Public Program Shrirampur (India)

श्रीरामपूरच्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात . ह्या सुंदर स्वागतपर गायना नंतर अगदी गहिवरून आलं . तसच वडाळ्याला इतकी मंडळी एकत्र जमली होती . आणि दोन क्षणात सगळेजण पार झाले हे बघून असं वाटत कि ह्या महाराष्ट्र भूमी मध्ये इतकी शक्ती आहे आणि त्यातून इथे लोकांमध्ये इतकी भक्ती आहे त्याच सार्थक झालं पाहिजे . आणि ते सहजच होत . आजकालच्या काळात देवाचं नाव सुद्धा लोकांना ऐकावंस वाटत नाही . पुष्कळांच असं म्हणणं आहे कि देव नाहीच आहे . पण हि काही शास्त्रीय प्रवृत्ती झाली नाही . जे सायन्टिफिक  लोक आहेत त्यांनी जर असं आपलं ठाम मत करून ठेवलं कि हि गोष्ट नाहीच आहे म्हणजे ते सायन्टिफिक नाही . कारण त्यांचं डोकं उघड असलं पाहिजे . मुभा असली पाहिजे . विचारांना मुभा असली पाहिजे . कोणाचाही विचार बांधून आणि त्यावर विश्वास ठेऊन काम करण  हे आंधळे पणाचे लक्षण आहे . म्हणूनच संतसाधुनी ह्या महाराष्ट्रात आपलं रक्त ओतलं आहे . काहीतरी विशेष ह्या भूमीत असलं पाहिजे . आणि वारंवार त्यांनी सांगितलं आहे कि परमेश्वर हा आहे फक्त तुमच्यातला परमेश्वर जागृत झाला पाहिजे . ते काही आजकालचे भ्रामक भामटे लोक नव्हते . त्यांनी जे सांगितलं ते सत्य सांगितलं तंतोतंत ते खर आहे . हे सिद्ध करण आज शक्य आहे त्यावेळी शक्य नव्हतं . म्हणून लोकांनी त्यांना छळलं त्यांचं ऐकलं नाही . पण आज ते शक्य आहे .  ह्या धकाधकीच्या काळामध्ये चारीकडे माणसाला जेव्हा वणवा पेटल्या सारखा वाटतो आणि कुठे जाऊ आणि काय करू अशी त्याची स्तिती झालेली आहे . अशा ह्या भ्रमित स्तिती मध्ये तो विचार करू लागतो कि परमेश्वर आहे तर तो आहे तरी कुठे ?. आणि मग तो माझी का मदत करत नाही . पुष्कळशे Read More …

Shri Nirmala Devi Puja, The Duties of a Guru Ganapatipule (India)

Talk to yogis, Ganapatipule (India), 3 January 1987. [English Transcript] Today is the third day of the Moon. Third day of the Moon is Tritiya, is the special day for the virgins. Kundalini is the virgin desire. It is virgin because it has not yet manifested itself. And also, on the third center of Nabhi, the virgins appear as shaktis of Guru. As we have got ten Gurus which we regard as the main Gurus they all had either their sister or daughter as their shakti. In the Bible it is said that, in the Old Testament, that the one who will be coming will be born of a virgin. And then the Jews would not accept Christ so they said that “It’s not written as virgin, it’s written ‘the girl’.” Now in Sanskrit Language ‘girl’ and ‘the virgin’ are one word. We did not have 80-year-old girls as we have nowadays. So the virginity of a woman meant that she was a girl who was not married as yet or who has not met her husband so far. That is the essence of purity, which was the power of the Guru Principle. So, for a Guru who is in charge of leading others into enlightenment, has to know that his power is to be used as a virgin power of pure power. A Guru cannot use this power in a way an ordinary person can use. So his relationship with his disciples whether they are boys or girls has to be Read More …

Evening Program, Beauty must have auspiciousness Ganapatipule (India)

Evening Program, Beauty Must Have Auspiciousness [English Transcript] God almighty created this universe, in a very beautiful manner. I have told you many a time the story of creation, and how the evolution took place. The mirror, is made to see your face, and God almighty could not see himself. His qualities, His greatness, His generosity, His magnanimity. Like the sun cannot see itself. Moon cannot see itself. Like the gold cannot see itself. A pearl, how can it go inside itself and see itself? So, this creation was made like a mirror, for God to see His reflection. Ultimately He created the most beautiful mirror that is human beings. At this point it would have been alright, if, Adam and Eve had not used their freedom wrongly. There would have been not such a long time and, had to go through evolutionary process with all the [UNCLEAR incarnations] coming in, guiding people. And today, at this time, to get to your spirit, to express God in your mirror fully. This has taken a long long process. But if you see it’s so beautifully done. I think, that’s the play of Mahamaya. That, first of all, beautiful worlds were created, beautiful starts were created, you see them around. Then beautiful mountains and rivers. Then beautiful plant kingdom came in, and the beautiful variety of trees. So much of Varieties. Varieties bring forth the beauty of God’s own imagination. A leaf of any tree cannot match, with any other leaf, and Read More …

Innocence and Ganesha Ganapatipule (India)

Talk about Innocence, Ganapatipule (India), 2 January 1987. [English Transcript] Today, in this blessed place of Mahaganesha, we have all assembled to go deep into our own beings, to enjoy our own glory. One has to remember that the very first thing God created on this earth was Shri Ganesha because He could emit holiness. He exists as chaitanya and this chaitanya exists in the atom and molecules as you know very well, as vibrations – symmetric and isometric. These vibrations later on start expressing themselves in the plant kingdom as life force and you see how they are kept under a bondage. A tree that is a mango tree will go up to a certain point. A coconut tree will grow up to a certain point. It’s all under control, and then it is expressed in the animals, where it binds them. That’s why they are called as pashus, means under bondage. But in the human being it is expressed as auspiciousness and ultimately as the epitome, as holiness. Holiness is to be understood in its essence as well as in its contents.Holiness is an innate quality of a personality, where a person rejects all that is unholy, all that is inauspicious. The ego doesn’t play any part. Up to the animal stage, ego doesn’t exist. But in the human stage, you are given freedom to choose whether you want holiness or not. But in the ego of man, he might say, “What’s wrong?” and he may defy all Read More …

Shri Mahalakshmi Puja Sangli (India)

Shri Mahalakshmi Puja Date 31st December 1986: Place Sangli Puja Type सांगली जिल्ह्यामध्ये सहजयोग हळूहळू पसरत आहे. पण जी गोष्ट हळूहळू पसरते, ती जम चांगला धरते. आणि कोणतीही जिवंत क्रिया हळूहळू होत असते. तेव्हा एकदमच ती मोठ्या प्रमाणात होईल अशी आपण आशा ठेऊ नये. प्लॅस्टिकची जर आपल्याला फुलं काढायची असली तर त्यासाठी एक मशिन घातलं की झालं. पण जिवंत फुलं काढण्यासाठी वेळ लागतो. मशागत करावी लागते. मेहनत करावी लागते. सहजयोगाबद्दल अजून पुष्कळशा लोकांना काहीही कल्पना नाही आणि ज्यांना आहे ती भ्रामक कल्पना आहे. पैकी आपल्याकडे पुष्कळसे असे पंथ आहेत, संप्रदाय आहेत, जे आधीपासूनच कार्यान्वित आहेत. पण हे पंथ आणि संप्रदाय ह्यांचा आपल्याला काही फायदा झालेला नाही.       ‘इतके दिवस आम्ही पंढरीला गेलो, इतके दिवस आम्ही तुळजापूरच्या भवानीची सेवा केली, इतके दिवस आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जात होतो, सगळं काही केलं आम्ही. व्रत- वैकल्य केली. सगळं करून माताजी, आम्हाला काही मिळालं नाही.’ त्यातून तुमची मुलं उद्या मोठी होतील आणि ती तुम्हाला म्हणतील ‘इतका तुम्ही वेळ घालवला, पैसे घालवले, मेहनत केली आणि शेवटी तुमच्या हाती काही आलेलं नाही. म्हणजे परमेश्वरच नाहीये.’ जर तुम्हाला सांगलीला यायचं आहे, तर  सांगलीच्या रस्त्यावर यायला पाहिजे. जर तुम्ही उलट मार्गाने गेलात तर तुम्ही सांगलीला पोहोचणार नाही. तेव्हा इतक्या वर्षानंतरही तुम्हाला सांगली मिळाली नाही,  याचा अर्थ असा आहे, की कोणत्यातरी चुकीच्या रस्त्यावर आपण चाललो होतो.  त्याच रस्त्यावर आपण भटकत आहोत.  त्यातून अजून आपल्याला मार्ग मिळालेला नाही. हा सुज्ञपणाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण आपल्याला अजून काही मार्ग मिळालेला नाही. काही साध्य झालेलं नाही. तेव्हा काहीतरी चुकलेलं आहे, असा एक  वेळ तरी  विचार करून सहजयोग काय आहे ते समजून लोकांना सांगितलं Read More …

