Diwali Puja, 1st Day, Dhanteras New Delhi (India)

Diwali [Translation from Hindi to Marathi] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) ही एक अद्भूत गोष्ट आहे की, आपल्या आतमध्ये असणाऱ्या शक्तीला आपण ओळखत नाही. मात्र आपण आपल्या विचारात अडकून पडतो. आपल्या आत बरीच शक्ती आहे, जी परमात्म्याने आपल्याला दिलेली आहे. आपण सर्व परमात्मा, परमात्मा म्हणतो पण सर्व हे ओळखतात, तो प्रत्येक जागी आहे, प्रत्येकात राहतो आणि सर्व ठिकाणी तो बघत असतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे तो फारच प्रेमपूर्वक बघत असतो. आता तुम्ही सर्व लोक त्याच्या दरबारात आलेले आहात. हे मला सांगताना अत्यंत आनंद होतो की इतकी वर्षे दिल्लीत सहजयोग जोरात चालू आहे. याचा अर्थ असा होतो की दिल्लीच्या लोकांत मोठी श्रद्धा आहे आणि सामुदायिकता पण आहे. नाहीतर मी इतक्या ठिकाणी गेले, तिथे एवढा प्रचार झाला तरी मी म्हणू शकत नाही की लोकांमध्ये इतकी जाणीव निर्माण झाली आहे. तुम्ही सर्वांनी सहजयोग पूर्ण तऱ्हेने समजून घेतला पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद मिळणे हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही सहजाला समजून घेतले तर सहज तुम्हाला समजून घेईल. तो ओळखतो की तुमची काय लायकी आहे आणि तुम्हाला काय हवय. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की बऱ्याच वर्षांपूर्वी दिल्लीला आले होते आणि मी विचार केला होता इथे दिल्लीत सहजयोगाचा चांगला जम बसेल. काय कारण होते ? इथे केंद्र सरकार आले आणि कलकत्त्याहून आले. काय कारण होते ? इथे सरकारी नोकर आले आणि सरकारचे काम इथे सुरु झाले. हे सर्व तुम्हा लोकांचा एकत्र आणण्याचा परिणाम होता. कुठेही जा, तुम्ही एवढ्या लोकांना एकत्र आणू शकत नाही. जितके काम दिल्लीत होते, तेवढे इतर ठिकाणी होऊ शकत नाही. हा माझा अनुभव आहे आणि मी हाच विचार करते की, दिल्लीमध्ये अशी कोणती विशेषता Read More …

Birthday Puja New Delhi (India)

80th Birthday Puja Date 21st March 2003: Place New Delhi: Type Puja [Marathi translation from Hindi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari] देण्याइतकी समाधानकारक इथें बरेचजण परदेशांतील लोक असल्यामुळें सर्वजण इंग्रजीमधून बोलत होते. दुसरी गोष्ट नाहीं. सहजयोगांत इतक्या मोठया आज मी तुमच्याबरोबर मानवी जीवनाबद्दल बोलणार आहे.हे जीवन सतत प्रवाही असते, संख्येने लोक येत आहेत ही फार आनंददायक गोष्ट आहे. सहजयोग इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरेल याची खरे तर मलाही कल्पना नव्हती, तुमच्या वयाशी त्याचा संबंध नसतो; पण सहजयोगामधून तुमच्यामध्ये जो प्रकाश आला पण माझ्याच आयुष्यभरात हे घडून आले आहे ह्याचे मला फार-फार समाधान आहे. दूर – आहे त्याचा तुम्ही कसा उपयोग करता हेच महत्त्वाचे आहे. तुम्ही कुण्डलिनी जागृत झाल्यामुळे आत्मप्रकाशांत आलेला आहात; दूरच्या देशांमधेही सहजयोग आता पसरत आहे व वाढतही आहे; अधिकाधिक जनता सहजयोगांत उतरत आहे. आता कांही लोक आपल्या देशांतच कार्य न करता बाहेरच्या प्रांतांमधे जाऊन सहजयोगाचा प्रसार करत तुम्हाला तिची सर्व माहिती आहे; पण तरीही तुम्ही मानवजातीच्या उध्दारासाठीं कसे व किती प्रयत्नशील आहांत हीच एकमेव प्राधान्यक्रमाची गोष्ट आहे. लोकांबद्दल चुका आहेत. मी स्वत: आजकाल सगळीकडे जाऊं शकत नसले तरी सहजयोग वेगाने पसरत आहे दाखवून त्यांची अवेहलना करण्यापेक्षा त्यांना उन्नतीच्या उच्च स्तरावर आणणे हेच तुमचे कर्तव्य आहे; तरच त्यांना आत्मसन्मान है सर्व पाहून मला किती आनंद होत आहे याची तुम्हा लोकांना कल्पना येणार नाहीं. त्यातल्या वाढदिवस पूजा त्यात ४३ देशांमधे तर सहजयोग फारच मोठ्या समजेल व आत्मसाक्षात्कार मिळण्यामधील भाग्य लक्षांत येईल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. मला प.पू. श्रीमाताजी निर्मला देवींचे आषण निर्मल-धाम, दिल्ली, २१ मार्च 2002 प्रमाणावर बहारत आहे आणि इतर ठिकाणीही तो जम धरत आहे. हे सर्व तुमच्या Read More …

