Public Program (India)

महालक्ष्मी आणि त्याचे महत्त्व कोल्हापूर, ४/३/१९८४ कोल्हापूरच्या सर्व भाविक आणि श्रद्धवावान साधकांना आमचा नमस्कार! कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली, एक नाटकच होतं म्हटलं तरी चालेल. कारण आमचे सहजयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा. माझा फोटो घेऊन जा. तुमच्या हातून हजारो लोक पार होतील. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेषकरून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहतेक क्षेत्रस्थळी लोक पोटभरू, जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच. त्यांना असं वाटतं की देऊळ थे असून आम्हाला काय फायदा झाला आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटं भरून राहिलेत. यांच्यातही आयुष्यात काही विशेष आहे का? त्यांचंतरी आयुष्य काही उज्वल आहे का? त्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का ? हे एवढं देवीची पूजा करतात, पाच-पाच त्यांच्या आरत्या करतात, तरी यांच्यामध्ये काही बदल होत नाही, पण असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का? त्यामुळे कोणताही बुद्धीजीवी वर्ग याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ ! आपले देवळात गेले, दोन पैसे घातले झालं काम! तेव्हा त्याची ती जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत कारण क्षेत्रस्थळी जन्माला आलेले आहेत हे मोठं भाग्याचं आहे ह्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्ट व्हायला सुरुवात होते ‘अति Read More …

Shri Mataji at sugar factory reception after program (India)

Shri Mataji at sugar factory reception after program, Shani Shingnapur, India, 1984-02-25 सहजयोगी – यांची स्मरण शक्ती सर्व गेली होती  सहजयोगी – क्रायसिस ने सहा-सात टाके पडले होते  श्री माताजी – बरं  सहजयोगी – नऊ टाके पडले होते  श्री माताजी – अच्छा  सहजयोगी – complete परत पूर्वीसारखं  श्री माताजी -अ  सहजयोगी -अर्धी बॉडी श्री माताजी पॅरलाईज्ड (paralysed) झालती कम्प्लिट (complete )   श्री माताजी – कोणाची?  सहजयोगी -यांची  श्री माताजी -हो का ? सहजयोगी -आणि मी सहज नेत्रे वकील आहेत ते भेटायला म्हणून गेलो. आणि मी व्हायब्रेशन दिले तर हालचाल चालू झाली त्यांची नंतर आवडीने आले मला ऐकून होते (अस्पष्ट) करत होते ते म्हटलं एवढा सच्चा माणूस आहे तर या मनुष्याला परमेश्वर बरोबर मिळणार दिली जागृती मग त्यांना मग ते… श्री माताजी -एखादं पत्र त्या सकाळच्या मूर्खांना  लिहून टाका.  सहजयोगी- विस्मृती झाली होती. श्री माताजी- त्यांना म्हणे, आम्ही तुम्हांला पाच हजार रुपये देऊ मला जर तुम्ही आजार ठीक कराल तर आहो (श्री माताजी हसतात)) सहजयोगी -पाच हजार रुपये (सहजयोगी हसतात) श्री माताजी – असं मूर्खासारखं लिहून पाठवलं होतं. तुम्ही आता लिहून कळवा की, माझं सगळं ठीक केलेलं आहे. एकही पैसा घेतला नाही माताजींनी, एक कवडी सुध्दा घेतली नाही.  सहजयोगी – हिटलरला आत्मसाक्षात्कार दया असं म्हणण्यासारखं आहे.  श्री माताजी – अरे बापरे!  सहजयोगी – खिचडी आहे .  श्री माताजी- खिचडी सुध्दा आहे का ? मग झालं आजचं संबंध जेवणच संपवून टाका तुम्ही आमचं अं.  सहजयोगी- (हास्य) सहजयोगी – कोण आहे रे खाली? बोलणं झालं कशाला करताय मग त्यांनीच सांगितलं की, फराळ वगैरे काहीतरी केला पाहिजे. ठीक आहे आता काहीतरी पाहुणचार घेतला पाहिजे. Read More …

Public Program Sangamner (India)

Public Program, Kundalini and Bandhan, Sangmaner, India 24-02-1984 ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री वटे साहेब तसेच संगमनेरचे सर्व भाविक साधक, सहजयोगी मंडळी सर्वांना आमचा प्रणिपात. आज विशेष्य करून फार क्षमा याचना करायची की इतका उशीर झाला. पण आजच एक प्रश्न उभा झाला आणि मला अहमदनगरला पहिल्यांदा जावं लागल. त्यामुळे इथ यायला इतका उशीर झाला तरी सगळ्यांनी उदार हृदयाने मला क्षमा करावी. इतका वेळ आपण वाट बघत बसलात त्यावरुन हे निश्चित आहे की आपण भाविक मंडळी आहात आणि आपण साधक आहात, परमेश्वराच्या शोधात आहात. आज पर्यंत ह्या भारत भूमीत विशेष्य करून या महाराष्ट्रात अनेक साधु संत झाले. श्रीराम सुद्धा या पवित्र भूमीवर अनवाणी चालले आणि त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीच्या वर्णनाला माझ्याजवळ शब्द नाहीत. त्यांना लोकांनी किती छळल, त्रास दिला त्यांना समजून नाही घेतल, त्यांची कोणत्याच प्रकारे मदत नाही केली तरी सुद्धा त्यांनी आपल कार्य अव्याहत चालवले. त्याला कारण त्यांना माहिती होत की एक दिवस असा येणार आहे की या भूमीवर असे मोठे मोठे लोक जन्माला येतील, जे पुण्यवान आत्मा असतील. मनुष्य पैशांनी मोठा होत नाही, यशाने मोठा होत नाही, सत्तेने मोठा होत नाही. कोणत्याही गोष्टीने मोठा होत नसतो पण ज्या माणसाला परमेश्वराची ओढ आहे, तोच खरा मनुष्य परमेश्वरी दृष्टीमध्ये मोठा असतो. आणि अशी परमेश्वराला शोधणारी अनेक मंडळी आहेत, जी आपल्या महाराष्ट्रात देशात विद्यमान आहेत. परमेश्वर हा आपल्या मध्ये, हृदयामध्ये आत्मा स्वरूप असतो अस सर्व संत साधूंनी सांगितलेले आहेत. ती सर्व साक्षात्कारी मंडळी होती आणि साक्षात्कारी मंडळींचे मुख्य म्हणजे अस असतं कि ते कोणचे  चुकीचे काम करत नाहीत. त्यांना सांगावे लागत नाहीत, त्यांच्यामध्ये धर्म जागृत असतो. ते धर्मातच असतात. त्यांना Read More …

Public Program – Rahuri School Rahuri (India)

फत्तेबादच्या या एज्युकेशन सोसायटी चे फार उपकार आमच्यावर आहेत असं वाटत मला .कारण पूर्वी हि मी फत्तेबदला आले होते आणि या ठिकाणी परत एकदा प्रोग्रॅम झाला तर बरा  अशी  माझी फार इच्छा होती .आणि त्या इच्छे प्रमाणे आज हे घडून आलं .त्या बद्दल या शाळेचे जे मुख्य अध्यापक आहेत त्यानं चे मी फार आभार मानते .तसेच इथले शिक्षक वर्ग ,विद्यार्थिनी आणि विध्यर्थी आणि फत्तेबाद शहरातील भाविक ,सात्विक अशी मंडळी या सर्वाना आमचा नमस्कार .आपल्या समोर सहजयोग म्हणजे काय आता व्यवस्तीत रूपाने चव्हाण साहेबानी मांडलेलं आहे . रस्त्याने चालताना कुणाशी बोलत नाही जस काही कुणी घरात मेल आहे ,सुतक पाळतात असेच ते वागत होते .तर त्यांना विचारलं तुम्हाला असं का वाटतंय ,तुम्ही दुःखी  का .तर ते म्हणतात आम्ही एव्हडी धावपल केली सगळं काही मिळवलं पण आमची चूक झाली नसेल ना काही  .तुकाराम बुवांनी कोणती चूक केली नाह ज्ञेनेश्वरांनी   कोणती चूक केली नाही आणि ते आनंदात होते म्हणजे त्यांच्या त काहीतरी आपल्या पेक्षा विशेष होत .हे लक्षात आणलं पाहिजे .आता आपली मी प्रतिज्ञा ऐकली फार आनंद झाला आणि मला अगदी आनंदाश्रू आले .संत साधू ज्या भूमीवर जन्माला आले आणि रामाला सुद्धा आपल्या पायातल्या वहाणा काढून अनवाणी चालावं लागलं अशी पुण्यभूमी बघण्या साठी म्हणून हे लोक आले पण आपल्याला मात्र त्याची कदर नाही .आपल्याला त्याची माहिती नाही .त्याला कारण असे आहे कि हि जी मंडळी येत आहेत त्यांना काहीतरी मिळालेलं आहे ;आणि जे मिळालाय त्यामुळे त्यांना समजत कि हि भूमी काय विशेष आहे .तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार भेटेल .नामदेवांनी सांगितलं आहे फार सुंदर  कि आकाशात पतंग उडते आणि मुलगा हातात पतंग उडवत आहे पण जरी Read More …

Public Program Rahuri (India)

Sarvajanik Karyakram Date : 22nd February 1984 Place Rahuri ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK राहरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार ! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं , की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे , ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहुतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळे माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझे वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळे काही. मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे ? ठीक आहे की नाही? अशा सर्व मोठ्यामोठया लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे Read More …

Public Program Pune (India)

