Diwali Puja, 1st Day, Dhanteras New Delhi (India)

Diwali [Translation from Hindi to Marathi] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) ही एक अद्भूत गोष्ट आहे की, आपल्या आतमध्ये असणाऱ्या शक्तीला आपण ओळखत नाही. मात्र आपण आपल्या विचारात अडकून पडतो. आपल्या आत बरीच शक्ती आहे, जी परमात्म्याने आपल्याला दिलेली आहे. आपण सर्व परमात्मा, परमात्मा म्हणतो पण सर्व हे ओळखतात, तो प्रत्येक जागी आहे, प्रत्येकात राहतो आणि सर्व ठिकाणी तो बघत असतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे तो फारच प्रेमपूर्वक बघत असतो. आता तुम्ही सर्व लोक त्याच्या दरबारात आलेले आहात. हे मला सांगताना अत्यंत आनंद होतो की इतकी वर्षे दिल्लीत सहजयोग जोरात चालू आहे. याचा अर्थ असा होतो की दिल्लीच्या लोकांत मोठी श्रद्धा आहे आणि सामुदायिकता पण आहे. नाहीतर मी इतक्या ठिकाणी गेले, तिथे एवढा प्रचार झाला तरी मी म्हणू शकत नाही की लोकांमध्ये इतकी जाणीव निर्माण झाली आहे. तुम्ही सर्वांनी सहजयोग पूर्ण तऱ्हेने समजून घेतला पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद मिळणे हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही सहजाला समजून घेतले तर सहज तुम्हाला समजून घेईल. तो ओळखतो की तुमची काय लायकी आहे आणि तुम्हाला काय हवय. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की बऱ्याच वर्षांपूर्वी दिल्लीला आले होते आणि मी विचार केला होता इथे दिल्लीत सहजयोगाचा चांगला जम बसेल. काय कारण होते ? इथे केंद्र सरकार आले आणि कलकत्त्याहून आले. काय कारण होते ? इथे सरकारी नोकर आले आणि सरकारचे काम इथे सुरु झाले. हे सर्व तुम्हा लोकांचा एकत्र आणण्याचा परिणाम होता. कुठेही जा, तुम्ही एवढ्या लोकांना एकत्र आणू शकत नाही. जितके काम दिल्लीत होते, तेवढे इतर ठिकाणी होऊ शकत नाही. हा माझा अनुभव आहे आणि मी हाच विचार करते की, दिल्लीमध्ये अशी कोणती विशेषता Read More …

Shri Bhoomi Devi Puja New Delhi (India)

Nirmal Dham Bhoomi Pujan Date 7th April 2000: Noida Place Public Program Type Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] करण्याचा माझा मानस होता. तीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. ज्या स्त्रिया निराधार आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, आपल्या मुलांचे व्यवस्थित पालन-पोषण करता येईल, समजात त्यांना प्रतिष्ठा मिळेल अशी व्यवस्था व शिक्षण या ठिकाणी झाले पाहिजे. अर्थात एक संस्था सुरू सत्याच्या शोधात असणार्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. एवढ्या टूरवरच्या ठिकाणी आपण लोक या कार्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने याल असे मला चाटत नव्हते. पण तुम्हा सर्वांना इथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. एकदा आम्ही गाडीने प्रोग्रामसाठी जात असताना दौलताबादजवळ आमची गाडी नादुरुस्त झाली. म्हणून मी केली म्हणजे सर्व काही झाले असे नाही. कारण हा एक खाली उतरले. खरे तर हीहि एक ‘सहज चीच घटना म्हणायचे, खाली उतरल्यावर मला तिथे साधारण शंभर एक होण्यासाठी साया समाजाचेच परिवर्तन व्हायला हवे, महिला व त्यांच्याबरोबरची मुले एका नळावर पाणी भरत असल्याचे दिसले. त्यांच्या अवतारावरून त्यांची परिस्थिति घरातील स्त्री व मुलांबाळाचे बाबतीतील त्यांचे कर्तव्य पार हलाखीची असल्याचे माझ्या लक्षात आले. चौकशी केल्यावर मला समजले की त्या सर्व बायका घटरस्फोटित मुसलमान एरवी इथल्या स्त्रियांची हालत सुधारणे शक्य नाही. इथे होत्या व मुलांसह अत्यंत हालाखीत जगत होत्या व दगड फोडण्याचे दुष्काळी मजुरी-कामावर लागल्या होत्या. राहण्यासाठी पडकी कच्ची घरे होती. अंगावर धड कपड़े पूर्वी कदाचित सती जाणे त्या पसंत करीत असाव्यात. नव्हते. त्यांची सर्व दशा पाहिल्यावर मला रडूच आवरेना. माझ्या मनात आले की आपल्या देशाची पुरातन संस्कृति व स्त्रियांमध्ये चारित्र्याची पवित्रता असूनही लोकांची अशी (पति) तर ‘मी म्हणेन Read More …

Gudi Padwa/Navaratri Puja Talk (India)

Gudi Padwa Puja Date 5th April 2000: Noida Place Type Puja Speech [Marathi translation from Hindi talk, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari] भारतामध्ये दोन नवरात्र मानले जातात. आजचा निगडित असतात व गणेश-चक्रालाही ही देवीच ठीक माीई या चैत्र-नवरात्रीचा पहिला दिवस महत्त्वाचा मानला ठेवते. जातो कारण या दिवशी देवीने “शैलपुत्री’ नाव पहिला जन्म हिमालयाच्या उत्तुंग पर्वतात घेतला. म्हणूनच तिला “शैलपुत्री” असे नाव पडले. तिचे कार्य त्या क्षेत्रातच होते. कथा अशी सांगतात की दक्ष राजाने केलेल्या हवनासाठी शिवांना न बोलवल्यामुळे तिने तेथे जाऊन अग्निकुंडात समर्पण करून घेतले, त्यानंतर शिव तिच्या मृत शरीराला घेऊन जात असतांना तिच्या शरीराचे तुकडे ठिकठिकाणी पडले व त्या त्या ठिकाणी शैलपुत्रीच्या आधी आदिशक्तीचे गाय-स्वरूपात अवतरण झाले. म्हणूनच गाईला इथे पवित्र मानतात. पण आदिशक्तीचे मनुष्य रूपात कलियुगोतच अवतरण झाले, कारण ती काळाची गरज होती. आधीच्या द्वापार, त्रेता इ. युगांमध्ये त्याची गरज नव्हती. पण घोर कलियुगात संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराचे महान कार्य होणार असल्यामुळे तिला सर्व चक्रे, सर्व शक्ति व सर्व देवता बरोबर घेऊन यावे लागले. त्याशिवाय हे कार्य होण्यासारखे नव्हते आणि त्याचबरोबर तिला तिची शक्ति प्रस्थापित झाली. उदा. विध्याचल. त्यानंतर संहारक शक्तीचे अवतरण झाले; काही शक्ति महामाया-रूप धारण करावे लागले. तसे देवीने डाव्या बाजूवर तर काही उजव्या बाजूवर (गायत्री, महाकाली, महासरस्वती, दुर्गा, शाकभरा देवी अशी सावित्री) निर्माण केल्या गेल्या पण संहारक शक्ति अनेक रूपे कालानुरूप धारण केली पण महामाया स्वरूपात या सर्व शक्ति तिचे. अंगप्रत्यंग म्हणून होत्याच. तसे प्रत्येक अवतरणाच्या पाठीशी देवीचीच मध्यावर आहे. दुर्गामाता स्वरूपात हुदयचक्रावर तिची स्थापना झाली. संहारक शक्तीचे कार्य म्हणजे जे लोक द दुसर्यांना त्रास देतात, त्यांच्यावर आघात करतात किंवा संकटात टाकतात अशांचा संहार करणे Read More …

Public Program Pune (India)

Public Program, Pune, India 7th March 2000 हिंदी भाषण आता मराठीत बोलते, कारण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही. ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा आहे. ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडिया मध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे मराठी भाषेसारखी भाषा नाही हे मला कबुल आहे. फारच उत्तम भाषा आहे. त्या बद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपलीही भाषा वाढेल. आणि लोक समजतील की मराठी भाषा काय आहे. पण जर आपण त्याच्या बरोबर सोवळं पाळलं आणि फक्त आम्ही मराठी शिकणार; मग या देशाचे आपण एक नागरिक आहात, त्यातली जी राष्ट्रभाषा आहे तिला आत्मसात केलं पाहिजे. अहो आम्ही काय मराठी भाषेतच शिकलो, मराठी शाळेत शिकलो आणि मराठी मिडीयम मध्ये शिकलो. पण आमचे वडील मोठे भारी देशभक्त होते. त्यांनी सांगितलं, काही नाही, हिंदी आलीच पाहिजे. आणि मलाही व्यासंगच फार होताना, तेंव्हा आमच्या घरी सगळ्यांना हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. तेंव्हा आपल्याकडे सुद्धा एक असं व्रत करावं की आम्ही हिंदी भाषा ही शिकून घेऊ. हि माझी विनंती आहे. आज आपल्या देशाचे अनेक तुकडे झालेले पाहून फार दुःख वाटतं. आणि विशेषतः महाराष्ट्रात, ती देशभक्ती नाही; जशी पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांसारखे झाले जिथे थोर पुरुष तिथे ती देशभक्ती नाही. पैशाकडे लक्ष, कसेही करून पैशाकडे लक्ष घालायचं. पैशाने सुखी झालेला मनुष्य मी आज तरी पाहिलेला नाही. पैसे आले म्हणजे मग सगळे प्रकार सुरू. दारू प्या मग आणखीन करा, हे करा, जेवढे पैसेवाले लोकं आहेत त्यातला एखादाच मी दानवीर पहिला. Read More …

Eve Of Mahashivaratri Puja, Evening Program Pune (India)

अफ्रीका ,वहा पर सात हजार सहजयोगी मुसलमान  है | टर्की में करीबन दो अढाही हजार और उससे आगे और एक देश है उसे  कहते है आइवरी  कोस्ट                वहाँपे करीबन तीन हजार मुसलमान सहजयोगी है | मै हैरान हूँ ,मैंने कहा की तुम मुसलमान क्यों हो गए तो कहने लगे की यहाँ पर फ्रेंच लोग थे | उनमे तो धर्म हमने कोई देखा ही नहीं | तो हमने सोचा चलो मुसलमान हो जाए |  तो उसमें भी न रुके  |                       अब इस कदर वो दौड़ पड़े है कुछ समजमें नहीं आता | हर जगह ,और अपने देश में तो बहोत जरुरी है समजना की ये दी हुई चीज है परमात्माकी अपने  अंदर है | आपकी अपनी शक्ति है | उसे जगालो ,उसके लिए कुछ पैसे वैसे नहीं देना पड़ता | कुछ नहीं है ,सच्चाई से उसको पाना है | बेकारकी कोईभी चीज के पीछे पड़के अपना सत्यानास करना | और आपको अपने बालबच्चोंका भी सोचना है | सो गलत रास्तेसे लोगोको हटाना पड़ेगा | बोहोत जरुरी है कि ये बड़ा भारी पुण्य का आशीष का काम है | अब मै तो जहाँतक कोशिश होती है वो मैं कर रही हूँ | अब तुम लोग भी करो | खुश रहो | 