Inauguration of Vaitarna Music Academy (India)

English Transcript Inauguration speech for the opening of the new Music Academy (transcr. only English part). Vaitarna (India), 1 January 2003. I’m sorry I spoke in Hindi language, because to talk about My father in any other language is very difficult, though he was a master of English language and he used to read a lot. He had a big library of his own where I also learned English, because my medium of instruction was Marathi. I’d never studied Hindi or English. But because of his library, because I was very fond of reading, I picked up English, whatever it is, and also Hindi. Now they all say I speak very good English and very good Hindi, I am surprised, because to Me they were foreign languages. And when I did my matriculation also, I had a very small book of English, and for inter-science also I had a very small book. And in the medical college of course there was no question of any language, but because I used to read a lot. So I would suggest to all of you to read, read more. But don’t read nonsensical books, very good famous books you must read. That’s how I developed my language, and I had to do so well. By reading that, I could know also so much about the human failings. I didn’t know human beings have those failings, I didn’t know. I was absolutely beyond them. After reading everything, I came to know that there are Read More …

Birthday Puja New Delhi (India)

Birthday Puja 21st March 2002 Date: Place Delhi: Type Puja [Marathi translation from Hindi and English, excerpt, scanned from Marathi Chaitanya Lahari] ह थें पसरलेला हा प्रेमसागर माझे हृदय भरुन आले आहे. या प्रेमप्रवाहाचा पाहून एवढा महासागर कसा निर्माण झाला हेहि लक्षांत आले नाहीं इतकी ही सुंदर घटना आहे. प्रेमाचे शास्त्र असे कांहींच नसते कारण त्याची शक्ति महासागरासारखी सर्वदूर पसरलेली आहे; इतकी की त्याची व्याप्ति लक्षांत येणे अवघड आहे. परमात्म्याची ही प्रेमशक्ति साच्या विश्वामधें, सर्व देशांमधे, सर्वत्र ठायी ठायी पसरलेली आहे. तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळाल्यानंतरच तुम्ही ती जाणूं शकता. प्रेम हीच त्या परमात्म्याची शक्ति आहे आणि प्रेमामधूनच ती कार्यान्वित होत असते. सर्वसाधारण लोकांच्या हे लक्षांत येत नाहीं; दुसऱ्याबद्दल मत्सर वा द्वेषभाव बाळगणें, दुसऱ्याशी भांडण-तंटा करणे या सर्व हीन प्रवृत्ति आहेत. तुम्ही सहजयोगी आहांत म्हणून तमच्या मनांत सदैव प्रेमभावनाच फूलली पाहिजे. आपल्या या भारतदेशांत सध्या जी अशांत परिस्थिति दिसत आहे ती बघितल्यावर मनांत प्रथम जाणवते की धर्माच्या नावाखाली लोक एवढे अकांडतांडव कसे करु शकतात? धर्माबद्दल कुणी कांही बोलले वा केले की त्याची तीव्र प्रतिक्रिया दुसरे लोक लगेच व्यक्त करुं लागतात; या क्रिया-प्रतिक्रियेला कांही अर्थ नसतो; उलट त्यामुळें लोकांच्या मनांतील परमात्म्याच्या अस्तित्वाची भावना क्षीण होत जाते. म्हणून परमात्म्याची ही प्रेमशक्ति लोकांच्या मनांत कशी दृढ़ करता येईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी म्हणेन की त्यासाठी आपण लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे. आपण मुलांना काय शिकवतो व शिकवायला पाहिजे इकडे लक्ष द्या. आपल्या मुलाला वाढदिवस पूजा प.पू. श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण (सारांश) निर्मलधाम दिल्ली दिनांक २१ मार्च २००२ ১২০ दुसर्याच्या मुलाने मारले तर त्याला जाऊन उलट थप्पड मारायला आपण सांगणार कां? त्याऐवजी त्याला समजावले की-मारलं Read More …

Talk, Paane ke baad dena chaahiye swagat samaroh New Delhi (India)