Public Program, Pune, India या पुण्यभूमीवर आधीही पुष्कळ आक्रमण झालेले आहे. इतर राक्षसी प्रवृत्तींनी अनेक वेळेला याच्यावरती आक्रमण केलं. शिवाजी महाराज असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे; येथे पुष्कळ अशा घटना झाल्या ज्या इतिहासात अद्वितीय आहेत. म्हणजे इथल्या जनतेने नेहमी सत्याचाच भाग उचलून धरला. त्या साठी झगडले. त्याचं ध्येय नेहमी सत्याला धरून राहणं असं होतं. नंतर आपल्या भारतामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्यात सुद्धा इथे वीरत्वाने लोक लढले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच सामाजिक पातळीवर सुद्धा फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. तेव्हा खरं म्हणजे महाराष्ट्राची मानसिक भूमी ही पुणे. जरी मुंबईला आपण म्हणतो की राजधानी आहे, पण आर्थिक राजधानी असली तरी जी मानसिक म्हटली पाहिजे किंवा धार्मिक म्हटली पाहिजे ती पुण्यभूमी ही पुण्याची आहे. या पुणेकरांवर एक मोठा भारी जबाबदारीचा भाग येतो. तो इतका मोठा जबाबदारीचा भाग आहे याची कल्पना सुद्धा तुम्हांला नसावी.कधी-कधी मला आश्चर्य वाटतं. पण दैवकृपेने येथे सहजयोग जमू लागलाय. हळूहळू त्याची पाळेमुळे जमू लागली आहेत. हे बघून मला फार आनंद होतो.  पूर्वी मला फार आश्चर्य वाटायचं की सर्व तऱ्हेचे दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस या पुण्यभूमीला कशे प्राप्त झाले आणि येथे येऊन त्यांनी कशे लोकांवर अत्याचार केले. पाशवी प्रवृत्तीचे लोक तसेच दुष्ट, रानटी तऱ्हेचेबाबाजी वगैरे अशा तऱ्हेचे लोक येथे आले. त्या नंतर इतर ढोंगी आणि अशे लोक येऊन त्यांनी पुष्कळ आक्रमण केलं. पण तरीसुद्धा त्यांची पुण्याई ते जिंकू शकले नाहीत. आणि सगळ्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्यांना इथून कूच करावं लागलं. आज अशा परिस्थितीत आपण बसलेलो आहोत. इथे मला दोन तऱ्हेची लोकं दिसतात. त्यातील एक म्हणजे रूढीवादी लोक. अजून आपल्या रूढी आपल्यामध्ये इतक्या रुजलेल्या आहेत, ते आपण डोळे उघडून बघायला Read More …

Shivaji the Anchavatara Satara (India)

Puja in Satara: Shivaji the Anchavatara. Satara (India), 7th February 1984 Marathi Transcript शिवाजी महाराजान  बद्दल सांगत होते कारण साताऱ्याला राजधानी स्थापन केली होती .त्यांच्यात जे गुण होते ते आपण घेतले पाहिजेत .त्यांच्यातला विशेष गुण  असा होता कि त्यांच्यात कोणतेच दोष नव्हते जे आपल्या माणसं मध्ये दोष असतात कुणाला कशाची सवय कुणाला कशाची लत  ,कुणाला काहीतरी वेड्या सारखं कशाच्या मागे लागले तर लागले .त्या च्या वरून हे सिद्ध होत कि ते अंशावतार होते .अंशावतार असल्या मुळे त्यांना कोणतीच वाईट सवय ,वाईट खोड ,खोट बोलणं ,दारू पिणं ,या गोष्टी त्यांना सांगाव्या लागल्याचं नाहीत .ते तसे नव्हतेच .दुसरं अत्यंत स्वभावाने गोड होते .स्वभाव फार गोड होता .अत्यंत गोड स्वभावाचे आणि आईला पूर्णपणे समर्पित होते .कधीही त्यांनी कुणाला वाकडा शब्द बोलला नाही किंवा कुणावरही ओरडले नाहीत का कुणावर बिघडले नाहीत .हे दोन गुण फार कठीण असतात .जेव्हा मनुष्याला इतकं आईच वरदान असत आणि त्या वरदाना मध्ये एक महत्व हि येत कारण ते महाराज होते .पण तरी सुद्धा स्वभावा मध्ये अत्यंत गोडवा होता .आणि स्वतः बद्दल शिष्ट पणा नव्हता कि मी राजा आहे आणि हे गोर गरीब आहेत आणि हे मावळे आहेत त्यांच्याशी कस बोलायचं .त्यांच्या बरोबर बसायचं त्यांच्या बरोबर भाकरी खायची ,कांदा भाकरी त्यांच्या बरोबर मजेत खात असत .रात्रन दिवस प्रवास करायचे ,घोड्यावर कुठे हि रात्रीच झोपायचं ,काही करायचं अशा रीतीने त्यांनी आपलं आयुष्य काढलं .आणि अत्यंत हाल अपेष्टा त्यांनी सहन केल्या आणि त्याच्या नंतर जेव्हा संभाजी महाराज आणि शाहू महाराज यांचं भांडण झालं त्याला कारण एकाच होत भाऊबंदकी .त्या आपल्या मराठा लोकां न  मध्ये स्वभाव आहे कि अंगात वळण आलेलं आहे त्याच्या Read More …

Procession and Public Program Satara (India)

Public Program, Satara, India 1984-02-06 प्रार्थना! ओम असतो मा सद्गमय।  तमसो मा ज्योतिर्गमय।  मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांतिः शांतिः शांतिः।। ओम तत्सत् श्री नारायण तू, पुरुषोत्तम गुरु तू ।। सिद्ध बुद्ध तू, स्कंद विनायक, सविता पावक तू ।। ब्रह्म मजद तू, यहव शक्ती तू, इशू पिता प्रभू तू ।। रुद्र विष्णू तू, रामकृष्ण तू, रहीम ताओ तू ।। वासुदेव गो-विश्वरूप तू, चिदानंद हरी तू ।। अद्वितीय तू अकाल निर्भय, आत्मलिंग शिव तू ।।   ओम तत्सत् श्री नारायण तू स्वागत गीत…… श्री माताजी: मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं “आदिमा”, म्हणाल की नाही या लोकांना फार आवडतं.  फॉरेनर्स तर शिकलेत. सहजयोगी:  मुली म्हणत असतील तर…… श्री माताजी: यांना येतं का? सहजयोगी: हे म्हणणारे नाहीत. ते आले नाहीत. श्री माताजी: नाही. या आमच्या फॉरिनर्सना बोलावून म्हणायला सांगायचं? सहजयोगी: हो. श्री माताजी: बोलवा. अलेक्झांडर अलेक्झांडर… Come along here about 2 – 3 persons who could sing with him the “Adima”, the song that they sung last time. ते हल्लीचंच होतं. शिवाजीरावांनी बसवलं होतं. शिवाजीराव, तुमचं गाणं ह्या लोकांनी इतका छान बसवलं होतं. तुमचे भाऊ नाही आले? आलेत? सहजयोगी:  हार्मोनियम पाहिजे? श्री माताजी: हो. हार्मोनियम तर पाहिजे. तबला ही पाहिजे. हार्मोनियम पाहिजे. सहजयोगी: आता कृपा करून कोणी बोलू नये. शांत रहा सगळ्यांनी. श्री माताजींकडे हात करून शांत बसावे. दोन्ही हात मांडीवर ठेवावे आणि शांत बसावे. श्री माताजी: “आदिमा”, भाऊ कुठे तुमचे? शिवाजीराजांचे भाऊ कुठे आहेत? या बरं. सहजयोगी: एस. पी. देसाई सर सापडले. कोणीही उभं राहायचं नाही. खाली बसून घ्या कृपा करून. श्री माताजी: You all could sing wherever you are, I think and you Read More …

Devi Puja Rahuri (India)

Devi Puja 26th January 1984 Date: Place Rahuri Type Puja राहरीबद्दल ह्यांना मी सांगितलं नाही, की राहरीचं काय महात्म्य आहे. राहरीमध्ये शालिवाहनांचं राज्य राहिलं. आदि काळामध्ये इथे एक राहर म्हणून राक्षस होता. फार दष्ट आणि तो लोकांना छळत असे. आणि त्याच उच्चाटन करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि तिने त्या राहुला ह्या राहरीमध्ये मारलं. ‘री’ शब्दाचा अर्थ होतो, ‘री’ म्हणजे महालक्ष्मी स्वरूप. महालक्ष्मी स्वरूपाने मारलं. म्हणून, आपण असं देवी महात्म्य असं वाचत नाही. कारण देवीमध्ये फक्त महाकालीचं वर्णन आहे. राहुला मुसळवाडीमध्ये मुसळाने मारलं. तरी तो पळत होता. नंतर ओरडला. म्हणून त्या गावाला आरडगाव म्हणतात. मग तो इथे येऊन धाराशाही झाला. मेला इथे म्हणून राहुरीचं महात्म्य आहे. पण त्याचं किती लांबलचक आहे ते बघितलं पाहिजे, कि आज इतक्या वर्षानंतर, हजारो वर्षानंतर शालीवाहनांचे बभ्रूवाहन राज्य करत असतांना त्यांनी विक्रमादित्याला हरवलं. विक्रमादित्य हा एक उज्जैनचा राजा होता. त्याचं स्वत: च एक पंचांग होतं . कॅलेंडर होतं. त्यांनी आपलं एक कॅलेंडर सुरू केलं. त्याचं नाव शालिवाहन. शक त्यांनी सुरू केलं आणि त्या शालिवाहन शकाप्रमाणे १९८८ का काहीतरी वर्षे झालेली आहेत. (थोडे इंग्लिश, नंतर मराठी सुरू) तर ह्यांना मी असं सांगत होते की शालिवाहनाचं जे कॅलेंडर होतं, ते त्यांनी केल्यानंतर मग त्यांनी जे राज्य स्थापन केलं, आणि सुरू त्याच्यात राहिले ते गुढीपाडवा, तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. ह्यांना मी इंग्लिशमध्ये सांगितलं. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे ती शाल, जी शाल ते वाहत असत म्हणून त्याला शालिवाहन देवीची शाल आणि ह्या देवीच्या शॉलमध्ये काय असतं, तुम्हाला माहिती आहे, की त्या शालीने तिला सौंदर्य येतं. आणि त्याशिवाय ती त्याने आपल्या अंगाचं रक्षण करते. म्हणजे थंडीवार्यापासून रक्षण करते. तिच्या Read More …