Public Program Sangli (India)

पब्लिक प्रोग्राम, सांगली, डिसेंबर 30, 1986, मराठी Shri Mataji addressing the seekers and their questions. Below are the conversations. Seeker’s talk/ questions are in brackets.  या इकडे या म्हणजे मी ऐकते.  (श्री माताजींना प्रश्न विचारला ” श्री माताजी माझी जागृती झालेली आहे, पण मला व्हायब्रेशन फक्त हृदया चक्रापर्यंत जाणवतात, त्याच्यावरती जाणवत नाही. कृपा करून आपण मला मार्गदर्शन द्याल का?)अर्थातच अगदी अगदी बसा आपण, मी सांगते आता. हे म्हणाले की कुंडलिनी त्यांच्या हृदयापर्यंत येऊन त्यांना जाणीव होते, आणि वर येत नाही म्हणजे विशुद्धी चक्रावरती दोष आहे. तर आता विशुद्धी चक्रावर काय दोष आहेत हे पाहिले पाहिजे. विशुद्धी चक्र कशाने खराब होऊ शकतं, जर तुम्ही खूप बोलत असाल, भाषण देत असाल तर घसा खराब होतो किंवा सिगरेट पीत असाल तंबाखू खाल्ले तर त्यांनी घसा खराब होतो किंवा सर्दी ने होऊ शकतो. कोणत्याही कारणाने जर घसा खराब झाला, विशुद्धी चक्र खराब झालं तर ही कुंडलिनी वर चढत नाही. पण ते आम्ही बघून टाकू, कुंडलिनी आम्ही चढवून टाकू, त्याची काळजी करू नका. त्याचा काही प्रॉब्लेम नाही.  हा पुढे काय? आणखीन कोण? काय प्रश्न असतील तर विचारा  Shri Mataji waiting  काय आहेत का प्रश्न? काय म्हणता? इकडे या इकडे……  (आपले कुठे आश्रम आहेत का?) आश्रम? आमचे अजून कुठेच आश्रम नाहीत. अहो सांगलीमध्ये सुद्धा नाहीत. सांगलीमध्ये आपले तावडे साहेब आहेत ना, त्यांच्या घरी सध्या प्रोग्राम आणि सेंटर होतात. सध्या आमचे कुठेच आश्रम बसवलेले नाहीत. कारण तुम्हाला माहित आहे, आपल्या देशाची काय स्थिती आहे. नंबर एक भ्रष्टाचार, त्यामुळे कुठेही जमीन घ्यायची म्हटली, की ते म्हणतात तुम्ही किती ब्लॅकचे पैसे द्याल? तर मी म्हटलं आमच्याकडे ब्लॅक बिग चे Read More …

Public Program Satara (India)

Public Program Until the Time 11.50 mins – Flowers offering at the Lotus Feet of Shri Mataji by various local centre representatives from Satara district of Maharashtra  15.30 mins – Shri Mataji’s speech starts  सातारा जिल्ह्यातील सहजयोगींचे कार्य बघून आत्य आनंद होतोय. तुम्ही गुलाल उडवत मिरवणूकित आपला आनंद प्रदर्शित केला, हा आनंद सातारा जिल्ह्यात पसरून 15 सेंटर उभी केली गेली हे फार मोठं काम आहे. श्री रामदासांची भूमी ही, स्वतः ते हनुमानांचे अवतरण होते. त्यांच्या कार्याची सुरुवात कधीच झाली होती, पण त्याची फल स्तुती मात्र आज दिसते की सातारा जिल्ह्यामध्ये 15 केंद्र उघडण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत साधू होऊन गेले आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या सर्व आपण सहज योगात बघू शकतो. सर्वप्रथम त्यांनी असं सांगितलं, की सद्गुरु तो जो तुम्हाला परमेश्वराशी ओळख करून देतो, ब्रह्मनिष्ठ बनवतो. जो तुमच्याकडून पैसे घेतो तुमची दिशाभूल करतो, तुम्हाला चूक मार्गात घालतो तो गुरु नव्हे. एकच लक्ष मानवाकडे असलं पाहिजे आणि ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय, आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, त्यापेक्षा मुकच राहिलेलं बरं.असं सुद्धा ज्ञानेश्वरांनी शेवटी म्हटलं. कारण आत्मसाक्षात्कार झाला नाही डोळे बंद आहेत आणि डोळे बंद असताना जी तुमची श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेला काही अर्थ नाही. आज  मी असं ऐकलं आहे की इथे एक अंधश्रद्धा निर्मूलन संस्था काढली आहे, हे बरं झालं म्हणा, हे आम्ही बरेच वर्षापासून म्हणत होतो. पण जे लोक अंधश्रद्धा काढतात त्यांची अंधता गेली आहे का नाही हे आधी बघायला पाहिजे. अंधश्रद्धा कोणात आहे आणि कुणात नाही हे जाणण्यासाठी डोळस व्हायला पाहिजे. जी मंडळी डोळस झालेली नाही, ती दुसऱ्यांना आंधळे झाले आहात हे Read More …

Public Program Satara (India)

Shri Mataji arrives and is welcomed by the local sahajis. A Bhajan is sung. Then on a foreign sahaji gives a brief introduction about sahaja yoga.  Shri Mataji’s speech starts at time 22.06 आपलीच महती आपण जाणत नाही ही गोष्ट खरी आहे. जसं सूर्याला कळत नाही की तो प्रकाशमय आहे, तसंच महाराष्ट्राच्या लोकांना कळत नाही की त्यांच्यामध्ये परमेश्वराने किती आशीर्वाद दिले आहेत. म्हणून तो भ्रमिषष्ठासारखा इकडे तिकडे भटकत आहे. सारा समाज आज पश्चिम संस्कृतीने भारावून गेला आहे. आणि पश्चिमेचे लोक आता थकून भारताकडे बघत आहेत. आणि त्यांची दृष्टी लागली आहे की आम्हाला त्यांच्यापासून काय शिकायचा आहे? आपण स्वतःला फार पश्चिम मार्क  समजून खूप शिष्टासारखं वागतोय आणि त्यापासून आपल्याला काय लाभ होणार आहे किंवा नाही त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. साहेबांची बदली लंडनला झाली म्हणून आम्ही इंग्लंडला गेलो, आणि तिथे आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केली. त्यावेळी असं लक्षात आलं की पश्चिम देशांमध्ये  जी काही प्रगती झाली आहे ती एखाद्या झाडाची प्रगती व्हावी अशी झाली आहे. पण त्याची मूळ या भारतात आहेत. आणि जोपर्यंत ही मूळ जोपासली जाणार नाहीत तोपर्यंत  ते झाड उलथून पडणार आणि त्या स्थितीला आल आहे ते. पण आपण जे या मुळात बसलेला आहोत, ते मात्र पूर्णपणे आधीभिज्ञ आहोत. आपलं काय कर्तव्य आहे आणि आपली  काय जबाबदारी आहे. कोणतीही गोष्ट त्या लोकांपासून आली ती विशेष असं समजून आपण अंधानुकरण चालवलं आहे. त्यातल्या त्यात आपल्याकडे दिशाभूल करणारे धर्मगुरू, मंदिरात बसलेले भटची बुआ. अशे  अनेक प्रकार असल्या मुळे पुष्कळ लोकांची अशी धारणा झाली आहे की परमेश्वरी ही गोष्ट अशी नाहीच. परमेश्वर आहे किंवा नाही हे आम्ही सिद्ध करू शकतो. पण तुम्ही कशावरून सिद्ध Read More …