1999-12-05 Talk in Delhi: Paane ke baad dena chaahiye swagat samaroh [Marathi translation Hindi talk, (excerpt) scanned from Marathi Chaitanya Lahari] सत्याच्या प्रकाशात आलेल्या सर्व सहजयोग्यांना नमस्कार, इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला इथे एकत्र जमलेले पाहून माझे हृदय खरोखरच भरून आले आहे. शिवाय माझ्या जीवितकालामध्ये एवढे सहजयोगी जगभर झाले याचेही मला मोठे समाधान आहे. सत्य जाणल्याशिवाय मानवी जीवन अर्थशून्य आहे; तो प्रकाश मिळत नाही तोपर्यंत मनुष्य आयुष्यभर भरकटतच राहतो. पण मी हा माणसाचा दोष समजत नाही. दोष असेल तर त्याला व्यापून राहिलेल्या अंधाराचा. म्हणूनच सहजयोगामधून प्रकाश मिळाला, तो सहजयोग आणखी खूप लोकांना द्या, तुम्हाला जे मिळाले आहे ते इतरांना वाटा म्हणजे सहजयोग आणखी पसरेल, त्याच्यातूनच या भूतलावर एक सुंदर शांतीचा स्वर्ग निर्माण होणार आहे. ही तुमचीच जबाबदारी आहे. भारतात आता है कार्य खूप जोराने चालले आहेच. तशी ही भारतभूमि योगभूमि आहे आणि इथे हे होणार हे खूप पूर्वीचं भाकित केले गेले आहे. भारत ही माझी मातृभूमि आहे आणि इथे येण्याचा आनंद शब्दांतून व्यक्त करणे अवघड आहे. तुम्हा सर्वाना भेटल्यावर तर हा आनंद द्विगुणित होतो. त्यातूनच इथे खन्या अर्थाने स्मरमय अर्थात आत्म्याचे राज्य प्रस्थापित होईल; स्व-तंत्राचा अर्थही तोच व हेच आता इथे घटित झाले आहे. म्हणूनच तुमच्यासारखे आणखी लोक सहजयोगात आणण्याचे कार्य तुम्हाला करायचे आहे. नुकतेच मला समजले की काही परदेशीय सहजयोगी इथे आले आणि सहजयोगाचे कार्य करण्यासाठी ओरिसात गेले; तिथे नऊ कंद्रे त्यांनी सुरू अलिकडे झालेल्या भीषण वादळात तेथील सहजयोग्याचे कसलेही नुकसान झाले नाही. तुर्कस्थानमध्येही (तिथे दोन हजार सहजयोगी आहेत) भूकप झाला तेव्हा तेथील सर्व सहजयोगी वाचले, कुणालाही कसलाही अपाय झाला नाही. तेव्हा सहजयोगात तुमचे पूर्ण संरक्षण होणार आहे हा मी Read More …

Awakening Of Kundalini Is Not A Ritual Shivaji Park, Mumbai (India)

1999-02-20 Awakening Of Kundalini Is Not A Ritual, Mumbai, India Hindi सत्य को खोजने वाले आप सभी साधकों को मेरा प्रणाम.  सत्य के और हमारी नज़र नही होती, इसकी क्या वजह है? क्यों हम सत्य को पसंद नहीं करते और आत्मसात नहीं करते? उसकी नज़र एक ही चीज़ से खत्म हो जाये तो बातकी जाए, पर ये तो दुनिया ऐसी हो गई की गलत-सलत चीज़ों पे ही नज़र जाती है। सो इस पर यही कहना है कि ये घोर कलियुग है, भयंकर कलियुग है। हमने जो लोग देखे वो बहुत निराले थे और आज जो लोग दिखाई दे रहे हैं, वो बहुत ही विक्षिप्त, बहुत ही बिगड़े हुए लोग हैं। और वो बड़े खुशी से बिगड़े हुए हैं, किसी ने उन पे ज़बरदस्ती नही की । तो अपने देश का जो कुछ हाल हो रहा है उसका कारण यही है कि मनुष्य का नीति से पतन हो गया। अब उसके लिए अपने देश में अनेक साधु-संतों ने मेहनत की, बहुत कुछ कहा, समझाया। और खास कर भारतवर्षीयों की विशेषता ये है कि जो कोई साधु-संत बता देते हैं उसको वो बिलकुल मान लेते हैं, उसको किसी तरह से प्रश्ण नही करते। विदेश में ऐसा नही है। विदेश में किसे ने भी कुछ कहा तो उसपे तर्क करने शुरू कर देते है। लेकिन हिंदुस्तान के लोगों की ये विशेषता है कि कोई ग़र साधु-संत उनको कोई बात बताए तो उसे वो निर्विवाद मान लेते है कि ये कह गए है ये हमें करना चाहिए। छोटी से लेकर बड़ी बात तक हम लोग ऐसा करते हैं। ये भारतीय लोगों की Read More …

Diwali Puja, Shri Lakshmi and Money Sintra (Portugal)

Diwali Puja. Sintra, Lisbon (Portugal) – 2 November 1997. Today, we have gathered here to worship Shri Lakshmi. In Diwali, in India, they worship Lakshmi because a great rakshasa called Narakasura was killed; also that Lakshmi came out of the sea, at the same time, long time back. This is like Her different appearances on the same ??. Lakshmi is the Goddess which gives us wealth, gives us prosperity. She is very blissful, no doubt. She gives you protection and also She is very humble because She stands on the lotus. She is very light, [which] means She does not put Her pressure on anyone. These are symbols of Shri Lakshmi. But also She is a part of Mahamaya in the modern times only. When people get Lakshmi, the money, they don’t understand that She is their Mother firstly, and She is to be respected. When this kind of perverse idea of Shri Lakshmi comes in such countries, such people meet their last end and destruction of the worst type ever. So this Lakshmi has to be used with a big balance, like standing on a lotus and not get into the pond, where there are all kinds of creatures to eat you all. You have to stand on the lotus: that means that you are above all the lures of this maya. Also in Sanskrit languages, we call Lakshmi as the maya. If somebody gets lot of money, they will say, “You got a lot of maya!” Now, this Read More …

Easter Puja, Crucify Yourself (India)