Public Program (India)

 Public Program, Ahmadnagar, India 22nd January 1984 राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण येथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायचं मला बरं नाही  वाटत  कारण  सगळी  माझीच  मुलं  आहेत . सगळ्यांना माझा नमस्कार . दादा साहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखून पाहिलं  की , ह्या मनुष्याला  खरोखर  लोकांच्यासाठी कळवळा आहे . ज्याच्या हृदयामध्ये कळवळा  नाही त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं  नाही त्यांनी राजकारणात येऊ नये .ज्यांनी समाजकार्य केलयं ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी पण  बहुतेक लोक समाजकार्यासाठी  एवढ्यासाठी करतात  की  आपण राजकारणात येऊन पैशे  कमवू . ते  मला सगळं माहित आहे . मी लहानपानापासनं  आपल्या देशाची स्थिती पाहिलेली आहे. तुम्हा सगळ्या मध्ये कदाचित माझे सगळ्यात वय जास्त असेल. माझे वडील सुद्धा फार धर्मनिष्ठ ,  अत्यंत उच्चप्रतीचे  समाजकर्ते , देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉक्टर  आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री ,अत्यंत मैत्री होती. जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं सगळकाही.. मी यांना लहानपणापासून पाहिलं  होतं . मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळचे नात त्यांच्याबरोबर राहिले ल आहे .आणि अत्यंत तेजस्वी, उदार अशे ते होते. माझे वडील गांधीवादी होते . आणि हे थोडसं गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे, संघर्षाची जी गोष्ट म्हटली ती . पण आपापसात अत्यंत मैत्री होती ,फार मैत्री . माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी विचारायला की कसं काय चाललंय ठीक आहे की नाही . अशा सर्व मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेल  आहे . मी गांधी आश्रमातही  वाढली आणि त्यांच्या  संघर्षातूनच Read More …

Public Program (India)

Public Programme in Shahapur, Maharashtra. माहित नव्हतं.आणि इतक्या लांबून यायचं, म्हणजे  एकदम मला असं वाटलं की सहाच्या नंतर प्रोग्राम आहे वगैरे त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी हरकत नाही  जेव्हा वेळ यायची असते तेव्हाच ती येते, असं आम्ही आत्तापर्यंत सहजयोगात  पाहिलेलं आहे.  आता सहजयोग म्हणजे काय आणि सहजयोगाचा उपयोग काय वगैरे वगैरे अनेक विषयांवर आपण आधीच ऐकलेलं असेल, आणखी पुस्तकही आहेत त्याची ती  वाचलीही असतील.  सांगायचं म्हणजे असं, की आजकालच्या या  धकाधकीच्या काळामध्ये मनुष्य नुसता म्हणजे घाबरून गेलेला आहे.  त्याला आतली काही  शांती म्हणून नाहीये.   आणि  आतली शांतता नसल्यामुळे बाहेरही तो शांत राहू शकत नाही.  बाहेरही तो बंडखोरासारखा  वागतो किंवा अगदीच वाह्यात पणाने काहीतरी  बोलत राहतो किंवा भांडणं करतो किंवा त्याच्या वर गेला  जुलमी जर झाला तर खून पाडतो, सगळ्या तर्‍हेचे जुलूम करायला मनुष्य शिकलेला आहे, ह्या अशा धकाधकीच्या काळामुळे.  जर त्याच्या मनामध्ये शांतता असली,  त्याच्या हृदयामध्ये जर शांती असली,  तर तो बाहेर सुद्धा शांती राखू शकतो.  पण जरआतच  शांतता नाहीये तर बाहेर कशी शांतता राखायची ?  तेव्हा  कुणी जर सांगितलं  की बुवा तुम्ही आता शांत राहा आणि समाधानी राहा, तर लोकांना असा प्रश्न पडतो की ह्या अशा काळामध्ये, मनुष्याने शांत तरी कसे राहायचं ?  सगळीकडनं जसा काही  वणवा पेटावा असं वाटायला लागतं.   इकडे बघितलं तर राजकारणात सुद्धा  मनुष्याला असं दिसतं की काहीही ह्याला भविष्य नाही.  ह्या राजकारणाला काही भविष्य दिसत नाही.  मारामारी, दंगल ,नाही तर एक इलेक्शनला हरले मग दुसरे जिंकले, म्हणजे होणार तरी काय या भारताचं  असं लोकांना वाटू लागतं.  तिसरं म्हणजे घरांमध्ये सुद्धा  भांडण, तंटे, आपापसांमध्ये  मोठमोठाले झगडे ह्या सर्व गोष्टींमुळे मनुष्य खरोखर म्हणजे आज वैतागून Read More …

Public Program, Dharmachi Durgati Jhali aahe Dhule (India)

 Public program, Day 2, Dhule, India, 17-01-1983   नाशिकचे मान्यवर कलेक्टर साहेब तशेच सहजयोगी व्यवस्थापक आणि नाशिकची भाविक मंडळी या सर्वांना माझा नमस्कार. आम्ही बाहत्तर साली नाशिकला आलो होतो, त्यावेळेला सहजयोग नुकताच सुरु झाला होता, आणि बरीच मंडळी त्यावेळेला इथे साक्षात्कार पावून पावन झाली होती आणि त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सहजयोग वाढवला, पण नाशकाला कार्य मात्र तसंच राहिलं. आता डॉक्टर साळवी इथं आलेले आहेत, आणि मधून मधून इतर मुंबईची मंडळी सुद्धा इथं येत असतात, त्यामुळे मला पूर्ण आशा आहे की सहजयोग इथे सुद्धा फोफावेल. सर्व प्रथम, सर्व गोष्टी विसरून धर्म आदी किंवा सायन्सच्या वगैरे एक मनुष्याने असा विचार केला पाहिजे की आम्ही ह्या संसारात कशासाठी आलो? आमच्या जीवनाचं लक्ष्य काय आहे? जर आम्ही एका अमिबापासून आज मानवस्थितीला आलो तर ते कशासाठी? या जीवनाला काही अर्थ आहे किंवा नाही? अर्थात या भारतभूमीमध्ये विशेषतः महाराष्ट्रात जिथे आपली साडे तीन पीठे बसली आहेत, विश्वाची सर्व कुंडलिनी आहे, अशा महान देशामध्ये जन्मलेल्या लोकांना हे तर माहीतच आहे की या संसारातून ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला तो महान झाला तेच सगळ्यात मोठं मिळवायचं आहे. त्यातून काही नवीन नवीन मंडळी पाश्चिमात्य देशात जाऊन शिक्षण घेऊन आली आणि त्यांना असा प्रश्न पडलेला असतो की देव वगैरे काही नसतो, आहे की नाही किंवा हे जे काही कुंडलिनी बद्दल एवढं मोठं लिहिलेलं आहे, ते ज्ञानेश्वर आपल्या सहाव्या अध्यायात सांगून गेलेत. तुकारामांनी ज्या परमात्म्याला मिळवण्याच्या गोष्टी केल्या. नामदेव आदी अनेक संतांनी या भूमीवर परमेश्वराच्या बद्दल जे सृजन केलेले आहे ते खरं होतं की खोटं होतं? ते खरे होते किंवा भ्रमित होते? त्यांनी जी गोष्ट केली त्याच्यात काही अर्थ होता की उगीचंच त्यांनी काहीतरी Read More …

Talk at Rotary Club (India)

Talk at Rotary Club from 01:15:00 : Q: What should be the relation between state of mind and awakened Kundalini? Will it affect the body or mind? Shri Mataji : Actually it affects everything but let’s see how it worrks? Now, what is ‘mind’ also is not a very clearcut idea. People don’t have a clearcut idea about ‘mind’, you see. To them ‘mind’ means ‘mana’ or ‘buddhi’, or ‘ahamkar’. Now, we will make it clear to you that when the Kriya Shakti [Power of action] works and acts then you create Ahamkara that is Ego, a balloon like thing. And when the Mana Shakti works then you create the Superego in the head. So we have two balloon like things called Ego and Superego. When they meet each other and the calcification takes place that’s how this Fontanelle bone area becomes hard and we become ‘I’, ‘you” and ‘you’. Now, the mind which you are talking, I don’t know which you are talking about – but if you think how the thought comes to us. Let us see the thought process. A thought rises and falls off by itself; another thought rises and falls off by itself. The rising of the thought we can see but not the falling of it. Now a thought comes to us either from the past or from the future and again it disappears in the past. Our attention is jumping on the cusps of these thoughts but in between these future and past Read More …

Public Program Kolhapur (India)

