Public Program Nashik (India)

परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . ह्या सर्व सृष्टी मध्ये पृथ्वी हि विशेष मानली जाते आणि त्या पृथ्वीवर विशेष म्हणजे भारत भूमी आहे . तिला योग भूमी असं म्हंटल आहे . त्या योग भूमी मध्ये तपोभूमी जी आहे ती नाशकाच्या आसपास आहे . अशा पवित्र भूमीत तुम्ही आला आहात . आणि इथे माझं कार्य फार होईल अशी मला अपेक्षा आहे . पुष्कळ दिवसापासून अनेकदा इथे आल्यावर सुध्दा माझ्या दृष्टीत असं आलंय कि इथले लोक इतकी मोठी संपदा असून सुध्दा ,एव्हडी मोठी तपोभूमी त्यांच्या पायाखाली असून सुध्दा ,इतक्या साधुसंतांनी आणि ऋषीमुनींनी इथे त्याग आणि तप केलेलं असून सुध्दा ह्या क्षेत्र भूमी मध्ये लोकांचं लक्ष परमेश्वराकडे कमी आहे . त्याला कारण शोधता असं कळलं कि प्रत्येक क्षेत्र ठिकाणी ,महाराष्ट्रात किंवा कोणत्याही ठिकाणी इतकच नव्हे तर तुम्ही जर रोमला गेलात किंवा इतर क्षेत्र स्थळी गेलात जिथे ख्रिश्चन धर्म आहे ,मुसलमानांचा धर्म आहे किंवा जैन धर्म आहे कोणाचाही धर्म असो त्या क्षेत्र स्थळी परमेश्वर उठलेला दिसतो . त्याला कारण काय तर तिथे लोक बसून देवाच्या नावावर पैसे कमावतात . आम्हाला देव सगळा माहित आहे . बाकी कुणाला देव समजत नाही . अशा रीतीने जे भाविक अत्यंत सोज्वळ लोक आहेत त्यांची दिशाभूल करतात आणि त्यांना अशा मार्गाला घालतात कि ते अभिभूत होऊन अशा कर्माला पडतात कि ज्याला आपण म्हणतो कि हे लोक बाधित झाले . ह्यांचे धंदे अशे असल्या मुळे प्रत्येक क्षेत्रस्थळी हा प्रकार झालेला आहे . पण जी मंडळी अत्यंत साध्या  प्रवृत्तीची आहेत आणि भाविक आहेत ज्यांनी अनेक जन्म परमेश्वरासाठी टाहो फोडलेला आहे त्यांना आज हि अशी संधी आहे कि त्यांनी आत्म्याचं आपलं दर्शन घ्यावं . त्याला कारण असं कि Read More …

Shri Adi Bhoomi Devi Puja Pune (India)

Marathi Transcription – Bhoomi Devi Puja Date 4th February 1985: Place Pune – Type Puja (Starts at 12:48) इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहजयोग्यांनी मिळून केली, ते बघून असं वाटतं, की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं, त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे. तशी अनेक कारणं आहेत पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनेच या पुण्यनगरीत वास्तव्य करण्याचे आम्ही ठरविलेले आहे. एकंदरीत इथे जागा मिळणे, त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे. पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे, साठा आहे त्याचा. आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुण्याईत घडविली जाऊ शकतात. पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच. कारण जेव्हा माणसं पुण्याईत घडविली जातात, तेव्हा त्यांच्यावरती आघात करायलासुद्धा, असुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते. विशेषकरून अशा ठिकाणी, जिथे काहीतरी पुण्य घडविलं जातं. तेव्हा आपण आणखीन सचोटीने, आणखीन सतर्कतेने काळजीपूर्वक सहजयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे. इतकंच नव्हे की पुण्य आहे, पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकल गेलं, तर आपल्या सबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची ह्यामध्ये मला मदत पाहिजे.       सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे, की घर बांधणं वगैरे हे काही विशेष महत्त्वाचं नाहीये आणि ते सोपं काम आहे. पण ह्या घराबरोबरच, जर पुण्यातले सहजयोगीसुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं, तर मला फार आनंद होईल. ही एक फार मोठी गोष्ट आहे, की आज इथे आपण भूमीपूजनाला आलो, सगळे एवढे संत- साधू आले आहेत. भूमीपूजन करीत आहेत आणि ह्या भूमीपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा Read More …

Birthday Puja Mumbai (India)

जनम दिवस पूजा २१ मार्च १९८५ , मुंबई आज के ६३वें जन्मदिवस पर आपने जो समारोह रचा है उसके लिए एक माँ को क्या कहना चाहिए? क्योंकि जो कुछ भी है सब आपके लिए ही है। ये सारी उम्र भी आपके लिए है इसलिए इसके लिए यदि आप इस समारोह को मानते हैं तो इतना ही कहना है कि यह अपनी चीज़ है। और इसका आपको पूरा उपयोग करना चाहिए। क्योंकि जिन्दगी बहुत महत्वपूर्ण है । आज तक परमात्मा ने अनेक लोगों को संसार में भेजा। उन्होंने भी कार्य किया है । उस कार्य की ही स्वरूप आप लोगों ने सहजयोग पाया है। लेकिन अभी तक आप लोग शायद इसका महत्व नहीं जान पाए। पहले तो लोग पहाड़ों में घूमते थे, बहुत तपश्चर्या करते थे, परमात्मा की खोज में रहते थे । अब फलश्रुति हो रही है। आज उसी कार्य के आशीर्वाद आपने सहज में ही आज अपनी आत्मा को प्राप्त किया, इतना सहज और सरल मिला है, और उससे इतना क्षेम प्राप्त हुआ है। इस कदर आपने शक्तियों को प्राप्त किया है, उसमें कभी भी ऐसा आपको लगा नहीं कि इस चीज़ को मिलने में कितना प्रयत्न करना पड़ा, कितने जन्म लेने पड़े, कितनी जिन्दगियाँ बितानी पड़ीं, उसके बाद आज आप सहजयोग को प्राप्त हुए । और इस दशा में आये हो कि आज आप एक साधु स्वरूप हैं। बहुत लोग सोचते हैं कि सहजयोग में आने से हमारी घर की सांपत्तिक स्थिति ठीक हो गयी या हमारे बच्चे ठीक हो गये। लड़कियों की शादियाँ हो गयीं, लड़कों को Read More …

Talk to Sahaja Yogis, A New Age Sydney Sydney (Australia)

H.H. Shri Mataji Nirmala Devi talking to the Sahaja yogis at Burwood ashram after the public program. Sydney, Australia. (1985-0311) [a Sahaja yogi reads Gyaneshwara’s Pasayadan in Marathi, and Shri Mataji comments on it in English] [Marathi] Shri Mataji and Sahaja Yogis: Aranava, forest, jungle.. Shri Mataji: Gyaneshawara. He describes Sahaja Yogis like this, beautifully. He first says, he’s requesting the God Almighty. [Marathi] Ata, he says, let the Spirit of the Universe be contented. He says now let it be contented. I have done my writing as the yagnya of my power of speaking [Marathi] And now with that. [Marathi] satisfaction, I mean, I mean God doesn’t have satisfaction but what you mean that now you are Prasanna, satisfied, then please give us the Pasaydan and Pasaydan, it means these vibrations, the blessings of the nectar of the milk of your joy, you give us that, that’s what he asks for, but the way he described the Sahaja Yogis, what will happen, you see the, what it will happen. [Marathi] So he says “So let’s walk, let’s go together. He describes you as the trees, the forest of the trees of fulfilling desires, you are the trees of fulfilling desires. Let us get together and march. [Marathi] Arava is the forest. [Marathi] Aranava, the oceans, you are the oceans, of talking ambrosa, of talking ambrosa, you are the oceans of ambrosa talking, or let us all move together, now we have the God, the Pasaydan, let’s give it to Read More …

Shri Mahalakshmi Puja (India)

Shri Mahalakshmi Puja 3rd February 1985 Date : Warnali Place Type Puja आता मराठीत काय सांगायचे, की ह्या इतक्या सुरम्य स्थानी तुम्ही आलात आणि इथे जगताप साहेबांनी आपली इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी पूरे पडणार नाहीत. इतकं प्रेमाने सगळ्यांना दिले आणि केले. त्याबद्दल हे सगळे सहजयोगी इतके आश्चर्यचकित झाले, की आपल्या देशात असा असेल तर किती होऊ शकेल! एवढे प्रेमाने वागून, सगळ्यांची प्रेमाने व्यवस्था करणे हे फार जर एकतरी मनुष्य मोठे काम आहे. हे ह्यांनी साधलेले आहे. त्याची ह्यांना कमाल वाटते. तसेच तुम्ही लोकांनी इतकी मेहनत केली, सगळ्यांनी ब्रह्मपुरीलाही येऊन इतकी सुंदर व्यवस्था केली. जंगलामध्ये. नंतर इथेही सगळ्यांची इतकी व्यवस्था केली. खूप मेहनत घेतलीत. आम्ही तुम्हाला काय देणार? काय विशेष देणार आहोत ? इतके तुम्ही रात्रंदिवस आटोकाट प्रयत्न करता. इथे एक पाटील साहेब आहेत. ते सहजयोगी नव्हते, पण त्यांनी एवढी मदत केली आहे. ह्या लोकांची तुम्ही केवढी सेवा केलेली आहे. त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. फार ऋणी आहे. अनेकदा सांगितलं तुम्ही, की माताजी, तुम्ही ह्याचा उल्लेख करावा. आम्हाला ह्यांच्याबद्दल फार आदर वाटतो. आम्हाला वाटते फार मोठे ह्या लोकांनी केलेले आहे. किती त्यागी लोकं आहेत ! आम्ही इतके करू शकत नाही. तेव्हा आज आपला शेवटचा दिवसच म्हटला पाहिजे टूरचा. कारण ही मंडळी निघालेली आहेत ह्या सर्वांच्या वतीने मी आपले फार फार आभार मानते. सगळ्यांचेच. एकएकाचे नाव सांगण्यासारखे नाही. पण मोदी साहेबांचे तुम्ही विशेषकरून आभार मानले पाहिजेत.

