Shri Bhoomi Devi Puja New Delhi (India)

Nirmal Dham Bhoomi Pujan Date 7th April 2000: Noida Place Public Program Type Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] करण्याचा माझा मानस होता. तीच इच्छा आता पूर्ण होणार आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. ज्या स्त्रिया निराधार आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, आपल्या मुलांचे व्यवस्थित पालन-पोषण करता येईल, समजात त्यांना प्रतिष्ठा मिळेल अशी व्यवस्था व शिक्षण या ठिकाणी झाले पाहिजे. अर्थात एक संस्था सुरू सत्याच्या शोधात असणार्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. एवढ्या टूरवरच्या ठिकाणी आपण लोक या कार्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने याल असे मला चाटत नव्हते. पण तुम्हा सर्वांना इथे जमलेले पाहून मला आनंद होत आहे. एकदा आम्ही गाडीने प्रोग्रामसाठी जात असताना दौलताबादजवळ आमची गाडी नादुरुस्त झाली. म्हणून मी केली म्हणजे सर्व काही झाले असे नाही. कारण हा एक खाली उतरले. खरे तर हीहि एक ‘सहज चीच घटना म्हणायचे, खाली उतरल्यावर मला तिथे साधारण शंभर एक होण्यासाठी साया समाजाचेच परिवर्तन व्हायला हवे, महिला व त्यांच्याबरोबरची मुले एका नळावर पाणी भरत असल्याचे दिसले. त्यांच्या अवतारावरून त्यांची परिस्थिति घरातील स्त्री व मुलांबाळाचे बाबतीतील त्यांचे कर्तव्य पार हलाखीची असल्याचे माझ्या लक्षात आले. चौकशी केल्यावर मला समजले की त्या सर्व बायका घटरस्फोटित मुसलमान एरवी इथल्या स्त्रियांची हालत सुधारणे शक्य नाही. इथे होत्या व मुलांसह अत्यंत हालाखीत जगत होत्या व दगड फोडण्याचे दुष्काळी मजुरी-कामावर लागल्या होत्या. राहण्यासाठी पडकी कच्ची घरे होती. अंगावर धड कपड़े पूर्वी कदाचित सती जाणे त्या पसंत करीत असाव्यात. नव्हते. त्यांची सर्व दशा पाहिल्यावर मला रडूच आवरेना. माझ्या मनात आले की आपल्या देशाची पुरातन संस्कृति व स्त्रियांमध्ये चारित्र्याची पवित्रता असूनही लोकांची अशी (पति) तर ‘मी म्हणेन Read More …

Public Program Pune (India)

Public Program, Pune, India 7th March 2000 हिंदी भाषण आता मराठीत बोलते, कारण अजूनही आपण हिंदी भाषा काही आकलन केलेली नाही. ती करायला पाहिजे. ती आपली राष्ट्रभाषा आहे. ती भाषा अवश्य यायला पाहिजे. साऊथ इंडिया मध्ये सुद्धा लोकांना ती भाषा आली पण महाराष्ट्रात काही येत नाही. मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं असं आहे मराठी भाषेसारखी भाषा नाही हे मला कबुल आहे. फारच उत्तम भाषा आहे. त्या बद्दल शंका नाही. पण जी आपली राष्ट्रभाषा आहे त्याच्याशी जर आपण संबंधित झालो तर राष्ट्रभाषेबरोबर आपलीही भाषा वाढेल. आणि लोक समजतील की मराठी भाषा काय आहे. पण जर आपण त्याच्या बरोबर सोवळं पाळलं आणि फक्त आम्ही मराठी शिकणार; मग या देशाचे आपण एक नागरिक आहात, त्यातली जी राष्ट्रभाषा आहे तिला आत्मसात केलं पाहिजे. अहो आम्ही काय मराठी भाषेतच शिकलो, मराठी शाळेत शिकलो आणि मराठी मिडीयम मध्ये शिकलो. पण आमचे वडील मोठे भारी देशभक्त होते. त्यांनी सांगितलं, काही नाही, हिंदी आलीच पाहिजे. आणि मलाही व्यासंगच फार होताना, तेंव्हा आमच्या घरी सगळ्यांना हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा येतात. तेंव्हा आपल्याकडे सुद्धा एक असं व्रत करावं की आम्ही हिंदी भाषा ही शिकून घेऊ. हि माझी विनंती आहे. आज आपल्या देशाचे अनेक तुकडे झालेले पाहून फार दुःख वाटतं. आणि विशेषतः महाराष्ट्रात, ती देशभक्ती नाही; जशी पाहिजे. आश्चर्याची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांसारखे झाले जिथे थोर पुरुष तिथे ती देशभक्ती नाही. पैशाकडे लक्ष, कसेही करून पैशाकडे लक्ष घालायचं. पैशाने सुखी झालेला मनुष्य मी आज तरी पाहिलेला नाही. पैसे आले म्हणजे मग सगळे प्रकार सुरू. दारू प्या मग आणखीन करा, हे करा, जेवढे पैसेवाले लोकं आहेत त्यातला एखादाच मी दानवीर पहिला. Read More …

Public Program Pune (India)

Velechi Hallk 25th March 1999 Date : Place Pune Public Program Type सत्य शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार! पूर्वी अनेकवेळा मी आपल्याला सत्याबद्दल सांगितलं होतं. सत्य काय आहे ? सत्य आणि असत्य यातला फरक कसा ओळखायचा याबद्दल मी आपल्याला बरंच समजावून सांगितलं होतं. आधी या पुण्यात या पुण्यपट्टणम मध्ये पण आपण सत्य का शोधतो ते बघितलं पाहिजे. आज या कलियुगात अनेक असे प्रकार दिसून येतात की मनुष्य घाबरून जातो. त्याला समजत नाही की हे सर्व काय चालले आहे आणि ही कलियुगाची विशेषता आहे की मनुष्याला भ्रांती पडते. त्याला भ्रांती होते आणि त्या भ्रांतीतून तो बावचळून जातो. घाबरून जातो. त्याला समजत नाही की सत्य काय आहे, मी कुठे चाललोय, जग कुठे चाललंय असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात डोकावतात. हे आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे पण सर्व जगात आहे. सर्व जगाला या कलीच्या महिम्याची फार पूर्णपणे जाणीव झालेली आहे. सांगायचं म्हणजे नल आणि दमयंती यांचा जो विरह केला गेला तो कलीने केला आणि एकदा हा कली नलाच्या हाती सापडला. त्यांनी सांगितलं की मी तुझा सर्वनाश करून टाकतो म्हणजे कोणालाच तुझा उपद्रव व्हायला नको, काही त्रास व्हायला नको तर तेव्हा कलीने त्याला सांगितलं की हे बघ की माझं आधी तू माहात्म्य ऐक आणि ते ऐकल्यावर जर मला मारायचे असेल तर मारून टाक. तर त्यांनी (नलाने) सांगितलं तुझं काय महत्त्व आहे? काय महत्त्व आहे तुझें? तर त्यावर त्याने (कलीने) सांगितले की माझं हे महत्त्व आहे की जेव्हा माझं राज्य येईल म्हणजे जेव्हा कलियुग येईल तेव्हा लोक भ्रांतीत पडतील. हे खरं आहे. पण त्यामुळेच त्यांच्यामध्ये अशी उत्कट इच्छा होईल की आपण शोधून काढावं की मनुष्याचं Read More …

Awakening Of Kundalini Is Not A Ritual Shivaji Park, Mumbai (India)

1999-02-20 Awakening Of Kundalini Is Not A Ritual, Mumbai, India Hindi सत्य को खोजने वाले आप सभी साधकों को मेरा प्रणाम.  सत्य के और हमारी नज़र नही होती, इसकी क्या वजह है? क्यों हम सत्य को पसंद नहीं करते और आत्मसात नहीं करते? उसकी नज़र एक ही चीज़ से खत्म हो जाये तो बातकी जाए, पर ये तो दुनिया ऐसी हो गई की गलत-सलत चीज़ों पे ही नज़र जाती है। सो इस पर यही कहना है कि ये घोर कलियुग है, भयंकर कलियुग है। हमने जो लोग देखे वो बहुत निराले थे और आज जो लोग दिखाई दे रहे हैं, वो बहुत ही विक्षिप्त, बहुत ही बिगड़े हुए लोग हैं। और वो बड़े खुशी से बिगड़े हुए हैं, किसी ने उन पे ज़बरदस्ती नही की । तो अपने देश का जो कुछ हाल हो रहा है उसका कारण यही है कि मनुष्य का नीति से पतन हो गया। अब उसके लिए अपने देश में अनेक साधु-संतों ने मेहनत की, बहुत कुछ कहा, समझाया। और खास कर भारतवर्षीयों की विशेषता ये है कि जो कोई साधु-संत बता देते हैं उसको वो बिलकुल मान लेते हैं, उसको किसी तरह से प्रश्ण नही करते। विदेश में ऐसा नही है। विदेश में किसे ने भी कुछ कहा तो उसपे तर्क करने शुरू कर देते है। लेकिन हिंदुस्तान के लोगों की ये विशेषता है कि कोई ग़र साधु-संत उनको कोई बात बताए तो उसे वो निर्विवाद मान लेते है कि ये कह गए है ये हमें करना चाहिए। छोटी से लेकर बड़ी बात तक हम लोग ऐसा करते हैं। ये भारतीय लोगों की Read More …