1982-1230-Public Program (Malharpeth) Marathi कलियुगा मध्ये जन्म घेणं आणि तेही आई’च्या रूपाने म्हणजे फार कठीण काम आहे. गुरु म्हटला की त्याचा आपोआपच सगळ्यांना वचक असतो, आई म्हटली की प्रत्येक मानवरासारखच (मानवासारख) आपल्या जी हक्काची आई आहे आपण कसंही तिच्याशी वागलं तर ती आपल्याला क्षमाच करणार तेव्हा सहज योग आई’च्या रूपाने साध्य करण तर व्हावंच लागतं कारण त्याच्याशिवाय होणारच नव्हतं आईच व्हायला पाहिजे दुसऱ्या कोणाच्या शक्तीततच नव्हत हे काम. तर मल्हार पेठेत सत्कार बघून आईचा या कलियुगात फार आश्चर्य वाटतं आणि फार आनंद झाला म्हणजे कलियुग बदलून कृतयुगाला सुरुवात झाली आहे असं पंचांगात आहे ते खरं आहे हे आज मला मात्र पटलं. आम्ही एक स्त्री आहोत तेही एक आई आहोत म्हणजे एकतऱ्हेचा दुबळेपणा आहे हृदयाला तुमचं काही वाईट झालं तर तेही दुखतं ,घनिष्ठ आहात तुमचं चांगलं व्हावं म्हणून इतका आटोकाट प्रयत्न असतो की कसंही करून यांना एकदा मिळालं पाहिजे कारण आईला स्वतःचं काहीच नसतं तिला आपली मुलं ठीक झाली, त्यांना शक्ती मिळाली त्यांचं जे काही आहे ते त्यांना मिळालं त्याच्या पलीकडे काय यायला नको .तेव्हा एक फक्त देण्याचं जे काम आहे ते झालं म्हणजे कृतार्थ वाटतं त्याच्या पलीकडे आणखीन आम्हाला काही नाही ,आपण इतकी मंडळी मल्हार पेठेत सहज योगाच्या कार्यक्रमाला आलात म्हणजे किती भाविक आणि किती सात्विक लोक, परत संत तुकारामांच्या नावाने इथे एवढी सुंदर शाळा काढलेली आहे याबद्दल मला इथले मुख्याध्यापक जे आहेत ते मला दिसले नाहीत कोण आहेत ते .तर त्यांना अत्यंत त्यांचे आभार मानायचे आहे संत तुकाराम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आमचेच आत्मिक स्वतःचे आहेत त्यांनी तर सहज योगाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती त्याचीच तयारी आपल्या Read More …

Marriages New Delhi (India)

1982-0221, Marriages, Delhi, India. आपण आनंदी आहोत आणि संपूर्ण विश्व आनंदाने फुलेल . (प्रेक्षक टाळ्यांचा आवाज)मागच्या वेळी आपली फक्त सहा लग्ने झाली होती आणि या वेळी आपली दुप्पट झाली आहे, आपल्याकडे बारा लग्ने झाली आहेत. (प्रेक्षक टाळ्या वाजवतात, प्रेक्षकांमधून कोणीतरी म्हणाले, पुढच्या वर्षी 24) मला आशा आहे की तुम्ही ही प्रगती करत राहाल. (प्रेक्षक हसण्याचा आवाज) सहजयोगींसाठी विवाह ही एक अतिशय महत्त्वाची संस्था आहे, जे लोक लग्न करत नाहीत किंवा विवाहांवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना आम्ही स्वीकारत नाही. तसेच, आपण संन्यासी असलेल्या लोकांना स्वीकारत नाही. त्यामुळे आपल्यासाठी साठी विविध कारणांसाठी विवाह ही एक अतिशय महत्वाची संस्था आहे कारण सुखी वैवाहिक जीवनाने, या पृथ्वीवर जगाची शांतता नांदू लागेल.मग आपल्यातील सामूहिक अस्तित्वाने तुमच्या आत्म्याने. विवाहांना आजूबाजूच्या सर्व लोकांचा आशीर्वाद मिळावा आणि विवाह असा असावा की ज्यामुळे लोकांना आनंद मिळावा.आता पती-पत्नीची जबाबदारी आहे की त्यांचे विवाह (३४:४८) अतिशय यशस्वी करणे. त्यात एक साधी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेमासाठी लग्न केले आहे. तुम्ही फक्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल सर्व काही कळेल आणि तुम्हाला त्या प्रेमाचा आनंद मिळेल. प्रेमाशिवाय तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. प्रेम हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळे तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकता. विशेषत: या देशात विवाहांना समाजाचा खूप पाठिंबा आहे आणि विवाह यशस्वी व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण त्यांना माहित आहे की चांगले वैवाहिक जीवन न राहिल्यास मुले उद्ध्वस्त होतील. ते अस्वस्थ होतील, संपूर्ण जग खूप अस्वस्थ होईल. त्यामुळे कधी कधी भांडणे किंवा भांडणे झाली तर नेहमीप्रमाणेच. हे मुलांच्या उपस्थितीत, नोकरांच्या उपस्थितीत किंवा इतर लोकांच्या उपस्थितीत केले Read More …

Shivaji School, Vishesh goshti sathi vel aali aahe Rahuri (India)

Vishesh Goshti Sathi Vel Aali Aahe 3rd February 1982 Date : Place Rahuri Public Program [Marathi Transcript] ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK परमेश्वराच्या अनेक कृपा आपल्यावर होतात. माणसावरती अनेक त्याच्या कृपा होतात. त्याच्या आशीर्वादाने अनेक उत्तम आणि उत्तम असं जीवन त्याला मिळतं, पण मनुष्य मात्र परमेश्वराला प्रत्येक क्षणी विसरत असतो. परमेश्वराने साक्षात ही सर्व पृथ्वी आपल्यासाठी निर्माण केलेली आहे आणि ती पृथ्वी निर्माण करून त्याच्यामध्ये विशेष रूपाने एक स्थान बनवलं आहे, ज्याच्यामुळे ती फार सूर्याच्या जवळ नाही, चंद्रापासून तितकी दर आहे जितकी तिला रहायला पाहिजे. आणि त्या पृथ्वीमध्ये हे जीवजंतू तयार करून आज ते सुंदर दूर कार्य मनुष्य निर्मितीमध्ये फलद्रूप झालेले आहे, म्हणजे आता तुम्ही मानव झालात. आता मानव स्थितीत आल्यावर आपण परमेश्वराला विसरून जावं हे बरोबर नाही. ज्या परमेश्वराने आपल्याला इतकं ऐश्वर्य, सुख आणि शांती दिलेली आहे त्या परमेश्वराला लोक फार लवकर विसरतात, पण ज्या लोकांना परमेश्वराने एवढा आराम दिलेला नाही, जे अजून दारिद्रियात आहेत, दु:खात आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत ते मात्र परमेश्वराची आठवण करत राहतात. पण ज्या लोकांना परमेश्वराने दिलेले आहे ते मात्र त्याला विसरून जातात. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ज्यांना आशीर्वाद दिला ते मात्र परमेश्वराला साफ विसरून जातात आणि ज्यांना दिला नाही ते मात्र त्याची आठवण काढत राहतात. मग त्याची आठवण केल्यावर, त्यांनाही आशीर्वाद मिळाल्यावर ते ही विसरून जातील. मानवाचं असं विचित्र डोकं आहे की त्याला काहीही दिलेलं झेपतच नाही. म्हणून हे आपण समजलं पाहिजे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर आपण बसून मोजत बसलो की परमेश्वराने सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला किती तऱ्हेने आशीर्वादित केलेले आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल! आजच माझ्याकडे पुण्यातले पुष्कळ श्रीमंत लोक आले. त्यांच्या घरी Read More …

Talk Rahuri (India)

Talk तो ला काय अर्थ आहे कि तो असा कि साक्षात् च आत्ता तुम्ही फोटो घेता हे सायन्स चे आपल्यावरती केवढे मोठे काम आहे आत्ता मी हॉंग काँगला (at Hong Kong )गेले होते . एक तिथे फार एक चांगली मुलगी होती ,तिचे संबंध स्वतः चे सगळॆ टेलीविजिनची वैगरे व्यवस्था होती. तिची माझ्यावर फार श्रध्दा होती तिने सांगितले कि टेलीविजिनवरती (on television )एक घेऊ का ? म्हटले घ्या आणि मग तिने टेलीविजिनवर दाखवले कि आणि त्यांना सांगितले कि तुम्ही आत्ता माताजींकडे असे सगळे हात करून बसा ,पाच मिनिटे आणि मला सांगितले अशा तुम्ही उभ्या राहा काही हरकत नाही आणि पुष्कळ लोकांना जागृती आली (आनंदाने हसून सांगत आहेत ) आणि त्यांनी पत्र लिहिले की आमच्या हातात अशा थंड थंड वाऱ्या सारखे काही वाहिले ,कां या चैतन्य लहरी आहेत ? यांच्या बद्दल सगळ्यांनी सांगितलेले आहे . महंमद साहेबांनी त्याला रुह असे म्हटलेले आहे .या चैतन्य लहरींच्यां बद्दल एक मोठे पुस्तक आदि शंकराचार्यांनी लिहलेले आहे. आत्ताचे शंकराचार्य नाहीत ते जुने . जे खरे शंकराचार्य होते . त्यांनी एवढे मोठे एक पुस्तक (हाताच्या बोटाने मोजून दाखवत आहेत )या चैतन्य लहरींवर लिहिलेले आहे .आपण वाचतच नाही मुळी त्याच्या मुळे आपल्याला हि कल्पना होत नाही कि आपल्या या धर्मात सुध्दा केवढा मोठा आपला वारसा आहे . त्याच्यावर ख्रिस्तानी याला कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट (cool breeze of holy ghost )असे म्हटलेले आहे .अगदी स्पष्ट ;ह्याच्या हून स्पष्ट काय म्हणणार कि म्हणजे आधी कुंडलिनी ;पण होली घोस्ट विषयी (with the subject of holy ghost ) ख्रिस्त जास्त बोललेले नाहीत कारण त्यांची आई सुध्दा हि आदिशक्ती होती . Read More …