Public Program (India)

ताराराणी हायस्कूल चे संचालक , तसेच शिक्षक वृंद , कोल्हापूरचे अबालवृद्ध आणि आसपास च्या खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व साधकांना आमचा प्रणिपात असो . आजचा विषय सहजयोग तर आहेच आणि सहजयोगावर मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं आहे कि सहजयोग म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला योगाचा जन्मसिध्द अधिकार . सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला . हि जिवंत क्रिया आहे . आणि ती जिवंत क्रिया आपल्या मध्ये घाटीत होते त्या साठी काहीही क्रिया करावी लागत नाही . अक्रियेत ते घडत हे मागच्या वेळेला तुम्हाला समजावून सांगितलं होत . पण महालक्ष्मीच्या परिसरात बसल्यावर हि महालक्ष्मी कोण ?तिचा आपला काय संबंध? ,आपण देवळात जाऊन काय मिळवायचं ? वैगेरे ह्या गोष्टींची कुणाला माहिती नाही . देवळात जायचं खणानारळानीं ओटी भरायची एव्हडं जे साधुसंतांनी सांगितलेलं आहे तेव्हड आपण करतो . तिच्या परिसरात राहून तिच्या आशीर्वादाने हि सश्यशामला भूमी पुनीत झालेली आहे तिचा पूर्ण उपभोग घ्यायचा ती आपली एक प्रवृत्ती आहे . तरी सुध्दा हि महालक्ष्मी कोण ?हि महालक्ष्मी तत्व रूपाने आपल्या मध्ये वास करत असते . आणि जी सुषुम्ना नाडी अशी जी आपल्या मध्ये जी मधोमध आपल्या मध्ये आहे ,जिच्यातून कुंडलिनीच उत्थापन होत त्या नाडीला महालक्ष्मीची नाडी असं म्हणतात . डावी कडे महाकाली आणि उजवी कडे महासरस्वती ह्या दोन्हीच्या मिलनानी बनलेल जे मधोमध अशी पोकळी आहे ह्या पोकळीला सुषुम्ना नाडी असं म्हणतात . म्हणजे महालक्ष्मी हि सुषुम्ना नाडी आहे आणि तिच्यातूनच कुंडलिनीच उत्थापन होत म्हणून जरी हि महालक्ष्मी आहे तरी तिच्या समोर जाऊन आपण उदे उदे आंबे असं म्हणतो . अंबा हि कुंडलिनी आहे . जो आपण जोगवा म्हणतो तेही तेच आहे . ग्रामीण विभागा मध्ये जोगवा म्हंटला जातो ते हि Read More …

Public Program (India)

 सांगलीचे चीफ इंजिनिअर श्री जगताप साहेब तसेच ह्या शाळेचे मुख्याधापक ,इथे राहणारे सर्व आबालवृध्द ,सत्याच्या शोधात आलेले सर्व साधक या सर्वाना आमचा प्राणिपाद असो . कुंडलिनीचा विषय थोड्या शब्दात किंवा थोड्या वेळात मांडणं हे सोपं काम नाही . पण तरी सुध्दा आपण असा विचार केला पाहिजे कि हि जी मानव आकृती तयार झाली ती का झाली . हा मानव निर्माण करताना इतका वेळ घालवला अनेक योनीतुन आपण संचार केला शेवटी ह्या मानव स्तीतीला आपण आलो . तेव्हा ह्या मानव स्तितीत येऊन पुढे काही आहे किंवा नाही हा एकदा विचार मनात जरूर डोकावतो . आणि जेव्हा हा प्रश्न डोक्यात उभा राहतो त्या वेळी साधक तयार होतात . आणि हे साधक परमेश्वराच्या शोधात, सत्याच्या शोधात ,निर्गुणाच्या शोधात कुठेना कुठे तरी भटकत असत . त्या साठी श्री कृष्णाने फार सुंदर विश्लेषण करून सांगितलं आहे . कि जगामध्ये तीनच जाती आहेत . तीनच तऱ्हेचे लोक आहेत म्हणजे एक तामसिक ,एक राजसिक आणि एक सात्विक . तामसिक मंडळी म्हणजे ती कि जे चूक असेल त्याला सत्य मानायचं आणि त्याच्या मागे धावायचं . ज्याचं काही महत्व नसेल ते महत्वपूर्ण करायचं आणि त्यासाठी संबंध आपलं आयुष्य घालवायचं . त्या बद्दल विचार करायचा नाही ,त्या बद्दल कोणचंही संतुलन ठेवायचं नाही . नुसतं वेड्यासारखं त्याच्या मागे लागायचं . जी आज पाश्चिमात्य देशांची स्तिती आहे ते राजसिक लोक आहेत . राजसिक लोक ते ज्यांना बरोबर काय आणि चूक काय ते समजत नाही . शुध्द काय आणि अशुध्द काय ते समजत नाही . पवित्र काय आणि अपवित्र काय ते समजत नाही . दोन्हीही चांगलं असं ते आपल्या अहंकाराच्या दमावर म्हणतात . तर राजसिक माणसाचा अहंकार फार बळावलेला असतो Read More …

Puja Brahmapuri (India)

Puja at Brahmapuri. Brahmapuri (India), 29 February 1985. Marathi Transcript इथे या लोकांच आगमन झाल आहे,तुम्ही लोका नि त्यांच स्वागत केल ,इतकी व्यवस्था केली,आणि इतकी सुंदर जागा शोधून काढली त्यांच्या साठी तेव्हा त्यांच्या वतीने मीतुमच्या सगळयांचे आभार मानते .या लोका नि इथे फार आनंदात वेळ काढलेला आहे .देव कृपेने यांच्या जवळ यांच्या देशात सगल काही आहे .तुम्ही जाउन बघितल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे लोक अत्यंत श्रीमंतीत वाढलेले आहेत आणि सगळ्या तरहेचा ऐशो आराम याना आहे,आपले रस्ते आपली धूळ तुडवत इथे ते आले आणि मी त्याना संगितल इथे श्रीरामाची आणि सीतेची मूर्ती मिळाली होती ,ही अशी पवित्र जागा आहे जिथे रामदास स्वमिनि या मूर्ती प्राप्त केल्या आणि त्या चाफळ ला नेऊन बसवल्या .या एका गोष्टीवर ही मंडळी म्हणायला लागली की आम्हाला तिकडे जायच आहे . तसच मी इथल्या मंडळिना संगितल की बर तुम्ही तिथे व्यवस्था करा ,त्या सर्व आरमाला सोडून ,त्या सर्व सुखा ला सोडून ते परमेश्वराच्या आनंदा साठी इथे आलेले आहेत . तसाच आपण सुधा ज्या पवित्रा जागा आहेत त्याच महत्व आपण समजल पाहिजे .आणि त्या पवित्र तेच आपण रक्षण केल पाहिजे . आपल्या मधे ती पवित्र ता आली पाहिजे. हे लोक इतके कुशाग्र आहेत की याना माहीत आहे की महाराष्ट्रात विशेष करून या भारत भूमी पेक्षा  सबंध महाराष्ट्रात अत्यंत सुंदर ,रम्य अशी अध्यात्मिक ठिकाणे आहेत . ते दिसायला आपल्याला सुंदर दिसेल या पेक्षा कितीतरी सुंदर त्यांच्या कडे फार सुंदर निसर्ग आहे ,फार सुंदर निसर्ग आहे .म्हणजे अगदी बघता च अस वाटत की काय विशेष आहे .पण त्यात चैतन्य नाही. इथे चैतन्य आहे म्हणून ते लोक आले ,तसेच Read More …

Public Program Angapur (India)

अंगापूरच्या या पंचक्रोशीत या पवित्र भूमीत आज येत आलं त्या साठी मी इथल्या सहजयोग्यांचे फार आभार मानते . अंगापूर बद्दल बरीच माहिती मी आधी वाचली होती . श्री रामदास स्वामींना इथे श्रीराम आणि सीतेच्या मूर्ती मिळाल्या त्यांनी त्या चाफळ मध्ये नेऊन ठेवल्या . त्याही मी पहिल्या आहेत . तेव्हा कधीतरी अंगापूरला जावं अशी माझी फार इच्छा होती . हि पवित्र घटना आहे आणि त्या एका घटने मुळे रामदास स्वामी नि अनेक ठिकाणी श्री हनुमानाचे सुंदर मंदिर बांधलेले आहे . त्यांनी जे कार्य केलं ते समाजोन्मुख होत ,समाजाकडे त्यांची द्रीष्टी होती . समाजाला परमेश्वरी ओळख झाली पाहिजे ,परमेश्वर मिळवल्या शिवाय माणसाचं कल्याण होऊ शकत नाही हि त्यांची ठाम समजूत होती . रामदास स्वामींना एकदा विचारण्यात आलं कि हा परमेश्वरी साक्षात्कार करायला किती वेळ लागतो . त्यांनी सांगितलं तत्क्षण . त्यांनी सहज शब्द अनेकदा वापरला पण सहज लोक नाहीत त्यांची वृत्ती सहज नाही . त्याला कारण श्री कृष्णांनी सांगितलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेचे लोक असतात . एक तामसिक लोक असतात दुसरे राजसिक असतात आणि तिसरे सात्विक लोक असतात .  तामसिक लोक ते असतात जे काहीतरी चुकीचं डोक्यामध्ये भ्रामक घ्यायचं आणि त्याच्या पाठीमागे सगळं आपलं आयुष्य घालवत असतात . आणि राजसिक लोक ते असतात ज्यांना चूक आणि बरोबर यातला फरक कळत नाही वाईट काय आणि चांगलं काय यातला फरक कळत नाही . हे अशे राजसिक लोक असतात . आणि तिसरे सात्विक लोक असतात जे परमेश्वरच नाव घेतात कारण त्याना माहित आहे कि सन्मार्गाने एकदा आपण वागलो कि आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल . ह्या विचाराने जे राहतात ,या ध्येयाने जे राहतात ते खरे सात्विक म्हणायचे . जे लोक उगीचच देवाचं नाव Read More …

Public Program Akluj (India)

यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि इतर संचालक वर्ग ह्या तालुक्यात राहणारी सर्व साधक मंडळी अबालवृद्ध सर्व भक्त मंडळांना तसेच अत्यंत सुंदर स्वरात भजन गाणाऱ्या ह्या सर्व भजन मंडळींना आमचा नमस्कार असो . सर्व प्रथम फार उशीर झाला आपल्याला वाट पाहावी लागली याच मला फार वाईट वाटत . त्या बद्दल मी क्षमा मागते सर्वांची . पण जे व्हायचं असत जी वेळ योगायोगाची असते त्या वेळेस ते कार्य घडत . असं मानून तुम्ही सर्वानी मला क्षमा करावी . ह्या कारखान्याचे दिग्दर्शन झाल्या पासून मला फार ह्या देशा बद्दल आशा वाटू लागली आहे . कारण आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती खरोखरच फार हालाकीची आहे . आणि जरी थोड्या जागी हि परिस्थिती सुधारली आहे तरी सर्व देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात अजून पुष्कळ स्तिती सुधारायची आहे . पण तरी सुद्धा अशा संस्था निघाल्या मुळे आर्थिक परिस्थिती हि सुधारू शकते आणि त्यांनी सुधारून इथे नंदनवन उभं केलं आहे हे पाहून मला खरोखर फार आनंद झाला . पण हे लक्षात ठेवलं पाहिजे कि नुसती आर्थिक परिस्थिती सुधारून सगळं ठीक होत नाही . आम्ही परदेशात फिरत असतो आणि माझ्या बरोबर चौदा देशातले परदेशी पाहुणे इथे आलेले आहेत . अर्थात ते इथे नाहीत साताऱ्याला सरळ गेले ,पुढल्या वेळेस त्यांना इथे घेऊन येईन . त्या लोकांना पाहिल्यावर हि गोष्ट लक्षात येते कि आर्थिक परिस्थिती जरा ठीक झाली तर माणूस वाईट मार्गाला लागतो . त्याच लक्ष मग अशा मार्गावर जात कि जिथून त्याच पतन सुरु होत . ह्या देशांची स्तिथी जरी वरून चांगली दिसते कारण यांच्या जवळ चांगली घर आहेत ,मोटारी आहेत ,सगळी व्यवस्था आहे दळणवळणाची ,काही अशे हालअपेष्टा नाहीत. पण तरीसुद्धा यांच्या मनाच्या Read More …

