Public Program Day 1 Kolhapur (India)

पब्लिक प्रोग्रॅम कोल्हापूर .  सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . आम्ही जेव्हा सत्याला शोधतो असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे ते तुम्ही बदलू शकत नाही . त्याची तुम्ही नुसती कल्पना करू शकत नाही . त्याची तुम्ही रूपरेषा बनवू शकत नाही . सर्वात मुख्य म्हणजे या मानवी जीवनात या मानवी चेतनेत तुम्ही त्याला जाणू शकत नाही . म्हणूनच सर्व शास्त्रां न मध्ये ,मग ते आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेले असोत ,चायनीज नि लिहिलेले असोत ,कुराणात असोत किंवा कोणत्याही धर्मातले असोत सर्वानी एकमेव गोष्ट सांगितली कि तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे . तुमचा आत्म साक्षात्कार झाला पाहिजे . तुम्हाला आत्म बोध झाला पाहिजे . पण आत्मबोध म्हणजे नुसतं काहीतरी बुद्धीने जाणान्या सारखं नसत . पण ते बुद्धीच्या पलीकडचं असं आहे . आणि त्या साठी फक्त एक तऱ्हेची नम्रता मनुष्यात पाहिजे . कि अजून आम्ही ते जाणलेलं नाही . जर सत्य एकमेव आहे आणि जर आपण सत्याला जाणतो तर इतके वादविवाद ,इतकी भांडण ,इतका त्रास ह्या   कलियुगाचा हा जो काही ,कलह ब्रम्ह आहे . तो कसा उत्पन्न झाला असता ,झाला असता ?. हि गोष्ट खरी कि पंचावन्न देशातील हि मंडळी आहेत ,पण हि आत्म साक्षात्कारी आहेत . त्यामुळे यांच्यात कलह नाही ,भांडण नाही ,चुरस नाही नुसतं प्रेम . एकमेकांचा आनंद कसा घ्यायचा ते याना माहित आहे .  महाराष्ट्राची महती माहित आहे ,मी काय सांगणार . याच नाव महाराष्ट्र आहे म्हणजे काहीतरी विशेष असलंच पाहिजे असा निदान आपण विचार केला पाहिजे . आणि या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो तेव्हा आपणही काहीतरी विशेष असलं पाहिजे ,त्यातून कोल्हापुरात महालक्षीमीच्या परिसरात आपला जन्म झाला म्हणजे आणखीन काहीतरी विशेष असलं पाहिजे Read More …

Shri Mahalakshmi Puja Kolhapur (India)

Shri Mahalakshmi Puja Date 21st December 1990 : Place Kolhapur Type Puja Speech [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] ुरचं, सगळ पूरच मराठीत सांगायलाच नको, म नाणलं पाहिजे संगळ तुम्हाला माहीतीच आहे. पण एब्हढं हृत्व कोल्हा ० इतके दिवस गातो, परवा मी झये कोणाला विचारलं ‘महालक्ष्मीच्या जोगवा आपण् . की ज सूचेना, तर मी त्यांना सौगितलं, महालक्ष्मी मध्यनारग गातो जोगवा’ तर त्यांना कांही उत्तर मंदीरात का आहे. सुषुम्ना न कुंड होईल. सुषुम्ना नाड़ी अशाप्रकारे बनली आहे की कागदाला आपण साडेतीन बेळां लपेटलं तर ति्या आंतल्या सूक्ष्म नाडीता ब्रम्हनाडी म्हणतात. लिनीचं जागरण नाड़ी आणि त्याच्यांतच यां नाडीतूनच प्रथम कुंडलिनीचे जागरण होतं. आणि अगदी केसा सारखी वर आली तरी ब्रम्हंध्राचे छेदन करते. ब्रम्हरंघ्राच्या छेदनाने झाला साक्षात्काराची सुरूवात होते. मध्यमार्ग अशा विशेष प्रकारे बनविला गेला आहे की, त्यामध्ये कितीही बाधा आल्या तरी कुंडलिनीच्या जागरणानंतर मोठा होऊँ शक्तो. या मग पाया’ असे पहिल्यादा शिखर मग पाया सा गोष्टीचा अपोग करून सहजयोगांत आम्ही ‘आधी कळस असे करून हे मंदीर बांधलं. प्रत्येक ठिकाणी जिये जिये पृथ् पैसे मिळवायला लोकानी सुरूवात केली. हे स्वयंभू विग्रह तपार केले तिथे तिथे वाईट पध्दतीने ीतत्वाने पृष्व मंदीरांची स्थिती वाईट झाली. लोक आपला की या मंदीरीतलं चैतन्य दबून जातंय की पैसा मिळवत मिळबत सुख्वात केली. ं लागलं राहीले त्यामळे कधी कधी असं बा पण आपण आला त्य डोट पावती प्रगत होलक्ष्मी आहांत तर असं होतं पशरकतं की महालक्ष्मीची परनी प्रन या मैहीगंत गन