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (India)

Ekadasha Rudra Swayambhu Shilanyas (Marathi Transcript) आफ्टर सहस्रार   सो ब्युटीफुल , इट्स त्रिगुणात्मिका ,  सी ,वन टू, थ्री .. कॅन यु सी द   त्रिगुणात्मिका. .धिस इज आज्ञा हियर.    ब्युटीफुल !  व्हेन आय से दॅट, इट इझ इव्हन मोर ! (सामूहिक हास्य ). नारळ वगैरे  फोडा इथे. सहजी :  हो. फोडतो ना. श्री माताजी  :  जे साधू संत सांगू शकतात , ते कोणी सांगू शकत नाही. आता हे सगळे साधू संत आलेत , तुम्हाला इथे  सांगायला. .ह्याचं नाव काय ठेवणार तुम्ही? देवळाचे ? कारण हे सहस्रार आहे. सबंध सातही देव आहेत.  सहज योगी  :  ह्यांनी आता काय प्राचीन काळापासून म्हसोबा म्हटलं आहे .  श्री माताजी  :  काय ? सहज योगी :  म्हसोबा . श्री माताजी  :  म्हसोबा? तर म्हसोबा का झालं ? सहज योगी :  अनेक दैवत म्हणून  म्हसोबा त्याला नाव आहे . श्री माताजी : अनेक दैवत म्हणून म्हसोबा. एकादश रुद्र . एकादश रुद्र . म्हसोबा म्हणजे एकादश रुद्र आहे …थोडंसं म्हसोबा म्हणजे कसं आहे . ते काही सगळ्यांना समजत नाही. सहज योगी :  अवघड आहे . श्री माताजी :  तेंव्हा एकादश रुद्र म्हटलं तरी चालेल . किंवा सहस्रार आहे हे. म्हणजे सातही देवता आहेत पण प्रसन्न आहेत. पण एकादश रुद्र म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पॉवर आहेत. अकरा. त्रिगुणात्मिकाचीही . नाव काहीही दिलं तरी काय ते समजलं पाहिजे. तत्व त्याच्यातलं काय आहे…… काय आहे, तीन आहेत ना आपल्यामध्ये?             सहज योगी  : हो. श्री माताजी  : महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. पैकी ( श्री माताजी स्वयंभू कडे निर्देश करून म्हणतात ) ही मधली महालक्ष्मी आहे आणि ही ,ही महाकाली आणि ही महासरस्वती . अश्या Read More …

Public Program Rahuri (India)

Public Program At Agricultural University ICU 1st February 1982 Date: Place Rahuri Public Program Type मराठी माणसाला अजून स्वत:बद्दल विशेष जाणीव नाही. विशेष करून तरूण मंडळींना सांगायचे आहे मला. परवा एका भाषणात एक गृहस्थ मला म्हणाले की आपल्या तरूण मंडळींची अगदी अधोगती होते आहे माताजी आणि त्याबद्दल तुमचे काय कार्य चालले आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. हे लोक उद्या वाया जाणार. दारू पिऊन, अगदी वाट्टेल तसे वागून सगळ्यांची नाचक्की करणार आहेत. यांना कोणाही बद्दल आता श्रद्धा वाटत नाही, कुणाचाही मानपान ठेवत नाही, सगळ्यांची थट्टा करतात आणि अगदी त्यांचे जीवन एखाद्या मूर्खासारखे झाले आहे. मी म्हंटले, ‘इतके काही वाईट नाही आहे हो . असं सगळच म्हणू नका तुम्ही. काही लोक आहेत तसे. आणि सगळ काही इतके बिघडलेले नाही आणि बिघडू शकत नाही.’ कारण अनंत शक्त्या या आपल्या भारत भूमीला आशीर्वादीत करताहेत. या तुमच्या महाराष्ट्रात सर्व विश्वाची कुंडलिनी नावाची शक्ती आहे. पण ही कुंडलिनी सुप्तावस्थेत आहे एवढच आहे. पण तिचे परिणाम मात्र आपल्या चरित्रावर, आपल्या संस्कृतीवर आहेत. महाराष्ट्रात सुद्धा असे अनेक लोक होऊन गेले ज्यांचे वर्णन करता येत नाही. ज्ञानेश्वर एक असे झाले तरी आपल्याला माहिती आहेत की कितीतरी संत साधू वारंवार म्हणजे तुम्ही दत्तात्रयांच्या वेळेपासून पाहिले तर आदिनाथ सुद्धा – त्यांच्या आधी पासून आदिनाथ-दत्तात्रयांचे जे अवतरण होते सुरूवातीचे आदिनाथांचे, ते सुद्धा या महाराष्ट्रात झाले. इतकच नव्हे तर जे मोठे मोठे संत-साधू झाले त्यांनी नेहमी महाराष्ट्राला भेट दिली. जे बाहेर होते, गुरूनानक होते ते इकडे आले किंवा जे जे असे- वल्लभाचार्य होते फार मोठे ते महाराष्ट्रात येऊन गेले. इतकेच नव्हे तर श्री राम आणि श्री सीता या पुनीत भूमीवर फिरलेले आहेत. त्यांचे Read More …

Puja, Be Thankful To God (India)

Be Thankful to God; Count Your Blessings 27th Jan. 1982, Kolapur, Maharasthra India .आता ह्यांना जे सांगितलं ते तुम्ही ऐकलेलंच आहे. पण तरीसुद्धा जरी तुमची खूप स्तुती केली, तरीसुद्धा हे समजलं पाहिजे की आपल्या हिंदुस्तानात सुद्धा अनेक तरतऱ्हेचे प्रकार आहेत. ज्यांनी आपण बांधले जातो. ह्यांच्यात श्रद्धा नाही आणि तुमच्यात आंधळी श्रद्धा, पहिली गोष्ट आंधळी श्रद्धा आहे. ती आंधळी श्रद्धा नीट केली पाहिजे. आता माताजीनी सांगितलं, की समजा असं सांगितलं, की बघा काळयामध्ये  काळं घालू नका, की लगेच माझ्यावरती सगळे दंडे घेऊन येतात, का माताजी म्हणे, अरे मी काय, मी कशाला सांगते?  ज्या गोष्टीला मी मना करते ते का करते?  उगीचच सांगत नाही. काळं घातलं म्हणजे त्याने त्रास होतो, ते करायचं नाही. नाही, हे माताजी आम्ही ते ही करतो आणि हेही करतो, तसं चालायचं नाही. दोन्ही करता येणार नाही. सहजयोग करायचा म्हणजे तो शुद्ध स्थितीत केला पाहिजे. ह्यांच्यामध्ये अश्रद्धा आहे, पण तुमच्यामध्ये आंधळी श्रद्धा आहे आणि हट्टी आहात त्याबाबतीत. तेव्हा ते ही ठीक नाही. आता युगधर्म आपण म्हटलेलं आहे. म्हणजे या युगामध्ये, सहजयोगाची धारणा, आपण धारण करायची असते. त्याच्यासाठी शहाणपण असायला पाहिजे. शहाणपण जर नसलं,  हट्ट  जर केला,  तर काहीच करता येण्यासारखं नाही. हट्ट नाही करायचा. बघायला पाहिजे, माताजी जे म्हणतात ते खरं होतं की नाही. झालं ना एकदा, कळलं ना तुम्हाला, व्हायब्रेशन्स आले नं,  हे सगळं लिहिलेलं नं देवीचे महात्म्य, की माताजींच्या पायावर तुम्ही कुंडलीनी पाहिली ना असताना, तर झालं ना, आता मला पुढे सांगायला कशाला पाहिजे. जर हे साक्षात आहे, तर मग कळलं पाहिजे आपल्याला, की माताजी जे म्हणतात ते केलं पाहिजे. सहजयोगात जे म्हटलंय ते केलं पाहिजे, जर ते तुम्ही करणार नाही, तर सहजयोग तुमच्यात वाढणार नाही. नाही वाढला की मग माताजींवर दोष लावायचा की Read More …

Puja, on the Republic Day (India)

Republic Day puja, Lonavala, India, 1982-0126 On puja and seers. Shri Mataji: Before that, I know that people think this time, this, but we have to go according to the auspicious time, isn’t it? Because to get maximum effects, so we have to start puja later. I also went for bath afterwards. So this is what it is. One has to understand that when you start the puja is very important. [Shri Mataji talks aside in Marathi] Sahaja Yogi: Presents…. Shri Mataji: Ah!! Seventeen past eleven. I didn’t see this. I didn’t see this book. Sahaja Yogi: This pratipadha is the first day of Navaratri “Maghi Navaratri” we call which is auspicious week. So the first day, it starts at eleven seventeen and ends tomorrow morning eleven thirty three. So we are starting just in time. Shri Mataji: You see if you see a watch, it would be all wrong because that is how I had to go for My bath also after [in Marathi] Sahaja Yogi : [in Marathi] Shri Mataji: I never read this book, you see this, where they described it. I know it is so. So you can tally it also. You see it is easy to see the watch and walk. You see if you give up watch and do it in auspicious time, half of your problems will be solved. [Puja talk starts here] Again it’s a great day. It’s a day of our independence of this great country and also the national day Read More …

Puja Pune (India)