Puja by the Krishna’s river Brahmapuri (India)

Devi Puja Date 27th December 1986: Place Brahmapuri Type Puja आता ही पाहणी मंडळी आपल्याकडे आलेली आहेत. त्यांनी मला सांगितलं आहे की, ‘कृपा करून ह्या सगळ्यांना आमच्यातर्फे हार्दिक धन्यवाद द्या. आणि त्यांचे आम्ही फार अनुग्रहित आहोत आणि आभारी आहोत.’ त्याबद्दल मी अनेकदा त्यांना सांगितलं की, मी मराठीत त्यांना सांगतच असते, पण तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना सांगा. म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांची ओळख करून घ्या. त्यांची मैत्री साधून घ्या. त्यांची नावं जाणून घ्या. म्हणजे त्यांनाही बरं वाटेल, की खेडोपाडी आमचे बांधव आहेत. आपण सगळे एका सूत्राने बांधले गेले आहोत. तुम्ही कोणत्याही देशातले असलात, कुठलेही असलात, तरी सगळी माझीच मुलं आहात. तेव्हा त्यात काहीही भेदभाव न पाळता सगळ्यांनी आपापसात मित्रता साधली पाहिजे. आणखीन सगळ्यांनी एकमेकांना ओळखून घेतलं पाहिजे. म्हणजे कोण कसं आहे, काय आहे. आता सांगायचं म्हणजे आजचा दिवस विशेष आहे. शनिवारचा दिवस, कृष्णा नदीच्या काठी. म्हणजे कृष्णाचं सगळें सुरू झालेलं दिसतंय साम्राज्य इकडे. आणि ह्या सगळ्या त्याच्या साम्राज्यात आजची तुम्ही पूजा मांडलेली आहे. पूजेत सांगायचं काहीच नसतं खरं म्हणजे. कारण स्वत:च चैतन्य वाहून तुम्हाला भरपूर करून टाकत असतं. तेव्हा तेच फक्त तुम्ही आपल्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे. सहजयोगाची विशेषता ही आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्यान-धारणा करावी लागते. जर तुम्ही ध्यान- धारणा केली नाही, तर मात्र सहजयोग जमत नाही. म्हणून थोडा तरी वेळ ध्यान- धारणेस दिला पाहिजे. आणि आपल्यामध्ये कुठे चुकतं ते तुम्हाला ध्यानातच कळू शकेल. ते तसेच पाळत ठेवायचं नाही. ते काढून टाकलं पाहिजे. ते काढून टाकल्याबरोबर त्याचे जे काही आपल्याला लाभ होतील, त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, की किती त-्हेचे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडून येतील. आणि तुम्ही ते इतरांनासुद्धा सांगू शकाल. Read More …

Public Program Angapur (India)

Shri Mataji is welcomed by the sahajis at the public program. Bhajans are sung. Shri Mataji’s speech starts at time 21.45आपणा सर्वांचा उत्साह आणि प्रेम बघून, एका आईचं हृदय किती गहिवरू शकतात हे समजण्याची क्षमता तुम्हा आयांना असू शकते मुलांना असू शकते. कारण हा देश आईंचा देश आहे. आईची थोरवी इथे  माणलेली  आहे आणि महाराष्ट्राची आई बहुतेक सुज्ञ बाई असते. आपल्या अंगापूरच्या योगभुमीत, आधी रामदास स्वामींनीच तपश्चर्येने पुष्कळ कार्य करून ठेवलेलं आहे. परवा तुकारामांच्या भजनात एक अभंग म्हणून दाखवला, तेव्हा ते म्हणाले मी तुम्हाला निरोप द्यायला आलोय. एक महत्त्वाचा निरोप – हा मार्ग, परमेश्वराचा मार्ग फार सहज सरळ आणि सुलभ होणार आहे. या सर्व साधू संतांनी आमच्यावर फार मेहरबानी केली, त्यामुळे लोकांना आज महाराष्ट्रात आज जाणीव आहे, की  आत्मसाक्षात्कार शिवाय जगात काहीही दुसरं मौल्यवान नाही.  पण ही जाणीव इथे दिसत नाही की, किंवा आपण असं म्हणूया, हिंदुस्थानात ही जाणीव कमी आहे. ही आपल्या महाराष्ट्रात संतांची फार मोठी देणगी आहे. आणी तो वारसा त्यांनी गीतेतुन, ज्ञानेश्वरी सारखी सुंदर कविता रचून,  अनेक ग्रंथ लिहून, लोकांना जाणीव दिली की आत्मसाक्षात्कार म्हणजेच परमेश्वराला मिळवणं आहे आणि त्यातच सगळं काही आहे. पण त्या संतांच्या सांगण्यावरून, आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, या दिवसाची वाट पाहणे, हे सुद्धा काहीतरी  विशेष पूर्वसर्वतामुळे  घडतं. म्हणून असं म्हटलं पाहिजे की अंगापूर आणि सातारा जिल्ह्यातले जी  लोक इथे आलेली आहेत, त्यांची काहीतरी पूर्व पुण्याई ही फार असली पाहिजे,  पूर्व सुखरूप काहीतरी असलं पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी इतके लोक मला सहज योगी दिसत आहेत. सहज योगाचे लाभ किती आहेत हे तुम्हाला माहित आहे. ते तुम्हाला परत परत काय सांगावे. पण एक गोष्ट Read More …

Christmas Puja Pune (India)

Christmas Puja – Stn Pavan Dam 25th December 1986 Date: Place Pune Type Puja आज मी मुद्दामून इंग्लिशमध्ये बोलले, पण तुम्हा सगळ्या पुणेकरांना इंग्लिश येतंय. तेव्हा जास्त काही त्याचा खुलासा करून सांगायला नको. पण ह्या लोकांना आज, ख्िसमसच्या दिवशी काहीतरी ख्रिस्ताबद्दल सांगावं म्हणून मी सांगितलेले आहे. आता आपल्या संस्कारांमुळे ख्रिस्तांची आपल्याला फारशी माहिती नाहीये. पण ते बरोबर नाही. आपण त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ती माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण तो आज्ञा चक्रावर बसलेला आहे. आज्ञा चक्रावर बसलेल्या ख्रिस्ताला जर आपण जाणलं नाही, तर आपण गणेशाला जाणलं नाही. कारण गणेश हाच ख्रिस्त आहे. तेव्हा गणेशाने जगामध्ये येऊन काय कार्य केलं? त्याने अवतरण घेऊन काय काय कमाल केली? त्याने काय आपल्यासाठी केलंय? त्याचं जे काही कार्य आहे आणि त्याचा जो काही प्रादर्भाव आहे, तो आपल्याला ख्रिस्ताच्या जीवनात मिळतो. नुसत गणपती, गणपती करून बसतो. गणपती बसला, गणपती हे, ते, पण गणपती म्हणजे काय, करतो तरी काय आपल्यामध्ये? त्याचे काय गुण शुभकारी आहे, अमूक आहे, तमूक आहे. त्याने कसं शुभ केलं! त्याचं जे काही कार्य होतं ते ख्रिस्ताच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून सर्व लोकांनी ख्रिस्ताचं चरित्र वाचून काढलं पाहिजे आणि आहेत ? तो विचारणा केली पाहिजे. आता हे जे काही मागचे संस्कार आहेत त्याप्रमाणे वागून चालत नाही. जसे इकडे हे लोक ख्रिस्ती धर्मातून आलेले आहेत. त्यांनी आपल्याकडचे सर्व अवतार कोणते होते? त्यांनी काय काय कार्य केलं? ह्याबद्दल माहिती करून घेतली. आणि कधीतरी तर ते आपल्यापेक्षाही जास्त आहेत. तेव्हा आपणही खरिस्तांबद्दल, मोहम्मदांबद्दल, इतरही जे मोठमोठाले सद्गुरु झाले त्यांच्याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. ह्याला कारण असं आहे, की उद्या तुम्हाला गुरुपद मिळालं, तुम्ही ब्रह्मनिष्ठ असलात, Read More …

Welcome Puja at Chalmala Chalmala, Alibag (India)