Talk, Paane ke baad dena chaahiye swagat samaroh New Delhi (India)

1999-12-05 Talk in Delhi: Paane ke baad dena chaahiye swagat samaroh [Marathi translation Hindi talk, (excerpt) scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याच्या प्रकाशात आलेल्या सर्व सहजयोग्यांना नमस्कार, इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला इथे एकत्र जमलेले पाहून माझे हृदय खरोखरच भरून आले आहे. शिवाय माझ्या जीवितकालामध्ये एवढे सहजयोगी जगभर झाले याचेही मला मोठे समाधान आहे. सत्य जाणल्याशिवाय मानवी जीवन अर्थशून्य आहे; तो प्रकाश मिळत नाही तोपर्यंत मनुष्य आयुष्यभर भरकटतच राहतो. पण मी हा माणसाचा दोष समजत नाही. दोष असेल तर त्याला व्यापून राहिलेल्या अंधाराचा. म्हणूनच सहजयोगामधून प्रकाश मिळाला, तो सहजयोग आणखी खूप लोकांना द्या, तुम्हाला जे मिळाले आहे ते इतरांना वाटा म्हणजे सहजयोग आणखी पसरेल, त्याच्यातूनच या भूतलावर एक सुंदर शांतीचा स्वर्ग निर्माण होणार आहे. ही तुमचीच जबाबदारी आहे. भारतात आता है कार्य खूप जोराने चालले आहेच. तशी ही भारतभूमि योगभूमि आहे आणि इथे हे होणार हे खूप पूर्वीचं भाकित केले गेले आहे. भारत ही माझी मातृभूमि आहे आणि इथे येण्याचा आनंद शब्दांतून व्यक्त करणे अवघड आहे. तुम्हा सर्वाना भेटल्यावर तर हा आनंद द्विगुणित होतो. त्यातूनच इथे खन्या अर्थाने स्मरमय अर्थात आत्म्याचे राज्य प्रस्थापित होईल; स्व-तंत्राचा अर्थही तोच व हेच आता इथे घटित झाले आहे. म्हणूनच तुमच्यासारखे आणखी लोक सहजयोगात आणण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे. नुकतेच मला समजले की काही परदेशीय सहजयोगी इथे आले आणि सहजयोगाचे कार्य करण्यासाठी ओरिसात गेले; तिथे नऊ कंद्रे त्यांनी सुरू अलिकडे झालेल्या भीषण वादळात तेथील सहजयोग्याचे कसलेही नुकसान झाले नाही. तुर्कस्थानमध्येही (तिथे दोन हजार सहजयोगी आहेत) भूकप झाला तेव्हा तेथील सर्व सहजयोगी वाचले, कुणालाही कसलाही अपाय झाला नाही. तेव्हा सहजयोगात तुमचे पूर्ण संरक्षण होणार आहे हा मी Read More …

Public Program Pune (India)

Velechi Hallk 25th March 1999 Date : Place Pune Public Program Type सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार! पूर्वी अनेकवेळा मी आपल्याला सत्याबद्दल सांगितलं होतं. सत्य काय आहे ? सत्य आणि असत्य यातला फरक कसा ओळखायचा याबद्दल मी आपल्याला बरंच समजावून सांगितलं होतं. आधी या पुण्यात या पुण्यपट्टणम मध्ये पण आपण सत्य का शोधतो ते बघितलं पाहिजे. आज या कलियुगात अनेक असे प्रकार दिसून येतात की मनुष्य घाबरून जातो. त्याला समजत नाही की हे सर्व काय चालले आहे आणि ही कलियुगाची विशेषता आहे की मनुष्याला भ्रांती पडते. त्याला भ्रांती होते आणि त्या भ्रांतीतून तो बावचळून जातो. घाबरून जातो. त्याला समजत नाही की सत्य काय आहे, मी कुठे चाललोय, जग कुठे चाललंय असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात डोकावतात. हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे पण सर्व जगात आहे. सर्व जगाला या कलीच्या महिम्याची फार पूर्णपणे जाणीव झालेली आहे. सांगायचं म्हणजे नल आणि दमयंती यांचा जो विरह केला गेला तो कलीने केला आणि एकदा हा कली नलाच्या हाती सापडला. त्यांनी सांगितलं की मी तुझा सर्वनाश करून टाकतो म्हणजे कोणालाच तुझा उपद्रव व्हायला नको, काही त्रास व्हायला नको तर तेव्हा कलीने त्याला सांगितलं की हे बघ की माझं आधी तू माहात्म्य ऐक आणि ते ऐकल्यावर जर मला मारायचे असेल तर मारून टाक. तर त्यांनी (नलाने) सांगितलं तुझं काय महत्त्व आहे? काय महत्त्व आहे तुझें? तर त्यावर त्याने (कलीने) सांगितले की माझं हे महत्त्व आहे की जेव्हा माझं राज्य येईल म्हणजे जेव्हा कलियुग येईल तेव्हा लोक भ्रांतीत पडतील. हे खरं आहे. पण त्यामुळेच त्यांच्यामध्ये अशी उत्कट इच्छा होईल की आपण शोधून काढावं की मनुष्याचं Read More …

Awakening Of Kundalini Is Not A Ritual Shivaji Park, Mumbai (India)

1999-02-20 Awakening Of Kundalini Is Not A Ritual, Mumbai, India Hindi सत्य को खोजने वाले आप सभी साधकों को मेरा प्रणाम.  सत्य के और हमारी नज़र नही होती, इसकी क्या वजह है? क्यों हम सत्य को पसंद नहीं करते और आत्मसात नहीं करते? उसकी नज़र एक ही चीज़ से खत्म हो जाये तो बातकी जाए, पर ये तो दुनिया ऐसी हो गई की गलत-सलत चीज़ों पे ही नज़र जाती है। सो इस पर यही कहना है कि ये घोर कलियुग है, भयंकर कलियुग है। हमने जो लोग देखे वो बहुत निराले थे और आज जो लोग दिखाई दे रहे हैं, वो बहुत ही विक्षिप्त, बहुत ही बिगड़े हुए लोग हैं। और वो बड़े खुशी से बिगड़े हुए हैं, किसी ने उन पे ज़बरदस्ती नही की । तो अपने देश का जो कुछ हाल हो रहा है उसका कारण यही है कि मनुष्य का नीति से पतन हो गया। अब उसके लिए अपने देश में अनेक साधु-संतों ने मेहनत की, बहुत कुछ कहा, समझाया। और खास कर भारतवर्षीयों की विशेषता ये है कि जो कोई साधु-संत बता देते हैं उसको वो बिलकुल मान लेते हैं, उसको किसी तरह से प्रश्ण नही करते। विदेश में ऐसा नही है। विदेश में किसे ने भी कुछ कहा तो उसपे तर्क करने शुरू कर देते है। लेकिन हिंदुस्तान के लोगों की ये विशेषता है कि कोई ग़र साधु-संत उनको कोई बात बताए तो उसे वो निर्विवाद मान लेते है कि ये कह गए है ये हमें करना चाहिए। छोटी से लेकर बड़ी बात तक हम लोग ऐसा करते हैं। ये भारतीय लोगों की Read More …

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja 14th January 1996 Date : Place Pune Type Puja Speech Language Hindi, English and Marathi नम्रता आहे. ह्यांचं असं आहे, की एक अक्षर जर म्हटलं तर तर्क करणं सोडून जे म्हणेन ते. कधी उत्तर म्हणून मी काही ऐकलं नाही. इथे तसं नाही. इथे पट्कन ‘असं नाही. तसं. ‘ आपलं डोकं चालवतील प्रत्येक गोष्टीत. हे लोक एका अक्षराने बोलत नाहीत. माताजी म्हणतील ते शांतपणाने स्वीकारतील. त्यांनी असं कोणतं केलं पुण्य होतं मला समजत नाही. तुम्ही काही कमी पुण्य केलेले नाही, जे या देशात जन्माला आले. पण तो पुण्याचा पेटारा मागेच राहिला. तिकडे बघा कुठे असतो! तो पेटारा उघडला पाहिजे. त्याच्यात बघा स्वत:च स्वरूप म्हणजे कळेल केवढ्या मोठ्या देशात जन्म झाला तुमचा आणि इतिहास तुमचा केवढा उज्वल, किती मोठा! मला कधी कधी वाटतं, की हे मावळे परदेशात जाऊन जन्माला आलेत की काय? त्यांचे मावळ्यांसारखेच आहेत. गुण आणि तिकडचे उपटसुंभ इकडे आलेत की काय? अहो, ब्राझीलमध्ये, अमेरिकेत तर सोडा, पण ब्राझीलमध्ये अशा देशात, की जिथे आपल्यासारख्यांचा कधी संबंध आला नसेल तिथेसुद्धा सहजयोग इतका जोरात पसरला आहे आणि इतके गहरे लोक आहेत. यू.पी.मध्ये ३० आयएएस ऑफिसर्स सहजयोगात आहेत आणि इथे एकाही आयएएस ऑफिसर्सना…, शेपट्या आहेत सगळ्यांना. आधी त्यांच्या शेपट्या पडल्या पाहिजेत, मग माणसात येतील. शिष्टपणा फार. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये भयंकर शिष्टपणा आहे. हा शिष्टपणा जायला पाहिजे. नम्रता नाही. त्यातल्यात पुरुषांपेक्षा बायका जरा जास्त शिष्ठ आहेत. हे जर एकदा झालं आणि घटित झालं, आपली स्वत: ची ओळख जर झाली तर आपोआप मनुष्य नम्र होतो आणि हा शिष्टठपणा जायला पाहिजे. फार आवश्यक आहे. जर महाराष्ट्रीयन लोकांचा इतिहास बघितला, अहो, हा खरच महाराष्ट्र आहे! फार Read More …

Diwali Puja, Sahajyog ke Suruvat (India)

Diwali Puja – Sahajayog Ki Shuruvat Date 29th October 1995 : Place Nargol Puja Type Speech [Marathi translation from Hindi] पंचवीस वर्षापूर्वी मी जेव्हा नारगोलला आले त्यावेळी सहस्त्रार उघडण्याचे माझ्या मनात नव्हते. माझा विचार होता, की अजून थोडे थांबावे आणि मानवाची स्थिती कशी आहे ते पहावे. त्यावेळेस आत्मसाक्षात्कार म्हणजे काय हे समजण्याइतकी त्याची स्थिती नव्हती. जरी पुष्कळ साधुसंतांनी आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितले होते तरीही; महाराष्ट्रात तर हे ज्ञान खूपच पसरले होते. कारण मध्यमार्ग सांगणान्या नाथपंथीयांनी स्वतःच्या उद्धाराचा एक मार्ग सांगितला तो म्हणजे स्वत:ला जाणणे. स्वत:ला ओळखल्याशिवाय तुम्ही काहीही मिळवू शकत नाही हे मला माहीत होते पण त्यावेळी माणसाची स्थिती फार विचित्र असलेली माझ्या पाहण्यात आले होते; खोटया लोकांच्या ते मागे लागले होते. त्या लोकांना नुसते पैसे मिळवायचे होते. सत्य ओळखण्याइतकी मानवाची स्तिती नसते तेव्हा त्याच्याशी सत्याबद्दल बोलणे अवघड होते. लोक माझं का ऐकणार? मला पुन्हा पुन्हा वाटायचे, की माणूस अजून वरच्या स्थितीला यायला हवा. पण मला हे ही दिसत होते, की या कलियुगात माणूस अगदी बेजार झाला आहे. गतजन्मीच्या पापकर्मांमुळे अडचणीत आलेले खूप लोक होते. काही लोक मागल्या जन्मात केलेल्या कर्मांमुळे राक्षस होऊन जन्माला आले आणि ते इतरांना त्रास देण्यांत, उपद्रव देण्यात मग्न होते. याचं त्यांना काही चुकतोयं असंही वाटत नव्हते. मी दोन प्रकारचे लोक पाहिले. एक दसऱ्यांना त्रास देणारे आणि दूसरे असमाधानी व त्रास भोगणारे. यापैकी कोणाकडे लक्ष द्यायचे याचा मी विचार करत होते. जे दूसर्यांना त्रास देत होते त्यांना आपण कोणी विशेष किंवा परिपूर्ण आहोत असे वाटत होते. आपल्याकडून दुसर्यांना त्रास होत आहे एवढेही त्यांना समजत नव्हते. ज्यांना त्रास होत होता ते असहाय असल्यासारखे तो सहन करीत होते. आपल्याला अधिकार Read More …