मंगळवार, जानेवारी 19th, 1982 महाराष्ट्राचं प्रेम अगाध आहे आणि ते माझ्या नुसतं हृदयात भरून येतं. इतकं प्रेम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे, कि त्या प्रेमातच सर्व संसार बुडाला, तर आनंदाच्या लहरी, किती जोरात वाहू लागतील याची मला कल्पना सुद्धा करवत नाही. त्या प्रेमासाठीसच   धडपडत  ही मंडळी तुमची भाषाही त्यांना येतं नाही, तरी सुद्धा इतक्या लांबून दुरून धडपडत महाराष्ट्रात जायचे म्हणून येतात. असं प्रेम जगात कुठेही नाही. हे अगदी खरं आहे. जरा मराठी भाषा सडेतोड आहे, जरा दांडगी आहे, खणखणते जास्त. पण हृदय मात्रं प्रेमाने भरलेलं आहे. भाषेमध्ये खोटा दांभिकपणा नाही. पण एकंदरीत प्रेमाची व्याख्या सुद्धा मराठी भाषेतच करता येते. किती तरी शब्द शोधून मला बाहेर सापडत नाहीत. जशी आपल्या मराठी भाषेत आहेत. कारण हृदयामध्ये जो प्रेमाचा प्रवाह वाहत आहे , त्याच्याच लहरी आदळून, आपटून, नवीन नवीन शब्द बनवतात. आणि त्या शब्दांचे तुषार, त्यातनं संगीत जाणवतं. हे असलं अबाधित प्रेम सदा सर्वदा महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. ज्या लोकांचा संबंध बाहेरच्या लोकांशी आला आहे, अश्या लोकांमध्ये मात्र, थोडासा फेरबदल झालेला आहे. त्यामुळे प्रेम काय आहे हे लोकांना कळत नाही. प्रेमामध्ये मनुष्याला त्याग म्हणजे हा जाणवतच नाही. एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल आस्था वाटते. विशेषतः जर एखादं मूल आजारी असलं तर तिचा जीव नुसतं कासावीस होतो त्या मुलासाठी. हे कसं? केवढं तिच्यासाठी हे धन आहे मोठं, स्वतःचा जीव आतमध्ये घालून, डोक्यात घालून, रात्रंदिवस ती त्या मुलाच्या सेवेसाठी असते. हे कुठून येतं? हे एवढे त्यागाचे जीवन पण वाटते का त्याग आहे? कसंही करून मुलगा ठीक झाला पाहिजे माझा. तसंच आपल्या नवऱ्याबद्दल मुलांच्या बद्दल हीच आस्था ह्या देशात बायकांना आहे. आणि आहे. अजून  पुष्कळांना आहे. तेंव्हा बाहेरचं Read More …

Tattwa Ki Baat New Delhi (India)

1981-02-15 Talk at Delhi University 1981: Tattwa Ki Baat 1, Delhi [Marathi Translation from Hindi] MARATHI TRANSLATION (Hindi Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari काल मी तुम्हाला सांगितले होते की आज तत्वाबद्दल आहे. पण तत्वे अनेक आहेत. ही जी अनेक तत्वे आहेत. सांगेन, जेव्हा आपण एखाद्या झाडाकडे पाहतो, तेव्हां आपल्या निरनिराळ्या चक्रांवर त्यांचा वास आहे. पण ती एका शरिरांत हे लक्षांत येते की त्याचे मध्ये कोणती तरी शक्ती प्रवाहित समाविष्ठ आहेत आणि एकाच दिशेने त्यांचे कार्य चालू आहे. व प्रभावित आहे की जिच्यामुळे तो वृक्ष वाढतो व पूर्णत्वाच्या त स्थितीला पोचतो. ही शक्ती त्याच्या मध्ये नसेल तर हे कार्य आहे. जस मूळाधार चक्रावर श्री गणेशाचे तत्व आहे. गणेश होऊ शकत नाही. पण ही शक्ती त्याने कशी मिळविली त्याचे तत्व, मर्म काय आहे ? जे बाह्यांत दिसून येते ते झाड, पृथ्वी इतक्या जोरात फिरत आहे की जर आपल्यामध्ये गणेश त्याची फळे-फुले-पाने दिसतात; हे काही तत्व नव्हे. ते त्या तत्व नसते तर पृथ्वीवर आपण टिकलो नसतो. पृथ्वीला सर्वापेक्षा सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्माला तर आपण बघू शकत चिकटून राहू शकलों नसतो. कोणी म्हणेल की माताजी, नाही. ते जर साकार असते तर दिसले असते. परंतु ते पृथ्वीच्या आंत सुध्दा गणेश तत्व आहे ? ही गोष्ट खरी आहे. निराकार स्थिती मध्ये आहे. याचा अर्थ त्याच्यात असलेली पृथ्वीच्या गणेश तत्वाच्या योगानेच आपण पृथ्वीला धरून पाणी, जरी ते वहात असले तर ते तत्व नाही. पाणीच त्या आहेात परंतु पृथ्वीचे आंत जे गणेश तत्व आहे ते पृथ्वीचा शक्तीला आपल्यातून वहात असते. म्हणजे जर पाणी तत्व जो (axis) आहे त्यावर गणेश तत्व स्थित आहे.खरं म्हणजे आहे असे धरले तर Read More …

Makar Sankranti Puja Pune (India)

Makar Sankranti Puja, Pune, India I’m sorry I’ve not been able to speak to you in English language and I’ve spoken sometimes. This special day today is a day of Sankranti. Sankri – you know ‘San’ means good, holy and ‘krant’ means if the -when I speak Marathi I forget English – revolution. Holy revolution. Holy.That’s what I’m telling them what is the Holy Revolution is that your own Dharma is established now through Sahaja Yoga. You know what is your Dharma. Because if you don’t do your own Dharma you’ll be lost. Your vibrations will be lost. You’ll immediately know that in your seeking you have lost something. You’ll be affected so you have to correct. That’s not so difficult.But to make it a Sankrant – Holy Revolution – you have to take to new – new religion, new steps. First of all, your own step should be enlightened, and then you must establish new steps to go ahead. And these are the new steps which are different for the Westerners and different for the Easterners. Just now I told them about the Eastern style and then I’ll tell you later on about the Western.We have to have new ideals, new styles because we are the courageous people, we are the valiant people. We’ll have to fight the war of love, through love. And it’s a very delicate thing. When the moon moves – the sun moves – from the left to the right that means your desire becomes Read More …

Talk to Sahaja Yogis Mumbai (India)

Sahaj Seminar Date : 10th December 1980 Place Mumbai Туре Seminar & Meeting Speech Language Marathi ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK आता चव्हाणांनी आपल्याला सहजयोगाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. पण कोणत्याही गोष्टीची जर माहिती मिळाली, तर ती गोष्ट मिळाली असं नसतं. माहितीने आपण फक्त जाणतो, की अमुक वस्तू अशी आहे. समजा आम्ही लंडनची आपल्याला माहिती दिली. तरी तुम्ही काही लंडनला अजून गेले नाहीत नां ! तेव्हा लंडनला जाऊन तिथलं वातावरण कसं काय आहे, त्याचा अनुभव यायला पाहिजे. त्यानंतर सबंध लंडनमध्ये काय काय प्रकार आहेत, कोणते रस्ते आहेत, कोणत्या इमारती आहेत, त्या सर्वांचेसुद्धा ज्ञान व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर, ते सगळे कळल्यावर तिथले कायदेकानून काय आहेत ? मग आपण तिथे वागायचं कसं? ज्याने आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होईल, ज्यासाठी आपण आलो. हा सगळा विचार करावा लागतो. अगदी तसेच सहजयोगाचे आहे. फक्त फरक एवढाच आहे, की सहजयोग ही जिवंत क्रिया आहे. जिवंत क्रियेत आणि कृत्रिम क्रियेत फार अंतर असतं. जिवंत क्रियेत कोणती गोष्ट कशी घडेल ते सांगता येत नाही. म्हणजे आता एखादं झाड जर तुम्ही लावलं, त्याला कुठे फांदी फुटेल, कुठे फुलं येतील, कधी येतील, कशी उमलतील, किती फळें येतील? ते काही आधी सांगता येत नाही. परत ते दिसायचं नाही काही सकाळी उठले फुलं आली. नंतर एखाद्या दिवशी सकाळी उठले फळं झाली. तसं सहजयोगाचं आहे. आधी पार व्हायचं. म्हणजे तुमचे कोंब फुटले. पार झाल्यावर, आता काय काय होतंय आमच्या आतून ते बघत रहायचं, साक्षी स्वरूपात. त्यासाठी पोषक काय करावे लागेल, तेवढं करत जायचं आणि ते करण्यासाठी शक्ती येते माणसामध्ये. म्हणजे मी आता कधीही प्रोग्रॅमच्या आधी म्हणत नाही की तुम्ही दारू पिऊ नका, की सिगरेट पिऊ Read More …

Seminar Part 3 Akurdi (India)

