उतरायची स्थिती आलेली आहे. हे कलियुगात दिसतंय आपल्याला चहुकडे. बापाला मुलाचा विश्वास नाही, मुलाला आईचा विश्वास नाही. संसारात सगळा Read More …

Public Program Rahuri (India)

1976-0314, Public Program,Rahuri  महात्मा फुले विद्यापीठाचे प्राध्यापक साहेब, प्राध्यापक वर्ग तसेच परदेशातून आलेले अनेक सहज योगी आणि सर्वात मान्य म्हणजे उद्याचे नागरिक तुम्ही सर्व विद्यार्थी वर्ग यांना माझा नमस्कार. (टाळ्यांचा आवाज)सगळ्यात आधी क्षमा मागायला पाहिजे कारण दैवी कार्य आणि मनुष्याचं कार्य याचा मेळ कधीकधी बसत नसतो आणि प्रत्येक गोष्टीची बंधनं असतात. तुमचं घड्याळ एका प्रकारे चालतं आणि परमेश्वराचं दुसऱ्या प्रकारे चालत आहे तेव्हा त्याचा मेळ बसला पाहिजे. मी पुष्कळ प्रयत्न करते कधीकधी असा उशीर होऊन जातो. नंतर त्यांची कारणं कळल्यावर आपण मला खरंच क्षमा करा. असो आपल्यापुढे आज (अस्पष्ट) भाषण दिलंय (अस्पष्ट) एक तास, त्यानंतर एक तास चव्हाण साहेब बोलले असं त्यांनी मला सांगितलं. विषय बोलण्याचा नाहीच आहे मुळी किंवा वाद-विवाद करण्याचा सुद्धा नाहीय. तुम्ही एक साधी गोष्ट की आपण अमिबा पासून माणसं झालोत तर आपण कोणता वाद-विवाद केला, कोणती पुस्तकं वाचली, कोणचं शास्त्र त्यात घातलत, कोणचं आपण टेक्निक लावलत. आणि इतकी आपलं टेक्निक शास्त्रीय ज्ञान वाढल्यावर सुद्धा आज सायन्स अगदी पराकोटीला आपण पोहोचलोय म्हणतो तरीसुद्धा विध्वंसक शक्ती मात्र आपल्याजवळ खूप हातात आलेली आहे पण अशी अजून एकही आपण किमया गाठली नाही की ज्यांनी आपण जिवंत कार्य करू शकतो. आता आपण शेतकरी आहात आपण बघता की बी-बियाणं दिसायला जिवंत दिसत नाहीत पण पृथ्वीच्या पोटात घातल्या बरोबर तिला जिवंतपणा येतो आणि जिवंत कार्य घडू लागते, घडतं, ते करू शकत नाही, आपण त्यासाठी जर समजा एखाद्या बी- बियाणा पुढे मी लेक्चर दिलं तर ते येईल का? ते जमेल का? त्याला अंकुर फुटेल? सगळी जेवढी जिवंत कार्य आहेत ती आपोआप त्याला इंग्लिश मध्ये स्पाँट्यानुएस्ली म्हणतात ते. त्याच्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करतो म्हटलं तर तो नुसता स्वतःचा एक मनाचा विचार किंवा एक मनाचं समाधान Read More …

Public Program Bharatiya Vidya Bhavan, Mumbai (India)

१७ मार्च १९७५              काही विशेष रूपाने मी आपल्याला सांगितलेले आहे , आणि ज्या चैतन्य  स्वरूपा ची गोष्ट प्रत्येक धर्मात प्रत्येक वेळेला सांगितलं आहे त्यात पण आपल्यामधून भरपूर लोक चांगलेच ओळखून आहे. त्यावर पण जेव्हा मी काई म्हणते कि तुम्ही संसारा मध्ये राहता आणि तुम्ही हाथ योग कडे नाही गेले पाहिजे  भरपूर लोक माझ्यावर नाराज होतात, आणि जेव्हा मी काई म्हणते कि ह्या सन्यास च्या मागे तुम्ही तुमचा वेळ वाया नका घालायू आणि त्यांना हवं (१.१५)याना हवं कि सांसारिक लोक ____ हवं , असं तर मी सर्व च धर्म बद्दल सांगायची इच्छा ठेवते. एवढंच नाही पण जे काई त्यात अर्धवट पण माहिती होत आहे त्याला मला पूर्ण करायचं आहे . मी कधीच कोणत्या शाश्र आणि धर्माच्या विरोधात असूच शकत नाही पण अशाश्र च्या नक्कीच विरोधात आहे आणि अधर्मच्या. आणि जिथे कोणती गोष्ट अधर्म होते आणि अशाश्र होते ,एका आईच्या नात्याने मला आपल्याला स्पष्ट्पणे सांगावं लागेल. नंतर आपल्याला सुध्दा अनुभव येईल कि मी जे म्हणते ते एकदम सत्य आहे आणि प्रात्यक्षिक आहे.             जेव्हा तुम्ही ह्या तुमच्या हातातून वाहणाऱ्या चैतन्य चा उपयोग कराल तेव्हा तुम्ही समजून घ्याल कि मी जे काई म्हणते एकदम सत्य म्हणजे आणि पूर्णपणे आपल्या हित साठी आणि तुमच्या उथ्थान च्या मार्गासाठी व्यवस्तीत रूपाने प्रकाशित होण्यासाठी सांगते. हीच एक शोचनीय स्थिती आहे कि मानव सत्य ला घ्यायला खूप वेळ लावतो. जर खोट्टं कुणी  पसरवत असेल तर मानव ते खूप लवकर स्वीकारतो किंवा अशी काही गोष्ट ज्याने त्याच्यातल्या कमीपनाला प्रगल्भता मिळेल किंवा त्याच्या अहंकाराला पुष्टी मिळेल तर मानव त्याला खूप लवकर Read More …