Public Program Pune (India)

सत्य को खोजने वाले आप सभी साधकोंको हमारा नमस्कार | माफ करिए जिन लोगोने कहा था की आठ बजे के पहले मत पहुँचयेगा ,जो लोग वाकई में सहजयोग में अपनी जागृती चाहते है वो बैठे रहेंगे और बाकीके चले जाएंगे | एक कारण ये है | दूसरा ये की हम कुछ सहजयोग के बारेमें बताएँगे और कुछ परदेसी लोग आपके सामने गाना गाना चाहते थे  | इस तरह से तीन चार कारणोंकी वजह से जानकर हम धीरे धीरे आए | पर इतने साधकोंको देख करके क्या कहा जाए | इस पूना में बड़ी मेहनत की है और वर्षोसे यहाँ आते थे | क्योंकि शास्त्रोमें इस जगह का नाम पुण्यपट्टनम है | माने पुण्यवान नगरी पर यहाँ इतना कुछ गड़बड़ मामला था जब हम आए | और उसके बाद ऐसे यहाँ गड़बड़ गुरु लोग आ गए | इसके कारण पूना  की जो आध्यात्मिक स्तिति थी वो ख़राब हो गई | बहोतसे लोगोंने हमें सताया भी बहोत है यहाँ पूना में | और उससे कोई हमें हानि नहीं हुई ,किंतु लोगोंकी जरूर हानि हुई | न जाने क्यों सत्य के विरोध में हमेशा कुछ लोग ऐसे खड़े हो जाते है की जिनको पता ही नहीं की सत्य कितना आवश्यक है | जिस कगार पे आज मनुष्य खड़ा है आप जानते है की ये घोर कलियुग है | ऐसा कलियुग तो कभी देखा ही नहीं | और सुना भी नहीं | जैसा आज कल है | कुछ भी  समजमें नहीं आता कोई भी प्रांगण में आप देखे ,राजकरण हो कुछ हो हर चीज़ में आप पते है की एक अजीबसा अँधेरा Read More …

Public Program Day 1 Kolhapur (India)

पब्लिक प्रोग्रॅम कोल्हापूर .  सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . आम्ही जेव्हा सत्याला शोधतो असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे ते तुम्ही बदलू शकत नाही . त्याची तुम्ही नुसती कल्पना करू शकत नाही . त्याची तुम्ही रूपरेषा बनवू शकत नाही . सर्वात मुख्य म्हणजे या मानवी जीवनात या मानवी चेतनेत तुम्ही त्याला जाणू शकत नाही . म्हणूनच सर्व शास्त्रां न मध्ये ,मग ते आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेले असोत ,चायनीज नि लिहिलेले असोत ,कुराणात असोत किंवा कोणत्याही धर्मातले असोत सर्वानी एकमेव गोष्ट सांगितली कि तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे . तुमचा आत्म साक्षात्कार झाला पाहिजे . तुम्हाला आत्म बोध झाला पाहिजे . पण आत्मबोध म्हणजे नुसतं काहीतरी बुद्धीने जाणान्या सारखं नसत . पण ते बुद्धीच्या पलीकडचं असं आहे . आणि त्या साठी फक्त एक तऱ्हेची नम्रता मनुष्यात पाहिजे . कि अजून आम्ही ते जाणलेलं नाही . जर सत्य एकमेव आहे आणि जर आपण सत्याला जाणतो तर इतके वादविवाद ,इतकी भांडण ,इतका त्रास ह्या   कलियुगाचा हा जो काही ,कलह ब्रम्ह आहे . तो कसा उत्पन्न झाला असता ,झाला असता ?. हि गोष्ट खरी कि पंचावन्न देशातील हि मंडळी आहेत ,पण हि आत्म साक्षात्कारी आहेत . त्यामुळे यांच्यात कलह नाही ,भांडण नाही ,चुरस नाही नुसतं प्रेम . एकमेकांचा आनंद कसा घ्यायचा ते याना माहित आहे .  महाराष्ट्राची महती माहित आहे ,मी काय सांगणार . याच नाव महाराष्ट्र आहे म्हणजे काहीतरी विशेष असलंच पाहिजे असा निदान आपण विचार केला पाहिजे . आणि या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो तेव्हा आपणही काहीतरी विशेष असलं पाहिजे ,त्यातून कोल्हापुरात महालक्षीमीच्या परिसरात आपला जन्म झाला म्हणजे आणखीन काहीतरी विशेष असलं पाहिजे Read More …

Public Program Kolhapur (India)

1990-1219 PUBLIC PROGRAM, KOLHAPUR, INDIA  शोधणाऱ्या आपण सर्व सहजयोग्यांना, तसेच अजून जे सहजयोगी झाले नाहीत अशा सर्वांना आमचा प्रणाम नमस्कार!        आशा ठेवली पाहिजे की सत्य आहे तिथे आहे आणि आपण त्याची कल्पना करू शकत नाही, त्याच्यावर कोणचंच आरोप पण करू शकत नाही, किंवा आपण ते बदलूही शकत नाही. हे सत्य काय आहे? हे सत्य आहे की आपण मन, बुद्धी, अहंकार या उपाधी नसून आपण आत्मा आहोत, आणि दुसरं सत्य असं आहे की, चराचरामध्ये एक सूक्ष्म शक्ती जिला वेदामध्ये ऋतंभरा प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. तसंच शास्त्रामध्ये तिला परमचैतन्य असं म्हटलेलं आहे. बायबलमध्ये त्याला ‘कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट’ म्हटलेलं आहे. आदिशंकरानी तिला ‘सलिलं सलिलं’ म्हणून पराशक्तीचे वर्णन केलेले आहे. ही अशी शक्ती जी सर्व जिवंत कार्य करते ती जिवंत कार्य करणारी ही शक्ती आहे आणि तिला जाणणे तिचा बोध होणे हे अत्यंत आवश्यक आहे. मानवी चेतनेपर्यंत आपण आपल्यावर उत्क्रांतीमध्ये आलोत. एवोलूशन मध्ये आलो आहोत, पण अजून मानवी चेतनेत आपल्याला अजून केवल ज्ञान किंवा केवल सत्य मिळालेलं नाही. त्याचा अर्थ असा की प्रत्येकजण एकच गोष्टीला एक आहे असं म्हणत नाही. म्हणजे आता आपल्याला डोळ्यांनी दिसतंय मी आपल्यासमोर उभी आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की माताजी आमच्यासमोर उभ्या आहेत. पण विचारांच्या बाबतीत तसं नाही. प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा बनतो, त्यामुळे धारणा वेगळ्या आहेत, प्रणाल्या वेगळ्या आहेत. कुणाला कम्युनियम पाहिजे, तर कुणाला डेमोक्रेसी पाहिजे, कुणाला एक राजा असलेला तो चालेल, अशारीतीने अनेक तऱ्हेचे राजकारणातसुद्धा, समाजात प्रत्येक ठिकाणी एक-एक वेगळा विचार करतात.          लोकमान्य टिळकांचं असं म्हणणं होतं की आपण आधी स्वातंत्र्य घेतलं पाहिजे आणि आगरकरांचं असं म्हणणं होतं की नाही आधी समाजाची व्यवस्था ठीक Read More …

Public Program Satara (India)