Shri Mahadevi Puja – Chalmala 21st December 1986 Date: Alibag Place Type Puja सर्व सहजयोगी मंडळींना आमचा प्रणिपात असो! सुरुवातीला मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, नंतर मराठीत बोलेन. आता ह्यांना मी असं सांगत होते, की पुष्कळ लोक असं विचारतात की देवाने हे जग कशाला निर्माण केलं? या जगाची काय गरज होती ? तर त्याचं कारण असं आहे, की देव हा सौंदर्याचा, आनंदाचा, प्रेमाचा स्रोत आहे आणि तो स्वत:ला बघू शकत नाही. त्याला हे कळत नाही, की केवढा मोठा स्रोत तो आहे. तसेच तुम्ही सहजयोगीसुद्धा त्याचा स्रोत आहात. म्हणून देवाने हा सबंध आरसा त्याच्यासाठी तयार केला. हा आरसा बघण्यासाठी, की त्याच्यातलं सौंदर्य काय आहे ते बघण्यासाठी म्हणून हा आरसा तयार केला. आणि ह्या की आरशात बघून देव संतुष्ट होतो. पण ह्या आरशात आणखीन एक त्याला बघायचं आहे, ते म्हणजे असं, मानवामध्ये हा आरसा जागृत झाला की नाही. जो मी मानव तयार केलेला आहे, जो मी मनुष्य तयार केलेला आहे, त्या मनुष्यामध्ये हे सौंदर्य आलं की नाही? त्याला ह्याची जाणीव झाली की नाही, की तो किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये किती गुण आहेत, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती मोठा आहे. हे सगळं जाणण्याची त्याच्यामध्ये पात्रता आली की नाही? तुकारामांनी म्हटलेले आहे की, ‘अणू-रेणूहनही थोडका , तुका आकाशाएवढा.’ मी ह्या अणूरेणूपेक्षा जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा मोठा आहे. ज्याने हे एकदा बघितलं स्वत:बद्दल, मग तो क्षुल्लक गोष्टींसाठी, भलत्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य घालविणार नाही. व्यर्थ गमवणार नाही आपलं आयुष्य ह्या क्षुल्लक गोष्टीकरता गमावणं फार मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये आता अनेक घाणेरड्या गोष्टी आलेल्या आहेत. ते आपल्याला माहिती आहेत. आता दारू पिणे. कोणी म्हटलं, Read More …

Diwali Puja Pune (India)

Diwali Puja (Hindi/Marathi). Pune (India), 1 November 1986. मराठीत म्हणतात, ‘त्याला पाहिजे जातीचे,’ आणि जात कोणती, तर सहजयोगाची. आपली एकच जात आहे. आपली जात एक आहे. असे म्हणतात, ‘या देवी सर्वभूतेषु, जातिरूपेण संस्थिता।’ सगळ्यांच्यामध्ये आहेत जाती. अनेक जाती आहेत. देवीने अनेक जाती केल्या. एक अशी जात आहे, की जे लोक परमेश्वराला विचारतसुद्धा नाही. ती एक जात आहे, जाऊ देत. दुसरी एक जात आहे, जे नेहमी परमेश्वराच्या विरोधात असतात. ती एक जात आहे, जाऊ देत. तिसरी एक जात आहे, ज्यांना भलते धंदे जास्त आहेत आणि परमेश्वर नको. ते ही आहेत, जाऊ देत. असेही लोक आहेत जे परमेश्वराच्या नावावर नुसते कर्मकांड करत बसले आहेत. अनेक जन्म केले आणि अजूनही करतच आहेत. त्यांचं ते ही सुटत नाही. कितीही सांगितलं तरी सुटत नाही. जाऊ देत. ते ही आहेत. त्याहन असे ही लोक आहेत की जे खरोखर परमेश्वराला शोधत आहेत. त्यांची बुद्धी त्याबाबतीत अगदी शुद्ध आहे आणि स्पष्ट रूपाने त्यांना दिसतय की परमेश्वर मिळवणं म्हणजे काय! हे लोक आपल्या जातीतले आहेत. आपल्या जातीत येऊ शकतात. प्रत्येक माणसाशी सहजयोग वर्णिता येत नाही. सहजयोगाला समजण्यासाठीसुद्धा एक विशेष पद्धतीचे लोक पाहिजेत. सहजयोगी सहजयोग मिळाल्यानंतर सर्व तऱ्हेच्या लोकांना जाऊन भिडतात. काही श्रीमंत माणसं असतात. ‘माताजी, ते फार श्रीमंत लोक आहेत. तुम्हाला भेटायची इच्छा आहे.’ ‘बरं मग पुढे काय!’ ‘ते म्हणतात आम्हाला एकदा माताजींना भेट्ू द्या.’ ‘मग त्यांना काय पाहिजे?’ ‘काही नाही, ते भेटायचं म्हणतात.’ मी म्हणते, ‘अहो, राहू देत, त्यांना अजून थोडसं बघू द्या.’ लोकांना समजत नाही, असं कसं माताजी म्हणाल्या? एवढे श्रीमंत आहेत. कारण त्या लायकीचे नाहीत ते. पैसे आले म्हणून पॉलिटिशियन आहेत. तुम्ही भेटा. म्हटलं, दरून नमस्कार! Read More …

Navaratri, Shri Gauri Puja Pune (India)

1986-10-05 Navaratri, Shri Gauri Puja (Hindi/Marathi) मराठी भाषा फार चांगली आहे कारण तिला तोड नाही. विशेषकरून सहजयोग हा मराठी भाषेतच समजवता येतो. आणि या ज्या गोष्टी मी हिंदी सांगितल्या त्याला कारण असे आहे की हिंदी लोकांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. त्यांच्या भाषेतच नाही. त्यांना काही माहीतच नाही. पुण्य म्हणजे काय ते माहीत नाही. तेव्हा थोडेसे हिंदीत बोललेले बरे कारण तुम्हाला सगळे आधीच पाठ आहे, सगळं माहिती आहे. सगळे पाठ आणि नंतर सपाट तसाही प्रकार आहे म्हणा. पण तरीसुद्धा असे म्हटले पाहिजे की आपल्याला फार मोठी संतांची इथे शिकवण जी मिळालेली आहे हा एक इतका मोठा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाने संस्कृती म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. पुण्य म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. हे चांगले-वाईट काय ते आपल्याला माहिती आहे. कळतं पण वळत नाही. कळतं सगळं की हे सांगितलेले आहे, वाईट आहे. असा पुण्यसंचय आपण पुष्कळ केलेला आहे. म्हणूनच या पुण्यामध्ये, या पुण्यनगरीमध्ये आपला जन्म झाला हे कबूल, पण तरीसुद्धा इतर लोकांना बघून आपल्याला असं वाटतं की आम्ही पुणेकर म्हणजे काही जास्त श्रीमंत नाही, मुंबईकर जास्त श्रीमंत आहेत. त्याच्याहून असं वाटतं की मुंबईपेक्षा दिल्लीचे लोक अधिक श्रीमंत. त्यांच्याजवळ पैसे जास्त असतात. तिथे दिल्लीला तख्तच असल्यामुळे तिथे त्यांच्याजवळ मान, बुवा पान, आदर हे सगळे काही बाह्यत: पुष्कळ दिसतं. तेव्हा असं वाटतं केवढे मोठे लोक आहेत हे. ह्यांचे केवढे मोठे पण आमचं काय, आम्ही गरीब अजून. पण तुम्ही पुण्यवान आहात. पण ह्या पुण्यातच असे लोक आहेत देवालाच मानत नाहीत. मोठे मोठे धुरंधर मी पाहिले. मोठे, मोठे विद्वान लोक मी पाहिले ते देवालाच मानत नाही म्हणजे इतके शिष्ट Read More …

Birthday Puja Mumbai (India)