Public Program Pimpri, Pune (India)

आता आपल्या समोर श्रीमती उमाशंशी भालेराव यांनी इतकं सुंदर भजन म्हंटल आहे , कि त्या भजना मध्ये जे काही सांगायचं ते आधीच सांगून टाकलेलं आहे . तुम्हा सगळ्यांच्या तर्फे आणि इथे जमलेल्या सहजयोगांच्या तर्फे ,पिंपरीच्या सर्व सहजयोग केंद्रांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानते . आणि परत परत असं सुश्राव्य भजन भाषणा ऐवजी ऐकायला मिळेल अशी मला आशा आहे . कारण मी भाषण देऊन देऊन आता कंटाळून गेले आहे . आणि किती भाषण दिली तरी ती डोक्यात केव्हा येणार आहेत असा विचार येतो . सहजयोगा बद्दल अनेकदा पिंपरीला प्रोग्रॅम झाला आणि आपण सर्व मंडळी तिथे आला होतात . त्याच्यावर आपण विचारविनिमय केला आहे .  सहजयोग म्हणजे तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे . सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला ,असा हा योग तुम्हाला प्राप्त करण्यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी परिस्थिती आता आलेली आहे . सहजच ते घडत सुद्धा म्हणून मराठीत सहजला दोन अर्थ आहेत सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला आणि सहज म्हणजे अगदी सहजगत्या ,विनासायास . आणि जे आपल्या बरोबर जन्मलेलं आहे ते सगळं सहज आहे . आपल्या डोळ्यांनी आपण काही बघतो ते किती सहज बघून आपण जाणतो कि हे काय आहे . कानांनी आपण ऐकतो ते किती सहज जाणतो कि ते किती सुश्राव्य आहे . अशा प्रकारे सहजयोग सुद्धा अत्यंत सहज असून तो तुमच्या बरोबर जन्मलेला एक योग आहे . आता हा सहजयोग प्रत्येकाला उपलब्ध का व्हावा हे पुष्कळांनी विचारलं . कारण पूर्वीच्या काळी  कुंडलिनी जागरण म्हणजे  काहीतरी बागुलबुवा होता . अशी सगळ्यांनी कल्पना केली होती . कुंडलिनी जागरण म्हणजे काही सोपं काम नाही ,कुंडलिनी जागरण व्हायचं म्हणजे काही काही प्रकार होतात . सहावा अध्याय म्हणजे Read More …

Devi Puja, Republic Day Pune (India)

Republic day puja, Devi puja, Pune India, 26/01/1985 आज आपला फार मोठा दिवस आहे परत वसंत पंचमी पण आहे , त्यातून आज राखी पण आहे .हा दिवस दिसेल म्हणून किती लोकांनी तडफडाट केला किती लोकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला होता .किती तरी गोष्टी अशा झालेल्या आहेत पण आपण मात्र अजून त्या स्तिती ला आलो नाही जिथे आपण जाणू कि हा देश मोठ्या मेहनतीने ,त्यागाने  लोकांनी जिंकलेला आहे या देशात सुद्धा जेव्हा आपण बंड पुकारलं तेव्हा गांधीजींनी असा विचार केला कि या देशाची जी खरी संपत्ती आहे ती आत्मिक आहे आणि आत्मबळ हे हिंसेत नसून अहिंसेत आहे .म्हणून त्यांनी अहिंसेवर सगळं उभारलं .कोणाची हिंसा न करता आपण हा देश जिंकलेला आहे .जेव्हा असं झालं तेव्हा हे आपल्या लक्षात आलं नाही कि हि जी आपल्याला एव्हडी मोठी संपत्ती मिळालेली आहे ,हा जो आपल्याला ठेवा  मिळाला आहे हा जो आपल्याला शिरा मिळाला आहे हा कोणच्या कोंदणात बसवायचा .तर त्याचे जे कोंदण आहे ते या मातीचेच असले पाहिजे आणि ह्या मातीच जे कोंदण आहे ते आत्मबलाच कोंदण आहे .आपल्या जवळ दुसरं काही नाही .या देशाचं सगळ्यात मुख्य आहे म्हणजे  साऱ्या जागाच जे तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मबलाच तत्व आहे .आणि त्या आत्मबळावरच आपण याची कोंदण बसवली पाहिजे .जो पर्यंत स्वातंत्र्याची कोंदण आत्मबळावर बसवली जाणार नाहीत तो पर्यंत या देशाचं कल्याण होणार नाही .पण त्यासाठी अशी मंडळी तयार केली पाहिजेत जी या आत्मबोधाला प्राप्त झाली .पण अजून मी असं बघते कि आत्मबोधाला प्राप्त झालेली मंडळी सुद्धा ,ज्यांनी आत्मबोध मिळवला आहे ते सुद्धा अजून अत्यंत कोट्या वृत्तीने वागत आहेत .आणि अत्यंत भांडकुदळ वृत्तीने राहत आहेत .त्यांच्या मधले जे प्रकार आहेत त्यांनी कालच Read More …

Welcome Talk Ahmednagar (India)

Welcome Talk 1985 01 25 Ahmednagar, Maharashtra, India. [English Transcript] Mr Pankay, the administrator of Municipal corporation of Ahmednagar, and other officers who are being very kind to host you to this beautiful function. And all the public from Ahmednagar. From all the Sahaja yogis abroad who have come all the way here, also the Sahaja yogis who are Indians, I would like to Thank administrator Mr Pankay for his kind invitation to this gracious occasion. [Clapping..]Tomorrow is a great day, in my life also, that it’s our republic day, we got our independence on the 15th of August, but we celebrate 26th as the republic day and as you know that my father, my mother, all my family sacrificed everything that they had to achieve this freedom. Even I, as you know, I have done my bit in this respect, and I have been a great leader of young students at that time. So, it is such a great thing to see this dream come true that without getting your freedom, your political freedom, you cannot ask for your spiritual freedom. Today, we don’t have Mahatma Gandhi with us, but if he was here, he would have supported Sahaja Yoga out and out. [Clapping..] As Mr Pankay has pointed out that it is our heritage of our culture which has kept us together, in this diversity, the unity is expressed because we have set certain basic fundamental ideas which are common, whatever religion, whatever race we may have. One Read More …

Public Program Rahuri (India)

श्री पंडित राव जाधव ,गौतम पब्लिक स्कूल चे मुख्य संचालक ,उपसंचालक तसेच शिक्षक वृंद , फॅक्टीरीतले माननीय डिरेक्टर्स तसेच इथे जमलेले इतर ह्या शाळेचे सहाय्यक लोक ,सहजयोगी जे बाहेरून आलेले आहेत आणि इथे आहेत ते पण . सगळ्यात मुख्य म्हणजे इथे जमलेला हा सुंदर बालवृन्द . इतकी सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे प्रेमाची कि काय बोलावं ते च समजत नाही . प्रेमाला भाषा नसते हे मी जाणते . पण नुसतं इतकं हृदय भरून येतंय कि त्यांना शब्दात घालून कस सांगायचं ते मला समजत नाही . हि अबोध ,निष्पाप मूल इथं बसलेली आहेत हीच उद्या आपल्या या महान देशाची नागरिक सेना आहे . आपल्या देशांनी हजारो वर्षांपासून तपस्या केलेली आहे . आणि त्या तपस्वितेचं फळ म्हणजे अनेक संतसाधु ह्या भारताच्या सुंदर प्रांगणामध्ये आले त्यांनी आशीर्वाद दिला . लोकांना हिताचा उपदेश केलेला आहे . आता आपला देश प्रगतीपर होत आहे . आपण प्रगतीकडे वाढत आहोत . हि फार मोठी गोष्ट आहे कि देश जो कि ३०० वर्ष गुलामीत खितपत पडला होता तो आज स्वातंत्र्याच्या नवीन विचारांनी आज वाढत आहे .  ह्या वेळी मला शिवाजी महाराजांची आठवण येते , त्यांनी सांगितलं होत कि स्व च तंत्र ओळखलं पाहिजे . स्वतंत्र व्हा . तसच ज्ञानेश्वरांनी म्हंटल आहे जेव्हा त्यांनी पसायदानातून परमेश्वराला प्रार्थना केली तेव्हा सांगितलं कि आता विश्वात्मके तोषावे ,तोषोनि दयावे पसायदान . पसायदान म्हणजे काय ?त्यांनी सांगितलं कि सगळ्यांना आत्मबोध झाला पाहिजे . आत्मबोध होताच हातातून ज्या चैतन्याच्या लहरी वाहतात ते पसायदान . त्यांनी तो शब्द वापरला जो शिवाजी महाराजांनी वापरला होता “विश्व स्वधर्म सूर्य पाहो “, स्वधर्म सूर्य पाहो ,स्व म्हणजे आत्मा त्या धर्माचा जो सूर्य आहे तो ह्या विश्वानी पाहो असं एक सुंदर भाकीत Read More …

Public Program – Sugarcane Factory Rahuri (India)

कोळपेवाडी साखर कारखान्याचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष तशी इतर कारभारी मंडळी ,इथे काम करणारी सर्व मंडळी तसेच कोळपे वाडीत राहणारी सर्व अबालवृद्ध मंडळी ,सर्वाना आमचा नमस्कार . आजच्या या शुभ दिवशी श्री गणेशाचा जन्म झालेला आहे . आकाशामध्ये बघितलं तर सूर्य नसताना सुध्दा चंद्राची झाक अत्यंत सुंदर आहे . आणि त्या चंद्राबरोबर आज एक विशेष योग मी बघितला तो फार कमी असतो . तो म्हणजे शुक्र आणि मंगळ . चंद्रमा आपल्या योगशास्त्रात मानलेला आहे आणि म्हणूनच तो शंकराच्या डोक्यावर बसलेला आहे . छान असा तो चंद्र आणि शुक्र हि देवता आहे जी प्रेमाची शक्ती आहे . देवाच्या प्रेमाची शक्ती हि शुक्र आहे आणि मंगळ हे श्री गणेश ,अशी आज हि त्रिविध युती झालेली आहे . हे काहीतरी कोळपेवाडी हि विशेष जागा असल्या शिवाय होणार नाही .  तेव्हा ह्या भारतात तुम्ही जन्माला आलात हेच फार मोठं सुकृताचं लक्षण आहे . असं सर्व शास्त्रात लिहिलं आहे आणि पाश्चिमात्य देशात सुध्दा लोक मानतात कि भारतवासी म्हणजे काहीतरी विशेष लोक आहेत . आज आपल्याला सांगितलं कि माझे यजमान लंडनला फार मोठ्या पदावर नोकरीला आहेत . आणि जरी तुम्ही मला संत म्हणता पण मी एक गृहस्थातील बाई  आहे . आणि मी गृहस्थाश्रमातच सहजयोग थाटलेला आहे . त्यांच्या हुद्याला धरून मला पुष्कळ ठिकाणी जावं लागत . तेव्हा तिथले जे पंतप्रधान आहेत त्यांना भेटण्याचा खूप वेळा योग आला . तेव्हा त्या मला एकदा म्हण्याला कि तुमच्या देशामध्ये लोकांमध्ये असं काय आहे किज्याच्या मुळे  इतकं स्थैर्य त्यांच्या मध्ये आहे . स्थैर्य कुठून आलं आहे . आत्म्याचं बळ असल्याशिवाय इतकं स्थैर्य लोकांमध्ये येऊ शकत नाही . आमच्या लोकांमध्ये हे स्थैर्य नाही . आणि हि गोष्ट खरी आहे . Read More …