पब्लिक प्रोग्रॅम सातारा .  मानवी कल्पनेनी ते आपण आकलन करू शकत नाही . ते मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे . मानव चेतनेत ते आपण जाणू शकत नाही . जर हि गोष्ट आपण लक्षात घेतली तर अध्यात्म म्हणजे काय ते आपल्या लक्षात येईल . अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान . ते झाल्या शिवाय कोणतीही अंधश्रद्धा ठेऊन ,कोणतीही धारणा धरून हे कार्य होत नाही . त्याला कुंडलिनीच जागरण हेच एक विधान सांगितलं आहे . ज्ञानेश्वर हे नाथ पंथीय आहेत . नाथ पंथियां मधली परंपरा अशी कि एका गुरूला एकच शिष्य असे . आणि त्या गुरुनी एकाच शिष्याला जागृती द्यायची आणि हे सगळं ज्ञान सांगायचं , पण ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात एक मोठी कामगिरी केली त्यांचे गुरु होते त्याचे जेष्ठ बंधू निवृत्तीनाथ त्यांना परवानगी मागितली ,कृपा करून एव्हडी परवानगी द्या कि मी जे काही कुंडलिनी बद्दल जाणतो ते मी स्पष्ट रूपाने लोकांना सांगू शकतो . नुसतं सांगायची मला परवानगी द्या . मी कुणालाही शिष्य करणार नाही पण मला फक्त सांगायची तुम्ही परवानगी दिलीत तर मला सार्थक वाटेल . त्यांनी हि परवानगी ज्ञानेश्वरांना दिली . आणि त्यामुळे बाराव्या शतकात च  ज्ञानेश्वरी लिहिताना सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीच वर्णन करून ठेवलं आहे . पण धर्म मार्तंडाना यातलं काही गम्य नव्हतं म्हणून त्यांनी सहावा अध्याय निषिध्द आहे म्हणून सांगितलं . त्यामुळे लोकांना कुंडलिनी बद्दल ज्ञान झालं नाही . पण त्या नंतर रामदास स्वामींनी कुंडलिनी बद्दल बरच सांगितलं आहे . हि रामदासांची कृपा ,केव्हडी पवित्र असली पाहिजे . त्यांनी स्पष्ट पणे सांगितलं कुंडलिनीच जागरण हे आवश्यक आहे . त्या शिवाय आत्म्याचं ज्ञान मिळत नाही . अध्यात्म बनत नाही . त्यांना कुणी विचारलं किती वेळ लागतो कुंडलिनीच जागरण व्हायला ,त्यांनी सांगितलं तत्क्षण ,पण देणारा  तसा पाहिजे  आणि घेणाराही तसा Read More …

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 18th December 1990 Date: Karad Place Public Program Type सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसऱ्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला। आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात , वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, Read More …

Public Program, Bhautik Pragati Adhyatmikte shiway hot nahi (India)

भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही ब्रह्मपुरी, १८ डिसेंबर १९९० सत्याला शोधणार्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार! सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की सत्य आहे. जे इथे आहे ते आपण बदलू शकत नाही किंवा ते आपण आपल्या कल्पनेत ते बदलू शकतो. ते सुद्धा जाणण्यासाठी मानवी चेतना अपुरी आहे. आपण उत्क्रांतीमध्ये, इव्होल्युशनमध्ये आज मानव स्थितीला आलो, पण या मानवस्थितीत आपल्याला केवळ सत्य मिळालेले नाही, केवळ ज्ञान मिळालेले नाही, ज्याला आपण कैवल्य म्हणतो. त्यामुळेच तरत-हेचे नवीन-नवीन विचार, नवीन नवीन धारणा निघतात आणि एकाचा दूसर्याला मेळ बसत नाही. मुख्य कारण असे आहे की केवळ सत्य जाणण्यासाठी आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे, ज्याला आपण अध्यात्म असे म्हणतो. आता डॉ.प्रभुणेंनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. पण ती अशी समजून घेतली पाहिजे की विज्ञान हे एकांगी आहे आणि एकांगी असल्यामुळे मनुष्याची सर्वांगीण उन्नती त्या विज्ञानामुळे होऊ शकत नाही. विज्ञानामध्ये कला नाही, प्रेम नाही, आनंद नाही. शुष्क आहे. जे समोर दिसते आहे त्यालाच आविष्कारीत करून मनुष्याने आपल्या भौतिक प्रगतीकरता हे विज्ञान वापरलेले आहे. पण जी भौतिक प्रगती अध्यात्माशिवाय होत नाही तिचा त्रास हा महाराष्ट्रात राहून कळणार नाही. आता आमचं म्हणजे काहीतरी असं नशीब आहे की सारखे आम्ही फिरत असतो आणि अनेक देशांत प्रवास केला. आणि अनेक देशात वास्तव्य झालं. इथे माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती अशी की ह्या लोकांना या एकांगी विज्ञानामुळे अनेक त्रास झाले. मुख्य म्हणजे ह्यांची सामाजिक व्यवस्था अगदी तुटून गेली. मुलांना काहीही वळण नसल्यामुळे मुलं तिथे ड्रग घेतात, दारू पितात, वाट्टेल तसे वागतात. पुष्कळ मुलांनी तर शाळा-कॉलेजला जाणं सोडलं. ते जरी असलं तरी अमेरीकेसारख्या देशामध्ये ६५% लोक, मग ते मोठे असोत, लहान असोत, मुलं असोत ह्यांनी Read More …

Public Program, Bhartatil Bhrashtachar (India)

Bhartatil Bhrashtachar 16th December 1990 Date: Place Wai Public Program Type त्या देशामध्ये किती हिंसाचार वाढलेला आहे, ह्याची अगदी आपल्याला कल्पना नसेल. आता न्युयॉर्कला जायचं असलं तर तुम्ही हातात काही घालून जाऊ शकत नाही, गळ्यात मंगळसूत्र घालून जाऊ शकत नाही. ते लपवून न्यावं लागतं. आपल्याला त्याची कल्पना नाही. इथे जे हिंदुस्थानी लोक आहेत ते अलिप्तच राहतात, नको रे बाबा! मला काही लोकांनी पत्र पाठवलं की, ‘माताजी, तुम्ही हिंदुस्थानात जर चांगली शाळा काढली तर आम्ही आमच्या मुलांना तिथे पाठवू.’ काही लोक आपली मुलं इथे घेऊन येतात. कारण ती इतकी उद्धट झाली आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इंग्लंडसारख्या शहरामध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये फक्त लंडन या एकाच सिटीमध्ये प्रत्येक आठवड्याला दोन मुलं आई-वडील मारून टाकतात. ही दशा तुम्हाला इथे आणायची आहे की का? सर्वांगीण प्रगतीसाठी पहिल्यांदा अध्यात्माचा पाया पाहिजे. अध्यात्मात उतरले, तुम्ही जर एखाद्या दारूङ्याला किंवा कोणालाही शंभर रूपये दिले तर तो कुठेतरी वाया घालवणार. पण जर तुम्ही एखाद्या संताला पैसे दिले तर तो सत्कारणीच लागणार. तो सत्कर्मातच जाणार. आता जसे हे लोक आहेत, तर मी पैसे काढले, ‘आम्ही एखाद्या शाळेला देणगी देऊ माताजी.’ सत्कर्मासाठी. काही वाईट कर्मासाठी नाही. पण आपल्याकडे ते सत्कर्मसुद्धा कठीण झालेले आहे. आम्ही आमचे लंडनला घर विकल्यावर विचार केला की कोणत्यातरी संस्थेला पैसे द्यायचे, तर एक संस्था अशी मिळाली नाही की जिथे खोटेपणा नाही. सर्व संस्थांमध्ये खोटेपणा, म्हणजे करायचे तरी काय? मग आम्ही शेवटी एक वास्तू बांधली. म्हटलं कमीत कमी एक वास्तू तर बांधू देत. मग पुढचं काय ते बघता येईल. अशा रीतीची ही परिस्थिती आपल्या देशात आलेली आहे आणि हा भ्रष्टाचार आणि आपल्या मुलांचं उद्या काय होणार आहे याचा Read More …

Public Program Satara (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्य म्हणजे काय आणि आपण ते का शोधतो हे समजून घेतलं पाहिजे . सत्य म्हणजे जे संत साधूंनी आणि अवतारणा मध्ये सांगितलं आहे . तुम्ही हे शरीर ,मन ,अहंकार ,बुध्दी या उपाधी नसून शुध्द आत्मा आहात . हे सत्य आहे . आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सर्व सृष्टी मध्ये व्यापलेली अशी अत्यंत सूक्ष्म शक्ती जिला आपण परमचैतन्य अस म्हणतो . हे दोन सत्य आपण शोधून काढले पाहिजेत . आणि ते का आपण शोधतो कारण आजच्या काळात या कलियुगात विशेषतः आपण बघतोआहे कि प्रत्येक तऱ्हेनी आपल्याला त्रास होत आहे . जर माणसा जवळ पैसा असला तरी  तो बेकार जातो आणि नसला तरी तो त्रासात असतो . ज्या देशानं मध्ये अत्यंत विपुल असा पैसा आहे त्या देशातले लोक आज इथे आपल्या कडे आलेले आहेत . त्यांच्या जवळ मोटारी ,गाड्या सगळं काही ,श्रीमंत लोक आहेत . ते ह्या महाराष्ट्रात एव्हड्या साठी आलेत कारण पैशाच्या धुंदीत तसच विज्ञानाच्या घमेंडीत त्या फुशारकीत एकाकी जीवन झालं आहे . त्या एकाकी जीवनाला ते कंटाळले कारण त्यामुळे अनेक त्रास झाले आहेत . अमेरिके सारख्या देशामध्ये आज तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ६५ टक्के लोक घाणेरड्या रोगाने पीडित आहेत आणि लवकरच ते ७० टक्के होतील अस भाकीत आहे . त्यातून त्यांना सुटका नाही . तरतऱ्हेचे रोग त्यांना झाले आहेत . रोगाचं नव्हे तर तिथे हिंसाचार फार बोकाळला आहे . तुम्ही कोणत्याही गावात ,खेडेगावात अस बसू शकत नाही . किंवा रात्रीच्या वेळेस एकट कुठ जाऊ शकत नाही . न्यूयार्क ला जायचं म्हंटल तर आपले दागिने ,मंगळसूत्र सगळं काढावं लागत नाहीतर लपवाव लागत . तिथं कुणी तुम्हाला सोडणार नाही . इतकी तिथे हिंसाचाराची वृत्ती वाढली Read More …