After Concert Talk (India)

आज सर्व गोष्टींना उशीर झाला .कारण आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे पण सहजयोगात आपण घड्याळ बघत नाही आणि हा हि विचार ठेवत नाही कि काही गोष्टी टाईमशीर होतात .जे सहज घडून येईल तेच अत्यानंद देईल .आता जी गाणी झाली सुरवातीला ती इंग्लिश मध्ये किंवा  आपण असं म्हणू कि पाश्चिमात्य पद्धतीची झाली .आणि तुम्हा सर्वाना एव्हडी आवडली हे एक मोठं मला समाधान वाटलं .नाहीतर इथे सर्व संगीत तज्ञ बसलेले आहेत .आणि ते म्हणतील माताजी तुम्ही हे काय सुरु केलं .पण आपण सर्व प्रकारचे संगीत समजून घेतलं पाहिजे . अर्थात जे नुसतं काहीतरी आज काल  निघालेलं तेच म्हणत नाही मी पण सर्व तह्रेच ,मला  तर वेस्टर्न क्लासिकल संगीताचा फार नाद आहे .तसा साऊथ इंडियन संगीताचा पण म्लाफर नाद आहे .आणि आपला तर आहेच .तेव्हा आपली द्रीष्टी व्यापक करायला पाहिजे .आणि ते बघून मला फार आनंद वाटला कि तुम्ही सर्वानी जे फ्रेंच लोकांनी तुमच्या समोर प्रस्तुत केलं ती गाणी ,त्यातला जो पुरुष होता आफ्रिकेचा तो एक प्रसिद्ध गायक आहे .फार प्रसिद्ध आहे फ्रांस मध्ये .पण आता सहजयोगात आला आणि आता लहान मुलांना सुद्धा शिकवतो आणि आपल्या गाण्या मध्ये सगळे मंत्र म्हणतो .तेव्हा एक मोठी क्रांती झालेली आहे जगा मध्ये .गणपतीला सुद्धा ते मानतात आणि गणपतीची केव्हडी स्तुती करत होते .हि केव्हडी मोठी क्रांती आहे .कि ह्या लोकांना आपल्या देव देवतां न बद्दल इतकं वाटत ,इतकी त्यांची माहिती आहे .तस त्यानी नाटक केलं .हे म्हणजे काय उगीचच त्यांच्यावर मी लादलेलं नाही .मी त्याना कधीही सांगितलं नाही कि असे नाटक करा म्हणून .आधीच नाही मी त्यांच्या जवळ कधीच अशी जबरदस्ती केली नाही कि तुम्ही असल्या तऱ्हेची नाटक करा .पण Read More …

Shri Ganesha Puja (India)

1994-12-31 Shri Ganesha Puja Kalwe English Transcript Today I’m talking about Shri Ganesha. Now we’ll be parting we will be going to our own country and I must congratulate you the way you have come up to the expectations of Shri Ganesha. I’m very happy with you people. I wish Indians would learn a lesson from you that you are the people who don’t have this tradition; you don’t have Shri Ganesha established there. Still somehow you have come up to such a level that I feel very proud of you and all of them should learn a lesson from you.They are going to the Western life, Western style, Western expression of the filth but you people have accepted it and have changed so much that they have to learn a lesson that’s what I’m telling them. It’s a very good lesson for them. First you used to come and learned here what was Sahaja Yoga and was respect, what was respecting yourself but I’m very happy to see this time you all have been a ideal example of Sahaja yogis. You tolerated all kinds of inconveniences and you saw [INAUDIABLE ?] of fort of your spirit not of your body and the way you have been behaving I’m over satisfied. I hope you’ll really grow to your spiritual dimensions and try to bring forth in this dimension in other people of your nationality – very important. You see all the bad points of these people and you see where Read More …

Talk To Yogis Madras (India)

Talk to Sahaja Yogis, Madras 1994-01-17 [Translation in PDF] [Transcript Scanned from Divine Cool Breeze] Today we are lost in the Shabad Jalam We say mantras, we read books, there are Shaivaites and Vaishnavities. All these things to us have been important also because we thought by following these methods, we will achieve our moksha, our last goal. This way I must say that Indians are very alert and basically spiritually minded. They also know what is wrong and what is good. They also know what is dharma and what is not Dharma They will do wrong things. They may take to things which are absolutely against their spiritual life, but in their heart of hearts they all know that this is wrong, but they can’t help it. We have to understand that we are specially blessed by people who were our forefathers who were great seers, saints and incarnations and who gave so much time for the emancipation of our spiritual life. To them material life was not so important. Specially in the South I feel that people are deeply rooted into Dharma. I read about Shalivahana who met Christ once in Kashmir Christ told him that ‘I come from the Country of Malekshas. (Mal-iccha) means desire for filth. Their desire is towards mat not towards purity and I have come here because you people are absolutely Nirmal – Pure. Shalivahan told him ‘Why do you want to come here. You should go and work for those people who Read More …

Mahashivaratri Puja Mumbai (India)

Mahashivaratri Puja Date 19th February 1993 : Place Mumbai Type Puja [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] ि महाशिवरात्री पुजा (दि. १९/२/९३ मुंबई) THIE ु क जिथे सर्व काही आपोआप घडते व कार्यान्वित होते, त्था ठिकाणी भगवान शिवाचे कार्य काय असावे? ते प्रत्येक शिवपूजा फार महान आणि विशेष पूजा असते. शिव तत्वाची प्राप्ती है मानवाचे अंतिम ध्येय असते. शिवतत्व गोष्टीस अवोधितपणात साक्षी असतात, शक्तीने सर्व विश्वाची मानवी युध्दीच्या पलिकडे असून युध्दीने जाणता येणार नाही. आत्मसाक्षात्कार मिळ पर्यंत आत्मा व शिवतत्व यांचे ज्ञान श्री शिवचि कार्य केवळ साक्षी असते एवढेच आहे. त्याच्या होऊ शकत नाही. श्री शिवांच्या नांवाखाली खोटेपणा, मिथळ्व साक्षी स्वरपतत्वामध्यच सर्व काही घटील होते. त्याची दृष्टी आणि अधश्रध्दा निर्माण झाल्या आहेत. आत्मसाक्षात्कारी झाल्या ज्या व्यवतीवर पडते त्या व्यवतीचा उध्दार होतो. त्यांची शिवाय व्यक्तिला भगवान शिवांचे शान होणे अशक्य आहे. कारण त्यांचा तो स्वभावच आहे की त्यांना समजण्यासाठी खेळच आहे. त्यांना मुद्दाम काही कयला लागत नाही. जस व्यवतीला ज्या पालळीवर सर्व संदगुण अंतयमी प्रस्थापित होतील त्या उंची पर्य पोचावे लागते ते निरागस शंकर आहेत असे म्हटले जाते. आजकाल अनेक, बुध्दीवादी लोक निर्माण झाले आहेत. त्यांनी त्यांच्या दुष्ट मनुष्य, निष्पाप, सत्यवचनी आणि न्यायी माणसास बुध्दीच्या भराऱ्या मारताना जो कांही मुखपणा त्यांच्या डोक्यात त्रास देतो त्या वेळी तो सूप रागायतो, त्याचा क्रोध भयंकर शिरला तो ते लिहून काढतात. त्यांच्या मते भगवान कषिवांच्या असतो. हुमार माणूस त्याचा राग शांत करण्यात यशस्वी होतो, अयोधितेला काही महत्व नाही. व्यक्ती जेवढी धूर्त व कारस्थानी परंतु अयोधित मागूस हसंत राहती कारण त्याच्यावर काहीही असेल तेवदी ती अधिक प्रसिध्द होते तर मग असे असताना परिणाम Read More …

Public Program Pune (India)

सत्य को खोजने वाले आप सभी साधकोंको हमारा नमस्कार | माफ करिए जिन लोगोने कहा था की आठ बजे के पहले मत पहुँचयेगा ,जो लोग वाकई में सहजयोग में अपनी जागृती चाहते है वो बैठे रहेंगे और बाकीके चले जाएंगे | एक कारण ये है | दूसरा ये की हम कुछ सहजयोग के बारेमें बताएँगे और कुछ परदेसी लोग आपके सामने गाना गाना चाहते थे  | इस तरह से तीन चार कारणोंकी वजह से जानकर हम धीरे धीरे आए | पर इतने साधकोंको देख करके क्या कहा जाए | इस पूना में बड़ी मेहनत की है और वर्षोसे यहाँ आते थे | क्योंकि शास्त्रोमें इस जगह का नाम पुण्यपट्टनम है | माने पुण्यवान नगरी पर यहाँ इतना कुछ गड़बड़ मामला था जब हम आए | और उसके बाद ऐसे यहाँ गड़बड़ गुरु लोग आ गए | इसके कारण पूना  की जो आध्यात्मिक स्तिति थी वो ख़राब हो गई | बहोतसे लोगोंने हमें सताया भी बहोत है यहाँ पूना में | और उससे कोई हमें हानि नहीं हुई ,किंतु लोगोंकी जरूर हानि हुई | न जाने क्यों सत्य के विरोध में हमेशा कुछ लोग ऐसे खड़े हो जाते है की जिनको पता ही नहीं की सत्य कितना आवश्यक है | जिस कगार पे आज मनुष्य खड़ा है आप जानते है की ये घोर कलियुग है | ऐसा कलियुग तो कभी देखा ही नहीं | और सुना भी नहीं | जैसा आज कल है | कुछ भी  समजमें नहीं आता कोई भी प्रांगण में आप देखे ,राजकरण हो कुछ हो हर चीज़ में आप पते है की एक अजीबसा अँधेरा Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja Date 17th March 1992 : Place Mumbai Puja Type [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] नाही अथवा बुद्धांचा त्यांच्याशी नाही. इतक्या प्रेमाने तुम्ही माझा वाढदिवस साजरा करीत आहात. तुम्हाला तुमच्या आत्म्याचा साक्षात्कार मिळाला आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही घटित झाला आहात आणि तुम्ही काहीतरी मिळविले आहे. मी जी आहे तीच आहे. मला काहीच व्हायचे नव्हते. तुम्हाला तुमच्या आत्यामधून आत्मबोधाची प्राप्ती झाली आहे. ही अतिशय महान गोष्ट आहे. सर्व सहज योगी आता फारच चांगले व धार्मिक झाले आहेत. दुसर्या धर्माच्या लोकांना पाहिले, तर असे दिसते की त्यांच्या धर्माच्या सर्व नियमांचे महत्प्रथासाने ते पालन करतात, उपास करतात, हिमालयांत जातात. डोक्यावर उभे रहातात व इतर अनेक गोष्टी करतात. पण त्यांचा आत्मा प्रकाशित झाला नाही. त्यांच्या गुरुंच्यावर | की इस्लाम आणि मुसलमान लोक यांच्यात फारच फरक आहे. ते लोक देवावर ते विश्वास ठेवतात पण ते गुरुच्या सारखे होण्याचा प्रयतल करतात कां? त्यांच्या गुरुंच्या शक्तीमुळे व गुणामुळे ते प्रकाशित झाले नसल्यास केवळ विश्वास ठेवण्यात काहीही अर्थ नाही. कोणताच धर्म वाईट नसतो. लोक त्याचे कसे आचरण करतात त्यांच्यावर सर्व काही आहे. काही डाव्या बाजूमध्ये तर काही उजव्या बाजूमधे गेले. खिश्चन धर्मातही असेच झाले. त्यांना अंतर्यामी काही शक्ति मिळवायच्या होत्या. म्हणून त्यांनी लोकांना कुसावर चढविले आणि श्री. खिस्तांच्या नावाखाली अनेक प्रकार केले. अजूनही तुम्हाला अझर बैजान मधे हजारो लोकांना कसे मारले ते आमेनियामधे पहायला मिळते. मारतेवेळी ते एका हातांत बायबल ध्यायचे, जणूं काही त्यांच्या बरोबर परमेश्वरच होता, आणि त्यांना वाटते की त्यांच्याच धर्म बरोबर आहे, आणि मुस्लिम लोक वाईट आहेत. मुस्लिम सुद्धा तेच करतात. इस्लाम फारच सुंदर व महान धर्म आहे. मुस्लिम Read More …