Public Program Deolali Pravara (India)

स्वधर्म सूर्य विश्व पाहो , स्व म्हणजे आत्मा . त्याच्या धर्माचा सूर्य सर्व विश्वानी पहिला पाहिजे . असं त्यांनी सांगितलं होत . शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे कि स्वधर्म जागवावा . शिवाजी महाराज सुध्दा एक साक्षात्कारी पुरुष होते . त्याशिवाय एव्हडं संतुलन एखाद्या माणसात येऊ शकत नाही . एव्हडा धर्म अंगात बाणवू शकत नाही . आणि इतकं संतुलन त्याच्या मध्ये होत ते येऊ शकत नाही . आणि त्यांच्यावर देवीची विशेष कृपा होती . त्यांनी सुद्धा स्वधर्म जोडावा ,नेहमी ते स्वधर्म जोडावा असं म्हणायचे . आता स्वातंत्र्य हा शब्द पण आपण पहिला तर स्व च तंत्र जाणणे हाच अर्थ होतो . स्व म्हणजे आत्मा त्याच तंत्र जाणल्या शिवाय आपल्या भारतात तरी काहीही साध्य होणार नाही . म्हणून भक्तीचे मार्ग काढले ,भक्ती करा ,परमेश्वरात रत राहा . वाईट मार्गाला जाऊ नका ,वाईट काम करू नका . त्याच्यात पण एकांगी पणा करायचा . भक्ती म्हणजे भक्ती . म्हणजे एखाद्या घाण्याला बैल बांधावा आणि त्याला झापड घालावी तशी आपण गोलगोल त्यालाच फिरत आहोत .  तेव्हा संतांनी स्पष्ट लिहिलं आहे कि जगामध्ये तीन तऱ्हेच्या प्रवृत्या आहेत . एक असते ती तामसिक दुसरी असते ती राजसिक आणि तिसरी जी उत्तम असते ती सात्विक . तामसिक लोक जे आहेत ते एखाद्या कोणत्या तरी चुकीला धरून बसतात किंवा कोणत्या तरी एका कडेला जातात आणि ते धरून तेच तेच करत बसतात . म्हणजे ती तामसिक वृत्ती . आता आपल्या कडे कोणत्याही गोष्टीला धरलं म्हणजे उपास करायचा म्हणजे सगळे दिवस उपास करायचा . हे कुणी सांगितलं आहे . देवांनी तर सांगितलं नाही ,कुठेही तुम्ही शास्त्रात  आधार दाखवा मला ,तुम्ही उपास करा देवाच्या नावाने असं लिहिलेलं नाही . Read More …

Devi Puja: On Leadership (Morning) Rahuri (India)

Talk about leadership, Rahuri, Maharashtra, India, 22nd January 1985. (English/Marathi) English Transcript …and this is the place where my forefathers reigned as kings, and they had a dynasty also. Now, the other place we went to, Musolwadi, is the place where the Goddess first of all hit him with a beam, so it is called as Musolwadi. It means a beam, ‘musol’ means a ‘beam’. So this is a place where [the] Goddess has done a lot of work. There is another place called Aradgao where he was running and he was screaming, so it’s called as arad. ‘Arad’ means ‘screaming’ (‘gao’ means village). So the whole place is already very much vibrated because also the Nathas, the nine Nathas — we saw one Ganifnath there — but all of them lived in this area and worked very hard. The last of all, Sainath, was very near here, as you know, in Shirdi. So this is a very, very holy place and a place of great worship where many a times the Goddess was worshipped. Rahuri itself, if you go round, you find there are nine deities sitting there. These are also created by Mother Earth. They are beautiful things. No one knows about them. You can go and have a look. There are nine of them and these represent the nine incarnations of the Goddess, or nine styles of the Goddess. Now, in this beautiful place we are here, though it is spoiled by many things, but, as you Read More …

Public Program Sonai (India)

Public Program, Sonai (India), January 21st, 1985 सोनाईचे सहजयोगी तसेच सोनाईचे भक्त लोक, सत्याला शोधणारे सर्व जीव, सर्वांना आमचा नमस्कार. सहजयोग आज आलेला आहे अशातली गोष्ट नाही, अनादी काळापासून सहज योगाची क्रिया घडत आहे. रामचंद्राच्या वेळेला राजा जनकानी नचिकेतला आत्मबोध दिला असे म्हणतात, त्यानंतर इंद्राला सुध्दा आत्मबोध घ्यावा लागला. म्हणजे जोपर्यंत आपल्या आत्म्याचा बोध आपल्याला होत नाही, तोपर्यंत आपण अर्धवट आहोत. बुद्धासुद्धा जेंव्हा एक राजपुत्र म्हणुन जन्माला आले, तेंव्हा त्यांच्या लक्षात अशी गोष्ट आली की मानवाचा जीव, मानवाचे आयुष्य हे अपूरे आहे. त्याची बुद्धी ही अपूरी पडते. म्हणून काहीतरी ह्याच्या पलीकडे असले पाहिजे, ज्याच्यामध्ये सुख आहे, ज्यांच्यामध्ये आनंद आहे आणि तो आनंद म्हणजे कधीही संपत नाही. असा कधीही न संपणारा आनंद कुठेतरी असलाच पाहिजे, अशा शोधात बुद्धसुद्धा फिरले आणि  शेवटी एक दिवशी ते असे एका झाडाखाली आरामात पडले होते थकून – त्या वेळेला सहजच त्यांची कुंडलिनी जागृत होऊन त्यांना आत्मबोध झाला. अशाप्रकारे आपल्या देशात अनेक लोकांचा आत्मबोध झालेला आहे. तसेच पुष्कळांना जन्मत:च हा आत्मबोध मिळालेला सुध्दा असतो. पण तरीसुद्धा असे साधुसंत फार कमी झाले. अशी फार अवतरण कमी झालेली आहेत आणि त्यामुळे लोकांना असे वाटते की हे काही आपल्या ह्याचे नाही, हे जनसाधारणासाठी नाही. पण आजचा सहजयोग हा समजोंमुख आहे. समाजाकडे लक्ष आहे. कारण ही जी क्रिया आहे ती पूर्वी एक दोन लोकांनाच साध्य होती आणि जे एक दोन लोकच म्हणवून मोठ्या पदाला पोहोचत असत ते आज सगळ्यांना उपलब्ध झाले पाहिजे अशी मला लहानपापासून इच्छा होती आणि म्हणून ती कशी उपलब्ध करून द्यायची, त्याच्यामध्ये काय लोकांना त्रास आहे, कशामुळे लोकांना ही मिळत नाही, ही ज्ञानाची गुरुकिल्ली का मिळत नाही याचा Read More …

Public Program (morning) Musalwadi (India)

मुसलवाडीच्या सर्व गावकऱ्यांना आमचा नमस्कार .  आपल्या देशामध्ये आपण अजून पुष्कळ अंधारात आहोत . ते अजून आपण समजून घेतलं पाहिजे . आपल्या देसाची अशी दुर्दशा का म्हणून लोक विचारतात . हि मोठी भारी योग भूमी ,महाराष्ट्र म्हणजे फार मोठी पुण्य भूमी आणि संतांची भूमी . हे सगळं असताना आपल्या देशाची अशी दशा का होती आहे . आता आम्ही गेलो होतो एका खेडेगावात त्याच नाव कोमलवाडी आणि तिथे कानिफनाथांची समाधी आहे . असं लोकांनी शोधून काढलं . ते सहजयोगीच शोधून काढू शकतात . कारण चैतन्याने कळत . आता आम्ही जस मुसलवाडीला म्हसोबाचं स्थान आहे हे शोधून काढलं ते सुध्दा चैतन्याच्या दमावर . आणि तिथे बघितल्यावर एकदम दुष्काळ ,भयंकर परिस्तिथी .लोक अगदी वाईट मार्गाला लागलेले काही विचारू नका ,असं वाटलं कि नरकात आपण आलो कि काय . आणि जिकडे पहाव तिकडे म्हणून काही हिरवं असं दिसतच नव्हतं . त्यांनी सांगितलं पाच वर्षातून एकदा पाऊस पडतो आणि पडला तरी थोडा पडतो . आता हिवाळ्यात हि स्तिती तर उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी पण मिळणार नाही . मग एकानी प्रश्न विचारला कि माताजी हे एव्हडे कानिफनाथ इथे असताना ,एव्हडं त्यानी इथे काम केलं मग अशी स्तिती का ?प्रश्न येतो कि नाही कि देवाचं एव्हडं साम्राज्य आहे तर मग लोकांना एव्हडा त्रास का होतो आहे . म्हणजे कारण असं आहे कि कानिफनाथांना फार छळल इथल्या लोकांनी . ते जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांना छळल ,तो मुसलमान ,अमका ,ढमका म्हणून त्यांचे नुसते हाल करून टाकले . त्या शिवाय असं म्हणतात कि त्यांना मारून टाकलं . म्हणून त्या अशा दुसऱ्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला . कुणीतरी तिथे समाधी बांधली पण ती समाधी बघून तर मला रडू कोसळलं . त्याच्यावर थोडे बहोत Read More …

Public Program Sangamner (India)

संगमनेरचे सहजयोगी तसेच संगमनेरचे रहिवासी आणि आसपास च्या गावातून आलेल्या अशा सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार . मी आधीच म्हंटल आहे कि सत्यशोधक असायला पाहिजे . ज्यांना सत्य शोधायचं असत ते सत्य शोधल्या शिवाय चैन घेत नसतात . अनेक जन्म जन्मांतरातलं जे आपण पुण्य गाठलेल आहे ,सत्य शोधताना आपण ज्याज्या गोष्टी मान्य करत गेलात आज त्याच्याच पुण्य प्रतापाने आपला जन्म या आधुनिक काळा मध्ये या महान थोर योगभूमीत भारत भूमीत झालेला आहे . हि भारत माता योगभूमी आहे . योगभूमी म्हणजे इथे जन्मलेल्या मनुष्याला योग प्राप्त होऊ शकतो फार सहज . त्याला कारण या देशा  मध्ये अनेक संतसाधु झाले . कित्येक अवतरण झाली . विशेष करून महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे स्वतः रामचंद्र सुध्दा अनवाणी आणि साक्षात सीता देवी हि सुध्दा इथे अनवाणी चाललेली आहे . अशा या पुण्य भूमीत आपला जन्म झालेला आहे . आता येताना मी कोमलवाडी म्हणून गाव आहे तिथे बघायला गेले होते . फार भयंकर दुष्काळ ग्रस्त असे ते गाव आहे . जवळ पासची बरीच खेडी तशाच स्तिथीत आहेत . ओसाड पडलेली . तिथे मला कळलं कि कानिफनाथांची समाधी आहे . त्या समाधीची स्तिती बघून मला इतकं आश्चर्य वाटलं कि एव्हडा महान आत्मा या ठिकाणी स्तीत आहे आणि त्याच्या कडे कोणाचंच लक्ष नाही . कुणीतरी प्रश्न विचारला कि माताजी एव्हडे मोठे महात्मा इथे झाले मग ह्या लोकांची स्तिती अशी खराब का . तर मी असं सांगितलं कि ह्या साधुसंताना आम्ही लोकांनी फार छळलेल आहे ,त्यांना मुसलमान म्हंटल ,त्यांना मारलं . इतकं लोक म्हणतात कि त्यांना मारून नाही टाकलं . त्यांना खायला प्यायला सुध्दा पाणी दिल नाही . पण तसाच एखादा भामटा आला जेल मधून सुटून ,आणि त्यांनी जर ढोंग केलं आणि तो जर भगवे वस्त्र घालून आला कि लागले Read More …