Easter Puja – You Must Crucify Your Ego Date 14th April 1995: Place Kolkata Type Puja [Marathi translation from English] ईस्टर हा फार अर्थपूर्ण दिवस आहे; फक्त ख्रिस्तांसाठी नाही पण आपल्या सर्वासाठी. कारण सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे जेव्हा पुनरुत्थान होते. ख्रिस्तांचे पुनरुत्थान हा ख्रिस्तनीतीचा संदेश आहे. क्रॉसचा नव्हे. पुनरुत्थान शक्य आहे. आणि याच्याशिवाय आज्ञाचक्रांच्या पार होणे शक्य नव्हते. त्यांचे आयुष्य फारच कमी होते याबद्दल शंका नाही आणि एका अर्थाने ते साडेतीन वर्षच होते असं आपण म्हणू शकतो. ते भारतात आले आणि शालिवाहनांची आणि त्यांची भेट झाली. शालीवाहनाने त्यांचे नाव विचारल्यावर ते म्हणाले माझे नाव.”इसामशी” आणि पुढे म्हणाले “मी म्लेंच्छ लोकांच्या देशातून आलो, म्लेंच्छ (मल इच्छा) म्हणजे वाईट इच्छा. अशुद्ध व मलीन इच्छा. म्हणून त्या देशात कसं रहायचं ? आता हाच माझा देश” पण शालिवाहनाने त्याला परत स्वदेशात जाऊन तिथल्या लोकांना वाचवायला आणि त्यांना “परम निर्मल तत्त्व सांगायला सांगितले” मग तो परत आपल्या देशात गेला आणि अवघ्या साडेतीन वर्षात त्याला सुळावर जावे लागले. मरते समयी त्यांनी ‘क्षमे’ बद्दल खूप सुंदर गोष्टी सांगितल्या. पण सरतेशेवटी ते म्हणाले, ‘माता आली आहे पहा’. म्हणजे तुम्ही आईची वाट पहा. तसंच हयात असताना ते असेही म्हणाले , “मी तुमच्यासाठी होली घोस्ट पाठवणार आहे.जे तुम्हाला आराम देतील, उपदेश करतील आणि तुमचा उद्धार करतील म्हणजेच तुमचं पुनरुत्थान होईल. ते हे सर्व म्हणाले कारण त्यांना पुढं काय होणार आहे व कसं होणार आहे हे सर्व माहीत होते. ते असेही म्हणाले की, ‘माझ्याबद्दल तुम्ही काहीही बोललात किंवा माझ्या विरोधात काहीही केलत तरी चालेल पण होली घोस्टच्या विरोधात तुम्ही गेलात तर ते मी कदापि सहन करणार नाही. काय वाटेल ते झालं Read More …

Seek the Eternal Kuala Lumpur (Malaysia)

Public Program Day 1, Kuala Lumpur, Malaysia 01-11-1990 मी सर्व सत्याच्या साधकांना नमन करते. अगदी सुरुवातीलाच, आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की सत्य तेच असते जे आपण आपल्या मानवी जाणीवेने संकल्पना मांडू शकत नाही किंवा त्याचे आयोजनही करू शकत नाही. जे होते ते आहे आणि जे आहे तेच राहील. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या मानवी पातळीपेक्षा आत्म्याच्या पातळीवर उतरावे लागेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही विचार करता तसेच तुम्ही ज्या काही संकल्पना मांडतात त्यामुळे समस्या निर्माण होतात. म्हणूनच सर्व धर्मग्रंथांनी एक गोष्ट सांगितली आहे की शाश्वततेचा शोध घ्या आणि क्षणभंगुरतेला त्याच्या सर्व समज आणि मर्यादांसह हाताळा परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आत्मा बनाल. सर्व संतांनी सांगितले आहे की तुम्ही स्वतःला जाणले पाहिजे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तो पर्यंत भ्रम आणि अज्ञान दूर होणार नाही. जर आपण चिन मधिल कन्फ्यूशियस पासून ते लाओ-त्झे पर्यंत सर्व पाहिले तर या सर्वांनी याबद्दल बोलले आहे. ख्रिश्चनांसाठी, ख्रिस्तांनी तेच सांगितले आहे, शीखांसाठी गुरू नानकांनी सुध्दा तेच सांगितले आहे की तुम्ही सत्य शोधले पाहिजे. आणि जेव्हा या लोकांनी तुम्हाला सहजयोगाबद्दल या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की तुम्ही आमच्यापैकी कोणावरही आंधळे पणाने विश्वास ठेवू नका. अंधविश्वास तुम्हाला कुठेही नेणार नाही,  कारण तुम्ही सत्य शोधत आहात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर आंधळे पणाने विश्वास ठेवत असाल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. शिवाय सहज म्हणजे ‘सह’ म्हणजे Read More …

Sahaja Culture Pune (India)

Sahaja Culture Now you see the western culture is coming so fast on your head and also another thing is that today low-level creations are coming, do you understand that part like dramas, like cinemas, like books so many also newspapers, very low level they are. Now what should we do about it, one way is to criticize them, but we don`t want to take that position (risk). Then what should be our attitude? What can we do? (In Marathi 00:49) Asking the people to come and sit in the front. So now tell Me what should we do? you also come and sit in the front (Marathi) A Yogi: (Marathi) the good dramas which are now closed due to lack of the audience. The dramas which are our cultural heritage, few of them are showing Sahaja culture that day You were also saying this, we should show such dramas, convince the people, we should buy the tickets and then force the people sit and watch them. Shri Mataji: (In Marathi) so what happened the day before yesterday we went to see a drama. (English) I went to see a very wonderful drama which is of an international level such a great drama it was, `RAMA WANI PATHWILA`. And there were hardly 20-30 people to watch that. And to all kinds of useless third rate —02:28——– speech, it is so boring even if it may not be very vulgar but there are so many people .So for the Sahaja yogis Read More …