Public Program, Marathi, Penicillin Factory, Akurdi, Pune 1980-12-09 Akurdi session       मागच्या वर्षी आकुर्डीला आमचा प्रोग्रॅम झाला, तेंव्हा मी म्हटलं होतं सहजच  की पेनिसिलीन फॅक्टरी मध्ये बघा प्रयत्न करून, बरीच मंडळी पार होतील  . तेंव्हा लोकांच्या लक्षात आलं नाही की माताजींनी पेनिसिलीन फॅक्टरीचं नाव का घेतलं?  त्याला कारण असं की माझ्या भावाच्या लग्नात मी आले होते इथे पुण्याला. आणि तुमच्या गेस्ट हाऊस  मधेच थांबले होते. तेंव्हा सकाळी उठून इकडे खूप अनवाणीने  फिरले, आणि माझी अशी इच्छा होती , की ही जर जागा सुद्धा चैतन्यमय झाली, तर जी कामगार मंडळी इथे येतील, त्यांच्यावर या वातावरणाचा अवश्य परिणाम होईल. आणि त्याचा आज मात्र दृश्य दिसलं. तेंव्हा सीता आणि राम या महाराष्ट्रामध्ये अनवाणी  का फिरले, त्याचंही कारण आपल्या लक्षात येईल.      परमेश्वरानी  फार कार्य केलेलं आहे. त्याची आपल्याला जाणीव नाही, की आपल्यासाठी परमेश्वरानी काय काय कार्य केलेलं आहे. सबंध सृष्टीच बघा किती सुंदर परमेश्वरानी रचली. रोजच्या आपल्या व्यवहारात सुद्धा आपण बघतो पण आपल्या लक्षात येत नाही की आपण जे अन्न खातो, जी आपण फळं खातो, ही फळंसुद्धा ,परमेश्वरानी आपल्यासाठीच तयार केलेली आहेत. एका फुलातनं आपण फळं काढू शकत नाही. एक सुद्धा आपण जिवंत कार्य करू शकत नाही.      सायन्सचं असं म्हणणं आहे की आम्ही अमीबा पासनं माणसं झालो. ते तरी परमेश्वरानीच केलेलं आहे. अनेक वेळा या संसारामध्ये परमेश्वराचं अवतरण झालं. विष्णू स्वरूपात . आणि त्यांनी हे उत्क्रांतीचं कार्य हे इवोल्युशनचं कार्य केलेलं आहे. पण जेंव्हा जेंव्हा ही  अवतरण  संसारात झाली तेंव्हा लोकांना हे समजलं नाही की याचा आपल्याला काय लाभ होतो. त्यामुळे आपल्यामध्ये कोणची अशी बांधणी नव्हती. त्यामुळे कोणची आपल्याला अशी वरची पायरी नव्हती. श्री विष्णूनी कशाला Read More …

Seminar Mumbai (India)

1980-12-09 Seminar India (Marathi) Sahaj Seminar Date : 9th December 1980 Place Mumbai Туре Seminar & Meeting Speech-Language Marathi CONTENTS | Transcript Marathi 02 – 15 English Hindi || Translation English Hindi Marathi FINAL TRANSCRIPT MARATHI TALK  सर्व संसारिक गोष्टींकडे लक्ष, जसे माझ्या मुलीचं लग्न, झालं माताजींचे पाच तास त्याच्यात. इथे जागृती नाही. लंडनला हृदय आहे. इथे लोकांना हृदय राहिलेलं नाही. हृदय गेलं त्यांचं, संपलं. ते मागेच पार वितळून गेलेलं दिसतं कुठेतरी. संपलय. ते हृदय नाही, फ्रोजन हार्ट , थिजलंय हृदय त्या लोकांचं. झालं. तिसरं झालं, युरोप, ते दारूने सबंध भरलंय! तिथलं लिव्हर कसं असणार? तेव्हा ही दशा झालेली आहे विराट पुरुषांची.  आता तुम्ही जागृत व्हावं. तुमचं लक्ष परमेश्वराकडे वेधलं पाहिजे. काही नाही, आम्ही जातो की हनुमानाला. एखादा नमस्कार घातला की झालं. सकाळी जातो ना! बरं बुवा झालं. पुष्कळ झालं. आम्ही नमस्कार तर करतो. आहे आमचा विश्वास हं परमेश्वरावर! अगदी उपकारच आहेत परमेश्वरावर सगळ्यांचे! अहो, तुम्हाला काही मिळवायचं आहे की नाही असा प्रश्न चार लोकांना विचारायला पाहिजे. सहजयोग्यांचं मुख्य कार्य म्हणजे असं आहे, की प्रकाश मिळाला दिव्याला, तर तो काय करतो? सहजयोगानंतर मग काय करायचं? प्रकाश द्यायचा असतो. किती लोकांना प्रकाश दिला आम्ही? केवढा सुगंध आहे तुमच्यात. केवढा आनंद आहे तुमच्यामध्ये! तो वाटला का तुम्ही का स्वत:च आनंदात बसले. माझी साधना चांगली असली म्हणजे झालं. ‘मी साधना खूप करतो माताजी, माझ्या घरी बसून. आणि काहीच प्रगती होत नाही.’ होणार कशी? पसरायला पाहिजे नां! जोपर्यंत कलेक्टिव्हिटी येणार नाही, जागतिकता येणार नाही, सार्वभौमिकता येणार नाही, तोपर्यंत तुमच्या सहजयोगाला काहीही अर्थ नाहीये. अगदी बेकार आहे. जंगलामध्ये जर एखादं फूल आलं, आणि त्याला कितीही Read More …

The Meaning Of Nirmala Rahuri (India)

  The Meaning Of Nirmala, 1980-01-18 आपण अशे भेटलो म्हणजे आपापल्या हितगुजाच्या गोष्टी करू शकतो, आणि त्याबद्दल जे काही बारीक-सारीक असेल हे सुद्धा आपण सांगू शकतो एकमेकांना, कसं आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे कारण आपल्या आईचं नावंच मुळी निर्मला आहे. आणि या नावामध्ये पुष्कळ शक्त्या आहेत. पहिला शब्द ‘नि’ आहे. ‘नि’ म्हणजे नाही, नाही जे नाही आणि जे आहे त्याला म्हणतात महामाया. तुम्ही जे नाही आहे वास्तविक, पण आहे असं भासतं, त्याचं नाव आहे महामाया. तसंच हे सर्व संसाराचं आहे. हे दिसतं आहे म्हणून, पण हे काही नाहीच. ह्याला जर आपण बघितलं आणि ह्याच्यात आपण फसलेलो असलो, की असं वाटतं की हेच आहे, हेच आहे व्यर्थ आहे. आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सामाजिक परिस्थिती वाईट आहे, संसारिक परिस्थिती वाईट आहे. सगळं वाईट दिसतं. चांगलं काही दिसत नाही. समुद्राच्या वर वरच्या थरावर जे पाणी असतं, ते अत्यंत गढूळ, घाणेरडं, त्याच्यामध्ये काय काय वस्तू तरंगत असतात; पण खोल गाभाऱ्यात त्याच्यात गेलं की, इतकं सौंदर्य त्याच्यात, एवढी संपदा शक्ती सगळं काही असतं. तेव्हा ते वरचं काही होतं हे सुद्धा लक्षात राहत नाही. पण सांगायचं म्हणजे हा सगळा भ्रम आहे. हे जे काही बाह्यातलं आहे हे सगळं भ्रम आहे. हे नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवले पाहिजे. ‘नि’ शब्दाची जर तुम्ही आपल्यामध्ये स्थापना केली, हे नाही, हे नाहीय इथून सुरुवात करायची. ‘नेति नेति वचने निर्मोही (अस्पष्ट) हे नाही, हा विचार नाही, हा विचार नाही. परत हा विचार नाहीय असं म्हणत गेलं पाहिजे. ‘निः’ शब्द जो आहे तो विसर्गासहित ‘निः’ आहे त्याचा अर्थ लागतो, तर कायतरी दुसरं आहे. जो भ्रम आपल्याला दिसतो तो भ्रम नाही, तर काहीतरी त्याच्या Read More …

Public Program Akurdi (India)

1980-01-11 Program at Akurdi, Pune आता आपण परम पूज्य माताजींनी पुणे जवळी चिंचवड येथे आकुर्डी गावी केलेला उपदेश ऐका.  हा उपदेश दिनांक ११ जानेवरी १९८० रोजी केला होता. मी आता काय बोलणार आहे हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. कारण हे सारं प्रेमाचं कार्य आहे. परमेश्वराचं  मानवावर अत्यंत प्रेम आहे. इतकं कोणत्याही वस्तूवर नाही. सृष्टी सबंध निर्माण केल्यावर , सर्व सृष्टीला आपल्या शक्तीच्या जोरावर पूर्णपणे  सुसज्ज  केल्यावर त्यांनी मनुष्याची निर्मिती केली. फार मेहनत घेऊन ही निर्मिती केलेली आहे, आणि ह्या मानवाच्या हातातून , काही तरी विशेष घडणार आहे, एक लहानसा अमीबा आज मानव स्थितीला पोहचला तो कशासाठी? ह्या दिव्याची तयारी हजारो वर्षांनी परमेश्वराने केली आहे.  अनेक वेळेला अवतरणं ह्या संसारात  आली.  त्यांनी हे महान कार्य करून मानव निर्माण केला. त्या नंतर धर्माची सुद्धा स्थापना केली. मानवामध्ये धर्म स्थापन करून त्याला पूर्ण पणे स्वतंत्रता देण्यात आलेली आहे. वाटलं तर त्याने अधर्मात जावं, वाटलं तर त्याने धर्मात राहावं. माणसाला त्याची बुद्धी वापरण्याची पूर्ण मुभा आहे. हे एवढ्यासाठी, की जेव्हां त्याला परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश मिळणार त्या वेळी तो स्वतंत्र असला पाहिजे. आपल्या स्वतंत्रेत त्याने धर्म स्वीकारला पाहिजे. जबरदस्तीने नाही. धर्म हा हितकारी आहे, मंगलमय आहे हे त्याने आपल्या स्वतंत्रेत जाणलं पाहिजे. चुका होतील, उलट मार्गाला सुद्धा जातील, पण शेवटी त्यांनी स्वतःच्या धर्मात बसलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये आज हा सहज योग, महायोग्याच्या पूर्ण (अस्पष्ट) जन्माला आलेला आहे. महायोग म्हणजे, आता आम्ही मुंबईहून आलो पुण्याला. पुण्याहून, ह्यांनी सांगितलं आकुर्डीला जायचंय माताजी, तरी योग घडला नव्हता, थोडा आराम केला, अजून योग घडला नाही, माझी मुलं वाट बघत बसली आहेत, अजून आम्हाला त्यांचं दर्शन झालेलं नाही. तो पर्यंत योग Read More …