Talk, Bholepana ani nirvicharitecha killa Mumbai (India)

[Marathi transcript ver 1] भोळेपणा आणि निर्विचारीतेचा किल्ला मुंबई, २१ जनवरी १९७५ काल भारतीय विद्या भवनमध्ये परमेश्वराच्या तीन शक्तींबद्दल मी सांगितले होते आपल्याला. पुष्कळ लोक असे म्हणाले, की आमच्या डोक्यावरून गेले. तेव्हा हृदयातून जाणारे काही तरी सांगायला पाहिजे. डोक्यातून काही आतमध्ये खरंच घुसत नाही. जे लोक फार मोठे शास्त्रज्ञ, शिकलेले, सुशिक्षित आणखीन आचार्य वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये सहजयोग घुसत नाही. असे मी पुष्कळ विद्वान पाहिले आणि एक साधारण मनुष्य ज्याला धड कपडा नाही, खायला नाही अशा माणसामध्ये सहजयोग सहजच घुसतो. शिक्षणाने परमेश्वर जाणता येत नाही. असे म्हटल्याबरोबर सगळे शिक्षणाचे अधिकारी मला मारायला उठतील. शिक्षणाने संसारातील सर्व लौकिक गोष्टी जाणता येतील. पण परमेश्वराच्या कार्याला जाणण्यासाठी दुसरे मार्ग पाहिजेत. दूसरे गुण पाहिजेत. पैकी मुख्य गुण म्हणजे भोळेपणा. ज्याला इंग्लिश भाषेमध्ये इनोसन्स म्हणतात. लहान मुलांमध्ये असतो बघा भोळेपणा. काही काही मोठी माणसेपण फार भोळी असतात हो! ठगविली जातात ती. अशा लोकांना लोक त्रासही जास्त देतात. छळतातही फार ! म्हणूनच सगळ्या संत लोकांना फार छळलंय या जगाने आणि आज ही छळताहेत. याचेच रडू येते कधी, कधी. आपण जी मंडळी पार झालात ती सुद्धा संत मंडळी आहात. संतच नव्हे तर देवता स्वरूप आहात. आज देवतांच्या ठिकाणी तुम्ही आलात. हीच देवता हेच ते देव ज्यांचे वर्णन आपण पुराणात वरगैरे वाचले असेल. हे देव जागवले गेलेत आपल्यामध्ये. हे देवपण आलेले आहे आपल्यामध्ये. तेव्हा आ देवपणामध्ये भूते ही पिंगा घालणारच! आणि तुम्हाला त्रास देणार. देऊ देत. कुठवर त्रास देणार? जिथप्यंत त्यांची मर्यादा आहे. त्यांची मर्यादा फक्त तीन आयामात, तीन डायमेंशनमध्ये चालते. म्हणजे जे काही लौकिक आहे तिकडे. फार तर तुमच्या शरीराला अपघात करतील. करू दे. शरीर हे नश्वरच आहे. Read More …

Guru Purnima, Sahaja Yoga a New Discovery Mumbai (India)