Public Program Sangamner (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्या बद्दल सांगायचं म्हणजे सत्य आहे तिथे आहे . ते आपण बदलू शकत नाही आणि त्याला आकार देऊ शकत नाही . जे लोक सत्याला न शोधता अनेक कार्य करतात त्या कार्यं मध्ये अनेक दोष असतात . सत्याला जाणण्या साठी मानव चेतना अपुरी आहे . आणि म्हणूनच ह्या मानव चेतनेच्या पलीकडे ह्या मानवी बुध्दीचे प्रांगण ओलांडून आपल्याला नव्या प्रांगणात उतरले पाहिजे . ते उतरल्या शिवाय आपल्या मध्ये नीरक्षीर विवेक येऊ शकत नाही . केवळ सत्य मिळू शकत नाही . आज काल नवीन नवीन गोष्टी लोकांनी सुरु केल्या आहेत . काहीतरी नवीन टुम काढायची आणि तरुण मुलांची दिशाभूल करून त्यांना आरडाओरडा करायला लावायचा ,त्यांच्या बुध्दीवर झापड घालायची असे अनेक प्रकार मी बघते आहे . आमच्या सहजयोगा मध्ये हि जी फॉरेन ची मंडळी अली आहेत हि फार विद्वान,शिकलेली ,फार उच्च शिक्षणानी अलंकृत अशी आहेत . आणि यांच्याही देशामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी होत्या ज्यानी ते भांबावून गेले होते . आणि त्यांना समजत नव्हतं कि ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये का होतात . सगळे सुशीक्षीत असताना इतकं तिथे विज्ञानाचं स्वरूप पसरलेलं असताना सुध्दा अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती कि अमेरिके सारख्या देशामध्ये सुध्दा भूतविद्या आहेत ,अनेक विद्या आहेत ,आणि त्यांना स्वातंत्र्य असल्या मुळे वाट्टेल त्या प्रकारचे ते लोक कार्य करतात . तसच विज्ञान सुध्दा हा एकांगी विषय आहे . ज्या देशा मध्ये विज्ञान वाढलेल आहे ,आपल्याला माहित आहे कि मी सर्व देशां मध्ये फिरलेली आहे आणि बरीच वर्ष मी परदेशात घालवली आहेत .  आणि माझ्या एकंदर तिथल्या परीस्तीतीला बघून अशा कल्पना झाल्या आहेत कि नुसतं विज्ञान करून मनुष्याची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही . आणि म्हणूनच हे लोक आता रसातळाला चालले आहेत . त्या देशांना तुम्ही बाहेरून बघता कुपमंडूका सारखं जस Read More …

Sarvajanik Karyakram Shrirampur (India)

1990 -12-11Public Program, Shrirampur सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना माझा नमस्कार .सत्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य  हे आहे तिथे आहे. आपण ते बदलु शकत नाही. ते आपल्या काबूत घेऊ शकत नाही. आणि काहीतरी त्याच्यातनं  सांगून ते सत्य आहे असं पटवून देऊ शकत नाही. आणि जे लोक असं  करतात  ते वास्तविकतेपासनं फार दूर आहेत. आणि स्वतःचं  नुकसान करून घेणं , समाजाचं नुकसान करून घेणं आणि उलट्या गतीनी ते आपल्या  नाशाला प्राप्त होतात .  याला कारण असं आहे की सत्य एक आहे ते म्हणजे  तुम्ही हे शरीर , मन , बुद्धी , अहंकार या उपाधी नसून शुद्ध स्वरूप आत्मा आहात .  दुसरं सत्य असं आहे की सर्व चराचरामध्ये परमेश्वराची प्रेम शक्ती जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो ती कार्यान्वित आहे . तेव्हा ह्या ब्रह्मशक्तीला  प्राप्त  होणं  हा  योग  आहे. आणि सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा ह्या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. पण हे सगळं , मी सांगत असताना आपण माझ्यावर  अंधश्रद्धा ठेऊ नये. उलट एखाद्या वैज्ञानिकासारखं,  सायंटिस्टसारखं  आपलं मन उघडं  ठेवलं पाहिजे . डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जर आपलं डोकं उघडं नसलं तर आपण वैज्ञानिक होऊच शकत  नाही आणि मी जे सांगते ते  जर अनुभवास आलं तर इमानदारी मध्ये  ते मानलं पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. कारण हा एक कल्याणाचा मार्ग आहे.  तो तुमच्याच कल्याणाचाच  नव्हे तुमचा मुलाबाळांचा , तुमच्या सर्व समाजाचा, भारताचा आणि सर्व जगाचा हा कल्याणाचा मार्ग आहे. उत्क्रातींमध्ये आपण आता मानव स्तिथीला आलो . या स्थितीतच आपण मान्यता केली की  फार उत्तम स्थिती  आहे तर हे कायिक बरोबर होणार नाही. या स्थिती मध्येच   अनेक Read More …

Public Program (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . परमेश्वर सत्य आहे असे म्हंटलेले आहे . तसेच परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असेही म्हंटले आहे . तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेलं आहे . अशी शक्ती परमेश्वराची कोणती आहे ?. आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पहात असतो . हि फुल आपण बघतो एका लहान बिजा पोटी इतकी सुंदर फुल येतात . एक लहानसं बीज त्याला इतकी सुंदर फुल कशी लागतात ?,आपण कधी विचार सुद्धा करत नाही फक्त समजून घेतो कि आहे हि जिवंत क्रिया आहे . आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही . पण हि जिवंत क्रिया घडते कशी ?,कोण घडवत ?,तसच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते . एखाद्या झाडाची सुध्दा उंची त्याला सुध्दा एक मर्यादा असते . नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते . प्रत्येक ऋतू मध्ये वेगवेगळे शेतीचे कार्य होतात . हि सगळी वेगळी कार्य करण्याची कोणती शक्ती आहे ?जी हि संबंध कार्याला घडवून आणते . आपण त्या बद्दल विचारही करत नाही . आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांगी झालेला आहे . एकतर्फा झालेला आहे . जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी आहे . आणि त्याच्याच मुळे आपल्याला आश्चर्य वाटेल कि परदेशा मध्ये आपण समजतो कि भौतिकता खूप वाढलेली आहे ,ती सगळी वाढ आहे ती तोलायची क्षमता त्यांच्यात नाही . ते ते तोलू शकत नाहीत . कारण त्यांचा पाया अध्यात्माचा नाही . तो पाया आपल्या देशात ,विशेषतः आपल्या महाराष्ट्रात अत्यंत भक्कम असा संत लोकांनी मांडलेला आहे . हे संतसाधु महाराष्ट्रात आले ,त्यांनी किती गहन कार्य केलय ,त्याची आपल्याला कल्पना सुध्दा आहे . आणि त्या Read More …

Public Program (India)