Public Program Komalwadi (India)

कोमलवाडीचे सहजयोगी तसेच इथले व्यवस्थापक ,इथले सगळे रहिवासी ,तसेच आसपास च्या गावातून आलेले सर्व भक्तजन ह्या सर्वाना आमचा नमस्कार . भारताच्या खेडेगावातच भारताचा आत्मा राहतो . शहरात रहात नाही . खेडेगावातूनच भारत उठवला पाहिजे . जी जागृती करायची ती खेडेगावातच करायला पाहिजे . शहरातून प्रगती करून काही फायदा होणार नाही आहे . हि गोष्ट अनेकदा अनेक पुढाऱ्यांनी सांगितली . तरी सुध्दा पुष्कळांना ती गोष्ट समजलेली दिसत नाही . त्यामुळे अजून सुध्दा आपल्या खेडेगावची स्तिती पहिली कि माझं हृदय अगदी भारावून जात . आणि काय बोलावं आणि काय बोलू नये हेच समजत नाही . कानिफनाथांची इथे समाधी आहे हे समजल्यावर माझ्या लक्षात आलं कि हि जागा आमच्या मोक्याची आहे . कारण आमचा त्यांचा फार संबंध आहे . ते आमचेच आहे म्हंटल तरी चालेल . आमची त्यांची जात एक आमचं त्यांचं सगळं काही वागणं ,विचार सगळं एक आहे . तेव्हा त्यांच्या गावी येन भाग्याच आहे . त्यातून तुमचं हे विशेष सुकृत दिसत ह्या गावी तुम्ही जन्माला आलात . हि पुण्य भूमी जिथे त्यांच्या सारख्यांच्या वास राहिला . ते इथे पायी हिंडले ,फिरले ,गरीबांची सेवा केली . परमेश्वराच्या आशिर्वादाला सगळ्यांना साक्ष म्हणून ते इथे आले होते . अशा महान व्यक्ती इथे तिथे हिंदुस्तानात राहिलेल्या आहेत ,पण त्यांची आपल्याला ओळख नव्हती ते जेव्हा जिवंत राहिले तेव्हा त्यांना सगळ्यांनी त्रास दिलेला असणार . त्यांना कुणी मानलं नसणार . कुणी मुसलमानातून आले तर कुणी हिंदूंतून आले तर त्यांना म्हणायचं तुम्ही मुसलमान ,हिंदूंतून आले तर त्यांना म्हणायचं तुम्ही हिंदू . अशी नसती भांडण करून, लहान लहान गोष्टीन कडे लक्ष देऊन ,ते काय खातात ,ते काय बोलतात असतंस बघून ,त्यांचं जे भव्य स्वरूप होत ते बघायचं नाही आणि कोणत्यातरी लहान गोष्टीत अडकून Read More …

Public Program Kamhala (India)

 कामहाला गावचे सरपंच साहेब तसेच उपसरपंच ,नंतर इथली जी सेवक मंडळी आहेत ,इथले रहिवाशी आहेत सगळ्यांना आमचा प्रणिपात . हि हनुमानाची जन्मभूमी आणि अंजनी देवीचं  हे स्थान  आहे . त्यामुळे त्या वेळच वर्णन करावं तितकं थोडं आहे . आम्ही सहजयोगा मध्ये अंजनी देवींना महासरस्वतीच स्थान मानतो . फार उच्च स्थानावर आहेत त्या . जी परमेश्वराची शक्ती जी आदिशक्ती जिचे तीन अंग आहेत पैकी जीनी सर्व सृष्टी रचली ती महासरस्वतीची शक्ती आहे . आणि तीच अंजनी देवी आहे असं आम्ही मानतो आणि ते खर आहे . आता त्यांचा इतिहास सांगायची आज वेळ नसली तरी त्यांच्याच कृपेने आणि हनुमानाच्या आशीर्वादाने च आज मला इथे येता आल . त्याबद्दल आता परत दिलगिरी दाखवली पाहिजे कि मी त्या दिवशी म्हंटल होत त्या दिवशी येऊ शकले नाही ,पण आज हि संधी मिळाली आणि तुम्हा सर्वाना भेटून मला आज फारच आनंद झाला आहे . बघितलं म्हणजे अगदी जीव भरून येतो . आणि काय बोलावं आणि कस सांगावं ते समजत नाही . कि आपल्या देशाची काय हालाखीची स्तिती आहे ती लोकांना काही माहीतच नाही असं वाटलं . ते बघतच नाहीत कशे लोक राहतात त्यांची राहणी खाणी कशी आहे ,घरदार कशी आहेत ,कशा परिस्तितीत राहतात ,कस तरी आयुष्य काढून राहिले . ओसाड जमिनी पडलेल्या आहेत ,त्यांनी तरी काय करायचं कस जगायचं ?. पण तिकडे कुणाचं लक्ष दिसत नाही मला वाटत . म्हणून एकच मी असा प्रयोग करायचा ठरवला आहे . तो जर जमला तुमच्या ह्या गावच्या जमिनीत ,जर ती मिळाली वेळेवर, तर पंचानी वैगेरे ठराव ठरवून त्यांची कबुली दिली असली तरी अजून ते व्हायला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही पण जर का Read More …

Public Program, Rudhigat hone hi tamasik pravrutti ahe Nashik (India)

Rudhigat Hone Hi Tamasik Pravrutti Aahe Date 18th January 1985: Place Nasik Public Program Type सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार असो! नाशिकला आजपर्यंत अनेकदा येणे झालेले आहे आणि पूर्वजन्मी नाशकात काही वेळ घालवलेला आहे. पण त्या जन्मात आणि ह्या जन्मात इतके अंतर आलेले आहे, की हे क्षेत्रस्थळच आहे की काय आहे? अशी मला शंका वाटू लागते. इतर ठिकाणी खेडेगावात जिथे श्रीरामचंद्रांनी पायसुद्धा ठेवले नव्हते, लोकांमध्ये धर्माची जाणीव, धर्माची चुणूक आणि कुशाग्रता जास्त आहे आणि नाशिकमध्ये एवढी का कमी आहे, याचा मी अनेकदा विचार केलेला आहे. त्याला कारण असे आहे मला वाटते, क्षेत्रस्थळी अनेक रूढी बांधल्या जातातच. कारण पोटभरू लोक, ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ते काहीना काही तरी अशा रीतीचे प्रबंध आणि दंडक बांधत असतात, की त्याने माणसं त्यात गोवली जातात. जसं एखाद्या बैलाला घाण्याला जुंपतांना आपण झापड घालतो, तशीच अशा ठिकाणी झापड लोकांना बांधली जाते आणि त्या झापडीत ते असेच गोल गोल फिरत असतात. त्यात आपली काही प्रगती झाली की नाही ते बघत नाहीत. त्यामुळे जिथे श्रीरामांचा वास झाला, जिथे शूर्पणखेला एवढे अपमानित केलं गेलं त्याच ठिकाणी अशा गोष्टी का घडाव्यात? ह्याचं मला वारंवार आश्चर्य वाटत होतं . पण एकंदर आराखडा घेतांना असं समजलं, की रूढीगत होणे, ही खरोखर तामसिक प्रवृत्तीच्या लोकांना असते. आपल्यामध्ये बहुतके करून राजसिक आणि तामसिक प्रवृत्तीचे लोक असतात. त्यापैकी राजसिक लोक जे असतात ते वाईट काय, चांगलं काय ते बघत नाहीत. वाईट काय आणि उत्तम काय ते त्यांना समजत नाही. पाश्चिमात्त्य देशामधील लोक राजसिक आहेत. त्यांना सांगितलं की तुम्ही धर्म करा तर तोही बरा, अधर्म करा तर तोही बरा. हेही चालेल आणि तेही चालेल. त्यांना कोणतं चांगलं Read More …

Public Program (India)

Public Program,Vaitarna,India,16th January 1985 की ह्यात काहीतरी विशेष आहे. आपण जाणून घेतलं पाहिजे की ही मंडळी इतक्या लांबून इतक्या परदेशातून आली.  यांना इथे काय मिळतंय ते समजून घेतले पाहिजे. असा थोडासा आपण समजुतदारपणा ठेवला पाहिजे. <Pause >  कदाचित आम्हा लोकांच्या आर्थिक परिस्थिती मुळे आम्हाला लोकांना हा विचार शिवत नसेल. पण काहीतरी विशेष असल्याशिवाय ही चौदा  देशातली  मंडळी इथे का येतात असा आपण एकदा जर  मनात विचार घेतला तर पुष्कळ गोष्टींचा आपल्याला पत्ता लागू लागेल. अजून आपल्याला  आपल्या धर्माबद्दलच माहिती नाहीये मुख्य म्हणजे. आपला धर्म जरी अनादी होताय,  भारतीय धर्म जरी अनादी होता तरीसुद्धा त्याची अनेकदा पुनर्रचना  कर करून, शेवटी सहाव्या शतकात “आदिशंकराचार्य”  हयांनी अवतरण घेतलं आणि या धर्माची पुनर्स्थापना पूर्णपणे करून कुंडलिनी योगा वरती  त्यांनी  पुष्कळ  पुस्तक लिहिली. कुंडलिनी शिवाय आता मार्ग नाही असं ‘उघडपणे त्यांनी  “सत्य उघडे करूनी  सांगितले”. तसंच श्रीकृष्णाने सांगितलं होतं  की तुम्ही स्थितप्रज्ञ झालं पाहिजे म्हणजे , तुम्ही आत्मसाक्षात्कारी  झालं पाहिजे. आपल्याला हा शब्द समजतो आत्मसाक्षात्कारी ,पण ते म्हणजे काय हे  माहिती नाही. ते आज लोकांना देण्याची पाळी आलेली आहे. <Pause > पण आपला विचार सखोल नसल्यामुळे जे परंपरागत आपलं चालू आहे तेच चालू आहे. म्हणजे आता टाळ कुटत  जायचं पंढरी पर्यंत. अरे, पण त्याने आपल्या आई-वडिलांना काही मिळाले नाही. आम्हाला काही मिळालं नाही.  का आम्ही  टाळ कुटली ?    पंढरीनाथाला भेटायला.  पंढरीनाथाला भेटणं  म्हणजे देवळात जाऊन नुसतं डोकं फोडून घेणे नव्हे. हे समजलं पाहिजे.  जरी आपण अशिक्षित असलो तरी एक गोष्ट लक्षात येते.  उलट अशिक्षित लोकांच्या लवकर लक्षात यायला पाहिजे की तिथे देवळात जाऊन नुसती जर आपण डोकीफोड  केली तर आपल्याला परमेश्वर  मिळणार आहे का Read More …