Press Conference Kolhapur (India)

Press Conference, Kolhapur, India, 20-12-1990 काळापासून आपल्या देशामध्ये कुंडलिनी शक्ती आहे . असे वर्णन केले आहे.  आता किती अनादी पुस्तकात आहे ते मी तुम्हाला सांगते.  चाप्टर लिहून घ्या. कारण जे काय असते. संस्कृत वाचलेले नाही. त्याच्यामुळे माहिती नाही.  पान 427 आता हे पुस्तक घ्या. पुष्कळ आहे. हंस उपदेश  आता योग तुरा मनी, हे आधी शंकराचार्य यांनी  लिहले ते बघू या. योग तुरा मणी,  लिहिल्यानंतर त्याच्यात त्यांनी सात्विक चर्चा केली, वैचारिक चर्चा आहे. त्यात एक शर्मा म्हणून धर्ममार्तंड आहेत. त्यांनी त्यांचं डोकं खाल्लं, त्यांचं सोडा. मग त्यानंतर सौंदर्य लहरी म्हणून पुस्तक लिहिलं. ऋषी याग, ध्यान विद्या, योग सुख उपदेश, योग कुंडलिनी, उपनिषद म्हणजे कुंडलिनी जागरण.  कई उपनिषद, देवीभागवत, योग पुराण, लिंग पुराण, अग्नि पुराण, नंतर शंकराचार्यांची सौंदर्य लहरी .त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रात मार्कंडेय. मार्कंडेय कुठ झाले माहित आहे का .आता आपल्याला माहितीच नाही. आपल्यात काय असते ते. ते झालं महाराष्ट्रात साडेतीन पीठ आहेत. आता हे हिंदी मध्ये लिहिलेलं कल्याण आहे. यांचा अभ्यास फार  चांगला आहे. आपण सगळं  जाणतो असं नाही. आपण मराठीत सगळं जाणतो पण या लोकांनी  हिंदीत पुष्कळ कार्य केले आहे .मराठी तेवढं कार्य झालेला नाही. आता यांनी लिहिले ओमकार स्वरूप साडेतीन सगुण शक्ती पीठ महाराष्ट्रात आहेत. कोण  कोणचं एक  मातार गड म्हणजे ज्याला आपण माहूरगड म्हणतो. एक गाणं आहे माहुर गडावरी तुझा वास, दुसरं कोल्हापूर मध्ये, तीन तुळजापूर. मातापुर ची महासरस्वती,तुळजापूरची महाकाली, कोल्हापूरची महालक्ष्मी, . त्यांचं सर्व काही यांनी दिलेल आहे काय काय ते. महाराष्ट्रात समर्थ रामदास यांनी  देवीला रामवरदायनी असं म्हटलं आहे. कारण शिवाजी महाराज तुळजापूर भवानी ला जात असत. तेथे त्यांना वरदान मिळाले ह्यांनी एवढे मोठे काम केले Read More …

Public Program Kolhapur (India)