Shri Saraswati Puja (India)

Shri Saraswati Puja 3rd February 1992 Date : Place Kolkata Type Puja ह्या कलीयुगात आईला ओळखणे फार कठीण आहे. आपल्या स्वत:च्या आईला आपण जाणू शकत नाही, तर मग मला जाणणे हे त्याहून कठीण आहे. पण ह्या योगभूमीची गहनता तुमच्यामध्ये कार्यरत झाली आहे. ह्या भागातून येणारा कोणताही सहजयोगी अत्यंत गहनतेत जातो, हे मी पाहिले आहे. मला आश्चर्य वाटतं की, जिथे इतकी वर्षे मी घालवली, इतके कार्य केले, तेथील लोक इतके गहन नाहीत. इथल्यासारखी इतकी सुरेख सामूहिकता त्यांच्याकडे नाही. ह्या भूमीचा, विशेष म्हणजे इथलं प्रेम आणि सामूहिकता ही पूर्णत: नि:स्वार्थी आहे, हे बघून मला अत्यंत आनंद होतोय. तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो. महासरस्वतीची इथे उपासना होणे फार महत्त्वाचे आहे. ह्या भूमीला तिने आशीर्वाद दिले आहेत. इथे सर्व काही हिरवेगार आहे, पण ही सरस्वतीची उपासना फार सीमित आहे. इथले कष्ट आणि दारिद्रय यांचे कारण हे आहे. आपल्या कलागुणांची वृद्धी करण्यासाठी किंवा विद्वान बनण्यासाठी इथे सरस्वतीची पूजा केली जाते. इथले लोक फार हुशार आणि अभिमानी आहेत, पण तरीही दारिद्रय कां? तुमच्याहून जास्त पैसा असणाऱ्या माणसाविषयी हेवा का? आपल्याकडे कोणत्या सूत्राची कमतरता आहे, जे आपल्याला मिळवायचे आहे, ते आपण जाणून घेतले पाहिजे. सरस्वतीचे कार्य उजव्या बाजूकडे आहे. ज्यावेळी ती स्वाधिष्ठानवर कार्य करते आणि ते डावीकडे जाते, त्यावेळी कलेची संवेदना वाढीस लागते. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात बंगाल प्रसिद्ध आहे. संगीत, नाट्य, मूर्तिशास्त्र आणि साहित्य या कलाक्षेत्रातील अनेक ख्यातनाम लोक इथे आहेत. कला ही देवाचा प्रकाश आहे. तुम्ही पाहू शकत नाही, पण तिला व्हायब्रेशन्स असतात. जगभराच्या लोकांनी ज्याला दाद दिली आहे आणि जे फार सुरेखरीत्या निर्माण केलेले आहे ते सौंदर्यदृष्ट्या समृद्ध असतं, त्या कलाकृतीकडे तुम्ही हात केल्यास त्यामधून व्हायब्रेशन्सचा Read More …

Public Program Day 1 Kolhapur (India)

पब्लिक प्रोग्रॅम कोल्हापूर .  सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . आम्ही जेव्हा सत्याला शोधतो असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे ते तुम्ही बदलू शकत नाही . त्याची तुम्ही नुसती कल्पना करू शकत नाही . त्याची तुम्ही रूपरेषा बनवू शकत नाही . सर्वात मुख्य म्हणजे या मानवी जीवनात या मानवी चेतनेत तुम्ही त्याला जाणू शकत नाही . म्हणूनच सर्व शास्त्रां न मध्ये ,मग ते आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेले असोत ,चायनीज नि लिहिलेले असोत ,कुराणात असोत किंवा कोणत्याही धर्मातले असोत सर्वानी एकमेव गोष्ट सांगितली कि तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे . तुमचा आत्म साक्षात्कार झाला पाहिजे . तुम्हाला आत्म बोध झाला पाहिजे . पण आत्मबोध म्हणजे नुसतं काहीतरी बुद्धीने जाणान्या सारखं नसत . पण ते बुद्धीच्या पलीकडचं असं आहे . आणि त्या साठी फक्त एक तऱ्हेची नम्रता मनुष्यात पाहिजे . कि अजून आम्ही ते जाणलेलं नाही . जर सत्य एकमेव आहे आणि जर आपण सत्याला जाणतो तर इतके वादविवाद ,इतकी भांडण ,इतका त्रास ह्या   कलियुगाचा हा जो काही ,कलह ब्रम्ह आहे . तो कसा उत्पन्न झाला असता ,झाला असता ?. हि गोष्ट खरी कि पंचावन्न देशातील हि मंडळी आहेत ,पण हि आत्म साक्षात्कारी आहेत . त्यामुळे यांच्यात कलह नाही ,भांडण नाही ,चुरस नाही नुसतं प्रेम . एकमेकांचा आनंद कसा घ्यायचा ते याना माहित आहे .  महाराष्ट्राची महती माहित आहे ,मी काय सांगणार . याच नाव महाराष्ट्र आहे म्हणजे काहीतरी विशेष असलंच पाहिजे असा निदान आपण विचार केला पाहिजे . आणि या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो तेव्हा आपणही काहीतरी विशेष असलं पाहिजे ,त्यातून कोल्हापुरात महालक्षीमीच्या परिसरात आपला जन्म झाला म्हणजे आणखीन काहीतरी विशेष असलं पाहिजे Read More …

Musical Program and Talk (India)

१९९१ -१२०१ इंडिया टूर ,     जैसे माँ से सहज में मिल जाती है कोई भी चीज ,लोग इसका विचार नहीं करते | विशेषकर मेरे रहते हुए ये बहोत जोरोंसे ये घटना होती है | अभी ये बैठी हुई हैना यहापर वो कह रही थी की  मुझे पहले दिन मेरी कुण्डलिनी इतने जोर से खड़ी  हुई और पूरी रात मैं आनंद में हो गई ,यही होता है | तो तुम कहोगे के माँ ये तुमने क्या किया | तो अपनी संकल्प शक्तिसे हमने ,अपनीही कुण्डलिनी पर आपको बिठा करके ,अपने ही रिधय में  आपको जन्म देके  और आपके सहस्त्रार से हमने आपको असल में पूरा जन्म दिया है | जैसे की माँ अपने  पेट के  बच्चेको पनपाती  है और उसके बाद उसको जन्म देती है उसी प्रकार सहस्त्रार से आपको जन्म दिया हुआ है | और यही सर्वव्यापी घटना फोटो पर भी घटित होती है ,आश्चर्य की बात है की हमारे फोटो में भी इतने व्हाईब्रेशन्स है ,और ये सायन्स का मैं  बड़ा उपकार मानती हु | यहाँ तक की ये मैं बोल रही हु इसमेसे भी मेरे व्हाईब्रेशन्स निचे चले जा रहे है | बहोत बार आपके चक्र पकड़ते है तो ऐसा हात  लगा लेती हु ना आज्ञा को तो आज्ञा छूट जाती है | देखिए सायन्स इसीलिए बनाया गया था की सहजयोग के लिए उपयोगी हो | कल अगर टी वी पे आप हमें बिठादे और लोग हमारे और हात करे तो न जाने कितने लोग पार हो जाए ,पर ऐसे दिन कब आएंगे पता नहीं की टी वी वाले Read More …

Dyan Ki Avashakta, On meditation New Delhi (India)

Dhyan Ki Avashakta 27th November 1991 Date : Place Delhi : Seminar & Meeting Type Speech [Marathi translation from Hindi] आज अनायासे आपण एकत्र जमलो आहोत म्हणून सहजयोगाबद्दल आपण जास्त समजून घेऊया. सहजयोग हा साऱ्या मानवजातीच्या भल्यासाठी आहे आणि तुम्ही लोक त्याचे माध्यम आहात. तुमच्यावर अर्थातच खूप मोठी जबाबदारी आहे. आपण जर झाडाला किंवा दगडाला व्हायब्रेशन्स दिल्या तर त्या प्रवाहित होऊ शकत नाहीत, कार्यान्वित होऊ शकत नाहीत तर तुमच्याच श्रद्धेमधून व कार्यामधून त्या प्रवाहित होणार असतात. सहजमध्ये एक प्रकारचा दोष आहे तो म्हणजे तो सहजच प्राप्त होण्यासारखा आहे पण त्याला सांभाळणे तितकेच कठीण आहे. कारण आपण पोकळीत राहत नाही किंवा फक्त आध्यात्मिक वातावरणात राहत नाही तर तऱ्हेतऱ्हेच्या वातावरणात व लोकांमध्ये आपण राहतो. आपल्या स्वत:च्याही बऱ्याच उपाधी असतात आणि त्यांना आपण चिकटून असतो. म्हणून सहजयोगात आपण शुद्ध बनणे व ही शुद्धता आपल्या अंतरंगात रुजवणे हे कार्य आपल्याला करायचे आहे. शक्तीचे वाहक असणारे माध्यम शुद्ध हवेच. उदा.विजेची तार खराब असेल तर वीज प्रवाहित होणार नाही किंवा पाण्याच्या पाईपमध्ये कचरा असेल तर नळामधून पाणी येणार नाही. त्याचप्रमाणे चैतन्य पसरवणाऱ्या नसा शुद्ध असल्या पाहिजेत आणि ही जबाबदारी तुमची स्वत: ची आहे. एरवी तुम्ही माझ्याकडे श्रद्धा, भक्ती मागत राहता पण ही मुख्य गोष्ट तुम्ही स्वत:च समजावून मिळवायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे नसा शुद्ध झाल्यावर तुम्हालाच आनंद मिळणार आहे. आपण काही कार्य करत आहोत हे ही तुम्हाला जाणवणार नाही. जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल; सर्व काही सहज घडून येईल. सर्व जमून येईल, योग्य प्रकारचे लोक तुमच्याकडे येऊन तुम्हाला मदत करतील. इतके की तुम्हालाच आश्चर्य वाटेल की आपण कसे एका वरच्या स्तरावर येत आहोत. Read More …