Makar Sankranti Puja Mumbai (India)

Makar Sankranti Puja Date 14th January 1985: Place Mumbai Type Puja आता तुम्हा लोकांना सांगायचं म्हणजे असं की इतकी मंडळी आपल्याकडे पाहणे म्हणून आली आणि त्यांना तुम्ही सगळ्यांनी एवढ्या ह्याने बोलावलंत, आणि त्यांची इतकी व्यवस्था केली. त्याबद्दल कोणीही, काहीही मला असं दाखवलं नाही की, आम्हाला अशी मेहनत पडली किंवा आम्हाला असा त्रास झाला. आणि मुंबईकरांनी विशेष करून फारच मेहनत केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या तर्फे, ह्या सर्वांच्या तर्फे मला असं म्हणावं लागेल, की मुंबईकरांनी फार आघाडी मारलेली आहे. पण जे ह्यांना सांगते तेच आपल्याला सांगते. आज आपण तिळगूळ देतो. कारण सूर्यापासून जे त्रास आहेत ते आपल्याला होऊ नयेत.  पहिला त्रास, सूर्य आला म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो. एक दुसऱ्याला उणंदुणं बोलतो. त्याच्यामध्ये अहंकार बळावतो. सूर्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना फार अहंकार आहे. म्हणून अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा मंत्र आहे, की ‘गोड गोड बोला. ‘ तिळगूळ घेतल्याबरोबर अंगात गरमी येते आणि लागले वसकन् ओरडायला. म्हणजे झालं! अहो, आत्ताच तिळगूळ दिला. निदान तेवढं तरी तुम्ही गोड बोला माझ्याशी. ते सुद्धा जुळत नाही. तिळगूळ घेतला नी लागले ओरडायला. कसला तिळगूळ तुमचा, फेका तिकडे. तेव्हा आजच्या ह्याच्यामध्ये आपण असं ठरवून घ्यायचं, की ही फार सुसंधी आहे. माताजी आल्या आणि माताजींनी आम्हाला कितीही सांगितलं तरी ते आमच्या डोक्यात जाणार नाही. जर आमच्या डोक्यात गरमी असली तर काहीही जाणार नाही. ही गरमी निघायला पाहिजे. आणि ही गरमी आपल्यामध्ये कुठून येते ? तर ती अहंकारामधून येते. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला, तेव्हा सगळ्यांच्या भांडाभांडी असायच्या. म्हणजे इथपर्यंत की डोकी फोडली नाही हे नशीब! बाकी डोकी शाबूत आहेत सगळ्यांची आता. पण भांडणं फार. कुणाचं कशावरून Read More …

Public Program (India)

1984-12-02 Public Program, Pen Village, Maharashtra India  पेणच्या सर्व भक्त आणि प्रेमी जनांना आमचे वंदन असो. मुंबईला सर्व कार्यक्रम ठरवण्यात आला, त्यात काही पेणची मंडळी आली होती आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी म्हटलं माताजी तुम्ही पेणला का येत नाही? आतूनच मला फार ओढ वाटली. मी म्हटले या वेळेला पेणला जायचं माझा प्रोग्रॅम ठरवा तुम्ही दोन तारखेला. ती ओढ का वाटली त्याचं आज प्रत्यंतर दिसलं. ओढ मलाही होती आणि ओढ तुम्हालाही, उशीरही झाला आणि वाटत होतं आणि म्हटलं हि सगळी तिष्ठत बसली असतील, पण हा प्रेमाचा सोहळा बघून सगळी काही माझी चिंता दूर झाली.  ह्या महाराष्ट्र भूमीच वैशिष्ट्य हे आहे, भक्तीचा इतका ठेवा आपल्याला संत साधूंनी देऊन ठेवलेला आहे कि जसं काही सगळीकडे भक्तीची फुलं विखुरलेली आहेत.  वृक्षाला सुरुवातीला एक दोनच फुलं येतात आणि त्यांना पुष्कळ  हालअपेष्टा आणि त्रास सहन करावा लागतो तसंच आपल्या संत साधूंचं झालं पण त्यांनी जी आपल्यासाठी मेहनत केली त्याची हि फळं आपल्याला दिसतात कि इतकी मंडळी भक्तिभावाने स्वतःचा आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी इथे एकत्र झालेली आहेत. आत्मसाक्षात्कार हा शब्द फार मोठा वाटतो आणि तो म्हणायला सुद्धा बराच वेळ लागतो. पण तुमची कुंडलिनी मात्र तत्क्षण, एका क्षणात जागृत होते. झाली पाहिजे. कारण जे फार महत्वाचे आहे ते अगदी सहजच घडले पाहिजे. आपण जो श्वास घेतो तो जर कठीण झाला किंवा त्यासाठी आपल्याला चार पुस्तके वाचावी लागली, किंवा सल्ला मसलत घ्यावी लागली तर किती लोक जिवंत राहतील. जे अत्यंत आवश्यक असे जीवनाला आहे, सर्वात महत्वपूर्ण जे आहे ते सहजच मिळाले पाहिजे. जर ते सहज मिळाले नाही तर ते कुणी मिळावूही शकणार नाही. सगळं संसारातील जेवढं झालेलं आहे. हि जी सृष्टीची रचना Read More …

Sarvajanik Karyakram Mumbai (India)

Sarvajanik Karyakram 29th November 1984 Date : Place Mumbai, Public Program ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सत्याच्या शोधात असणाच्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार! आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे की, प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे ? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द ‘प्रपंच’ हा काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. ‘प्र’ आणि ‘पंच’. ‘पंच’ काय तर आपल्यामध्ये जी पंचमहाभूते आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती ‘प्र’ लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. ‘प्र’ म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. ‘अवघाची संसार सुखाचा करेन’ असे जे म्हटले आहे ते सुख प्रपंचातच मिळायला पाहिजे. प्रपंच सांगून परमेश्वर मिळविता येत नाही. पुष्कळांची अशी कल्पना आहे की, योग म्हटला म्हणजे कुठे तरी हिमालयात बसायचे आणि गारठून मरायचे. हा योग नव्हे. हा हट्ट आहे. हट्टच नव्हे तर थोडासा मूर्खपणाच आहे. ही जी कल्पना लोकांनी धर्माबद्दल केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. विशेषकरून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत – होऊन गेले. त्या सगळ्यांनी प्रपंच केला फक्त रामदासस्वामींनी प्रपंच नाही केला. पण प्रत्येक दासबोधातून प्रपंच वाहतो आहे. ‘प्रपंच काढून कोणी परमेश्वर मिळवू शकत नाही’ हे त्यांचे वाक्य अनेकदा आले आहे . प्रपंचातून उठून आपण परमेश्वर मिळवायचा ही कल्पना बरेच वर्षापासून आपल्या देशात आलेली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. कारण बुद्धाला उपरती झाली, तो संसार सोडून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्याला आत्मसाक्षात्कार झाला. पण तो जेव्हा संसारात होता तेव्हाही त्याला उपरती झाली नसती अशी गोष्ट नाही. समजा आम्हाला दादरला जायचे आहे. तेव्हा आम्ही सरळ, धोपट मार्गाने तेथे पोहचू शकतो, पण जर आम्हाला इथून भिवंडीला जायचे आहे, मग तिकडून आणखी पुण्याला जायचे, आणखीन फिरून चार ठिकाणी मग Read More …

Birthday Puja, Be Sweet, Loving and Peaceful Mumbai (India)

Puja for the 61° Birthday (Be sweet, loving and peaceful), Juhu, Bombay (India), 22 March 1984. ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सर्व सहजयोगी मंडळींना, संतांना माझा नमस्कार असो! साठी उलटल्यानंतर वाढदिवस नसतो तो! एक एक दिवस कमी होत जातो आयुष्याचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून एक एक दिवस जेव्हा कमी होत आहे तेव्हा सुद्धा प्रगती त्यामानाने फार गतीमय झाली पाहिजे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढ्या उत्साहाने माझा वाढदिवस केला. फार उत्साह होता, फार प्रेम ! फार आनंद वाटला मला! सहजयोग्यांना या संसारात राहून सगळे कार्य करायचं असतं. मुलं-बाळं, घर -द्वार, आई – वडील सगळ्यांना सांभाळून सहजयोग करायचा असतो. मी तसंच करते. मी सुद्धा माझ्या घरातल्या सर्व लोकांना सांभाळून, सर्व भाऊ-बहिणींना सांभाळून, सर्व नातलगांना सांभाळून, माझ्या यजमानांना सांभाळून सगळ्यांना सांभाळूनच मी माझा संसार चालवून जगाचा संसार चालवते आहे. कोणालाही सोडायचं नसतं. तेव्हा हे काम कठीण आहे. कारण काही तरी मुलीला झालं, काही मुलाला झालं, कुठे काही बिघडलं, नवरा वाईट असला, काही असलं की बायका घाबरतात. पुरुषांच्या नोकरीत काही खराबी झाली, त्यांच्या पगारात कमी झाली, पैशाचा त्रास झाला, असं झालं, तसं झालं. त्याने पुरुष घाबरतात. तऱ्हेतऱ्हेचे असे प्रसंग येतात ज्याने मनावरती दडपण येऊ शकतं. पण अशा परिस्थितीतच सहजयोग बसवला पाहिजे. कारण तुम्ही जर पाण्यापासून दूर असलात आणि तुम्हाला तहान लागलेली असली तर त्याच्यात काही विशेष नाही आणि तुम्ही म्हणाल की आम्ही तहान मारतो, त्याला काही विशेष नाही . पण सगळीकडे पाणी असूनसुद्धा तुम्ही त्यातून अलिप्त राहू शकता, तेव्हाच तुम्ही खरे सहजयोगी आहात. तेव्हा पहिल्यांदा प्रापंचिक गोष्टी फार लोक मला येऊन सांगत असत. माझ्या आईचं असं आहे, माझ्या वडिलांचं तसं आहे, Read More …

Public Program in Shri Ram Temple (India)

Public Program in the Shri Ram Temple (Marathi), Phaltan near Satara, Maharashtra (India). 7 March 1984. फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार! आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याही पेक्षा जास्त उत्कंठतेने तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून जातो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की ‘बाबा, आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे ती दे.’ ही आपल्या देशाची खरोखरच हलाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही की तुम्हाला कळवायला की कसं पोहोचायचं? कसं झालंय. म्हणजे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही यावेळेला पोहोचू, त्यावेळेला पोहोचू, पाहोचले तर नशीब! आदळत, आपटत. एका शरीरात जर पोहोचले (काहीही इजा न होता) तर स्वत:ला मानायचं की बाबा पोहोचलो! पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे. आणि लोकांमध्ये एकतऱ्हेचे समाधान, शहाणपण आहे. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून आहोत. जर अशी स्थिती परदेशात कुठेही असती, तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असतं. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी आहेत आणि जसं असू दे बाबा, परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नांना ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते की नाही अशी सुद्धा मला शंका आली होती. आजचा विषय ‘सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती’ असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा Read More …

Public Program Kolhapur (India)