Birthday Puja 21st March 1986 Date: Place Mumbai Type Puja आज आपण सर्वांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. त्या बद्ल मी आपली आभारी आहे. वाढदिवस एकी कडनं वाढतो आणि एकी कडनं आयुष्य कमी होतं. पण सहज योग्यचं उलट आहे. वाढदिवस आला तर असं समजायचं कि आपल्या आत्मिक वृक्षाला एक आणखीन वाढ झालेली आहे. आपलं आत्मिक वृक्ष वाढत चाल्लय. जरी आयुष्य कमी होतं चाललं तरी सुद्धा आत्मयचा प्रकाश प्रत्येक क्षणी वाढतो आणी प्रत्येक प्रकाशाची किरणं आपल्या सर्व दालनात शिरून आपलं सर्व प्रांगण आलौकीत करून टाकतं. तेव्हा जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत हा आत्मा अधिक आणि अधिक आपल्या चित्ता मध्य प्रकाश ओढवतो. आयुष्याचा विचार मनुष्याने केला नाही पाहिजे. योग मिळाल्यावर जे आता आम्हाला आयुष्य मिळालेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा एक एक क्षण महत्वाचं आहे प्रत्यक क्षणी आम्ही आपली वाढ करून देऊ शकतो. असं समजलं पाहिजे कि जसे बी ला अंकुर फुटतं आणि अंकुर फुटताना बी ला असं वाटतं कि आपलं आयुष्यं संपून गेलंय पण खरोखर त्याचं रूपांतर आता मुळांन मध्ये झालेलं आहे. योग्यांच्या आयुष्याचं महत्व हे आहे कि जेव्हा योग्यांना मरणं येतं तेव्हा त्यांचे अंकुर गौरवांचे अंकुर पृथिवीच्या बाहेर निघतात आणि झाडं कीर्ती रूपानं झळकू लागतं. म्हणजे देह त्याग झाल्या नंतर मनुष्य कीर्ती रूप उरतो तेव्हा योगानंतर जे आयुष्यं आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपण आता संतांची किती लक्षणं सांगावी. ज्ञानेश्वरांना आपल्या हयातीत लोकांनी किती त्रास दिला, हा काय तरीच इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतो असं सुद्धा लोकं त्यांना  म्हणाले. कबीरांना किती लोकांनी त्रास दिला. नानकांना किती त्रास झाला. तुकारामांना लोकांनी कधींच मान्य केलं नाही, नामदेवांना सुद्धा लोकांनी Read More …

Mahashivaratri Puja Pune (India)

Mahashivaratri Puja 8th March 1986 Date : Place Pune : Type Puja या पुण्यनगरीला पुणे असे म्हणतात. पण आपल्या शास्त्रात याला पुण्यपट्टणम असे म्हटलेले आहे. साऱ्या विश्वातलं पुण्य या पुणे नगरातून वहात आहे आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात. आज हा केवढा योग आहे, की जे पुण्याचे स्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे. जोपर्यंत शिव स्थितीला उतरत नाही, जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत तो मनुष्य आंधळ्यासारखा वावरत असतो. कोणतीही मानवी धारणा ही एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बघून, त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठीत असतो. आत्मतत्त्व जाणल्याशिवाय साऱ्या विश्वातलं जे मर्म आहे ते मनुष्य जाणू शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्या रोजच्या व्यवहारातलं सुद्धा, रोजच्या मानवाच्या जीवनातलं तत्त्व, मर्म मनुष्य जाणू शकत नाही. प्रत्येक मानवामध्ये हे शिवतत्त्व हृदयामध्ये प्रतिबिंबित आहे, आत्मास्वरूप आणि हे सर्व विश्वाच्या आत्म्याचे प्रतिबिंब जे हृदयात आहे, ते जाणल्याशिवाय ह्या सृष्टीचं सूत्रसुद्धा कळू शकत नाही. अंधारात आपण चाचपडत असतो. एकमेकांना ओळखत नाही, एकमेव एकमेकांना जाणत नाही, कसलीच आपल्याला जाणीव एकमेव नसते. त्याबद्दल भ्रामकता असते. जाणिवेसाठी ज्याला अॅबसल्यूट म्हणतात, तो आत्माच मिळविला पाहिजे. कारण तोच आपल्या सर्व नसानसांमध्ये एकमेव जाणीव देऊ शकतो. ज्याला वेदांनी विद् म्हटलेले आहे, की विद् झाले पाहिजे. ते आत्म्याच्या शक्तीशिवाय आपल्या नसानसांमध्ये येणार नाही. आज जरी आम्ही कितीही म्हटलं की आम्ही जातियता सोडून टाकू, जातीवाद सोडून टाकू, गरीब-श्रीमंत मिटवून टाकू. म्हणजे असे कोणतेही प्रश्न ज्याला इश्यूज म्हणता येतील, जागतिक प्रश्न घ्या, की आम्ही विस्फोटक जेवढे बॉम्ब आहेत त्यांना बंद करून टाकू किंवा सर्व जगात एकच साम्राज्य आलं पाहिजे अशा मोठ्या मोठ्या कितीही कल्पना केल्या आणि ते Read More …

Makar Sankranti Puja Rahuri (India)

Sankranti Puja (English/Marathi). Rahuri, Maharashtra (India), 14 January 1986. English Part: Today is a sad day for Me because we’ll be now parting. I may not be able to meet you in Bombay. Maybe for a year this may not happen for some of you, and I would like to give you a little advice about the growth within yourself. It is believed by people that God is helping us and we are in His kingdom. So whatever happens He looks after us. It is true but as you are the instrument of the God you have to also look after yourself. For today’s delay I would like to apologize but the delay comes because from Poona Mr. Kulkarni was to come and see us do this puja. Now I told him that his wife is a negative lady, and he doesn’t understand his own importance, I would say. As a leader you must understand your importance. And another person who came, he asked, “Why don’t you come with me?” He said, “I have to come with my wife.” And that’s how this delay has taken place because he’s not here. He said he’ll come for puja so the main thing was first to arrive here in time without a negative force pulling him. So we conclude that it is important that first of all we should know that in any way we should not try to have any negative forces attacking us or involving us or attaching to us. Read More …

Public Program (India)

Sarvajanik Karyakram 11th January 1986 Date: Place Shrirampur Public Program Type श्रीरामपूरच्या सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या साधकांना आमचा प्रणिपात असो. आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने आम्हाला इथे बोलवलं आणि परमेश्वर प्राप्तीची उत्कंठा दर्शवली त्यातच आम्ही कृतार्थ झालो. तसंही जीवन आहे. आपण जे काही शिकत असतो, त्यामध्ये आपण आनंद शोधत असतो. काहीही आपण करतो ते आनंदासाठी करतो. कोणीही दु:खासाठी शोध करत नाही. दु:ख कुठे म्हणून शोधायला जात नाही. पण जिकडे आनंद आहे. तिकडे माणसाचं लक्ष वेधलेलं असतं. जीवनामध्ये आनंद काय आपल्याला समजत नाही. सुख आणि दुःख ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो सुखाकडे म्हणून धावतो त्याला शेवटी दुःख होतं. ह्याला काय कारण असलं पाहिजे? जो निव्वळ आनंद, ज्याने सुख आणि दुःख दोन्ही संपून, जातात अशी कोणती स्थिती असली पाहिजे? असा विचार जेव्हा माणसाच्या मनात उद्भवतो त्यावेळी तो एकसांख्य होतो आणि तो परमेश्वराला शोधू लागतो. परमेश्वराच्या नावावर लोकांनी पुष्कळ दुकानं मांडलेली आहेत. दुकानात गेलं म्हणजे परमेश्वर मिळतो असा आपला पुष्कळांचा विचार आहे. सहजयोगात तुम्ही पैसे देऊ शकत नाहीत, असं म्हटल्याबरोबर अर्धे लोक उठून चालले जातात. पैशाने तुम्ही परमेश्वर विकत घेऊ शकत नाही. परमेश्वर घेताच येत नाही आपल्याला. विकाऊ वस्तू नाही आहे परमेश्वर . तर परमेश्वर काय आहे ? ज्याने ही सृष्टी रचली, ज्याने पृथ्वी आपल्याला दिली, ज्या पृथ्वीतलावर आपण जन्माला आलो, हे सगळं करणारा जो परमेश्वर आहे, तो आहे तरी काय? असा प्रश्न मनामध्ये उभा राहतो. पुष्कळसे लोक अशा भ्रामक कल्पनेत इकडे तिकडे भटकतात आणि भटकले आहेत. धर्माच्या नावावरतीसुद्धा पुष्कळांना भरकटवून टाकलेले आहे. ज्याला आपण धर्म म्हणतो, कधी कधी असं वाटतं, की हा धर्मच नसावा. जे धर्मावरती बोलतात त्यांचासुद्धा एवढा अधर्मीपणा! आपल्याला Read More …