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . एक गोष्ट आपण जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे . ते आपण बनवू शकत नाही आणि ते आपण बदलू पण शकत नाही . जे आहे ते होत आणि राहील . एक आणखीन दोष आहे तो असा कि मानव चेतने मध्ये तुम्ही सत्य जाणू शकत नाही . त्या साठी एक सूक्ष्म चेतना हवी . आताच आपल्या समोर प्राध्यापकांनी सांगितलं कि परदेशामध्ये असंतुलन वाढलं आहे . त्याची कल्पना आपल्याला इथे येऊ शकत नाही . आम्ही ह्या देशात फिरलेलो आहोत . आम्ही ह्या देशांना जाणलेलं आहे .वास्तव्य बरेच वर्ष तिथे झाल्या मुळे ह्याची दुर्दशा म्हणजे शब्दात सुध्दा सांगता येणार नाही . भौतिकतेत ते वाढले असणार . विज्ञानात वाढलेत कबूल . पण विज्ञान हे एकांगी आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे . त्यांनी मनुष्य एकांगी होतो हे तुम्ही जर बाहेर जाऊन पाहिलं तर लक्षात येईल . वाट्टेल तशी नैतिकता वापरल्या मुळे अनेक तऱ्हेचे रोग त्यांना झालेले आहेत . अशे रोग झालेले आहेत कि त्या रोगाचं निदान सुध्दा त्यांना लागु शकत नाही . ते ठीक होऊ शकत नाहीत . ६५टक्के लोक अमेरिके मध्ये अशा रोगांनी ग्रस्त आहेत आणि बाकीचे सुध्दा सगळे ग्रस्त होतील अशी त्यांना भीती वाटू लागली आहे . रोगाचं सोडा पण हिंसाचार इतका भयंकर आहे कि न्यूयॉर्क ला तुम्ही गेलात तर गळ्यात मंगळसूत्र सुध्दा घालून तुम्ही जाऊ शकत नाही ,कुणी तुमचं ओढून घेईल . इतका हिंसाचार ह्या देशामध्ये ,मी म्हंटल हि  डेमोक्रॉसी  आहे कि डेव्हनाक्रोसि आहे . आपण अजून इथे बसलेलो आहोत आपल्याला काही कल्पना नाही . आपण जर त्यांच्या सारखे केस केले ,त्यांच्या सारखा वेष केला तरी आपल्याला त्यांची कल्पना येणार नाही कि आतून ते किती पोखरले गेले आहेत. त्याला कारण Read More …

Public Program, Adhyatma mhanje atmyala prapt karne Shrirampur (India)

Sarvajanik Karyakram Date 9th December 1990: Place Shrirampur Public Program Type एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सत्य आहे ते आहे. ते आपण बदलू शकत नाही. त्याची व्यवस्था करू शकत नाही किंवा त्यावर आपलं प्रभुत्व असू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, की ह्या मानवी चेतनेत आपण ते जाणू शकत नाही. आज ‘ग्यानबा तुकाराम’ च भजन ऐकलं, तेव्हा फार आनंद वाटला, की अजून त्यांचं स्मरण लोकांना आहे आणि त्यांचं नाव घेत आहेत. त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी परमेश्वर मिळवला पाहिजे आणि त्यासाठी देवाची आठवण ठेवली पाहिजे. कारण त्यांनी जर एक गोष्ट सांगितली नसती, तर आपण एवढ्या भक्तीच्या मार्गात राहिलो नसतो. कधीच आपली वाट लागली असती. स्वातंत्र्य मिळालं आहे, इतके दिवस झाले, तरीसुद्धा अजून आपण धर्मात उभे आहोत. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. धर्म म्हणजे पैशाचा खेळ नव्हे. धर्मासाठी एवढं जाणलं पाहिजे, की आपल्या अंगात बाणलेलं एक काहीतरी विशेष परमेश्वराने दिलेलं एक महान गुणांचं, एक भांडार आहे. पण ते झाल्यावरसुद्धा आपल्याला धर्म समजत नाही. समजा आपण हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिस्ती असो, कोणत्याही धर्माचे असो, तरी मनुष्य कोणतेही पाप करू शकतो. म्हणजे आश्चर्य वाटतं , की हा मनुष्य स्वत:ला जागृत धार्मिक म्हणवतो, देवळात जातो, घंटा वाजवतो, देवासमोर बसून इतकी प्रवचनं ऐकतो, सगळं काही आहे, आणि तरीसुद्धा हा मनुष्य असे पापकर्म तरी कसे करतो ? म्हणून शंका येते आणि मग लोक म्हणू लागतात, की देवधर्म वगैरे सर्व खोटे आहे आणि ती गोष्ट खरी आहे. पण हे अशास्त्रीय बोलणं झालं. तुम्ही आधी ओळखा, परमेश्वर आहे की नाही. त्याचा आधी पत्ता लावला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पत्ता लावत नाही, तोपर्यंत असं म्हणू शकता की, ‘परमेश्वर आहे की Read More …

Seek the Eternal Kuala Lumpur (Malaysia)

Public Program Day 1, Kuala Lumpur, Malaysia 01-11-1990 मी सर्व सत्याच्या साधकांना नमन करते. अगदी सुरुवातीलाच, आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की सत्य तेच असते जे आपण आपल्या मानवी जाणीवेने संकल्पना मांडू शकत नाही किंवा त्याचे आयोजनही करू शकत नाही. जे होते ते आहे आणि जे आहे तेच राहील. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या मानवी पातळीपेक्षा आत्म्याच्या पातळीवर उतरावे लागेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही विचार करता तसेच तुम्ही ज्या काही संकल्पना मांडतात त्यामुळे समस्या निर्माण होतात. म्हणूनच सर्व धर्मग्रंथांनी एक गोष्ट सांगितली आहे की शाश्वततेचा शोध घ्या आणि क्षणभंगुरतेला त्याच्या सर्व समज आणि मर्यादांसह हाताळा परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आत्मा बनाल. सर्व संतांनी सांगितले आहे की तुम्ही स्वतःला जाणले पाहिजे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तो पर्यंत भ्रम आणि अज्ञान दूर होणार नाही. जर आपण चिन मधिल कन्फ्यूशियस पासून ते लाओ-त्झे पर्यंत सर्व पाहिले तर या सर्वांनी याबद्दल बोलले आहे. ख्रिश्चनांसाठी, ख्रिस्तांनी तेच सांगितले आहे, शीखांसाठी गुरू नानकांनी सुध्दा तेच सांगितले आहे की तुम्ही सत्य शोधले पाहिजे. आणि जेव्हा या लोकांनी तुम्हाला सहजयोगाबद्दल या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की तुम्ही आमच्यापैकी कोणावरही आंधळे पणाने विश्वास ठेवू नका. अंधविश्वास तुम्हाला कुठेही नेणार नाही,  कारण तुम्ही सत्य शोधत आहात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर आंधळे पणाने विश्वास ठेवत असाल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. शिवाय सहज म्हणजे ‘सह’ म्हणजे Read More …

Public Program Day 1 (India)

1st Public Program C Date 10th April 1990 : Place Kolkata Public Program Type Speech [Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याच्या बाबतीत जाणून धेतले पाहिजे की, सत्य आदि आहई आणि आपण मानव त्याला बदलू शकत नाही सत्याला या मानवी चेतनेमध्ये आपण जाणूं शकत नाही. त्यासाठी एक सुक्ष्म चेतना पाहिजे, त्याला अत्मिक चेतना म्हणतात. फखाया वैज्ञानिकाप्रमाणे आपण आपली बुध्दी उधडी ठेवा आणि सत्य सिध्द झालं , तर इमानदारीने त्याला मानून घ्या. एक महान सत्य हे आहे की सृष्टीची: चालना पक सूक्ष्म शक्ति करते आहे. ज्याला परमचेतन्य म्हणतात. ती विश्कयापी आहे व प्रत्येक अणुरेणुंमध्ये कार्यान्वित आहे नईस सिह्टिमला चालवते . आलेली नाही ज्यामुळे आपण परमचैतन्याला जाणूं शक् दूसरे सत्य हे आहे की आपण, हे . आपल्या शरीरांतील स्वयंचीलत संस्थेला १ऑटोनॉमस जे कांही जिबंत कार्य होते ते तिच्यायोगे घडते. पण अजून आपल्यांत ती हिथिती शरीर, बुध्दी अहंकार भावना वगैरे उपाधी नसुन, एनत आत्मा आहोत. आणि हे सिद्द हाऊं शकते तिसरे सत्य हें आहे, की आपल्या अांत एक शक्ति आहे, जी त्रिकोणाकार अस्थिमध्यें स्थित आहे. आणि होते तेडां आपला संबंध त्या परमचैतन्याशी प्स्थापित करते . आपले जेव्हां ही शक्ति जागृत आणि याप्रकारेच नवे क्षितीज- तयार डोते ज्यामुळे आफल्या नसांवर समजूं शकते. जे नसांवर कळते तैच ज्ञान आहे.हे समजण्यासाठी कुंडलिनीचे जाग्रण पाहिजे. ती स्वतः आप ली ही आपलीच आई आहे .आणि डी आई आपल्याला पुनजन्म वैतेः टेपरेकॉ्डरमध्ये जसे आपण सर्व कुडालिनीने आफ्ल्याविषयी सर्व कांही जाणलेलं आहे . साडेतीन कुण्डलांमध्ये आत्गदर्शन होते. मग आफल्या आंत एक नवी डायमेन्शन आई आहे . कांही टेप करूं शकतां त्याप्रमाणे या ही वसली आहे त्यामुळे हिला Read More …

Public Program Brahmapuri (India)