Guru Purnima Puja. Mumbay (India), 1 June 1972. Translation from Hindi to Marathi सहजयोगाचा एक अभिनव असा आविष्कार होत आहे. जे सत्य आहे जे ‘आहेच’ त्याचा आविष्कार कसा होतो हे समजून घ्या. कोलंबस हिंदुस्थान शोधायला बाहेर पडला. तेव्हाही हिंदुस्थान होताच; नसला तर शोध कशाचा घ्यायचा? तसेच सहजयोग होताच, पण त्याचा अनुभव आता तुम्हाला घ्यायचा आहे, काही जणांना मिळालाही आहे. सहजयोग हा त्या परमतत्त्वाकडे जाण्याचा एक मार्ग आहे; एक व्यवस्था आहे; एक प्रणाली आहे; मानवजातीला उन्नत स्थितीवर येण्यासाठी जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी ही एक व्यवस्था आहे. ज्यामध्ये मानव या विश्वव्यापी चैतन्याची ओळख करून घेऊ शकेल आणि ते परमचैतन्य आत्मसात करू शकेल. याच परमतत्त्वाकडून सारी सृष्टी चालवली जात आहे व त्याच्यातूनच मानव जन्माला आला आहे. फार प्राचीन कालापासून याचा शोध चालत आला आहे. त्याच्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे; प्रेम, पैसा, सत्ता अशा विविध क्षेत्रांमध्ये मानवाचा हा शोध चलत आला आहे. तरीही मानव अजून स्वतःला नीट ओळखू शकला नाही. तसे पाहिले तर हा एक आनंदाचा शोध आहे. पण मग कुणी संपत्ती मिळाली की आनंद मिळेल असे समजून पैशाच्या मागे लागले, पण त्याचबरोबर ज्यांनी अमाप संपत्ती मिळवली त्यांनाही दुःखापासून सुटका मिळाली नाही; काही लोकांनी तर या निराशेपोटी आत्महत्या करून घेतली. असे करता करता कुठेच आनंद मिळाला नाही म्हणून लोक धर्माच्या मागे लागले. धर्माच्या पाठीमागे लागल्यावरही त्यांचे चित्त बाहेरच्या गोष्टींमधेच अडकून राहिले आणि त्यांना खरी ‘स्व’ (स्वतःची) ओळख झाली नाही. हे असे का होते? कारण माणूस खऱ्या स्व बद्दल अपरिचीत असतो आणि त्यामुळे त्या ‘स्व’ चे वैभव, ऐश्वर्य, महानता, प्रेम हे त्याच्या लक्षातच येत नाही. त्या अवर्णनीय आनंदाला तो पारखाच राहतो. मानव स्वतःच आनंदस्वरूप Read More …

Talk About Nizamuddin (date and location unknown) (Location Unknown)

1970-0101 Talk About Nizamuddin       ह्या जमिनीवर हजरत निजामुद्दीन गाडले गेले.ते खूप मोठे नबी आणि सुफी होते.आणि त्यांच्या सर्व कवितांमध्ये त्यांनी अश्या सूचक गोष्टी वापरल्या आहेत, आणि जे लोक त्या क्षमतेचे आहेत ते लोक कधी कुठला धर्म हा वेगळा आहे असा विचार नाही करत. खरतर मोहम्मद साहेब कधी फक्त इस्लाम बद्दल च नाही बोलले,ते सर्व च लोकांबद्दल बोल्ले जे जे त्यांच्या समोर आले, जसे कि, अब्राहम, मोझेस,क्रिस्त ,आणि मी महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या आई बद्दल कुराण मध्ये बोलले.           त्यांनी स्वतःला कधी वेगळं नाही समजून घेतलं.आणि कधी च वेगळे नही होते, कारण त्यांना माहिती होत कि हे सर्व महान लोक ह्या पृथ्वी वर लोकांना मुक्ती देण्यासाठी आले आहे.           खूप आधी ,माझ्या लग्नाच्या आधी मी येथे आली होती,मी च ती पहिली होती जिने त्यांच्या वर फुलांची चादर अर्पण केली.आणि माझे बाबा पण खूप मोठे  आत्मासाक्षात्कारी  होते.माझ्या बाबानी च मला सांगितलं कि , हजारात निजामुद्दीन आणि त्यांचे शिष्य खुसरो ,हे खूप महान कवी होते.त्यांच्या हिंदी मध्ये खूप साऱ्या कविता आहेत. ते एक महान कवी म्हणून ओळखले जात होते ,आणि त्यांनीच हे प्रतीकात्मक गाणं लिहलं आहे.जर बघायला गेलो तर ते मुस्लिम.टिळक हे हिंदू . आणि माझ्या बाबतील ,जेव्हा मला सत्य कळलं मी तर पूर्व सोडून च दिल .आणि हे खूप गहन आणि खूप सुंदर पाने स्प्ष्टीले आहेत.तरिकी ते एका मुस्लिम धर्मा मध्ये जन्मले होते ,पण ते सर्व धर्मा मध्ये खरे पण पाहत होते . आणि हे सुफी सर्वीकडे आहे ,मला तर आचार्य वाटले कि ते तुर्की मध्ये पण आहेत.आणखी ते ट्युनिसिर यामध्ये आपण आहेत ,सर्व Read More …