Press Conference Kolhapur (India)

Press Conference, Kolhapur, India, 20-12-1990 काळापासून आपल्या देशामध्ये कुंडलिनी शक्ती आहे . असे वर्णन केले आहे.  आता किती अनादी पुस्तकात आहे ते मी तुम्हाला सांगते.  चाप्टर लिहून घ्या. कारण जे काय असते. संस्कृत वाचलेले नाही. त्याच्यामुळे माहिती नाही.  पान 427 आता हे पुस्तक घ्या. पुष्कळ आहे. हंस उपदेश  आता योग तुरा मनी, हे आधी शंकराचार्य यांनी  लिहले ते बघू या. योग तुरा मणी,  लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी सात्विक चर्चा केली, वैचारिक चर्चा आहे. त्यात एक शर्मा म्हणून धर्ममार्तंड आहेत. त्यांनी त्यांचं डोकं खाल्लं, त्यांचं सोडा. मग त्यानंतर सौंदर्य लहरी म्हणून पुस्तक लिहिलं. ऋषी याग, ध्यान विद्या, योग सुख उपदेश, योग कुंडलिनी, उपनिषद म्हणजे कुंडलिनी जागरण.  कई उपनिषद, देवीभागवत, योग पुराण, लिंग पुराण, अग्नि पुराण, नंतर शंकराचार्यांची सौंदर्य लहरी .त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रात मार्कंडेय. मार्कंडेय कुठ झाले माहित आहे का .आता आपल्याला माहितीच नाही. आपल्यात काय असते ते. ते झालं महाराष्ट्रात साडेतीन पीठ आहेत. आता हे हिंदी मध्ये लिहिलेलं कल्याण आहे. यांचा अभ्यास फार  चांगला आहे. आपण सगळं  जाणतो असं नाही. आपण मराठीत सगळं जाणतो पण या लोकांनी  हिंदीत पुष्कळ कार्य केले आहे .मराठी तेवढं कार्य झालेला नाही. आता यांनी लिहिले ओमकार स्वरूप साडेतीन सगुण शक्ती पीठ महाराष्ट्रात आहेत. कोण  कोणचं एक  मातार गड म्हणजे ज्याला आपण माहूरगड म्हणतो. एक गाणं आहे माहुर गडावरी तुझा वास, दुसरं कोल्हापूर मध्ये, तीन तुळजापूर. मातापुर ची महासरस्वती,तुळजापूरची महाकाली, कोल्हापूरची महालक्ष्मी, . त्यांचं सर्व काही यांनी दिलेल आहे काय काय ते. महाराष्ट्रात समर्थ रामदास यांनी  देवीला रामवरदायनी असं म्हटलं आहे. कारण शिवाजी महाराज तुळजापूर भवानी ला जात असत. तेथे त्यांना वरदान मिळाले ह्यांनी एवढे मोठे काम केले Read More …

Public Program Kolhapur (India)

1990-1219 PUBLIC PROGRAM, KOLHAPUR, INDIA  शोधणाऱ्या आपण सर्व सहजयोग्यांना, तसेच अजून जे सहजयोगी झाले नाहीत अशा सर्वांना आमचा प्रणाम नमस्कार!        आशा ठेवली पाहिजे की सत्य आहे तिथे आहे आणि आपण त्याची कल्पना करू शकत नाही, त्याच्यावर कोणचंच आरोप पण करू शकत नाही, किंवा आपण ते बदलूही शकत नाही. हे सत्य काय आहे? हे सत्य आहे की आपण मन, बुद्धी, अहंकार या उपाधी नसून आपण आत्मा आहोत, आणि दुसरं सत्य असं आहे की, चराचरामध्ये एक सूक्ष्म शक्ती जिला वेदामध्ये ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. तसंच शास्त्रामध्ये तिला परमचैतन्य असं म्हटलेलं आहे. बायबलमध्ये त्याला ‘कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट’ म्हटलेलं आहे. आदिशंकरानी तिला ‘सलिलं सलिलं’ म्हणून पराशक्तीचे वर्णन केलेले आहे. ही अशी शक्ती जी सर्व जिवंत कार्य करते ती जिवंत कार्य करणारी ही शक्ती आहे आणि तिला जाणणे तिचा बोध होणे हे अत्यंत आवश्यक आहे. मानवी चेतनेपर्यंत आपण आपल्यावर उत्क्रांतीमध्ये आलोत. एवोलूशन मध्ये आलो आहोत, पण अजून मानवी चेतनेत आपल्याला अजून केवल ज्ञान किंवा केवल सत्य मिळालेलं नाही. त्याचा अर्थ असा की प्रत्येकजण एकच गोष्टीला एक आहे असं म्हणत नाही. म्हणजे आता आपल्याला डोळ्यांनी दिसतंय मी आपल्यासमोर उभी आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की माताजी आमच्यासमोर उभ्या आहेत. पण विचारांच्या बाबतीत तसं नाही. प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा बनतो, त्यामुळे धारणा वेगळ्या आहेत, प्रणाल्या वेगळ्या आहेत. कुणाला कम्युनियम पाहिजे, तर कुणाला डेमोक्रेसी पाहिजे, कुणाला एक राजा असलेला तो चालेल, अशारीतीने अनेक तऱ्हेचे राजकारणातसुद्धा, समाजात प्रत्येक ठिकाणी एक-एक वेगळा विचार करतात.          लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की आपण आधी स्वातंत्र्य घेतलं पाहिजे आणि आगरकरांचं असं म्हणणं होतं की नाही आधी समाजाची व्यवस्था ठीक Read More …

Public Program Satara (India)

पब्लिक प्रोग्रॅम सातारा .  मानवी कल्पनेनी ते आपण आकलन करू शकत नाही . ते मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे . मानव चेतनेत ते आपण जाणू शकत नाही . जर हि गोष्ट आपण लक्षात घेतली तर अध्यात्म म्हणजे काय ते आपल्या लक्षात येईल . अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान . ते झाल्या शिवाय कोणतीही अंधश्रद्धा ठेऊन ,कोणतीही धारणा धरून हे कार्य होत नाही . त्याला कुंडलिनीच जागरण हेच एक विधान सांगितलं आहे . ज्ञानेश्वर हे नाथ पंथीय आहेत . नाथ पंथियां मधली परंपरा अशी कि एका गुरूला एकच शिष्य असे . आणि त्या गुरुनी एकाच शिष्याला जागृती द्यायची आणि हे सगळं ज्ञान सांगायचं , पण ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात एक मोठी कामगिरी केली त्यांचे गुरु होते त्याचे जेष्ठ बंधू निवृत्तीनाथ त्यांना परवानगी मागितली ,कृपा करून एव्हडी परवानगी द्या कि मी जे काही कुंडलिनी बद्दल जाणतो ते मी स्पष्ट रूपाने लोकांना सांगू शकतो . नुसतं सांगायची मला परवानगी द्या . मी कुणालाही शिष्य करणार नाही पण मला फक्त सांगायची तुम्ही परवानगी दिलीत तर मला सार्थक वाटेल . त्यांनी हि परवानगी ज्ञानेश्वरांना दिली . आणि त्यामुळे बाराव्या शतकात च  ज्ञानेश्वरी लिहिताना सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीच वर्णन करून ठेवलं आहे . पण धर्म मार्तंडाना यातलं काही गम्य नव्हतं म्हणून त्यांनी सहावा अध्याय निषिध्द आहे म्हणून सांगितलं . त्यामुळे लोकांना कुंडलिनी बद्दल ज्ञान झालं नाही . पण त्या नंतर रामदास स्वामींनी कुंडलिनी बद्दल बरच सांगितलं आहे . हि रामदासांची कृपा ,केव्हडी पवित्र असली पाहिजे . त्यांनी स्पष्ट पणे सांगितलं कुंडलिनीच जागरण हे आवश्यक आहे . त्या शिवाय आत्म्याचं ज्ञान मिळत नाही . अध्यात्म बनत नाही . त्यांना कुणी विचारलं किती वेळ लागतो कुंडलिनीच जागरण व्हायला ,त्यांनी सांगितलं तत्क्षण ,पण देणारा  तसा पाहिजे  आणि घेणाराही तसा Read More …

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 18th December 1990 Date: Karad Place Public Program Type सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसऱ्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला। आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात , वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, Read More …

Public Program, Bhautik Pragati Adhyatmikte shiway hot nahi (India)

भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही ब्रह्मपुरी, १८ डिसेंबर १९९० सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसर्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला. आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात, वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, मुलं असोत ह्यांनी Read More …

Public Program, Bhartatil Bhrashtachar (India)

Bhartatil Bhrashtachar 16th December 1990 Date: Place Wai Public Program Type त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे, ह्याची अगदी आपल्याला कल्पना नसेल. आता न्युयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ शकत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. इथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात, नको रे बाबा! मला काही लोकांनी पत्र पाठवलं की, ‘माताजी, तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवू.’ काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात. कारण ती इतकी उद्धट झाली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इंग्लंडसारख्या शहरामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये फक्त लंडन या एकाच सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे की का? सर्वांगीण प्रगतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले, तुम्ही जर एखाद्या दारूङ्याला किंवा कोणालाही शंभर रूपये दिले तर तो कुठेतरी वाया घालवणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तर तो सत्कारणीच लागणार. तो सत्कर्मातच जाणार. आता जसे हे लोक आहेत, तर मी पैसे काढले, ‘आम्ही एखाद्या शाळेला देणगी देऊ माताजी.’ सत्कर्मासाठी. काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्मसुद्धा कठीण झालेले आहे. आम्ही आमचे लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्यातरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली नाही की जिथे खोटेपणा नाही. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा, म्हणजे करायचे तरी काय? मग आम्ही शेवटी एक वास्तू बांधली. म्हटलं कमीत कमी एक वास्तू तर बांधू देत. मग पुढचं काय ते बघता येईल. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे आणि हा भ्रष्टाचार आणि आपल्या मुलांचं उद्या काय होणार आहे याचा Read More …