Devi Puja Pune (India)

Devi Puja (Transcriber’s Note: A Sahaja Yogini is singing a bhajan to Shri Mataji.) Shri Mataji: Waa. [UNKNOWN INDIAN WORDS]. I’ll give her. May God bless you. There’s a Sari [UNKNOWN INDIAN WORD]. Shri Mataji speaks in Marathi / Hindi. (Transcriber’s Note: Shri Mataji begins in either Hindi or Marathi. She then speaks in English but it seems that in is not the beginning of a sentence.) Marathi language because Poona is a very, very important; very extremely important place and the people have a special gift of God that they are born here. Punya (sounds like – nugarie OR nagari) is the name. Punya Patanam means the…all the punyas, all the good deeds that they did in their previous lives is poured into this. All the saints have praised this place. In the ancient times, in the ancient books it is written as this is a Punya Patanam – is the place, is the city of punyas. So in such a great place you all have come, you should be very thankful. I’m just addressing to them that you are born in such a great country, in such a great city and you have a special, very special responsibility. And that’s what I was advising them that these foreigners have come. They are also very lucky people to come to this great city of punyas. And by God’s grace I’m sure they will achieve a big ascent in this puja. So let us all decide today not to worry Read More …

Public Program Sangli (India)

Public Program Sangli, 6th January 1986 सांगली तसच कोल्हापूर दोन्हीही ठिकाणच्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात . मागच्या वर्षी आम्ही इथे आलो होतो, आणखीन  सहजयोगाबद्दल  लोकांना माहिती दिली होती . आता आपण असा विचार केला पाहिजे , की  ह्या जगामधे आपण आलो ते कशासाठी ? त्याबदद्ल आपल्या मनामधे पुष्कळ भ्रम आहे . तो विचार आपण करू नये असे पुष्काळांचे मत आहे. कारण असा विचार करून फायदा काय होणार ? आपल्याला पुढचं काय ते काय माहीत नाही . पण जर आपण लक्षात घेतल तर अनेक हजारो वर्षांपासनं  आपल्या देशामधे विशेषत: ह्या महाराष्ट्रात  , ह्या संतभुमिमधे संतानी अस संगितलेल आहे  की, अवघाची संसार सुखाचा करीन ! इतकच नव्हे तर पसायदान म्हणून जे काही ज्ञानेश्वरांनी लिहलय ते सुद्धा वर्णन आपल्याला खर वाटत नाही की , जे जो वांछील ते तो लाहो ! हे कस होणार?, ह्याला मार्ग काय ? जी जी वर्णन अशा परमेश्वरी साम्राज्याची आपल्या शास्त्रात करून ठेवलीय . त्यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो की, अस साम्राज्य आलं  पाहिजे .पण ते येणार कस ? आता कम्युनिस्ट लोकांच अस म्हणन आहे की , मार्क्सनी, मार्क्सवादी लोकांच अस  म्हणन आहे की मार्क्सनी अशी रचना केली होती की,असे विशेष लोक तयार होणार आहेत , की ज्यांना ग्व्हर्नमेंटची गरज नाही , ज्यांना पोलिसांची गरज नाही ,ज्यांना कशाचीही गरज नाही .पण ते कसे होणार ? त्याचा कुठे कोणी उल्लेख केलेला नाही. ते कसं घडून येणार आहे ?अस होणार तरी कसं  ? म्हणून त्यांनी जबरदस्ती केली ,कसतरी  करून कम्युनिझम आणला.पण त्याचा काही फायदा झाला नाही. मनुष्य होता तसाच आहे . तेव्हा त्याला काहीतरी कारण असलं पाहीजे  , ते Read More …

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja Date 6th January 1986: Place Sangli Puja Type आता सांगलीकरांना सांगायचं असं की ते आपण पूर्वी एक पूजा केली होती आणि आता परत केलेली आहे. सांगलीला बरच पेपरमध्ये वगैरे आल्यामुळे बरच काम झालेलं आहे आणि इथे सहजयोग बसूही शकतो. कारण वातावरण फार छान आहे. शांत आहे आणि इथले एकंदर लोक मदत करायला तयार आहेत. थोडी सांगलीकरांना आमच्यातर्फे एक लहानशी भेट देणार आहोत. तर ती भेट त्यांनी स्वीकारावी. अशी माझी विनंती आहे आणखीन एक वस्तू आहे, पण ती अजून बाजारातच रातहिली आहे. ती आल्यावरती देऊ. कोण घेत आहे ? (भेट) (अनुवाद-श्री.तावडे, जे इथले मोठे सहजयोगी आहेत. त्यांनी भेट स्वीकारली.) आता आजच्या पूजनाला खरोखर महत्त्व असं आहे, की आज महालक्ष्मीचं पूजन आहे. आणखीन महालक्ष्मीचं जे महात्म्य आपल्या सहजयोगात आहे, ते कोणत्याच शक्तीचं नाही. कारण महालक्ष्मी ही शक्ती जिला आपण सुषुम्ना नाडी म्हणतो, त्यात वास करते आणि त्याने पॅरासिंपथॅटिक नव्व्हस सिस्टीमचं चालन होतं. ह्या महालक्ष्मीला सशक्त करण्यासाठी आपल्या उत्क्रांतीमध्ये ज्या ज्या घटना झाल्या, त्यात मुख्य म्हणजे महालक्ष्मीचं अवतरण आहे. महालक्ष्मीने अनेकदा अवतार घेतले आणि तिचीच एवढी हिंमत आहे, की तिने एक शरीर धारणा करून ह्या संसारात जन्म घेतला आणि कार्य केलेल आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की आपल्याला सर्व ह्या महालक्ष्मीच्या अवतरणाबद्दल कोणी माहिती दिलेली नाही किंवा इतकं गहन कोणाला त्याच्याबद्दल, सविस्तर वर्णनच माहिती नाही. आता महालक्ष्मीचं तत्त्व म्हणजे लक्ष्मीच्या तत्त्वावरचं आहे. म्हणजे लक्ष्मीची आई महालक्ष्मी म्हटलं पाहिजे. लक्ष्मीची आई म्हणजे लक्ष्मी जी आहे, जेव्हा माणसाजवळ लक्ष्मी येते, लक्ष्मीसुद्धा एक संतुलन असलेली, एक स्त्री स्वरूप देवी आहे. इतकी संतुलनात आहे ती की ती एका कमळावर उभी राहते. तिच्या हाता दोन कमळं Read More …

Public Program Ganapatipule (India)

Sarvajanik Karyakram 3rd January 1986 Date: Ganapatipule Place Public Program Type गणपतीपळे आणि मालगुंड ह्या पवित्र परिसरात राहणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो! गतवर्षी सहजच गणपतीपुळेला येणं झालं आणि इथलं पवित्र वातावरण पाहन ही परमेश्वरी सोन्याची खाण इतके दिवस का लक्षात आली नाही हेच मला समजलं नाही. आणि ह्या ठिकाणी जी मालगुंडची मंडळी राहतात आणि गणपतीपुळ्याची मंडळी राहतात त्यांना तरी ह्या खाणीची माहिती आहे की नाही असा मला प्रश्न पडला, तेव्हा काहीही झालं तरी आम्ही आमचा प्रोग्रॅम गणपतीपुळ्यालाच घेऊ या, असं मी सर्वांना सांगितलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी हा शब्द उचलून धरला. नागपूरहन इथे मंडळी आली. तसेच इतर ठिकाणाहून, फार लांबून, दिल्लीहून, कोलकाताहून, फार लांबून मंडळी इथे आली. मद्रासची पण मंडळी इथे आली. माताजींनी गणपतीपुळ्याला एवढ महत्त्व दिलं तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात होता. पण इथे आल्याबरोबर त्यांना मोठा आश्चर्यजनक आनंद झाला. कारण हे वातावरण इतक शुद्ध आणि पवित्र आहे, की ते एका आत्मसाक्षात्कारी माणसालाच जाणवू शकतं. ही जाणीव व्हावी लागते. नुसतं असं म्हणून की आम्ही गणपतीपुळ्याला गेलो, ह्या अष्टविनायकाला गेलो, तिथे गेलो, असं केलं, तसं केलं, त्याला काही अर्थ रहात नाही. तुम्हाला काय मिळालं? असं विचारलं, तुम्ही अष्टविनायकाला गेलात, तुम्ही इतकी तीर्थयात्रा केलीत, तुम्हाला काय मिळालं? जसेच्या तसेच. इकडे गेलो, हे खर्च केले. तिकडे गेलो, हे केलं. दानधर्म केला, अमुक केलं, तमुक केलं, तीर्थयात्रा केल्या, पण का केल्या आणि तुम्हाला मिळालं काय? आता हे अष्टविनायक कोणी शोधून काढले? अष्टविनायक आहेत हे कोणी सिद्ध केलं? ही फार पुरातन गोष्ट आहे. आजची गोष्ट नाही. फार पुरातन गोष्ट आहे. तेव्हा त्या वेळेला जे आत्मसाक्षात्कारी मोठे लोक झाले, त्यांना लोक Read More …