Puja Talk, God is Satchitanand (Marathi talk not on the video) Ganapatipule (India)

Puja Talk, India Tour. Ganapatipule (India), 6 January 1988. It is said that God is Satchitanand. He is truth, He is attention and He is joy. In Sahaja Yoga, first you have discovered the truth. Discover the truth on your fingertips. The truth that you can discover on your central nervous system is the truth. First you discover the truth and you can tell about it, talk about, explain about it but you cannot give it to others unless and until the other person gets Realization. So the truth has to be tested. One has to test on the fingertips the existence of truth. Otherwise all kinds of descriptions are of no weight. No one can understand what you are talking about when you tell them that you can feel the all pervading power of Gods’ love around you. And then you start experiencing your attention. You start feeling that there is somebody, some force, some power, some organization is looking after you. Gradually you find your own attention becomes active. Today I am happy to say that I can tell you all these things openly, so clearly. But can you believe that 20 years back even in India nobody could talk about it because something Agamya, not to be known, not to be understood because your attention has become enlightened. With your enlightened attention you are listening to Me that’s why you are understand what I am saying. You attention itself has become active now and it baffles you Read More …

Shri Adi Bhoomi Devi Puja Pune (India)

Marathi Transcription – Bhoomi Devi Puja Date 4th February 1985: Place Pune – Type Puja (Starts at 12:48) इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहजयोग्यांनी मिळून केली, ते बघून असं वाटतं, की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं, त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक कारणं आहेत पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनेच या पुण्यनगरीत वास्तव्य करण्याचे आम्ही ठरविलेले आहे. एकंदरीत इथे जागा मिळणे, त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे. पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे, साठा आहे त्याचा. आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुण्याईत घडविली जाऊ शकतात. पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच. कारण जेव्हा माणसं पुण्याईत घडविली जातात, तेव्हा त्यांच्यावरती आघात करायलासुद्धा, असुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते. विशेषकरून अशा ठिकाणी, जिथे काहीतरी पुण्य घडविलं जातं. तेव्हा आपण आणखीन सचोटीने, आणखीन सतर्कतेने काळजीपूर्वक सहजयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे. इतकंच नव्हे की पुण्य आहे, पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकल गेलं, तर आपल्या सबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची ह्यामध्ये मला मदत पाहिजे.       सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे, की घर बांधणं वगैरे हे काही विशेष महत्त्वाचं नाहीये आणि ते सोपं काम आहे. पण ह्या घराबरोबरच, जर पुण्यातले सहजयोगीसुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं, तर मला फार आनंद होईल. ही एक फार मोठी गोष्ट आहे, की आज इथे आपण भूमीपूजनाला आलो, सगळे एवढे संत- साधू आले आहेत. भूमीपूजन करीत आहेत आणि ह्या भूमीपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा Read More …

Public Program in Shri Ram Temple (India)

Public Program in the Shri Ram Temple (Marathi), Phaltan near Satara, Maharashtra (India). 7 March 1984. फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार! आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याही पेक्षा जास्त उत्कंठतेने तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून जातो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की ‘बाबा, आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे ती दे.’ ही आपल्या देशाची खरोखरच हलाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही की तुम्हाला कळवायला की कसं पोहोचायचं? कसं झालंय. म्हणजे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही यावेळेला पोहोचू, त्यावेळेला पोहोचू, पाहोचले तर नशीब! आदळत, आपटत. एका शरीरात जर पोहोचले (काहीही इजा न होता) तर स्वत:ला मानायचं की बाबा पोहोचलो! पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे. आणि लोकांमध्ये एकतऱ्हेचे समाधान, शहाणपण आहे. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून आहोत. जर अशी स्थिती परदेशात कुठेही असती, तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असतं. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी आहेत आणि जसं असू दे बाबा, परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नांना ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते की नाही अशी सुद्धा मला शंका आली होती. आजचा विषय ‘सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती’ असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा Read More …

Public Program Kolhapur (India)