पब्लिक प्रोग्राम ब्रम्हपुरी, (भारत),  ३१/१२/१९८९            या शाळेचे आद्यप्रवर्तक जिजाबा मोहिते यांनी हृदयाला पिळवटून टाकणारं असं भाषण केलेयं आणि मला खरोखर माझे अश्रू सुद्धा आवरता आले नाहीत. आपल्या देशातली गरिबी बघून जीवाचा नुसता कोंडमारा होतो आहे आणि बेचाळीस (१९४२) सालामध्ये आम्हीसुद्धा त्या लहानपणी स्वातंत्र्ययुद्धात होतो. माझे वडील आणि आई ह्यांनी गांधीजींना आपलं सर्वस्व वाहिलं होतं. आणि मी सुद्धा गांधीजींच्या बरोबर लहानपणापासून राहिलेली आहे. ती वेळ स्वातंत्र्य मिळविण्याची होती.             कॉलेजमध्ये असताना तेव्हा भारत छोडो चा नारा लागला. ९ ऑगस्ट च्या दिवशी आमच्या कॉलेजच्या समोर उभं राहून मी, प्रदर्शन केले. त्यावेळेला आमच्यावरती तोफा आणि बंदुका घेऊन सगळे उभे होते. त्याबद्दल आमचे त्यावेळचे जे कॉलेजचे मुख्य प्रिन्सिपल होते, त्यांनी या सहजयोग्यांना सांगितलं, की मला तेव्हाच वाटलं, की ही काहीतरी मोठी शक्ती असेल. की अठरा वर्षाच्या वयामध्ये या बंदुका आणि ह्यांच्यासमोर कशी उभी राहिली. एकटी मी उभी होते. मं ते कॉलेज आम्ही बंद पाडलं.            त्यानंतर बेचाळीस (१९४२) सालात मी, आध्यात्माचा विचार केला नाही. फक्त देशाला स्वातंत्र्य करण्याचा आणि त्यावेळेला आम्हाला त्या पोलिसांनी पकडून नेऊन इलेक्ट्रिकचे शॉक दिले, बर्फावर घातलं. आई माझी तिला वाटायचं अठरा वर्षाची मुलगी आहे, हिचे प्राण जाणार आणि जवळ-जवळ नऊ महिने मला भूमिगत व्हाव लागलं.            अशा प्रकारे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर हळूहळू लोक कसे वाहवत गेले आणि ज्या कार्यासाठी स्वातंत्र्य मिळवलं होतं, की आपल्या देशातली गरीबी जावी, लोक कार्यशील झाले पाहिजेत, त्यांच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे, हे जे गांधीजींच सगळं काही देशाबद्दलच प्रेम होतं, ते कुठेतरी वार्‍यावर उडून गेलं. त्यामुळे अत्यंत ग्लानी आलीये मला, की हे कसलं स्वातंत्र्य मिळवलंय? ह्या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे आपल्याला. अशा रीतीने हे लोक स्वार्थी, स्वतःचे पैशे Read More …

Public Program Pune (India)

2nd Public Program 27th December 1989 Date: Place Pune Public Program Type [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्य कार्य आहे? सत्य एक अशी शक्ति आहे जिला परमचेतन्य असे म्हणतात. डी परमर्शक्ति सर्व जिवंत कार्य करीत असते – सृष्टीमध्ये नाना प्रकारचे चमत्कार रोज दिसतात. पण सगळ्यांत मोठा चमत्कार परमेश्वराने केलाय, तो म्हणजे, मानव- या मानवामध्ये त्याने जी व्यवस्था करून ठेवलीय ती ল। अन्युत्तम आहे असे लक्षांत ठेवलं पाहीजे की आपल्या उत्कांतीमध्ये जे जे टप्पे आपण गांठले सर्वात प्रथम मुलाधार – है चक आहे त्या त्या दण्प्यांचंच एकेक चक झालेल आहे. ग्हणजे ठिकाणी मूकाचा आधार आहे. मुळ म्हणजे कारय, तर आपली कुंडालिनी- परदेशी देशोंत आपण वघतो, त्यांची बाहयात फार प्रगती झाली आहे. पण ते आपल्या मूरकांना ओकसित नाहीत. लोकांची अशी परिल्थिती आहे, की ते अरत्यंत आशोकत आहेत, भयभीत आहेत. की त्यामुळे आता आमची काय स्थिती होणार? सायन्समुळे ल्यांनी मशिनी बर्नाक्याः मशनींमुळे असे प्रश्न हौणार आहे. अशी त्यांना भिरती वाटते कारण उभे राहिले आहेत की भर्यंकर परिस्थिती उत्पन्न त्यांच्यामध्ये कोणतेच संतुलन नाही- एक विचार करायचा तो बुध्दीने, एकीकडे, एकाच ओळीने की आपल्याकडेच येतो- असा वहाता आणि थोडया केळात त्याची शव्ति संपली सायन्समध्ये तुम्ही काय बनवलंय? सायन्स। सायन्स। सायन्स। एकतर जेंटम बॉम बनवून ठेवला तिकडे हायोजन बॉम्ब बनवृन ठेवला ते बनकि्याशिवाय सायन्स संपतच नव्हतं आता ते रस बनबून ठेवले तेवहां तिकडे ते धोडेसे धांबले त्यांनी स्पुरटनिक बनवलं, आकाशांत जायचे, अंतराळात जायचे. काय मिळाले त्यांना, करोडों सूपये सर्च करून? किती देशांत लोक उपाशी मरताहेत, त्यांना खायला नाही. त्यांची परिस्थिती सराब आहे- पण है सगळे पैसे बेकारव्या गोष्टी करण्यासाठी, स्व्रतःचा मोठेपणा दासांवण्यासाठी; Read More …

Public Program Day 1 Pune (India)

Sarvajanik Karyakram Date 26th December 1989: Place Pune Public Program Type [Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याला शोधणा-या सर्व साधकांना आमचा नमस्कार सत्य काय, आणि असत्य का्य है सुध्दा जाणण्यासाठी आत्मसाक्षात्कार पाहीजे ज्यांना आत्मसाक्षात्कार आला नाही, त्यांच्याबद्दल कबिराने म्हटलं आहे, “कैसे समझावूं, सब जग अंधा।” आत्मसाक्षात्काराशिवाय ती सूक्ष्मदृष्टी येत नाही, ज्यांने चराचरांत पसरलेली ही परमेश्वरीशवित आपण जाणू शकती कोणीही उठाव, आणि म्हणावं परमेश्वर नाही, हे आजकालच चे प्रकार आहेत, यण है अशा्त्रीय आहे . तुम्ही त्याबद्रल काही गहनतेने तुम्ही त्याबदल काही माहिती घेतली को? विचार केला आहे का? आणि सगळयांत कमालीची गोष्ट आहे की हा संबंध वारसा हया महाराष्ट्राचा आहे . या महाराष्ट्रांतच है एकेकाळी आणि तेच कार्य आम्ही करत सगळ कार्य झालेल आहे आहोत. है कार्य करीत आहोत आणि पूर्वी एकेका माणसाचं फरक प्डढाच की सामूहिकतेत आम्ही . हे कार्य होत असे- पण कुंडलिनी जागृतिनंतर तुम्ही आकाशांत उड़ता किंवा पाण्यावर चालू शकता असले प्रकार मी कधीही म्हटले नाही- उतट हयाच्या मी विरोधात आहे. कारण हया क्षद्र सिध्दया आहेत. आणि श्री ज्ञानेश्वरांनीपण असं कसं म्हटलं असेल वरं त्यांच्याबद्दल बोलतांना लोकांनी जीम लि ूं जवरावी ते बर पण काय म्हटले तरी, काय ती विभूति। त्यांच्या दोन औळीतरी तुम्ही शकतां का? ते त्यांच्यावर कोरडे औटतायत। दोन अलषर डोंग्लिश शिकुन तुम्ही मोठे शहाणे झालांत? तहानपणी मी ज्ञानेश्वरी वाचली होती आणि म्डटले काय है अवतरण आहे, अवतरण ते काय समजेल माणसाला? आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय तुम्हाला काहीही ककत नाही, आणि त्याच्या पलिकडच्या हया गोप्टी आणि तुम्हाला काय कळणार, ही मंडळी कोण होती आणि सांगायला गेल तर, “तुम्ही खोट सांगतां” कारण है अतिशहाणे, Read More …

Public Program (India)