1990-1219 PUBLIC PROGRAM, KOLHAPUR, INDIA  शोधणाऱ्या आपण सर्व सहजयोग्यांना, तसेच अजून जे सहजयोगी झाले नाहीत अशा सर्वांना आमचा प्रणाम नमस्कार!        आशा ठेवली पाहिजे की सत्य आहे तिथे आहे आणि आपण त्याची कल्पना करू शकत नाही, त्याच्यावर कोणचंच आरोप पण करू शकत नाही, किंवा आपण ते बदलूही शकत नाही. हे सत्य काय आहे? हे सत्य आहे की आपण मन, बुद्धी, अहंकार या उपाधी नसून आपण आत्मा आहोत, आणि दुसरं सत्य असं आहे की, चराचरामध्ये एक सूक्ष्म शक्ती जिला वेदामध्ये ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. तसंच शास्त्रामध्ये तिला परमचैतन्य असं म्हटलेलं आहे. बायबलमध्ये त्याला ‘कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट’ म्हटलेलं आहे. आदिशंकरानी तिला ‘सलिलं सलिलं’ म्हणून पराशक्तीचे वर्णन केलेले आहे. ही अशी शक्ती जी सर्व जिवंत कार्य करते ती जिवंत कार्य करणारी ही शक्ती आहे आणि तिला जाणणे तिचा बोध होणे हे अत्यंत आवश्यक आहे. मानवी चेतनेपर्यंत आपण आपल्यावर उत्क्रांतीमध्ये आलोत. एवोलूशन मध्ये आलो आहोत, पण अजून मानवी चेतनेत आपल्याला अजून केवल ज्ञान किंवा केवल सत्य मिळालेलं नाही. त्याचा अर्थ असा की प्रत्येकजण एकच गोष्टीला एक आहे असं म्हणत नाही. म्हणजे आता आपल्याला डोळ्यांनी दिसतंय मी आपल्यासमोर उभी आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की माताजी आमच्यासमोर उभ्या आहेत. पण विचारांच्या बाबतीत तसं नाही. प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा बनतो, त्यामुळे धारणा वेगळ्या आहेत, प्रणाल्या वेगळ्या आहेत. कुणाला कम्युनियम पाहिजे, तर कुणाला डेमोक्रेसी पाहिजे, कुणाला एक राजा असलेला तो चालेल, अशारीतीने अनेक तऱ्हेचे राजकारणातसुद्धा, समाजात प्रत्येक ठिकाणी एक-एक वेगळा विचार करतात.          लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की आपण आधी स्वातंत्र्य घेतलं पाहिजे आणि आगरकरांचं असं म्हणणं होतं की नाही आधी समाजाची व्यवस्था ठीक Read More …

Talk on Marriage and Nirvikalpa Kolhapur (India)

Purity Of Sahaja Yogis Date 30th December 1989: Brahmapuri Place Seminar & Meeting Type आता आपण कोणतीही मोठमोठाली माणसं बघुयात, आपल्यासमोर टिळक आहेत, आगरकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी जी मोठमोठाली मंडळी झालीत, त्यांनी काय केलंय ? ते कसे वागले ? त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवाजी महाराजांनासुद्धा चारदा लग्न करावं लागलं, राजकारणासाठी. त्यांनी केलं. ‘राजकारणासाठी मला करायचंय तर मी केलं लग्न.’ पण ते नि:संग होते, त्याच्यावर त्याचा परिणाम नव्हता काही. कराव लागलं तर केलं आम्ही. चार लोकांशी आम्हाला दोस्ती करायचीय. त्यांनी जात-पात पाहिली नाही, की शहाणवच कुळी असलं पाहिजे, की अमुकच असलं पाहिजे. असं काही पाहिलं नाही. त्यावेळेला जेव्हा इतके वर्षापूर्वी गागाभट्टांना इथे येऊन त्यांना राज्याभिषेक द्यावा लागला, जातीपातीच्या लोकांनी त्यांना किती हिणवलं , की तुम्ही कुणबी आहात, तुम्ही मराठा नाही. तेव्हा तुमची तेव्हा ह्या कोणतीही जात असेना का, तुम्ही आज सहजयोगी झालात, तुमची जात बदलली. तुमचा धर्म बदललेला आहे. हा धर्म ‘विश्व निर्मल धर्म’ आहे. तो तुमच्यात जागृत झालेला आहे, त्यामुळे तुमच्या वाईट सवयी गेल्या, सगळं काही गेलं. पण हे भूत अजून काही गेलेलं नाही. तुमच्या जातीच्या लोकांशी तुमचा संबंधच नाही आला पाहिजे. कारण ही जमात जी तुमची आहे, ती भुतं आहेत सगळी . दारू पिणं, मारणं, मग ते दारू पिओ, नाहीतर काही करो. हंडा घेवो नाहीतर काही करो. मग ते आमच्या जातीतलंच असलं पाहिजे. मग तुम्ही सहजयोगी कसे ? मग सहजयोग सोडा तुम्ही. तुम्ही दोन धर्मात उभे राहू शकता का ? नाही राहू शकत. त्याच्यामुळेच काल ह्यांना मार खावा लागला. हे लोक ज्यांनी सर्व धर्म सोडला, परमेश्वर सोडला, आणखीन आम्ही काहीच असं करत नाही असे उभे राहिले. त्यांनी Read More …

Public Program Kolhapur (India)