Public Program. Sadoli in the Kolapur area of Maharashtra (India). 5 March 1984. (Dots indicate that the content is unclear) सहजयोगी १ :   साडोलीच्या भूमीमध्ये आज हा अभूतपूर्व योगायोग आहे. महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली असे त्रिगुणात्मक कुंडलिनीचा अवतार माताजी आज तुम्हाला पावन करण्यासाठी आल्या आहेत.  नवीन पर्व आले.  नवीन विचार आले. भारत वर्षामध्ये,  भारत देशामध्ये फार मोठी योग भूमी समजली जाणारी.  फार मोठे योगी होऊन गेले. फार मोठे तपस्वी होऊन गेले.  विश्वामित्रासारखा,  राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिणारा,  महर्षी भूमी आहे.  तरीसुद्धा हा जो माताजींचा सहज योग आहे,  हा या जगामध्ये पहिलेच काम आहे कारण मला असं वाटतं लोकांनी भक्ती केली, जप केलं,  ग्रंथ वाचले,  पारायणं केली.  सगळा देश तूडविला. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत,  रामेश्वरापर्यंत पदयात्रा काढली.  तरी सुद्धा त्यांना दैवी शक्तीबद्दल जितकं समाधान मानायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि त्याच गोष्टींचा मी सुद्धा ………………………पण गगनगिरीनी सांगितलं……नाही.  योगी नाही व्हायचं.  संसार करून परमार्थ करायचा. राम राम करत रहा.  ठीक आहे.  श्रद्धा,  नम्रता अशा जोडीला, अशा तऱ्हेचा जोडीला विचार घेऊन मी जवळ-जवळ १७ वर्ष गगनगिरीनी सांगितलं ते केलं. अनेकदा प्रत्यय आला की माझी तळमळ होती ती काही नाही………. ही तळमळ माझ्या अंतकरणात होती जी समाधान देऊ शकत नाही.  परमार्थाच्या विचाराला,  हृदयाला समाधान मिळायला पाहिजे.  दैवी शक्तीने जे समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं.  तरीसुद्धा माझं भाग्य समजतो मी की मागील वर्षी ८३ च्या १ जानेवारीला १ तारखेला माझ्या १७ वर्षाच्या तपश्चर्येच्या फळाला फळ आलं आणि त्यादिवशी माताजींची आणि माझी गाठ पडून मी पार झालो. कुंडलिनी शक्ती जागृतीचा प्रयोग आणि पार झाल्यानंतर,  समाधान झाल्यावर माताजींकडे मी गेलो. माताजींकडे बघितलं.  माताजी मला बोलायचं आहे मी बोललो.  Read More …

Public Program (India)

महालक्ष्मी आणि त्याचे महत्त्व कोल्हापूर, ४/३/१९८४ कोल्हापूरच्या सर्व भाविक आणि श्रद्धवावान साधकांना आमचा नमस्कार! कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली, एक नाटकच होतं म्हटलं तरी चालेल. कारण आमचे सहजयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा. माझा फोटो घेऊन जा. तुमच्या हातून हजारो लोक पार होतील. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेषकरून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहतेक क्षेत्रस्थळी लोक पोटभरू, जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच. त्यांना असं वाटतं की देऊळ थे असून आम्हाला काय फायदा झाला आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटं भरून राहिलेत. यांच्यातही आयुष्यात काही विशेष आहे का? त्यांचंतरी आयुष्य काही उज्वल आहे का? त्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का ? हे एवढं देवीची पूजा करतात, पाच-पाच त्यांच्या आरत्या करतात, तरी यांच्यामध्ये काही बदल होत नाही, पण असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का? त्यामुळे कोणताही बुद्धीजीवी वर्ग याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ ! आपले देवळात गेले, दोन पैसे घातले झालं काम! तेव्हा त्याची ती जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत कारण क्षेत्रस्थळी जन्माला आलेले आहेत हे मोठं भाग्याचं आहे ह्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्ट व्हायला सुरुवात होते ‘अति Read More …

Public Program Rahuri (India)

Sarvajanik Karyakram Date : 22nd February 1984 Place Rahuri ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK राहरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार ! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं , की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे , ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहुतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळे माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझे वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळे काही. मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे ? ठीक आहे की नाही? अशा सर्व मोठ्यामोठया लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे Read More …

Public Program (India)

 Public Program, Ahmadnagar, India 22nd January 1984 राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण येथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायचं मला बरं नाही  वाटत  कारण  सगळी  माझीच  मुलं  आहेत . सगळ्यांना माझा नमस्कार . दादा साहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखून पाहिलं  की , ह्या मनुष्याला  खरोखर  लोकांच्यासाठी कळवळा आहे . ज्याच्या हृदयामध्ये कळवळा  नाही त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं  नाही त्यांनी राजकारणात येऊ नये .ज्यांनी समाजकार्य केलयं ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी पण  बहुतेक लोक समाजकार्यासाठी  एवढ्यासाठी करतात  की  आपण राजकारणात येऊन पैशे  कमवू . ते  मला सगळं माहित आहे . मी लहानपानापासनं  आपल्या देशाची स्थिती पाहिलेली आहे. तुम्हा सगळ्या मध्ये कदाचित माझे सगळ्यात वय जास्त असेल. माझे वडील सुद्धा फार धर्मनिष्ठ ,  अत्यंत उच्चप्रतीचे  समाजकर्ते , देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉक्टर  आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री ,अत्यंत मैत्री होती. जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं सगळकाही.. मी यांना लहानपणापासून पाहिलं  होतं . मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळचे नात त्यांच्याबरोबर राहिले ल आहे .आणि अत्यंत तेजस्वी, उदार अशे ते होते. माझे वडील गांधीवादी होते . आणि हे थोडसं गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे, संघर्षाची जी गोष्ट म्हटली ती . पण आपापसात अत्यंत मैत्री होती ,फार मैत्री . माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी विचारायला की कसं काय चाललंय ठीक आहे की नाही . अशा सर्व मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेल  आहे . मी गांधी आश्रमातही  वाढली आणि त्यांच्या  संघर्षातूनच Read More …