Shri Mahaganesha Puja Ganapatipule (India)

Shri Mahaganesha Puja, Ganapatipule, India, 1986-01-01 आज आज आम्ही गणपतीपुळ्याला आलो. त्याचे फार  महात्म्य आहे. अष्टविनायका मध्ये, हे महा गणेशाचे स्थान आहे. महागणेश हा पिठाधीश आहे. आणि  ह्या पिठावर  बसूनच तो सर्व गणेशाचे रक्षण करतो. सर्व ओंकाराची चालना करतो. कारण त्याला गुरु तत्व मिळालेले आहे. वातावरणात सुद्धा आपण पाहिलं की, समुद्र  इतका सुंदर आणि स्वच्छ आहे. या गणपतीचे पाय  धुतो.  कारण समुद्र हा गुरु तत्व आहे.  आणि त्या गुरुतत्त्वानी  तो श्री गणेश यांचे पाय धुतो. तसेच सर्व सहज योग यांचे झाले पाहिजे. गणेश  स्तुती झाली, गणेश स्थापना झाली त्यानंतर महालक्ष्मी तत्त्वांनी तुम्ही महा गणेश झाले. ही स्थिती आहे ती लहान मुलांना, मोठ्या मुलांना, वयस्क, ,स्त्री.पुरुष सर्वांना सुलभ  मिळू शकते. जर त्याच्यामध्ये सरळ स्वभाव आला.  त्याला आपण सारल्या म्हणतो. मराठी भाषेत  ज्याला   अबोध धीता म्हणतात. इनोसन्स, याला म्हणतात, ते जेव्हा आपल्यामध्ये पूर्णपणे  बानुन  जाते तेव्हा आपल्याला गुरुपद येऊ शकते. कोणताही गुरु  त्याच्यामध्ये हि  सरलता आहे.  ते  हो ने  पण नाही. तो कधीही गुरु होऊ शकत नाही. त्याचं लक्ष फक्त परमेश्वरी शक्तीकडे आहे. तोच गुरु होऊ शकतो, जो सर्व साधारण माणसाचे लक्ष हे दूषित आहे. ते स्वच्छ नाही. त्याबद्दल ख्रिस्ताने  सांगितले की, तुमच्या डोळ्यात   कोणताही दूषित पणा  नसला पाहिजे. त्याचा अर्थ असा की, विचारांचे काहूर माजून जाते, व भलतेसलते विचार येऊ लागतात. किंवा हे आपल्याला का मिळाले नाही ? किंवा  हेवे- दावे .कोणत्याही वस्तूकडे बघून जर विचार आला तर तुम्ही आज्ञा चक्रा वर अजून मात केलेली नाही. कोणत्याही वस्तूकडे बघून निर्विचार इता आली पाहिजे. विशेष करून जेवढ्या परमेश्वरी संबोधित समृद्ध अशा देवी देवता आहेत त्यांच्याकडे पाहून तरी निर्विचारइता  आली पाहिजे.  Read More …

Public Program Atit (India)

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . अतीत बद्दल मी ऐकल होत कि इथे पुष्कळ साधक आहेत आणि सहजयोग चांगलाच रंगलेला आहे . इथे आल्याशिवाय ते सत्य द्रीष्टी समोर आलं नाही . आणि पाहून मला मोठं आश्चर्य वाटलं कि या ठिकाणी प्रथमच मी आले आणि लोकांचा उत्साह त्यांचं प्रेम किती भव्य आहे किती मोठं आहे . आपण नेहमीच सत्याला शोधत असतो . जाणता जाणता आपण शोधत असतो ते सत्य . कारण सत्य हेच प्रेम आहे . एखाद्या बद्दल आपल्याला जर प्रेम वाटलं तर आपण त्याच्या बदल सगळं काही असेल ते जाणतो ,जे सत्य आहे ते जाणतो . बाह्यतः सुद्धा . आणि ते प्रेम आनंददायक असत . तेव्हा ते सत्यच आनंदाचा स्रोत आहे . आपल्याला असं वाटत कि सत्य म्हणजे काहीतरी कोरड असेल कारण जे सत्यवचनी असतात ते करारी लोक ,बाणेदार लोक आणि हातात नेहमी तलवार धरूनच असतात . त्यांच्या जवळ जायचं म्हणजे अगदी विचार करावा लागतो . त्यांच्या जवळ जायचं तरी कस एखादा तडाखा दिला तर कस होईल आपलं . सत्य हे प्रेममय आहे ,आनंदमय आहे . ,सौन्दर्य शाली आहे . सुखमय आहे . ते आपण सत्य शोधत असतो . पुष्कळसे लोक असं समजतात कि आम्ही जर मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्या तर आम्हाला आनंद होईल . पुष्कळसे लोक भौतिकतेत पडतात त्यांना वाटत कि आम्ही जर मोठमोठाले बंगले बांधले किंवा मोठाल्या गाड्या ठेवल्या श्रीमंत झालो म्हणजे आम्हाला आनंद मिळेल . सुख दुःखाचा हा फेरा आहे . हा आनंदाचा सागर नव्हे . सुख तेव्हा होत जेव्हा माणसाचा अहंकार बळावतो . एखाद्या माणसाने उदोउदो केला म्हणजे माणसाला सुख वाटत . आणि Read More …

Devi Puja Brahmapuri (India)

Devi Puja Talk, India, 1985-12-27 Time: 26 minutes 56 seconds to 29 minutes 56 seconds. (26.56 To 29.56)               आता तुम्हांला काय सांगायचं तुमची स्तुतीच करत होते सगळ्यांना. सगळ्यांजवळ मी तुमची स्तुती करते, की तुम्ही मूर्खासारखे वागू नका, असं त्यांना सांगतेय मी. तेव्हा तुम्हांला तसं सांगायचं की तुम्ही ह्यांचं अंधानुकरण करायचं नाही. आपलं जे आहे ते फार मोठं आहे. आपला वारसा आहे तो सांभाळला पाहिजे. नुसतं आपण बाहेरच्या लोकांना बघून तसं वागायला लागलो तर आपण मूर्खात निघणार. त्यांना काही संतुलन नाही. त्यांच्या जीवनात काही संतुलन राहिलेलं नाही. एकीकडे वहावलेलं जीवन आहे ते. हे मी पाहून आले ना आता. बारा वर्ष तिथं राहून आले. तप केलं बारा वर्षाचं. बारा वर्षांत तप होतं म्हणतात. (हास्य) तसं तप झालं माझं. आणि आता त्यांचं अंधानुकरण करू नका एवढंच सांगायचं. पण ‘जुनं ते सोनं’ जरी असलं तरी जुनाट जे आहे ते चांगलं नाही. जुनाट नको. ‘जुनं ते सोनं’ पण जुनाट जे धरून बसले ते नको आणि जुनाट सुद्धा आत्ता आत्ताच आलेलं आहे, म्हणजे बायकांना छळणे मुसलमानांपासून शिकलो आपण. इंग्लिश लोकांपासनं डावरी देण्याचं शिकलोय. मुलींना डावरया दयायच्या, आता कशाला? आता आपला असा नवीन नियम झालेला आहे, त्या नवीन नियमांमध्ये आपल्याला काही डावरी दयायला नको. मुलीला अर्धी प्रोपर्टी दयायची, मुलींनी अर्धी प्रोपर्टी घ्यायची ही पद्धत बरोबर आहे. पण मुली घेणारही नाहीत आणि देणारही नाहीत. तेव्हा त्यांचं जे आहे ते शिकायचं. आपली जी नम्रपणाची वर्तणूक आहे तीच ठेवायची. व्यवस्थित राहायचं. जसं आपल्याला पूर्वजांनी सांगितलंय तसं राहायचं. पण जुनाट ज्या वस्तू झालेल्या त्या फेकून टाकल्या पाहिजेत. जुनाटातल्या पुष्कळ वस्तू आहेत त्या म्हणजे ब्राहमणांचं साम्राज्य जे पसरलंय देवळामधनं ते काढलं पाहिजे. Read More …

