Public Program Day 1, Kuala Lumpur, Malaysia 01-11-1990
मी सर्व सत्याच्या साधकांना नमन करते. अगदी सुरुवातीलाच, आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की सत्य तेच असते जे आपण आपल्या मानवी जाणीवेने संकल्पना मांडू शकत नाही किंवा त्याचे आयोजनही करू शकत नाही. जे होते ते आहे आणि जे आहे तेच राहील. तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला या मानवी पातळीपेक्षा आत्म्याच्या पातळीवर उतरावे लागेल. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही विचार करता तसेच तुम्ही ज्या काही संकल्पना मांडतात त्यामुळे समस्या निर्माण होतात. म्हणूनच सर्व धर्मग्रंथांनी एक गोष्ट सांगितली आहे की शाश्वततेचा शोध घ्या आणि क्षणभंगुरतेला त्याच्या सर्व समज आणि मर्यादांसह हाताळा परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आत्मा बनाल. सर्व संतांनी सांगितले आहे की तुम्ही स्वतःला जाणले पाहिजे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तो पर्यंत भ्रम आणि अज्ञान दूर होणार नाही. जर आपण चिन मधिल कन्फ्यूशियस पासून ते लाओ-त्झे पर्यंत सर्व पाहिले तर या सर्वांनी याबद्दल बोलले आहे. ख्रिश्चनांसाठी, ख्रिस्तांनी तेच सांगितले आहे, शीखांसाठी गुरू नानकांनी सुध्दा तेच सांगितले आहे की तुम्ही सत्य शोधले पाहिजे. आणि जेव्हा या लोकांनी तुम्हाला सहजयोगाबद्दल या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत तेव्हा हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की तुम्ही आमच्यापैकी कोणावरही आंधळे पणाने विश्वास ठेवू नका. अंधविश्वास तुम्हाला कुठेही नेणार नाही, कारण तुम्ही सत्य शोधत आहात. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला सत्य कळत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नका. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर आंधळे पणाने विश्वास ठेवत असाल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. शिवाय सहज म्हणजे ‘सह’ म्हणजे सह, ‘ज’ म्हणजे जन्म. तुमच्याबरोबर जन्माला येणा-या या योगाची क्षमता सर्वव्यापी दैवीय शक्तशी एकरुप होणे हि आहे. तर सत्याची पहिली मूलभूत गोष्ट म्हणजे तुम्ही हे शरीर नाही, तुम्ही हे मन नाही. तुम्ही या भावना नाहीत, किंवा तुम्ही हा अहंकार किंवा कंडिशनिंग सुध्दा नाही तर तुम्ही आत्मा आहात. हे सत्य आहे. हेच सत्य आहे आणि जोपर्यंत तुम्ही आत्मा बनत नाही तोपर्यंत तुम्हाला सत्य कळणार नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे की तुम्ही पाहत असलेले सर्व सजीव कार्य, ही सर्व सुंदर फुले एकाच बीजातून बाहेर पडतात. सर्व जीवंत कार्य ईश्वराच्या प्रेमाच्या या सर्वव्यापी शक्तीने केले जात म्हणून आत्मा बनून तुम्ही दुसरे सत्य जाणता ते म्हणजे ही शक्ती जी सर्वव्यापी आहे पण ती फक्त मार्गदर्शन करणारी आहे, हे तुम्हाला माहीत नाही. आमचे सर्व ज्ञान मार्गदर्शन करत परंतु तुम्हाला ते तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर जाणले पाहिजे आणि या सर्व ख्रिश्चनांनी याला अज्ञेयवादी(परमेश्र्वराविषयी काहीही समजणे शक्य नाही अशी श्रद्धा असणारा) म्हटले आहे, ज्या लोकांना ‘ग्न’ माहित होता, ‘ ग्न’ हा शब्द संस्कृत शब्द ”ज्ञ’ पासून आला आहे किंवा आम्ही देखील म्हणतो ‘ मराठी भाषेत ‘ ग्न’, आपण त्याला ‘ ज्ञ’ म्हणतो. तर या अज्ञेयवादाचा अर्थ जाणून घेणे आहे आणि तेच ज्ञान आहे जे ज्ञानी आहेत, तेच खरे लोक आहेत जे बुध्दि ने जाणत नाही परंतु तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तुम्हाला ही सर्वव्यापी शक्ती जाणवली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही असे करत नाही आणि तुमचे संबंध पूर्णपणे स्थापित करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे सत्य काय आहे हे कळणार नाही. तोपर्यंत तुम्ही जे काही कराल ते अंधश्रद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला अंधश्रद्धेच्या पलीकडे जावे लागेल. तुम्हाला यापलीकडे जायचे आहे आणि या सर्वांनी पुन्हा पुन्हा तेच सांगितले आहे, परंतु आपण ते विसरत आहोत. या संतांनी दिलेल्या उपायांबद्दल आपण फक्त वाचतो, वाचतो. गुरु नानकांनी म्हटल्या प्रमाणे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्हाला भ्रम दिसणार नाही, आम्ही ते वाचत राहतो, वाचून उपयोग नाही किंवा ख्रिस्चनां बद्दल हीच गोष्ट आहे, आता ‘स्वतःला जाणून घ्या’, ‘स्वतःला जाणून घ्या’ असे म्हणत जाता. ‘स्वतःला ओळखा’ म्हटल्याने तुम्ही स्वतःला ओळखाल का?
तर, आमच्यात एक व्यवस्था आहे, जे काही आहे ते त्यांनी आत्ताच दाखवले आहे आणि तुम्हाला सांगितले आहे की ऑस्ट्रेलियन लोक मलेशियानां साठी दुर-दुर वरुन आले आहेत. आता, या व्यवस्था आपल्यातच अस्तित्वात आहेत. इथेही मी म्हणेन की, जेव्हा आम्ही तुम्हाला आपल्या स्वतःमध्ये असलेल्या या सर्व व्यवस्थेबद्दल सांगतो तेव्हा तुम्ही विश्वास ठेवू नये. पण एक शास्त्रज्ञ म्हणून, मी जे सांगतेय ते तुम्ही गृहितक म्हणून स्वीकारले पाहिजे आणि ते खरे असल्याचे सिद्ध झाल्यास, तर एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून तुम्ही ते स्वीकारले पाहिजे कारण ते तुमच्या हिताच आहे. त्यातूनच या सर्व संतांचे अस्तित्व आणि त्यांनी काय सांगितले आहे हे सिद्ध होईल.
हे तुमच्या मानवी शरीराच्या हितासाठी, त्याच्या मानसिक तसेच भावनिक बाजूंच्या हितासाठी आहे आणि ते तुमच्या देशाच्या, जगातील सर्व देशांच्या कल्याणासाठी आहे. म्हणून हे घडणे आवश्यक आहे, याला पुनरुत्थानाची वेळ म्हणतात. कुराणात, मोहम्मद साहब यांनी याला ‘कियामा’ असे म्हटले आहे. ते म्हणाले की यावेळी, तुमचे हात बोलतील. तुमचे हात बोलले पाहिजे आणि सहजयोगात हेच घडते. तुमचे हात बोलू लागतात, तुम्हाला तुमच्या पाचही बोटांवर जाणीव होवु लागते, जसे दाखवल्या प्रमाणे हे 5-6 आणि 7 डावीकडचे केंद्रे आहेत जे आपल्या भावनांशी निगडित अहेत, उजव्या बाजूला तुम्हाला