Public Program (India)

Public Programme in Shahapur, Maharashtra. माहित नव्हतं.आणि इतक्या लांबून यायचं, म्हणजे  एकदम मला असं वाटलं की सहाच्या नंतर प्रोग्राम आहे वगैरे त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी हरकत नाही  जेव्हा वेळ यायची असते तेव्हाच ती येते, असं आम्ही आत्तापर्यंत सहजयोगात  पाहिलेलं आहे.  आता सहजयोग म्हणजे काय आणि सहजयोगाचा उपयोग काय वगैरे वगैरे अनेक विषयांवर आपण आधीच ऐकलेलं असेल, आणखी पुस्तकही आहेत त्याची ती  वाचलीही असतील.  सांगायचं म्हणजे असं, की आजकालच्या या  धकाधकीच्या काळामध्ये मनुष्य नुसता म्हणजे घाबरून गेलेला आहे.  त्याला आतली काही  शांती म्हणून नाहीये.   आणि  आतली शांतता नसल्यामुळे बाहेरही तो शांत राहू शकत नाही.  बाहेरही तो बंडखोरासारखा  वागतो किंवा अगदीच वाह्यात पणाने काहीतरी  बोलत राहतो किंवा भांडणं करतो किंवा त्याच्या वर गेला  जुलमी जर झाला तर खून पाडतो, सगळ्या तर्‍हेचे जुलूम करायला मनुष्य शिकलेला आहे, ह्या अशा धकाधकीच्या काळामुळे.  जर त्याच्या मनामध्ये शांतता असली,  त्याच्या हृदयामध्ये जर शांती असली,  तर तो बाहेर सुद्धा शांती राखू शकतो.  पण जरआतच  शांतता नाहीये तर बाहेर कशी शांतता राखायची ?  तेव्हा  कुणी जर सांगितलं  की बुवा तुम्ही आता शांत राहा आणि समाधानी राहा, तर लोकांना असा प्रश्न पडतो की ह्या अशा काळामध्ये, मनुष्याने शांत तरी कसे राहायचं ?  सगळीकडनं जसा काही  वणवा पेटावा असं वाटायला लागतं.   इकडे बघितलं तर राजकारणात सुद्धा  मनुष्याला असं दिसतं की काहीही ह्याला भविष्य नाही.  ह्या राजकारणाला काही भविष्य दिसत नाही.  मारामारी, दंगल ,नाही तर एक इलेक्शनला हरले मग दुसरे जिंकले, म्हणजे होणार तरी काय या भारताचं  असं लोकांना वाटू लागतं.  तिसरं म्हणजे घरांमध्ये सुद्धा  भांडण, तंटे, आपापसांमध्ये  मोठमोठाले झगडे ह्या सर्व गोष्टींमुळे मनुष्य खरोखर म्हणजे आज वैतागून Read More …

Shri Durga Puja Rahuri (India)

Shri Durga Puja. Rahuri (India), 1 February 1982. आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी आजची अष्टमी आहे आणि सकाळी रथसप्तमी! अष्टमीच्या दिवशी पूजन मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि राहुरीला, हे माझं माहेरघर आहे. या ठिकाणी पूजन झालं हे त्याहून विशेष आहे. ह्या अष्टमीच्या दिवशी, आपण तो दिवस साजरा करतो, जेव्हा देवीने अष्टभुजा देवी बनून जगात फार पराक्रम केले. मुख्य पराक्रम म्हणजे जे मोठे मोठे दुष्ट राक्षस होते त्यांचं हनन करणं, त्यांचा नाश करणं. तिला नवचंडी असं म्हणतात, चण्डिका ही अष्टभुजा आहे. दुर्गा.. वगैरे तिची अनेक नावं आहेत. आणि तिने ह्या सर्व चंड-मुंड आदी ह्या अशा नवचंडांचा नाश केलेला आहे , म्हणून तिला नवचंडी म्हणतात. इतकंच नव्हे, महिषासुरासारख्या राक्षसाचासुद्धा तिने वध केलेला आहे. त्याच्यानंतर, महिषासुराला मारल्यावर देवांनी तिची फार भक्ती केली आणि तिचं भजन केलं. पण ज्या भक्तांनी तिला बोलवलं ते अत्यंत धार्मिक, सात्विक आणि अत्यंत गुणी होते. त्यांच्या गुणावर प्रसन्न होऊन देवीने अवतार घेतलेला आहे. तेव्हा आपल्यामध्येही ते गुण बाणले गेले पाहिजेत. आपला देवीवर काय अधिकार? ‘माताजी, आम्ही तुमची पूजा ठेवली आहे. म्हणजे जसं काही आम्ही एखादा कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथे तुम्ही या, प्रेसिडेंट बनून,’ तसा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे पुष्कळदा म्हणतात, माताजी आम्ही पूजा ‘ह्या’ वेळेला ठेवली. तसं ठेवून चालायचं नाही. तशी ठेवता येत नाही. आम्ही असलो प्रसन्न तर बसू पूजेला, नाहीतर नाही. आमच्या ह्याच्यावर अवलंबुन असतं, तर म्हणून देवीला आधी बोलवावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं. पाचारण असतं, वगैरे वगैरे … ती काय अशी येऊन बसत नाही- “आता तुम्ही ठेवली आहे तर आम्ही बरोबर घड्याळाला येऊन बसलो बुवा, करा आमची पूजा!” कारण देवीला पूजेची गरज नाही, पूजेची Read More …