Public Program. Sadoli in the Kolapur area of Maharashtra (India). 5 March 1984. (Dots indicate that the content is unclear) सहजयोगी १ :   साडोलीच्या भूमीमध्ये आज हा अभूतपूर्व योगायोग आहे. महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली असे त्रिगुणात्मक कुंडलिनीचा अवतार माताजी आज तुम्हाला पावन करण्यासाठी आल्या आहेत.  नवीन पर्व आले.  नवीन विचार आले. भारत वर्षामध्ये,  भारत देशामध्ये फार मोठी योग भूमी समजली जाणारी.  फार मोठे योगी होऊन गेले. फार मोठे तपस्वी होऊन गेले.  विश्वामित्रासारखा,  राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिणारा,  महर्षी भूमी आहे.  तरीसुद्धा हा जो माताजींचा सहज योग आहे,  हा या जगामध्ये पहिलेच काम आहे कारण मला असं वाटतं लोकांनी भक्ती केली, जप केलं,  ग्रंथ वाचले,  पारायणं केली.  सगळा देश तूडविला. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत,  रामेश्वरापर्यंत पदयात्रा काढली.  तरी सुद्धा त्यांना दैवी शक्तीबद्दल जितकं समाधान मानायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि त्याच गोष्टींचा मी सुद्धा ………………………पण गगनगिरीनी सांगितलं……नाही.  योगी नाही व्हायचं.  संसार करून परमार्थ करायचा. राम राम करत रहा.  ठीक आहे.  श्रद्धा,  नम्रता अशा जोडीला, अशा तऱ्हेचा जोडीला विचार घेऊन मी जवळ-जवळ १७ वर्ष गगनगिरीनी सांगितलं ते केलं. अनेकदा प्रत्यय आला की माझी तळमळ होती ती काही नाही………. ही तळमळ माझ्या अंतकरणात होती जी समाधान देऊ शकत नाही.  परमार्थाच्या विचाराला,  हृदयाला समाधान मिळायला पाहिजे.  दैवी शक्तीने जे समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं.  तरीसुद्धा माझं भाग्य समजतो मी की मागील वर्षी ८३ च्या १ जानेवारीला १ तारखेला माझ्या १७ वर्षाच्या तपश्चर्येच्या फळाला फळ आलं आणि त्यादिवशी माताजींची आणि माझी गाठ पडून मी पार झालो. कुंडलिनी शक्ती जागृतीचा प्रयोग आणि पार झाल्यानंतर,  समाधान झाल्यावर माताजींकडे मी गेलो. माताजींकडे बघितलं.  माताजी मला बोलायचं आहे मी बोललो.  Read More …

Public Program Kolhapur (India)

1982-1230-Public Program (Malharpeth) Marathi कलियुगा मध्ये जन्म घेणं आणि तेही आई’च्या रूपाने म्हणजे फार कठीण काम आहे. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचक असतो, आई म्हटली की प्रत्येक मानवरासारखच (मानवासारख) आपल्या जी हक्काची आई आहे आपण कसंही तिच्याशी वागलं तर ती आपल्याला क्षमाच करणार तेव्हा सहज योग आई’च्या रूपाने साध्य करण तर व्हावंच लागतं कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं आईच व्हायला पाहिजे दुसऱ्या कोणाच्या शक्तीततच नव्हत हे काम. तर मल्हार पेठेत सत्कार बघून आईचा या कलियुगात फार आश्चर्य वाटतं आणि फार आनंद झाला म्हणजे कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे ते खरं आहे हे आज मला मात्र पटलं. आम्ही एक स्त्री आहोत तेही एक आई आहोत म्हणजे एकतऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला तुमचं काही वाईट झालं तर तेही दुखतं ,घनिष्ठ आहात तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो की कसंही करून यांना एकदा मिळालं पाहिजे कारण आईला स्वतःचं काहीच नसतं तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ती मिळाली त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं त्याच्या पलीकडे काय यायला नको .तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे ते झालं म्हणजे कृतार्थ वाटतं त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नाही ,आपण इतकी मंडळी मल्हार पेठेत सहज योगाच्या कार्यक्रमाला आलात म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक लोक, परत संत तुकारामांच्या नावाने इथे एवढी सुंदर शाळा काढलेली आहे याबद्दल मला इथले मुख्याध्यापक जे आहेत ते मला दिसले नाहीत कोण आहेत ते .तर त्यांना अत्यंत त्यांचे आभार मानायचे आहे संत तुकाराम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचेच आत्मिक स्वतःचे आहेत त्यांनी तर सहज योगाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती त्याचीच तयारी आपल्या Read More …