मानसिक आणि शारीरिक लक्षण जाणवतात. आता काही देशांमध्ये, मला वाटते की काही लोक खूप आत्मपरीक्षण करतात जस रशियन. त्यांनी तुम्हाला रशियन अनुभव सांगितला असेल. ते अत्यंत आत्मपरीक्षण करणारे आहेत आणि त्यामुळेच हे त्यांच्यामध्दे इतक्या मोठ्या प्रमाणात स्थिरावले, अगदी शास्त्रज्ञसुध्दा, २०० शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी सहजयोगाला सुरुवात केली, ६०० डॉक्टर सहजयोगात आले आहेत, ते त्यावर काम करत आहेत. पण ही कोंबडा व बैलाची गोष्ट असू शकते, परंतु खोटेपणा अगदी सहजपणे शोधला जाऊ शकतो हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या खोट्या व्यक्ती कडे गेल्यावर ते तुमच्याकडून पैसे घेतील. प्रथम व्याज हे असेल की तुम्ही त्यांना किती पैसे देणार आहात. तुमच्या खिशात किती पैसे आहेत या मध्दे त्यांचे स्वारस्य असते किंवा त्यांचे इतर काही हितसंबंध आहेत जे कोणत्याही प्रकारे शुद्ध हितसंबंध नाहीत. शुद्ध हित असे असावे की तुम्हाला तुमचा आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे. अर्थात, त्यासाठी तुम्ही पैसे देऊ शकत नाही आणि तुम्ही जास्त प्रयत्न करू शकत नाही. हीच मूळ गोष्ट समजून घेतली तर इकडे तिकडे धावणाऱ्या अनेक खोट्या लोकांपासून सुटका होऊ शकते. पण जर तुम्ही फालतू(गांभीर्य नसलेला) असाल तर तुम्ही गुरु-शॉपिंग आणि ते सर्व करू शकता. गुरूला आपण खरेदी करू शकत नाही, गुरूने तुम्हाला खरी वस्तू द्यावी लागते, त्याला ते ‘असल’ म्हणतात. वास्तव द्यावे लागते. जर वास्तविकता द्यायची असेल तर तुम्ही त्यासाठी शुल्क आकारू शकत नाही कारण ते खूप अमूल्य आहे. म्हणून, जे लोक परमेश्वराला शोधत आहेत, किंवा जे लोक शांती शोधत आहेत, स्वतःचा आत्मसाक्षात्कार शोधत आहेत त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण आपल्या आत्म-साक्षात्काराची किंमत देऊ शकत नाही. पण, असे घडते की लोक ज्या पद्धतीने जाहिरात करतात, लोक दिखाऊ असतात त्यामुळे आपला भ्रमनिरास होतो. पण सहजयोगाबद्दल दिखाउपणा करता येत नाही कारण ते वास्तव आहे. आता जशी वेळ आली आहे, बरेच काही निघून गेले आहे आणि या लोकांनी तुम्हाला तुमच्याबद्दल सांगितले आहे, आज पहिला दिवस असल्याने ही माझी शैली होती की मला प्रेक्षकांकडून काही प्रश्न अपेक्षित आहेत. पण समजूतदार प्रश्न, आक्रमक प्रश्न नाहीत. कारण ती तुमच्यात आहे, ती तुमची स्वतःची शक्ती आहे, ति तुमची स्वतःची आई आहे आणि उद्या मी तुम्हाला सर्व काही समजावून सांगेन. ही तुमच्या उथ्थानाची शक्ती आहे. तर, तुम्ही मला याबद्दल काही समंजस प्रश्न विचारणे शक्य आहे का?, मी उत्तर देईन मग आमच्याकडे आत्म-साक्षात्काराचे सुमारे 10-15 मिनिटांचे सत्र असेल.
16:58 नक्कीच, मी तुम्हाला कळवते. मी आता इथे येणार आहे, मी इथे फक्त 2 दिवस राहायचे ठरवले, पण मला वाटते की मी आता 3 दिवस इथे राहीन आणि मला मलेशियाच्या लोकांना भेटायला आवडेल, चांगली कल्पना असेल.
परमेश्वरा तुम्हाला आशीर्वादीत करो!