Public Program Satara (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्य म्हणजे काय आणि आपण ते का शोधतो हे समजून घेतलं पाहिजे . सत्य म्हणजे जे संत साधूंनी आणि अवतारणा मध्ये सांगितलं आहे . तुम्ही हे शरीर ,मन ,अहंकार ,बुध्दी या उपाधी नसून शुध्द आत्मा आहात . हे सत्य आहे . आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्व सृष्टी मध्ये व्यापलेली अशी अत्यंत सूक्ष्म शक्ती जिला आपण परमचैतन्य अस म्हणतो . हे दोन सत्य आपण शोधून काढले पाहिजेत . आणि ते का आपण शोधतो कारण आजच्या काळात या कलियुगात विशेषतः आपण बघतोआहे कि प्रत्येक तऱ्हेनी आपल्याला त्रास होत आहे . जर माणसा जवळ पैसा असला तरी  तो बेकार जातो आणि नसला तरी तो त्रासात असतो . ज्या देशानं मध्ये अत्यंत विपुल असा पैसा आहे त्या देशातले लोक आज इथे आपल्या कडे आलेले आहेत . त्यांच्या जवळ मोटारी ,गाड्या सगळं काही ,श्रीमंत लोक आहेत . ते ह्या महाराष्ट्रात एव्हड्या साठी आलेत कारण पैशाच्या धुंदीत तसच विज्ञानाच्या घमेंडीत त्या फुशारकीत एकाकी जीवन झालं आहे . त्या एकाकी जीवनाला ते कंटाळले कारण त्यामुळे अनेक त्रास झाले आहेत . अमेरिके सारख्या देशामध्ये आज तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ६५ टक्के लोक घाणेरड्या रोगाने पीडित आहेत आणि लवकरच ते ७० टक्के होतील अस भाकीत आहे . त्यातून त्यांना सुटका नाही . तरतऱ्हेचे रोग त्यांना झाले आहेत . रोगाचं नव्हे तर तिथे हिंसाचार फार बोकाळला आहे . तुम्ही कोणत्याही गावात ,खेडेगावात अस बसू शकत नाही . किंवा रात्रीच्या वेळेस एकट कुठ जाऊ शकत नाही . न्यूयार्क ला जायचं म्हंटल तर आपले दागिने ,मंगळसूत्र सगळं काढावं लागत नाहीतर लपवाव लागत . तिथं कुणी तुम्हाला सोडणार नाही . इतकी तिथे हिंसाचाराची वृत्ती वाढली Read More …

Public Program Sangamner (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्या बद्दल सांगायचं म्हणजे सत्य आहे तिथे आहे . ते आपण बदलू शकत नाही आणि त्याला आकार देऊ शकत नाही . जे लोक सत्याला न शोधता अनेक कार्य करतात त्या कार्यं मध्ये अनेक दोष असतात . सत्याला जाणण्या साठी मानव चेतना अपुरी आहे . आणि म्हणूनच ह्या मानव चेतनेच्या पलीकडे ह्या मानवी बुध्दीचे प्रांगण ओलांडून आपल्याला नव्या प्रांगणात उतरले पाहिजे . ते उतरल्या शिवाय आपल्या मध्ये नीरक्षीर विवेक येऊ शकत नाही . केवळ सत्य मिळू शकत नाही . आज काल नवीन नवीन गोष्टी लोकांनी सुरु केल्या आहेत . काहीतरी नवीन टुम काढायची आणि तरुण मुलांची दिशाभूल करून त्यांना आरडाओरडा करायला लावायचा ,त्यांच्या बुध्दीवर झापड घालायची असे अनेक प्रकार मी बघते आहे . आमच्या सहजयोगा मध्ये हि जी फॉरेन ची मंडळी अली आहेत हि फार विद्वान,शिकलेली ,फार उच्च शिक्षणानी अलंकृत अशी आहेत . आणि यांच्याही देशामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी होत्या ज्यानी ते भांबावून गेले होते . आणि त्यांना समजत नव्हतं कि ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये का होतात . सगळे सुशीक्षीत असताना इतकं तिथे विज्ञानाचं स्वरूप पसरलेलं असताना सुध्दा अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती कि अमेरिके सारख्या देशामध्ये सुध्दा भूतविद्या आहेत ,अनेक विद्या आहेत ,आणि त्यांना स्वातंत्र्य असल्या मुळे वाट्टेल त्या प्रकारचे ते लोक कार्य करतात . तसच विज्ञान सुध्दा हा एकांगी विषय आहे . ज्या देशा मध्ये विज्ञान वाढलेल आहे ,आपल्याला माहित आहे कि मी सर्व देशां मध्ये फिरलेली आहे आणि बरीच वर्ष मी परदेशात घालवली आहेत .  आणि माझ्या एकंदर तिथल्या परीस्तीतीला बघून अशा कल्पना झाल्या आहेत कि नुसतं विज्ञान करून मनुष्याची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही . आणि म्हणूनच हे लोक आता रसातळाला चालले आहेत . त्या देशांना तुम्ही बाहेरून बघता कुपमंडूका सारखं जस Read More …

Sarvajanik Karyakram Shrirampur (India)

1990 -12-11Public Program, Shrirampur सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना माझा नमस्कार .सत्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य  हे आहे तिथे आहे. आपण ते बदलु शकत नाही. ते आपल्या काबूत घेऊ शकत नाही. आणि काहीतरी त्याच्यातनं  सांगून ते सत्य आहे असं पटवून देऊ शकत नाही. आणि जे लोक असं  करतात  ते वास्तविकतेपासनं फार दूर आहेत. आणि स्वतःचं  नुकसान करून घेणं , समाजाचं नुकसान करून घेणं आणि उलट्या गतीनी ते आपल्या  नाशाला प्राप्त होतात .  याला कारण असं आहे की सत्य एक आहे ते म्हणजे  तुम्ही हे शरीर , मन , बुद्धी , अहंकार या उपाधी नसून शुद्ध स्वरूप आत्मा आहात .  दुसरं सत्य असं आहे की सर्व चराचरामध्ये परमेश्वराची प्रेम शक्ती जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो ती कार्यान्वित आहे . तेव्हा ह्या ब्रह्मशक्तीला  प्राप्त  होणं  हा  योग  आहे. आणि सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा ह्या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. पण हे सगळं , मी सांगत असताना आपण माझ्यावर  अंधश्रद्धा ठेऊ नये. उलट एखाद्या वैज्ञानिकासारखं,  सायंटिस्टसारखं  आपलं मन उघडं  ठेवलं पाहिजे . डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जर आपलं डोकं उघडं नसलं तर आपण वैज्ञानिक होऊच शकत  नाही आणि मी जे सांगते ते  जर अनुभवास आलं तर इमानदारी मध्ये  ते मानलं पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. कारण हा एक कल्याणाचा मार्ग आहे.  तो तुमच्याच कल्याणाचाच  नव्हे तुमचा मुलाबाळांचा , तुमच्या सर्व समाजाचा, भारताचा आणि सर्व जगाचा हा कल्याणाचा मार्ग आहे. उत्क्रातींमध्ये आपण आता मानव स्तिथीला आलो . या स्थितीतच आपण मान्यता केली की  फार उत्तम स्थिती  आहे तर हे कायिक बरोबर होणार नाही. या स्थिती मध्येच   अनेक Read More …

Public Program (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . परमेश्वर सत्य आहे असे म्हंटलेले आहे . तसेच परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असेही म्हंटले आहे . तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेलं आहे . अशी शक्ती परमेश्वराची कोणती आहे ?. आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पहात असतो . हि फुल आपण बघतो एका लहान बिजा पोटी इतकी सुंदर फुल येतात . एक लहानसं बीज त्याला इतकी सुंदर फुल कशी लागतात ?,आपण कधी विचार सुद्धा करत नाही फक्त समजून घेतो कि आहे हि जिवंत क्रिया आहे . आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही . पण हि जिवंत क्रिया घडते कशी ?,कोण घडवत ?,तसच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते . एखाद्या झाडाची सुध्दा उंची त्याला सुध्दा एक मर्यादा असते . नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते . प्रत्येक ऋतू मध्ये वेगवेगळे शेतीचे कार्य होतात . हि सगळी वेगळी कार्य करण्याची कोणती शक्ती आहे ?जी हि संबंध कार्याला घडवून आणते . आपण त्या बद्दल विचारही करत नाही . आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांगी झालेला आहे . एकतर्फा झालेला आहे . जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी आहे . आणि त्याच्याच मुळे आपल्याला आश्चर्य वाटेल कि परदेशा मध्ये आपण समजतो कि भौतिकता खूप वाढलेली आहे ,ती सगळी वाढ आहे ती तोलायची क्षमता त्यांच्यात नाही . ते ते तोलू शकत नाहीत . कारण त्यांचा पाया अध्यात्माचा नाही . तो पाया आपल्या देशात ,विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अत्यंत भक्कम असा संत लोकांनी मांडलेला आहे . हे संतसाधु महाराष्ट्रात आले ,त्यांनी किती गहन कार्य केलय ,त्याची आपल्याला कल्पना सुध्दा आहे . आणि त्या Read More …

Public Program (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . एक गोष्ट आपण जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे . ते आपण बनवू शकत नाही आणि ते आपण बदलू पण शकत नाही . जे आहे ते होत आणि राहील . एक आणखीन दोष आहे तो असा कि मानव चेतने मध्ये तुम्ही सत्य जाणू शकत नाही . त्या साठी एक सूक्ष्म चेतना हवी . आताच आपल्या समोर प्राध्यापकांनी सांगितलं कि परदेशामध्ये असंतुलन वाढलं आहे . त्याची कल्पना आपल्याला इथे येऊ शकत नाही . आम्ही ह्या देशात फिरलेलो आहोत . आम्ही ह्या देशांना जाणलेलं आहे .वास्तव्य बरेच वर्ष तिथे झाल्या मुळे ह्याची दुर्दशा म्हणजे शब्दात सुध्दा सांगता येणार नाही . भौतिकतेत ते वाढले असणार . विज्ञानात वाढलेत कबूल . पण विज्ञान हे एकांगी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे . त्यांनी मनुष्य एकांगी होतो हे तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर लक्षात येईल . वाट्टेल तशी नैतिकता वापरल्या मुळे अनेक तऱ्हेचे रोग त्यांना झालेले आहेत . अशे रोग झालेले आहेत कि त्या रोगाचं निदान सुध्दा त्यांना लागु शकत नाही . ते ठीक होऊ शकत नाहीत . ६५टक्के लोक अमेरिके मध्ये अशा रोगांनी ग्रस्त आहेत आणि बाकीचे सुध्दा सगळे ग्रस्त होतील अशी त्यांना भीती वाटू लागली आहे . रोगाचं सोडा पण हिंसाचार इतका भयंकर आहे कि न्यूयॉर्क ला तुम्ही गेलात तर गळ्यात मंगळसूत्र सुध्दा घालून तुम्ही जाऊ शकत नाही ,कुणी तुमचं ओढून घेईल . इतका हिंसाचार ह्या देशामध्ये ,मी म्हंटल हि  डेमोक्रॉसी  आहे कि डेव्हनाक्रोसि आहे . आपण अजून इथे बसलेलो आहोत आपल्याला काही कल्पना नाही . आपण जर त्यांच्या सारखे केस केले ,त्यांच्या सारखा वेष केला तरी आपल्याला त्यांची कल्पना येणार नाही कि आतून ते किती पोखरले गेले आहेत. त्याला कारण Read More …

Public Program, Adhyatma mhanje atmyala prapt karne Shrirampur (India)