Navaratri Celebrations, Shri Kundalini, Shri Ganesha Mumbai (India)

Kundalini Ani Shri Ganesha 22nd September 1979 Date: Place Mumbai Seminar & Meeting Type आजच्या ह्या शुभ प्रसंगी अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इतका सुंदर विषय म्हणजे बरेच योगायोग जुळलेले दिसतात. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कुणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे ! विशेषत: या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातच्या या पुण्यभूमीत,  अष्टविनायकांची रचना सृष्टी देवीने केलेली आहे, तेंव्हा गणेशाचे महात्म्य काय आहे, या अष्टविनायकांचे महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीत नसतात याचे मला फार आश्चर्य वाटते. कदाचित जे सर्व काही समजत होते, ज्यांना सगळे काही माहीत होते असे जे मोठेमोठे साधुसंत ह्या आपल्या संतभूमीवर झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार. किंवा त्यांचे कोणी ऐकून घेतले नसेल, पण याबद्दल सांगावे तितके थोडे आहे आणि एकाच्या जागी सात भाषणे जरी ठेवली असली, तरीसुद्धा श्री गणेशाबद्दल बोलतांना मला ती पुरणार नाहीत.  आजचा सुमुहर्त म्हणजे घटपूजनाचा. घटस्थापना ही अनादि आहे म्हणजे ज्यावेळेला या सृष्टीची रचना झाली, अनेकदा. एकाच वेळी सृष्टीची रचना झालेली नाही तर ती अनेकदा झालेली आहे, जेंव्हा या सृष्टीची रचना  झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी लागली. घट म्हणजे काय? हे अत्यंत सूक्ष्मात समजले पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जी एक स्थिती, परमेश्वराचे वास्तव्य असते, त्याला आपण इंग्लिशमध्ये entropy म्हणू.  जेंव्हा काहीही हालचाल नसते.  त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर ‘परमेश्वराला’ येते तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा समावते.  आता काहीतरी संसारामध्ये सृजन केले पाहिजे. क्रिएट केलं पाहिजे.  त्यांना ही इच्छा का होते? ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते हे समजणे माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. अशा पुष्कळशा गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण Read More …

Parmeswarane Aplya Samrajyat Bolavale Aahe Pune (India)

परमेश्वराने आपल्या साम्राज्यात बोलवले आहे पुणे, २५/२/१९७९ पुण्यनगरीतीलपुण्यनगरीतील नागरिकांना माझे त्रिवार वंदन. आपल्यापुढे विस्तारपूर्वक सहजयोगाचे महत्त्व सांगितलेले आहे. पण आपण परमेश्वराच्या दृष्टीने जर विचार केला तर माणसापेक्षा. परमेश्वराने ही सृष्टी रचली. आपल्याला माहीतच आहे, इथे पुष्कळ विद्वान लोक आहेत, की कशी पृथ्वीची रचना ओंकारापासून झाली आणि किती त्याच्यावर परमेश्वरानी मेहनत घेतली आहे. त्यापुढे त्या पृथ्वीवर वनस्पती, त्यानंतर अनेक प्राणी निर्माण करून त्यांची हजारो वर्षे जोपासना केली. त्या जोपासनेतून हळूहळू त्यांची निवड करून त्यांना या अशा स्थितीला आणून पोहोचवलंय जिथे आपण त्या प्राण्यांना मात करून आज मानव प्राणी तयार केलेला पहातो आहोत. याचं महत्त्व परमेश्वराला जास्त आहे, १ म्हणजे हा मानव किती मेहनतीने तयार केलेला आहे. हजारो वर्षे याच्यावर मेहनत करून आणि निवडसुद्धा फारच मेहनतीने करून याला आपल्याला जो गरजेंद्र मोक्षाचा प्रसंग माहिती आहे, तिथेसुद्धा मॅमल्स सारखे जे मोठे मोठे प्राणी होते त्यातले काहीतरी वाचवलेच पाहिजेत, पैकी हत्ती हा प्राणी हे देवीचे वाहन आहे. आपल्याला माहीत आहे, ते लक्ष्मीचे वाहन आहे, तसेच गणेशाचे स्वरूपही आहे त्याच्यात. तेव्हा ते वाचवण्यासाठी त्यांनी गजेंद्रमोक्षामधे जे अवतरण घेतलं, श्री विष्णूंनी त्याचं रक्षण केलं, ते काहीच नव्हतं, जे पुढे जाऊन देवीला आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी, आपल्याला माहिती आहे त्यांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेकदा या संसारात जन्म घेतला आणि किती तरी राक्षसांचं पारिपत्य केलं, त्यांच्याशी लढाया केल्या आणि आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे. ही मेहनत हजारो वर्षे चालली. चौदा हजार वर्षांपूर्वी सुद्धा लढाया होत होत्या. त्यानंतर श्रीरामांच्या काळातसुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आठ हजार वर्षाचा काळ म्हटला पाहिजे, जेव्हा श्रीराम या संसारात पुरुषोत्तम म्हणून वावरत होते. त्यांना ते कार्य करायचं होतं, की एक आदर्श राजा कसा असला पाहिजे, त्याची Read More …

Seminar Ahmednagar (India)

कुण्डलिनी शक्ती आणि सात चक्र अहमदनगर, २३ फेब्रुवारी १९७९ अहमदनगरच्या नागरिकांनी इतक्या प्रेमाने आम्हाला आमंत्रण पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्वच आपले फार आभारी आहोत. त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काही तरी मला विशेष वाटतो. कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे. तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे. म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेली आहेत. सगळ्यात शेवटी सांगायचे म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेले आहे. ही सगळी तयारी अनादिकालापासून मानवामध्ये झालेली आहे.  मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोहोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला. तो अमिबापासून या दशेला का आला ? एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली? तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे की नाही ? ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेले आहे त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळे माहीत झालेलं आहे? परमेश्वराबद्दल जे त्याच्यामध्ये कुतूहल आहे, काहीतरी उत्कंठा आहे, जिज्ञासा आहे. परमात्मा म्हणून कोणी तरी शक्ती संसारात आहे, असं प्रत्येक मानवाला वाटत असतं. ते त्यानं कसं जाणलं, कुठून जाणलं? त्याबद्दल त्याने पुष्कळ पुस्तकं लिहिली आहेत, संतांची पूजा केलेली आहे. त्रास ही दिलेला आहे. अशा या मानवाला काहीतरी अर्थ असला पाहिजे. वायफळ कुणीतरी इतकी मेहनत केलेली नसणार. निदान परमेश्वराने तरी केलेली नसणार. जर समजा आम्ही हे एक यंत्र बनवलं. त्याचा आधी पाया घातला, त्याची सबंध व्यवस्था केली तर सहजच आपण विचाराल की ‘माताजी, कोणासाठी? काय आहे हे? काय बनवणं चालवलंय तुम्ही? याच्यातून काय होणार?’ हे सगळं Read More …

Sahaja Yoga is a big blessing (India)

Sahajayogacha Upyog Saglyani Karun Ghyava ICI 25th March 1977 Date : Place Kalwe Public Program Type Speech Language Marathi यांनी हा सुंदर योग घडवून आणलेला आहे, की मी आज आपल्याला सर्वांना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे. असे योगायोग जुने असतात. जन्मजन्मांतरातले असतात ते. आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी कशी होते ते आपल्या एवढं लक्षात येणार नाही, कारण आपल्याला आपले पूर्वजन्म माहीत नाहीत. पण हे पूर्वजन्माचेच योगायोग आहेत. आणि त्यामुळेच आज परत, या जन्मातसुद्धा आपणा सर्वांना भेटण्याचा, हा उत्तम योग आलेला आहे. इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे की तो मी खरंच शब्दांनी वर्णन करून सांगू शकत नाही. ग्रामीण विभागात, सहजयोग, फार उत्तम तऱ्हेने पोहोचला जाईल हे मला माहीत आहे. कारण शहरात राहणारे हे लोक, ही मंडळी स्वत:ला फार शहाणी समजतात. एक तर बहुतेक पढतमूर्खच असतात. पढतमूर्ख नसले तर पैशाच्या व सत्तेच्या दमावर स्वत:ला काही तरी विशेष समजतात. त्यांना असं वाटतं की सगळं जग त्यांनीच निर्माण केलेलं आहे. हे आकाशसुद्धा त्यांनीच निर्माण केलेले आहे आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत आणि परमेश्वर नावाची वस्तु काही जगात नाही. कधीही त्यांना कोणतंही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही, की आपण हे अधर्माचं कार्य करीत आहोत. अजून आपल्या देशातली ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मंडळी परमेश्वराला आठवून आहेत. आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे आणि रामाने आणि सीतेनी पायी प्रवास करून सर्व भूमीला पुनीत केलेले आहे, पवित्र केलेले आहे. ग्रामीण समाजामध्ये, जो एक साधेपणा, भोळेपणा आणि परमेश्वराची परम भक्ती आहे, त्याचा दुरुपयोगसुद्धा लोक करतात म्हणजे पुष्कळसे लोक खोट्या गोष्टी सांगून पैसे उकळतात. काही तरी भोळ्याभाबड्या लोकांना भिववून काही तरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये Read More …