1987-12-23_Sarvajanik Karyakram- Atmyache Darshan_Akole-MARATHI अकोल्या गावामध्ये जी आत्मानुभावाची प्रगती झालेली आहे त्याला अगस्त्य मुनिंचे आर्शीवाद तसेच लव आणि कुश यांचे गेलेले बालपण आणि श्री सितेची शुभेच्छा सर्वच कारणीभुत आहेत. ह्या महाराष्ट्रात संत साधुंनी फार मेहनत घेतली आहे. ते जिवंत असतांना लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही. जे धर्ममार्तंड होते त्यांनी त्यांचा छळ केला. आणि जनसाधारणा मध्ये एव्हढी शक्ती नव्ह्ती की त्यांना या छ्ळवाद्यां पासन संरक्षण द्यावे. ती गोष्ट कधी-कधी जिवाला लागुन राहते. ऋषिमुनींच्या वेळेला असला प्रकार नव्हता. पण ह्या कलीयुगामध्ये मोठ-मोठ्या संत साधुंनी फार छळ सहन केला. कारण मानवाला त्यांच्या शक्तीची जाणीव नव्हती, त्यांच्या व्याक्तीत्वाची कल्पना नव्हती. ते केव्हढ मोठ कार्य करत होते त्या बद्धल जाणीव नव्हती, आज त्यांच्याच कार्यावर आम्ही हा सामुहिक सहाजयोग उभारलेला आहे, त्यांच्याच मदतीनी, त्यानींच पेरलेली बिये आज फुलली आहेत आणि त्यावरच आमच काम चालु आहे, तेव्हा त्यांना अनेकदा नमस्कार करुन, माझी आपल्याला अशी विनंती आहे की जे झाल–गेल ते विसरुन जावं आज वर्तमान काळात हया वेळेला ह्या कलीयुगामध्ये जेव्हा सगळी कडे आपल्याला अंधकार दिसतो आहे. राक्षसांचे जसे काही थैमान चालले आहे. कुठे जाव – काय कराव काही कळत नाही, कश्या रितीने या संकटातुन मुक्त व्हाव, सर्व देश त्राही-त्राही करत असतांना, हा सहजयोग आपल्या समोर उभा राहीलेला आहे, एकदा नळाला(नल राजा) कली सपडला, कली सापड्ल्या वर नळानी त्याला असा जाब विचारला कि तु महाद्रुष्ट आहेस, तुझ्यामुळे जगामध्ये परमेश्वरी तत्व नष्ट होतेय, तुझ्यामुळे लोकांची द्रुष्टी भलत्या गोष्टींकडे जाते, त्यांच्या चित्तामध्ये अनेक तऱ्हेचे विकल्प येतात तसेच अनाचार आणि अत्याचार याचा सुळसुळाट होतो. तेव्हा अश्या तुला मी नष्ट का करु नये?, तु सुध्दा माझा आणि माझ्या पत्निचा विरह घडवुन आणलास Read More …

Public Program Sangamner (India)

1987-12-22 Sangamner Public Program (Marathi) १९८७-१२-२२, मराठी सार्वजणिक कार्यक्रम, सगंमणेर – १/३ (मराठी भाषणाचे लिखीत रूपातंर) पर्मेश्वरी शक्तीला शोधंणार्‍या सर्व साधकांना, भाविकांना {मोठा विलबं (Big pause)….} आमचा प्रणिपात. एवढ्या थोड्या वेळातचं सगंमणेरला सहजयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हंणजे एक फारचं मोठं समाधान आहे. कुंडंलीनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होत. जनक राजाने एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षातकांर दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षातकांर घ्यावा लागला अशी एक दोन उदाहरणे आपल्याला पुर्व काळात मिळतात. इतिहास सुद्धा असचं सांगतो की फारच कमी लोकनां आत्मसाक्षातकांर झाला होता. पण संत साधू हे वारंवार आपल्या कार्यासाठी भारतात आले, विशेष़तः महारा्ष्ट्रात आणि त्यांनी अनेकोपरी समजवून सांगितंल की आत्मानुभंवाशिवाय तुम्हाला काहीही मिळालेल नाही. आधंळ्याला जशी दृष्टी नसते तसीचं मानवला जोपर्यतं तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यतं त्याला सत्य कळु शकत नाही, केवळ सत्य कळू शकत नाही. धर्मानी फारतरं फार मनुष्य सदाचरणी बनू शकतो. पण कोणत्याही धर्मातला मणूष्य मग कोणत्याही तो जातीचा असेना कां? कोणच्याही वर्णाचा असेना कां? कोणतेही पाप करु शकतो, त्याला कोणी रोकू शकत नाही कारण त्याला रोकणारी जी शक्ती ती आत्म्यामध्ये स्थित आहे आणि तो आत्मा अजून आपल्या चित्तात प्रकाशित झाला नाही म्हंणून सामर्थ्थ माणसांमध्ये नाही की त्या पापाच्या प्रलोभनातंन तो मुक्त होईल. सहजयोगाचे अनेक फायदे आहेत, पण सर्वात मुख्य म्हंणजे असे की, सदाचंरणानी मणूष्याला पुर्नत्व येऊ नाही. आत्मानुभंवातनं त्याला पुर्नत्व येतं. जो पर्यतं आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडत नाही तो पर्यतं आपल्याला खरं आणि खोटं याचा पुर्ण अदांज, सपुंर्ण कल्पना येऊ शकत नाही, त्याशिवाय आत्मानुभंव म्हंणजे जिवा शिवाची भेट, म्हंणजे पर्मेश्वराशी संबंध, म्हंणजे पर्मेश्वरी शक्तिचा आपल्यामध्ये आलेला सबंधं प्रवाह. जशी आज आपण सगळीकडे वीज बघतो Read More …

Public Program (India)

Public Program Marathi Maheshwari Dharamshala India आपण सर्वानी थोडी वाट पाहिली . मला क्षमा करा मला माहित नव्हतं आज प्रोग्रॅम आहे म्हणून . आत्ता कळलं कि इथे प्रोग्रॅम आहे म्हणून . तेव्हा येन झालय तरी सर्वानी क्षमा करावी . सर्वप्रथम पैठण मध्ये आम्ही अलोत . आमचे पूर्वज ह्याच गावी रहात असत असे म्हणतात . ह्या गावाचं नाव पूर्वी प्रतिष्टान होत . आणि देवीला फार मानत असत असा हा देश विशेष आहे . त्यातल्या त्यात इथे बरेच वर्ष देवीची आराधना वैगेरे होत असे . आणि देवी बद्दल पुष्कळ माहिती लोकाना  होती . ज्ञानेश्वरांची सुद्धा कृपा झालेली आहे . सर्वानीच ह्या जागी फार कृपा केलेली आहे . आणि पैठण हे गाव सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . पण मला इथे इतके दिवस येता आलं नाही . इतकी इच्छा  असताना सुद्धा आणि आज आपण सर्वानी बोलावलं हि मी आपली कृपा समजते . आज जो विषय मी आपल्या समोर मांडणार आहे तो आपण कदाचित ऐकला असेल .  हा जो कि  ज्ञानेश्वरी मध्ये सहावा अध्याय जो ज्ञानेश्वरांनी वर्णिला आहे . आणि तो वाचू नये असं सांगण्यात आलं होत . आणि त्या मुळे पुष्कळांना ह्या गोष्टीची माहिती नव्हती . कि आपल्या मध्ये एक अशी सुप्तावस्थेत बसलेली अशी शक्ती आहे ज्या शक्तीने आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो . हे वाचू नये असं का सांगितलं हे मला सांगता येणार नाही . कारण हि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे . सर्व आपण पूजा पाठ परमेश्वराबद्दल श्रवन ,ध्यानधारणा वैगेरे सर्व करतो पण तरीसुद्धा परमेश्वर मिळत नाही . त्या शिवाय पुष्कळशा लोकांनी ज्यांचा देवावर विश्वास नाही मला असा प्रश्न टाकलेला आहे कि जे देव देव म्हणतात त्यांच्या तरी आयुष्यात देव आलेला दिसत नाही . Read More …

Public Program Astagaon (India)

आजचा दिवस फार मोठा शुभा शिशाचा आहे . कारण आज आपल्याला माहित असेलच कि शाकंबरी देवीच्या नवरात्राचा पौर्णिमेचा दिवस आहे . म्हणजे आज शेवटची रात्र आहे . शाकंबरी देवी हि शेतकरी लोकांची देवी आहे . आणि तिचा प्रादुर्भाव मेरठ जिल्ह्यात झाला होता . त्या वेळी आमचे साहेब तिथे कलेक्टर होते मेरठ जिल्ह्यात तेव्हा मी तिथे पुष्कळ शेतीच काम केलं होत . आणि त्या शेतीत पुष्कळ चमत्कार घडले . आणि लोकांना आश्चर्य वाटलं कि इतक्या तर तऱ्हेच्या भाज्या आणि पीक एव्हड्या मोठ्या प्रमाणात पण एव्हड्या लहानशा जागेत कस आलं . असो . आजचा दिवस विशेष आशिर्वादाचाच आहे . कारण आजच्या दिवशी शाकंभरीदेवीने सर्व जगाला आशीर्वाद दिला होता . आणि शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला होता . कि त्यांच्या हातून अशी पीक आणि अशी धान्य तशीच उत्तम भाजी ,फळे सगळी ह्या सगळ्या संसारात शेतकऱ्यांच्या हाती ,त्यांच्या करवी ,त्यांच्या मेहनतीने सर्व जगाला मिळूदे . ह्या त्यांच्या आशीर्वादाचा उल्लेख करावासा वाटतो . त्यांच्याच आशीर्वादाने आपण लोक शेतकरी झालात . आणि जी काही सुजलाम सुफलाम आपली भूमी आहे तिचा फायदा यांनीच होतो .  आता हे परदेशी लोक इथे आले आहेत . आणि यांना महाराष्ट्रा विषयी फार आस्था आणि भक्ती आहे . त्याला कारण असे आहे कि महाराष्ट्रामध्ये फार मोठे मोठे संतसाधु होऊन गेले . त्यांनी इथे आपलं रक्त ओतलं . आजच एका नवीन गुरूंची ओळख झाली त्यांचं नाव हैबती . खरोखरच ते आत्मसाक्षात्कारी असतील पण त्यांना दोनचार माणसंच जाणतात . पण ह्या लोकांची शुध्दबुध्दि आहे . त्यातून पैसे वैगेरे मिळवायचे याच त्याच्या मागे त्रांगड नाही आहे . सगळे श्रीमंतीत राहणारे लोक आहेत . त्यांना पैशाची कदर नाही आहे . परमेश्वराची कदर आहे . आणि ज्या महाराष्ट्रात एव्हडे मोठे साधुसंत झाले त्यांची पुस्तक Read More …