Sarvajanik Karyakram Date 9th December 1990: Place Shrirampur Public Program Type एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सत्य आहे ते आहे. ते आपण बदलू शकत नाही. त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की ह्या मानवी चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. आज ‘ग्यानबा तुकाराम’ च भजन ऐकलं, तेव्हा फार आनंद वाटला, की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहेत. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर मिळवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे. कारण त्यांनी जर एक गोष्ट सांगितली नसती, तर आपण एवढ्या भक्तीच्या मार्गात राहिलो नसतो. कधीच आपली वाट लागली असती. स्वातंत्र्य मिळालं आहे, इतके दिवस झाले, तरीसुद्धा अजून आपण धर्मात उभे आहोत. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. धर्म म्हणजे पैशाचा खेळ नव्हे. धर्मासाठी एवढं जाणलं पाहिजे, की आपल्या अंगात बाणलेलं एक काहीतरी विशेष परमेश्वराने दिलेलं एक महान गुणांचं, एक भांडार आहे. पण ते झाल्यावरसुद्धा आपल्याला धर्म समजत नाही. समजा आपण हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो, कोणत्याही धर्माचे असो, तरी मनुष्य कोणतेही पाप करू शकतो. म्हणजे आश्चर्य वाटतं , की हा मनुष्य स्वत:ला जागृत धार्मिक म्हणवतो, देवळात जातो, घंटा वाजवतो, देवासमोर बसून इतकी प्रवचनं ऐकतो, सगळं काही आहे, आणि तरीसुद्धा हा मनुष्य असे पापकर्म तरी कसे करतो ? म्हणून शंका येते आणि मग लोक म्हणू लागतात, की देवधर्म वगैरे सर्व खोटे आहे आणि ती गोष्ट खरी आहे. पण हे अशास्त्रीय बोलणं झालं. तुम्ही आधी ओळखा, परमेश्वर आहे की नाही. त्याचा आधी पत्ता लावला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही, तोपर्यंत असं म्हणू शकता की, ‘परमेश्वर आहे की Read More …

Seek the Eternal Kuala Lumpur (Malaysia)

Public Program Day 1, Kuala Lumpur, Malaysia 01-11-1990 मी सर्व सत्याच्या साधकांना नमन करते. अगदी सुरुवातीलाच, आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की सत्य तेच असते जे आपण आपल्या मानवी जाणीवेने संकल्पना मांडू शकत नाही किंवा त्याचे आयोजनही करू शकत नाही. जे होते ते आहे आणि जे आहे तेच राहील. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या मानवी पातळीपेक्षा आत्म्याच्या पातळीवर उतरावे लागेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही विचार करता तसेच तुम्ही ज्या काही संकल्पना मांडतात त्यामुळे समस्या निर्माण होतात. म्हणूनच सर्व धर्मग्रंथांनी एक गोष्ट सांगितली आहे की शाश्वततेचा शोध घ्या आणि क्षणभंगुरतेला त्याच्या सर्व समज आणि मर्यादांसह हाताळा परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आत्मा बनाल. सर्व संतांनी सांगितले आहे की तुम्ही स्वतःला जाणले पाहिजे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तो पर्यंत भ्रम आणि अज्ञान दूर होणार नाही. जर आपण चिन मधिल कन्फ्यूशियस पासून ते लाओ-त्झे पर्यंत सर्व पाहिले तर या सर्वांनी याबद्दल बोलले आहे. ख्रिश्चनांसाठी, ख्रिस्तांनी तेच सांगितले आहे, शीखांसाठी गुरू नानकांनी सुध्दा तेच सांगितले आहे की तुम्ही सत्य शोधले पाहिजे. आणि जेव्हा या लोकांनी तुम्हाला सहजयोगाबद्दल या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की तुम्ही आमच्यापैकी कोणावरही आंधळे पणाने विश्वास ठेवू नका. अंधविश्वास तुम्हाला कुठेही नेणार नाही,  कारण तुम्ही सत्य शोधत आहात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर आंधळे पणाने विश्वास ठेवत असाल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. शिवाय सहज म्हणजे ‘सह’ म्हणजे Read More …

Public Program Day 1 (India)

1st Public Program C Date 10th April 1990 : Place Kolkata Public Program Type Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याच्या बाबतीत जाणून धेतले पाहिजे की, सत्य आदि आहई आणि आपण मानव त्याला बदलू शकत नाही सत्याला या मानवी चेतनेमध्ये आपण जाणूं शकत नाही. त्यासाठी एक सुक्ष्म चेतना पाहिजे, त्याला अत्मिक चेतना म्हणतात. फखाया वैज्ञानिकाप्रमाणे आपण आपली बुध्दी उधडी ठेवा आणि सत्य सिध्द झालं , तर इमानदारीने त्याला मानून घ्या. एक महान सत्य हे आहे की सृष्टीची: चालना पक सूक्ष्म शक्ति करते आहे. ज्याला परमचेतन्य म्हणतात. ती विश्कयापी आहे व प्रत्येक अणुरेणुंमध्ये कार्यान्वित आहे नईस सिह्टिमला चालवते . आलेली नाही ज्यामुळे आपण परमचैतन्याला जाणूं शक् दूसरे सत्य हे आहे की आपण, हे . आपल्या शरीरांतील स्वयंचीलत संस्थेला १ऑटोनॉमस जे कांही जिबंत कार्य होते ते तिच्यायोगे घडते. पण अजून आपल्यांत ती हिथिती शरीर, बुध्दी अहंकार भावना वगैरे उपाधी नसुन, एनत आत्मा आहोत. आणि हे सिद्द हाऊं शकते तिसरे सत्य हें आहे, की आपल्या अांत एक शक्ति आहे, जी त्रिकोणाकार अस्थिमध्यें स्थित आहे. आणि होते तेडां आपला संबंध त्या परमचैतन्याशी प्स्थापित करते . आपले जेव्हां ही शक्ति जागृत आणि याप्रकारेच नवे क्षितीज- तयार डोते ज्यामुळे आफल्या नसांवर समजूं शकते. जे नसांवर कळते तैच ज्ञान आहे.हे समजण्यासाठी कुंडलिनीचे जाग्रण पाहिजे. ती स्वतः आप ली ही आपलीच आई आहे .आणि डी आई आपल्याला पुनजन्म वैतेः टेपरेकॉ्डरमध्ये जसे आपण सर्व कुडालिनीने आफ्ल्याविषयी सर्व कांही जाणलेलं आहे . साडेतीन कुण्डलांमध्ये आत्गदर्शन होते. मग आफल्या आंत एक नवी डायमेन्शन आई आहे . कांही टेप करूं शकतां त्याप्रमाणे या ही वसली आहे त्यामुळे हिला Read More …

Adi Shakti Puja (India)

MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahiri जुम्डी लाकांची प्रगति पाहून खूप आनंद झाला फलकतत्यातील आणि या वहरामध्ये अनेक लोक खूप गहन साधक आहेत हे मी जाणते त्यांना जजून समजले नाडी की, अरवी वैळ आली आहे की व्यना ते शोधत आडेत ते त्यांना मिळणार नुम्हा लोकांना त्यांच्यापर्यंत पौहौोचले पाहीजे शोधित आहेत. यासाठी जपला क्स्तार चारी बाजूंना करणे आवश्यक अाहे -पण त्यावरोबरच आपल्याला आपती थाविलसुध्दा वादवली पाडीने प्र्यलित केले पाडीजे. ज्याला पाहून लोक औवळसतील ही काड़ी विशेष व्यक्ति आडे घ्यानधारणा करणे लुम जरूरीचे ज्षाहे · आणि अथा लोकाचा शोध यैतता पाडीजे, जे सत्याला आपले जीवनसुष्दा परिवर्तित केले पाठीजे आापले जीवन सुध्दा एका अतूट ज्यौतीप्रमाणे कलफत्ता एक परर गजबजाटाचे थडर आहे . जाणि जाती त्याला वैळ कमी मिळतो. हा जो केऊ आापण आफल्या डातामध्ये राला आहे. तो फकत उत्यानासाठी य आपल्या आातील याच्या गजबजाटामध्ये मनुष्य बुडून प्रगातसाठी आहे – जपल्याला जर आतून स्वतःला पुर्णपने जाणून घ्यावयाचे असेल तर आपण योडा केळ रोज त्यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आाडे संध्याकाकळी जाणि सकाळी चीड़ा केक त्यागमध्ये जे करतात व करीत नाहीत त्यामध्ये पुष्कक फरक येतो. विशेषत: जे लोक बाहयात मूप कार्य करीत आहेित, णि सहजयोगासाठी सूप मेडनत पेत आहेत इकडे तिकडे फिरत आहेत, रूहानी शक्ति आहे, जी दैवी शवित आडे ती हळ इळ कमी होत जाते त्यासाठी अ्षा लोकानी ध्यानघारणी जरू लोकांशी गप्पागोष्टी करीत आहेत लेक्वर्स देतात, समजावतात त्यांची जी करणे जास्तच आवश्यक आहे । आणि झोपण्यापूर्वी थोड़ा केळ घ्यान करा. आणि सकाळी आयोळ कैल्यावर पौड़ा कैळ घ्यान करा, है पुरसे आहेण जैव्हा ध्यान करता त्यावेळी आपले ध्यान नीट आले है कसे जळवणार? Read More …

Birthday Puja, Sahaja Yoga me pragati ki Teen Yuktiyaan New Delhi (India)

Janm Diwas Puja Date 30th March 1990 : Place Delhi : Type Puja आज नवरात्रीची चतुर्थी आहे आणि नवरात्रीमध्ये रात्री पूजा झाली पाहिजे. अंधकार दूर करण्यासाठी रात्रीत प्रकाशाला आणणे अत्यावश्यक आहे. आजच्या दिवसाचा एक आणखी संयोग आहे, की आपण लोक आमचा जन्मदिवस साजरा करीत आहात. आजच्या दिवशी गौरीजींनी आपल्या विवाहानंतर श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेश पावित्र्याचे स्रोत आहेत. सर्वप्रथम या जगामध्ये पवित्रता पसरवली गेली. ज्यामुळे जे प्राणी किंवा जे मानव या विश्वात आले ते पावित्र्यामुळे सुरक्षित रहावे आणि अपवित्र गोष्टींपासून दूर रहावे, यासाठी साऱ्या सृष्टीला गौरीजींनी पवित्रतेने न्हाऊन काढले आणि त्यानंतरच साऱ्या सृष्टीची रचना झाली. तर, जीवनामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण कार्य हे आहे, की आपण आपल्यामधील पावित्र्याला सर्वात उच्च गोष्ट समजणे, पण पवित्र याचा अर्थ असा नव्हे, की आंघोळ करून शूचिर्भूत होऊन, सफाई करून आपल्या शरीराला ठीक करणे, तर आपल्या हृदयाला स्वच्छ केले पाहिजे. हृदयाचा सर्वात मोठा विकार आहे क्रोध आणि मनुष्य जेव्हा क्रोधित होतो तेव्हा जे पवित्र आहे ते नष्ट होऊन जाते कारण पावित्र्याचे दुसरे नाव आहे निव्व्याज्य प्रेम. ते प्रेम जे सतत वाहत असते आणि कशाचीही इच्छा करीत नाही. त्याची तृप्ती यातच आहे, की ते सतत वाहत आहे आणि ज्यावेळी ते वाहत नाही त्यावेळी ते चिंतीत (अस्वस्थ) होते, तर पवित्र याचा अर्थ असा की आपण आपल्या हृदयाला प्रेमाने भरून टाका. क्रोधाने नव्हे. क्रोध आपला शत्रू आहे, पण तो विश्वासाचा शत्रू आहे. जगात जेवढी युद्धे झाली, जेवढी हानी झाली, ती सर्व सामूहिक क्रोधाची कारणे आहेत. क्रोधासाठी कारणे अनेक असतात, ‘मी अशासाठी नाराज झालो कारण असे होते.’ प्रत्येक क्रोध कोणते तरी कारण शोधू शकतो. युद्धासारख्या भयानक गोष्टीसुद्धा क्रोधापासून उपजतात. Read More …