Talk Rahuri (India)

Talk तो ला काय अर्थ आहे कि तो असा कि साक्षात् च आत्ता तुम्ही फोटो घेता हे सायन्स चे आपल्यावरती केवढे मोठे काम आहे आत्ता मी हॉंग काँगला (at Hong Kong )गेले होते . एक तिथे फार एक चांगली मुलगी होती ,तिचे संबंध स्वतः चे सगळॆ टेलीविजिनची वैगरे व्यवस्था होती. तिची माझ्यावर फार श्रध्दा होती तिने सांगितले कि टेलीविजिनवरती (on television )एक घेऊ का ? म्हटले घ्या आणि मग तिने टेलीविजिनवर दाखवले कि आणि त्यांना सांगितले कि तुम्ही आत्ता माताजींकडे असे सगळे हात करून बसा ,पाच मिनिटे आणि मला सांगितले अशा तुम्ही उभ्या राहा काही हरकत नाही आणि पुष्कळ लोकांना जागृती आली (आनंदाने हसून सांगत आहेत ) आणि त्यांनी पत्र लिहिले की आमच्या हातात अशा थंड थंड वाऱ्या सारखे काही वाहिले ,कां या चैतन्य लहरी आहेत ? यांच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलेले आहे . महंमद साहेबांनी त्याला रुह असे म्हटलेले आहे .या चैतन्य लहरींच्यां बद्दल एक मोठे पुस्तक आदि शंकराचार्यांनी लिहलेले आहे. आत्ताचे शंकराचार्य नाहीत ते जुने . जे खरे शंकराचार्य होते . त्यांनी एवढे मोठे एक पुस्तक (हाताच्या बोटाने मोजून दाखवत आहेत )या चैतन्य लहरींवर लिहिलेले आहे .आपण वाचतच नाही मुळी त्याच्या मुळे आपल्याला हि कल्पना होत नाही कि आपल्या या धर्मात सुध्दा केवढा मोठा आपला वारसा आहे . त्याच्यावर ख्रिस्तानी याला कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट (cool breeze of holy ghost )असे म्हटलेले आहे .अगदी स्पष्ट ;ह्याच्या हून स्पष्ट काय म्हणणार कि म्हणजे आधी कुंडलिनी ;पण होली घोस्ट विषयी (with the subject of holy ghost ) ख्रिस्त जास्त बोललेले नाहीत कारण त्यांची आई सुध्दा हि आदिशक्ती होती . Read More …

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (India)

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (Marathi Transcript) आफ्टर सहस्रार   सो ब्युटीफुल , इट्स त्रिगुणात्मिका ,  सी ,वन टू, थ्री .. कॅन यु सी द   त्रिगुणात्मिका. .धिस इज आज्ञा हियर.    ब्युटीफुल !  व्हेन आय से दॅट, इट इझ इव्हन मोर ! (सामूहिक हास्य ). नारळ वगैरे  फोडा इथे. सहजी :  हो. फोडतो ना. श्री माताजी  :  जे साधू संत सांगू शकतात , ते कोणी सांगू शकत नाही. आता हे सगळे साधू संत आलेत , तुम्हाला इथे  सांगायला. .ह्याचं नाव काय ठेवणार तुम्ही? देवळाचे ? कारण हे सहस्रार आहे. सबंध सातही देव आहेत.  सहज योगी  :  ह्यांनी आता काय प्राचीन काळापासून म्हसोबा म्हटलं आहे .  श्री माताजी  :  काय ? सहज योगी :  म्हसोबा . श्री माताजी  :  म्हसोबा? तर म्हसोबा का झालं ? सहज योगी :  अनेक दैवत म्हणून  म्हसोबा त्याला नाव आहे . श्री माताजी : अनेक दैवत म्हणून म्हसोबा. एकादश रुद्र . एकादश रुद्र . म्हसोबा म्हणजे एकादश रुद्र आहे …थोडंसं म्हसोबा म्हणजे कसं आहे . ते काही सगळ्यांना समजत नाही. सहज योगी :  अवघड आहे . श्री माताजी :  तेंव्हा एकादश रुद्र म्हटलं तरी चालेल . किंवा सहस्रार आहे हे. म्हणजे सातही देवता आहेत पण प्रसन्न आहेत. पण एकादश रुद्र म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पॉवर आहेत. अकरा. त्रिगुणात्मिकाचीही . नाव काहीही दिलं तरी काय ते समजलं पाहिजे. तत्व त्याच्यातलं काय आहे…… काय आहे, तीन आहेत ना आपल्यामध्ये?             सहज योगी  : हो. श्री माताजी  : महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. पैकी ( श्री माताजी स्वयंभू कडे निर्देश करून म्हणतात ) ही मधली महालक्ष्मी आहे आणि ही ,ही महाकाली आणि ही महासरस्वती . अश्या Read More …