Public Program. Sadoli in the Kolapur area of Maharashtra (India). 5 March 1984. (Dots indicate that the content is unclear) सहजयोगी १ :   साडोलीच्या भूमीमध्ये आज हा अभूतपूर्व योगायोग आहे. महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली असे त्रिगुणात्मक कुंडलिनीचा अवतार माताजी आज तुम्हाला पावन करण्यासाठी आल्या आहेत.  नवीन पर्व आले.  नवीन विचार आले. भारत वर्षामध्ये,  भारत देशामध्ये फार मोठी योग भूमी समजली जाणारी.  फार मोठे योगी होऊन गेले. फार मोठे तपस्वी होऊन गेले.  विश्वामित्रासारखा,  राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिणारा,  महर्षी भूमी आहे.  तरीसुद्धा हा जो माताजींचा सहज योग आहे,  हा या जगामध्ये पहिलेच काम आहे कारण मला असं वाटतं लोकांनी भक्ती केली, जप केलं,  ग्रंथ वाचले,  पारायणं केली.  सगळा देश तूडविला. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत,  रामेश्वरापर्यंत पदयात्रा काढली.  तरी सुद्धा त्यांना दैवी शक्तीबद्दल जितकं समाधान मानायला पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि त्याच गोष्टींचा मी सुद्धा ………………………पण गगनगिरीनी सांगितलं……नाही.  योगी नाही व्हायचं.  संसार करून परमार्थ करायचा. राम राम करत रहा.  ठीक आहे.  श्रद्धा,  नम्रता अशा जोडीला, अशा तऱ्हेचा जोडीला विचार घेऊन मी जवळ-जवळ १७ वर्ष गगनगिरीनी सांगितलं ते केलं. अनेकदा प्रत्यय आला की माझी तळमळ होती ती काही नाही………. ही तळमळ माझ्या अंतकरणात होती जी समाधान देऊ शकत नाही.  परमार्थाच्या विचाराला,  हृदयाला समाधान मिळायला पाहिजे.  दैवी शक्तीने जे समाधान मिळायला पाहिजे ते मिळत नव्हतं.  तरीसुद्धा माझं भाग्य समजतो मी की मागील वर्षी ८३ च्या १ जानेवारीला १ तारखेला माझ्या १७ वर्षाच्या तपश्चर्येच्या फळाला फळ आलं आणि त्यादिवशी माताजींची आणि माझी गाठ पडून मी पार झालो. कुंडलिनी शक्ती जागृतीचा प्रयोग आणि पार झाल्यानंतर,  समाधान झाल्यावर माताजींकडे मी गेलो. माताजींकडे बघितलं.  माताजी मला बोलायचं आहे मी बोललो.  Read More …

Public Program (India)

महालक्ष्मी आणि त्याचे महत्त्व कोल्हापूर, ४/३/१९८४ कोल्हापूरच्या सर्व भाविक आणि श्रद्धवावान साधकांना आमचा नमस्कार! कोल्हापूरला आल्याबरोबर तब्येत खराब झाली, एक नाटकच होतं म्हटलं तरी चालेल. कारण आमचे सहजयोगी माताजींच्या शिवाय कुठे जायलाच तयार नाही आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर्वव्यापी शक्ती परमेश्वराची आहे, तुम्ही जाऊन प्रयत्न करा. माझा फोटो घेऊन जा. तुमच्या हातून हजारो लोक पार होतील. पण ते एका ग्रामीण भागात, शहरात नाही, विशेषकरून क्षेत्रस्थळी तर मुळीच होणार नाही. माझे वडील मला सांगत असत की क्षेत्रस्थळी श्रद्धावान फार कमी राहतात. बहतेक क्षेत्रस्थळी लोक पोटभरू, जे देवळावरती पैसे कमवतात किंवा त्यांना बघून बघून परमेश्वरापासून परावृत्त झालेले असेच. त्यांना असं वाटतं की देऊळ थे असून आम्हाला काय फायदा झाला आणि देवळात सुद्धा हे लोक बसून नुसते आपलं पोटं भरून राहिलेत. यांच्यातही आयुष्यात काही विशेष आहे का? त्यांचंतरी आयुष्य काही उज्वल आहे का? त्यांच्यात काही बघण्यासारखं आहे का ? हे एवढं देवीची पूजा करतात, पाच-पाच त्यांच्या आरत्या करतात, तरी यांच्यामध्ये काही बदल होत नाही, पण असा देव आहे तरी काय? आणि अशी देवी जर महालक्ष्मी आहे तर ह्यांची अशी भिकाऱ्यासारखी स्थिती का? त्यामुळे कोणताही बुद्धीजीवी वर्ग याला परमेश्वरापासून परावृत्त करतो. त्यांच्या मनात असा विचार येतो की परमेश्वर म्हणून कोणी शक्ती नाही ठीक आहे, एक देऊळ आहे, चला जाऊन येऊ ! आपले देवळात गेले, दोन पैसे घातले झालं काम! तेव्हा त्याची ती जी सूक्ष्म स्थिती आहे, त्याच्यातली जी सूक्ष्म शक्ती आहे ती कधीही त्यांना मिळत नाही. तसे ते फार भाग्यवान आहेत कारण क्षेत्रस्थळी जन्माला आलेले आहेत हे मोठं भाग्याचं आहे ह्याबद्दल शंकाच नाही. पण क्षेत्रस्थळामध्ये जी इतर गोष्ट व्हायला सुरुवात होते ‘अति Read More …

Puja, Achieve the power of Spirit within Rahuri (India)

Puja, Achieve the power of Spirit within, MARATHI TRANSLATION (English Talk) Scanned from Marathi Chaitanya Lahari आणि तिकडे देशात मी एवढे प्रयत्न करते, खूप कष्ट स्वस्थतेचे उगमस्थान आपला आत्मा आहे. घेते सर्वकाही तुमच्याबरोबर राहून करते तरी फारसे आपले चिते जेव्हा आपल्या आत्मसुखाकडे राहते तेव्हा बाह्यातील सुखोपभोग गळून पडतात. आपण कोठे यश येत नाही. पण येथे ते सहज प्राप्त करता. आपले राहतो, कोंठे झोपतो, काय खातो, कारय करतो याची चिता करत नाही. अशा बाह्य गोष्टीवरील लक्ष दूर आणि आता परत येथेच आलात असे वाटते, स्थलांतर करण्याचा प्रयत्न करा व आतील जाणीवा वरील लक्ष कायद्यामुळे या स्थितीत मला वाटतें तुम्ही इथेच तुमचे वाढवा. आपले घडाळ्याबरोबर धावण्याची आपली सवये (conditioning घालवण्यासाठीच तुम्ही येथे आलात. ही जीवघेणी धावपळ एकदाची थांबली पाहिजे, ती आपोआप थाबेल, जेव्हा ध्यानातून आपले चित्त तुम्ही स्वतःला घडवा. तिथे अनेक प्रयत्न करून फारसे आत येईल तेव्हा आतून शांतता मिळवाल, जी प्रत्येक मानवाला आवश्यक आहे, ज्यामुळे आपण सर्व जगाला विनाशापासून वाचवू. उध्वस्त जीवन विसरा, मला तुम्ही येथूनच तिकडे गेला आश्रम स्थापा, तुमच्या योजना इथेच राबवा. त्यामुळे तुमच्या येथे सतत येण्याने तुम्ही उन्नत व्हाल, येथे सतत ३/४ महिने राहून थोडी मिळकत जमवून येथे काही प्राप्त झाले नाही. आपल्या या सर्व दौर्यातून शेवटी हेच सिद्ध होते. इथले जीवन खडतर, रस्ते खडबडीत असले तरी आपण सर्वजण मजा घेत आहात. मी जेव्हा तुमच्या लक्षात आलेच असेल की सहजयोग वेगाने वाढत आहे. त्याने गती घेतली आहे. सर्व जगाला तुम्हाला पहाते, तुमचे सर्व काही व्यवस्थित आहे अधिक उत्तम व सर्व काही सुस्थितीत जमले आहे जसे घड्याळाची गुणवत्ता ठरविण्यासाठी त्यांना वाहत्या पाण्यात सोडले जाते नंतर तबकात टाकून जोरात हालविले Read More …

Shri Mataji at sugar factory reception after program (India)

Shri Mataji at sugar factory reception after program, Shani Shingnapur, India, 1984-02-25 सहजयोगी – यांची स्मरण शक्ती सर्व गेली होती  सहजयोगी – क्रायसिस ने सहा-सात टाके पडले होते  श्री माताजी – बरं  सहजयोगी – नऊ टाके पडले होते  श्री माताजी – अच्छा  सहजयोगी – complete परत पूर्वीसारखं  श्री माताजी -अ  सहजयोगी -अर्धी बॉडी श्री माताजी पॅरलाईज्ड (paralysed) झालती कम्प्लिट (complete )   श्री माताजी – कोणाची?  सहजयोगी -यांची  श्री माताजी -हो का ? सहजयोगी -आणि मी सहज नेत्रे वकील आहेत ते भेटायला म्हणून गेलो. आणि मी व्हायब्रेशन दिले तर हालचाल चालू झाली त्यांची नंतर आवडीने आले मला ऐकून होते (अस्पष्ट) करत होते ते म्हटलं एवढा सच्चा माणूस आहे तर या मनुष्याला परमेश्वर बरोबर मिळणार दिली जागृती मग त्यांना मग ते… श्री माताजी -एखादं पत्र त्या सकाळच्या मूर्खांना  लिहून टाका.  सहजयोगी- विस्मृती झाली होती. श्री माताजी- त्यांना म्हणे, आम्ही तुम्हांला पाच हजार रुपये देऊ मला जर तुम्ही आजार ठीक कराल तर आहो (श्री माताजी हसतात)) सहजयोगी -पाच हजार रुपये (सहजयोगी हसतात) श्री माताजी – असं मूर्खासारखं लिहून पाठवलं होतं. तुम्ही आता लिहून कळवा की, माझं सगळं ठीक केलेलं आहे. एकही पैसा घेतला नाही माताजींनी, एक कवडी सुध्दा घेतली नाही.  सहजयोगी – हिटलरला आत्मसाक्षात्कार दया असं म्हणण्यासारखं आहे.  श्री माताजी – अरे बापरे!  सहजयोगी – खिचडी आहे .  श्री माताजी- खिचडी सुध्दा आहे का ? मग झालं आजचं संबंध जेवणच संपवून टाका तुम्ही आमचं अं.  सहजयोगी- (हास्य) सहजयोगी – कोण आहे रे खाली? बोलणं झालं कशाला करताय मग त्यांनीच सांगितलं की, फराळ वगैरे काहीतरी केला पाहिजे. ठीक आहे आता काहीतरी पाहुणचार घेतला पाहिजे. Read More …

Public Program Sangamner (India)