Mahashivaratri Puja, Atmasakshatkati ki visheshtaye Pune (India)

Mahashivaratri Puja 23rd February 1990 Date : Place Pune Type Puja Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahiri] आज शिवरात्री आहे. आणि आम्ही आज शिवाचे पूजन करणार आहोत. बाडेरील गौष्टीत आपण आपले शरीर व त्या संबंधीच्या अनेक गोष्टी, मन, बुध्धि अहंकार आदि गोष्टींना चालना देत असतो. त्यावर प्रभुत्व मिकव शकतो. त्याचप्रमाणे ज्या काही अंतीरिक्षांतील गोष्टी आहेत. त्याडी आम्ही ओळख शकता व त्याचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे या पृथ्वीमध्ये जे बुध तत्व आहे आणि या पूर्वीत जे निर्माण झाले आहे ते सर्व आम्ही उपयोगांत आूं शकतो. त्याचे सारे प्रभुत्व आम्ही आमच्या हातावर घेऊ शकतो परंतु हे सर्व बाहेरचे आवरण आहे . जाम्ही आंतमध्ये आहोत. जो आमचा आत्मा आहे तो शिव आहे.बाहेरील सर्व गोष्टी नश्वर आडेत- जो जन्म घेणार त्याला मरण आहेच. जो उत्पन्न होतो त्याचा विनाश होतोच. परंतु आत्म्याच्या आतमध्ये जो आत्मा जाहे, जो शिव आहे तो त्या सदाशिवाचे प्रतिबिंब आहे . तो अविनाशी, निब्काम व स्वच्छंद आहे . तो कोणतल्याही गोष्टीस लिप नाहीं. तो निरंजन आहे .त्या शिवाची प्राप्ती झलू्यावर आम्ही त्या शिवाच्या प्रकाशांत चमकू लागतो. आम्ही इळूडळू संन्यास घेऊ लागतो. बाहेरचे आवरण जसेव्या तसेच राहाते. परंतु आतमध्ये जो आत्मा आहे तो अचर, अतूट व अविनाशी आहे तो नेहमी आफ्ल्याच ठिकाणी असतो. आत्मसाक्षात्कार मिळान्यावर आमचे त जीवन हे भव्य, विव्य व पवित्र असे जीवन बनते. म्हणून मनुष्यमात्रासाठी आत्मसाक्षात्कार मिळविषे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय मानवात संतुलन येत नाही. त्यामध्ये सरे प्रेम निर्माण होत नाही व त्यामध्ये सरी सामुहिकता येत नाही व त्याला सत्याची ओळख पटत नाही. ते सारे ज्ञान गुध्द ज्ञान होऊन जाते जिला . ती फक्त या Read More …

Sahaja Culture Pune (India)

Sahaja Culture Now you see the western culture is coming so fast on your head and also another thing is that today low-level creations are coming, do you understand that part like dramas, like cinemas, like books so many also newspapers, very low level they are. Now what should we do about it, one way is to criticize them, but we don`t want to take that position (risk). Then what should be our attitude? What can we do? (In Marathi 00:49) Asking the people to come and sit in the front. So now tell Me what should we do? you also come and sit in the front (Marathi) A Yogi: (Marathi) the good dramas which are now closed due to lack of the audience. The dramas which are our cultural heritage, few of them are showing Sahaja culture that day You were also saying this, we should show such dramas, convince the people, we should buy the tickets and then force the people sit and watch them. Shri Mataji: (In Marathi) so what happened the day before yesterday we went to see a drama. (English) I went to see a very wonderful drama which is of an international level such a great drama it was, `RAMA WANI PATHWILA`. And there were hardly 20-30 people to watch that. And to all kinds of useless third rate —02:28——– speech, it is so boring even if it may not be very vulgar but there are so many people .So for the Sahaja yogis Read More …

Public Program Brahmapuri (India)

पब्लिक प्रोग्राम ब्रम्हपुरी, (भारत),  ३१/१२/१९८९            या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला पिळवटून टाकणारं असं भाषण केलेयं आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतो आहे आणि बेचाळीस (१९४२) सालामध्ये आम्हीसुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्ययुद्धात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं. आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती.             कॉलेजमध्ये असताना तेव्हा भारत छोडो चा नारा लागला. ९ ऑगस्ट च्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी, प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळचे जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते, त्यांनी या सहजयोग्यांना सांगितलं, की मला तेव्हाच वाटलं, की ही काहीतरी मोठी शक्ती असेल. की अठरा वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्यासमोर कशी उभी राहिली. एकटी मी उभी होते. मं ते कॉलेज आम्ही बंद पाडलं.            त्यानंतर बेचाळीस (१९४२) सालात मी, आध्यात्माचा विचार केला नाही. फक्त देशाला स्वातंत्र्य करण्याचा आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी तिला वाटायचं अठरा वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार आणि जवळ-जवळ नऊ महिने मला भूमिगत व्हाव लागलं.            अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं, की आपल्या देशातली गरीबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींच सगळं काही देशाबद्दलच प्रेम होतं, ते कुठेतरी वार्‍यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आलीये मला, की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलंय? ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे आपल्याला. अशा रीतीने हे लोक स्वार्थी, स्वतःचे पैशे Read More …

Public Program Pune (India)

2nd Public Program 27th December 1989 Date: Place Pune Public Program Type [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्य कार्य आहे? सत्य एक अशी शक्ति आहे जिला परमचेतन्य असे म्हणतात. डी परमर्शक्ति सर्व जिवंत कार्य करीत असते – सृष्टीमध्ये नाना प्रकारचे चमत्कार रोज दिसतात. पण सगळ्यांत मोठा चमत्कार परमेश्वराने केलाय, तो म्हणजे, मानव- या मानवामध्ये त्याने जी व्यवस्था करून ठेवलीय ती ল। अन्युत्तम आहे असे लक्षांत ठेवलं पाहीजे की आपल्या उत्कांतीमध्ये जे जे टप्पे आपण गांठले सर्वात प्रथम मुलाधार – है चक आहे त्या त्या दण्प्यांचंच एकेक चक झालेल आहे. ग्हणजे ठिकाणी मूकाचा आधार आहे. मुळ म्हणजे कारय, तर आपली कुंडालिनी- परदेशी देशोंत आपण वघतो, त्यांची बाहयात फार प्रगती झाली आहे. पण ते आपल्या मूरकांना ओकसित नाहीत. लोकांची अशी परिल्थिती आहे, की ते अरत्यंत आशोकत आहेत, भयभीत आहेत. की त्यामुळे आता आमची काय स्थिती होणार? सायन्समुळे ल्यांनी मशिनी बर्नाक्याः मशनींमुळे असे प्रश्न हौणार आहे. अशी त्यांना भिरती वाटते कारण उभे राहिले आहेत की भर्यंकर परिस्थिती उत्पन्न त्यांच्यामध्ये कोणतेच संतुलन नाही- एक विचार करायचा तो बुध्दीने, एकीकडे, एकाच ओळीने की आपल्याकडेच येतो- असा वहाता आणि थोडया केळात त्याची शव्ति संपली सायन्समध्ये तुम्ही काय बनवलंय? सायन्स। सायन्स। सायन्स। एकतर जेंटम बॉम बनवून ठेवला तिकडे हायोजन बॉम्ब बनवृन ठेवला ते बनकि्याशिवाय सायन्स संपतच नव्हतं आता ते रस बनबून ठेवले तेवहां तिकडे ते धोडेसे धांबले त्यांनी स्पुरटनिक बनवलं, आकाशांत जायचे, अंतराळात जायचे. काय मिळाले त्यांना, करोडों सूपये सर्च करून? किती देशांत लोक उपाशी मरताहेत, त्यांना खायला नाही. त्यांची परिस्थिती सराब आहे- पण है सगळे पैसे बेकारव्या गोष्टी करण्यासाठी, स्व्रतःचा मोठेपणा दासांवण्यासाठी; Read More …

Public Program Day 1 Pune (India)

Sarvajanik Karyakram Date 26th December 1989: Place Pune Public Program Type [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याला शोधणा-या सर्व साधकांना आमचा नमस्कार सत्य काय, आणि असत्य का्य है सुध्दा जाणण्यासाठी आत्मसाक्षात्कार पाहीजे ज्यांना आत्मसाक्षात्कार आला नाही, त्यांच्याबद्दल कबिराने म्हटलं आहे, “कैसे समझावूं, सब जग अंधा।” आत्मसाक्षात्काराशिवाय ती सूक्ष्मदृष्टी येत नाही, ज्यांने चराचरांत पसरलेली ही परमेश्वरीशवित आपण जाणू शकती कोणीही उठाव, आणि म्हणावं परमेश्वर नाही, हे आजकालच चे प्रकार आहेत, यण है अशा्त्रीय आहे . तुम्ही त्याबद्रल काही गहनतेने तुम्ही त्याबदल काही माहिती घेतली को? विचार केला आहे का? आणि सगळयांत कमालीची गोष्ट आहे की हा संबंध वारसा हया महाराष्ट्राचा आहे . या महाराष्ट्रांतच है एकेकाळी आणि तेच कार्य आम्ही करत सगळ कार्य झालेल आहे आहोत. है कार्य करीत आहोत आणि पूर्वी एकेका माणसाचं फरक प्डढाच की सामूहिकतेत आम्ही . हे कार्य होत असे- पण कुंडलिनी जागृतिनंतर तुम्ही आकाशांत उड़ता किंवा पाण्यावर चालू शकता असले प्रकार मी कधीही म्हटले नाही- उतट हयाच्या मी विरोधात आहे. कारण हया क्षद्र सिध्दया आहेत. आणि श्री ज्ञानेश्वरांनीपण असं कसं म्हटलं असेल वरं त्यांच्याबद्दल बोलतांना लोकांनी जीम लि ूं जवरावी ते बर पण काय म्हटले तरी, काय ती विभूति। त्यांच्या दोन औळीतरी तुम्ही शकतां का? ते त्यांच्यावर कोरडे औटतायत। दोन अलषर डोंग्लिश शिकुन तुम्ही मोठे शहाणे झालांत? तहानपणी मी ज्ञानेश्वरी वाचली होती आणि म्डटले काय है अवतरण आहे, अवतरण ते काय समजेल माणसाला? आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय तुम्हाला काहीही ककत नाही, आणि त्याच्या पलिकडच्या हया गोप्टी आणि तुम्हाला काय कळणार, ही मंडळी कोण होती आणि सांगायला गेल तर, “तुम्ही खोट सांगतां” कारण है अतिशहाणे, Read More …