Public Program Shrirampur (India)

श्रीरामपूरच्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात . ह्या सुंदर स्वागतपर गायना नंतर अगदी गहिवरून आलं . तसच वडाळ्याला इतकी मंडळी एकत्र जमली होती . आणि दोन क्षणात सगळेजण पार झाले हे बघून असं वाटत कि ह्या महाराष्ट्र भूमी मध्ये इतकी शक्ती आहे आणि त्यातून इथे लोकांमध्ये इतकी भक्ती आहे त्याच सार्थक झालं पाहिजे . आणि ते सहजच होत . आजकालच्या काळात देवाचं नाव सुद्धा लोकांना ऐकावंस वाटत नाही . पुष्कळांच असं म्हणणं आहे कि देव नाहीच आहे . पण हि काही शास्त्रीय प्रवृत्ती झाली नाही . जे सायन्टिफिक  लोक आहेत त्यांनी जर असं आपलं ठाम मत करून ठेवलं कि हि गोष्ट नाहीच आहे म्हणजे ते सायन्टिफिक नाही . कारण त्यांचं डोकं उघड असलं पाहिजे . मुभा असली पाहिजे . विचारांना मुभा असली पाहिजे . कोणाचाही विचार बांधून आणि त्यावर विश्वास ठेऊन काम करण  हे आंधळे पणाचे लक्षण आहे . म्हणूनच संतसाधुनी ह्या महाराष्ट्रात आपलं रक्त ओतलं आहे . काहीतरी विशेष ह्या भूमीत असलं पाहिजे . आणि वारंवार त्यांनी सांगितलं आहे कि परमेश्वर हा आहे फक्त तुमच्यातला परमेश्वर जागृत झाला पाहिजे . ते काही आजकालचे भ्रामक भामटे लोक नव्हते . त्यांनी जे सांगितलं ते सत्य सांगितलं तंतोतंत ते खर आहे . हे सिद्ध करण आज शक्य आहे त्यावेळी शक्य नव्हतं . म्हणून लोकांनी त्यांना छळलं त्यांचं ऐकलं नाही . पण आज ते शक्य आहे .  ह्या धकाधकीच्या काळामध्ये चारीकडे माणसाला जेव्हा वणवा पेटल्या सारखा वाटतो आणि कुठे जाऊ आणि काय करू अशी त्याची स्तिती झालेली आहे . अशा ह्या भ्रमित स्तिती मध्ये तो विचार करू लागतो कि परमेश्वर आहे तर तो आहे तरी कुठे ?. आणि मग तो माझी का मदत करत नाही . पुष्कळशे Read More …

Public Program Sangli (India)

पब्लिक प्रोग्राम, सांगली, डिसेंबर 30, 1986, मराठी Shri Mataji addressing the seekers and their questions. Below are the conversations. Seeker’s talk/ questions are in brackets.  या इकडे या म्हणजे मी ऐकते.  (श्री माताजींना प्रश्न विचारला ” श्री माताजी माझी जागृती झालेली आहे, पण मला व्हायब्रेशन फक्त हृदया चक्रापर्यंत जाणवतात, त्याच्यावरती जाणवत नाही. कृपा करून आपण मला मार्गदर्शन द्याल का?)अर्थातच अगदी अगदी बसा आपण, मी सांगते आता. हे म्हणाले की कुंडलिनी त्यांच्या हृदयापर्यंत येऊन त्यांना जाणीव होते, आणि वर येत नाही म्हणजे विशुद्धी चक्रावरती दोष आहे. तर आता विशुद्धी चक्रावर काय दोष आहेत हे पाहिले पाहिजे. विशुद्धी चक्र कशाने खराब होऊ शकतं, जर तुम्ही खूप बोलत असाल, भाषण देत असाल तर घसा खराब होतो किंवा सिगरेट पीत असाल तंबाखू खाल्ले तर त्यांनी घसा खराब होतो किंवा सर्दी ने होऊ शकतो. कोणत्याही कारणाने जर घसा खराब झाला, विशुद्धी चक्र खराब झालं तर ही कुंडलिनी वर चढत नाही. पण ते आम्ही बघून टाकू, कुंडलिनी आम्ही चढवून टाकू, त्याची काळजी करू नका. त्याचा काही प्रॉब्लेम नाही.  हा पुढे काय? आणखीन कोण? काय प्रश्न असतील तर विचारा  Shri Mataji waiting  काय आहेत का प्रश्न? काय म्हणता? इकडे या इकडे……  (आपले कुठे आश्रम आहेत का?) आश्रम? आमचे अजून कुठेच आश्रम नाहीत. अहो सांगलीमध्ये सुद्धा नाहीत. सांगलीमध्ये आपले तावडे साहेब आहेत ना, त्यांच्या घरी सध्या प्रोग्राम आणि सेंटर होतात. सध्या आमचे कुठेच आश्रम बसवलेले नाहीत. कारण तुम्हाला माहित आहे, आपल्या देशाची काय स्थिती आहे. नंबर एक भ्रष्टाचार, त्यामुळे कुठेही जमीन घ्यायची म्हटली, की ते म्हणतात तुम्ही किती ब्लॅकचे पैसे द्याल? तर मी म्हटलं आमच्याकडे ब्लॅक बिग चे Read More …

Public Program Satara (India)

Public Program Until the Time 11.50 mins – Flowers offering at the Lotus Feet of Shri Mataji by various local centre representatives from Satara district of Maharashtra  15.30 mins – Shri Mataji’s speech starts  सातारा जिल्ह्यातील सहजयोगींचे कार्य बघून आत्य आनंद होतोय. तुम्ही गुलाल उडवत मिरवणूकित आपला आनंद प्रदर्शित केला, हा आनंद सातारा जिल्ह्यात पसरून 15 सेंटर उभी केली गेली हे फार मोठं काम आहे. श्री रामदासांची भूमी ही, स्वतः ते हनुमानांचे अवतरण होते. त्यांच्या कार्याची सुरुवात कधीच झाली होती, पण त्याची फल स्तुती मात्र आज दिसते की सातारा जिल्ह्यामध्ये 15 केंद्र उघडण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत साधू होऊन गेले आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या सर्व आपण सहज योगात बघू शकतो. सर्वप्रथम त्यांनी असं सांगितलं, की सद्गुरु तो जो तुम्हाला परमेश्वराशी ओळख करून देतो, ब्रह्मनिष्ठ बनवतो. जो तुमच्याकडून पैसे घेतो तुमची दिशाभूल करतो, तुम्हाला चूक मार्गात घालतो तो गुरु नव्हे. एकच लक्ष मानवाकडे असलं पाहिजे आणि ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय, आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, त्यापेक्षा मुकच राहिलेलं बरं.असं सुद्धा ज्ञानेश्वरांनी शेवटी म्हटलं. कारण आत्मसाक्षात्कार झाला नाही डोळे बंद आहेत आणि डोळे बंद असताना जी तुमची श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेला काही अर्थ नाही. आज  मी असं ऐकलं आहे की इथे एक अंधश्रद्धा निर्मूलन संस्था काढली आहे, हे बरं झालं म्हणा, हे आम्ही बरेच वर्षापासून म्हणत होतो. पण जे लोक अंधश्रद्धा काढतात त्यांची अंधता गेली आहे का नाही हे आधी बघायला पाहिजे. अंधश्रद्धा कोणात आहे आणि कुणात नाही हे जाणण्यासाठी डोळस व्हायला पाहिजे. जी मंडळी डोळस झालेली नाही, ती दुसऱ्यांना आंधळे झाले आहात हे Read More …