Public Program, Kundalini and Bandhan, Sangmaner, India 24-02-1984 ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, श्री वटे साहेब तसेच संगमनेरचे सर्व भाविक साधक, सहजयोगी मंडळी सर्वांना आमचा प्रणिपात. आज विशेष्य करून फार क्षमा याचना करायची की इतका उशीर झाला. पण आजच एक प्रश्न उभा झाला आणि मला अहमदनगरला पहिल्यांदा जावं लागल. त्यामुळे इथ यायला इतका उशीर झाला तरी सगळ्यांनी उदार हृदयाने मला क्षमा करावी. इतका वेळ आपण वाट बघत बसलात त्यावरुन हे निश्चित आहे की आपण भाविक मंडळी आहात आणि आपण साधक आहात, परमेश्वराच्या शोधात आहात. आज पर्यंत ह्या भारत भूमीत विशेष्य करून या महाराष्ट्रात अनेक साधु संत झाले. श्रीराम सुद्धा या पवित्र भूमीवर अनवाणी चालले आणि त्यांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. त्या मेहनतीच्या वर्णनाला माझ्याजवळ शब्द नाहीत. त्यांना लोकांनी किती छळल, त्रास दिला त्यांना समजून नाही घेतल, त्यांची कोणत्याच प्रकारे मदत नाही केली तरी सुद्धा त्यांनी आपल कार्य अव्याहत चालवले. त्याला कारण त्यांना माहिती होत की एक दिवस असा येणार आहे की या भूमीवर असे मोठे मोठे लोक जन्माला येतील, जे पुण्यवान आत्मा असतील. मनुष्य पैशांनी मोठा होत नाही, यशाने मोठा होत नाही, सत्तेने मोठा होत नाही. कोणत्याही गोष्टीने मोठा होत नसतो पण ज्या माणसाला परमेश्वराची ओढ आहे, तोच खरा मनुष्य परमेश्वरी दृष्टीमध्ये मोठा असतो. आणि अशी परमेश्वराला शोधणारी अनेक मंडळी आहेत, जी आपल्या महाराष्ट्रात देशात विद्यमान आहेत. परमेश्वर हा आपल्या मध्ये, हृदयामध्ये आत्मा स्वरूप असतो अस सर्व संत साधूंनी सांगितलेले आहेत. ती सर्व साक्षात्कारी मंडळी होती आणि साक्षात्कारी मंडळींचे मुख्य म्हणजे अस असतं कि ते कोणचे  चुकीचे काम करत नाहीत. त्यांना सांगावे लागत नाहीत, त्यांच्यामध्ये धर्म जागृत असतो. ते धर्मातच असतात. त्यांना Read More …

Public Program – Rahuri School Rahuri (India)

फत्तेबादच्या या एज्युकेशन सोसायटी चे फार उपकार आमच्यावर आहेत असं वाटत मला .कारण पूर्वी हि मी फत्तेबदला आले होते आणि या ठिकाणी परत एकदा प्रोग्रॅम झाला तर बरा  अशी  माझी फार इच्छा होती .आणि त्या इच्छे प्रमाणे आज हे घडून आलं .त्या बद्दल या शाळेचे जे मुख्य अध्यापक आहेत त्यानं चे मी फार आभार मानते .तसेच इथले शिक्षक वर्ग ,विद्यार्थिनी आणि विध्यर्थी आणि फत्तेबाद शहरातील भाविक ,सात्विक अशी मंडळी या सर्वाना आमचा नमस्कार .आपल्या समोर सहजयोग म्हणजे काय आता व्यवस्तीत रूपाने चव्हाण साहेबानी मांडलेलं आहे . रस्त्याने चालताना कुणाशी बोलत नाही जस काही कुणी घरात मेल आहे ,सुतक पाळतात असेच ते वागत होते .तर त्यांना विचारलं तुम्हाला असं का वाटतंय ,तुम्ही दुःखी  का .तर ते म्हणतात आम्ही एव्हडी धावपल केली सगळं काही मिळवलं पण आमची चूक झाली नसेल ना काही  .तुकाराम बुवांनी कोणती चूक केली नाह ज्ञेनेश्वरांनी   कोणती चूक केली नाही आणि ते आनंदात होते म्हणजे त्यांच्या त काहीतरी आपल्या पेक्षा विशेष होत .हे लक्षात आणलं पाहिजे .आता आपली मी प्रतिज्ञा ऐकली फार आनंद झाला आणि मला अगदी आनंदाश्रू आले .संत साधू ज्या भूमीवर जन्माला आले आणि रामाला सुद्धा आपल्या पायातल्या वहाणा काढून अनवाणी चालावं लागलं अशी पुण्यभूमी बघण्या साठी म्हणून हे लोक आले पण आपल्याला मात्र त्याची कदर नाही .आपल्याला त्याची माहिती नाही .त्याला कारण असे आहे कि हि जी मंडळी येत आहेत त्यांना काहीतरी मिळालेलं आहे ;आणि जे मिळालाय त्यामुळे त्यांना समजत कि हि भूमी काय विशेष आहे .तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार भेटेल .नामदेवांनी सांगितलं आहे फार सुंदर  कि आकाशात पतंग उडते आणि मुलगा हातात पतंग उडवत आहे पण जरी Read More …

Public Program Rahuri (India)

Sarvajanik Karyakram Date : 22nd February 1984 Place Rahuri ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK राहरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील, तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण इथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायला मला बरं नाही वाटत. कारण सगळी माझीच मुलं आहेत. सगळयांना माझा नमस्कार ! दादासाहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखलं , की ह्या मनुष्याला लोकांबद्दल खरोखर कळवळा आहे. ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही, त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाज कार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं आहे , ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी. पण बहुतेक लोक समाजकार्य एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैसे कमवू. ते मला सगळे माहिती आहे. मी लहानपणापासून आपल्या देशाची स्थिती पाहिली आहे. तुम्हा सगळ्यांमध्ये माझे वय कदाचित जास्त असेल. माझे वडीलसुद्धा फार धर्मनिष्ठ, अत्यंत उच्च प्रतीचे समाजकर्ते, देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉ.आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री, अत्यंत मैत्री! जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं. सगळे काही. मी ह्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळच नातं त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. आणि अत्यंत तेजस्वी, उदार असे ते होते. माझे वडील गांधीवादी होते आणि हे थोडेसे गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे. संघर्षाची जरी गोष्ट म्हटली, तरी आपापसात अत्यंत मैत्री होती. फार मैत्री! माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी, विचारायला, कसं काय चाललं आहे ? ठीक आहे की नाही? अशा सर्व मोठ्यामोठया लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेले आहे. मी गांधी आश्रमातही वाढले आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे Read More …

Public Program (India)

Public Program in Anjaneri, the birthplace of Shri Hanuman (Marathi). Maharashtra (India). 19 February 1984. श्री हनुमानांनी मिळवलं होतं, जसं अंजनी देवी नं मिळवलं होतं. त्या अंजनी देवी सारखं, हनुमानासारखं, जर आपण आपल्या हृदया मध्ये बसलेल्या आत्म्याचं दर्शन घेतलं, जर आपल्याला आत्म साक्षात्कार झाला तर आपल्या पुढे कोणाताही प्रश्न उभा राहणार नाही. सर्व, दुःख, दैन्य, दारिद्र्य दूर होऊ शकतं. आपल्या मध्ये अनेक तत्वे आहेत, ती अजुन झोपलेली आहेत, ती जागृत व्हायला पाहिजे. ती जागृत झाल्या शिवाय, आपल्याला काही अर्थ लागलेला नाही. म्हणजे असं आहे की, अजून आपला संबंध परमेश्वराशी झालेला नाही. जो पर्यंत आपला संबंध परमेश्वराशी होत नाही तेव्हा आपण त्याच्या साम्राज्यात कसे येणार.आणि त्याचं जे काय वरदान आहे ते आपल्याला कसं मिळणार. म्हणून आपला संबंध परमेश्वराशी झाला पाहिजे, आणि सातत्याने राहिला पाहिजे, हे मुख्य गोष्ट आहे की तो सातत्याने राहिला पाहिजे. परत उगीचचं आपण जर सारख विठ्ठलाला बोलवलं, आणि तो जर धत्त येऊन उभा जरी झाला तरी तुम्ही ओळखणार कसे त्याला, तेव्हा जी अपरा भक्ति आहे, जी परमेश्वराला न पाहता, न जाणता केलेली भक्ति आहे. तिच्या फळाला आज आमचा सहजयोग. ( श्री माताजी थांबले आहेत) गणेशाला आपण म्हणतो की सहज पडलो प्रवाही तेव्हा तू मोक्षाच्या वेळेला आमचं रक्षण कर. ती मोक्षाची वेळ आज आलेली आहे ती गाठून त्यात सातत्याने आपण राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही, परमेश्वराला पैसे कशाशी खातात ते माहित नाही. हे पुष्कळ लोकांना माहित नसेल की परमेश्वराला पैसा काय आहे ते समजत नाही. आता आम्ही खेडे गावात गेलो आणि त्यांना सांगितले हे बघा तुम्ही आम्हाला पैसे वगेरे काही द्यायचे नाही, तर ते म्हणतात बर Read More …

Public Program (India)

Music, dance, Public Address at Vaitarna Temple (Marathi/English). Vaitarna (India) , 18 February 1984. आज मला फार आनंद झाला तुम्ही सगळे आलात परत आणि आज तुमच्यात चेतना आलेली दिसते .फार फरक झालेला आहे .मागच्या वेळे पासून ह्या वेळेला सगळ्या मुलांच्या हातात थंड थंड व्हायब्रेएशन दिसतात .त्यांच्यात  फार जागृती झालेली दिसते आहे .चेहरे बदलेले दिसले .आणि बायकां न च्या चेहऱ्यात सुद्धा तेजस्विता दिसली .पुरुष पुष्कळ सुधारलेले दिसले .सगळ्या न मध्ये एकूण आशा जशी चमकावी तस डोळ्यामध्ये आशेच तेज चमकू राहील आहे .हे पाहून फार आनंद झाला .आपल्या देशाचे दुर्दिन होते ते बदलण्याचे दिवस आलेले आहेत .सगळं काही भलं झालेलं आहे .सगळं दारिद्र्य ,दुःख सगळं काही बदलणार आहे .हे बदलच पाहिजे .त्याच्या साठी आपल्याला योग मिळवला पाहिजे .तो तुम्ही मिळवला ,आणि हळू हळू तुमच्या लक्षात येईल कि तुमच्यात केव्हडा बदल झाला .तुमच्या वातावरणात केव्हडा बदल आला .तुमच्या परिस्थितीत किती बदल झाला .आणि संबंध जी काही आपली जी मनस्थिती होती जी अत्यंत दुःखात राहत असे त्याच्यात किती समाधान आलं .ते समाधान तुमच्या हृदयात बसलेल्या आत्माराम च आहे .ते समाधान तुम्ही अनुभवावं त्याचा आनंद घ्यावा ,आणि त्या आनंदात तुम्ही डुंबत राहावं हीच माझी इच्छा आहे .आज सगळ्यांना फार आनंद झाला सगळे फार खुश झाले आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं कि तुम्ही लोक सुद्धा इतक्या एकजुटीने तिथे आलात ,सगळे जण नाचला त ,सगळ्यांनी आनंदानी जयजयकार केला .आता हे लोक पूर्वी आपल्या देशावर राज्य करत होते .तेव्हा त्यांना आपली काही कदर नव्हती .तेच आज तुमच्या चरणावर आलेत इथे ,तुम्हाला भेटायला आलेत .तुमच्यावर प्रेम करायला आलेत ,तुम्हाला सुख द्यायला आलेत ,तुम्हाला ओळखायला आलेत .आणि त्यांना वाटत कि तुम्ही किती मोठ्या अशा भारतभूमी तल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीत  या Read More …