Public Program, Swacha dharma Pune (India)

1985-12-22 Public Program, Swacha Dharma, Pune. पाडवळीत गावातले सरपंच तसेच इथले ग्रामस्थ मंडळी त्यांनी हा कार्यक्रम इतका उत्साहाने योजला आहे की माझं हृदय  भरून आलं आहे . या पवित्र भुमीत श्री तुकाराम महाराज राहीले त्यांनी परमेश्वराची गाथा गायली .परमेश्वराची ओळख सांगितली . लोकांना अनेक प्रकारे आपल्या जीवनातून अत्यन्त मुल्यवान अशी माहीती  दिली .आज येतांना उशीर होत होता कारण रस्त्यामध्ये दुसरी गाडी फेल ( fail ) झाली तर तिकडे मला तुमच्या उत्साहाची आणखिन त्रासाची पूर्ण कल्पना येत होती .पण त्या वेळेला तुकारामांचा एक अभंग आठवला समयासी सादर व्हावे . समयाला सादर असलं पाहिजे. इतक्या सोप्या शब्दात फार मोठी गोष्ट तुकाराम बुवांनी सांगितली .समयासी सादर व्हावे म्हणजे आपण एकतर पुढचा तरी विचार करतो किंवा मागचा तरी विचार करतो .पण ह्या क्षणाला ,ह्या क्षणाला  काय मिळतंय ते आपण बघत नाही . वर्तमान काळात राहू शकत नाही , आज आता इथे काय आहे ते आपल्या लक्षात येत नाही .त्यामुळे जे विशेष आहे जे महत्वाचं आहे ,जे संपुर्ण आहे ते आपल्याला मिळू शकत नाही एवढी मोठी गोष्ट एका वाक्यामध्ये समयासी सादर व्हावे इतकं नम्रपणानी त्यांनी म्हटलेलं आहे .इतका उत्साह इतकं प्रेम तुम्ही आईला दिलंत त्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत . आज एवढया धकाधकीच्या काळामध्ये आपल्या समाजात अनेक तऱ्हेचे  वैगुण्य आलेले आहेत .पुष्कळ खराबी आलेली आहे त्यामुळे प्रत्येकाला काहीना-काहीतरी दुःख आहे कुणाला शारिरीक दुःख आहे ,तर कुणाला मानसिक दुःख आहे ते नसलं तर एखाद्याला कौटंबिक दुःख पण फार आहे ,सामाजिक दुःख आहे .तरतर्हेचे त्रास एकदम जशे काही सगळेच्या सगळे एकत्र फोफावून उभे राहिलेत. माणसाला समजत नाही भांबावून गेलेला आहे की जावं तर जावं कुठे करावं तरी करावं Read More …

Public Program Sangamner (India)

परमेश्वराला  शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . ह्या भारत भूमीत ह्या योगभूमीत महाराष्ट हे एक विशेष प्रकारचं राष्ट्र  आहे . आणि अनादी काळापासून याला महाराष्ट्र असं म्हंटल आहे . महाराष्ट्र का म्हंटल असं कुणाला विचारलं तर लोकांना ते सांगता येत नाही . आणि केव्हा पासून म्हंटल ते सुध्दा त्यांना सांगता येत नाही . असे अनादी नाव कोणत्याही देशाला आजपर्यंत महाराष्ट्र असं दिलेलं नाही . तेव्हा ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असं आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे . म्हणजे एव्हड्या मोठ्या राष्ट्रात जर जन्म झालेला आहे ,हे राष्ट्र संबंध पृथ्वी तलावावर महान मानलं जात तेव्हा याच जे आपण मोठं नाव ठेवलेलं आहे किंवा नाव आहे त्याला साजेस काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहजे . राजवाड्यात जे राहतात त्याना रजवाडे म्हणतात . तसच ह्या महाराष्ट्रात जे राहतात त्यांना महाराष्ट्रीयन म्हणतात . किंवा महाराष्ट्र वासी म्हणतात . पण त्यातलं ब्रीद काय आहे ते ओळखून घेतलं पाहिजे . त्याच्या शिवाय स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायचं नाही . कारण सत्य हे आहे कि हा देश अत्यंत महान आहे . आणि आधी मी आपल्याला सांगितलं आहे कि सर्व विश्वाची कुंडलिनी  ह्या महाराष्ट्रा च्या पठारामध्ये जशी त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपल्यात  ती बसलेली आहे तशीच हि कुंडलिनी आपल्या ह्या महाराष्ट्रात बसलेली आहे . हि महान आदी कुंडलिनी ह्या महाराष्ट्रात आहे . तिची तीन पीठ आपल्याला माहीतच आहे .   महाकालीच ,महासरस्वतीच आणखीन महालक्ष्मीचं . पण जे मुख्य आहे ते सप्तशृंगीचं अर्धमात्रा , ती आदिशक्ती आहे . ती नाशकाच्या जवळ आपल्याला माहित आहे . अशी साडेतीन पीठ ह्या भूमातेच्या पाठीच्या कणावर महाराष्ट्रात आहेत . म्हणजे इथे चैतन्याच्या नुसत्या लहरी वहात आहेत . चैतन्य नुसतं उफाळून आलेलं Read More …

Puja Nashik (India)

Saptashrungi Puja Date 17th December 1985: Place Nasik Type Puja आता मी इंग्लिशमध्ये जरी बोलले असले तरी आपल्याला सगळे कळलं असेल. पण तरी सांगायचं म्हणजे असं की आपला सहजयोग आहे आणि सहज असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.’ तर सहज हा जो योग घडतो, तो फक्त कुंडलिनीची जागृती आणि तुमच सहस्रार भेदन, इथपर्यंत आमचं तुमचं देणं-घेणं आहे. आता पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये तुम्ही जर एखाद बी घातलंत, तर तिचं देणं-घेणं एवढच आहे की, ‘बाबा, तुझ्यामध्ये मी अंकूर फोडते.’ पण त्यानंतर बघायला नको. तेव्हा जरी हे अगदी सहज असलं, तरी आता आम्ही संत झालो, हे समजण फार कठीण आहे. आता आम्ही बी घडलो. हे समजणं फारच कठीण गोष्ट आहे. अजून आम्ही तेच आहोत, असं सारखं आपल्याला वाटत असतं किंवा तस नाही वाटलं, तरी आपली वागणूक तशीच असते. तर ती बदलायला पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आता आम्ही संत झालोत . संतांची किती लक्षणं सांगितलेली आहेत रामदास स्वामींनी! प्रत्येकाने सांगितलेली आहे. त्या संतांमधली आपल्यामध्ये कोणती लक्षणं आहेत ती पाहिली पाहिजे. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. ती लक्षणं आपल्यामध्ये दृष्टीगोचर का होत नाही? लोक आपल्यामध्ये ते शोधत का नाहीत ? ते आपल्यात त्यांना दिसत का नाही ? त्याला कारण काय हे पाहिलं पाहिजे. तर सर्वप्रथम आपण असा विचार केला पाहिजे, कि परमेश्वराने आपल्याला अंकुरलं आहे. बरं, झालं. आता पुढे काय? आम्ही काय केलं त्या परमेश्वरासाठी ? आम्हाला सहजयोगामध्ये हे माहिती आहे, की प्रत्येकाला आशीर्वादित करतो परमेश्वर. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ योग मिळाला तुम्हाला, क्षेम घ्याच. ते त्याच्याच बरोबर येतं समजा. बिल्ट इन. त्याला काही करायला नको. क्षेम घ्या. पण क्षेमाबरोबर एक Read More …